'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'
भरतमुनिविरचित नाट्यशास्त्रामध्ये विशेषतः शृंगाररसाचे सम्यग्दर्शन साधण्यासाठी स्त्री-पुरुषांतील भावसंबंधातून निर्माण होणाऱ्या विविध अवस्थांची रसिकतेने चर्चा केलेली असून तीमधूनच नायक-नायिकांच्या कल्पना रुजल्या व विकसित झाल्या. नाट्यगुणवैशिष्ट्ये सांगत असताना अभिनयदृष्ट्या भावदर्शनाची सीमा गाठता यावी, या हेतूने स्त्रीपुरुष-स्वभावांचे सूक्ष्म परिशीलन नाट्यशास्त्रात केलेले आहे. ते करीत असताना मुख्य अष्टनायिकांचे स्वरूपवर्णन भरताने दिले आहे. त्या अष्टनायिका अशा - अभिसारिका, खंडिता, कलहान्तरिता, प्रोषितभर्तृका, स्वाधीनपतिका, उत्कंठिका, वासकसज्जा आणि विप्रलब्धा.
ह्या अष्टनायिकांचे दर्शन ’अमरुशतक’ ह्या काव्यातील श्लोकांमधून घडविण्याचा हा प्रयत्न आहे. हे काव्य म्हणजे कमीअधिक १०० श्लोकांचा एक संग्रह आहे. ज्याचे नाव परंपरेने ह्या संग्रहाशी जोडले गेले आहे तो अमरु नावाचा कवि कोण, कोठला, केव्हाचा अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. हे श्लोक त्यानेच मुळात निर्माण केले की त्याला उपलब्ध श्लोकांचा त्याने केवळ संग्रह केला आहे हेहि माहीत नाही.
नायक-नायिका ह्यांच्या शृंगारिक संबधातील निरनिराळ्या धाग्यांवर हे श्लोक बेतलेले आहेत. ह्यापैकी प्रत्येक श्लोक स्वतन्त्र असून नायक-नायिका संबधातील एका अंगावर तो श्लोक भर देतो
अमरु कवि कोण होता ह्याविषयी माधवाचार्यलिखित शांकरदिग्विजय ग्रंथामध्ये पुढील कथा सांगितली आहे. प्रख्यात मीमांसक मंडनमिश्र ह्यांच्याशी वाद करण्यासाठी शंकराचार्य वाराणसीमध्ये पोहोचले आणि ते आणि मंडनमिश्र ह्यांच्या मध्ये शास्त्रार्थ बरेच दिवस चालला. अखेर शंकराचार्यांचा विजय दिसू लागला असता मंडनमिश्रांची विदुषी पत्नी सरस्वती हिने वादामध्ये हस्तक्षेप करून शंकराचार्यांना आह्वान दिले. शंकराचार्यांकडून त्या आह्वानाचा स्वीकार झाल्यावर तिने शंकराचार्यांपुढे कामशास्त्राविषयी काही प्रश्न टाकला. शंकराचार्य संन्यासी असल्याने त्यांना प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. त्यांनी उत्तर देण्यासाठी काही मुदत मागून घेतली. त्याच वेळी अमरु नवाचा एक राजा नुकताच मृत झाला होता. आपल्या शिष्यांना आपले शरीर सांभाळण्याची कामगिरी सोपवून शंकराचार्यांनी योगसामर्थ्याने अमरु राजाच्या शरीरात प्रवेश केला. त्या शरीरात वास करून त्यांनी शृंगाराचा अनुभव घेतला आणि परत आपल्या देहात परतून त्या ज्ञानाच्या उपयोगाने सरस्वतीच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले आणि शास्त्रार्थ जिंकला. अमरु राजाच्या शरीरामध्ये वास्तव्य केले असतांना त्यांनी कमीअधिक १०० श्लोकांचा हा संग्रह निर्मिला.
सध्याच्या काळत ह्या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसेल असे नाही पण आहे ती पारंपारिक गोष्ट अशी आहे.
आता मूळ विषयाकडे वळू. ह्यापुढे क्रमश: नायिकेच्या प्रत्येक प्रकाराचे एक चित्र दाखवून त्यापुढे अमरुकाव्यातील त्या प्रकाराचे दर्शक असे दोन श्लोक त्यांच्या भाषान्तरासह दाखवीत आहे. भाषान्तर बहुश: मुळाला धरून आहे पण कोठेकोठे ते आवश्यकतेनुसार स्वैरहि केले आहे.

प्राणाधिको वसति यत्र जन: प्रियो मे ।
एकाकिनी बत कथं न बिभेषि बाले
नन्वस्ति पुङ्खितशरो मदन: सहाय: ॥
कलकलवती काञ्ची पादौ रणन्मणिनूपुरौ ।
प्रियमभिसरस्येवं मुग्धे त्वमाहतडिण्डिमा
यदि किमधिकत्रासोत्कम्पं दिश: समुदीक्षसे ॥

सद्य: कोपपराङ्मुखं ग्लपितया चाटूनि कुर्वन्नपि ।
आवेगादवधीरित: प्रियतमस्तूष्णीं स्थिततत्क्षणा-
न्मा भून्म्लान इवेत्यमन्दवलितग्रीवं पुनर्वीक्षित:॥
न खलु तव कदाचित्कोप एवंविधोऽभूत् ।
इति निगदति नाथे तिर्यगामीलिताक्ष्या
नयनजलमनल्पं मुक्तमुक्तं न किंचित् ॥

निभृतकितवाचारेत्युक्ते रुषा परुषीकृते।
व्रजति रमणे नि:श्वस्योच्चै: स्तनार्पितहस्तया
नयनसलिलच्छन्ना दृष्टि: सखीषु निपातिता ॥
नो जानाति सविभ्रमाङ्गवलनावक्रोक्तिसंसूचनम् ।
स्वच्छैरच्छकपोलमूलगलितै: पर्यस्तनेत्रोत्पला
बाला केवलमेव रोदिति लुठल्लोलोदकैरश्रुभि:॥

मानं धत्स्व धृतिं बधान ऋजुतां दूरे कुरु प्रेयसि ।
सख्यैवं प्रतिबोधिता प्रतिवचस्तामाह भीतानना
नीचै: शंस हृदि स्थितो हि ननु मे प्राणेश्वर: श्रोष्यति ॥
दिवसगणनादक्षश्चायं व्यपेतघृणो यम: ।
त्वमपि वशगो मानव्याधेर्विचिन्तय नाथ हे
किसलयमृदुर्जीवेदेवं कथं प्रमदाजन:॥

नो वा पादयुगे स्वयं निपतितं तिष्ठेति नोक्तं वच: ।
काले केवलमम्बुदालिमलिने गन्तुं प्रवृत्त: शठ-
स्तन्व्या बाष्पजलौघकल्पितनदीपूरेण रुद्ध: प्रिय:॥
श्रुत्वा नामापि यस्य स्फुटघनपुलकं जायतेऽङ्गं समन्ता-
द्दृष्ट्वा यस्याननेन्दुं भवति वपुरिदं चन्द्रकान्तानुकारि ।
तस्मिन्नागत्य कण्ठग्रहनिकटपदस्थायिनि प्राणनाथे
भग्ना मानस्य चिन्ता भवति मयि पुनर्वज्रमय्यां कदाचित् ॥
(चन्द्रकान्तमणि चन्द्राचे किरण त्याच्यावर पडले की द्रवतो अशी कविकल्पना आहे.)

दीर्घोच्छासमुदश्रुणा विरहिणीं बालां चिरं ध्यायता ।
अध्वन्येन विमुक्तकण्ठमखिलां रात्रिं तथा क्रन्दितं
ग्रामीणै: पुनरध्वगस्य वसतिर्ग्रामे निषिद्धा यथा॥
क्षणमभिमुखैर्लज्जालोलैर्निमेषपराङ्मुखै: ।
हृदयनिहितं भावाकूतं वमद्भिरिवेक्षणै:
कथय सुकृती कोऽयं मुग्धे त्वयाद्य विलोक्यते ॥

रुद्धायामपि वाचि सस्मितमिदं दग्धाननं जायते ।
कार्कश्यं गमितेऽपि चेतसि तनू रोमाञ्चमालम्बते
दृष्टे निर्वहणं भविष्यति कथं मानस्य तस्मिञ्जने ॥
परिमलभरो भग्नो ग्रीष्मस्त्वमुत्सहसे यदि ।
घन घटयितुं तं नि:स्नेहं य एव निवर्तने
प्रभवति गवां किं नश्छिन्नं स एव धनंजय:॥

किं लब्धं शठ दुर्नयेन नयतां सौभाग्यमेतां दशाम् ।
पश्यैतद्दयिताकुचव्यतिकरासक्ताङ्गरागारुणं
वक्षस्ते मलतैलपङ्कशबलैर्वेणीपदैरङ्कितम् ॥
निराहारा: सख्य: सततरुदितोच्छूननयना: ।
परित्यक्तं सर्वं हसितपठितं पञ्जरशुकै-
स्तवावस्था चेयं विसृज कठिने मानमधुना॥
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच सुंदर.
एकदम सुरेख.
@अरविंद कोल्हटकर
@अरविंद कोल्हटकर
'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'
हा लेख आवडला 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@अरविंद कोल्हटकर
'अमरुशतकातून अष्टनायिकादर्शन'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
हे भारी केलंय. लैच आवडलं
In reply to @अरविंद कोल्हटकर by टर्मीनेटर
_/\_
In reply to हे भारी केलंय. लैच आवडलं by प्रचेतस
काय आहे गंमत?
In reply to _/\_ by टर्मीनेटर
काय आहे गंमत?
In reply to _/\_ by टर्मीनेटर
दिलखेचक काव्य
सततरुदितोच्छूननयना:
धन्यवाद!
In reply to सततरुदितोच्छूननयना: by अरविंद कोल्हटकर
शंकराचार्य, मंडनमिश्र, सरस्वती... अमरु राजा आणि अरविंद कोल्हटकर.
भारी मस्त ओळख
अतिशय आवडला लेख. आणि
छान लेख आहे
खुपच सुंदर.