आपण मराठी संस्कृतीत वाढतोय याचा अभिमान जरूर बाळगूया, पण आपल्या मराठी पणा विषयी ओव्हर पझेसिव्ह नको होऊया. कारण याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. राजकारण खेळण्यासाठी त्यांना नवे मुद्दे हवे असतात. उद्या मराठी विरूद्ध बिगर मराठी हा वाद मिटला तर काही नाही उरलं तर विलेपार्ले(पूर्व) आणि विलेपार्ले(पश्चिम)हाही वाद निर्माण करायला ही माणसे मागेपुढे पाहणार नाहीत..
अख्ख्या जगात दहशत वाद्यांनी थैमान घातलंय, जगाला आपल्या रक्तातला शिवाजी हवाय!
सारं जग 'ग्लोबल वॉर्मिंग" मुळे हैराण झालंय, जगाला आपल्या कोकणची हिरवीगार वनश्री हवी आहे!
जगातल्या एकाकी वृद्धांच्या सुरकुतल्या चेहर्यावर हास्य उमटवायला या जगाला आपले पुलं हवे आहेत!
सारं जग असमाधान्-तणाव्-नैराश्यानं ग्रासलंय- जगाला आपलं 'पसायदान' हवंय!
ही वाक्य आहेत नविन काळे यांच्या या लेखातली. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती चा अस्त होत आहे अशी चर्चा होते आहे. संस्कृती म्हणजे काय.. ती लोप पावते म्हणजे काय? याची उत्तरं या लेखातून मिळतील. आपण मराठी असल्याचा अभिमान नक्की आहे, पण त्याचं भांडवल करून राजकारणी लोक फायदा उठवतात आणि सामान्य माणूस मात्र स्वतःची बुद्धी राजकारण्यांच्या हाती गहाण टाकून मराठी-बिगरमराठी अशा वादात लढतच राहतो.
मला हा लेख खूप आवडला. नविन काळे यांनी मांडलेले मुद्दे खरंच विचार करण्याजोगे आहेत. एक विचार प्रवर्तक लेख असेच मी म्हणेन.
- प्राजु
- प्राजु
वाचने
3692
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अस्तित्व
सहमत. थोडे
In reply to अस्तित्व by प्रकाश घाटपांडे
सहमत
बोलतो मराठी
चित्रफीत
In reply to बोलतो मराठी by अजय भागवत
एका
धन्यवाद
असेच म्हणतो
In reply to धन्यवाद by धनंजय