Skip to main content

लेख

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

" माझी माय .......!!"

लेखक जेनी... यांनी शनिवार, 07/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
काय कमावलं अन काय गमावलं ,ह्या एकाच प्रश्नाच उत्तर माणूस शेवट पर्यंत शोधत शोधतच वाट चालत रहातो .काही वळणावर थांबतो विसावा घेतो अन पुन्हा चालू लागतो .बस फक्त चालताना कुणाच्यातरी मायेचा हात ,कुणाच्यातरी प्रेमाची साथ एवढ मात्र कायम सोबत राहावं अशी अपेक्षा न चुकता करतो .माझ्याही पाठीवर असाच एक हात ,अशीच एक साथ , माझ सर्वस्व ,माझी माय .. अजून आठवतो ,बाबा गेले तो दिवस .मला जास्त कळत नव्हत पण माईच्या डोळ्यातन वाहणारे दुखाचे लोट , वाफाळणारे अश्रू माझ्या गालावरण खाली वाहत होते .माईला घट्ट मिठी मारून बसलो होतो मी कारण माई सारखी बाबांच्या छातीवर जोरजोरात मारत होती .मला जाम भीती वाटली तेव्हा .माईच्या

मारवा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/04/2012 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

फायली : एक दाबणे !

लेखक यकु यांनी मंगळवार, 03/04/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012 http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार. -------------------------------------- जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे. मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?

ती

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 29/03/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांचे मला माहीत नाही, पण मला ती फारच हवीहवीशी वाटते. तिच्यात काय आहे एवढे? अहो, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे असे कुठे आहे? मला मात्र ती आवडते. विशिष्ट वेळ झाली, संकेत झाला की मला तिच्या येण्याचे वेध लागतात. मन अनावर होते. शरीर बंड करू लागते. अर्थात, मी काही तिला मोबाईल उचलून हाक घालत नाही. केवळ तशी प्रथा नाही म्हणून. एरव्ही तेही आवडले असते. तिचे वर्णनच करायचे झाले तर फार बहारीचे होईल. मात्र हल्ली इंग्लिशमध्ये जर वर्णन केले नाही तर त्याला फारशी 'व्हॅल्यू' नसते.

नजरा

लेखक रेशा यांनी बुधवार, 28/03/2012 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्‍या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय.. आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !! आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,... त्यांची नजरा नजर होते: एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,..

साबुदाणा खरेदी...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 27/03/2012 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला उपास करता येत नाही..अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत... पण माझ्या बायकोला वाटते की मी खूप धार्मिक आहे...ह्याचे कारण म्हणजे आमची "साबुदाणा खरेदी"... बायको बरोबर खरेदी करणेआणि तो अनुभव काहीवर्षांनी सांगणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असते... बायको आणि नवरा ह्या व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात... गालावरून हळूच फिरणारा चंद्रा सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी आपल्या पाठीवर कसा तळपत्या वज्रा सारखा आदळतो, हे समजायला (नव्हे अनुभवायला) लग्नच करावे लागते. लग्नापूर्वी माझी खरेदी ७/८ मिनिटात होत असे..आपली कुवत आणि गरज बघून खरेद

दु:खाचा महाकवी हरपला

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 26/03/2012 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत. १० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात.