भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता.
१८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला. तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून दोन समुदायात दंगल झाली. १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली.
फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. पण बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला.
२३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. तो वाद वाढू लागला म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले. १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली. न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील. जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले.
सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला.
सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते.
१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्या विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली. सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली.
३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. ६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली. घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले. बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली.
१ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभागाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली. वादग्रस्त जागेवर मंदिर कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला सन २००३ मध्ये उत्खनन करण्याचे आदेश दिले. बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला.
३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी स्थगिती दिली. सन २०१७ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली. ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला.
५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.
अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. "हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार दूर होवो आणि लौकरच रामराज्य येवो ही प्रार्थना!
||जय श्रीराम||
वाचने
60892
प्रतिक्रिया
199
मिसळपाव
प्रतिक्रिया
काल...
ते शेजारी मुहूर्त पाहतात की
In reply to काल... by वेडा बेडूक
लोक तर नातेवाईकांच्या लग्नात पण मानापमानावरुन खुस्पट काढतात.
In reply to काल... by वेडा बेडूक
आमच्या गावातील आराम हा राम
In reply to काल... by वेडा बेडूक
खिक्क.
In reply to आमच्या गावातील आराम हा राम by आग्या१९९०
राममंदिर कसे चुकीचे आहे
खिक
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
वाट्सअपवर आलेली प्रत्येक
In reply to खिक by अहिरावण
खरे तर मंदिरात बऱ्याच चुका
In reply to वाट्सअपवर आलेली प्रत्येक by अमरेंद्र बाहुबली
इंजिनीयरींगमधे नोबेल या
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
च्यायला घष्टी तर चांगली प्या
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
हा हा
In reply to च्यायला घष्टी तर चांगली प्या by अहिरावण
अभियांत्रिकीमध्ये नोबेल पारीतोषिक नसते, त्यामुळे कोणाला मिळत नाह
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
रानरेडा यांनी खोडसाळपणे अ
In reply to अभियांत्रिकीमध्ये नोबेल पारीतोषिक नसते, त्यामुळे कोणाला मिळत नाह by Trump
यावरुन एक जुने वाक्य आठवले.
In reply to रानरेडा यांनी खोडसाळपणे अ by सुबोध खरे
यावरुन एक जुने वाक्य आठवले. "मोदींकडे तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे पुरोगामी त्याला आपला नेता मानतील" बाकी चालू द्याहेच मी ऊलट ऐकले होते. "मोदींच्या बाजूने तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे अंधभक्त त्याला आपला नेता मानतील" असो. रानरेडा हे अंधभक्त वाटताहेत, आलं की ढकल ह्या कॅटेगीरीतले.भुजबळ बुवा
In reply to यावरुन एक जुने वाक्य आठवले. by अमरेंद्र बाहुबली
मी रानरेडा याना ओळखतो ते
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
मी रानरेडा याना ओळखतो ते आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी जास्त हुशार आणि समतोल आहेत.ते त्यांच्या वरील व्हाईट बाईच्या पोस्ट वरून कळालं किती हुशार नी समतोल आहेत ते.त्यांच्यासाठी श्री मोदी हे एकच नेते पुरेसे आहेत.असं काहीही नाहीये.काही अंधभक्त कितीतरी लुंग्यासुंग्यांना नेता मानतात तर काही योगी, अमीतशा नी फडणवीस ह्यांना नेता मानतात.>>रानरेडा हे अंधभक्त वाटताहेत
In reply to यावरुन एक जुने वाक्य आठवले. by अमरेंद्र बाहुबली
राममंदिर कसे चुकीचे आहे
कुणी काही म्हणा.....
टायपो चूकभूल
In reply to कुणी काही म्हणा..... by कर्नलतपस्वी
अगदी मनातल्या भावना व्यक्त केल्यात
In reply to कुणी काही म्हणा..... by कर्नलतपस्वी
स्वतःच्या पोटात दुखावून घ्यायचेच असेल तर त्यावर काहीही औषध नाहीय
In reply to अगदी मनातल्या भावना व्यक्त केल्यात by यश राज
>>>उदारमतवादी हिंदू लोकांचा
In reply to स्वतःच्या पोटात दुखावून घ्यायचेच असेल तर त्यावर काहीही औषध नाहीय by मुक्त विहारि
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी
क्या बात है !
In reply to चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी by अमरेंद्र बाहुबली
एक बातमी....
शक्यता. :)
In reply to एक बातमी.... by मुक्त विहारि
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं
सेमिकंडक्टर धोरणामुळे
In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
सेमिकंडक्टर धोरणामुळे तैवानच्या नाड्या आवळ्या गेल्यात का?तो प्रकल्प महाराष्ट्रातून काढल्यामूळे वारला.Lol
In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
काही आकडे?? की वाट्सअप
In reply to Lol by वामन देशमुख
'
In reply to काही आकडे?? की वाट्सअप by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं
In reply to ' by वामन देशमुख
म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं
In reply to म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं by अमरेंद्र बाहुबली
मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७
In reply to काही आकडे?? की वाट्सअप by अमरेंद्र बाहुबली
अधिकांश जागी स्थानिक रोजगार होता.
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
पटाईत काका
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
मतभिन्नतेच्या आदरासहित -
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
तुफान सुरू आहे
In reply to Lol by वामन देशमुख
सेठ को
In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
हाहाहा. खतरनाक.
In reply to सेठ को by सर टोबी
ताईवान की नाड्या
In reply to सेठ को by सर टोबी
वामनराव
In reply to ताईवान की नाड्या by वामन देशमुख
+१
In reply to वामनराव by सर टोबी
म्हणून आम्ही आपल्याला फारसा
In reply to वामनराव by सर टोबी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन
In reply to वामनराव by सर टोबी
अयोध्येत जमिनीला सोन्याचा दर,
येडा बेडूक कुठे गेला?
२२ जानेवारी...
In reply to येडा बेडूक कुठे गेला? by रंगीला रतन
युपी नी अपकमींग युपीत
In reply to २२ जानेवारी... by वेडा बेडूक
अयोध्या में अमेरिकी कंपनी खोलेगी 100 कमरे वाला रिजॉर्ट
पान्चजन्य. :)
In reply to अयोध्या में अमेरिकी कंपनी खोलेगी 100 कमरे वाला रिजॉर्ट by मुक्त विहारि
राजस्थान से चल पड़ी अयोध्या की आस्था ट्रेन,
Ayodhya Aastha Special Trains:
In reply to राजस्थान से चल पड़ी अयोध्या की आस्था ट्रेन, by मुक्त विहारि
रेल्वे ला शर्वाधीक ऊत्पन्न
In reply to राजस्थान से चल पड़ी अयोध्या की आस्था ट्रेन, by मुक्त विहारि
योगी सरकार की अयोध्या को सौगात
अरबपति हुए रामलला
१९९२ ला कारसेवा झाली तेव्हा
In reply to अरबपति हुए रामलला by मुक्त विहारि