मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी

केदार पाटणकर ·

चौथा कोनाडा गुरुवार, 09/07/2023 - 17:57
लैच बाळबोध अपेक्षा ! हे इ-आवृतीवाले वाचक नेट वर काय काय "बघत" बसतात ते मार्केटींगच्या लोकांनी कोळून अभ्यास केलेला आहे. क्लिक पडली त र च पगार होणार हे त्यांना चांगलंच माहित्येय. आजकाल " मसालेदार " च खपते. "एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी" ही आद्यपत्रकार जांभेकर शास्त्री कालीन अपेक्षा झाली !

कंजूस गुरुवार, 09/07/2023 - 18:56
पूर्ण बातमीही नसते. 'या' अभिनेत्रीने 'असा' केला वाढदिवस साजरा. यापुढे गेल्या आहेत होऊ घातलेल्या होतकरू तारका. त्या स्वतःच इंस्टाग्रामवर फोटो टाकतात. पत्रकारांना काही कामच नाही उरले. नोकऱ्या धोक्यात.

लोक्स अशा बातम्या "वाचतात"? आम्ही तर या बातम्या फक्त "बघतो". आणि ऑनलाईनच तर आहे, थोडीच कागद वाया जातोय? टाकु द्या की मोठमोठे फोटो

चौथा कोनाडा गुरुवार, 09/07/2023 - 17:57
लैच बाळबोध अपेक्षा ! हे इ-आवृतीवाले वाचक नेट वर काय काय "बघत" बसतात ते मार्केटींगच्या लोकांनी कोळून अभ्यास केलेला आहे. क्लिक पडली त र च पगार होणार हे त्यांना चांगलंच माहित्येय. आजकाल " मसालेदार " च खपते. "एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी" ही आद्यपत्रकार जांभेकर शास्त्री कालीन अपेक्षा झाली !

कंजूस गुरुवार, 09/07/2023 - 18:56
पूर्ण बातमीही नसते. 'या' अभिनेत्रीने 'असा' केला वाढदिवस साजरा. यापुढे गेल्या आहेत होऊ घातलेल्या होतकरू तारका. त्या स्वतःच इंस्टाग्रामवर फोटो टाकतात. पत्रकारांना काही कामच नाही उरले. नोकऱ्या धोक्यात.

लोक्स अशा बातम्या "वाचतात"? आम्ही तर या बातम्या फक्त "बघतो". आणि ऑनलाईनच तर आहे, थोडीच कागद वाया जातोय? टाकु द्या की मोठमोठे फोटो
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

विकास ·

आजानुकर्ण Fri, 03/18/2016 - 20:35
लोकसत्ता आणि कुबेर यांनी अग्रलेख मागे घेेऊन अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह पाऊल उचलले आहे. धर्मांध लोकांना अशा कृतीमुळे निश्चितच बळ मिळेल आणि भावना दुखावण्याची जोरदार साथ येईल.

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश Fri, 03/25/2016 - 11:00
+१ खरेतर अग्रलेख मागे घेण्यापेक्षा कुबेरांनी राजीनामा द्यायला हवा होता.

मदनबाण Fri, 03/18/2016 - 20:56
अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि लोकसत्ता यांच्याकडुन हे असे अघटित कसे घडले ? नक्की कुणाच्या भावना दुखावल्या ? बाकी लोकसत्ते मधील मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतरणाचा उद्देश- मोहन भागवत ही बातमी वाचल्यावर अनेकांना पोट शूळ उद्भवल्याचे समजले आहे ! ;) जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

In reply to by मदनबाण

मदनबाण Fri, 03/18/2016 - 21:04
जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? संदर्भ मिळाला ! तो देखील लोकसत्ते मधलाच ! धर्मा म्हणू नये आपुला आज जगात सर्वात वेगाने वाढणारा कोणता धर्मगट असेल तर तो पेंटाकोस्टल ख्रिश्चन हा आहे. जास्तीत जास्त अन्य धर्मीयांना ख्रिस्ताच्या पायाशी आणून त्यांचे धर्मातर घडवणे हे या पंथाचे जीवितकार्य आहे. या पंथीयांच्या मागे राजसत्ता नसती तर तिचा इतका प्रसार झाला असता काय? समाजसेवेसाठी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या मदर तेरेसा या अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीचेही धर्मातर करीत, हा इतिहास आहे. लोकसत्ता यांनी हा लेख देखील काढुन टाकुन टाकावे ! कशाला डेटा हवा असा भावना दुखावणारा "डेटा" त्यांच्या संकेस्थळावर ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

In reply to by मदनबाण

विकास Fri, 03/18/2016 - 22:16
मदर तेरेसांबद्दल आपण मांडलेले मुद्दे मी आधी देखील विविध विचारांच्या लोकांकडून वाचले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सहमत असलो तरी हे लिहीताना माझा उद्देश किंचीत वेगळा होता... येथे एका संपादकाचे हात इतके बांधण्यासारखे काय झाले आहे? आणि हो या संपादकाचे अनेक विचार हे मला दिशाभूल करणारे वाटले आहेत, तरी देखील हेच मत आहे. अग्रलेखात देशाचे तुकडे करण्याची भाषा नव्हती की कुठल्याही धर्माच्या सामान्य जनांवर अत्याचार होईल अशा पध्दतीची प्रक्षोभक भाषा नव्हती. तरी देखील, ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. येथे मराठी ऐवजी इतर कुठल्या भाषेतले असते तरी असेच मत असते पण येथे मराठीत झाल्याने आपण सगळे ते वाचू शकतो आणि त्या अर्थाने लोकसत्तेचा संबंध आहे. आणि हो , असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते.

In reply to by विकास

मदनबाण Sat, 03/19/2016 - 09:40
विकासराव आपल्या लेखनाचा उद्देश अर्थातच समजला आहे... जबरदस्तीने शेपुट घालायला लावणे असे म्हणता येईल ! ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. खरयं... यावरुन मुस्कटदाबी कोणत्या थरापर्यंत गेली आहे आणि जाऊ शकते याचे उदाहरणच लोकसत्ताने त्यांच्या वाचकांना सप्रमाण घालुन दिले आहे ! एक वाचक म्हणून या झालेल्या घटनेचा मी निशेध व्यक्त करतो. असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते. १०० % सहमत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

श्रीरंग_जोशी Fri, 03/18/2016 - 21:01
लोकसत्तेने या अग्रलेखासठी माफी मागणे अतिशय चुकीचे आहे. अवांतर - मिपाकर राजघराणं यांचा संबंधीत विषयावरचा हा लेख वाचनीय आहे - दयाळू मदर तेरेसा.

लोकमत ह्या लेखातील पिग्गी बँक वरती जे उर्दूत लिहिलेलं आहे त्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या म्हणून mim च्या लोकांनी लोकमत जळगाव कार्यालयावर हल्ला केल्यानंतर ह्यांनी सपशेल लोटांगण घातलं ना।भावना फक्त ह्यांना असतात हिंदूंना नसतात हे नेहमी अधोरेखित होत राहत।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विकास Fri, 03/18/2016 - 22:24
ज्या गुंडागर्दीला लोकमतला (कधीकाळी महानगरला ) तोंड द्यावे लागले, ती भले कोणी ठरवून केली असली तरी झुंडशाहीतली एक प्रतिक्रीया होती. अर्थात हे त्याचे समर्थन अथवा त्याचा बचाव करण्यासाठीचा मुद्दा नाही. इथे, माझ्या अनुभवाप्रमाणे आणि जे काही ऐकले-वाचले आहे, त्यावरून मराठी ख्रिस्तीधर्मिय समाज हा बर्‍यापैकी शांत आहे. मग तो महाराष्ट्रातला असो अथवा गोव्यातला. त्यांच्यातल्या काहींचे जरी काही धर्मांतराचे चाळे चालले असतील तरी ते मर्यादीत असावे आणि तो मुद्दा वेगळा आहे, वेगळ्यापद्धतीने (कायद्याने) हाताळता येईल. त्यामुळे त्या लोकांच्या भावना इतक्या टोकाला जाऊन दुखावल्या असतील असे वाटत नाही. मग या अग्रलेखानंतर एक विरोधी प्रतिक्रीया मराठी ख्रिस्ती समाजातून दिसली नाही आणि तरी देखील २४ तासात माफी मागून अग्रलेख अप्रकाशीत करावा लागतो? याच्या मागे नक्की कर्ताकरविता आहे तरी कोण? म्हणून म्हणले लोकमत वरील हल्ला आणि लोकसत्ता संपादकाची कुठेही आवाज न करता, गोंधळ न करता, एखाद्या surgical strike सारखी केलेली मुस्कटदाबी जास्त गंभीर वाटते.

अजया Fri, 03/18/2016 - 21:07
कुबेर यांचे हात बांधले गेलेले दिसतात.शिवाय त्यांनाच वैयक्तिक माफीनामा द्यायला लावलेला दिसतोय.नेहमी काही चुकीचे असल्यास वृत्तपत्राकडून माफी मागितली जाते.इथे मी लिहिले आहे!

बोका-ए-आझम Fri, 03/18/2016 - 23:16
याबद्दल ही एक लिंक आहे. लिहिणारे धर्मगुरूच आहेत,त्यामुळे तथ्य आहे असं मानायला हरकत नाही. http://m.dummies.com/how-to/content/saints-for-dummies-cheat-sheet.html म्हणजे जोपर्यंत पोप म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही संत नाही. शिवाय संत अशी पदवी ही मृत्यूनंतरच मिळणार. लोकांनी स्वयंस्फूर्तीने तुम्हाला संतत्व बहाल केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि कुणीही केलेल्या कामात जर धर्मप्रसार हा मुद्दा नसेल, तर पोप त्याचा विचार संतत्वासाठी का करेल? कारण जर तसं असतं तर फक्त कॅथाॅलिक पंथीयांचाच विचार झाला नसता. एखादा हिंदू किंवा मुस्लिमही सेंट अमुक किंवा सेंट तमुक म्हणून गणला गेला असता. पण तसं होत नाही. एका हाडा-मांसाच्या माणसात लोकांना संतत्व देण्याची बुद्धी असते आणि त्याची निवड कोण करतात - तर इतर हाडा-मांसाची माणसेच. पण ती एखाद्याला संतत्व देऊ शकत नाहीत. असं हे चमत्कारिक त्रांगडं आहे!

अभ्या.. Fri, 03/18/2016 - 23:43
ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे प्रोसेस समजू शकतो. प्रिंट आवृत्तीत तो होता ना लेख? मला पाहिल्यासारखा वाटतोय पण जुन्या अंकात असणारच. अशा बाबतीत (जर ऑनलाइन आवृत्ती नसलीच असती) तर संपादकांचे धोरण काय राहिले असते? आमचे विचार चुकीचे की माझे विचार चुकीचे म्हणले गेले असते?

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. Sat, 03/19/2016 - 00:03
इतरांच्या लेखाला पंख लागू दे रे. इथे संपादकीयच उडवलेय. लै भारी शब्द हाय पण ऑलरेडी दुश्मन्या वाढल्यात त्यात भर नको. ;)

In reply to by अभ्या..

श्रीरंग_जोशी Sat, 03/19/2016 - 00:17
दोस्तो का दोस्त, दुश्मनो का दुश्मन... अभ्या द हिरो :-) एक वेळ चुकीची आकडेवारी किंवा तथ्य छापले गेले तर त्याविषयी चुक झाली म्हणून माफी मागणे समजू शकतो. इथे तार्किक विचार आहेत ते एकदा मांडले की मांडले. अशा प्रकारे परत घेण्याने ते गायब होत नसतात उलट अधिक वेगाने पसरतात.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Sat, 03/19/2016 - 00:25
आधी लाथ मारायची मग नमस्कार केल्यासारखे हात पुढेमागे करायचे! ;) तरी देखील तेव्हढे सोपे नसावे इथे.

In reply to by अभ्या..

नाखु Mon, 03/21/2016 - 08:35
पुणे छापील आवृत्तीत तसा माफी खुलासा आणि लेख मागे घेतल्याचे निवेदन आहे (वल्लींना सांगून त्याचा फटु उद्या टाकतो). च्या मारी असहिष्णुताची व्याख्या एकदा मिपा विचारवंत धुरीणांनी करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावी ही मिपा वाचकांतर्फे जाहीर विनंती.

दा विन्ची Sat, 03/19/2016 - 11:44
गिरीश कुबेर यांनी अतिशय अनाकलनीय पाऊल उचलले. एवढा कोणता दबाव आहे कळायला मार्ग नाही. लोकसत्ता सारख्या आघाडीच्या वर्तमानपत्राला अशोभनीय आहे हे सारे.

आनन्दा Sat, 03/19/2016 - 13:16
हा फारच धक्कदायक प्रकार आहे.. विकास सर तुमची अडचण नसेल तर हा तुमचा लेख कायअप्पा वर टाकावा म्हणतो.. लोकसत्तच्या संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे राहिलेच पाहिजे.. बाकी चिमणराव, सर्वज्ञानी आणि विदूषकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.. ते परवाच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढत होते.

In reply to by कपिलमुनी

आनन्दा Sat, 03/19/2016 - 14:58
किमान पुढच्या वेळी तरी त्यांनी शेपुट घालू नये म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा हो. आता झाले ते झाले. पण याविरुद्ध जनमताचा रेटा उभा करणे आवश्यक आहे.

In reply to by आनन्दा

विकास Sat, 03/19/2016 - 18:03
धन्यवाद, माझी काहीच हरकत नाही कायअप्प्पा वर टाकण्यासाठी. मी आधी देखील म्हणले तसे, हा मुद्दा कुणाबद्दचा लेख मागे घेतला अथवा लिहीणार्‍या व्यक्तीविषयी नाही. कारण त्या संपादक महाशयांचे एकांगी विचार पटत नाहीत. मला मराठी ख्रिस्ती समाजाबद्दल बर्‍यापैकी खात्री आहे, की ते असे नाहीत. (चूक असलो तर चूक म्हणेन पण तुर्तास पॉझिटीव्ह गृहीतक म्हणा हवे तर). कुबेरांचे आणि एक्सप्रेस व्यवस्थापनाचे कशासाठी जमत नसेल तर तो देखील त्यांचा अंतर्गत मामला होतो. त्यामुळे हे कुबेर या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून देखील नाही. हा गंभिर प्रश्न अशा करता आहे कारण बोलवता धनी पूर्ण गप्प बसला आहे. आज कुबेरांचे झाले त्यावर जर आवाज केला नाही तर यांचा धीर आणि माज अजूनच वाढेल...

आनन्दा Sat, 03/19/2016 - 13:19
जाताजाता- कालच कायअप्प वर वाचलेला विनोद -
मदर तेरेसांचे दोन चमत्कार ज्यामुळे त्यांना संतपद दिले गेले - १. ब्राझीलमध्ये एका महिलेचा कर्करोग बरा केला. २. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे कळू नये म्हणून त्यांना आंधळे आणि बहिरे केले.

In reply to by प्रदीप साळुंखे

आनन्दा Sat, 03/19/2016 - 15:05
आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी." चला निर्धार करा ! माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.

In reply to by प्रदीप साळुंखे

आनन्दा Sat, 03/19/2016 - 15:07
हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे -
नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे.

आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो
माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आपण झुगारून काय उपयोग? कारण असल्या गोष्टींची माध्यमांना फिकीर नाही,त्यांना सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवे असते.आणि त्यातच ते धन्यता मानतात. लोकमतचीही याआधी घाबरगुंडी उडाली होती. माध्यमांची ही बायस भूमिका सर्वातीत आहेच.डरपोक आहेत साले!

श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 17:55
अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून केवळ २४ तासात माफी मागून अग्रलेख मागे घेणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केवळ २४ तासात गिरीश कुबेरांचे विचार बदलले असणे शक्य नाही. गिरीश कुबेरांवर कोणाचा तरी जबरदस्त दबाव आला असावा. माध्यमांवर दडपण आणले जात आहे हा निधर्मांधांचा आरोप एका अर्थी खरा ठरला आहे. मात्र हिंदू वगळता इतर धर्मियांबद्दल लिहिल्याबद्दल हा दबाव आणला असावा. असाच अग्रलेख हिंदू धर्मातील एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल लिहिला असता तर तो मागे घेण्याची गरज पडली नसती. हा अग्रलेख मागे घेतल्याबद्दल अपेक्षेप्रमाणे एकाही निधर्मांधाने अजूनपर्यंत चकार शब्दानेही विरोध केला नाही. गिरीश कुबेर लवकरच लोकसत्तातून बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर काढले तर आश्चर्य वाटणार नाही. ज्यांना हा अग्रलेख वाचायला मिळाला नसेल त्यांच्यासाठी तो खालील पानावर उपलब्ध आहे. https://www.facebook.com/photo.php?fbid=10153959678189454&set=a.10153762589229454.1073741848.539949453&type=3&theater

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते Sun, 03/20/2016 - 21:41
अग्रलेखाचा मुख्य विषय ख्रिश्चन संताविषयी होता. परंतु लोकसत्ता वाचणारे मराठी ख्रिश्चन ही संख्या इतकी कमी असावी की त्यांच्या मागणीपुढे मान तुकवण्याची लोकसत्ताला धंद्याच्या दृष्टीने काहीच गरज नसावी असे धागाकर्ते सुचवतायत. त्याअर्थी पूर्वी इंदिरा गांधी म्हणत असत त्याप्रमाणे हा "परकीय हात" असावा असं दिसतंय.

मदनबाण Sat, 03/19/2016 - 18:21
Loksatta हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो काधुन इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

In reply to by मदनबाण

मदनबाण Sat, 03/19/2016 - 18:36
लोकसत्ता {संपादकांचे} यांचे अभिव्यक्ति स्वातंत्र नष्ट झाले आहे,ही घटना साधी नसुन या मागचे गूढ उकलले गेले पाहिजे. ही वाचकांशी केलेली प्रतारणा तर आहेच, तसेच हिंदू समाजाच्या भावनांना काडीची किंमत नसुन इतर धर्मा बद्धल सत्य कथन केल्यास दडपशाही केली जाईल हे अधोरेखित करणारे धोरण स्पष्ट झाले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

In reply to by विकास

अगम्य Sun, 03/20/2016 - 00:43
प्रतिक्रिया द्यायला शब्दच सुचत नाहीत. लेखात "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" लिहिले आहे. त्याचाच अनुभव घेतल्यासारखे वाटतेय.

राही Sat, 03/19/2016 - 22:31
खरे कारण अगदीच वेगळे असावे. एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत.

In reply to by राही

विकास Sun, 03/20/2016 - 01:32
मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत. मायबोलीतील लेखाबद्दल सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की कुठले प्रतिसाद म्हणत आहात ते माहीत नाही. पण मी असे गृहीत धरतो की आपण अग्रलेखातील शेवटच्या परीच्छेदात जे काही बालाजी तांब्यांचे नाव(च) आणि अप्रत्यक्षपणे नाव न घेता केलेला असारामबापूंचा कथीत उल्लेख म्हणत असाल, तर ते काही तार्कीक वाटत नाही. सर्वप्रथम बालाजी तांब्यांना बुवा-बाबांच्या स्टाईलचे फॉलोअर्स आहेत असे वाटत नाही. असारामबापूंकडे गणंग बरेच असले तरी जस जसे त्यांचे जेल मधले राहाणे वाढत आहे त्याबरोबर त्यांचे फॉलोअर्स पण गप्प होऊ लागले असावेत. शिवाय असारामबापूंचे मराठी फॉलोअर्स किती असू शकतील? बरं या दोघांवरही अनेकदा अनेक ठिकाणी टिका झालेली असेल. मला वाटते दोघांवर विनोद देखील भरपूर झालेले आहेत. या सर्वामुळे लोकसत्तासंपादक तात्काळ अग्रलेख मागे घेतील असे वाटत नाही... तुम्हाला तसे वाटत नाही का? का इतर कुठल्यातरी प्रतिक्रीयेस आपण सूचक म्हणत आहात? एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. कुठल्या क्षेत्रात आणि काय खळबळ माजली आहे? आता उत्सुकता वाढली आहे.

राही Sun, 03/20/2016 - 14:08
सीतामाई आणि लक्ष्मणाचे उल्लेख आसारामबापूंना लागू होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आसारामबापूंना फारसे अनुयायी नाहीतच. उलट दुसर्‍या बापूंची अनुयायी संख्या डोळे विस्फारवणारी आहे. आणि..

In reply to by राही

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 14:28
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम

In reply to by राही

विकास Sun, 03/20/2016 - 17:25
शेवटच्या परीच्छेदातले उल्लेख केवळ बालाजी असा स्पष्ट म्हणजे नाव घेऊन आहे. पण या दुसर्‍या बापूंचे नाव तरी आलेले नाही. अशा वेळेस वृत्तपत्रांना इतकी टिका करण्याची परवानगी असते. अर्थात कोर्टात काही होऊ शकणार नाही असे मला वाटते... पण ते जाउंदेत, माझी उत्सुकता उगाच ताणली गेली आहे... :) कोण आहे हा नवाराम? :) जर इथे लिहीणे योग्य वाटत नसेल तर खरड केलीत तरी चालेल...

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 18:34
मिशिवाल्या बापूंची पांढरा शर्ट, काळी प्यांट. बलात्कारासाठी मंत्र दिला कसा झ्यांग झ्यांग. दर गुरुवारी लागते बघा बांद्र्यामधी रांग भक्त भरती वह्या लिहुन फक्त रामनाम. भावना दुकावतील काय हो मिपानी रुद्ध झालेल्या सदस्यांच्या?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विकास Sun, 03/20/2016 - 19:03
अग्रलेखात "लैंगिक शोषण करणारे कोणी बाबाबापू" असे म्हणले आहे. त्याला धरून कोण असू शकतील ते समजावे लागतील. मी कुठल्याच बाबाबापूंचा समर्थक अथवा भक्त नाही. तसेच मधल्याकाळात लक्ष जावे अशा त्यांच्याबद्दल बातम्या देखील दिसलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ होत आहे. तरी देखील मुळ मुद्यासंदर्भात: जर अप्रत्यक्ष उल्लेख असला तर त्यामुळे संपूर्ण अग्रलेख काढायला लावण्याइतका कायदेशीर प्रश्न तयार झालेला नाही. शिवाय लॉजिकली, असल्या बुवाबाबांचे भगतगण शांतपणे असे करतील अशातले नाहीत. त्यामुळे ही शक्यता वाटत नाही.

In reply to by विकास

विकासराव संपादकीय थोडेसे चुकलेले वाटते,त्यांच्या लिखाणानुसार स्वतःला राम धाकल्या बंधुस लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढवलेल्या स्वतःच्या पत्नीस सीता ठरवत भक्तांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणारे बाबा बापू असे जे म्हटले आहे ,माझ्या मते ते दोघे बाबा दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात।। एक म्हणजे अनिरुद्ध बापू आणि दुसरे आसाराम बापू।। काय आहे आपण ठरलो कुबेरांच्या बुद्धी व वयापेक्षा लहान ,पण तोरसेकर ह्यांच्यानुसार कुबेराना स्वतःच्या बुद्धी बद्दल जास्तच घमंड आहे।त्यामुळें ते जे काही लिहितात ते त्यांना अंतिम सत्य वाटते

गामा पैलवान Sun, 03/20/2016 - 15:29
विकास, >> ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील >> एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. मलाही पटलं नाही. तातडीने माफी मागून लेख मागे घ्यावा इतका काही तो स्फोटक वगैरे नाहीये. त्यामुळे गिरीश कुबेरांचा बोलविता धनी वेगळाच असणार. कशावरून मोदीकाका नसतील? त्यांनी बरोबर डाव साधलेला दिसतोय. गोयनका कुटुंब आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते ते असल्या दबावांना भीक घालणारे वाटतात का? माझ्या अंदाजाप्रमाणे मोदीकाकांनी बरोब्बर नेम साधलाय. बघूया आता असहिष्णुतेच्या नावाने कोणकोण पुरस्कार परत करताहेत ते. जरी बदनामी झाली तरी चर्चची होणार. हे सगळं करूनही मोदीकाका नामानिराळेच राहणार. शिवाय गिरीश कुबेर आणि गोयनका यांचाही फायदाच फायदा आहे. मस्त गेम खेळलाय. आ.न., -गा.पै. विशेष : सदर लेख आजूनही लोकसत्तावर उपलब्ध आहे : http://epaper.loksatta.com/c/9207507. मग तर शंका अधिकच बळावतेय.

In reply to by गामा पैलवान

विकास Sun, 03/20/2016 - 17:41
खरेच आहे... आत्ता ज्या पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याच्या पाईकांनी "हाताची घडी, तोंडावर बोट" ठेवले आहे ते बघून अहोआश्चर्यंम् असे म्हणावे लागत आहे! काय गंमत आहे, कन्हैय्या आणि उमरच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरून बोंब झाली, पण येथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरून कोणी कुबेरांच्या बाजूने उभे राहीलेले दिसले नाही. थट्टा अथवा कुचेष्टा नाही, पण ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे आणि ती देखील स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रात झाली आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अगम्य Mon, 03/21/2016 - 09:46
खरे आहे. जर बरखा दत्त ला विचारले तर ती साळसूद पणे म्हणेल की कुबेरांना jenuinely वाईट वाटले आणि त्यांनी voluntareely लेख मागे घेतला. ह्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेलीच नाही. कुठे आहे त्यांना कुणी धमकावल्याचा पुरावा? उलट असे लिहून सुद्धा कुणी ख्रिश्चन संघटनेने मोर्चा, मोडतोड असे काही केले नाही हा ख्रिश्चनांच्या सहिष्णुतेचा पुरावाच आहे. भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. उदाहरणार्थ असे ऐकले की मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले.

In reply to by अगम्य

मदनबाण Mon, 03/21/2016 - 10:32
भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. अगदी... मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले. जसा पोशाखात बदलाव केला तसा आता मोडस ओपरेंडी मध्ये सुद्धा बदल केला गेला पाहिजे ! जसे गळ्यात क्रॉस घालण्याचे फॅड गुपचुप आणले गेले तसेच ओम सुद्धा व्हावे ही इच्छा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

नितिन थत्ते Sun, 03/20/2016 - 17:46
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.

In reply to by नितिन थत्ते

मोदक Sun, 03/20/2016 - 18:25
मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. बरोबर आहे. फक्त पाऊणे चारशे वर्षांपूवी गॅलिलीओ वर पण असाच दबाव आला होता.

In reply to by नितिन थत्ते

विकास Sun, 03/20/2016 - 19:09
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. तसे म्हणा हवे तर. पण माझ्या लेखी कुठल्याच संताकडून हा दबाव आलेला असण्याची शक्यता नाही. पण खेद वाटण्यासारखे एकच आहे की जे लोकं कन्हैय्याच्या आचरटपणाला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणत सांभाळत होते ते सगळे इतके (खर्‍याअर्थाने)बुद्धीवादी कुबेरांच्या बाबतीत पाठींबा देण्यासाठी पुढे कसे आले नाहीत? यातकुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. ती मुस्कटदाबी देखील अशीच कुठलाच जाहीर निषेध न करता झाली होती का?

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 19:24
हे प्रकरण वेगळं आहे. कुठेही विरोध स्पष्ट आणि जाहीर नसतांना संपादकाने मी असा उल्लेख करुन लेख मागे घेणे विचित्र शंकांना जन्म देणारे आहे. ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा कसा काढणार?

In reply to by तर्राट जोकर

विकास Sun, 03/20/2016 - 20:41
स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय? म्हणजे "संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल..." मध्ये स्वखुशी दिसत असली तर ती आत्महत्येच्या वेळेस लिहीलेल्या कुठल्याही पत्रात दिसली पाहीजे, नाही का? विशेष करून जेंव्हा आत्महत्या करणारी व्यक्ती, "I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this." असे म्हणते, तेंव्हा इतरांना दोषी ठरवणे योग्य असते असे म्हणायचे आहे का?

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 21:29
माहित होतं तुम्ही हाच मुद्दा काढाल. पण आता आपण मूळ मुद्द्यावर राहुयात का? संपादकांनी कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या ते तर काही लिहिले नाही. तसे कोणी वाचक दिसतही नाहीत. कुठे काही विरोध प्रकटला नाही. संपादकिय मागे घेण्यामागचं कारण कुठेही स्पष्ट नसतांना स्वखुशीने केलेली आत्महत्या आहे असेच म्हणावे लागेल. ह्यात तुम्ही वेमुला केस घुसडू नका. अवांतरासाठी आम्ही बदनाम आहोत. आम्हालाच बदनाम राहु द्या. जगात आत्महत्या करणारा वेमुला पहिला इसम नाही.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा Mon, 03/21/2016 - 13:38
का का? तुम्ही वारीस पठाणच्या वेळेस दुष्काळ काढलात ते बरोबर, आणि यांनी इथे रोहित वेमुला काढला ते चूक काय? असो.. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या नाहेत असे ठरवून आलो होतो खरे तर, पण अनवधानाने प्रतिसाद टाइप झाल्यावर लक्षात आले.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 13:52
चालेल ना वेमुला काढा, कन्हया काढा, गांधी, कोणीही कुठेही काहीही काढा, स्वातंत्र्य आहे. पण विषयांतर करतो म्हनून फक्त माझं नाव बदनाम करु नका म्हणजे झालं. बाकी वारीस पठाणच्या निलंबनासाठी जे विधानसभासदस्य एकत्र आले त्यांना जनतेच्या तातडीच्या कामांसाठी असेच एकत्र यायला का जमत नाही असा तो प्रश्न होता, पण तुम्हाला मला टार्गेटच करायचं असेल तर कुठलंही कारण पुरतं.

In reply to by विकास

आनन्दा Mon, 03/21/2016 - 15:52
बाकी सगळे जाऊद्या, मात्र गिरीश कुबेरांनी स्वखुशीने आत्मह्त्या केली आहे, ही मात्र खूपच भावले. जे काही झाले त्याला "आत्महत्या" यापेक्षा समर्पक उपमा असूच शकत नाही. मला असे वाटते की आपण १ दिवस लोकसत्ता न घेऊन काही फरक पडणार नाही, तर पुढचा पूर्ण महिना लोकसत्ता न घेऊन गिरीश कुबेरांना पाठिंबा दिला पाहिजे.

In reply to by विकास

यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... १००० टक्के हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 04:56
प्रभावशाली व्यक्तीचा धर्म देव इतरानी फॉलो करणे यात गैर काहीच नाही... पेशवाईचा नगारा वाजत होता ता काळात पेसवे पुजतात म्हणुन गणेशभक्त वाढले व अश्टविनायकांचे प्रस्थ वाढले. ..... मुसुलमान फार वैट ! इथे येऊन ते दिल्लीत राजे झाले. ख्रिस्चन फार वैट ! इथे येउन अनाथालये व कुश्टरोगी आश्र्म काढले व नोबेल मिळवले. ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) . ... पैशाचं मिंधेपण ! हं ! ते तर सगळीकडेच असते. एक कुठले तरी कुडमुडे पारितोषिक वाघाकडुन घेताना एक बटाटा बोलला होता ... ही लोकशाही आहे की ठोकशाही ? वाघाने पंजा उगार्ताच बटाट्याने शब्द गिळले होते ना ? ........ तसेही कुष्ठरोग आश्रम आता टीबी एड्समध्ये कन्वर्त होत चाललेत कारण कुष्ठर्ग्ण आता कमी होत चाललेत. त्यामुळे हिंदु संघटनानीही आता टीबी एड्सचे आस्रम खोलावेत व २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.

In reply to by विकास

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 08:09
कोदलानीबैना सध्या तसेही काही काम नाही. त्याना एखादा आश्रम काढुन दिल्यास त्यांचे , रुग्नांचे व हिंदु धर्माचे भले होइइल. २०५० चे नोबेल घेण्यास शुभेच्छा !

In reply to by मितभाषी

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 17:48
बाळासाहेबांच्यआ हस्ते पुलना एक पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारुन लगेच पुलं बोलले होते के हे सरकार लोकशाही आह की ठोकशाहीचे ? ठाकरेनी फटकारले होते ... आमच्यचकडुन पुरस्कार घेउन आम्हालाच बोलता का ?

In reply to by मृत्युन्जय

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 18:34
सिम्बोलिक हो .. बाघोबा आणि बटाट्याची चाळ नावे लिहिणे टाळायचे होते म्हणुन लिहिले होत्व. पण घटना व त्या बातम्या जगजाहिर आहेत म्हणुन नावे लिहिण्यात काही प्रॉब्लेम नसावा

अर्धवटराव Mon, 03/21/2016 - 07:57
तर सदर प्रकरण 'असहिष्णुता' कॅटॅगरीत मोडत नाहि, त्यामुळे त्याचा निषेध वगैरे करण्याचं काहि कारण नाहि. हायबर्नेटमोड मधे वावरणार्‍या मिपाकरांना चार शब्द वकिली थाटात भिरकावयाला मिळाले. काहिंनी मुख्य मुद्दे बाजुला फेकत आपले जुनेच दळण कांडण उकरुन काढले. काहि नवसदस्यांनी आपण जुनेच असल्याचे पुरावे दिले... एव्हढी उपलब्धी काहि कमि नाहि.

अनुप ढेरे Mon, 03/21/2016 - 10:18
ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक ग्रुपने त्यांच्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती धर्माची यथेच्छ टवाळी केली होती. आरडाओरडा झाला. सुरुवातीला माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका घेतली त्यांनी. पण नंतर काय झालं माहिती नाही. दोन दिवसांनी मुंबैच्या एका चर्च अधिकार्‍याची प्रतेक्ष भेट घेऊन माफी मागितली. त्याचा फोटोदेखील प्रसिद्ध झाला.

मृत्युन्जय Mon, 03/21/2016 - 11:48
या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध होतातः १. देशातली असहिष्णूता वाढत चालली आहे आणि त्यासाठी सध्याचे सरकार अथवा हिंदु जनता जबाबदार आहे असा जो कांगावा केला जात आहे तो धादांत खोटा आहे.. २. सहिष्णुता फक्त हिंदुंमध्येच असली पाहिजे. इतर धर्मीयांना हा नियम लागू नाही, ३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे थोतांड मांडणारे प्रेस्टिट्युट्स सिलेक्टिव्ह गोष्टींकडे बरोबर काणा डोळा करतात. ४. भावना फक्त हिंदोतेर लोकांना आहे. हिंदु लोकांना कुठल्याही धार्मिक / सामाजिक भावना अथवा जाणीवा असता कामा नये. ५. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदुंविषयी गरळ ओ़कण्यासाठी आहे. ६. हिंदु वगळता इतर सर्व धर्मांमध्ये चमत्कार होतात. हिंदु धर्मातील अश्या गोष्टींवर मात्र जळाजळीत टीका केली जाइल. ७. कोणीही यावे आणि हिंदुंना मारुन जावे. एक्खाद्या राजकीय पक्षाने त्याविरुद्ध आवाज उठवला की ते "अतिरेकी " आणि असहिष्णू ठरावेत. इतर धर्मीयांचा चुकांवर कुणी बोट ठेवले तर काय होते ते दिसलेच. ८. गिरीश कुबेर पक्के दुतोंडी आणी ढोंगी आहेत. त्याची शिरजोरी फक्त सात्विक संताप येणार्‍या लोकांविरुद्धच. असे कोणी नरडे दाबले की *गणाला पाय लावुन पळत सुटतात.

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 11:50
"असंतांचे संत" एक उत्तम लेख होता. तो मागे घेण्याचे पाउल निश्चितच पळपुटेपणाचे वाटले. त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. कमाल आहे!!

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 16:02
त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. त्यात मी, अग्रलेखात अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल पण लिहीले आहे. पण कदाचीत तुम्हाला ते दिसले नसावे. असो.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 16:57
अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल
इतर धर्मांचा उल्लेख अनावश्यक अजिबात नव्हता.. राजसत्तेला लोंबकळणारी धर्मांची दुकानदारी असा विषय असल्याने सर्व धर्मांना सारखेच फटकारणे योग्यच होते या निमित्ताने.. बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 17:08
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! "हिंदूविरोध" हा तुम्हाला दिसला. मला नाही. नाहीतर वहाबीबद्दल लिहीले नसते आणि लिहीलेले तुम्हाला दिसले असते.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 17:26
हिंदूविरोध या प्रकरणात नाही म्हणत आहे.. इतर बर्‍याच ठि़काणच्या आक्षेपाबद्दल आहे ते.. बाकी मला वहाबी न दिसण्याचा काही प्रश्नच नाही.. मला कुठल्याही धर्माविषयी अजिबात आत्मीयता नाही.. सर्व धर्म थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी..

In reply to by बाळ सप्रे

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 17:10
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! >> अचूक पकडलंय सप्रेसाहेब. उदा. 'होळीला पाणी वाचवा' म्हणणे, प्लास्टरऑफपॅरिसच्या गणपतीला विरोध, दिवाळीचे फटाकेविरोध, इत्यादी, हे हिंदूसणांविरुद्धचे कारस्थान आहे असे म्हटले जाते. ;-)

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 03/21/2016 - 17:13
तसं नाही काही... पण स्वतः काय करावे हे पहाण्याऐवजी इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! उगाच कशाला असहीष्णुता वाढवायची! बरोब्बर की नाही?

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 03/21/2016 - 17:22
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! अजूनही समजले नसेल तर मी माझे हे गीतापठण थांबवतो.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 17:34
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!
जे खटकतय ते सांगणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला नव्हे. कोणी पाणी वाचवण्यासाठी कींवा नदी प्रदूषण थांबवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमावर किंवा गणपती विसर्जनावर हल्ला वगैरे केल्याचे ऐकिवात नाही .. आवाहन करण्यात काही चूक नाही. ज्यांना पटेल त्यांनी करावं , नाही ते करतातच आहे आपापल्या मनासारखं .. असो.. खूप अवांतर व्हायला लागलय ..

In reply to by विकास

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 17:35
नाही ते समजले हो. पण माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ही गीता सांगावी वाटली ते कळले नाही. ह्यातले इतर कोण आहेत ते स्पष्ट केलेत तर मजसारख्याला समजेल तरी. बाकी, मिसळपाव चर्चांमधे उच्च अलंकारिक भाषेत एखाद्यास गाढव म्हणणे सर्वसंमत असावे. तेच आम्ही सरळ सरळ म्हटले की लोक पिसाळतात. ;-)

गामा पैलवान Mon, 03/21/2016 - 12:25
एच्चमंगेशराव, १. >> ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) अगदी बरोबर बोललात पहा. आता हिंदू जागा होऊ लागलाय. नेमकं तेच तुमचं दुखणं आहे. वेलकम टू मिपा. २. >> २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे. जगाचे उकिरडे फुंकून पारितोषिकं मिळवायची वेळ अजूनतरी हिंदूंवर आलेली नाहीये. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही असेल ते. तरीपण तुमच्या सल्ल्याबद्दल आभार. आ.न., -गा.पै. जाताजाता : एच्चमंगेशराव हे बटाट्याच्या पुस्तकातलं नाव घेतांना तुम्हाला अजिबात लाज वाटली नसेल.

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 18:26
सहमत. त्याच बरोबर, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज उठवणारे एकंदरीतच गप्प बसलेले पाहून आश्चर्य वाटले नाही.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 18:40
चॅनलवर उहापोह झाला नाही वा ट्वीटरवर ट्रेंड झालं नाही म्हणजे सगळ्यांना ही माघार घेणं पटलयं असा सोयीस्कर निष्कर्ष काढायचीही गरज नाही.. :-)

In reply to by बाळ सप्रे

आजानुकर्ण Mon, 03/21/2016 - 19:36
, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. या वेळी केतकर आठवले. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. कुबेर यांची मात्र या सर्व प्रसंगात चांगलीच शोभा झाली आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास Mon, 03/21/2016 - 20:50
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. पूर्ण सहमत. आपण निषेध केलात याचे चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. वास्तवीक, लेख लिहीताना हा मुद्दा डोक्यात पण नव्हता. मात्र काही प्रतिसाद ज्या पद्धतीने येऊ लागले त्यामुळे असे नक्कीच वाटू लागले. असो. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. खरे आहे. या वरून मला विनोद मेहतांची आठवण झाली. त्यांनी The Independent म्हणून एक नियतकालीक चालू केले होते. ज्या प्रमाणे आठवते त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल होते. टाईम्स ला वगैरे सहज हरवू शकले असते. ते मुंबईतच चालू झाले होते, सुरवातीस ते मोफत वाटायचे आणि नंतर ते मुंबईतच बंद पडले.. या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातील तमाम पक्ष एकत्र येऊन विरोधात बोलले होते. मला वाटते पवार मुख्यमंत्री असावेत तेंव्हा पण ते पण अर्थातच यावर आक्षेप घेण्यात पुढे होते. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आला. त्याचे काय झाले ते आठवत नाही. पण त्यांनी, "जर-तर"च्या भाषेत मोघम माफी मागितली होती. म्हणजे आत्ता कसे, "वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...." असे स्पष्ट म्हणले आहे. त्याउलट, तेंव्हा "जर वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल..." अशा अर्थाची माफी (म्हणजे, मी चुकलो वगैरे नाही) मागितली होती. तसेच अंतुलेंचे प्रकरण जेंव्हा बाहेर आले तेंव्हा, "अंतुलेंच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असा रविवारचा दृष्टीक्षेप लिहून माधव गडकरींनी हक्कभंग प्रस्ताव ओढवून घेतला होता. अर्थात पुढे काय झाले ते आठवत नाही. पण गडकरींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात तरी नाही. पण या दोन्ही गोष्टी राजकीय होत्या... वर चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर यांचा एक मदर तेरेसांवर ताशेरे ओढणारा लेख वाचल्याचे आठवते. त्यात, त्यांची एक आठवण देखील होती...(मी आता आठवणीतून लिहीत आहे) एकदा ते आणि मदर तेरेसा एकाच विमानात एकाच लाईन (रो मध्ये) बसले होते. संपुर्ण विमानातले सगळे जण या बाईंच्या पाया पाडून गेले. तळवळकरांना त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांचे काम प्रामाणिक वाटत नव्हते. शिवाय असले नमस्कार करण्यात इंटरेस्ट नसल्याने, ते करायला गेले नाहीत. थोड्यावेळाने फ्लाईट अटेंडंटकडून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. मदर तेरेसांनी त्यात "गॉड ब्लेस यू" अथवा तत्सम आशिर्वादपर संदेश दिला होता. अर्थातच त्यात गर्भितपणे, "तू मला नमस्कार करायला आला नाहीस" अशा अर्थाचे निरीक्षण देखील केले होते असे तळवळकरांच्य लक्षात आले. वास्तवीक त्यांचा हा लेख वाचेपर्यंत इतर कुठल्याही तत्कालीन व्यक्तीप्रमाणे, मदर तेरेसांबद्दल माझे मत निगेटीव्ह नव्हते. पण तळवळकर म्हणतात म्हणल्यावर लक्ष गेले आणि नंतर कधीकाळी न्यूयॉर्क टाईम्समधे देखील तसेच नकारात्मक लेख वाचल्यावर खात्री पटली... असो.

In reply to by विकास

श्रीगुरुजी Mon, 03/21/2016 - 22:45
या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.
अमेरिकन पत्रकार सेमूर हर्श (Seymour Hersh) यांनी १९८३ मध्ये The Price of Power: Kissinger in the Nixon White House हे एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या सुरवातीच्या काळात सीआयचे हस्तक होते असा आरोप केला होता. हर्श यांचा असा आरोप होता की जॉन्सन व निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असण्याच्या काळात मोरारजी देसाईंनी भारताचे परराष्ट्र धोरण व स्थानिक धोरणाची महत्त्वाची माहिती सीआयएला २०००० डॉलर्स (तत्कालीन ३.४० लाख रूपये) च्या बदल्यात दिली होती. त्यामुळे मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श विरूद्ध अमेरिकन न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. मोराराजी देसाई हेच मंत्रीमंडळातील हेर होते हे सेमूर हर्श यांना सिद्ध करता आले नाही. परंतु त्या आरोपामुळे मोरारजींची बदनामी झाली आहे हे मोरारजींच्या वकीलाला सिद्ध करता आले नाही व त्यामुळे तो खटला मोरारजी देसाई हरले. नतर १९८९ च्या उत्तरार्धात टाईम्स गटाच्या द इंडिपेंडंट या नवीन इंग्लिश दैनिकात पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन विनोद मेहतांनी असा आरोप केला होता की सेमूर हर्श यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला केंद्रीय मंत्रीमंडळातील सीआयए चा हेर हे मोरारजी देसाई नसून यशवंतराव चव्हाण होते. हा आरोप प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मुंबईत व इतरत्र मोर्चे निघाले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी विनोद मेहतांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत व शेवटी त्यांना माफी मागून आरोप मागे घ्यावे लागले. काही काळातच हे दैनिकही बंद झाले.

होबासराव Mon, 03/21/2016 - 19:39
अह्हा हितेश दरेकर उर्फ मग्गा वापिस आयेला हय... काय जंत बर झालेत का?

In reply to by होबासराव

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 23:20
अख्ख्या देशालाच जंत झालेत. २०१४ पासुन

In reply to by मदनबाण

hmangeshrao Tue, 03/22/2016 - 10:00
आमचे एक डी एच ओ ( म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ... म्हाणजे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रातील डोक्टरांचे बॉस , ते स्वतः माळकरी होते.) आम्हाला सतत सांगायचे... भारत ही संतांची व जंतांची भूमी आहे. ( पेशंटला ताप , खोकला , डायरिया , अ‍ॅनेमिया , भूक नसणे , व्हिट्यामिन कमतरता , अ‍ॅलर्जी .... काहीही असले तरी जंताना विसरू नका. )

उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका करणाऱ्यांना मोदींचा काही पर्याय दिसतो आहे का,म्हणजे कोणती पार्टी हि मोदींपेक्षा चांगला कारभार देऊ शकेल,मुसळमान आणि बाकीचे सर्व वेमुला किंवा कन्हैय्या पंथाचे अल्पसंख्याक हे न भिता राहू शकतील,आर्थिक प्रगती हि सुसाट होईल,भ्रष्टाचार होणार नाही,पुरस्कार वापसी हि होणार नाही (आता ह्या उपटसुभं लेखकाना त्यांचे खाऊ सरकार असल्यावर पुरस्कार वापसी ची गरज काय)fti च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही,jnu ला हिंदुस्थान मुर्दाबाद वैगरे घोषणा दिल्या म्हणून कोर्ट कचेरीचे भय राहणार नाही, ओवेसी ला भारत माता कि जय म्हणायची गरज भासणार नाही,हिकडे राणे पुत्राला मराठ्यांचा नेता म्हणून स्थापित होता येईल,भुजबळ बाहेर येतील,तिकडे मालदा मधल्या निर्दोष मुस्लिमांना पोलिसांवर हल्ला करण्याचे भय राहणार नाही।तिस्ता ,पाटकर ह्या फोर्ड चा पैसा विना भय घेऊ शकतील,ग्रीन पीस हि संघटना पर्यावरण हाणीचे प्रकल्पाला विदेशी पैशाने विरोध करू शकतील।केजरिवाल ,सरदेसाई ,बरखा ह्यांना मोदींच्या नावाने कंठशोष करायची गरज भासणार नाही,है कोई

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मितभाषी Tue, 03/22/2016 - 12:30
बहुतेक लोकांना मोदीचाय व्हीजनबद्दल शंका नसावी. हे वाचाळवीर, भक्त, मनुवादी यांच्यामुळे जातीय तेढ वाढत आहे.

श्रीगुरुजी Tue, 03/22/2016 - 14:18
विचारस्वातंत्र्याच्या दडपशाहीचे अजून एक जुने उदाहरण आहे. पण ही दडपशाही पुरोगामी विचारवंत समजल्या जाणार्‍यांनीच केली असल्याने त्याला दडपशाही म्हणता येणार नाही. १९८८ किंवा १९८९ मध्ये 'माणूस' नावाच्या साप्ताहिकात (त्यावेळी संपादक कोण होते ते आठवत नाही) बाळ गांगल यांनी 'महात्मा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज' अशा शीर्षकाचा एक टीकात्मक लेख लिहिला होता. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रचंड वादळ उठले. ब्राह्मण संपादक असलेल्या सदाशिव पेठेतून प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकात ब्राह्मण लेखकाने बहुजन समाजाच्या नेत्यांवर लिहिलेल्या टीकात्मक लेखाने एकदम जातीयवादी धुरळा उडाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. विधानसभेत या लेखावर चर्चा होऊन कडक टीका करण्यात आली. पुण्यातील तत्कालीन महापौर (बहुतेक काकडे असावेत) आपल्या गाडीतून ४-५ जणांना घेऊन साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा वगैरे फोडल्याचे वृत्तपत्रातून आले होते. नंतर पुढे काय झाले ते आठवत नाही. माणूस साप्ताहिक नंतर केव्हा तरी बंद झाल्याचे आठवते. छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा हे एक कारण वापरले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात "तुम्ही इतर मागासवर्गियांना राखीव जागा देणार्‍या मंडल आयोगाला विरोध केला, महात्मा फुल्यांची बदनामी करणार्‍या बाळ गांगल यांना पाठीशी घातले" असे आरोप इतर आरोपांबरोबर केले होते.

मितभाषी Tue, 03/22/2016 - 21:32
महात्मा फुले नी पुण्यात वर्तमानपत्र काढल्यास प्रेस जाळून टाकू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. म्हणून त्यांनी ते काम मुंबईतुन करावे लागले. हे सोयीस्करपणे विसरले जाते.

आजानुकर्ण Fri, 03/18/2016 - 20:35
लोकसत्ता आणि कुबेर यांनी अग्रलेख मागे घेेऊन अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह पाऊल उचलले आहे. धर्मांध लोकांना अशा कृतीमुळे निश्चितच बळ मिळेल आणि भावना दुखावण्याची जोरदार साथ येईल.

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश Fri, 03/25/2016 - 11:00
+१ खरेतर अग्रलेख मागे घेण्यापेक्षा कुबेरांनी राजीनामा द्यायला हवा होता.

मदनबाण Fri, 03/18/2016 - 20:56
अरेरे... श्री.गिरिष कुबेर आणि लोकसत्ता यांच्याकडुन हे असे अघटित कसे घडले ? नक्की कुणाच्या भावना दुखावल्या ? बाकी लोकसत्ते मधील मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतरणाचा उद्देश- मोहन भागवत ही बातमी वाचल्यावर अनेकांना पोट शूळ उद्भवल्याचे समजले आहे ! ;) जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

In reply to by मदनबाण

मदनबाण Fri, 03/18/2016 - 21:04
जाता जाता :- मदर तेरेसा मॄत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला देखील धर्मांतरीत करायच्या असे कुठेतरी वाचनात किंवा ऐकणात आल्याचे वाटते, हे खरे होते का ? संदर्भ मिळाला ! तो देखील लोकसत्ते मधलाच ! धर्मा म्हणू नये आपुला आज जगात सर्वात वेगाने वाढणारा कोणता धर्मगट असेल तर तो पेंटाकोस्टल ख्रिश्चन हा आहे. जास्तीत जास्त अन्य धर्मीयांना ख्रिस्ताच्या पायाशी आणून त्यांचे धर्मातर घडवणे हे या पंथाचे जीवितकार्य आहे. या पंथीयांच्या मागे राजसत्ता नसती तर तिचा इतका प्रसार झाला असता काय? समाजसेवेसाठी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या मदर तेरेसा या अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीचेही धर्मातर करीत, हा इतिहास आहे. लोकसत्ता यांनी हा लेख देखील काढुन टाकुन टाकावे ! कशाला डेटा हवा असा भावना दुखावणारा "डेटा" त्यांच्या संकेस्थळावर ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Obama’s counterproductive Pakistan policy

In reply to by मदनबाण

विकास Fri, 03/18/2016 - 22:16
मदर तेरेसांबद्दल आपण मांडलेले मुद्दे मी आधी देखील विविध विचारांच्या लोकांकडून वाचले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात सहमत असलो तरी हे लिहीताना माझा उद्देश किंचीत वेगळा होता... येथे एका संपादकाचे हात इतके बांधण्यासारखे काय झाले आहे? आणि हो या संपादकाचे अनेक विचार हे मला दिशाभूल करणारे वाटले आहेत, तरी देखील हेच मत आहे. अग्रलेखात देशाचे तुकडे करण्याची भाषा नव्हती की कुठल्याही धर्माच्या सामान्य जनांवर अत्याचार होईल अशा पध्दतीची प्रक्षोभक भाषा नव्हती. तरी देखील, ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. येथे मराठी ऐवजी इतर कुठल्या भाषेतले असते तरी असेच मत असते पण येथे मराठीत झाल्याने आपण सगळे ते वाचू शकतो आणि त्या अर्थाने लोकसत्तेचा संबंध आहे. आणि हो , असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते.

In reply to by विकास

मदनबाण Sat, 03/19/2016 - 09:40
विकासराव आपल्या लेखनाचा उद्देश अर्थातच समजला आहे... जबरदस्तीने शेपुट घालायला लावणे असे म्हणता येईल ! ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. खरयं... यावरुन मुस्कटदाबी कोणत्या थरापर्यंत गेली आहे आणि जाऊ शकते याचे उदाहरणच लोकसत्ताने त्यांच्या वाचकांना सप्रमाण घालुन दिले आहे ! एक वाचक म्हणून या झालेल्या घटनेचा मी निशेध व्यक्त करतो. असाच लेख जर कुठल्यातरी तशाच भोंदू पण हिंदू धर्मिय व्यक्तीवर लिहीला गेला असता आणि त्याबद्दल माफी मागायला लावली असती, तर ते देखील तितकेच निषेधार्ह असते. १०० % सहमत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

श्रीरंग_जोशी Fri, 03/18/2016 - 21:01
लोकसत्तेने या अग्रलेखासठी माफी मागणे अतिशय चुकीचे आहे. अवांतर - मिपाकर राजघराणं यांचा संबंधीत विषयावरचा हा लेख वाचनीय आहे - दयाळू मदर तेरेसा.

लोकमत ह्या लेखातील पिग्गी बँक वरती जे उर्दूत लिहिलेलं आहे त्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या म्हणून mim च्या लोकांनी लोकमत जळगाव कार्यालयावर हल्ला केल्यानंतर ह्यांनी सपशेल लोटांगण घातलं ना।भावना फक्त ह्यांना असतात हिंदूंना नसतात हे नेहमी अधोरेखित होत राहत।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विकास Fri, 03/18/2016 - 22:24
ज्या गुंडागर्दीला लोकमतला (कधीकाळी महानगरला ) तोंड द्यावे लागले, ती भले कोणी ठरवून केली असली तरी झुंडशाहीतली एक प्रतिक्रीया होती. अर्थात हे त्याचे समर्थन अथवा त्याचा बचाव करण्यासाठीचा मुद्दा नाही. इथे, माझ्या अनुभवाप्रमाणे आणि जे काही ऐकले-वाचले आहे, त्यावरून मराठी ख्रिस्तीधर्मिय समाज हा बर्‍यापैकी शांत आहे. मग तो महाराष्ट्रातला असो अथवा गोव्यातला. त्यांच्यातल्या काहींचे जरी काही धर्मांतराचे चाळे चालले असतील तरी ते मर्यादीत असावे आणि तो मुद्दा वेगळा आहे, वेगळ्यापद्धतीने (कायद्याने) हाताळता येईल. त्यामुळे त्या लोकांच्या भावना इतक्या टोकाला जाऊन दुखावल्या असतील असे वाटत नाही. मग या अग्रलेखानंतर एक विरोधी प्रतिक्रीया मराठी ख्रिस्ती समाजातून दिसली नाही आणि तरी देखील २४ तासात माफी मागून अग्रलेख अप्रकाशीत करावा लागतो? याच्या मागे नक्की कर्ताकरविता आहे तरी कोण? म्हणून म्हणले लोकमत वरील हल्ला आणि लोकसत्ता संपादकाची कुठेही आवाज न करता, गोंधळ न करता, एखाद्या surgical strike सारखी केलेली मुस्कटदाबी जास्त गंभीर वाटते.

अजया Fri, 03/18/2016 - 21:07
कुबेर यांचे हात बांधले गेलेले दिसतात.शिवाय त्यांनाच वैयक्तिक माफीनामा द्यायला लावलेला दिसतोय.नेहमी काही चुकीचे असल्यास वृत्तपत्राकडून माफी मागितली जाते.इथे मी लिहिले आहे!

बोका-ए-आझम Fri, 03/18/2016 - 23:16
याबद्दल ही एक लिंक आहे. लिहिणारे धर्मगुरूच आहेत,त्यामुळे तथ्य आहे असं मानायला हरकत नाही. http://m.dummies.com/how-to/content/saints-for-dummies-cheat-sheet.html म्हणजे जोपर्यंत पोप म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही संत नाही. शिवाय संत अशी पदवी ही मृत्यूनंतरच मिळणार. लोकांनी स्वयंस्फूर्तीने तुम्हाला संतत्व बहाल केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि कुणीही केलेल्या कामात जर धर्मप्रसार हा मुद्दा नसेल, तर पोप त्याचा विचार संतत्वासाठी का करेल? कारण जर तसं असतं तर फक्त कॅथाॅलिक पंथीयांचाच विचार झाला नसता. एखादा हिंदू किंवा मुस्लिमही सेंट अमुक किंवा सेंट तमुक म्हणून गणला गेला असता. पण तसं होत नाही. एका हाडा-मांसाच्या माणसात लोकांना संतत्व देण्याची बुद्धी असते आणि त्याची निवड कोण करतात - तर इतर हाडा-मांसाची माणसेच. पण ती एखाद्याला संतत्व देऊ शकत नाहीत. असं हे चमत्कारिक त्रांगडं आहे!

अभ्या.. Fri, 03/18/2016 - 23:43
ऑनलाईन आवृत्तीत मागे घेणे प्रोसेस समजू शकतो. प्रिंट आवृत्तीत तो होता ना लेख? मला पाहिल्यासारखा वाटतोय पण जुन्या अंकात असणारच. अशा बाबतीत (जर ऑनलाइन आवृत्ती नसलीच असती) तर संपादकांचे धोरण काय राहिले असते? आमचे विचार चुकीचे की माझे विचार चुकीचे म्हणले गेले असते?

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. Sat, 03/19/2016 - 00:03
इतरांच्या लेखाला पंख लागू दे रे. इथे संपादकीयच उडवलेय. लै भारी शब्द हाय पण ऑलरेडी दुश्मन्या वाढल्यात त्यात भर नको. ;)

In reply to by अभ्या..

श्रीरंग_जोशी Sat, 03/19/2016 - 00:17
दोस्तो का दोस्त, दुश्मनो का दुश्मन... अभ्या द हिरो :-) एक वेळ चुकीची आकडेवारी किंवा तथ्य छापले गेले तर त्याविषयी चुक झाली म्हणून माफी मागणे समजू शकतो. इथे तार्किक विचार आहेत ते एकदा मांडले की मांडले. अशा प्रकारे परत घेण्याने ते गायब होत नसतात उलट अधिक वेगाने पसरतात.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Sat, 03/19/2016 - 00:25
आधी लाथ मारायची मग नमस्कार केल्यासारखे हात पुढेमागे करायचे! ;) तरी देखील तेव्हढे सोपे नसावे इथे.

In reply to by अभ्या..

नाखु Mon, 03/21/2016 - 08:35
पुणे छापील आवृत्तीत तसा माफी खुलासा आणि लेख मागे घेतल्याचे निवेदन आहे (वल्लींना सांगून त्याचा फटु उद्या टाकतो). च्या मारी असहिष्णुताची व्याख्या एकदा मिपा विचारवंत धुरीणांनी करून केंद्र सरकारकडे पाठवून द्यावी ही मिपा वाचकांतर्फे जाहीर विनंती.

दा विन्ची Sat, 03/19/2016 - 11:44
गिरीश कुबेर यांनी अतिशय अनाकलनीय पाऊल उचलले. एवढा कोणता दबाव आहे कळायला मार्ग नाही. लोकसत्ता सारख्या आघाडीच्या वर्तमानपत्राला अशोभनीय आहे हे सारे.

आनन्दा Sat, 03/19/2016 - 13:16
हा फारच धक्कदायक प्रकार आहे.. विकास सर तुमची अडचण नसेल तर हा तुमचा लेख कायअप्पा वर टाकावा म्हणतो.. लोकसत्तच्या संपादकाच्या मागे आपण अश्या प्रसंगी उभे राहिलेच पाहिजे.. बाकी चिमणराव, सर्वज्ञानी आणि विदूषकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.. ते परवाच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढत होते.

In reply to by कपिलमुनी

आनन्दा Sat, 03/19/2016 - 14:58
किमान पुढच्या वेळी तरी त्यांनी शेपुट घालू नये म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा हो. आता झाले ते झाले. पण याविरुद्ध जनमताचा रेटा उभा करणे आवश्यक आहे.

In reply to by आनन्दा

विकास Sat, 03/19/2016 - 18:03
धन्यवाद, माझी काहीच हरकत नाही कायअप्प्पा वर टाकण्यासाठी. मी आधी देखील म्हणले तसे, हा मुद्दा कुणाबद्दचा लेख मागे घेतला अथवा लिहीणार्‍या व्यक्तीविषयी नाही. कारण त्या संपादक महाशयांचे एकांगी विचार पटत नाहीत. मला मराठी ख्रिस्ती समाजाबद्दल बर्‍यापैकी खात्री आहे, की ते असे नाहीत. (चूक असलो तर चूक म्हणेन पण तुर्तास पॉझिटीव्ह गृहीतक म्हणा हवे तर). कुबेरांचे आणि एक्सप्रेस व्यवस्थापनाचे कशासाठी जमत नसेल तर तो देखील त्यांचा अंतर्गत मामला होतो. त्यामुळे हे कुबेर या व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून देखील नाही. हा गंभिर प्रश्न अशा करता आहे कारण बोलवता धनी पूर्ण गप्प बसला आहे. आज कुबेरांचे झाले त्यावर जर आवाज केला नाही तर यांचा धीर आणि माज अजूनच वाढेल...

आनन्दा Sat, 03/19/2016 - 13:19
जाताजाता- कालच कायअप्प वर वाचलेला विनोद -
मदर तेरेसांचे दोन चमत्कार ज्यामुळे त्यांना संतपद दिले गेले - १. ब्राझीलमध्ये एका महिलेचा कर्करोग बरा केला. २. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे कळू नये म्हणून त्यांना आंधळे आणि बहिरे केले.

In reply to by प्रदीप साळुंखे

आनन्दा Sat, 03/19/2016 - 15:05
आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी." चला निर्धार करा ! माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.

In reply to by प्रदीप साळुंखे

आनन्दा Sat, 03/19/2016 - 15:07
हा म्हणजे अगदी मास्टरपीस आहे -
नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे.

आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो
माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आपण झुगारून काय उपयोग? कारण असल्या गोष्टींची माध्यमांना फिकीर नाही,त्यांना सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवे असते.आणि त्यातच ते धन्यता मानतात. लोकमतचीही याआधी घाबरगुंडी उडाली होती. माध्यमांची ही बायस भूमिका सर्वातीत आहेच.डरपोक आहेत साले!

श्रीगुरुजी Sat, 03/19/2016 - 17:55
अग्रलेख प्रसिद्ध झाल्यापासून केवळ २४ तासात माफी मागून अग्रलेख मागे घेणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केवळ २४ तासात गिरीश कुबेरांचे विचार बदलले असणे शक्य नाही. गिरीश कुबेरांवर कोणाचा तरी जबरदस्त दबाव आला असावा. माध्यमांवर दडपण आणले जात आहे हा निधर्मांधांचा आरोप एका अर्थी खरा ठरला आहे. मात्र हिंदू वगळता इतर धर्मियांबद्दल लिहिल्याबद्दल हा दबाव आणला असावा. असाच अग्रलेख हिंदू धर्मातील एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल लिहिला असता तर तो मागे घेण्याची गरज पडली नसती. हा अग्रलेख मागे घेतल्याबद्दल अपेक्षेप्रमाणे एकाही निधर्मांधाने अजूनपर्यंत चकार शब्दानेही विरोध केला नाही. गिरीश कुबेर लवकरच लोकसत्तातून बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर काढले तर आश्चर्य वाटणार नाही. ज्यांना हा अग्रलेख वाचायला मिळाला नसेल त्यांच्यासाठी तो खालील पानावर उपलब्ध आहे. https://www.facebook.com/photo.php?fbid=10153959678189454&set=a.10153762589229454.1073741848.539949453&type=3&theater

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते Sun, 03/20/2016 - 21:41
अग्रलेखाचा मुख्य विषय ख्रिश्चन संताविषयी होता. परंतु लोकसत्ता वाचणारे मराठी ख्रिश्चन ही संख्या इतकी कमी असावी की त्यांच्या मागणीपुढे मान तुकवण्याची लोकसत्ताला धंद्याच्या दृष्टीने काहीच गरज नसावी असे धागाकर्ते सुचवतायत. त्याअर्थी पूर्वी इंदिरा गांधी म्हणत असत त्याप्रमाणे हा "परकीय हात" असावा असं दिसतंय.

मदनबाण Sat, 03/19/2016 - 18:21
Loksatta हा तो लेख, मोबल्यावरुन फोटो काधुन इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

In reply to by मदनबाण

मदनबाण Sat, 03/19/2016 - 18:36
लोकसत्ता {संपादकांचे} यांचे अभिव्यक्ति स्वातंत्र नष्ट झाले आहे,ही घटना साधी नसुन या मागचे गूढ उकलले गेले पाहिजे. ही वाचकांशी केलेली प्रतारणा तर आहेच, तसेच हिंदू समाजाच्या भावनांना काडीची किंमत नसुन इतर धर्मा बद्धल सत्य कथन केल्यास दडपशाही केली जाईल हे अधोरेखित करणारे धोरण स्पष्ट झाले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बेतहाशा दिल ने तुझ को ही चाहा है,हर दुआ में मैंने तुझको ही माँगा है... :- Sanam Teri Kasam

In reply to by विकास

अगम्य Sun, 03/20/2016 - 00:43
प्रतिक्रिया द्यायला शब्दच सुचत नाहीत. लेखात "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" लिहिले आहे. त्याचाच अनुभव घेतल्यासारखे वाटतेय.

राही Sat, 03/19/2016 - 22:31
खरे कारण अगदीच वेगळे असावे. एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत.

In reply to by राही

विकास Sun, 03/20/2016 - 01:32
मायबोलीवरच्या एका लेखातले काही प्रतिसाद सूचक आहेत. मायबोलीतील लेखाबद्दल सुचवल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की कुठले प्रतिसाद म्हणत आहात ते माहीत नाही. पण मी असे गृहीत धरतो की आपण अग्रलेखातील शेवटच्या परीच्छेदात जे काही बालाजी तांब्यांचे नाव(च) आणि अप्रत्यक्षपणे नाव न घेता केलेला असारामबापूंचा कथीत उल्लेख म्हणत असाल, तर ते काही तार्कीक वाटत नाही. सर्वप्रथम बालाजी तांब्यांना बुवा-बाबांच्या स्टाईलचे फॉलोअर्स आहेत असे वाटत नाही. असारामबापूंकडे गणंग बरेच असले तरी जस जसे त्यांचे जेल मधले राहाणे वाढत आहे त्याबरोबर त्यांचे फॉलोअर्स पण गप्प होऊ लागले असावेत. शिवाय असारामबापूंचे मराठी फॉलोअर्स किती असू शकतील? बरं या दोघांवरही अनेकदा अनेक ठिकाणी टिका झालेली असेल. मला वाटते दोघांवर विनोद देखील भरपूर झालेले आहेत. या सर्वामुळे लोकसत्तासंपादक तात्काळ अग्रलेख मागे घेतील असे वाटत नाही... तुम्हाला तसे वाटत नाही का? का इतर कुठल्यातरी प्रतिक्रीयेस आपण सूचक म्हणत आहात? एका क्षेत्रात बरीच खळबळ माजली. कुठल्या क्षेत्रात आणि काय खळबळ माजली आहे? आता उत्सुकता वाढली आहे.

राही Sun, 03/20/2016 - 14:08
सीतामाई आणि लक्ष्मणाचे उल्लेख आसारामबापूंना लागू होत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आसारामबापूंना फारसे अनुयायी नाहीतच. उलट दुसर्‍या बापूंची अनुयायी संख्या डोळे विस्फारवणारी आहे. आणि..

In reply to by राही

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 14:28
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम

In reply to by राही

विकास Sun, 03/20/2016 - 17:25
शेवटच्या परीच्छेदातले उल्लेख केवळ बालाजी असा स्पष्ट म्हणजे नाव घेऊन आहे. पण या दुसर्‍या बापूंचे नाव तरी आलेले नाही. अशा वेळेस वृत्तपत्रांना इतकी टिका करण्याची परवानगी असते. अर्थात कोर्टात काही होऊ शकणार नाही असे मला वाटते... पण ते जाउंदेत, माझी उत्सुकता उगाच ताणली गेली आहे... :) कोण आहे हा नवाराम? :) जर इथे लिहीणे योग्य वाटत नसेल तर खरड केलीत तरी चालेल...

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 18:34
मिशिवाल्या बापूंची पांढरा शर्ट, काळी प्यांट. बलात्कारासाठी मंत्र दिला कसा झ्यांग झ्यांग. दर गुरुवारी लागते बघा बांद्र्यामधी रांग भक्त भरती वह्या लिहुन फक्त रामनाम. भावना दुकावतील काय हो मिपानी रुद्ध झालेल्या सदस्यांच्या?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विकास Sun, 03/20/2016 - 19:03
अग्रलेखात "लैंगिक शोषण करणारे कोणी बाबाबापू" असे म्हणले आहे. त्याला धरून कोण असू शकतील ते समजावे लागतील. मी कुठल्याच बाबाबापूंचा समर्थक अथवा भक्त नाही. तसेच मधल्याकाळात लक्ष जावे अशा त्यांच्याबद्दल बातम्या देखील दिसलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ होत आहे. तरी देखील मुळ मुद्यासंदर्भात: जर अप्रत्यक्ष उल्लेख असला तर त्यामुळे संपूर्ण अग्रलेख काढायला लावण्याइतका कायदेशीर प्रश्न तयार झालेला नाही. शिवाय लॉजिकली, असल्या बुवाबाबांचे भगतगण शांतपणे असे करतील अशातले नाहीत. त्यामुळे ही शक्यता वाटत नाही.

In reply to by विकास

विकासराव संपादकीय थोडेसे चुकलेले वाटते,त्यांच्या लिखाणानुसार स्वतःला राम धाकल्या बंधुस लक्ष्मण आणि दागिन्यांनी मढवलेल्या स्वतःच्या पत्नीस सीता ठरवत भक्तांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणारे बाबा बापू असे जे म्हटले आहे ,माझ्या मते ते दोघे बाबा दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात।। एक म्हणजे अनिरुद्ध बापू आणि दुसरे आसाराम बापू।। काय आहे आपण ठरलो कुबेरांच्या बुद्धी व वयापेक्षा लहान ,पण तोरसेकर ह्यांच्यानुसार कुबेराना स्वतःच्या बुद्धी बद्दल जास्तच घमंड आहे।त्यामुळें ते जे काही लिहितात ते त्यांना अंतिम सत्य वाटते

गामा पैलवान Sun, 03/20/2016 - 15:29
विकास, >> ज्या इंडीयन एक्सप्रेस वृत्तसमुहाने एकेकाळी आणिबाणीच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवला, त्या वृत्तसमुहातील >> एका संपादकाची इतकी मुस्कटदाबी हा समुहच करतो? हे काही पटले नाही. मलाही पटलं नाही. तातडीने माफी मागून लेख मागे घ्यावा इतका काही तो स्फोटक वगैरे नाहीये. त्यामुळे गिरीश कुबेरांचा बोलविता धनी वेगळाच असणार. कशावरून मोदीकाका नसतील? त्यांनी बरोबर डाव साधलेला दिसतोय. गोयनका कुटुंब आणीबाणीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते ते असल्या दबावांना भीक घालणारे वाटतात का? माझ्या अंदाजाप्रमाणे मोदीकाकांनी बरोब्बर नेम साधलाय. बघूया आता असहिष्णुतेच्या नावाने कोणकोण पुरस्कार परत करताहेत ते. जरी बदनामी झाली तरी चर्चची होणार. हे सगळं करूनही मोदीकाका नामानिराळेच राहणार. शिवाय गिरीश कुबेर आणि गोयनका यांचाही फायदाच फायदा आहे. मस्त गेम खेळलाय. आ.न., -गा.पै. विशेष : सदर लेख आजूनही लोकसत्तावर उपलब्ध आहे : http://epaper.loksatta.com/c/9207507. मग तर शंका अधिकच बळावतेय.

In reply to by गामा पैलवान

विकास Sun, 03/20/2016 - 17:41
खरेच आहे... आत्ता ज्या पद्धतीने व्यक्तीस्वातंत्र्याच्या पाईकांनी "हाताची घडी, तोंडावर बोट" ठेवले आहे ते बघून अहोआश्चर्यंम् असे म्हणावे लागत आहे! काय गंमत आहे, कन्हैय्या आणि उमरच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरून बोंब झाली, पण येथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरून कोणी कुबेरांच्या बाजूने उभे राहीलेले दिसले नाही. थट्टा अथवा कुचेष्टा नाही, पण ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे आणि ती देखील स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या महाराष्ट्रात झाली आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अगम्य Mon, 03/21/2016 - 09:46
खरे आहे. जर बरखा दत्त ला विचारले तर ती साळसूद पणे म्हणेल की कुबेरांना jenuinely वाईट वाटले आणि त्यांनी voluntareely लेख मागे घेतला. ह्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेलीच नाही. कुठे आहे त्यांना कुणी धमकावल्याचा पुरावा? उलट असे लिहून सुद्धा कुणी ख्रिश्चन संघटनेने मोर्चा, मोडतोड असे काही केले नाही हा ख्रिश्चनांच्या सहिष्णुतेचा पुरावाच आहे. भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. उदाहरणार्थ असे ऐकले की मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले.

In reply to by अगम्य

मदनबाण Mon, 03/21/2016 - 10:32
भाजप , संघ परिवार, शिवसेना, मनसे ह्या सर्वांना गाजावाजा न करता कार्यभाग कसा उरकावा ते कळत नाही. उलट ते करणार फारसे नाहीत पण त्याचा गाजावाजा इतका करतील की त्यांच्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळते. अगदी... मुंबईतल्या एका आस्थापनेत नोकरी मिळण्यासाठी "knowledge of Marathi mandatory" असे होते. तो नियम बदलून "knowledge of Marathi is desirable" असा केला. आता धडाधड परप्रांतीय त्या नोकऱ्या राजरोस मिळवतील आणि मराठीच्या नावाने दुकान चालवणारे पक्ष खळ्ळ खट्याक करत बसतील. पण शांतपणे कागदी डावपेच लढवून आपले उद्दिष्ट साधणे हे त्यांना जमत नाही. तीच गोष्ट घर वापसीची. ख्रिश्चनांनी सर ईशान्य भारत अजिबात गाजावाजा न करता ख्रिस्ती केला आणि हे पन्नास जणांना घर वापसी करवून ढोल बडवायला लागले. जसा पोशाखात बदलाव केला तसा आता मोडस ओपरेंडी मध्ये सुद्धा बदल केला गेला पाहिजे ! जसे गळ्यात क्रॉस घालण्याचे फॅड गुपचुप आणले गेले तसेच ओम सुद्धा व्हावे ही इच्छा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

नितिन थत्ते Sun, 03/20/2016 - 17:46
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे.

In reply to by नितिन थत्ते

मोदक Sun, 03/20/2016 - 18:25
मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. बरोबर आहे. फक्त पाऊणे चारशे वर्षांपूवी गॅलिलीओ वर पण असाच दबाव आला होता.

In reply to by नितिन थत्ते

विकास Sun, 03/20/2016 - 19:09
ओव्हरऑल संत प्रकरणावर कुबेरांनी तोंडसुख घेतले असल्याने कोणत्या संतांकडून दबाव आला हे कळायला मार्ग नाही. तसे म्हणा हवे तर. पण माझ्या लेखी कुठल्याच संताकडून हा दबाव आलेला असण्याची शक्यता नाही. पण खेद वाटण्यासारखे एकच आहे की जे लोकं कन्हैय्याच्या आचरटपणाला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणत सांभाळत होते ते सगळे इतके (खर्‍याअर्थाने)बुद्धीवादी कुबेरांच्या बाबतीत पाठींबा देण्यासाठी पुढे कसे आले नाहीत? यातकुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... मागील काही वर्षांत संत मंडळींच्या भक्तांकडून मुस्कटदाबी झाल्याचे आणखी एक उदाहरण तुकारामभक्तांकडून घडले आहे. ती मुस्कटदाबी देखील अशीच कुठलाच जाहीर निषेध न करता झाली होती का?

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 19:24
हे प्रकरण वेगळं आहे. कुठेही विरोध स्पष्ट आणि जाहीर नसतांना संपादकाने मी असा उल्लेख करुन लेख मागे घेणे विचित्र शंकांना जन्म देणारे आहे. ह्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे खरंच आहेत की नाहीत, खरंच झाला का नाही हेच कळले नसल्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा कसा काढणार?

In reply to by तर्राट जोकर

विकास Sun, 03/20/2016 - 20:41
स्वखुशीने आत्महत्या करण्याच्या केसमधे कोणावर खुनाचा आरोप ठेवतात काय? म्हणजे "संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल..." मध्ये स्वखुशी दिसत असली तर ती आत्महत्येच्या वेळेस लिहीलेल्या कुठल्याही पत्रात दिसली पाहीजे, नाही का? विशेष करून जेंव्हा आत्महत्या करणारी व्यक्ती, "I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this." असे म्हणते, तेंव्हा इतरांना दोषी ठरवणे योग्य असते असे म्हणायचे आहे का?

In reply to by विकास

तर्राट जोकर Sun, 03/20/2016 - 21:29
माहित होतं तुम्ही हाच मुद्दा काढाल. पण आता आपण मूळ मुद्द्यावर राहुयात का? संपादकांनी कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या ते तर काही लिहिले नाही. तसे कोणी वाचक दिसतही नाहीत. कुठे काही विरोध प्रकटला नाही. संपादकिय मागे घेण्यामागचं कारण कुठेही स्पष्ट नसतांना स्वखुशीने केलेली आत्महत्या आहे असेच म्हणावे लागेल. ह्यात तुम्ही वेमुला केस घुसडू नका. अवांतरासाठी आम्ही बदनाम आहोत. आम्हालाच बदनाम राहु द्या. जगात आत्महत्या करणारा वेमुला पहिला इसम नाही.

In reply to by तर्राट जोकर

आनन्दा Mon, 03/21/2016 - 13:38
का का? तुम्ही वारीस पठाणच्या वेळेस दुष्काळ काढलात ते बरोबर, आणि यांनी इथे रोहित वेमुला काढला ते चूक काय? असो.. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या नाहेत असे ठरवून आलो होतो खरे तर, पण अनवधानाने प्रतिसाद टाइप झाल्यावर लक्षात आले.

In reply to by आनन्दा

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 13:52
चालेल ना वेमुला काढा, कन्हया काढा, गांधी, कोणीही कुठेही काहीही काढा, स्वातंत्र्य आहे. पण विषयांतर करतो म्हनून फक्त माझं नाव बदनाम करु नका म्हणजे झालं. बाकी वारीस पठाणच्या निलंबनासाठी जे विधानसभासदस्य एकत्र आले त्यांना जनतेच्या तातडीच्या कामांसाठी असेच एकत्र यायला का जमत नाही असा तो प्रश्न होता, पण तुम्हाला मला टार्गेटच करायचं असेल तर कुठलंही कारण पुरतं.

In reply to by विकास

आनन्दा Mon, 03/21/2016 - 15:52
बाकी सगळे जाऊद्या, मात्र गिरीश कुबेरांनी स्वखुशीने आत्मह्त्या केली आहे, ही मात्र खूपच भावले. जे काही झाले त्याला "आत्महत्या" यापेक्षा समर्पक उपमा असूच शकत नाही. मला असे वाटते की आपण १ दिवस लोकसत्ता न घेऊन काही फरक पडणार नाही, तर पुढचा पूर्ण महिना लोकसत्ता न घेऊन गिरीश कुबेरांना पाठिंबा दिला पाहिजे.

In reply to by विकास

यात कुठल्या बुवाबाबाच्या चमत्कारा पेक्षा लिबरल्स लोकांच्या चमत्कारीक वर्तनाचे पितळ उघडे पडले असे म्हणावे लागत आहे... १००० टक्के हे न समजलेले लोक झोपलेले नसून झोपेचे सोंग घेऊन आहेत, हे केजीतल्या पोरालाही सांगण्याची गरज नाही.

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 04:56
प्रभावशाली व्यक्तीचा धर्म देव इतरानी फॉलो करणे यात गैर काहीच नाही... पेशवाईचा नगारा वाजत होता ता काळात पेसवे पुजतात म्हणुन गणेशभक्त वाढले व अश्टविनायकांचे प्रस्थ वाढले. ..... मुसुलमान फार वैट ! इथे येऊन ते दिल्लीत राजे झाले. ख्रिस्चन फार वैट ! इथे येउन अनाथालये व कुश्टरोगी आश्र्म काढले व नोबेल मिळवले. ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) . ... पैशाचं मिंधेपण ! हं ! ते तर सगळीकडेच असते. एक कुठले तरी कुडमुडे पारितोषिक वाघाकडुन घेताना एक बटाटा बोलला होता ... ही लोकशाही आहे की ठोकशाही ? वाघाने पंजा उगार्ताच बटाट्याने शब्द गिळले होते ना ? ........ तसेही कुष्ठरोग आश्रम आता टीबी एड्समध्ये कन्वर्त होत चाललेत कारण कुष्ठर्ग्ण आता कमी होत चाललेत. त्यामुळे हिंदु संघटनानीही आता टीबी एड्सचे आस्रम खोलावेत व २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे.

In reply to by विकास

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 08:09
कोदलानीबैना सध्या तसेही काही काम नाही. त्याना एखादा आश्रम काढुन दिल्यास त्यांचे , रुग्नांचे व हिंदु धर्माचे भले होइइल. २०५० चे नोबेल घेण्यास शुभेच्छा !

In reply to by मितभाषी

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 17:48
बाळासाहेबांच्यआ हस्ते पुलना एक पुरस्कार मिळाला होता. तो स्वीकारुन लगेच पुलं बोलले होते के हे सरकार लोकशाही आह की ठोकशाहीचे ? ठाकरेनी फटकारले होते ... आमच्यचकडुन पुरस्कार घेउन आम्हालाच बोलता का ?

In reply to by मृत्युन्जय

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 18:34
सिम्बोलिक हो .. बाघोबा आणि बटाट्याची चाळ नावे लिहिणे टाळायचे होते म्हणुन लिहिले होत्व. पण घटना व त्या बातम्या जगजाहिर आहेत म्हणुन नावे लिहिण्यात काही प्रॉब्लेम नसावा

अर्धवटराव Mon, 03/21/2016 - 07:57
तर सदर प्रकरण 'असहिष्णुता' कॅटॅगरीत मोडत नाहि, त्यामुळे त्याचा निषेध वगैरे करण्याचं काहि कारण नाहि. हायबर्नेटमोड मधे वावरणार्‍या मिपाकरांना चार शब्द वकिली थाटात भिरकावयाला मिळाले. काहिंनी मुख्य मुद्दे बाजुला फेकत आपले जुनेच दळण कांडण उकरुन काढले. काहि नवसदस्यांनी आपण जुनेच असल्याचे पुरावे दिले... एव्हढी उपलब्धी काहि कमि नाहि.

अनुप ढेरे Mon, 03/21/2016 - 10:18
ऑल इंडिआ बकचोद (AIB) नामक ग्रुपने त्यांच्या एका कार्यक्रमात ख्रिस्ती धर्माची यथेच्छ टवाळी केली होती. आरडाओरडा झाला. सुरुवातीला माफी अजिबात मागणार नाही अशी भूमिका घेतली त्यांनी. पण नंतर काय झालं माहिती नाही. दोन दिवसांनी मुंबैच्या एका चर्च अधिकार्‍याची प्रतेक्ष भेट घेऊन माफी मागितली. त्याचा फोटोदेखील प्रसिद्ध झाला.

मृत्युन्जय Mon, 03/21/2016 - 11:48
या घटनेतुन काही गोष्टी सिद्ध होतातः १. देशातली असहिष्णूता वाढत चालली आहे आणि त्यासाठी सध्याचे सरकार अथवा हिंदु जनता जबाबदार आहे असा जो कांगावा केला जात आहे तो धादांत खोटा आहे.. २. सहिष्णुता फक्त हिंदुंमध्येच असली पाहिजे. इतर धर्मीयांना हा नियम लागू नाही, ३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे थोतांड मांडणारे प्रेस्टिट्युट्स सिलेक्टिव्ह गोष्टींकडे बरोबर काणा डोळा करतात. ४. भावना फक्त हिंदोतेर लोकांना आहे. हिंदु लोकांना कुठल्याही धार्मिक / सामाजिक भावना अथवा जाणीवा असता कामा नये. ५. अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदुंविषयी गरळ ओ़कण्यासाठी आहे. ६. हिंदु वगळता इतर सर्व धर्मांमध्ये चमत्कार होतात. हिंदु धर्मातील अश्या गोष्टींवर मात्र जळाजळीत टीका केली जाइल. ७. कोणीही यावे आणि हिंदुंना मारुन जावे. एक्खाद्या राजकीय पक्षाने त्याविरुद्ध आवाज उठवला की ते "अतिरेकी " आणि असहिष्णू ठरावेत. इतर धर्मीयांचा चुकांवर कुणी बोट ठेवले तर काय होते ते दिसलेच. ८. गिरीश कुबेर पक्के दुतोंडी आणी ढोंगी आहेत. त्याची शिरजोरी फक्त सात्विक संताप येणार्‍या लोकांविरुद्धच. असे कोणी नरडे दाबले की *गणाला पाय लावुन पळत सुटतात.

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 11:50
"असंतांचे संत" एक उत्तम लेख होता. तो मागे घेण्याचे पाउल निश्चितच पळपुटेपणाचे वाटले. त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. कमाल आहे!!

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 16:02
त्यातही धागालेखकाला रामदेवबाबा व श्रीश्रींचा छोटासा उल्लेख खटकला.. त्यात मी, अग्रलेखात अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल पण लिहीले आहे. पण कदाचीत तुम्हाला ते दिसले नसावे. असो.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 16:57
अनावश्यक असलेला बुद्ध आणि वहाबी धर्माच्या उल्लेखांबद्दल
इतर धर्मांचा उल्लेख अनावश्यक अजिबात नव्हता.. राजसत्तेला लोंबकळणारी धर्मांची दुकानदारी असा विषय असल्याने सर्व धर्मांना सारखेच फटकारणे योग्यच होते या निमित्ताने.. बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !!

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 17:08
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! "हिंदूविरोध" हा तुम्हाला दिसला. मला नाही. नाहीतर वहाबीबद्दल लिहीले नसते आणि लिहीलेले तुम्हाला दिसले असते.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 17:26
हिंदूविरोध या प्रकरणात नाही म्हणत आहे.. इतर बर्‍याच ठि़काणच्या आक्षेपाबद्दल आहे ते.. बाकी मला वहाबी न दिसण्याचा काही प्रश्नच नाही.. मला कुठल्याही धर्माविषयी अजिबात आत्मीयता नाही.. सर्व धर्म थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी..

In reply to by बाळ सप्रे

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 17:10
बाकी हिंदू धर्माविषयी लिखाणाला "फक्त हिंदूविरोध" असा कांगावा आणि इतर धर्माविषयी असले तर "सेक्युलरी समतोल" अशी विचारसरणी असेल तर काय बोलणार म्हणा !! >> अचूक पकडलंय सप्रेसाहेब. उदा. 'होळीला पाणी वाचवा' म्हणणे, प्लास्टरऑफपॅरिसच्या गणपतीला विरोध, दिवाळीचे फटाकेविरोध, इत्यादी, हे हिंदूसणांविरुद्धचे कारस्थान आहे असे म्हटले जाते. ;-)

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 03/21/2016 - 17:13
तसं नाही काही... पण स्वतः काय करावे हे पहाण्याऐवजी इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! उगाच कशाला असहीष्णुता वाढवायची! बरोब्बर की नाही?

In reply to by तर्राट जोकर

विकास Mon, 03/21/2016 - 17:22
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना! अजूनही समजले नसेल तर मी माझे हे गीतापठण थांबवतो.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 17:34
इतरांनी काय करावे हे सांगणे म्हणजे इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला असतो ना!
जे खटकतय ते सांगणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला नव्हे. कोणी पाणी वाचवण्यासाठी कींवा नदी प्रदूषण थांबवण्यासाठी होळीच्या कार्यक्रमावर किंवा गणपती विसर्जनावर हल्ला वगैरे केल्याचे ऐकिवात नाही .. आवाहन करण्यात काही चूक नाही. ज्यांना पटेल त्यांनी करावं , नाही ते करतातच आहे आपापल्या मनासारखं .. असो.. खूप अवांतर व्हायला लागलय ..

In reply to by विकास

तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 17:35
नाही ते समजले हो. पण माझ्या प्रतिसादातल्या कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ही गीता सांगावी वाटली ते कळले नाही. ह्यातले इतर कोण आहेत ते स्पष्ट केलेत तर मजसारख्याला समजेल तरी. बाकी, मिसळपाव चर्चांमधे उच्च अलंकारिक भाषेत एखाद्यास गाढव म्हणणे सर्वसंमत असावे. तेच आम्ही सरळ सरळ म्हटले की लोक पिसाळतात. ;-)

गामा पैलवान Mon, 03/21/2016 - 12:25
एच्चमंगेशराव, १. >> ( हे सगळे ' तुम्ही ' का नै केले ? ग्लानीर्भवती झाला होता काय? असं मात्र इचारायचं नाही . ) अगदी बरोबर बोललात पहा. आता हिंदू जागा होऊ लागलाय. नेमकं तेच तुमचं दुखणं आहे. वेलकम टू मिपा. २. >> २०५० चे नोबेल घेण्याचे टार्गेट ठेवावे. जगाचे उकिरडे फुंकून पारितोषिकं मिळवायची वेळ अजूनतरी हिंदूंवर आलेली नाहीये. सुदैवाने वा दुर्दैवाने जे काही असेल ते. तरीपण तुमच्या सल्ल्याबद्दल आभार. आ.न., -गा.पै. जाताजाता : एच्चमंगेशराव हे बटाट्याच्या पुस्तकातलं नाव घेतांना तुम्हाला अजिबात लाज वाटली नसेल.

In reply to by बाळ सप्रे

विकास Mon, 03/21/2016 - 18:26
सहमत. त्याच बरोबर, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज उठवणारे एकंदरीतच गप्प बसलेले पाहून आश्चर्य वाटले नाही.

In reply to by विकास

बाळ सप्रे Mon, 03/21/2016 - 18:40
चॅनलवर उहापोह झाला नाही वा ट्वीटरवर ट्रेंड झालं नाही म्हणजे सगळ्यांना ही माघार घेणं पटलयं असा सोयीस्कर निष्कर्ष काढायचीही गरज नाही.. :-)

In reply to by बाळ सप्रे

आजानुकर्ण Mon, 03/21/2016 - 19:36
, यात एरवी व्यक्ती/विचार स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे आणि अंधश्रद्धेच्या विरोधात विज्ञानवादी आवाज
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. या वेळी केतकर आठवले. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. कुबेर यांची मात्र या सर्व प्रसंगात चांगलीच शोभा झाली आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास Mon, 03/21/2016 - 20:50
विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अस्मादिकांनी या काथ्याकूटाला सर्वप्रथम प्रतिसाद देऊन लोकसत्ताचा निषेध केला आहे. पूर्ण सहमत. आपण निषेध केलात याचे चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. वास्तवीक, लेख लिहीताना हा मुद्दा डोक्यात पण नव्हता. मात्र काही प्रतिसाद ज्या पद्धतीने येऊ लागले त्यामुळे असे नक्कीच वाटू लागले. असो. अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाबाबत अग्रलेख लिहिल्यावर त्यांना घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न झाला तरीही त्यांनी अग्रलेख मागे घेतला नाही. खरे आहे. या वरून मला विनोद मेहतांची आठवण झाली. त्यांनी The Independent म्हणून एक नियतकालीक चालू केले होते. ज्या प्रमाणे आठवते त्याप्रमाणे ते अतिशय प्रोफेशनल होते. टाईम्स ला वगैरे सहज हरवू शकले असते. ते मुंबईतच चालू झाले होते, सुरवातीस ते मोफत वाटायचे आणि नंतर ते मुंबईतच बंद पडले.. या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. महाराष्ट्रातील तमाम पक्ष एकत्र येऊन विरोधात बोलले होते. मला वाटते पवार मुख्यमंत्री असावेत तेंव्हा पण ते पण अर्थातच यावर आक्षेप घेण्यात पुढे होते. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आला. त्याचे काय झाले ते आठवत नाही. पण त्यांनी, "जर-तर"च्या भाषेत मोघम माफी मागितली होती. म्हणजे आत्ता कसे, "वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो...." असे स्पष्ट म्हणले आहे. त्याउलट, तेंव्हा "जर वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल..." अशा अर्थाची माफी (म्हणजे, मी चुकलो वगैरे नाही) मागितली होती. तसेच अंतुलेंचे प्रकरण जेंव्हा बाहेर आले तेंव्हा, "अंतुलेंच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असा रविवारचा दृष्टीक्षेप लिहून माधव गडकरींनी हक्कभंग प्रस्ताव ओढवून घेतला होता. अर्थात पुढे काय झाले ते आठवत नाही. पण गडकरींवर कारवाई झाल्याचे ऐकीवात तरी नाही. पण या दोन्ही गोष्टी राजकीय होत्या... वर चर्चाप्रस्तावात म्हणल्याप्रमाणे, म.टा.चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर यांचा एक मदर तेरेसांवर ताशेरे ओढणारा लेख वाचल्याचे आठवते. त्यात, त्यांची एक आठवण देखील होती...(मी आता आठवणीतून लिहीत आहे) एकदा ते आणि मदर तेरेसा एकाच विमानात एकाच लाईन (रो मध्ये) बसले होते. संपुर्ण विमानातले सगळे जण या बाईंच्या पाया पाडून गेले. तळवळकरांना त्यांच्याबद्दल राग होता कारण त्यांचे काम प्रामाणिक वाटत नव्हते. शिवाय असले नमस्कार करण्यात इंटरेस्ट नसल्याने, ते करायला गेले नाहीत. थोड्यावेळाने फ्लाईट अटेंडंटकडून त्यांना एक चिठ्ठी मिळाली. मदर तेरेसांनी त्यात "गॉड ब्लेस यू" अथवा तत्सम आशिर्वादपर संदेश दिला होता. अर्थातच त्यात गर्भितपणे, "तू मला नमस्कार करायला आला नाहीस" अशा अर्थाचे निरीक्षण देखील केले होते असे तळवळकरांच्य लक्षात आले. वास्तवीक त्यांचा हा लेख वाचेपर्यंत इतर कुठल्याही तत्कालीन व्यक्तीप्रमाणे, मदर तेरेसांबद्दल माझे मत निगेटीव्ह नव्हते. पण तळवळकर म्हणतात म्हणल्यावर लक्ष गेले आणि नंतर कधीकाळी न्यूयॉर्क टाईम्समधे देखील तसेच नकारात्मक लेख वाचल्यावर खात्री पटली... असो.

In reply to by विकास

श्रीगुरुजी Mon, 03/21/2016 - 22:45
या नियतकालीकात, मेहतांनी अचानक एका लेखात शिवाजी आणि यशवंतराव चव्हाणांवर वक्तव्य केले. शिवाजीवरील आठवत नाही. पण यशवंतरावांना त्यांनी मला वाटते सीआयएचे हस्तक ठरवले होते. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला होता.
अमेरिकन पत्रकार सेमूर हर्श (Seymour Hersh) यांनी १९८३ मध्ये The Price of Power: Kissinger in the Nixon White House हे एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी मोरारजी देसाई हे इंदिरा गांधींच्या सुरवातीच्या काळात सीआयचे हस्तक होते असा आरोप केला होता. हर्श यांचा असा आरोप होता की जॉन्सन व निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असण्याच्या काळात मोरारजी देसाईंनी भारताचे परराष्ट्र धोरण व स्थानिक धोरणाची महत्त्वाची माहिती सीआयएला २०००० डॉलर्स (तत्कालीन ३.४० लाख रूपये) च्या बदल्यात दिली होती. त्यामुळे मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श विरूद्ध अमेरिकन न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. मोराराजी देसाई हेच मंत्रीमंडळातील हेर होते हे सेमूर हर्श यांना सिद्ध करता आले नाही. परंतु त्या आरोपामुळे मोरारजींची बदनामी झाली आहे हे मोरारजींच्या वकीलाला सिद्ध करता आले नाही व त्यामुळे तो खटला मोरारजी देसाई हरले. नतर १९८९ च्या उत्तरार्धात टाईम्स गटाच्या द इंडिपेंडंट या नवीन इंग्लिश दैनिकात पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन विनोद मेहतांनी असा आरोप केला होता की सेमूर हर्श यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला केंद्रीय मंत्रीमंडळातील सीआयए चा हेर हे मोरारजी देसाई नसून यशवंतराव चव्हाण होते. हा आरोप प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली. मुंबईत व इतरत्र मोर्चे निघाले. आपले आरोप सिद्ध करण्यासाठी विनोद मेहतांना कोणतेही पुरावे देता आले नाहीत व शेवटी त्यांना माफी मागून आरोप मागे घ्यावे लागले. काही काळातच हे दैनिकही बंद झाले.

होबासराव Mon, 03/21/2016 - 19:39
अह्हा हितेश दरेकर उर्फ मग्गा वापिस आयेला हय... काय जंत बर झालेत का?

In reply to by होबासराव

hmangeshrao Mon, 03/21/2016 - 23:20
अख्ख्या देशालाच जंत झालेत. २०१४ पासुन

In reply to by मदनबाण

hmangeshrao Tue, 03/22/2016 - 10:00
आमचे एक डी एच ओ ( म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ... म्हाणजे जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रातील डोक्टरांचे बॉस , ते स्वतः माळकरी होते.) आम्हाला सतत सांगायचे... भारत ही संतांची व जंतांची भूमी आहे. ( पेशंटला ताप , खोकला , डायरिया , अ‍ॅनेमिया , भूक नसणे , व्हिट्यामिन कमतरता , अ‍ॅलर्जी .... काहीही असले तरी जंताना विसरू नका. )

उठ सुठ केंद्रीय सरकारवर टीका करणाऱ्यांना मोदींचा काही पर्याय दिसतो आहे का,म्हणजे कोणती पार्टी हि मोदींपेक्षा चांगला कारभार देऊ शकेल,मुसळमान आणि बाकीचे सर्व वेमुला किंवा कन्हैय्या पंथाचे अल्पसंख्याक हे न भिता राहू शकतील,आर्थिक प्रगती हि सुसाट होईल,भ्रष्टाचार होणार नाही,पुरस्कार वापसी हि होणार नाही (आता ह्या उपटसुभं लेखकाना त्यांचे खाऊ सरकार असल्यावर पुरस्कार वापसी ची गरज काय)fti च्या विद्यार्थ्यांना आंदोलनाची गरज भासणार नाही,jnu ला हिंदुस्थान मुर्दाबाद वैगरे घोषणा दिल्या म्हणून कोर्ट कचेरीचे भय राहणार नाही, ओवेसी ला भारत माता कि जय म्हणायची गरज भासणार नाही,हिकडे राणे पुत्राला मराठ्यांचा नेता म्हणून स्थापित होता येईल,भुजबळ बाहेर येतील,तिकडे मालदा मधल्या निर्दोष मुस्लिमांना पोलिसांवर हल्ला करण्याचे भय राहणार नाही।तिस्ता ,पाटकर ह्या फोर्ड चा पैसा विना भय घेऊ शकतील,ग्रीन पीस हि संघटना पर्यावरण हाणीचे प्रकल्पाला विदेशी पैशाने विरोध करू शकतील।केजरिवाल ,सरदेसाई ,बरखा ह्यांना मोदींच्या नावाने कंठशोष करायची गरज भासणार नाही,है कोई

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मितभाषी Tue, 03/22/2016 - 12:30
बहुतेक लोकांना मोदीचाय व्हीजनबद्दल शंका नसावी. हे वाचाळवीर, भक्त, मनुवादी यांच्यामुळे जातीय तेढ वाढत आहे.

श्रीगुरुजी Tue, 03/22/2016 - 14:18
विचारस्वातंत्र्याच्या दडपशाहीचे अजून एक जुने उदाहरण आहे. पण ही दडपशाही पुरोगामी विचारवंत समजल्या जाणार्‍यांनीच केली असल्याने त्याला दडपशाही म्हणता येणार नाही. १९८८ किंवा १९८९ मध्ये 'माणूस' नावाच्या साप्ताहिकात (त्यावेळी संपादक कोण होते ते आठवत नाही) बाळ गांगल यांनी 'महात्मा फुले व त्यांचा सत्यशोधक समाज' अशा शीर्षकाचा एक टीकात्मक लेख लिहिला होता. तो लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रचंड वादळ उठले. ब्राह्मण संपादक असलेल्या सदाशिव पेठेतून प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकात ब्राह्मण लेखकाने बहुजन समाजाच्या नेत्यांवर लिहिलेल्या टीकात्मक लेखाने एकदम जातीयवादी धुरळा उडाला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. विधानसभेत या लेखावर चर्चा होऊन कडक टीका करण्यात आली. पुण्यातील तत्कालीन महापौर (बहुतेक काकडे असावेत) आपल्या गाडीतून ४-५ जणांना घेऊन साप्ताहिकाच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा वगैरे फोडल्याचे वृत्तपत्रातून आले होते. नंतर पुढे काय झाले ते आठवत नाही. माणूस साप्ताहिक नंतर केव्हा तरी बंद झाल्याचे आठवते. छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा हे एक कारण वापरले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात "तुम्ही इतर मागासवर्गियांना राखीव जागा देणार्‍या मंडल आयोगाला विरोध केला, महात्मा फुल्यांची बदनामी करणार्‍या बाळ गांगल यांना पाठीशी घातले" असे आरोप इतर आरोपांबरोबर केले होते.

मितभाषी Tue, 03/22/2016 - 21:32
महात्मा फुले नी पुण्यात वर्तमानपत्र काढल्यास प्रेस जाळून टाकू अशा जाहीर धमक्या दिल्या होत्या. म्हणून त्यांनी ते काम मुंबईतुन करावे लागले. हे सोयीस्करपणे विसरले जाते.
गेल्या ६ ते ८ महीन्यांमध्ये असहीष्णुता आणि त्याला अनुसरून व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच कसा सद्य भारत सरकारच्या कारभारामुळे होत आहे यावरून माध्यमात कशी आणि कुठल्या कुठल्या कारणाने चर्चा झाली, हे येथे सांगत बसायची गरज आहे असे वाटत नाही... :) हे सर्व चाललेले असताना वास्तवीक तमाम वृत्तपत्रे-माध्यमे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पण कडक टिका करण्यात मागे पडत नव्हती. ही टिका केवळ सरकारवरच नव्हती तर बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानावर देखील तितकीच होती आणि अजूनही होते.

सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...

संदीप डांगे ·

जेपी Sun, 08/23/2015 - 13:46
डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे सोडले. तुम्ही 'लोकमत' वाचणे सोडा. टक्याला 'संध्यानद' वाचणे सोडायला सांगु. मी 'एकमत' वाचणे सोडतो. मापं ना ' मटा ' सोडायला सांगु. एकुणच व्रुत्तपत्रे वाचणे सोडु.हाकानाका.

In reply to by जेपी

नाखु गुरुवार, 08/27/2015 - 19:15
शिवाय खाजगी वाहिन्यांवरच्या (दूरदर्शनवरील नाही) कोंब्डा-कुत्री झुंजी पाहणे सोडणे जास्ती हितकर आहे. अनुभवी नाखु

गॅरी ट्रुमन Sun, 08/23/2015 - 13:50
ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
मी ८० च्या दशकात विशीमध्ये नव्हतो तरीही एक मुद्दा---
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?
सुंदर पिचाईंविषयी मला विशेष काही माहिती नाही आणि ते खरोखरच गरीब कुटुंबातले होते की नाही हे पण मला माहित नाही. पण आय.आय.टी आणि स्टॅनफर्डमध्ये शिकणे हा गरीब नसल्याचे लक्षण आहे हे मला नक्कीच मान्य नाही. आय.आय.टी मध्ये शिक्षणासाठी कर्ज मिळते.आणि आय.आय.टी मध्ये चांगल्या ग्रेड आल्यास त्या आधारे स्टॅनफर्डमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळू शकतो.तेव्हा या दोन आधारांवर कोणीही गरीब नव्हते हे सिध्द करता येण्याजोगा हा सक्षम मुद्दा नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 14:15
सुंदर पिचई यांच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्याच माध्यमांमधे अशीच माहीती उपलब्ध आहे. स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं. शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे. आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात. सुपर३० उगाच सूरू झाले नाही. आयआयटी व गरिबांचा प्रवेश यावर माध्यमांमधे बरीच चर्चा झाली आहे मागे. हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन Sun, 08/23/2015 - 14:54
स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं.
तसे असेल तर सुंदर पिचाई एकदम श्रीमंत म्हणायला हवेत. आजच्या काळात स्टॅनफर्डची फी आणि कॅलिफोर्नियात दोन वर्षे रहायचा खर्च याचा आकडा एखाद कोटीपर्यंत सहज जाईल.त्याच तुलनेत त्यावेळीही असणार असे धरायला हरकत नसावी.
शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे.
अशा आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये शिकायला स्टेट बँक गेल्या अनेक वर्षांपासून विनातारण कर्ज देत आली आहे.असे कर्ज विनातारण आणि गॅरेंटरशिवाय कर्ज स्टेट बँकेची त्या संस्थेच्या आवारातलीच शाखा देते आणि केवळ अ‍ॅडमिशन लेटरवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या इतर कुठल्याही शाखेत शिक्षणकर्ज घ्यायचे असेल तर मात्र तारण, गॅरेंटर इत्यादी प्रकार असतात.
आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात.
कोट्याला आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी आय.आय.टी जे.ई.ई साठी कोचिंग क्लासच्या फॅक्टर्‍या ८० च्या दशकातही होत्या का? आणि आय.आय.टी मध्ये कोणी विद्यार्थी असेल तर तो कोचिंग क्लास मधूनच गेला असेल आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून गेला नसेलच असे कशावरून?
हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.
इतकं मनावर नका घेऊ हो :)

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 15:03
इतकं मनावर नका घेऊ हो :)
नाही हो ;-) वडिल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर असलेले अभियंता, घर, स्कूटर, इ. गोष्टी बाजूला ठेवून फक्त आयआयटी प्रवेश इतकाच निकष लावला तर गरीब श्रीमंत कोण हा प्रश्नच उरत नाही. चर्चेत एखाद्याचं विधान चुकीचंच कसं हे सिद्ध करायला सिलेक्टीव रीडींग पुरेसं असतं. मी कलेक्टीव अ‍ॅनालिसिस मांडत आहे. तुम्ही त्यातलं ज्यावर वाद घालता येईल तेवढंच वाक्य उचलून पिचई ला बेनेफिट ऑफ डाइट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो गरीब असूही शकतो असे म्हटलं आहे. पण इतर परिस्थिती त्या विधानाविरूद्ध आहे हे लक्षात घेतलेले नाही. तुम्ही आयआयटी बद्दल उल्लेख मनावर घेऊ नका. पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं. यासंबंधीत लिंक्स देतो सावकाश.

In reply to by संदीप डांगे

चिरोटा Mon, 08/24/2015 - 15:02
पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं ७० व ८०च्या दशकातल्या जे.ई.चे अनेक लोक पाहिलेत तर आय.आय.टी. मोठ्या शहरांतील सुशि़क्षित मध्यम्वर्गीयांना अ‍ॅक्सेसेबल होती असे म्हणता येते.क्लासेस प्रकार खूप कमी होता. अग्रवाल व ब्रिलियंट ट्युटोरियल्स हे प्रामुख्याने होते.ह्यांची फी पण वाजवी असायची(९० साली अग्रवाल-२३०० रुपये) बहुतांशी परीक्षा देणारे व पास होणारे हे मुंबई,पुणे,दिल्ली,चेन्नई,कोलकाता... अशा मोठ्या शहरांमधून असायचे. साधारण २ लाख परी़क्षार्थी व त्यातून २००० जागा,म्हणजे १:१०० असे गुणोत्तर.

मारवा Sun, 08/23/2015 - 14:22
मी अशीच मागे एकदा जपानच्या प्रिन्सेस नोरिको ची बातमी वाचली होती. त्यात ती राजघराण्याच्या बाहेर एका साध्या माणसाशी ( राजघराण्याच्या तुलनेत तसा नाही ) लग्न करणार होती. आता नविन जीवन राजघराण्याच्या बाहेर एका सामान्य माणसाबरोबर व्यतीत करावे लागेल या संघर्षाची कल्पना आल्याने तिने प्रिपरेशन करायला सुरुवात केली ती स्वतः स्वतःच्या कारने सुपरमार्केट पर्यंत गेली. तिने स्वतः ( हो स्वतःच्या हाताने काहि वस्तु खरेदी करुन कार्ट मध्ये टाकल्या) नंतर त्या कार्टीने तीने बिलींग केले. परत सर्व सामान स्वतः कारमध्ये टाकुन घरी गेली. असतो एकेकाचा गरीबीशी संघर्ष दुसरा कॉन्ट्रास्ट आपल्याकडे मुबलक पहायला मिळतो. एक महाश्वेतादेवींच्या मुलाखतीत वाचलेल आठवतय बिरसा मुंडा चा पत्ता सांगितला की साक्ष दिली पोलिसात नक्की आठवत नाही अस काहितरी एका आदिवासीने केल तर का कशाच्या बदल्यात तर त्याला दोन रुपये आणि पोट भरुन भात खायला दिला म्हणुन. त्यात त्या म्हणतात त्या आदिवासींसाठी आयुष्यात एकदा तरी पोट भरुन भात खायला मिळणे म्हणजे खुप च मोठी गोष्ट होती. दे आर सो पुअर यु नो ते सर्व बिचारे एका खराटा मारुती ८०० मध्ये पिकनीक ला जातात

यशोधरा Sun, 08/23/2015 - 14:27
लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड नसावा बहुतेक. कोणत्या मासिकातील/ वर्तमानपत्रातील बातमीला कितपत महत्व द्यायचे हे आपण नक्कीच ठरवू शकतो. असो.

In reply to by यशोधरा

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 14:55
ताई, लोकमत व सुंदर पिचईचे हे फक्त एक उदाहरण दिलंय. अशा स्वरूपाच्या बातम्या विविध लोकांबद्दल विविध दर्जाच्या विविध माध्यमांतून येतंच असतात. माध्यमांमधून यशस्वी लोकांनी कसा खडतर प्रवास केलाय अशा कहान्या नेहमीच येतात. त्यांच्या प्रवासाचा खडतरपणा अधिक - लार्जर दॅन रीअल लाइफ- रंगवण्याच्या अहमहमिकेने त्या कधी कधी हास्यास्पद व बनावट होतात हेच पिचईच्या निमित्ताने सिद्ध झालं इतकंच.

In reply to by संदीप डांगे

यशोधरा Sun, 08/23/2015 - 16:23
अहो साहेब ठीके की. सुंदर पिचाई म्हणजे काही आयुष्य जगायचा मापदंड नव्हेत. आता ते दारिद्र्यरेषेखाली जगले नसतील पण म्हणून त्यांनी जे साध्य केलं त्याचं क्रेडिट कमी होतं का? बरं, ज्यांनी बातमी दिली आहे त्यांनी कितपत तपासून दिली आहे, तो एक अलाहिदा मुद्दा. आणि तसंही पिचईच्या खडतर प्रवासाची किती लोकांना पडली आहे, असं वाटतं तुम्हांला? लोक आता वाचतील, पुढच्या अर्ध्या तासात विसरतील. कोणत्याही बातमीचे हेच प्राक्तन आहे आणि असते.

gogglya Sun, 08/23/2015 - 15:18
'भारतीय मूळ' असलेल्या आणी सध्या परदेशी वास्तव्यास असलेल्या [यातील बहुतेक जण ग्रीन कार्ड मिळालेले किंवा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले] लोकांचे गुणगान करत राहणार आहोत, हा प्रश्न आहे. बाकी लहानपणीची गरीबी / श्रीमंती वगैरे चालु द्या...

चिरोटा Sun, 08/23/2015 - 15:53
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
खरे आहे.८०च्या दशकात्, फोन साठी प्रतिक्षायादी असायची.बहुतांशी लोकांकडे त्यामुळे फोन नसायचा.टी.व्ही. वा गाडीचेही तसेच.प्रस्थापित व्यवस्थेत 'नेत्रदीपक' यश मिळाले की थोडेसे गरीबीचे,'हालाखीच्या दिवसांचे' भांडवल करणे ही पद्धत आहे.एखादी कंपनी बर्यापैकी मोठी झाली की मग तिचे प्रवर्तक आमची कंपनी कशी 'गॅरेज स्टर्टअप' होती हे दिमाखाने सांगतात. त्या गॅरेजचे फोटो मग मोठ्या नियत्कालिकांत 'ते दिवस' शिर्षकाखाली छापून येतात. अनेक वेळा ही गॅरेजेस श्रीमंत वस्त्यांमध्ये असतात व त्या गॅरेजचा आकारही आपल्या १ बी.एच.के.पेक्षा मोठा असतो.

नंदन Sun, 08/23/2015 - 16:03
ब्लूमबर्ग.कॉमवर गेल्या वर्षी पिचाईंवर एक लेख/प्रोफाईल आला होता. त्यातल्या दुसर्‍या पानावर (दुवा) हे सारे स्कूटर - टेलिफोन - स्टॅनफर्ड इ. उल्लेख आहेत. तेदेखील पिचाईंनीच सांगितलेले दिसताहेत. (आता हा त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग किंवा वैट्ट, वैट्ट, दुष्ट अमेरिकन पत्रकारांनी तत्कालीन भारतीय मध्यमवर्गाला हिणवण्यासाठी रचलेले कारस्थान, यावर अजून एक वायफळाचा मळा पिकवता येईल.) तर अलीकडच्या बातम्यांत अनेक वृत्तपत्रांनी बातमी देताना या ब्लूमबर्गी लेखाकडे निर्देश केला. मी 'लोकमत'मधली बातमी वाचलेली नाही; पण तुमच्या कैफियतीवरून असं दिसतंय की बहुधा त्या पत्रकारूने असले दुवे/निर्देश देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या मगदुराप्रमाणे थेट अनुवादाची पाटी टाकलेली असावी. त्यातही तपशीलाच्या चुका आहेतच. उदा.
Pichai excelled at school and won a coveted spot at the Indian Institute of Technology in Kharagpur, where he studied engineering. After graduating, he won an additional scholarship to Stanford University to study materials science and semiconductor physics. Pichai’s father tried to take out a loan to cover the cost of the plane ticket and other expenses. When it didn’t come through in time, he withdrew $1,000 from the family’s savings—more than his annual salary. “My dad and mom did what a lot of parents did at the time,” Pichai says. “They sacrificed a lot of their life and used a lot of their disposable income to make sure their children were educated.”

रेवती Sun, 08/23/2015 - 22:46
मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली नाही. बाकी नक्की किती खरं किती खोटं हे करण्यापेक्षा तो मनुष्य दोनवेळा खाऊन पिऊन सुखी असावा असा निष्कर्ष निघू शकेल, जे चांगलेच आहे. अर्धपोटी वगैरे कोणीच रहायला नकोय. आवश्यक ते पाटी, दप्तर, पुस्तकं मिळाली असावित हेही चांगलच आहे. आमच्या आजूबाजूला राहणार्‍या दोनेक जणांनी नक्की काय केलं म्हणजे आपली मुलं अशा पोझिशनला पोहोचतील? त्यांना आपण सुंदर पिचाई व सत्या नाडेला यांच्या जीवनावर माहिती द्यायला हवी का अशी चर्चा व्हॉटस अपवर केली असे नवरा म्हणत होता. पण तेवढेच! मग विषय संपला. त्या चर्चा करणार्‍यांचाही उत्साह संपला असावा कारण पुढे काही झाले नाही.

सुंदर पिचाई हे गरीब का श्रीमंत परिस्थितीत वाढले हे ठरवणे अधिक करून संदर्भावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणता येईल तर अमेरिकन संदर्भात ती गरीब ठरेल. पण यापेक्षा अधिक महत्वाची आणि विचारणीय बाब अशी कि सत्य नाडेला[Microsoft] शिव नाडर [HCL Technologies] आणि सुंदर पिचाई [Google] हे तिघेही त्यांच्या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या नवीन पिढीला आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात.

In reply to by श्रीनिवास टिळक

असंका Mon, 08/24/2015 - 00:55
एक शंका आहे, कुणी प्लीज सांगेल का- एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

In reply to by असंका

पगला गजोधर Mon, 08/24/2015 - 09:43
एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?
हे मात्र १+ निरीक्षण आपले, कंफ्युज्ड(नसलेले), अकौंटंट साहेब

In reply to by श्रीनिवास टिळक

श्रीरंग_जोशी Mon, 08/24/2015 - 10:36
सत्या नाडेला व सुंदर पिचाई हे दोघेही जागतिक किर्तीच्या कंपन्यांत (अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट व गुगल) बर्‍याच खालच्या पदावरून सुरुवात करून सिइओ पदापर्यंत पोचले. शिव नाडर एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. वयानेही (७० वर्षे) ते इतर दोघांपेक्षा बरेच मोठे आहेत. सुंदर पिचाई यांची गुगलच्या सिइओपदी नियुक्ती झाल्यावर फेसबुकवर सत्या नाडेला व शिव नाडर यां दोघांच्या फोटोज बरोबर त्यांचा फोटो फिरवला जात होता. तुमचा प्रतिसाद त्या फेसबुक पोस्टवरून प्रेरित आहे का?

उगा काहितरीच Mon, 08/24/2015 - 00:57
ते गरीब होते कि नाही ही बाब गौण आहे. ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

In reply to by उगा काहितरीच

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 01:14
ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
बरोबर. आणी सुंपिला गरीब म्हटल्याने जर एखाद्या गरीब व्यक्तीला वर उठण्याची जिद्द मिळत असेल तर अजुन सुरेख...

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 10:41
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद! फार थोड्या लोकांना लेखाचा उद्देश आणि रोख नेमका कळला. कदाचित मलाच नीट लिहिता आले नाहीये. प्रश्न, सुंदर पिचई हा खरंच गरिब होता की नव्हता, आता काय आहे, कसा यशस्वी झाला वैगेरे नाहीच आहे. कुण्या गरिबाने श्रीमंतच होउ नये असे काही मी म्हटले नाही. सुंदर पिचईचे केवळ एक उदाहरण घेतले आहे. तसेही राहुलजींच्या मते गरिबी ही एक सापेक्ष मानसिकता आहे. ;-) असो. थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात. आम्ही फार गरिब होतो, आमच्या चौघांत मिळून एकच कार होती, एकच घर होते, तीनच वेळेला जेवत होतो, आठवड्यातून एकदाच मल्टीप्लेक्सला जात होतो, वर्षातून एकदाच फॉरेनट्रीपला जात होतो, आईकडे दहाच किलो सोन्याचे दागिने होते, आमची फक्त पाचशे एकर बागायती शेती होती. इत्यादी कहान्या तीस वर्षांनी काही मुले सांगतील कदाचित मुद्दा संदर्भाचा आहे. त्यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याकाळाला आजच्या काळाप्रमाणे किंवा अमेरिकन दृष्टीकोणातून बघणे विसंगतीपूर्ण आहे व ते हास्यास्पद होते असे म्हणायचे होते. त्याकाळातले जनजीवन, समाजकारण, आर्थिक परिस्थितीतून उद्भवणारे प्रसंग इत्यादी बाबी आजच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. कारण ऐंशीचे दशकातली टीनेजर मंडळी आणि ९५ नंतर जन्मलेली टीनेजर मंडळी यांच्या आकलनात फार फरक आहे. कष्ट, गरीबी, अभाव याचा जो काळ ऐंशीच्या दशकातल्या टीनेजरनी बघितला तो नंतरच्या पीढीने बघितलाच नाही. आज मोलकरणीचा मुलगाही स्मार्टफोनसाठी जीवघेणा हट्ट करतो, त्याला आईचे कष्ट, पैशाची अनुपलब्धता, इत्यादी गोष्टी समजतच नाहीत. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असले पाहिजे असाच अट्टाहास सर्वत्र दिसतो. ऐंशीच्या दशकात मुलांमधे ह्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्याकाळात स्कूटरवर फिरलो, रि़क्षातून शाळेत जायचो, तीन खोल्यांचे घर ह्या गरिबी किंवा अभावाच्या गोष्टी नसून सुखवस्तूपणाच्या द्योतक आहेत. पण आजच्या काळात जर त्यांना गरिबीच्या, अभावाच्या प्रातिनिधिक म्हणून सादर केल्यात तर आजच्या पीढीला खरी गरिबी काय होती हे कळणारच नाही. माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता. थांबतो. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 12:27
जेंव्हा घवघवीत यश हातात येते. त्या वेळी अशा व्यक्तीच्या नकारात्मक बाजुही गुणगान गायल्या प्रमाणे वाखाणल्या जातात(उदा. स्टीव जोब्स) व अपयश असेल तर तर सकारात्मक बाजुचीही निंदा केली जाते... कमी मिळकतीचे जिवन अत्यंत हालाखीचे दारिद्र्यावस्थेतले चितारले जाते... कोणाला चायवाला समजले जाते... कोणाला भिकारी... ये सब चलते रहतायं.सुंदरच्या गरीबीची वास्तवअवास्तव वर्णने वाचुन एका खर्‍या गरीबाला जर वर जाण्याची उर्मी अन दिशा मीळाली तरी ते सर्व न्याय ठरते. सो लेट्स से हिप हिप हिप हुर्रे फॉर बिइंग पुर सुंदर...
थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.
:) येस. असे असतात खरे... पण ते फार दिशाभुल करु शक्तात असे वाटत नाही.
माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ Mon, 08/24/2015 - 12:34
>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता. ऑरे दादा, ई चोलबे ना. मिपावर सुन्दर धागे कुणी काढले असते मग???? डांगे अण्णा हलकं घ्या. गरीबी ही मानसिक अवस्था आहे या आदरणीय राहुलजी यांच्या मताशी सहमत असलेला

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 14:16
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:14
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?
छान विचार. आपणही जेंव्हा एखाद्याबाबत बोलतो/धागे काढुन मत व्यक्त करतो (उदा. सुंदर पिचाइ) त्याबाबत वैयक्तीक होत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा तेही मुर्खांचेच लक्षण असेल.

In reply to by द-बाहुबली

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:28
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.
तुम्ही जर गुगलचे सिएओ झालात तर मला तुमचा अभिमान वाटेल असे मी विधान केले आहे तर यात तुम्हाला झोंबण्यासारखे/ अथवा मुर्ख लक्षन काय आहे अथवा मुद्दा सोडुन काय आहे ? कारण मुद्दा कोणाला कोनीतरी कोणी बनल्यावर वाटणार अभिमान हाच मुद्दा आहे नाही का जर आपण वैयक्ती लिखाण करत नाही आहोत तर ? तुम्ही तुमचे कामधंदे सोडुन मिपाचे संपादक बनलात तरी मला अभिमान आहे हे विधानही अजिबात वैयक्तीक व मुद्दा सोडून नाही जर चर्चेचा मुद्दा अभिमान केंव्हा वाटावा हा असेल तर. आणी नसेल तर मुळात प्रथम तो कोणी घुसडला... शेवटी तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही पण तुम्ही गुगलचे सिइओ बनला असता तर मला जास्त अभिमान वाटले हे फक्त मी एक निरीक्षण नोंदवतो.

सुबोध खरे Mon, 08/24/2015 - 12:44
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण १९८१ साली आय आय टी ची फी रुपये २५०/- सहामाही साठी होती. ( माझ्या भावाचा प्रवेश असल्याने माहिती आहे) आणि व्ही जे टी आय ची रुपये १८०/ - स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना एक तर शिष्यवृत्ती असे किंवा शिक्षण कर्ज सहज मिळे ज्याचा हप्ता दोन वर्षानंतर सुरु होत असे जेंव्हा तो विद्यार्थी अमेरिकेत डॉलर मध्ये कमवू लागत असे. त्यामुळे या गोष्टी गरिबांना सुद्धा परवडत असत. बाकी सुंदर पिचई जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील हे गरिब मध्यमवर्गीय नव्हे तर मध्य मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गात गणले जाऊ शकतील. तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 12:51
तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको
+१०००००.

In reply to by गॅरी ट्रुमन

असंका Mon, 08/24/2015 - 14:20
+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? एक लाख वेळा सांगताय की अशी अमुक एक गल्लत कुणी करू नका? आणि कुणी केलीये अशी गल्लत ? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यावर तुम्हीच अशी गल्लत केल्याचं दिसतंय...कारण धागाकर्त्याच्या लेखाचा विषय हा सुंदर पिचाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा हा नसून, त्यांच्याबद्दल आलेल्या लेखातली त्यांच्या नजरेला आलेली विसंगती हा होता. आणि तुम्ही मात्र ते गरीब असले तरी काही काही मार्गांनी त्यांना आणि एकंदरीतच गरीबांना कर्ज, शिष्यवृत्ती वगैरे मिळून असे शिक्षण घेणं शक्य असल्याचं मत मांडलं आहेत. म्हणजे गरीबांना उच्च शिक्षण परवडत असे हा मुद्दा आपणच तर आणला होतात चर्चेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

अस्वस्थामा Mon, 08/24/2015 - 14:45
हो आहे. एनी प्रॉब्लेम?
ही ही ही.. बाकी क्लिंटन भौ अम्रिकेसारखेच मस्त अ‍ॅटिट्युड घेऊन वावरत असता हे भारीय. :)

तुडतुडी Mon, 08/24/2015 - 13:25
हो ना . आणि देशासाठी काहीही न करता परदेशात संपूर्ण योगदान देणार्यांचं एवढं कौतुक कशाला ? का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून . इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ? त्याच्या गावाला केक बिक कापला जातो का ? बावळटपणा नुसता

In reply to by तुडतुडी

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 13:42
इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ?
असे काही लोक सांगू शकाल का?

In reply to by तुडतुडी

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 14:13
का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .
हो. काय त्रास आहे तुम्हाला ? इथे एक भारतीय म्हणून आत्मविश्वास नुकताच कुठे तरुणांमधे उभारु लागला आहे त्यांची स्वप्ने आत्ता कुठे विस्त्रुत (विस्तृत न्हवे ब्रॉड) होत आहेत मग हा सुर कशाला ? नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ? - भारताबद्दल प्रचंड अभिमान असलेला पण विषेश प्रेम नसलेला.

In reply to by द-बाहुबली

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 14:19
नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?
योगदान अगदीच दिले नाही असे नाही. भारतासाठी योगदान भारतात राहूनच देता येते असे नाही.परदेशात चांगले काम करून भारत या नावाचा दबदबा निर्माण करायला हातभार लावणे हे पण भारतासाठीच योगदान आहे. अमेरिकेतील ज्यू लॉबीमुळे अमेरिका इसराएलला फार काही करू शकत नाही.तसा दबदबा जगभर भारतीयांचा व्हायला हवा. आणि हो आत्मविश्वास तर नक्कीच साजरा करायला हवा. - भारताबद्दल प्रचंड प्रेम असलेला पण विषेश अभिमान नसलेला (गॅरी ट्रुमन)

In reply to by गॅरी ट्रुमन

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:18
सहमत आहे. पण ही बाब लोकांना सामजावणे अवघड असते ज्यांना भारतातुन निघुन जाणार्‍या व्यक्ती देशाप्रती काहीच देणे ठेवत नाहीत असे मानतात. आणी स्वतःलाच त्यांच्यापासुन तोडुन घेतात.

इरसाल Mon, 08/24/2015 - 13:57
ज्यांच्या नावातच "पिचलेले" असावेत असा धडधडीत अर्थछटा प्रतित करणारा "पिचाई" शब्द येतोय त्याच्या गरीबीवर काय शिंतोडे उडवत आहात.(शिंतोडे उडवु र्‍हायले बे ?)

अरे होऊ द्या की गवगवा जरासा सुंदर पिचईंचा ! आतापर्यंत हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच भारतीय लोक जगातल्या पहिल्या पाचात असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोचलेत. त्यात एका भारतियाची भर पडली ही काय अभिमानाची गोष्ट नाही ? शिवाय असा माणूस भारतातल्या निम्न/मध्यम वर्गातून काय अगदी सधन वर्गातून आला असला तरी जागतीक स्तरावर (आणि मुख्य म्हणजे अमेरिकन प्रणालीतून पुढे आलेल्यांशी) स्पर्धा करून ते पद मिळवणे ही विशेषच गोष्ट नाही का ? अश्या लोकांचे जरासे जास्त वाढवून वर्णन केले गेले (सुंदरचे तसे वर्णन झाले असा माझा अजिबात दावा नाही) तर ते इतर अनेक महत्वाकांक्षी भारतियांना प्रेरणादायक ठरून... "हे पण होऊ शकते" इतकी जरी त्यांच्या मनाची खात्री झाली तरी सुंदरचा विक्रम मोडणारा दुसरे सुंदर२,३,४,५ व्हायला मदतच होईल, नाही का? शिवाय, सम्राटांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि औद्योगिक धुरीण यांच्या संबंधींच्या लोकवदंता (अनेक्डोट्स) हे साम्राज्ये, सत्तास्थाने आणि उद्योग अधिकाधिक वाढविण्यासाठी मोठे उपयोगी साधन आहे, हे व्यवस्थापनातले सर्वमान्य तत्व आहे. त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात आपण निकम्म्या भ्रष्ट नेत्यांच्या नावाच्या पाट्या आणि फ्लेक्स आपण रोज बघतोच आहोत ना ?... त्याला आपण विरोध करतो काय ? पिचईसारख्यांची एखाद्या वेळची थोडी वाढवून सांगितलेली स्तुतीही भारतीयांमध्ये काहीतरी सकारत्मकच फरक घडवेल. तिला उगी विरोध कशाला ?!

असंका Mon, 08/24/2015 - 14:42
थोडी वाढवून सांगितलेली
म्हणजे बदल करून सांगितलेली...
तिला उगी विरोध कशाला ?!
आहे अशी बातमी न सांगता लेखकाच्या मनाप्रमाणे केलेले बदल हे धोकादायकच. त्यात तुम्ही असे बदल हवेसे, असे बदल नकोसे हे नाही ठरवू शकत. कारण हितसंबंध हे परस्परावलंबी आणि परस्परविरोधी दोन्ही प्रकारचे असतात. या अनिश्चित जगात ज्या ज्या गोष्टींनी अनिश्चितता वाढते, तिला विरोध करायलाच हवा. त्याला "उगीच विरोध" म्हणणं योग्य नाही. बातमी वाचताना मला अशी शंका मनात यायला नको की या लेखकाने काही तरी बदलून लिहिलं आहे. त्याने अनिश्चितता निर्माण होइल.

In reply to by असंका

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/27/2015 - 22:31
त्या प्रतिसादावर अगोदर... त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात. असे लिहिले आहे ! :)

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 19:31
सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं म्हणून बर्‍याच लोकांना खटकलेलं दिसतंय. कुणाला काही स्वतःहूनच खटकवून घ्यायचं असेल तर माझा नाइलाज आहे. जणू पिचईबद्दल आकस ठेवूनच मी हा धागा लिहिलाय असं काहींच्या प्रतिसादात जाणवतंय. अनिवासी/मूळ भारतीयांच्या परदेशातल्या यशाने हुरळणारे व त्यांना नाके मुरडणारे असे बहुतेक दोन गट जालावर नेहमीच दिसतात. असे काही विषय दिसले की दोन्ही गट आपआपली हत्यारे परजून युद्धात उतरतांना बघितलेत. त्याबद्दल कुठे 'मोकळं' व्हायच्या कायम तयारीत असलेले हा धागा मिळायलाय तर पूर्वग्रहदूषित मनाने वाटेल ते टायपत सुटलेत. इथे नुसतं सुंदर पिचई एवढे दोन शब्द लिहिले असते तरी तेच झाले असते. अशा लोकांना धाग्याचा खरा उद्देश कळूनही ते जर आपल्याला वाटेल तो अर्थ काढत हुज्जत घालण्याच्याच प्रवृत्तीचे असतील तर त्याला माझा काही इलाज नाही. विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या धाग्यावर तरी काही लोक तेच करत आहेत. चर्चेचे मुद्दे/प्रश्न काय होते?
माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का? की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो? कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या? मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का? तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
माझ्या धाग्यात वा प्रतिसादात सुंदर पिचई वा त्यांच्या यशाबद्दल कुठलाही खोचक उल्लेख वा रोख नाही. माझा रोख केवळ आणि केवळ दोन काळातला फरक माध्यमांत कसा दाखवला जातो याचे उदाहरण देणे यावर होता. त्यावर काही माहिती मिळावी, त्याकाळातला मध्यमवर्ग, आताचा मध्यमवर्ग, बदलते राहणीमान, विचार यावर चर्चा व्हावी असा उद्देश होता. राहता राहिला तो सुंदर पिचई बद्दलच्या माझ्या वैयक्तिक मताचा प्रश्न, जो फारच क्षुल्लक आहे माझ्यासाठी. तर त्यांनी जे यश मिळवले त्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची कंपनी उभारली असती तर हा अभिमान (माझ्या मनात असलेला, इतरांनीही तसेच वाटून घ्यावे असे नाही) द्विगुणित झाला असता. बरेच भारतीय मोठ्या विदेशी कंपन्यांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजकाल त्यात काही नवल-विशेष नाही. येणार्‍या भारतीय पिढ्यांसमोर असे नोकरपेशा आदर्श ठेवण्यापेक्षा स्टीव जॉब्स, बील गेट्स, झुकरबर्ग, बन्सल्स, मित्तल, इत्यादी 'समस्यांवर उपाय शोधून त्याचे व्यवसाय तयार करणार्‍या व जगाच्या व्यवहाराची भाषा बदलणार्या लोकांचे' आदर्श ठेवणे 'माझ्या वैयक्तिक मतानुसार' आवश्यक आहे. याचा अर्थ नोकर्‍या करणारे फक्त पाट्या टाकतात असे माझे मत आहे असे नाही. ज्याला जिथे योग्य संधी मिळते, मग भले ती नोकरीत असो, व्यवसायात असो, भारतात असो वा परदेशात असो, त्याने त्या संधीचे सोने केले तर मला आनंदच वाटेल. तिथे वादाचा मुद्दाच कुठे येतो? इथे कोण भारतीय, अभारतीय, इथे राहिले, तिकडे गेले, भारतासाठी काय केले वैगेरे प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय कुठेही राहू दे, त्यांनी स्वतः काहीतरी निर्माण करावे, शोधावे, उद्योग उभारावे. एक भारतीय म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. त्यांनी किती गरिबीत दिवस काढले यावर रोख असल्यापेक्षा त्यांनी जगात काय बदल घडवले, काय योगदान दिले यावर चर्चा व्हाव्यात असे माझे मत आहे. माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही. लेख व प्रतिसादांत माझी भूमिका/मतं मांडली आहे. याउपर योग्य त्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असेल तर स्वागत आहे.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Wed, 08/26/2015 - 19:24
माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.
विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या प्रतिसादात तरी असेच आपले कडुन घडले आहे. पण अर्थातच आपण त्याला किंमत देणार नाही असे (म्हणत) असल्याने आपण विरोधाभासी लिहता म्हणायची द्वीरुक्ती टाळतो. बाकी प्रतिसाद उल्लेखनीय.

पैसा Wed, 08/26/2015 - 22:13
"तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं..
१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे. मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय. सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Wed, 08/26/2015 - 22:40
पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत. १९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते. माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा Wed, 08/26/2015 - 22:47
आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.

In reply to by पैसा

शब्दबम्बाळ Wed, 08/26/2015 - 23:03
टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत... आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)

In reply to by श्रीरंग_जोशी

रेवती गुरुवार, 08/27/2015 - 22:27
आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.

In reply to by रेवती

असंका गुरुवार, 08/27/2015 - 22:36
व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्‍यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात... काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/27/2015 - 10:30
चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली.
वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.

नमकिन गुरुवार, 08/27/2015 - 12:09
स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे. कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच. स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.

शरभ गुरुवार, 08/27/2015 - 13:16
एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ? भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय. मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....

In reply to by शरभ

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 08/27/2015 - 16:05
पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत. सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष. सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष. सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष. सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष. सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.

राही गुरुवार, 08/27/2015 - 17:32
भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्‍या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही. साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्‍यांचा भात वाढला. नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला. दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/27/2015 - 22:43
सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या कंपनीचे सी.इ.ओ. झाले
माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.

शरभ Fri, 08/28/2015 - 12:24
हा असला उदो उदो करुन काय मिळनारे? अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.

जेपी Sun, 08/23/2015 - 13:46
डॉ.खरेंनी 'लोकसत्ता' वाचणे सोडले. तुम्ही 'लोकमत' वाचणे सोडा. टक्याला 'संध्यानद' वाचणे सोडायला सांगु. मी 'एकमत' वाचणे सोडतो. मापं ना ' मटा ' सोडायला सांगु. एकुणच व्रुत्तपत्रे वाचणे सोडु.हाकानाका.

In reply to by जेपी

नाखु गुरुवार, 08/27/2015 - 19:15
शिवाय खाजगी वाहिन्यांवरच्या (दूरदर्शनवरील नाही) कोंब्डा-कुत्री झुंजी पाहणे सोडणे जास्ती हितकर आहे. अनुभवी नाखु

गॅरी ट्रुमन Sun, 08/23/2015 - 13:50
ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
मी ८० च्या दशकात विशीमध्ये नव्हतो तरीही एक मुद्दा---
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?
सुंदर पिचाईंविषयी मला विशेष काही माहिती नाही आणि ते खरोखरच गरीब कुटुंबातले होते की नाही हे पण मला माहित नाही. पण आय.आय.टी आणि स्टॅनफर्डमध्ये शिकणे हा गरीब नसल्याचे लक्षण आहे हे मला नक्कीच मान्य नाही. आय.आय.टी मध्ये शिक्षणासाठी कर्ज मिळते.आणि आय.आय.टी मध्ये चांगल्या ग्रेड आल्यास त्या आधारे स्टॅनफर्डमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळू शकतो.तेव्हा या दोन आधारांवर कोणीही गरीब नव्हते हे सिध्द करता येण्याजोगा हा सक्षम मुद्दा नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 14:15
सुंदर पिचई यांच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्याच माध्यमांमधे अशीच माहीती उपलब्ध आहे. स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं. शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे. आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात. सुपर३० उगाच सूरू झाले नाही. आयआयटी व गरिबांचा प्रवेश यावर माध्यमांमधे बरीच चर्चा झाली आहे मागे. हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.

In reply to by संदीप डांगे

गॅरी ट्रुमन Sun, 08/23/2015 - 14:54
स्टॅनफर्डमधलं शिक्षण त्यांच्या घरच्या बचतीच्या पैशांवर झालं असं समजतं.
तसे असेल तर सुंदर पिचाई एकदम श्रीमंत म्हणायला हवेत. आजच्या काळात स्टॅनफर्डची फी आणि कॅलिफोर्नियात दोन वर्षे रहायचा खर्च याचा आकडा एखाद कोटीपर्यंत सहज जाईल.त्याच तुलनेत त्यावेळीही असणार असे धरायला हरकत नसावी.
शै़क्षणिक कर्ज, इतर सुविधा वैगेरे आजच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही असं माझं मत आहे.
अशा आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये शिकायला स्टेट बँक गेल्या अनेक वर्षांपासून विनातारण कर्ज देत आली आहे.असे कर्ज विनातारण आणि गॅरेंटरशिवाय कर्ज स्टेट बँकेची त्या संस्थेच्या आवारातलीच शाखा देते आणि केवळ अ‍ॅडमिशन लेटरवर कर्ज मिळू शकते.बँकेच्या इतर कुठल्याही शाखेत शिक्षणकर्ज घ्यायचे असेल तर मात्र तारण, गॅरेंटर इत्यादी प्रकार असतात.
आयआयटीबद्दलतर आजच्या काळात जेवढा गवगवा आहे त्याच्या मानाने ८०च्या दशकात फक्त मोजक्या लोकांना त्याची माहीती होती. ही मोजकी मंडळी म्हणजे उच्चशिक्षित, सूखवस्तू कुटूंबे. ह्यांनाच कोचींगक्लासेसच्या फिया परवडतात.
कोट्याला आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी आय.आय.टी जे.ई.ई साठी कोचिंग क्लासच्या फॅक्टर्‍या ८० च्या दशकातही होत्या का? आणि आय.आय.टी मध्ये कोणी विद्यार्थी असेल तर तो कोचिंग क्लास मधूनच गेला असेल आणि स्वतःचा स्वतः अभ्यास करून गेला नसेलच असे कशावरून?
हजारात दहा अपवाद दाखवून सत्य नाकारता येणार नाही.
इतकं मनावर नका घेऊ हो :)

In reply to by गॅरी ट्रुमन

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 15:03
इतकं मनावर नका घेऊ हो :)
नाही हो ;-) वडिल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर असलेले अभियंता, घर, स्कूटर, इ. गोष्टी बाजूला ठेवून फक्त आयआयटी प्रवेश इतकाच निकष लावला तर गरीब श्रीमंत कोण हा प्रश्नच उरत नाही. चर्चेत एखाद्याचं विधान चुकीचंच कसं हे सिद्ध करायला सिलेक्टीव रीडींग पुरेसं असतं. मी कलेक्टीव अ‍ॅनालिसिस मांडत आहे. तुम्ही त्यातलं ज्यावर वाद घालता येईल तेवढंच वाक्य उचलून पिचई ला बेनेफिट ऑफ डाइट देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो गरीब असूही शकतो असे म्हटलं आहे. पण इतर परिस्थिती त्या विधानाविरूद्ध आहे हे लक्षात घेतलेले नाही. तुम्ही आयआयटी बद्दल उल्लेख मनावर घेऊ नका. पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं. यासंबंधीत लिंक्स देतो सावकाश.

In reply to by संदीप डांगे

चिरोटा Mon, 08/24/2015 - 15:02
पण जेवढं वाचलं आहे त्यावरून आयआयटी ही श्रीमंत-उच्च्भ्रूंना अ‍ॅक्सेसेबल होती असं वाटतं ७० व ८०च्या दशकातल्या जे.ई.चे अनेक लोक पाहिलेत तर आय.आय.टी. मोठ्या शहरांतील सुशि़क्षित मध्यम्वर्गीयांना अ‍ॅक्सेसेबल होती असे म्हणता येते.क्लासेस प्रकार खूप कमी होता. अग्रवाल व ब्रिलियंट ट्युटोरियल्स हे प्रामुख्याने होते.ह्यांची फी पण वाजवी असायची(९० साली अग्रवाल-२३०० रुपये) बहुतांशी परीक्षा देणारे व पास होणारे हे मुंबई,पुणे,दिल्ली,चेन्नई,कोलकाता... अशा मोठ्या शहरांमधून असायचे. साधारण २ लाख परी़क्षार्थी व त्यातून २००० जागा,म्हणजे १:१०० असे गुणोत्तर.

मारवा Sun, 08/23/2015 - 14:22
मी अशीच मागे एकदा जपानच्या प्रिन्सेस नोरिको ची बातमी वाचली होती. त्यात ती राजघराण्याच्या बाहेर एका साध्या माणसाशी ( राजघराण्याच्या तुलनेत तसा नाही ) लग्न करणार होती. आता नविन जीवन राजघराण्याच्या बाहेर एका सामान्य माणसाबरोबर व्यतीत करावे लागेल या संघर्षाची कल्पना आल्याने तिने प्रिपरेशन करायला सुरुवात केली ती स्वतः स्वतःच्या कारने सुपरमार्केट पर्यंत गेली. तिने स्वतः ( हो स्वतःच्या हाताने काहि वस्तु खरेदी करुन कार्ट मध्ये टाकल्या) नंतर त्या कार्टीने तीने बिलींग केले. परत सर्व सामान स्वतः कारमध्ये टाकुन घरी गेली. असतो एकेकाचा गरीबीशी संघर्ष दुसरा कॉन्ट्रास्ट आपल्याकडे मुबलक पहायला मिळतो. एक महाश्वेतादेवींच्या मुलाखतीत वाचलेल आठवतय बिरसा मुंडा चा पत्ता सांगितला की साक्ष दिली पोलिसात नक्की आठवत नाही अस काहितरी एका आदिवासीने केल तर का कशाच्या बदल्यात तर त्याला दोन रुपये आणि पोट भरुन भात खायला दिला म्हणुन. त्यात त्या म्हणतात त्या आदिवासींसाठी आयुष्यात एकदा तरी पोट भरुन भात खायला मिळणे म्हणजे खुप च मोठी गोष्ट होती. दे आर सो पुअर यु नो ते सर्व बिचारे एका खराटा मारुती ८०० मध्ये पिकनीक ला जातात

यशोधरा Sun, 08/23/2015 - 14:27
लोकमत हा पत्रकारितेचा मापदंड नसावा बहुतेक. कोणत्या मासिकातील/ वर्तमानपत्रातील बातमीला कितपत महत्व द्यायचे हे आपण नक्कीच ठरवू शकतो. असो.

In reply to by यशोधरा

संदीप डांगे Sun, 08/23/2015 - 14:55
ताई, लोकमत व सुंदर पिचईचे हे फक्त एक उदाहरण दिलंय. अशा स्वरूपाच्या बातम्या विविध लोकांबद्दल विविध दर्जाच्या विविध माध्यमांतून येतंच असतात. माध्यमांमधून यशस्वी लोकांनी कसा खडतर प्रवास केलाय अशा कहान्या नेहमीच येतात. त्यांच्या प्रवासाचा खडतरपणा अधिक - लार्जर दॅन रीअल लाइफ- रंगवण्याच्या अहमहमिकेने त्या कधी कधी हास्यास्पद व बनावट होतात हेच पिचईच्या निमित्ताने सिद्ध झालं इतकंच.

In reply to by संदीप डांगे

यशोधरा Sun, 08/23/2015 - 16:23
अहो साहेब ठीके की. सुंदर पिचाई म्हणजे काही आयुष्य जगायचा मापदंड नव्हेत. आता ते दारिद्र्यरेषेखाली जगले नसतील पण म्हणून त्यांनी जे साध्य केलं त्याचं क्रेडिट कमी होतं का? बरं, ज्यांनी बातमी दिली आहे त्यांनी कितपत तपासून दिली आहे, तो एक अलाहिदा मुद्दा. आणि तसंही पिचईच्या खडतर प्रवासाची किती लोकांना पडली आहे, असं वाटतं तुम्हांला? लोक आता वाचतील, पुढच्या अर्ध्या तासात विसरतील. कोणत्याही बातमीचे हेच प्राक्तन आहे आणि असते.

gogglya Sun, 08/23/2015 - 15:18
'भारतीय मूळ' असलेल्या आणी सध्या परदेशी वास्तव्यास असलेल्या [यातील बहुतेक जण ग्रीन कार्ड मिळालेले किंवा मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेले] लोकांचे गुणगान करत राहणार आहोत, हा प्रश्न आहे. बाकी लहानपणीची गरीबी / श्रीमंती वगैरे चालु द्या...

चिरोटा Sun, 08/23/2015 - 15:53
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
खरे आहे.८०च्या दशकात्, फोन साठी प्रतिक्षायादी असायची.बहुतांशी लोकांकडे त्यामुळे फोन नसायचा.टी.व्ही. वा गाडीचेही तसेच.प्रस्थापित व्यवस्थेत 'नेत्रदीपक' यश मिळाले की थोडेसे गरीबीचे,'हालाखीच्या दिवसांचे' भांडवल करणे ही पद्धत आहे.एखादी कंपनी बर्यापैकी मोठी झाली की मग तिचे प्रवर्तक आमची कंपनी कशी 'गॅरेज स्टर्टअप' होती हे दिमाखाने सांगतात. त्या गॅरेजचे फोटो मग मोठ्या नियत्कालिकांत 'ते दिवस' शिर्षकाखाली छापून येतात. अनेक वेळा ही गॅरेजेस श्रीमंत वस्त्यांमध्ये असतात व त्या गॅरेजचा आकारही आपल्या १ बी.एच.के.पेक्षा मोठा असतो.

नंदन Sun, 08/23/2015 - 16:03
ब्लूमबर्ग.कॉमवर गेल्या वर्षी पिचाईंवर एक लेख/प्रोफाईल आला होता. त्यातल्या दुसर्‍या पानावर (दुवा) हे सारे स्कूटर - टेलिफोन - स्टॅनफर्ड इ. उल्लेख आहेत. तेदेखील पिचाईंनीच सांगितलेले दिसताहेत. (आता हा त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा भाग किंवा वैट्ट, वैट्ट, दुष्ट अमेरिकन पत्रकारांनी तत्कालीन भारतीय मध्यमवर्गाला हिणवण्यासाठी रचलेले कारस्थान, यावर अजून एक वायफळाचा मळा पिकवता येईल.) तर अलीकडच्या बातम्यांत अनेक वृत्तपत्रांनी बातमी देताना या ब्लूमबर्गी लेखाकडे निर्देश केला. मी 'लोकमत'मधली बातमी वाचलेली नाही; पण तुमच्या कैफियतीवरून असं दिसतंय की बहुधा त्या पत्रकारूने असले दुवे/निर्देश देण्याच्या भानगडीत न पडता आपल्या मगदुराप्रमाणे थेट अनुवादाची पाटी टाकलेली असावी. त्यातही तपशीलाच्या चुका आहेतच. उदा.
Pichai excelled at school and won a coveted spot at the Indian Institute of Technology in Kharagpur, where he studied engineering. After graduating, he won an additional scholarship to Stanford University to study materials science and semiconductor physics. Pichai’s father tried to take out a loan to cover the cost of the plane ticket and other expenses. When it didn’t come through in time, he withdrew $1,000 from the family’s savings—more than his annual salary. “My dad and mom did what a lot of parents did at the time,” Pichai says. “They sacrificed a lot of their life and used a lot of their disposable income to make sure their children were educated.”

रेवती Sun, 08/23/2015 - 22:46
मीही बातमी पूर्ण वाचली/ऐकली नाही. बाकी नक्की किती खरं किती खोटं हे करण्यापेक्षा तो मनुष्य दोनवेळा खाऊन पिऊन सुखी असावा असा निष्कर्ष निघू शकेल, जे चांगलेच आहे. अर्धपोटी वगैरे कोणीच रहायला नकोय. आवश्यक ते पाटी, दप्तर, पुस्तकं मिळाली असावित हेही चांगलच आहे. आमच्या आजूबाजूला राहणार्‍या दोनेक जणांनी नक्की काय केलं म्हणजे आपली मुलं अशा पोझिशनला पोहोचतील? त्यांना आपण सुंदर पिचाई व सत्या नाडेला यांच्या जीवनावर माहिती द्यायला हवी का अशी चर्चा व्हॉटस अपवर केली असे नवरा म्हणत होता. पण तेवढेच! मग विषय संपला. त्या चर्चा करणार्‍यांचाही उत्साह संपला असावा कारण पुढे काही झाले नाही.

सुंदर पिचाई हे गरीब का श्रीमंत परिस्थितीत वाढले हे ठरवणे अधिक करून संदर्भावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय म्हणता येईल तर अमेरिकन संदर्भात ती गरीब ठरेल. पण यापेक्षा अधिक महत्वाची आणि विचारणीय बाब अशी कि सत्य नाडेला[Microsoft] शिव नाडर [HCL Technologies] आणि सुंदर पिचाई [Google] हे तिघेही त्यांच्या अभूतपूर्व यशामुळे भारताच्या नवीन पिढीला आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून ठरू शकतात.

In reply to by श्रीनिवास टिळक

असंका Mon, 08/24/2015 - 00:55
एक शंका आहे, कुणी प्लीज सांगेल का- एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?

In reply to by असंका

पगला गजोधर Mon, 08/24/2015 - 09:43
एच सी एल ही माय्क्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्याबरोबरीने नाव घेण्याएवढी मोठी कंपनी आहे का ? की सत्यम शिवम सुंदरम हे जुळतंय म्हणून फक्त?
हे मात्र १+ निरीक्षण आपले, कंफ्युज्ड(नसलेले), अकौंटंट साहेब

In reply to by श्रीनिवास टिळक

श्रीरंग_जोशी Mon, 08/24/2015 - 10:36
सत्या नाडेला व सुंदर पिचाई हे दोघेही जागतिक किर्तीच्या कंपन्यांत (अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट व गुगल) बर्‍याच खालच्या पदावरून सुरुवात करून सिइओ पदापर्यंत पोचले. शिव नाडर एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. वयानेही (७० वर्षे) ते इतर दोघांपेक्षा बरेच मोठे आहेत. सुंदर पिचाई यांची गुगलच्या सिइओपदी नियुक्ती झाल्यावर फेसबुकवर सत्या नाडेला व शिव नाडर यां दोघांच्या फोटोज बरोबर त्यांचा फोटो फिरवला जात होता. तुमचा प्रतिसाद त्या फेसबुक पोस्टवरून प्रेरित आहे का?

उगा काहितरीच Mon, 08/24/2015 - 00:57
ते गरीब होते कि नाही ही बाब गौण आहे. ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.

In reply to by उगा काहितरीच

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 01:14
ते आत्ता गरीब नाहीत , व जे काही मिळवले ते स्वतःच्या मेहनतीने ! ही बाब महत्त्वाची आहे. त्यांचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
बरोबर. आणी सुंपिला गरीब म्हटल्याने जर एखाद्या गरीब व्यक्तीला वर उठण्याची जिद्द मिळत असेल तर अजुन सुरेख...

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 10:41
सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद! फार थोड्या लोकांना लेखाचा उद्देश आणि रोख नेमका कळला. कदाचित मलाच नीट लिहिता आले नाहीये. प्रश्न, सुंदर पिचई हा खरंच गरिब होता की नव्हता, आता काय आहे, कसा यशस्वी झाला वैगेरे नाहीच आहे. कुण्या गरिबाने श्रीमंतच होउ नये असे काही मी म्हटले नाही. सुंदर पिचईचे केवळ एक उदाहरण घेतले आहे. तसेही राहुलजींच्या मते गरिबी ही एक सापेक्ष मानसिकता आहे. ;-) असो. थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात. आम्ही फार गरिब होतो, आमच्या चौघांत मिळून एकच कार होती, एकच घर होते, तीनच वेळेला जेवत होतो, आठवड्यातून एकदाच मल्टीप्लेक्सला जात होतो, वर्षातून एकदाच फॉरेनट्रीपला जात होतो, आईकडे दहाच किलो सोन्याचे दागिने होते, आमची फक्त पाचशे एकर बागायती शेती होती. इत्यादी कहान्या तीस वर्षांनी काही मुले सांगतील कदाचित मुद्दा संदर्भाचा आहे. त्यातली विसंगती दाखवण्याचा प्रयत्न होता. त्याकाळाला आजच्या काळाप्रमाणे किंवा अमेरिकन दृष्टीकोणातून बघणे विसंगतीपूर्ण आहे व ते हास्यास्पद होते असे म्हणायचे होते. त्याकाळातले जनजीवन, समाजकारण, आर्थिक परिस्थितीतून उद्भवणारे प्रसंग इत्यादी बाबी आजच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. कारण ऐंशीचे दशकातली टीनेजर मंडळी आणि ९५ नंतर जन्मलेली टीनेजर मंडळी यांच्या आकलनात फार फरक आहे. कष्ट, गरीबी, अभाव याचा जो काळ ऐंशीच्या दशकातल्या टीनेजरनी बघितला तो नंतरच्या पीढीने बघितलाच नाही. आज मोलकरणीचा मुलगाही स्मार्टफोनसाठी जीवघेणा हट्ट करतो, त्याला आईचे कष्ट, पैशाची अनुपलब्धता, इत्यादी गोष्टी समजतच नाहीत. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असले पाहिजे असाच अट्टाहास सर्वत्र दिसतो. ऐंशीच्या दशकात मुलांमधे ह्या भावना नव्हत्या. त्यामुळे त्याकाळात स्कूटरवर फिरलो, रि़क्षातून शाळेत जायचो, तीन खोल्यांचे घर ह्या गरिबी किंवा अभावाच्या गोष्टी नसून सुखवस्तूपणाच्या द्योतक आहेत. पण आजच्या काळात जर त्यांना गरिबीच्या, अभावाच्या प्रातिनिधिक म्हणून सादर केल्यात तर आजच्या पीढीला खरी गरिबी काय होती हे कळणारच नाही. माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता. थांबतो. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 12:27
जेंव्हा घवघवीत यश हातात येते. त्या वेळी अशा व्यक्तीच्या नकारात्मक बाजुही गुणगान गायल्या प्रमाणे वाखाणल्या जातात(उदा. स्टीव जोब्स) व अपयश असेल तर तर सकारात्मक बाजुचीही निंदा केली जाते... कमी मिळकतीचे जिवन अत्यंत हालाखीचे दारिद्र्यावस्थेतले चितारले जाते... कोणाला चायवाला समजले जाते... कोणाला भिकारी... ये सब चलते रहतायं.सुंदरच्या गरीबीची वास्तवअवास्तव वर्णने वाचुन एका खर्‍या गरीबाला जर वर जाण्याची उर्मी अन दिशा मीळाली तरी ते सर्व न्याय ठरते. सो लेट्स से हिप हिप हिप हुर्रे फॉर बिइंग पुर सुंदर...
थोरामोठ्यांची कारकिर्द लिहितांना त्यांनी कसे गरिबीतून दिवस काढले याच्या कहान्या रंगवल्या जातात. त्यांना मिळणारा सॉफ्टकॉर्नर पाहून ज्यांनी फारसे गरिबीत दिवस काढले नाहीत तेही असला सॉफ्टकॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हास्यास्पद कहान्या प्रसवतात.
:) येस. असे असतात खरे... पण ते फार दिशाभुल करु शक्तात असे वाटत नाही.
माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा आहे. सुंदर पिचईकाकांबद्दल मला फक्त एकच वाटते. स्वत:ची कुंपनी काढली अस्ती तर अजून अभिमान वाटला असता.
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.

In reply to by द-बाहुबली

प्यारे१ Mon, 08/24/2015 - 12:34
>>>>>सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता. ऑरे दादा, ई चोलबे ना. मिपावर सुन्दर धागे कुणी काढले असते मग???? डांगे अण्णा हलकं घ्या. गरीबी ही मानसिक अवस्था आहे या आदरणीय राहुलजी यांच्या मताशी सहमत असलेला

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 14:16
सुंदर ऐवजी तुम्ही गुगलचे सिइओ झाला असता तर अजून अभिमान वाटला असता.
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:14
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा. तुम्हाला अभिमान वाटो न वाटो याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी माझ्या कंपनीचा फाउंडर, सीईओ, क्लर्क, चपराशी सगळं आहे आणि त्यातच मला अभिमान आहे. पण तुमचं काय?
छान विचार. आपणही जेंव्हा एखाद्याबाबत बोलतो/धागे काढुन मत व्यक्त करतो (उदा. सुंदर पिचाइ) त्याबाबत वैयक्तीक होत नाही ना याची काळजी घ्यावी अन्यथा तेही मुर्खांचेच लक्षण असेल.

In reply to by द-बाहुबली

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:28
माझ्यावर वैयक्तिक घसरण्याइतकं तुम्हाला वैयक्तिक झोंबेल असं काय आहे माझ्या धाग्यात वा प्रतिसादात? मुद्देसूद बोलता येत नाही तेव्हा वैयक्तिकवर घसरणे मूर्खांची लक्षणे आहेत. तेव्हा सांभाळा.
तुम्ही जर गुगलचे सिएओ झालात तर मला तुमचा अभिमान वाटेल असे मी विधान केले आहे तर यात तुम्हाला झोंबण्यासारखे/ अथवा मुर्ख लक्षन काय आहे अथवा मुद्दा सोडुन काय आहे ? कारण मुद्दा कोणाला कोनीतरी कोणी बनल्यावर वाटणार अभिमान हाच मुद्दा आहे नाही का जर आपण वैयक्ती लिखाण करत नाही आहोत तर ? तुम्ही तुमचे कामधंदे सोडुन मिपाचे संपादक बनलात तरी मला अभिमान आहे हे विधानही अजिबात वैयक्तीक व मुद्दा सोडून नाही जर चर्चेचा मुद्दा अभिमान केंव्हा वाटावा हा असेल तर. आणी नसेल तर मुळात प्रथम तो कोणी घुसडला... शेवटी तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही पण तुम्ही गुगलचे सिइओ बनला असता तर मला जास्त अभिमान वाटले हे फक्त मी एक निरीक्षण नोंदवतो.

सुबोध खरे Mon, 08/24/2015 - 12:44
आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण १९८१ साली आय आय टी ची फी रुपये २५०/- सहामाही साठी होती. ( माझ्या भावाचा प्रवेश असल्याने माहिती आहे) आणि व्ही जे टी आय ची रुपये १८०/ - स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बर्याच विद्यार्थ्यांना एक तर शिष्यवृत्ती असे किंवा शिक्षण कर्ज सहज मिळे ज्याचा हप्ता दोन वर्षानंतर सुरु होत असे जेंव्हा तो विद्यार्थी अमेरिकेत डॉलर मध्ये कमवू लागत असे. त्यामुळे या गोष्टी गरिबांना सुद्धा परवडत असत. बाकी सुंदर पिचई जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील हे गरिब मध्यमवर्गीय नव्हे तर मध्य मध्यम वर्गीय किंवा उच्च मध्यम वर्गात गणले जाऊ शकतील. तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 12:51
तेंव्हा गरिबांना उच्च शिक्षण परवडत असे का? आणि सुंदर पिचई गरीब होते का? या दोन गोष्टींची गल्लत नको
+१०००००.

In reply to by गॅरी ट्रुमन

असंका Mon, 08/24/2015 - 14:20
+१०००००? एक लाख? हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने? एक लाख वेळा सांगताय की अशी अमुक एक गल्लत कुणी करू नका? आणि कुणी केलीये अशी गल्लत ? वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यावर तुम्हीच अशी गल्लत केल्याचं दिसतंय...कारण धागाकर्त्याच्या लेखाचा विषय हा सुंदर पिचाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा हा नसून, त्यांच्याबद्दल आलेल्या लेखातली त्यांच्या नजरेला आलेली विसंगती हा होता. आणि तुम्ही मात्र ते गरीब असले तरी काही काही मार्गांनी त्यांना आणि एकंदरीतच गरीबांना कर्ज, शिष्यवृत्ती वगैरे मिळून असे शिक्षण घेणं शक्य असल्याचं मत मांडलं आहेत. म्हणजे गरीबांना उच्च शिक्षण परवडत असे हा मुद्दा आपणच तर आणला होतात चर्चेत?

In reply to by गॅरी ट्रुमन

अस्वस्थामा Mon, 08/24/2015 - 14:45
हो आहे. एनी प्रॉब्लेम?
ही ही ही.. बाकी क्लिंटन भौ अम्रिकेसारखेच मस्त अ‍ॅटिट्युड घेऊन वावरत असता हे भारीय. :)

तुडतुडी Mon, 08/24/2015 - 13:25
हो ना . आणि देशासाठी काहीही न करता परदेशात संपूर्ण योगदान देणार्यांचं एवढं कौतुक कशाला ? का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून . इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ? त्याच्या गावाला केक बिक कापला जातो का ? बावळटपणा नुसता

In reply to by तुडतुडी

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 13:42
इंग्लंड , अमेरिकेतल्या एखाद्या माणसाची नियुक्ती भारतातल्या उच्च पदावर झाली तर तिकडे त्याचं असं कौतुक होतं का ?
असे काही लोक सांगू शकाल का?

In reply to by तुडतुडी

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 14:13
का तर फक्त भारतीय वंशाचा आहे म्हणून .
हो. काय त्रास आहे तुम्हाला ? इथे एक भारतीय म्हणून आत्मविश्वास नुकताच कुठे तरुणांमधे उभारु लागला आहे त्यांची स्वप्ने आत्ता कुठे विस्त्रुत (विस्तृत न्हवे ब्रॉड) होत आहेत मग हा सुर कशाला ? नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ? - भारताबद्दल प्रचंड अभिमान असलेला पण विषेश प्रेम नसलेला.

In reply to by द-बाहुबली

गॅरी ट्रुमन Mon, 08/24/2015 - 14:19
नाही दिलं भारताला योगदान... जमलं नाही, इछ्चा नाही असं नाही. म्हणून एक भारतिय म्हणून इतरांनी आपणही एखाद्या राक्षसी कंपनीचे सिइओ बनु शकतो याचा आत्मविश्वास साजरा करु नये का ?
योगदान अगदीच दिले नाही असे नाही. भारतासाठी योगदान भारतात राहूनच देता येते असे नाही.परदेशात चांगले काम करून भारत या नावाचा दबदबा निर्माण करायला हातभार लावणे हे पण भारतासाठीच योगदान आहे. अमेरिकेतील ज्यू लॉबीमुळे अमेरिका इसराएलला फार काही करू शकत नाही.तसा दबदबा जगभर भारतीयांचा व्हायला हवा. आणि हो आत्मविश्वास तर नक्कीच साजरा करायला हवा. - भारताबद्दल प्रचंड प्रेम असलेला पण विषेश अभिमान नसलेला (गॅरी ट्रुमन)

In reply to by गॅरी ट्रुमन

द-बाहुबली Mon, 08/24/2015 - 15:18
सहमत आहे. पण ही बाब लोकांना सामजावणे अवघड असते ज्यांना भारतातुन निघुन जाणार्‍या व्यक्ती देशाप्रती काहीच देणे ठेवत नाहीत असे मानतात. आणी स्वतःलाच त्यांच्यापासुन तोडुन घेतात.

इरसाल Mon, 08/24/2015 - 13:57
ज्यांच्या नावातच "पिचलेले" असावेत असा धडधडीत अर्थछटा प्रतित करणारा "पिचाई" शब्द येतोय त्याच्या गरीबीवर काय शिंतोडे उडवत आहात.(शिंतोडे उडवु र्‍हायले बे ?)

अरे होऊ द्या की गवगवा जरासा सुंदर पिचईंचा ! आतापर्यंत हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच भारतीय लोक जगातल्या पहिल्या पाचात असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदापर्यंत पोचलेत. त्यात एका भारतियाची भर पडली ही काय अभिमानाची गोष्ट नाही ? शिवाय असा माणूस भारतातल्या निम्न/मध्यम वर्गातून काय अगदी सधन वर्गातून आला असला तरी जागतीक स्तरावर (आणि मुख्य म्हणजे अमेरिकन प्रणालीतून पुढे आलेल्यांशी) स्पर्धा करून ते पद मिळवणे ही विशेषच गोष्ट नाही का ? अश्या लोकांचे जरासे जास्त वाढवून वर्णन केले गेले (सुंदरचे तसे वर्णन झाले असा माझा अजिबात दावा नाही) तर ते इतर अनेक महत्वाकांक्षी भारतियांना प्रेरणादायक ठरून... "हे पण होऊ शकते" इतकी जरी त्यांच्या मनाची खात्री झाली तरी सुंदरचा विक्रम मोडणारा दुसरे सुंदर२,३,४,५ व्हायला मदतच होईल, नाही का? शिवाय, सम्राटांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि औद्योगिक धुरीण यांच्या संबंधींच्या लोकवदंता (अनेक्डोट्स) हे साम्राज्ये, सत्तास्थाने आणि उद्योग अधिकाधिक वाढविण्यासाठी मोठे उपयोगी साधन आहे, हे व्यवस्थापनातले सर्वमान्य तत्व आहे. त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे, दर गल्लीबोळात आपण निकम्म्या भ्रष्ट नेत्यांच्या नावाच्या पाट्या आणि फ्लेक्स आपण रोज बघतोच आहोत ना ?... त्याला आपण विरोध करतो काय ? पिचईसारख्यांची एखाद्या वेळची थोडी वाढवून सांगितलेली स्तुतीही भारतीयांमध्ये काहीतरी सकारत्मकच फरक घडवेल. तिला उगी विरोध कशाला ?!

असंका Mon, 08/24/2015 - 14:42
थोडी वाढवून सांगितलेली
म्हणजे बदल करून सांगितलेली...
तिला उगी विरोध कशाला ?!
आहे अशी बातमी न सांगता लेखकाच्या मनाप्रमाणे केलेले बदल हे धोकादायकच. त्यात तुम्ही असे बदल हवेसे, असे बदल नकोसे हे नाही ठरवू शकत. कारण हितसंबंध हे परस्परावलंबी आणि परस्परविरोधी दोन्ही प्रकारचे असतात. या अनिश्चित जगात ज्या ज्या गोष्टींनी अनिश्चितता वाढते, तिला विरोध करायलाच हवा. त्याला "उगीच विरोध" म्हणणं योग्य नाही. बातमी वाचताना मला अशी शंका मनात यायला नको की या लेखकाने काही तरी बदलून लिहिलं आहे. त्याने अनिश्चितता निर्माण होइल.

In reply to by असंका

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/27/2015 - 22:31
त्या प्रतिसादावर अगोदर... त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात. असे लिहिले आहे ! :)

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 19:31
सुंदर पिचईचं उदाहरण घेतलं म्हणून बर्‍याच लोकांना खटकलेलं दिसतंय. कुणाला काही स्वतःहूनच खटकवून घ्यायचं असेल तर माझा नाइलाज आहे. जणू पिचईबद्दल आकस ठेवूनच मी हा धागा लिहिलाय असं काहींच्या प्रतिसादात जाणवतंय. अनिवासी/मूळ भारतीयांच्या परदेशातल्या यशाने हुरळणारे व त्यांना नाके मुरडणारे असे बहुतेक दोन गट जालावर नेहमीच दिसतात. असे काही विषय दिसले की दोन्ही गट आपआपली हत्यारे परजून युद्धात उतरतांना बघितलेत. त्याबद्दल कुठे 'मोकळं' व्हायच्या कायम तयारीत असलेले हा धागा मिळायलाय तर पूर्वग्रहदूषित मनाने वाटेल ते टायपत सुटलेत. इथे नुसतं सुंदर पिचई एवढे दोन शब्द लिहिले असते तरी तेच झाले असते. अशा लोकांना धाग्याचा खरा उद्देश कळूनही ते जर आपल्याला वाटेल तो अर्थ काढत हुज्जत घालण्याच्याच प्रवृत्तीचे असतील तर त्याला माझा काही इलाज नाही. विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या धाग्यावर तरी काही लोक तेच करत आहेत. चर्चेचे मुद्दे/प्रश्न काय होते?
माध्यमांमधून खर्‍या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का? की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो? कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या? मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का? तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
माझ्या धाग्यात वा प्रतिसादात सुंदर पिचई वा त्यांच्या यशाबद्दल कुठलाही खोचक उल्लेख वा रोख नाही. माझा रोख केवळ आणि केवळ दोन काळातला फरक माध्यमांत कसा दाखवला जातो याचे उदाहरण देणे यावर होता. त्यावर काही माहिती मिळावी, त्याकाळातला मध्यमवर्ग, आताचा मध्यमवर्ग, बदलते राहणीमान, विचार यावर चर्चा व्हावी असा उद्देश होता. राहता राहिला तो सुंदर पिचई बद्दलच्या माझ्या वैयक्तिक मताचा प्रश्न, जो फारच क्षुल्लक आहे माझ्यासाठी. तर त्यांनी जे यश मिळवले त्याचा अभिमान आहेच, पण स्वतःची कंपनी उभारली असती तर हा अभिमान (माझ्या मनात असलेला, इतरांनीही तसेच वाटून घ्यावे असे नाही) द्विगुणित झाला असता. बरेच भारतीय मोठ्या विदेशी कंपन्यांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजकाल त्यात काही नवल-विशेष नाही. येणार्‍या भारतीय पिढ्यांसमोर असे नोकरपेशा आदर्श ठेवण्यापेक्षा स्टीव जॉब्स, बील गेट्स, झुकरबर्ग, बन्सल्स, मित्तल, इत्यादी 'समस्यांवर उपाय शोधून त्याचे व्यवसाय तयार करणार्‍या व जगाच्या व्यवहाराची भाषा बदलणार्या लोकांचे' आदर्श ठेवणे 'माझ्या वैयक्तिक मतानुसार' आवश्यक आहे. याचा अर्थ नोकर्‍या करणारे फक्त पाट्या टाकतात असे माझे मत आहे असे नाही. ज्याला जिथे योग्य संधी मिळते, मग भले ती नोकरीत असो, व्यवसायात असो, भारतात असो वा परदेशात असो, त्याने त्या संधीचे सोने केले तर मला आनंदच वाटेल. तिथे वादाचा मुद्दाच कुठे येतो? इथे कोण भारतीय, अभारतीय, इथे राहिले, तिकडे गेले, भारतासाठी काय केले वैगेरे प्रश्न माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाहीत. भारतीय कुठेही राहू दे, त्यांनी स्वतः काहीतरी निर्माण करावे, शोधावे, उद्योग उभारावे. एक भारतीय म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटेल. त्यांनी किती गरिबीत दिवस काढले यावर रोख असल्यापेक्षा त्यांनी जगात काय बदल घडवले, काय योगदान दिले यावर चर्चा व्हाव्यात असे माझे मत आहे. माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही. लेख व प्रतिसादांत माझी भूमिका/मतं मांडली आहे. याउपर योग्य त्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत असेल तर स्वागत आहे.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Wed, 08/26/2015 - 19:24
माझ्या वैयक्तिक मताचा आदर नसणार्‍यांच्या व आधी भोचकपणा करून मग वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या पळपुट्या शहाजोगी (पिचाइच्या स्वयंघोषित) वकिलांच्या वैयक्तिक प्रतिसादांना मी काडीची किंमत देत नाही.
विवेकानंदांच्या धाग्यावर मारवा यांनी 'कमी महत्त्वाच्या भागावर फोकस करून पाहिजे तो अर्थ काढला' म्हणून बोंबाबोंब झाली. या प्रतिसादात तरी असेच आपले कडुन घडले आहे. पण अर्थातच आपण त्याला किंमत देणार नाही असे (म्हणत) असल्याने आपण विरोधाभासी लिहता म्हणायची द्वीरुक्ती टाळतो. बाकी प्रतिसाद उल्लेखनीय.

पैसा Wed, 08/26/2015 - 22:13
"तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं..
१९८५ साली गरीब? मी १९८७ साली बँकेत नोकरीला लागले तेव्हा माझा पगार महिना १०५० रुपये होता. घराचे कर्ज फक्त स्टाफला मिळत असे. त्याची लिमिट जास्तीत जास्त दीड लाख रुपये होती. त्यात साधारण २ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट कसाबसा घेता यायचा. इतर पब्लिकला घराचे कर्ज जाम महाग असायचे. मुंबईत घर घेणे तेव्हाही दुरापास्त होते. डोंबिवली ठाणे वगैरे भागात रहाणारे लोक बहुधा वन रूम किचनचे लहानसे फ्लॅट घेत असत. चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली. कोणाकडे बजाजची स्कूटर असलीच तर बहुधा सेकंड हँड असायची. सायकली फ्याशन म्हणून नव्हे तर गरज म्हणून वापरात होत्या. साधा टेलिफोन कोणाकडे असायचा? अगदी १९९० सालीसुद्धा टेलिफोन सहज मिळत नव्हते. बहुतेक १९९५ मधे आमच्याकडे टेलिफोन आला. आणि १९९८ ला डायल अप इंटरनेट. मात्र १९८५ साली आम्ही गरीब नक्कीच नव्हतो. भले श्रीमंत म्हणता येणार नाही, पण खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय. सुंदर पिचाईचे वर्णन गरीब घराचे नक्कीच नाही. त्या काळातले कोणत्याही प्रातिनिधिक मध्यमवर्गीय घराचे आहे. तीन खोल्यांचे घर म्हणजे बहुतेक उच्च मध्यमवर्गीय असावेत.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Wed, 08/26/2015 - 22:40
पैतै अशाच तंत्रकुशल बनल्या नाहीत. १९९८ साली फार कमी लोकांकडे इंटरनेट जोडणी असायची. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शहरात एकच सायबर कॅफे होते. एका तासाला बहुधा ₹१२० की ₹१५० शुल्क होते. माझ्या घरी २००१ मध्ये संगणक घेतला. २००२ मध्ये इंटरनेट जोडणी काही दिवस घेतली होती. महाग पडत असल्याने काही महिन्यांनी काढून टाकली.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा Wed, 08/26/2015 - 22:47
आधी डायल करा. मग वाट बघत बसा. गूगल सर्च पेज ओपन होईपर्यंत भाजीला फोडणी घालून यायचं. दुसरं पेज ओपन होईपर्यंत भाजी शिजायची. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला दिवसभर इंटरनेट फुकट असायचं आणि रात्री बहुतेक ११ नंतर. पण स्पीड काय विचारायचं नाही. जीमेल नंतर आली. आधी एमेसेन. माझा पहिला ईमेल आयडी @msn.com वाला आहे.

In reply to by पैसा

शब्दबम्बाळ Wed, 08/26/2015 - 23:03
टीईईईईई टू टुक टुक टुक.....टुक टुक टुक ट्याव ट्याव काय भारी आवाज यायचा डायल अपचा!! :D अस वाटायचं कि आपला कम्प्युटर बोलतोय आपल्याशी त्याच्या भाषेत... आपण खूप काहीतरी भारी शोध लावणारे आता अशी फिलिंग यायची मला तर! :)

In reply to by श्रीरंग_जोशी

रेवती गुरुवार, 08/27/2015 - 22:27
आम्ही ९९ साली एक रुपाया प्रतिमिनिट असे इंटरनेट वापरले. नंतर ते ५०, ३०, २५ रूपयांपर्यंत कमी होत गेले.

In reply to by रेवती

असंका गुरुवार, 08/27/2015 - 22:36
व्ही एस एन एल द्यायची डायल अप सेवा...त्यांचं ऑफीस लय कुठल्या कोपर्‍यात होतं पोलीस परेड ग्राउंडच्या तिकडे पुण्यात... काय शोधाशोध केली होती.... साई इंटरनेट की कायतरी नाव होतं त्यांचं. इंटरनेटचा पॅक वेगळा आणि फोनचं बिल वाढून यायचं ते वेगळं ...

In reply to by पैसा

गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/27/2015 - 10:30
चेन्नै हे मुंबईप्रमाणे मेट्रो असल्याने तिथे परिस्थिती वेगळी असेल असे वाटत नाही. तीन खोल्यांचे घर म्हणजे लैच मोठी उडी झाली.
वन बी.एच.के घरालाही तीन खोल्यांचेच घर म्हणता येईल.मी लहानपणी ठाण्याला होतो तेव्हा आमचेही वन बी.एच.के च घर होते. तीन खोल्यांचे घर म्हणजे तीन बेडरूमचे घर अशी कन्सेप्ट काही ठिकाणी सध्या वापरात आहे.ती त्या काळी होती असे वाटत नाही. अर्थातच पिचाई हे श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी मध्यमवर्गीय असे नक्कीच म्हणता येईल.

नमकिन गुरुवार, 08/27/2015 - 12:09
स्थल, काल, कार्य, संपन्न, असे मुद्दे असुनही गाडी भरकटुन (वैचारिक चुंबकीय शक्ती) गेली कर्तुत्व विषयाकडे. कदाचित मूळ लेखन परदेशी भाषेत झाले असावे (परदेशी ठिकाणी) त्या अाधारे पुढील सर्व बेतलेले दिसत आहे, त्यात "ष्टोरी" छापन्याची घाई असणार, मग कुठला स्थलकाल अभ्यास! चालायचंच. स्पर्धा, दर्जा दुर्लक्षित.

शरभ गुरुवार, 08/27/2015 - 13:16
एक माणूस म्हणून बघताना, अशा एखाद्या गोष्टीचा उदो उदो केला जावा का ? भारतीय आहेत म्हणुन.... अभिमान वाट्तोय. मराठी असते तर ......अत्याभिमान वाट्ला असता मराठी अमुक एक जातीचे असते तर्...उर फूटून आलं असतं आडनाव बंधू असते तर... अती होतय, आवरा....

In reply to by शरभ

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 08/27/2015 - 16:05
पूर्वीच्या काळी जी मर्यादेत कवतिके व्हायची तेच बरे असे म्हणावे लागतेय असे ह्यांचे मत. सुंदर भारतीय म्हणून भारतीय खूष सुंदर चेन्नईचा म्हणून चेन्नईकर खूष. सुंदर तामिळ ब्राम्हण म्हणून अय्यर्,अय्यंगार खूष. सुंदर आय.आय.टी.चा म्हणून आय आय टी मेटॅलर्जीवाले खूष. सुंदर आय.टी.त म्हणून आमचे हिंजवडी,मगरपट्टावाले खूष. सुंदर एन.आर.आय. म्हणून आमचे अमेरिकन एन.आर.आय. खूष.

राही गुरुवार, 08/27/2015 - 17:32
भारतातल्या मध्यमवर्गाच्या विस्तारीकरणाची सुरुवात बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून झाली असे मानता येईल. तोपर्यंत अर्थक्षेत्राशी कारकूनवर्गाचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रीयीकरणानंतर निमशहरी आणि शेतमालाच्या बाजारपेठांच्या गावातही सरकारी बँका सक्तीने का होईना, पोचल्या. शाखावृद्धीमुळे हजारोंना नोकर्‍या मिळाल्या. आर्थिक जगताचे एक अद्भुतरम्य दार सामान्य भारतीयांसाठी उघडले. परकीय चलन, मोठ्या कंपन्यांचा पतपुरवठा, त्यांचे व्यवहार, शेअर बाजार अशा कधी न ऐकलेल्या जगात मध्यमवर्ग डोकावू लागला. एक प्रकारे अलीकडच्या आय.टी. क्रांतीचेच ते एक मिनिरूप होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी एशिअन गेम्सच्या निमित्ताने टेलिविजनचे जाळे भारतात पसरले. हे गेम्स पाहाता यावे म्हणून दर दिवशी एक टीवी टॉवर या वेगाने सुमारे एकदीड वर्ष टॉवर (वसंत साठे यांच्या धडाडीमुळे) उभारले गेले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीधंद्याच्या संधी वाढल्या. टीवीवरून संपन्न जगताची झलक सर्वसामान्यांना दिसली. कन्ज़्यूमर गुडसची मागणी आणि उत्पादन वाढले. यानंतर संगणकयुगाचा पाया घातला गेला. गावोगावी टेलिफोन एक्स्चेन्जिस पोचली. संपर्कक्रांतीची ती सुरुवात होती. शहरात डिजिटल युग अवतरले आणि त्यामुळे निकामी झालेली एक्स्चेन्जिस निमशहरी भागात धाडली गेली. या नंतर भारतीय मध्यमवर्गाने मागे वळून पाहिले नाही. साधारणपणे १९५० ते १९७५ पर्यंत गरीबी होती. लाल बहादुर शास्त्रींनी १९६५च्या युद्धादरम्यान भारतीयांनी वर्षभर एक दिवस उपास करावा म्हणजे ५५ कोटी जेवणे वाचतील असे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. १९७१च्या पाक युद्धानंतर समारंभातल्या जेवणावळींवर निर्बंध आले होते. फक्त पन्नास माणसांना जेवण घालता येई. किती अन्न शिजले आहे ते तपासण्यासाठी पोलीस धाडी घालीत. मग एकावेळी फक्त पन्नास जणांचा स्वयंपाक शिजवण्याची शक्कल लोकांनी काढली. काहींनी तांदुळाऐवजी वर्‍यांचा भात वाढला. नंतर कृषिक्रांतीमुळे काळ्या बाजारातून साखर किंवा राशनचे धान्य घेण्याची गरज मध्यमवर्गाला राहिली नाही. चैनीच्या वस्तूंची खरेदी वाढली. पूर्वी फर्निचर म्हणजे एक गोद्रेज किंवा गद्रेचे कपाट, एक सिंगर मशीन, एक लोखंडी खाट आणि बसायला खुर्च्या इतक्याच वस्तू असत. दिवाळीला मोती साबण ही चैनीची परमावधी होती. बजाज स्कूटरसाठी पाच पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे आणि डिलिवरीच्या वेळी तुफान काळाबाजार चाले. कित्येक तर ऑन पैसे मिळवण्यासाठी बुकिंग करून ठेवीत. मारुतीने स्कूटरची मिजास उतरवली. मराठी मध्यमवर्ग शेअर बाजारात १९७५-८० नंतर उतरला. उद्योगांच्या विस्तारीकरणामुळे खूप प्रायमरी ऑफर्स (आय.पी.ओ) असत. त्या वेळी दहावीस शेअर्स लागलेले लोक आज कोट्यवधीचे मालक असतील, जर त्यांनी ते विकले नसतील तर. या बरोबरच चाळ आणि वाडा संस्कृती लयाला जाऊन वन बी एच के संस्कृती आली. त्या काळचा उच्चमध्यमवर्ग उदयास आला. दारिद्य तेव्हाही होते, आताही आहे. पण दारिद्र्याच्या व्याख्येत फरक झाला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/27/2015 - 22:43
सुंदर पिचई एका थोरल्यामोठ्या कंपनीचे सी.इ.ओ. झाले
माझ्या उत्त्पन्नात काही फरक पडलाय का? मग मी ते वाढायसाठी अजुन कष्ट करु का सुंदर पिचईंचे गोडवे गात फिरु? हे गृहस्थ पुर्वी गरिब होते का सोन्याच्या पलंगावर झोपत होते ह्याची वायफळ चर्चा कशाला पाहिजे? त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं म्हणा आणि त्यातुन शिका ना ४ गोष्टी.

शरभ Fri, 08/28/2015 - 12:24
हा असला उदो उदो करुन काय मिळनारे? अहो, असेच एक भारतीय एका मोठ्या फर्मचे सी इ ओ झाल्यावर, भारतात किती तरी जॉब कट झाले. Employee वरुन vendor झालो, हा स्वानुभव आहे. त्यावेळी नोकरी जाउन बेकार झालो नाही हेच नशीब. तस्मात, ह्या लोकांकडून शिकावं आणि पुढे जावं हेच उत्तम. He deaserved it, its his own achievement, that's it.
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे... आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय?