मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?

गामा पैलवान ·

प्रचेतस Mon, 10/18/2021 - 20:20
अवांतर- तुम्ही केवळ कंबोडियाला नामसाध्यर्मामुळे कांबोज म्हणत आहात असे वाटते. वास्तविक कांबोज म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग. महाभारतात पुष्कळदा उत्तरेकडील देश म्हणून याचे वर्णन आले आहे. भीष्मपर्वात भीष्म उत्तरेकडील देशांचे वर्णन करताना म्हणतात उत्तराश्चापरे म्लेच्छा जना भरतसत्तम || यवनाश्चिनकांबोजदारुणा म्लेच्छजातयः | सकृदृहा: पुलथ्थाश्च हूणाः पारसिकै: सह | उत्तरेकडे यवन, चीन, कांबोज, म्लेंच्छ, सकृदृह, पुलथ्थ, हूण आणि पारशी हे देश आहेत. गांधार, कांबोज, सिंधू सौवीर ह्या देशातील घोडे उत्कृष्ट प्रतीचे असतात असे वर्णनही महाभारतात कित्येकदा आले आहे. सांगायचा उद्देश इतकाच की कंबोडिया म्हणजे कांबोज नव्हे.

In reply to by प्रचेतस

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 01:37
प्रचेतस, उणीव दाखवून दिल्याबद्दल आभार. या राष्ट्राचा कुंबज असाही उच्चार होतो. संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE#%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8 हा मी चुकून कांभोज असा केला. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे कंबोडिया हे राज्य वायव्येतील कांबोजपेक्षा वेगळं आहे. असाच प्रकार उत्तरकाशी या ठिकाणाबद्दलही आढळतो. सध्या हे गाव गढवालात आहे. मात्र उत्तर शिन-च्यांग प्रांताचं ठिकाण काश्गर हे ही उत्तरकाशी असू शकतं. त्याचा स्थानिक उच्चार काशी आहे. आ.न., -गा.पै.

बोका Mon, 10/18/2021 - 22:36
जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत
आय.जी.फार्बेन चा सीमेन्स शी काय संबंध? आय.जी.फार्बेन ही केमिकल कंपनी होती. तसेच फार्बेन च्या आधीहि या केमिकल कंपन्या होत्याच.

In reply to by बोका

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 01:43
बोका, तुमचं बरोबर आहे. सीमेन्सचा आय.जी.फार्बेनशी थेट संबंध नाही. पण दोन्ही आस्थापनं नाझींसाठी कामं करीत होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ Tue, 10/19/2021 - 10:08
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( तुमचाय म्हणन्या प्रमाणे ) तेव्हा कंबोडिया हिंदू होता अ सा तुमचा दावा आहे का? कि फार पूर्वी होता ( अंगकोर वाट चा संधर्भ घेऊन )

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 18:43
चौकस२१२, आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. फार काय श्रीलंकाही अर्धी हिंदू आहे. फक्त श्रीलंकी हिंदूंना तामिळ म्हणून संबोधलं जातं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ Wed, 10/20/2021 - 05:06
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. कहि पुरावा या एका वाक्यामुळे आपण कॉन्सीपरासी थेअरी शोधात असता दिसतंय... या मतावर शिक्कमोर्तब झाले

चौथा कोनाडा Tue, 10/19/2021 - 13:14
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे. दुसरी बाजू देखील समोर आली. मुद्देसुद मांडणी पटावीच अशी आहे. इतिहासाची सखोल माहिती घेतल्या शिवाय व्हिलन कोण हे आमच्या सारख्या पामरानं मत व्यक्त करणं योग्य नाही असं वाटतं. बाकी जाणकार मिपाकरांच्या चर्चेच्या प्रतिक्षेत.

पाषाणभेद Tue, 10/19/2021 - 16:40
त्या लेखातही शंका विचारली. येथेही विचारतो. ७० च्या दशकात ३० लाख लोकसंख्या असलेली राजधानी तेथे होती. ३० लाखा लोकसंख्या? त्या काळी? ते पण एका तिसर्या देशातील? शंकेला वाव आहे.

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 18:46
पाषाणभेद, माझ्या मते ही फिग्लेली लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात एजंट ऑरेंजने सगळ्या वनस्पती नष्ट केल्या, पाणी दूषित झाल्याने मासे मेले. मग खाण्यासाठी लोकं नोम पेन कडे धावंत सुटले. त्यामुळे मलातरी ही फुग(व)लेली लोकसंख्या वाटते आहे. आ.न., -गा.पै.

सगळा दोष अमेरिकेवर ढकलून पॉल पॉट मात्र एकदम सज्जन होता असे चित्र उभे केले आहे ते पटले नाही. पत्रकार नेट थेअर च्या ब्लॉगवर त्याने पॉल पॉटच्या १९९७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन दिले आहे. https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html त्यात पॉल पॉट म्हणतो-- I would like to say first that my conscience is clear. Everything I have done and contributed is first for the nation and the people and the race of Cambodia. तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का या प्रश्नावर तो म्हणतो-- There are two sides to it, as I told you: There's what we did wrong, and what we did right. The mistake is that we did some things against the people - by us and also by the enemy - but the other side, as I told you, is that without our struggle there would be no Cambodia right now. या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही. तेव्हा-- १. जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता. my conscience is clear म्हणजेच त्याने काहीतरी केले पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जे काही केले ते त्याच्या देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी होते. हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता. २. अमेरिकेने या प्रकरणी अगदी महाहलकटपणा केला होता. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवलेली असेल. किसिंजर कधी तिथे येतो आणि त्याला कधी नरकात ढकलतात यासाठी तिकडचे पहारेकरी तयारच असतील. पण स्वतः पॉल पॉट जे काही झाले (एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे) त्यासाठी व्हिएटनामला जबाबदार ठरवत आहे. अमेरिकेचे नावही घेत नाही. वेनेझ्युएलाचा ह्युगो चॅवेझ, इराणचा महमूद अहमदनिजाद वगैरे नेते अमेरिकेविरूध्द अगदी कडवटपणे बोलत नसत. तसेही इथे दिसत नाही. यात विसंगती वाटत नाही? एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.

बापूसाहेब Tue, 10/19/2021 - 19:19
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
सहमत. फारच एकांगी आणि hypothetical लेख वाटला. मात्र एकंदरीत आता हा लेख वाचुन खुप कन्फ्युज झालोय की नमके खरे काय.

In reply to by बापूसाहेब

चौकस२१२ Wed, 10/20/2021 - 05:16
करोना हे थोतांड आहे याच चालित हे कंबोडिया पुराण इकडे ऑस्ट्रेल्यात व्हिएतनामी निर्वासित आहेत आणि काही कंबोडियन पण ते तर असे काही म्हणताना कधी कुठे दिसत नाहीत ! जॉन बऱ्यपकी डावया विचारांनचा शोध पत्रकार आहे त्याचा हा विडिओ बघा .. https://www.youtube.com/watch?v=FTmEy2GEVL8

कंजूस Tue, 10/19/2021 - 19:39
आपल्यातला कुणी तिथे राहतो आणि त्याच्या पूर्वजांनी काही लिहिलेलं इकडे पाठवण्याची शक्यता कमीच आहे. हेच इतर इतिहास आधारित मराठी पुस्तकांचं होतं. ती मी वाचायचे कष्ट घेत नाही. इस्राईलच्या कामकाजाविषयी शोध घेतल्यावर बरीच पुस्तकं दिसली. यातलं कोण खरं? कुणी म्हणालं की ही पुस्तकं वाचूनच इस्राइली गुप्तचर यंत्रणा काम करते. असेल.

Quora वर व्हिएटनामने पॉल पॉटची राजवट उलथवली नसती तर काय झाले असते या प्रश्नाचे कंबोडियात राहणार्‍या एकाने दिलेले उत्तर-- https://qr.ae/pGVmc7 Pol Pot led one of the most brutal regime ever existed in the human history. He killed over a quarter the total of Cambodian’s population. If Vietnam have not helped us to overthrow Pol Pot, then many things could happen to Cambodia. He was literally destroying my country by killing all the intelligent people. Cambodia’s population would be really low and if it kept on happening, millions more innocent lives would be lost. Cambodia might look like North Korea today. Rulled by a dictatorship and enslaving its own people. Pol Pot troops would kept on invading Vietnam and also killing their people. There would be no Cambodia like today. I would like to say thank you to Vietnamese soldiers who helped us overthrow Pol Pot and helped liberate us from this cruel dictator. त्यावर एकाने उत्तर दिले आहे- त्या परिस्थितीत कंबोडिया ही जगातील सर्वात धोकादायक जागा असती.

गल्लीत, शहरात, राज्यात्,देशात आणि जगात काय काय घडुन गेले आहे आणि काय काय घडत आहे हे सगळे डोके चक्रावुन टाकणारे राजकारण आहे. शत्रू मित्र वगैरे पोकळ धारणा आहेत. शेवटी सगळे पैशा भोवती फिरते. अमेरिका तर एक नंबर हलकट आणि व्यापारी वृत्तीचा देश आहे. आपला शस्त्रांचा धंदा चालत रहावा म्हणुन जगात कुठे ना कुठे युद्ध चालु राहिलेच पाहिजे हा त्यांचा सरळ हिशोब आहे. दोन शेजारी देशात कुरबुर असेल तर एकाच्या बाजुने अमेरिका उभी राहिलीच समजा. आणि कुरबुर नसेल तर ती निर्माण करायला मदत करणे आणि मग वडीलकिचा आव आणुन त्यात मांडवली करणे हाही हातखंडा उद्योग. किती उदाहरणे द्यावीत तेल मिळत होते तोवर सद्दामचे गोडवे गायले, सुन्नी/शिया दुफळीचा फायदा घेतला, शिया इराण ला दाबले आणि नंतर कुवैत् चा कैवार घेउन सद्दामचा काटा काढला. लादेन चे गोडवे गाउन आणि त्याला सर्वपरी मदत करुन रशिया विरुद्ध वापरला, आणि उपयोग संपल्यावर त्याला खलनायक ठरवुन मोठी मोहिम वगैरे नाटक करुन खात्मा केला. गद्दाफीचेही लिबियात तेच केले. एकीकडे इस्त्राईल् ला जमीन दिली आणि सगळी मदत करुन अरब राष्ट्रांवर अंकुश ठेवला. भारत पाकिस्तान प्रश्न तर सर्वांना माहितच आहे. आता चीन दुसर्‍या बाजुने छोट्या देशांना मोठी कर्जे देउन त्यांना मांडलिक बनवुन विस्तार करु पाहतोय. मग तो श्रीलंका असो,पाकिस्तान वा अफगाणिस्तान. लायकी नसताना प्रचंड कर्जे द्यायची आणि फेडता आली नाहीत की प्रदेश गिळंकृत करायचे. हे म्हणजे गोड लागले म्हणुन विष पिण्यासारखे आहे. आता लेखाकडे वळतो. लेखकाची सगळीच मते पटली किवा सगळेच माहितीचे स्त्रोत विश्वासार्ह असतील असे नाही. पण एका विषयाच्या मागे लागुन चिकाटीने एका ठिकाणी जमवलेली माहिती वाचुन ज्ञानात बरीच भर पडली हे नक्की. आपण सामर्थ्यवान होणे आणि दुसर्‍याच्या दयेवर न जगणे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे असे वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोत्रि Wed, 10/20/2021 - 14:45
डिट्टो॓! अगदी हेच म्हणतो. अमेरिकेने स्वत:च्या फायद्यासाठी (नफेखोरी आणि भांडवशाही) सगळ्या जगला वेठीला धरले आहे. अविकसीत आणि अर्धविकसीत देशांमध्ये अशांतता असण्यात आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होण्यात बहुतांशी अमेरिकेचे राजकारण आणि अर्थकारण कारणीभूत असते. आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर ही दादागीरी अमेरिका दुसर्‍या महायुद्धापासून करते आहे. गा.पै. नी मांडलेला मुद्दा रास्त आहे ह्याबाबत माझ गुमत नाही! - (लेखाशी सहमत असलेला) सोकाजी

Rajesh188 Tue, 10/19/2021 - 21:12
पॉल पोट चा कार्यकाळ काही जूना नाही .त्याच्या सत्ता काळात तरुण असणारे लोक आता पण जिवंत असतील.ती लोक खरी स्थिती सांगू शकतात. कमोबोडिया चा दौरा करून खरी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न खूप लोकांनी नक्कीच केला असणार.आणि समाज माध्यमावर तो अनुभव शेअर पण केला असणार. माहिती साठी कोणत्या ही मीडिया हाऊस वर अवलंबून राहण्याची आज गरज नाही. फक्त अनेक अनुभवातून नक्की कोणती माहिती सत्य आहे हे समजून घेता आले पाहिजे. अमेरिकेने त्या देशात भू सुरुंग पेरले असतील ,एजंट Orange च मारा केला असेल हे सत्य च असणार. ग्रामीण भाग एजंट Orange मुळे बरबाद झाल्यामुळे लोकसंख्या शहरात आश्रयाला आली असेल असा अंदाज पण करता येईल. ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप कमी झाले असणार देशाची अन्नधान्य ची गरज देशात च भागवण्यासाठी शेती करणे गरजेचेच होते पण लोक ग्रामीण भागात जावून शेती करण्यास तयार नसणार आणि त्याच मुळे पॉलपॉट नी जबरदस्ती नी शहरात आलेल्या लोकांस ग्रामीण भागात जाण्यास भाग पाडले.त्या साठी जोर जबरदस्ती केली. देश हितासाठी त्याचा निर्णय योग्य च होता. ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांची त्यांनी कत्तल केली . असा घटनाक्रम असावा.

तर्कवादी Wed, 10/20/2021 - 00:26
गामाजी आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. आताचा लेखही त्याला अपवाद नाहीच. त्यामुळे लेखातील मुख्य विषयाबद्दल नंतर पुन्हा नीट वाचून प्रतिक्रिया देतो. दरम्यान,
भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.
मला वाटते हे लेखातील अवांतर असले तरी यावरही चर्चा व्हायला हरकत नाही. हिंदुराष्ट्र ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या भारतातील लोकशाहीचं जे स्वरुप आहे त्यापेक्षा हिंदूराष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे का ? असल्यास कशी ? याबद्दल सविस्तर असा वेगळा धागा काढलात तर उत्तमच. धन्यवाद.

गामा पैलवान गुरुवार, 10/21/2021 - 01:24
चंद्रसूर्यकुमार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. लेख वाचून पॉल पॉट हा सज्जन होता असा तुमचा समज झाला तर गैरसमजाबद्दल क्षमस्व. त्याने अत्याचार केले असतीलही, पण तसे पंजाबातही झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ( बहुतेक केपीएस गिल ) खुलेआम मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही ठार मारलेल्या ९ पैकी १ निरपराध होता. याबद्दल पंजाब पोलिसांना कोणी दोषी धरंत नाही. मग फक्त पॉल पॉट च दोषी कसा? अमेरिकेची काहीच भूमिका नाही ? ज्या पावत्या त्याच्या नावावर फाडल्या जाताहेत ते अत्याचार त्याने खरंच केले होते का? ते ही फक्त १९७५ ते १९७८ या ३ वर्षांत? १९७० ते १९७५ या कालखंडाबद्दल कोणीच बोलंत नाही. तुम्ही दिलेला या दुव्यावारचे लेख वाचले : https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html इथेही तीच तऱ्हा. प्रस्तुत लेख पॉल पॉट ला दोषी मानतात. दुसरी बाजू ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. 'तू लादलेल्या यातनांसाठी खेद प्रदर्शित करणार का' म्हणून विचारल्यावर त्याच्या तोंडावर गोंधळल्याचे भाव आले. genuinely confused असा लेखकानेच उल्लेख केला आहे. याचा अर्थ नरसंहार त्याने केलेला नाही. त्याच्यावरील आरोपांना त्याने एका पुस्तकात उत्तर दिलं आहे. हे पुस्तक कधीच चर्चेस आल्याचं मलातरी माहित नाही. सदर लेखांत १९७० ते १९७५ हा कालखंड अजिबात चर्चेस येत नाही. कारण की या काळात अमेरिकी हल्ले चालू होते ( १९६९ ते १९७३ ). हे कितपत न्याय्य? १९७० पूर्वी ख्मेर रूज ही लहानशी चळवळ होती. इतकी चिमुकली होती की पॉल पॉट कडे तिचं नेतृत्व अपघाताने आलं. वरील अनुदिनीत उल्लेख आहे : Pol Pot said that it was as much "by chance" as anything that he became leader of the Cambodian communist party in 1960, when Tou Samouth disappeared. मग ही लहानशी चळवळ १९७० ते १९७५ या काळांत नोम पेन चा ताबा घेण्याइतकी मोठी कशी झाली? त्यामागे अमेरिकी विध्वंसच आहे. कोणी त्यावर चर्चा का करंत नाही ? आता तुमच्या एकेक विधानांवर भाष्य करतो. १.
या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही.
त्याचा नाईलाज आहे. कारण त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रसंघातली जागा अमेरिकेच्या मेहेरबानीवर अवलंबून होती. अमेरिकेने कितीही विध्वंस केला तरी तो अमेरिकेस दोष देऊ शकंत नाही. तसंही पाहता अधिकृत रीत्या व्हियेतनाम्यांनी कंबोडियातनं लपून अमेरिकेवर हल्ले केले. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेच्या आधी व्हियेतनामने घुसखोरी केली आहे. व्हियेतनाम्यांनी १९५४ साली फ्रेंचांना व १९७६ साली अमेरिकेस धूळ चारली. कंबोडिय सैन्य इतकं पराक्रमी नाही. व्हियेतनाम्यांना दूर ठेवण्यास ख्मेर रुजना अमेरिका वा राष्ट्रसंघाची मदत लागणार. २.
जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता.
त्याच्या पुस्तकात त्याने म्हंटलं असेल अशी अपेक्षा आहे. ३.
हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता.
हिटलरचं तशा अर्थीचं काही पुस्तक वा मुलाखत आहे का ? मला माहीत नाही. असल्यास पॉल पॉट च्या पुस्तकाशी तुलना करता येईल. ४.
( एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे )
मला पॉल पॉट ला सफेद प्रमाणपत्र देण्यात बिलकुल रस नाही. पण त्याच्या गळ्यात न केलेली पापं बांधली जाताहेत. तेच आपण ( म्हणजे भारतीय ) जर खरं धरून चाललो तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात. या पलीकडे माझा काही हेतू नाही. पॉल पॉट ची दुसरी बाजू समोर यायला हवी. ५.
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
करेक्ट. हे न पटण्यासारखेच आहे. म्हणूनंच पॉल पॉट चं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. आणि ते ही भारताची सुरक्षा ध्यानी ठेवून. असो. एक गंमत सांगतो. गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी या हत्या केल्या. प्रत्यक्षात काँग्रेसकडे गावपातळीवर पोहोचतील असे हत्याकर्ते नव्हते. पण पत्रीसरकारकडे मात्र होते. त्यांच्या सुविधा वापरून ब्राह्मणांचा जनोच्छेद घडवण्यात आला. मग यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना जबाबदार धरणार का ? समजा त्यांना गाठून कोणी विचारलं असतं की 'तुम्ही ब्राह्मणांना दिलेल्या यातनांचे विषयी तुम्हांस खेद व्यक्त करावासा वाटतो का', तर त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले असते ना ? कंबोडिया व पॉल पॉट सारखी परिस्थिती इतरत्र कुठे झालीयेत का याचा ठाव घेत होतो. तर सापडली. अगदी आपल्या महाराष्ट्रातच सापडली. बघा पटतंय का. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 04:21
तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात कंबोडिया सारख्या छोट्या देशावर अमेरिकेने जे केले ( अप्लाय म्हणल्याप्रमाणे ) तसे काहीसे तो भारताच्या बाबतीत करेल असे आपले म्हणणे आहे का ? म्हणजे उद्या अमेरिका मोदींविरुद्ध अशी आवई उठवेल कि त्यांनी १० वर्षात नरसंहार केलं वगैरे ( गोध्रा पूर्व सारखा काहीतरी ) तर असे आपले म्हणणे असेल तर ते कागदोपत्री जरी समजावून घेता येत असेल तरी प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही कारण १) भारताची मोठ्ठी बाजारपेठ अमेरिका विसरू शकत नाही २) भारताची अमेरिकेतील लॉबी त्याला आधीपासून विरोध करेल अमेरिका "जागतिक पोलीस" या नावाखाली जगात " का शी" करते हे मान्य करून सुद्धा असे होईल असे वाटत नाही पॉल पॉट ला "क्लीन चिट" देण्याचा आपलं तर्क हास्यस्पद वाटतो

In reply to by चौकस२१२

Rajesh188 गुरुवार, 10/21/2021 - 12:43
कोणाच्या जमिनीत कधीच इंटरेस्ट नव्हता.आणि आता पण नाही.फक्त आर्थिक बाबतीत सर्व देश त्यांचे गुलाम असावेत असेच तिचे प्रयत्न चालू असतात.त्यांच्या आर्थिक हिता बाधा आली की ते त्या देशाची राख रांगोळी करतात म्हणजे करतात. भारत आता जास्त च अमेरिकेचे गुणगान गात आहे ह्याचा फटका एक दिवस नक्कीच बसणार आहे.

In reply to by गामा पैलवान

Trump गुरुवार, 10/21/2021 - 12:11
गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. >> कोणती आकडेवारी आहे का?

In reply to by Trump

Rajesh188 गुरुवार, 10/21/2021 - 12:39
ग्रामीण भागात ब्राह्मण लोकांच्या हत्या झाल्या त्यांची मालमत्ता लुटली गेली.जमीन जुमला, वाडे सोडून ते गाव सोडून गेले.प्रतेक गावात ह्याच्या खाणाखुणा मिळतील आकडेवारी कशाला पाहिजे.

In reply to by Rajesh188

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/21/2021 - 13:37
देशो देशी झालेली जाती जमातींची शिरकाणे बघितली तर त्या मागे शेवटी संपत्ती,सत्ता यांचा हव्यासच दिसतो. मग हिटलरने केलेले ज्युंचे हत्याकांड असो, ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समुदायावर झालेले हल्ले, सिन्धी लोकांवर फाळणीच्या वेळी किवा काश्मिरी पंडीतांना हुसकावण्यासाठी १९८६ नंतर सुरु झालेले हल्ले असोत वा नथुराम ब्राम्हण असल्याने गांधीवधानंतर झालेले ब्राम्हणांचे शिरकाण असो. आकडेवारीत काही अर्थ नसतो. जे झाले ते झाले. पण अजुनही जेव्हा लोक सत्कार करताना पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घाला, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच वगैरे वगैरे तारे तोडतात, फार कशाला पुतळेही गॅस कटरने कापतात, ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे आणि हा आपल्या समाजाला कुठे घेउन जाणार आहे असा प्रश्न पडतो.

In reply to by Trump

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 15:16
सांगली जवळील वाळवा तालुका हा (कु) प्रसिद्ध आहे या बाबतीत यावर पर ला अग्निपंख हे नाटक जरूर बघावे .. खास करून त्यातील शेवट

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 15:11
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे काय करायचं ते सभ्य भाषेत सांगण्यासारखे नाहीये .... त्यामुळे गप्पच बसावे लागणार आहे असो काहीही नाही करायचे ... आपण षंढ आहोत .... या बाबतीत पुण्य परमातम राष्ट्रपिता "मोकगा" वृत्ती प्रमाणे आपल्या डाव्या गालावर थप्पड बसली कि उज्वा गाल पुढे करायचा अगदीच असह्य झालं तर धर्मांतर करावं असा विचार करतोय .. म्हणजे "हिंदू हे हिंदू ते" हि टीका सतत ऐकावी लागणार नाही

In reply to by चौकस२१२

Trump गुरुवार, 10/21/2021 - 20:22
हा जो काही प्रकार आहे तो सर्व ब्राम्हणेतर लोकांना पसंत नाही. काही ठराविक घराणी किंवा पक्ष आहेत, ते हे उद्योग करतात.

In reply to by Trump

श्रीगुरुजी गुरुवार, 10/21/2021 - 14:30
खालील पानावर आकडेवारी व तत्कालीन वृत्तपत्रांच्या बातम्यांची प्रकाशचित्रे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण सावरकर यांना कॉंग्रेसी गुंडांनी ठेचून मारले होते. मुंबईत १५ ब्राह्मणांची हत्या झाल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आली होती. मुंबईपेक्षा सातारा, कोल्हापूर इ. दक्षिण महराष्ट्रातील भागात जाळपोळ व हत्यांचे प्रमाण खूप जास्त होते. सांगलीतील मेन रोडवर असलेला माझ्या नातेवाईकांचा वाडा जाळून टाकला होता. https://www.google.com/amp/s/trunicle.com/the-untold-story-of-maharashtrian-brahmin-genocide-committed-by-congress-after-gandhis-assassination-in-1948/%3famp मॉरीन पॅटरसन या विदेशी पत्रकार महिलेने संशोधन करून “City, countryside and society in Maharashtra states” है पुस्तक लिहिले आहे. या दंगलीत ८००० ब्राह्मण मारले गेले असे तिने लिहिले आहे. https://hindugenocide.com/political-crimes/1948-maharashtrian-brahmin-genocide-8000-killed/ खालील बातमीनुसार - A New York Times article soon after the assassination put the number of mortal victims in Bombay (now Mumbai) alone, and on the very first day, at 15. Elst believes the death toll "may well run into several hundreds", but sadly no study has been done so far on the violence which soon took a casteist turn as the Marathas joined the killers' bandwagon to settle historical scores with the Brahimins. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/lifestyle/what-s-hot/story/this-author-s-book-debunks-several-myths-associated-with-mahatma-gandhi-s-assassination-1186885-2018-03-11 खालील वृत्तानुसार ५००० हून अधिक ब्राह्मण मारले गेले. https://medium.com/@AdhiyajnaSharma/after-hundreds-of-years-of-freedom-struggle-india-got-her-independence-from-foreigners-in-563aeb7db7f7

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत Fri, 10/22/2021 - 01:59
अशा घटना घडल्या हे केवळ ऐकुन होतो. २-४ तुरळक घटना ऐकुन/ वाचून माहिती होत्या. पण इतके तपशिल महित नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

रामदास२९ Tue, 10/26/2021 - 23:54
प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. पण.. नथुरामच्या हत्येच निमित्य करून , ब्राम्हणान्चा छ्ळ केला गेला.. कान्ग्रेस चे एक माजी मुख्यमन्त्री यान्नी कोन्ग्रेस मधल्या ब्राम्हण पुढार्यान्च राजकारण सम्पविण्यासाठी नथुरामच निमित्य करून अक्षरशः चान्ग्ल्या चान्गल्या सधन कुटुम्बाना देशोधडीला लावला, ज्यान्चा गान्धी हत्येशी काहिही सम्ब्न्ध नव्ह्ता.. माझ्या आजोबान्च घर जाळल होता.. शेवटी या जन्मातल्या कर्माची फळे इथेच भोगायला लागणार.. वाचा कोणीतरी फोडली हे बरच झाल... आणि हेच कोन्ग्रेसवाले.. उत्तर प्रदेशात ब्राम्हणान्ची मत मागत फिरतात तेव्हा पर्वा वाराणसीतल्या एका माणसानी , १९४८ च्या महाराष्ट्रातल्या दन्गलीचा सन्दर्भ दिला..

In reply to by रामदास२९

Rajesh188 Wed, 10/27/2021 - 23:07
त्यांच्या समर्थक लोकांकडून हल्लेखोर ज्या समाजातील आहे त्या वर हल्ले करण्याचे प्रकार भारतात घडतात च. लोकांची मानसिकता तशीच आहे.निष्पाप लोकांना टार्गेट करणे खूप चुकीचं आहे हे पण ह्या आंधळ्या समर्थक लोकांना कळत नाही. गांधी हत्ये नंतर ब्राह्मण समाजाला टार्गेट केले गेले. इंदिराजी च्या हत्ये नंतर शीख लोकांची कत्तल केली गेली. राजीवजी च्या हत्ये नंतर तामिळी लोकांना टार्गेट केले गेले. बाकी गल्ली बोळातील दादा ,भाऊ ह्यांच्या हत्ते नंतर पण हुल्लाड बाजी केली जातेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/21/2021 - 15:53
लेखन माहितीपूर्ण आहे, संदर्भासहित लेखात एक रोचक माहिती मिळते. अमेरिका तिच्या स्वार्थासाठी, आंतरराष्ट्रीय दबदब्यासाठी काय काय करते तेही समजले. फक्त यात भारताकडे बोट करून लेखातला वीसेक टक्का जो काही भाग आहे, जे काही अलर्ट करणे आहे, ते काही पटत नाही. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान Fri, 10/22/2021 - 19:11
प्राडॉ, प्रतीसादानिमित्त आभार. भारतीयांना सजग करणे हाच या लेखामागे हेतू आहे. काल जे भारताच्या परसदारी झालं ते आज भारतात होऊ घातलंय. सावध असलेलं कधीही बरं. आ.न., -गा.पै.

शानबा५१२ गुरुवार, 10/21/2021 - 21:42
पॉट क्रुर हत्या करुनही ८५ वर्षे त्रासाविना कसा जगला, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजुन एक, तिसरा लेख येऊ दे. आधीच्या लेखातील लेखक स्वःता तिथे जाउन त्यांने आपले अनुभव लिहले आहेत असे वाचताना कळले. मग त्यांनी लिहलेल्या गोष्टींवर आक्षेप कसा घेता येईल?

Rajesh188 Fri, 10/22/2021 - 13:59
हिटलर,मुसोलिनी, सारखे हुकूमशहा जन्माला आले नसते तर भारताला अजुन पण स्वतंत्र मिळाले नसते.ब्रिटिश साम्राज्य कधीच नष्ट झाले नसते.

नठ्यारा Fri, 12/01/2023 - 14:22
कंबुजांचा खाटीक व पराकोटीचा नरपशू हेनरी किसिंजर गचकला आहे. बातमी : https://www.lokmat.com/international/former-us-secretary-of-state-henry-kissinger-passed-away-at-the-age-of-100-a-a601/ आज नरकात बरीच गडबड उडाली असेल. बरेच हिशोब चुकते होणार असतील. -नाठाळ नठ्या

विवेकपटाईत Fri, 12/01/2023 - 15:06
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते. इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. : कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II आख्यायिका संपादन कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले. या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक

प्रचेतस Mon, 10/18/2021 - 20:20
अवांतर- तुम्ही केवळ कंबोडियाला नामसाध्यर्मामुळे कांबोज म्हणत आहात असे वाटते. वास्तविक कांबोज म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग. महाभारतात पुष्कळदा उत्तरेकडील देश म्हणून याचे वर्णन आले आहे. भीष्मपर्वात भीष्म उत्तरेकडील देशांचे वर्णन करताना म्हणतात उत्तराश्चापरे म्लेच्छा जना भरतसत्तम || यवनाश्चिनकांबोजदारुणा म्लेच्छजातयः | सकृदृहा: पुलथ्थाश्च हूणाः पारसिकै: सह | उत्तरेकडे यवन, चीन, कांबोज, म्लेंच्छ, सकृदृह, पुलथ्थ, हूण आणि पारशी हे देश आहेत. गांधार, कांबोज, सिंधू सौवीर ह्या देशातील घोडे उत्कृष्ट प्रतीचे असतात असे वर्णनही महाभारतात कित्येकदा आले आहे. सांगायचा उद्देश इतकाच की कंबोडिया म्हणजे कांबोज नव्हे.

In reply to by प्रचेतस

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 01:37
प्रचेतस, उणीव दाखवून दिल्याबद्दल आभार. या राष्ट्राचा कुंबज असाही उच्चार होतो. संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE#%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8 हा मी चुकून कांभोज असा केला. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे कंबोडिया हे राज्य वायव्येतील कांबोजपेक्षा वेगळं आहे. असाच प्रकार उत्तरकाशी या ठिकाणाबद्दलही आढळतो. सध्या हे गाव गढवालात आहे. मात्र उत्तर शिन-च्यांग प्रांताचं ठिकाण काश्गर हे ही उत्तरकाशी असू शकतं. त्याचा स्थानिक उच्चार काशी आहे. आ.न., -गा.पै.

बोका Mon, 10/18/2021 - 22:36
जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत
आय.जी.फार्बेन चा सीमेन्स शी काय संबंध? आय.जी.फार्बेन ही केमिकल कंपनी होती. तसेच फार्बेन च्या आधीहि या केमिकल कंपन्या होत्याच.

In reply to by बोका

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 01:43
बोका, तुमचं बरोबर आहे. सीमेन्सचा आय.जी.फार्बेनशी थेट संबंध नाही. पण दोन्ही आस्थापनं नाझींसाठी कामं करीत होती. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ Tue, 10/19/2021 - 10:08
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( तुमचाय म्हणन्या प्रमाणे ) तेव्हा कंबोडिया हिंदू होता अ सा तुमचा दावा आहे का? कि फार पूर्वी होता ( अंगकोर वाट चा संधर्भ घेऊन )

In reply to by चौकस२१२

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 18:43
चौकस२१२, आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. फार काय श्रीलंकाही अर्धी हिंदू आहे. फक्त श्रीलंकी हिंदूंना तामिळ म्हणून संबोधलं जातं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ Wed, 10/20/2021 - 05:06
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. कहि पुरावा या एका वाक्यामुळे आपण कॉन्सीपरासी थेअरी शोधात असता दिसतंय... या मतावर शिक्कमोर्तब झाले

चौथा कोनाडा Tue, 10/19/2021 - 13:14
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे. दुसरी बाजू देखील समोर आली. मुद्देसुद मांडणी पटावीच अशी आहे. इतिहासाची सखोल माहिती घेतल्या शिवाय व्हिलन कोण हे आमच्या सारख्या पामरानं मत व्यक्त करणं योग्य नाही असं वाटतं. बाकी जाणकार मिपाकरांच्या चर्चेच्या प्रतिक्षेत.

पाषाणभेद Tue, 10/19/2021 - 16:40
त्या लेखातही शंका विचारली. येथेही विचारतो. ७० च्या दशकात ३० लाख लोकसंख्या असलेली राजधानी तेथे होती. ३० लाखा लोकसंख्या? त्या काळी? ते पण एका तिसर्या देशातील? शंकेला वाव आहे.

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान Tue, 10/19/2021 - 18:46
पाषाणभेद, माझ्या मते ही फिग्लेली लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात एजंट ऑरेंजने सगळ्या वनस्पती नष्ट केल्या, पाणी दूषित झाल्याने मासे मेले. मग खाण्यासाठी लोकं नोम पेन कडे धावंत सुटले. त्यामुळे मलातरी ही फुग(व)लेली लोकसंख्या वाटते आहे. आ.न., -गा.पै.

सगळा दोष अमेरिकेवर ढकलून पॉल पॉट मात्र एकदम सज्जन होता असे चित्र उभे केले आहे ते पटले नाही. पत्रकार नेट थेअर च्या ब्लॉगवर त्याने पॉल पॉटच्या १९९७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन दिले आहे. https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html त्यात पॉल पॉट म्हणतो-- I would like to say first that my conscience is clear. Everything I have done and contributed is first for the nation and the people and the race of Cambodia. तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का या प्रश्नावर तो म्हणतो-- There are two sides to it, as I told you: There's what we did wrong, and what we did right. The mistake is that we did some things against the people - by us and also by the enemy - but the other side, as I told you, is that without our struggle there would be no Cambodia right now. या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही. तेव्हा-- १. जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता. my conscience is clear म्हणजेच त्याने काहीतरी केले पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जे काही केले ते त्याच्या देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी होते. हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता. २. अमेरिकेने या प्रकरणी अगदी महाहलकटपणा केला होता. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवलेली असेल. किसिंजर कधी तिथे येतो आणि त्याला कधी नरकात ढकलतात यासाठी तिकडचे पहारेकरी तयारच असतील. पण स्वतः पॉल पॉट जे काही झाले (एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे) त्यासाठी व्हिएटनामला जबाबदार ठरवत आहे. अमेरिकेचे नावही घेत नाही. वेनेझ्युएलाचा ह्युगो चॅवेझ, इराणचा महमूद अहमदनिजाद वगैरे नेते अमेरिकेविरूध्द अगदी कडवटपणे बोलत नसत. तसेही इथे दिसत नाही. यात विसंगती वाटत नाही? एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.

बापूसाहेब Tue, 10/19/2021 - 19:19
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
सहमत. फारच एकांगी आणि hypothetical लेख वाटला. मात्र एकंदरीत आता हा लेख वाचुन खुप कन्फ्युज झालोय की नमके खरे काय.

In reply to by बापूसाहेब

चौकस२१२ Wed, 10/20/2021 - 05:16
करोना हे थोतांड आहे याच चालित हे कंबोडिया पुराण इकडे ऑस्ट्रेल्यात व्हिएतनामी निर्वासित आहेत आणि काही कंबोडियन पण ते तर असे काही म्हणताना कधी कुठे दिसत नाहीत ! जॉन बऱ्यपकी डावया विचारांनचा शोध पत्रकार आहे त्याचा हा विडिओ बघा .. https://www.youtube.com/watch?v=FTmEy2GEVL8

कंजूस Tue, 10/19/2021 - 19:39
आपल्यातला कुणी तिथे राहतो आणि त्याच्या पूर्वजांनी काही लिहिलेलं इकडे पाठवण्याची शक्यता कमीच आहे. हेच इतर इतिहास आधारित मराठी पुस्तकांचं होतं. ती मी वाचायचे कष्ट घेत नाही. इस्राईलच्या कामकाजाविषयी शोध घेतल्यावर बरीच पुस्तकं दिसली. यातलं कोण खरं? कुणी म्हणालं की ही पुस्तकं वाचूनच इस्राइली गुप्तचर यंत्रणा काम करते. असेल.

Quora वर व्हिएटनामने पॉल पॉटची राजवट उलथवली नसती तर काय झाले असते या प्रश्नाचे कंबोडियात राहणार्‍या एकाने दिलेले उत्तर-- https://qr.ae/pGVmc7 Pol Pot led one of the most brutal regime ever existed in the human history. He killed over a quarter the total of Cambodian’s population. If Vietnam have not helped us to overthrow Pol Pot, then many things could happen to Cambodia. He was literally destroying my country by killing all the intelligent people. Cambodia’s population would be really low and if it kept on happening, millions more innocent lives would be lost. Cambodia might look like North Korea today. Rulled by a dictatorship and enslaving its own people. Pol Pot troops would kept on invading Vietnam and also killing their people. There would be no Cambodia like today. I would like to say thank you to Vietnamese soldiers who helped us overthrow Pol Pot and helped liberate us from this cruel dictator. त्यावर एकाने उत्तर दिले आहे- त्या परिस्थितीत कंबोडिया ही जगातील सर्वात धोकादायक जागा असती.

गल्लीत, शहरात, राज्यात्,देशात आणि जगात काय काय घडुन गेले आहे आणि काय काय घडत आहे हे सगळे डोके चक्रावुन टाकणारे राजकारण आहे. शत्रू मित्र वगैरे पोकळ धारणा आहेत. शेवटी सगळे पैशा भोवती फिरते. अमेरिका तर एक नंबर हलकट आणि व्यापारी वृत्तीचा देश आहे. आपला शस्त्रांचा धंदा चालत रहावा म्हणुन जगात कुठे ना कुठे युद्ध चालु राहिलेच पाहिजे हा त्यांचा सरळ हिशोब आहे. दोन शेजारी देशात कुरबुर असेल तर एकाच्या बाजुने अमेरिका उभी राहिलीच समजा. आणि कुरबुर नसेल तर ती निर्माण करायला मदत करणे आणि मग वडीलकिचा आव आणुन त्यात मांडवली करणे हाही हातखंडा उद्योग. किती उदाहरणे द्यावीत तेल मिळत होते तोवर सद्दामचे गोडवे गायले, सुन्नी/शिया दुफळीचा फायदा घेतला, शिया इराण ला दाबले आणि नंतर कुवैत् चा कैवार घेउन सद्दामचा काटा काढला. लादेन चे गोडवे गाउन आणि त्याला सर्वपरी मदत करुन रशिया विरुद्ध वापरला, आणि उपयोग संपल्यावर त्याला खलनायक ठरवुन मोठी मोहिम वगैरे नाटक करुन खात्मा केला. गद्दाफीचेही लिबियात तेच केले. एकीकडे इस्त्राईल् ला जमीन दिली आणि सगळी मदत करुन अरब राष्ट्रांवर अंकुश ठेवला. भारत पाकिस्तान प्रश्न तर सर्वांना माहितच आहे. आता चीन दुसर्‍या बाजुने छोट्या देशांना मोठी कर्जे देउन त्यांना मांडलिक बनवुन विस्तार करु पाहतोय. मग तो श्रीलंका असो,पाकिस्तान वा अफगाणिस्तान. लायकी नसताना प्रचंड कर्जे द्यायची आणि फेडता आली नाहीत की प्रदेश गिळंकृत करायचे. हे म्हणजे गोड लागले म्हणुन विष पिण्यासारखे आहे. आता लेखाकडे वळतो. लेखकाची सगळीच मते पटली किवा सगळेच माहितीचे स्त्रोत विश्वासार्ह असतील असे नाही. पण एका विषयाच्या मागे लागुन चिकाटीने एका ठिकाणी जमवलेली माहिती वाचुन ज्ञानात बरीच भर पडली हे नक्की. आपण सामर्थ्यवान होणे आणि दुसर्‍याच्या दयेवर न जगणे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे असे वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सोत्रि Wed, 10/20/2021 - 14:45
डिट्टो॓! अगदी हेच म्हणतो. अमेरिकेने स्वत:च्या फायद्यासाठी (नफेखोरी आणि भांडवशाही) सगळ्या जगला वेठीला धरले आहे. अविकसीत आणि अर्धविकसीत देशांमध्ये अशांतता असण्यात आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होण्यात बहुतांशी अमेरिकेचे राजकारण आणि अर्थकारण कारणीभूत असते. आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर ही दादागीरी अमेरिका दुसर्‍या महायुद्धापासून करते आहे. गा.पै. नी मांडलेला मुद्दा रास्त आहे ह्याबाबत माझ गुमत नाही! - (लेखाशी सहमत असलेला) सोकाजी

Rajesh188 Tue, 10/19/2021 - 21:12
पॉल पोट चा कार्यकाळ काही जूना नाही .त्याच्या सत्ता काळात तरुण असणारे लोक आता पण जिवंत असतील.ती लोक खरी स्थिती सांगू शकतात. कमोबोडिया चा दौरा करून खरी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न खूप लोकांनी नक्कीच केला असणार.आणि समाज माध्यमावर तो अनुभव शेअर पण केला असणार. माहिती साठी कोणत्या ही मीडिया हाऊस वर अवलंबून राहण्याची आज गरज नाही. फक्त अनेक अनुभवातून नक्की कोणती माहिती सत्य आहे हे समजून घेता आले पाहिजे. अमेरिकेने त्या देशात भू सुरुंग पेरले असतील ,एजंट Orange च मारा केला असेल हे सत्य च असणार. ग्रामीण भाग एजंट Orange मुळे बरबाद झाल्यामुळे लोकसंख्या शहरात आश्रयाला आली असेल असा अंदाज पण करता येईल. ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप कमी झाले असणार देशाची अन्नधान्य ची गरज देशात च भागवण्यासाठी शेती करणे गरजेचेच होते पण लोक ग्रामीण भागात जावून शेती करण्यास तयार नसणार आणि त्याच मुळे पॉलपॉट नी जबरदस्ती नी शहरात आलेल्या लोकांस ग्रामीण भागात जाण्यास भाग पाडले.त्या साठी जोर जबरदस्ती केली. देश हितासाठी त्याचा निर्णय योग्य च होता. ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांची त्यांनी कत्तल केली . असा घटनाक्रम असावा.

तर्कवादी Wed, 10/20/2021 - 00:26
गामाजी आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. आताचा लेखही त्याला अपवाद नाहीच. त्यामुळे लेखातील मुख्य विषयाबद्दल नंतर पुन्हा नीट वाचून प्रतिक्रिया देतो. दरम्यान,
भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.
मला वाटते हे लेखातील अवांतर असले तरी यावरही चर्चा व्हायला हरकत नाही. हिंदुराष्ट्र ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या भारतातील लोकशाहीचं जे स्वरुप आहे त्यापेक्षा हिंदूराष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे का ? असल्यास कशी ? याबद्दल सविस्तर असा वेगळा धागा काढलात तर उत्तमच. धन्यवाद.

गामा पैलवान गुरुवार, 10/21/2021 - 01:24
चंद्रसूर्यकुमार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. लेख वाचून पॉल पॉट हा सज्जन होता असा तुमचा समज झाला तर गैरसमजाबद्दल क्षमस्व. त्याने अत्याचार केले असतीलही, पण तसे पंजाबातही झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ( बहुतेक केपीएस गिल ) खुलेआम मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही ठार मारलेल्या ९ पैकी १ निरपराध होता. याबद्दल पंजाब पोलिसांना कोणी दोषी धरंत नाही. मग फक्त पॉल पॉट च दोषी कसा? अमेरिकेची काहीच भूमिका नाही ? ज्या पावत्या त्याच्या नावावर फाडल्या जाताहेत ते अत्याचार त्याने खरंच केले होते का? ते ही फक्त १९७५ ते १९७८ या ३ वर्षांत? १९७० ते १९७५ या कालखंडाबद्दल कोणीच बोलंत नाही. तुम्ही दिलेला या दुव्यावारचे लेख वाचले : https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-exclusive-interview-by-nate-thayer.html इथेही तीच तऱ्हा. प्रस्तुत लेख पॉल पॉट ला दोषी मानतात. दुसरी बाजू ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. 'तू लादलेल्या यातनांसाठी खेद प्रदर्शित करणार का' म्हणून विचारल्यावर त्याच्या तोंडावर गोंधळल्याचे भाव आले. genuinely confused असा लेखकानेच उल्लेख केला आहे. याचा अर्थ नरसंहार त्याने केलेला नाही. त्याच्यावरील आरोपांना त्याने एका पुस्तकात उत्तर दिलं आहे. हे पुस्तक कधीच चर्चेस आल्याचं मलातरी माहित नाही. सदर लेखांत १९७० ते १९७५ हा कालखंड अजिबात चर्चेस येत नाही. कारण की या काळात अमेरिकी हल्ले चालू होते ( १९६९ ते १९७३ ). हे कितपत न्याय्य? १९७० पूर्वी ख्मेर रूज ही लहानशी चळवळ होती. इतकी चिमुकली होती की पॉल पॉट कडे तिचं नेतृत्व अपघाताने आलं. वरील अनुदिनीत उल्लेख आहे : Pol Pot said that it was as much "by chance" as anything that he became leader of the Cambodian communist party in 1960, when Tou Samouth disappeared. मग ही लहानशी चळवळ १९७० ते १९७५ या काळांत नोम पेन चा ताबा घेण्याइतकी मोठी कशी झाली? त्यामागे अमेरिकी विध्वंसच आहे. कोणी त्यावर चर्चा का करंत नाही ? आता तुमच्या एकेक विधानांवर भाष्य करतो. १.
या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही.
त्याचा नाईलाज आहे. कारण त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रसंघातली जागा अमेरिकेच्या मेहेरबानीवर अवलंबून होती. अमेरिकेने कितीही विध्वंस केला तरी तो अमेरिकेस दोष देऊ शकंत नाही. तसंही पाहता अधिकृत रीत्या व्हियेतनाम्यांनी कंबोडियातनं लपून अमेरिकेवर हल्ले केले. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेच्या आधी व्हियेतनामने घुसखोरी केली आहे. व्हियेतनाम्यांनी १९५४ साली फ्रेंचांना व १९७६ साली अमेरिकेस धूळ चारली. कंबोडिय सैन्य इतकं पराक्रमी नाही. व्हियेतनाम्यांना दूर ठेवण्यास ख्मेर रुजना अमेरिका वा राष्ट्रसंघाची मदत लागणार. २.
जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता.
त्याच्या पुस्तकात त्याने म्हंटलं असेल अशी अपेक्षा आहे. ३.
हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता.
हिटलरचं तशा अर्थीचं काही पुस्तक वा मुलाखत आहे का ? मला माहीत नाही. असल्यास पॉल पॉट च्या पुस्तकाशी तुलना करता येईल. ४.
( एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे )
मला पॉल पॉट ला सफेद प्रमाणपत्र देण्यात बिलकुल रस नाही. पण त्याच्या गळ्यात न केलेली पापं बांधली जाताहेत. तेच आपण ( म्हणजे भारतीय ) जर खरं धरून चाललो तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात. या पलीकडे माझा काही हेतू नाही. पॉल पॉट ची दुसरी बाजू समोर यायला हवी. ५.
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
करेक्ट. हे न पटण्यासारखेच आहे. म्हणूनंच पॉल पॉट चं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. आणि ते ही भारताची सुरक्षा ध्यानी ठेवून. असो. एक गंमत सांगतो. गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी या हत्या केल्या. प्रत्यक्षात काँग्रेसकडे गावपातळीवर पोहोचतील असे हत्याकर्ते नव्हते. पण पत्रीसरकारकडे मात्र होते. त्यांच्या सुविधा वापरून ब्राह्मणांचा जनोच्छेद घडवण्यात आला. मग यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना जबाबदार धरणार का ? समजा त्यांना गाठून कोणी विचारलं असतं की 'तुम्ही ब्राह्मणांना दिलेल्या यातनांचे विषयी तुम्हांस खेद व्यक्त करावासा वाटतो का', तर त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले असते ना ? कंबोडिया व पॉल पॉट सारखी परिस्थिती इतरत्र कुठे झालीयेत का याचा ठाव घेत होतो. तर सापडली. अगदी आपल्या महाराष्ट्रातच सापडली. बघा पटतंय का. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 04:21
तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात कंबोडिया सारख्या छोट्या देशावर अमेरिकेने जे केले ( अप्लाय म्हणल्याप्रमाणे ) तसे काहीसे तो भारताच्या बाबतीत करेल असे आपले म्हणणे आहे का ? म्हणजे उद्या अमेरिका मोदींविरुद्ध अशी आवई उठवेल कि त्यांनी १० वर्षात नरसंहार केलं वगैरे ( गोध्रा पूर्व सारखा काहीतरी ) तर असे आपले म्हणणे असेल तर ते कागदोपत्री जरी समजावून घेता येत असेल तरी प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही कारण १) भारताची मोठ्ठी बाजारपेठ अमेरिका विसरू शकत नाही २) भारताची अमेरिकेतील लॉबी त्याला आधीपासून विरोध करेल अमेरिका "जागतिक पोलीस" या नावाखाली जगात " का शी" करते हे मान्य करून सुद्धा असे होईल असे वाटत नाही पॉल पॉट ला "क्लीन चिट" देण्याचा आपलं तर्क हास्यस्पद वाटतो

In reply to by चौकस२१२

Rajesh188 गुरुवार, 10/21/2021 - 12:43
कोणाच्या जमिनीत कधीच इंटरेस्ट नव्हता.आणि आता पण नाही.फक्त आर्थिक बाबतीत सर्व देश त्यांचे गुलाम असावेत असेच तिचे प्रयत्न चालू असतात.त्यांच्या आर्थिक हिता बाधा आली की ते त्या देशाची राख रांगोळी करतात म्हणजे करतात. भारत आता जास्त च अमेरिकेचे गुणगान गात आहे ह्याचा फटका एक दिवस नक्कीच बसणार आहे.

In reply to by गामा पैलवान

Trump गुरुवार, 10/21/2021 - 12:11
गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. >> कोणती आकडेवारी आहे का?

In reply to by Trump

Rajesh188 गुरुवार, 10/21/2021 - 12:39
ग्रामीण भागात ब्राह्मण लोकांच्या हत्या झाल्या त्यांची मालमत्ता लुटली गेली.जमीन जुमला, वाडे सोडून ते गाव सोडून गेले.प्रतेक गावात ह्याच्या खाणाखुणा मिळतील आकडेवारी कशाला पाहिजे.

In reply to by Rajesh188

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/21/2021 - 13:37
देशो देशी झालेली जाती जमातींची शिरकाणे बघितली तर त्या मागे शेवटी संपत्ती,सत्ता यांचा हव्यासच दिसतो. मग हिटलरने केलेले ज्युंचे हत्याकांड असो, ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समुदायावर झालेले हल्ले, सिन्धी लोकांवर फाळणीच्या वेळी किवा काश्मिरी पंडीतांना हुसकावण्यासाठी १९८६ नंतर सुरु झालेले हल्ले असोत वा नथुराम ब्राम्हण असल्याने गांधीवधानंतर झालेले ब्राम्हणांचे शिरकाण असो. आकडेवारीत काही अर्थ नसतो. जे झाले ते झाले. पण अजुनही जेव्हा लोक सत्कार करताना पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घाला, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच वगैरे वगैरे तारे तोडतात, फार कशाला पुतळेही गॅस कटरने कापतात, ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे आणि हा आपल्या समाजाला कुठे घेउन जाणार आहे असा प्रश्न पडतो.

In reply to by Trump

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 15:16
सांगली जवळील वाळवा तालुका हा (कु) प्रसिद्ध आहे या बाबतीत यावर पर ला अग्निपंख हे नाटक जरूर बघावे .. खास करून त्यातील शेवट

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चौकस२१२ गुरुवार, 10/21/2021 - 15:11
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे काय करायचं ते सभ्य भाषेत सांगण्यासारखे नाहीये .... त्यामुळे गप्पच बसावे लागणार आहे असो काहीही नाही करायचे ... आपण षंढ आहोत .... या बाबतीत पुण्य परमातम राष्ट्रपिता "मोकगा" वृत्ती प्रमाणे आपल्या डाव्या गालावर थप्पड बसली कि उज्वा गाल पुढे करायचा अगदीच असह्य झालं तर धर्मांतर करावं असा विचार करतोय .. म्हणजे "हिंदू हे हिंदू ते" हि टीका सतत ऐकावी लागणार नाही

In reply to by चौकस२१२

Trump गुरुवार, 10/21/2021 - 20:22
हा जो काही प्रकार आहे तो सर्व ब्राम्हणेतर लोकांना पसंत नाही. काही ठराविक घराणी किंवा पक्ष आहेत, ते हे उद्योग करतात.

In reply to by Trump

श्रीगुरुजी गुरुवार, 10/21/2021 - 14:30
खालील पानावर आकडेवारी व तत्कालीन वृत्तपत्रांच्या बातम्यांची प्रकाशचित्रे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण सावरकर यांना कॉंग्रेसी गुंडांनी ठेचून मारले होते. मुंबईत १५ ब्राह्मणांची हत्या झाल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आली होती. मुंबईपेक्षा सातारा, कोल्हापूर इ. दक्षिण महराष्ट्रातील भागात जाळपोळ व हत्यांचे प्रमाण खूप जास्त होते. सांगलीतील मेन रोडवर असलेला माझ्या नातेवाईकांचा वाडा जाळून टाकला होता. https://www.google.com/amp/s/trunicle.com/the-untold-story-of-maharashtrian-brahmin-genocide-committed-by-congress-after-gandhis-assassination-in-1948/%3famp मॉरीन पॅटरसन या विदेशी पत्रकार महिलेने संशोधन करून “City, countryside and society in Maharashtra states” है पुस्तक लिहिले आहे. या दंगलीत ८००० ब्राह्मण मारले गेले असे तिने लिहिले आहे. https://hindugenocide.com/political-crimes/1948-maharashtrian-brahmin-genocide-8000-killed/ खालील बातमीनुसार - A New York Times article soon after the assassination put the number of mortal victims in Bombay (now Mumbai) alone, and on the very first day, at 15. Elst believes the death toll "may well run into several hundreds", but sadly no study has been done so far on the violence which soon took a casteist turn as the Marathas joined the killers' bandwagon to settle historical scores with the Brahimins. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/lifestyle/what-s-hot/story/this-author-s-book-debunks-several-myths-associated-with-mahatma-gandhi-s-assassination-1186885-2018-03-11 खालील वृत्तानुसार ५००० हून अधिक ब्राह्मण मारले गेले. https://medium.com/@AdhiyajnaSharma/after-hundreds-of-years-of-freedom-struggle-india-got-her-independence-from-foreigners-in-563aeb7db7f7

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत Fri, 10/22/2021 - 01:59
अशा घटना घडल्या हे केवळ ऐकुन होतो. २-४ तुरळक घटना ऐकुन/ वाचून माहिती होत्या. पण इतके तपशिल महित नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

रामदास२९ Tue, 10/26/2021 - 23:54
प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. पण.. नथुरामच्या हत्येच निमित्य करून , ब्राम्हणान्चा छ्ळ केला गेला.. कान्ग्रेस चे एक माजी मुख्यमन्त्री यान्नी कोन्ग्रेस मधल्या ब्राम्हण पुढार्यान्च राजकारण सम्पविण्यासाठी नथुरामच निमित्य करून अक्षरशः चान्ग्ल्या चान्गल्या सधन कुटुम्बाना देशोधडीला लावला, ज्यान्चा गान्धी हत्येशी काहिही सम्ब्न्ध नव्ह्ता.. माझ्या आजोबान्च घर जाळल होता.. शेवटी या जन्मातल्या कर्माची फळे इथेच भोगायला लागणार.. वाचा कोणीतरी फोडली हे बरच झाल... आणि हेच कोन्ग्रेसवाले.. उत्तर प्रदेशात ब्राम्हणान्ची मत मागत फिरतात तेव्हा पर्वा वाराणसीतल्या एका माणसानी , १९४८ च्या महाराष्ट्रातल्या दन्गलीचा सन्दर्भ दिला..

In reply to by रामदास२९

Rajesh188 Wed, 10/27/2021 - 23:07
त्यांच्या समर्थक लोकांकडून हल्लेखोर ज्या समाजातील आहे त्या वर हल्ले करण्याचे प्रकार भारतात घडतात च. लोकांची मानसिकता तशीच आहे.निष्पाप लोकांना टार्गेट करणे खूप चुकीचं आहे हे पण ह्या आंधळ्या समर्थक लोकांना कळत नाही. गांधी हत्ये नंतर ब्राह्मण समाजाला टार्गेट केले गेले. इंदिराजी च्या हत्ये नंतर शीख लोकांची कत्तल केली गेली. राजीवजी च्या हत्ये नंतर तामिळी लोकांना टार्गेट केले गेले. बाकी गल्ली बोळातील दादा ,भाऊ ह्यांच्या हत्ते नंतर पण हुल्लाड बाजी केली जातेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/21/2021 - 15:53
लेखन माहितीपूर्ण आहे, संदर्भासहित लेखात एक रोचक माहिती मिळते. अमेरिका तिच्या स्वार्थासाठी, आंतरराष्ट्रीय दबदब्यासाठी काय काय करते तेही समजले. फक्त यात भारताकडे बोट करून लेखातला वीसेक टक्का जो काही भाग आहे, जे काही अलर्ट करणे आहे, ते काही पटत नाही. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान Fri, 10/22/2021 - 19:11
प्राडॉ, प्रतीसादानिमित्त आभार. भारतीयांना सजग करणे हाच या लेखामागे हेतू आहे. काल जे भारताच्या परसदारी झालं ते आज भारतात होऊ घातलंय. सावध असलेलं कधीही बरं. आ.न., -गा.पै.

शानबा५१२ गुरुवार, 10/21/2021 - 21:42
पॉट क्रुर हत्या करुनही ८५ वर्षे त्रासाविना कसा जगला, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजुन एक, तिसरा लेख येऊ दे. आधीच्या लेखातील लेखक स्वःता तिथे जाउन त्यांने आपले अनुभव लिहले आहेत असे वाचताना कळले. मग त्यांनी लिहलेल्या गोष्टींवर आक्षेप कसा घेता येईल?

Rajesh188 Fri, 10/22/2021 - 13:59
हिटलर,मुसोलिनी, सारखे हुकूमशहा जन्माला आले नसते तर भारताला अजुन पण स्वतंत्र मिळाले नसते.ब्रिटिश साम्राज्य कधीच नष्ट झाले नसते.

नठ्यारा Fri, 12/01/2023 - 14:22
कंबुजांचा खाटीक व पराकोटीचा नरपशू हेनरी किसिंजर गचकला आहे. बातमी : https://www.lokmat.com/international/former-us-secretary-of-state-henry-kissinger-passed-away-at-the-age-of-100-a-a601/ आज नरकात बरीच गडबड उडाली असेल. बरेच हिशोब चुकते होणार असतील. -नाठाळ नठ्या

विवेकपटाईत Fri, 12/01/2023 - 15:06
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते. इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. : कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II आख्यायिका संपादन कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले. या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक
लोकहो, पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734 त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ? मग २०००० कुठून कोंबायची?

आधार कार्डः खरंच गरज आहे का?

अभिनव ·

अभिनव Tue, 09/13/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव Tue, 09/13/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम Tue, 09/13/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 14:36
अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक Wed, 09/14/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम Tue, 09/13/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 06:56
इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना Wed, 09/14/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

तुषार काळभोर Tue, 09/13/2016 - 16:01
??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत Tue, 09/13/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा Tue, 09/13/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम Wed, 09/14/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना Wed, 09/14/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 07:02
अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना Wed, 09/14/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना Wed, 09/14/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम Wed, 09/14/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर Wed, 09/14/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग Mon, 07/03/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !

अभिनव Tue, 09/13/2016 - 11:55
कोर्टाने आधार कार्ड अनिवार्य करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देऊनही रेल्वेने तिकिट खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे. प्रत्यक्ष अमलबजावणी डिसेंबर पासुन होईल. http://trak.in/tags/business/2016/09/12/irctc-aadhaar-card-compulsory-booking-train-tickets-passenger-insurance/

राघव Tue, 09/13/2016 - 13:34
मला वाटतं आधार सारख्या योजनेची गरज होतीच. आणि भारताचा बर्‍यापैकी लँडस्केप त्यात कव्हर झालेला आहे. आता सिक्यूरिटी बद्दल काळजी घ्यायलाच हवी आणि डेटा प्रायव्हसी बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. पण त्याबद्दलचे नियम/कायदे अस्तित्वात येऊन त्यावर होणारा अंमल ही खरंच खूप पुढची गोष्ट आहे. अमेरिकेतल्या सोशल सिक्यूरिटी नंबर च्या डेटामधे अनेक गोंधळ अनेकवेळा झालेले आहेत. त्यातून ते ती सिस्टीम पक्की करत जातात. सगळे फूलप्रूफ असण्याची अपेक्षा असणे बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक योजना बनवता आणि राबवता, तेव्हा तुम्ही तिला शक्यतो फ्लेक्सिबल ठेवता. त्याशिवाय एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात योजना राबवणे अशक्य आहे. जेव्हा डेटा ९०% च्या वर जमा होतो, तेव्हा त्यापुढचा भाग राबवावा लागतो. त्यात मग हळुहळू सुधारणा होत जाते. हा डेटा सरकार कशासाठी वापरते ते आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. नाहीतर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. पण ते वाईटासाठीच वापरतील असेच गृहित धरणे गरजेचे नाही. सरकारी पैशाचा सर्वसाधारण जनतेसाठीचा विनियोग हा या पद्धतीने चांगला होऊ शकेल हे मात्र खरे.

दासबोध.कॊम Tue, 09/13/2016 - 14:13
आधार कार्ड योजनेत तुमचा बायोमेट्रिक डेटा गोळा होतो हे माहित असल्याने जे खरे चोर लोक आहेत ते या योजनेपासून 10 हात दूरच राहणार आहेत! हि योजना सर्व समावेशक होणे निव्वळ अशक्य आहे. पण जितका डेटा गोळा होतोय हेही नसे थोडके! त्यात आता पर्सिस्टन्ट चे देशपांडे या योजनेवर गेलेत त्यामुळे काही चांगले बदल नक्की पाहावयास मिळतील असे वाटते .

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 14:36
अहो डेटा सिक्युरिटी बद्दल केव्हा बोलणार जेव्हा डेटा आपल्या हातात असेल, इथे डेटा स्टोरेजलाच मोंगो डीबी अन अन तत्सम परदेशी कंपनी वापरल्या जातायत, म्हणजे करोडो लोकांचा बायोमेट्रिक डेटा परदेशात साठवणे. घ्या समजून काय ते

In reply to by फेदरवेट साहेब

लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक Wed, 09/14/2016 - 17:19
लोकल डेटासेंटर असावे. तेवढीही काळजी आधार टीमने घेतली नसेल तर खुशाल आपण मुर्ख लोकांच्या हाती आपलं बायोमॅट्रिक दिलंय असं समजुन जाव! सरकार बदलल्यानंतर या धोरणामध्ये बदल झाला नाहीये का?

In reply to by मोदक

हे डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये नसावेत. मुळातच माँगो अतिशय सोपी अन साधारण हार्डवेअरवर चालणारी डाटाबेस सिस्टीम आहे. तिला स्पेशल हार्डवेअर लागत नाही. किंवा ती क्लाऊडबेस्ड सिस्टीमही नाही की डेटा बाहेर ठेवावा लागेल. माँगोला फंडींग सीआयेकडुन मिळालेल असल्याने हा सगळा धुरळा उठवलाय.

बोका-ए-आझम Tue, 09/13/2016 - 14:59
डेटाचा गैरवापर फक्त आधार कार्डमुळेच होईल असं थोडंच आहे? जेव्हा तुम्ही तुमची माहिती इतरांना देता तेव्हा समोरच्या माणसाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणे आणि त्याचबरोबर काळजी घेणे या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. इन्कमटॅक्स रिटर्न्स भरताना आपली माहिती सरकारी खात्यात जातच असते की. अजूनपर्यंत त्याचा गैरवापर झाल्याची उदाहरणं नाहीत. निदान मला तरी माहित नाहीत. जाणकारांनी सांगावी.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 06:56
इनकम टॅक्सचा डेटा भारतीय सर्वर्सवर असतो (नॅशनल इन्फॉर्मटिकस सेंटर, वगैरे) आधारचे तसे नाही, त्याच्यामुळे करोडो लोकांचा डेटा संवेदनशील झालाय. शिवाय इतर योजना गाय मारतात म्हणून आपण वासरू मारणे हे काही पटणारे लॉजिक नाही.

In reply to by बोका-ए-आझम

साहना Wed, 09/14/2016 - 20:05
स्वानुभवाने भरपूर गैर व्यवहार झाला आहे हे सांगू शकते. लोकांचा PAN इत्यादी पर्सनल डेटा घेऊन गुपचूप त्यांच्या माहितीशिवाय त्यांचे रिटर्न ऑनलाईन चेक करून ती माहिती इतरांना देणाऱ्या अनेक कंपन्या/लोक आहेत. पण बहुतेक वेळा त्याची सुद्धा गरज नसते. आमच्या धंद्यांत आम्ही बँक मॅनेजरला फोने करून श्री अमुक तमुक ह्यांच्या खात्यात किती पैसे आहेत हो ? असा प्रश्न केला तर मॅनेजर सहज सांगतो (आपली उलाढाल किती आहे ह्यावर हे अवलंबून असते). हे रिटर्न्स चोरणारे लोक बहुतेक वेळा private लेंडर्स साठी काम करतात. इलेक्शन रोल, RTO चा डेटा आणि इतर अनेक सरकारी डेटा वापरून एका माणसाची संपूर्ण माहिती काढणार्या एका पुणे कंपनीबरोबर मी काही काळ काम केले होते. एखाद्या माणसाची किती माहिती त्यांच्या कडे होती हे अक्षरशः थक्क करणारी गोष्ट होती. अनेकदा सरकारी खात्यात प्युन सारखा माणूस सुद्धा बऱ्यापैकी माहिती चोरून त्यांना देऊ शकत होता.

तुषार काळभोर Tue, 09/13/2016 - 16:01
??? हे काय सार्वजनिक शौचालय आहे का? तिथे अन् तिथे करून झालं होतं, इथं करायचं राहिलं होतं!! आता इथं पण करून झालंय, कसं शांत वाटतंय, निवांत वाटतंय, बरं वाटतंय! .. अन् तुम्हाला 'स्वतःला अडचणीत टाकणारे प्रश्न" इतरांनी विचारल्यावर त्रास होतो ना? मग इथली चर्चा कशी चालणार? इथे तर लोक प्रश्न विचारतात. सरळ मनाने पण विचारतात आणि खवचटपणा करत 'ह्याला आता तोंडावरच पाडायचं!" अस ठरवून पण विचारतात!

विवेकपटाईत Tue, 09/13/2016 - 17:22
या आधार मुळे सरकारचे राशन आणि गस सबसिडीत हजारों कोटी वाचले. बाकी कपिल शर्मा सारखे गैर काम करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात मग ओरड सुरु होते.

चौकटराजा Tue, 09/13/2016 - 17:35
मी ज्यावेळी सरकारी व खाजगी नोकरीत मुलाखत दिली त्यानंतर मला नग्न होऊन डॉक्टरांसमोर जावे लागले. याचाच अर्थ माझ्या मांडीवर तीळ असेल व तेथे कॅमेरा असेल तो त्याने टिपला असेल. माझ्या एक्स रे मधे माझी डावी बरगडी जोडलेली आहे पीन घालून हे ही कोठेतरी नोंदले गेले असेल. या पातळीवर सुद्धा मला " प्रायव्हेट" रहाता येत नाही. समाजात रहाताना फार अतिरेक प्रायव्हसीचा करून चालणारच नाही. अशा लोकानी समुद्रात घर करून रहावे. हो तरीही तुमच्या मांडीवरचा तीळ सॅटेलाईटचा कॅमेरा टिपणारच. आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम Wed, 09/14/2016 - 01:07
आपण गुरूचे फोटो काढून त्याला चार उपग्रह आहेत हे समजून घेतले आहेत म्हणजे त्याची प्रायव्हसी चोरलीच आहे.
))) महालोल! चौराकाकांनी बर्रा (एकाच वेळी दोन सिक्सर्स) मारलेल्या आहेत. रच्याकने गुरुची प्रायव्हसी गॅलिलिओ नावाच्या खऊट इटालियन दाढीवाल्याने फार पूर्वीच चोरली होती!

साहना Wed, 09/14/2016 - 01:46
दोन आधार कार्ड करून ठेवा. एक गावाकडे आणि एक शहरात. असे केल्याने प्रायव्हसीचा प्रश्नच मिटला. एकच कार्ड महत्वाच्या कामासाठी वापर दुसरे कार्ड तिकीट वगैरे बुक करण्यासाठी वापरा.

In reply to by साहना

फेदरवेट साहेब Wed, 09/14/2016 - 07:02
अहो काहीही काय! दोन आधारकार्ड्स कशी तयार होतील? तुम्ही एक तयार करता तेव्हाच तुमचे बोटांचे ठसे अन रेटिना स्कॅन घेतले जातात, ते डाटाबेस मध्ये स्टोर केलेले असतात (ते डाटाबेस foreigner असणे हाच तर सद्ध्या मुद्दा आहे) , तरीही जर तुम्ही एक आधार असताना दुसरे काढायला गेलात तर तुमचे फिंगर प्रिंट अन रेटिना स्कॅन अकॅसेप्ट होत नाहीत सिस्टिम मध्ये, डेटा redundancy एरर येतो किंवा रेकॉर्ड ओव्हरलाप दाखवतात त्यामुळे दोन आधार वगैरे तयार करणे कठीण नाही अशक्य आहे, तुम्ही राहिवासाचा पत्ता अन नाव बदलाल खरं बोटाचे ठसे अन रेटिना स्कॅनचे काय??

In reply to by फेदरवेट साहेब

साहना Wed, 09/14/2016 - 18:29
आपली कायद्याने जाणाऱ्यांची एक दुनिया असते आणि .... डुप्लिकेट, खोटी, ड्युअल वाट्टेल त्या प्रकारची आधार कार्डे भेटतात

साहना Wed, 09/14/2016 - 01:50
प्रायव्हसीचा अर्थ सर्व गोष्टींची गुप्तता असा होत नाही. डॉक्टरने आपली नग्न चित्रे काढून पॉर्न साईटवर टाकली असती तर तो आपल्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. किंवा नोकरीच्या साठी तपासणी ह्या नावाखाली आपली किडनी काढून विकली तर तो आपला हक्क भंग झाला असता.

दासबोध.कॊम Wed, 09/14/2016 - 16:34
योजना छान आहे आधाराची..पण आधार या नावात उगाचच आपण "हे येण्यापूर्वी आपण निराधार होतो" असा भाव जाणवतो! याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.

In reply to by दासबोध.कॊम

अभ्या.. गुरुवार, 09/15/2016 - 11:19
याचे नाव काहीतरी वेगळे हवे होते. जसे की " हाथियार ", "मेरा यार", इ.इ.
कार्डच काढताय ना? का त्याच्या पाकीटाची रुंदी वाढवायचा विचार आहे? फ्लेवर बिवर काही आहेत का डोक्यात?

प्रीत-मोहर Wed, 09/14/2016 - 17:11
बाकी माहित नाही. पण Direct benefit Transfer schemes जसे की MHRD ची Central Sector Scheme of Scholarship for College and University Students किंवा pre-matric or post-matric scheme for minorities etc साठी आता आधार अनिवार्य केला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या मागे लागुन आधार ब्यांकेत सीड करुन घ्यावा लागतोय.(गोव्यात ९९ टक्के आधार आहे)

आशु जोग Mon, 07/03/2017 - 12:51
हा विषय पुन्हा पेटलाय या आधाराने काही घोटाळे कुणाला माहीत असतील तर कृपया माहीती द्यावी !
हा लेख इथे टाकायचा राहुन गेला होता.