मनात भाषांतर न करता
एक माहिती हवी आहे.
शहरात राहणार्या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं?
मिसळपाव