Skip to main content

श्रद्धा

शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 29/01/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी दुसरी बाजू न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात " स्वामी अस्वस्थानंद रसवंती" हे नाव चर्चेत येत आहे . स्वामीजींची भेट झाली. त्यांच्याबद्दल नेटवर वैयक्तिक जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. त्यांनी चर्चेत खालील मुद्दे उपस्थित केले. शनीच्या चौथर्‍यावर जाणाराने सहा महीने कुठल्याही महिलेशी संपर्क करणे निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे हा कालावधी सहा वर्षे आहे.

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 13/09/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत.