मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा शिक्षण

मनात भाषांतर न करता

उपयोजक ·
एक माहिती हवी आहे. शहरात राहणार्‍या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं?

स्पष्टीकरण मिळावे.

उपयोजक ·
मी एका समूहात (मला जमेल तितकी) मराठी अन्य भाषिकांना शिकवत असतो.ती शिकवताना काही उद्भवलेले प्रश्न. १.'काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का? २.पहा की पाहा? ३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं? ४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय? ५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत. ६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो. ७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय? ८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं? ९.

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

वेल्लाभट ·
ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी. पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे.

मिळू जाउनि इंग्रजी सागराला

वेल्लाभट ·
मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे.

"कॉन्व्हेण्ट" मुलांच्या पालकांवर कारवाई करा .. - भालचंद्र नेमाडे बडबडले !

हेमन्त वाघे ·
भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो हे पहा त्यांची मुक्ताफळे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those... ‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत.