Skip to main content

लेख

चॅलेंज भाग 1

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 01/08/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचंय मला.” “कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं. “कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं. “अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं. “हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना!

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 31/07/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा.

मनुस्मृति भाग २

लेखक शरद यांनी रविवार, 30/07/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग २ (७) अध्याय ७ (श्लोक २२६) सृष्टीच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली आहे. कार्यशक्ती, देश आणि काल यानुरूप राजाला वेगवेगळे रूप धारण कराए लागते. त्याच्या प्रसन्नतेत लक्ष्मी, पराक्रमात जय आणि क्रोधात मृत्यू वास करतो.

निलपक्षी

लेखक दशानन यांनी शनिवार, 29/07/2017 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली.

समाधानाचे मुखवटे (भाग - २)

लेखक निशांत_खाडे यांनी शुक्रवार, 28/07/2017 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
समाधानाचे मुखवटे भाग - १ दुपारी साडे-बारा एक वाजायच्या सुमारासास बसवाल्याने समाधानाला रस्त्याच्या शेजारी फूटपाथवर सोडले, त्या फूटपाथला लागून पूर्ण अर्धवर्तुळ आकाराचे एक भले मोठे मोकळे मैदान होते. तो फूटपाथ आकाराने एवढा मोठा की होता त्यावर काही चहावाले, पानटपरीवाले यांनी स्वतःचे धंदे दारूची जाहिरात असणाऱ्या छत्र्यांखाली सुरु केले होते. इथेही मान्सून बहुतेक नुकताच सुरु झाला असावा, असा अंदाज समाधानने त्या मैदानावर नुकताच उगवलेल्या हिरवळीकडे पाहून लावला. वातावरण छानच होते, हलका-हलका पाऊस चालू होता, गडद राखाडी रंगाचे ढग. संथ, आरामदायक आणि थंड हवा.

सह्याद्रीतल्या अपघातांची शेल्फी

लेखक विखि यांनी गुरुवार, 27/07/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जे आपल्या सह्याद्री मध्ये अपघातांच सत्र सुरू आहे, त्यावर काही तरी बोलावं आणि त्या संदर्भात काही चर्चा करावी या हेतूने हा लिहायचा एक प्रयत्न. लिखाण माझा पिंड पण नाही. पण सध्या जे काही विचित्र अपघात घडतायत त्या मध्ये विनाकारण माझ्या सह्याद्री बद्दल ज्या काही शंका,भीती पसरवली जात आहे तो दूर करण्याच्या साठी हा सगळा लेखनाचा प्रपंच. हो जाणीवपूर्वक मी 'माझा सह्याद्री' म्हणतोय कारण त्यानेच मला घडवलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मला तो गुरुस्थानीच आहे. मी त्याला माझाच समजतो आणि त्याने देखील कधी मला परकं समजलेलं नाही.

समाधानाचे मुखवटे भाग - १

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 26/07/2017 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
सलग दोन दिवस आणि रात्री झालेल्या अखंड जागरणामुळे त्याला कसलीतरी धुंदी आल्यासारखे वाटत होते, पूर्णपणे नशेत असल्यासारखी भावना. डोळेही भयंकर जळजळ करत होते. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता, जरा वेळ इकडे तिकडे केले कि त्याला प्रचंड उत्साह येई, मग अचानक आजूबाजूचे लोक, घटना हास्यास्पद वाटत. आणि मग अचानक थकवा. सखोल थकवा.. आता एकदाची गाडी आली म्हणजे दहा बारा तास ह्या अवजड पिशव्यांपासून सुटका होईल आणि निवांत झोपता येईल. असा विचार करत तो बसस्थानकावर कसा बस वेळ काढत होता.

रश्दी अबाझा

लेखक खडूस काका यांनी मंगळवार, 25/07/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते. १९४८ मध्ये रश्दी एका कॅसिनो मध्ये बिलियर्ड्स खेळत असताना त्याला कमाल बरकत नावाच्या दिग्दर्शकाने पाहिले, त्याला पाहून कमाल इतका प्रभावित झाला कि आपल्या चित्रपटात प्रमुख भमिका दिली.

अंदाज अपना अपना....

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 22/07/2017 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’. सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं.

दिव्याची आवस

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/07/2017 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यांची आवस आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.