Skip to main content

वोट चोरी वर चर्चा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 05/09/2025 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा. गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.” मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.” तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.” त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.” तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!” तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?” ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.” मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.” त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.” बहुतेक त्याने कधीच मतदान केलेलं नसावं.

वाचने 13085
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by विवेकपटाईत

>>बाकी रागा एका ही केस मध्ये कोर्टात गेलेले नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणयात किती सत्याचा अंश असतो असता तर त्यांनी अनेकदा कोर्टात माफी मागितली नसती. एवढेच नव्हे बिहार मध्ये सर झाले, कोर्टा समोर ही प्रमाण प्रस्तुत करू शकले नाही. आपल्या माहितीचा स्त्रोत काय? कोणती माध्यमे वरील प्रमाणे माहिती देत आहेत? माझ्या माहितीनुसार रागा यांनी आयोगाला प्रश्न विचारले आहेत. आयोगाने बदनामीचा खटला वगैरे दाखल केला आहे काय? मतचोरीबाबत माफी कधी मागितली? उलट ते मी सावरकर नसल्याने मुळीच माफी मागणार नाही असे बोलले होते, असे आठवते.

In reply to by स्वधर्म

महितीचा स्त्रोत गूगल करून स्वत तपासू शकता. बाकी नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका (Public Interest Litigation) “पूर्वग्रहदूषित आणि पुराव्यांशिवाय” असल्याचे सांगून फेटाळली, जी राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप केल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत होती. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यावरच ₹1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला,

In reply to by स्वधर्म

बीबीसी म्हणजे ब्लफ ब्राडकास्टिंग कंपनी. बाकी कर्नाटक पोलिस यावर काही करत नाही. त्याचे कारण कर्नाटक पोलीसला विचारा. निवडणूक आयोगाला नाही. बाकी त्या मतदार संघात कोंग्रेस विजयी झाली होती.

एक ट्रायल म्हणून, प्रयोग म्हणून, कागदावरील मतपत्रीकांवर निवडणूक का होऊ नये? भले हा प्रयोग एखाद्या प्रांतात राबवा.

In reply to by पाषाणभेद

तसे केले तर त्याना जिंकणे कठीण होईल! कारण मतपत्रिका हॅक करता येत नाहीत, (बूथ कॅप्चर केला जाईल म्हणून काही छाती बडवत येतील, पण बूथ कॅप्चर करे पर्यंत प्रशासन झोपा काढते का? हे नाही सांगणार!)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुंबईतील बेस्टच्या पतपेढी ची निवडणूक कशी झालेली. EVM नसेल कदाचित तिथं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण महान बुद्धिमान आहात. मत पत्र कुणीही सकाळी सिरिज पाहून कागदावर एका तासांत छापू शकतो. तीनपट मतपेटी स्थानीय लोहार ही बनवून देईल. त्यावेळी मतपेट्या बदलल्या जात होत्या. पण सिरीज नंबर असलेली ईव्हीएम डुप्लीकेट बनविणे शक्य नाही. तेच दुखणे विपक्षी दलांचे आहे. वोट चोरी करणे शक्य नाही.

निवडणूक आयोग उघडपणे सत्ताधारी पक्षासाठी काम करतंय. सरकारतर्फे रेवडी वाटप, उद्घाटन कार्यक्रम झाल्यावर बिहार निवडणुकांची तारीख जाहीर केली. राहुल गांधींनी वोटचोरी उघडकीस आणली नसती तर रेवडी वाटली असती का?

In reply to by आग्या१९९०

वोट चोरीचा अर्थ वोट एकाला दिले आणि गेले दुसर्‍याला. राहुल गांधीने एक ही वोट चोरी उघडकीस आणलेली नाही. बाकी मद्रास उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका (Public Interest Litigation) “पूर्वग्रहदूषित आणि पुराव्यांशिवाय” असल्याचे सांगून फेटाळली, जी राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप केल्याबद्दल निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत होती. ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यावरच ₹1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पारदर्शकता वाढविण्यासाठी बिहारमधील सर्व मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग केले जाईल. मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी पीठासीन अधिकारी ECINET वर मतदारांची संख्या थेट नोंदवतील. सर्वात महत्वाचे: निवडणुक आयोगाचा बिहार निवडणुकीत आंगणवाडी व पोलीस महिलांना "खास" महिलांचे ओळखपत्र पडताळणीस नेमणूक करण्याचा आदेश.

In reply to by नावातकायआहे

भाजप नेत्यांच्या गाड्या नी त्यात ईव्हीएम आहेत की नाही ह्यावर देखील लक्ष ठेवायला पाहिजे!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नेहमी प्रमाणे, बातमी पुर्ण न वाचता धुराळा उडवणार्या "रागा" टिम चे पालुपद. आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम: ४ अधिकाऱ्यांना निलंबित, केंद्रावर पुन्हा मतदान. एवढेच वाचले असेलः बातमी "पुर्ण" वाचायची व समजून घेण्याची सवय चांगली असते: https://www.ndtv.com/india-news/assam-assembly-polls-poll-panel-team-hi… तेलंगणा पोटनिवडणुकीसाठी मतदार ओळखपत्र वाटल्याबद्दल खांग्रेसी नेत्यावर गुन्हा दाखल. वोटचोरीची बोंब मारणाऱ्या गॅंगकडे ह्याचे उत्तर आहे का? https://www.ndtv.com/india-news/naveen-yadav-jubilee-hills-hyderabad-le… बिहारमधे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ८ टक्के (७-१० जागा) मिळण्याचा अंदाज आहे. "बडा घर पोकळ वासा"!

In reply to by नावातकायआहे

खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांशी कुठे वाद घालताय? पादलात तर का पादलात? आणि नाही पादलात तर का नाही पादलात? असली भंपक चर्चा करणाऱ्यांकडून काय निष्पन्न होणार आहे? मुळात राहुल गांधीं सारख्या बिनडोक माणसांची गुलामी करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची झेप कुठपर्यंत जाणार आहे?

In reply to by सुबोध खरे

56 इंची ढेरपोट्या समर्थकांनी भाजप नेते गाडीत ईव्हीएम घालून का फिरतात हे सांगावे! पळ काढणे हे उत्तर नाही.