Skip to main content

लेख

भारतातील भाषासमृध्दी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/09/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार भाषिक आकडेवारी तब्बल सात वर्षांनी म्हणजे आत्ताच जून 2018 च्या शेवटी प्रकाशित करण्यात आली. भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा 19,569 असल्याचं उघड झालं. (आताचे भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते.) भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपावणारीच बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ५

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 29/08/2018 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 https://www.misalpav.com/node/43144 https://www.misalpav.com/node/43170 मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रांझ फर्डिनांडच्या खुनानंतरच्या घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत.

वाटणी - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/08/2018 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते. - 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला. मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले. पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता.

तीन देवियां - भाग १

लेखक Prakashputra यांनी मंगळवार, 28/08/2018 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
मला दहावीपर्यंत जरा अक्कल कमीच होती, मुली म्हणजे तापदायक आणि त्रासदायक विषय वाटायचा. वर्गात मी हुशार समजला जायचो, म्हणून काही मुली गणित, सायन्सचे प्रश्न घेऊन यायच्या, पण मी त्यांना काहीच भाव द्यायचो नाही. त्याशिवाय मी नाटक, भाषण यात भाग पण घ्यायचो आणि तिथेपण मुलींबरोबर काम करायला लागायचे, पण या सगळ्या अपूर्व संध्या मी वाया घालवल्यात. तर तात्पर्य काय मला दहावीपर्यंत या विषयात काही अक्कल नव्हती. बायकोचे असे म्हणणे आहे कि मला अजूनही कोणत्याच विषयात काहीच अक्कल नाही. असो, परत कथानकाकडे वळू . पण अकरावीत काहीतरी एकदम बदल झाला, मुली म्हणजे काहीतरी गोड, सुंदर गोष्ट वाटू लागली.

तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ .......

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 25/08/2018 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. विषाची काही reaction होईल का या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ? खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?".

मुक्त मी !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 23/08/2018 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वयाच्या साठाव्या वर्षी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि बॉम्बच पडला सगळ्या घरात !नवरा-बायको म्हणून पटत नव्हतंच कधी., ते सारे ओढून ताणून चाललंय हे तर जगजाहीर होते. पण एकदम घटस्फोट? इतकी वर्ष एकत्र काढल्यावर हा असा विचित्र निर्णय घेण्याचं कारण काय? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला. इतकी वर्ष जमवून घेतलं ना त्याच्याशी ? मग आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्याला एकमेकांची ,एका साथीदाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा आता हे असं वेगळं राहून काय मिळवणार आहेस तू ? आणि प्रमोद चा काही विचार करशील की नाही? नातवंडं, मुलं ,सुना ,नातेवाईक मंडळी, समाज, बापरे किती लोक? इतक्या सगळ्यांना समजवायचं ...

मी पाहिलेले दशावतारी नाटक!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 21/08/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात. मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो.

गावाकडची गोष्ट

लेखक दिनु गवळी यांनी शनिवार, 18/08/2018 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची .

आभाळ

लेखक शब्दवेडी यांनी शनिवार, 18/08/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याविना घर खायला उठतं मला. तू असताना जांभळीच्या पांनातून येणारं वारं सोबत शहारे घेऊन येतं आणि तू नसताना, मनाला कापरं भरवतं. तू नसल्याच्या जाणीवेनी माझा भूप भैरवी बनतो आणि मागे उरतात फक्त काही आर्त स्वर – काळीज चिरत जाणारे. तुला कितपत कळेल माझी भाषा, माझी आर्तता, माझ्या भावना, नाही माहिती मला. तरीपण तुला सांगावासं वाटतं, तू माझा आधार आहेस. माझं आभाळ आहेस. म्हणशील मला तू खुळचट आणि विचारशील “अगं वेडे, आभाळ कधी आधार देऊ शकतं का?” इतरांना नाही देऊ शकणार कदाचित पण तू आहेस माझं आभाळ आणि आधारपण! लोकांना जगण्यासाठी डोक्यावरती छप्पर लागतं, एक निवारा लागतो, चार भिंती लागतात.