Skip to main content

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

लेखक उनाड यांनी शुक्रवार, 12/05/2023 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा. या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे. महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला. नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले. स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला. या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे. केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?

वाचने 36771
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

लव जिहाद असतो असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न - १. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ? (आय ए एस अधिकाऱ्यांचा घटस्फोट झाला तरी लव जिहाद असतो, केवळ मुस्लिम गुन्हेगार असला की इतर काही धार्मिक कारण समोर नसताना लव जिहाद म्हणले जाते, म्हणून प्रश्न विचारणे गरजेचे.) २. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ? आकडेवारी हवी, स्वतंत्र उदाहरणे नकोत. हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ?

In reply to by कॉमी

धर्मांतर हा मुख्य हेतू आणि त्यासाठी वापरल्याजाणारी अनेक शस्त्रानपकी एक शस्त्र म्हणजे लग्न / मैत्री आणि यातून धर्मांतर ... किंवा अगदी खरे प्रेमात पडून लग्नाचे वेळीस मात्र "तू माझाच धर्म स्वीकार हि सक्ती करणे " पण तुम्हाला जर फसवून / अमिश दाखवून केलेले धर्मांतर हे होते हेच मान्य नसेल आणि हिंदूंचे असे धर्मांतर केले जाते हे पण अजिबात मान्य दिसत नाहोये / नसेल तर कशाला वेळ घालव्यायाचा... तुमचा मूळ हेतू हे सर्व अस्वीकर करणायचा आहे हे दिसतंय ... ( कृपया जे काय लिहायचे ना ते उघड प्रतिसादात लिहा ती खरडवही कि काय किंवा व्यनि पाठवू नका गरज नाही

In reply to by चौकस२१२

१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? २. असे किती वेळा घडले ? विदा काय ? आणि तुम्हाला पण चर्चा न करता तुमचेच पालुपद आळवायचे असेल तर तुमचा प्रतिसाद दुर्लक्षित होईल. त्यामुळे तुम्ही उगाच माझा हेतू काय वैगरे फालतुगिरी न करता तुमचा वेळ वाचवाच.

In reply to by कॉमी

स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? फसवणूक करून लग्न करणे हे चुकीचेच आहे पण त्याचा वापर धर्मांतरासाठी केला गेला असेल तर त्याला अजून एक कंगोरा येतो... तो तुम्ही दुर्लक्ष करा हवे तर सोयीस्कर रित्या ... इतरांना तो दिसतो म्हणलना ला "लंबे रेसका घोडा आहे ..." " धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा" हे जगातील २ अब्राहमीक धर्मांचे ब्रिदवाकायचआहे जणू मग त्यासाठी प्रेम वापरा , धाक वापरा, बाकी संपत्ती वापरा ... टूल किट मध्ये अनेक टूल आहेत आणि जर धर्मानंतर हा हेतू नस्ता तर फ़िलपिन पासून नार्वे पर्यंत इतक्या वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकाच धर्माचे कसे झाले असते? तुम्ही हिंदू बहुसंख्यांक प्रदेशात राहात असावा म्हणून ते जाणवत नसेल, पण एकदा हिंदू अल्पसंख्यांक होऊन बघा मग कळेल " जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात ते ( हे लेकाचे गीतेतील काही गोष्टी सांगून तुम्हाला सांगतील कि बघा येशूला शरण जा ) तुम्हाला झळ लागलेली दिसत नाहीये .. त्यामुळे आकडेवारी आकडेवारी चालू आहे

In reply to by कॉमी

Source ? कसला पाहिजे ? "जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात याचा ?

In reply to by कॉमी

१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ? मूळ हेतू. खून आणि सदोष मनुष्यवध यातील मूलभूत फरक जो आहे तोच. पहिल्यात त्या माणसाचा वध करणे हाच मूळ हेतू असतो (murder). तर दुसऱ्यात त्या माणसाला इजा करणे हा हेतू असतो किंवा निष्काळजी पणाने मृत्यू होतो परंतु वध करणे हा हेतू नसतो. (culpable homicide not amounting to murder). हिंदू ख्रिश्चन किंवा अन्यधर्मीय मुलीला फसवून किंवा धाक दाखवून इस्लाम मध्ये धर्मांतरं करणे या हेतूने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी विवाह करणे ( आणि नंतर तिला तलाक देऊन सोडून देणे) अथवा हे आपले आद्य धर्मकर्तव्य आहे असे समजणे आणि त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसणे अथवा उलट अभिमान बाळगणे म्हणजे लव्ह जिहाद. याचे प्रमाण आंतरधर्मीय विवाहात नगण्य आहे परंतु त्यामागचा मूळ हेतू हा अत्यंत जघन्य आहे. त्यामागे स्त्रियांच्या बद्दल कस्पटासमान वागवण्याची मानसिक वृत्ती हि नीच आहे. भारतात रोज अधिकृत आकड्यांप्रमाणे (२०२१) रोज ८६ बलात्कार होतात ( वर्षाला साधारण ३२,०००) पण निर्भया बलात्कार प्रकरण हे एवढं प्रचंड का गाजलं? तर त्यात ज्या निर्घृणतेने त्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर अत्यंत वाईट तर्हेने शारीरिक अत्याचार केला गेला त्यामुळे माणसे संतापाने पेटून उठली. आज लव्ह जिहाद हा विषय परत ऐरणीवर आला कारण ज्या तऱ्हेने या गोष्टी घडत गेल्या आणि पुरोगामी लोकांनी त्या लपवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला यामुळे लोकांच्या मनात संताप आहे. आता उनाड यांच्या पुरोगामी गृहीतकाप्रमाणे हा बलात्कार एक उच्चवर्णीय फँटसी वगैरे नाही होत का? उच्चवर्णीय फॅन्टसी असेल तर त्यात ख्रिश्चन मुलींचा लव्ह जिहाद व्हायला नको https://www.deccanherald.com/national/love-jihad-campaigns-by-religious… केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्री श्री अच्युतानंदन यांनी २०१० मध्ये हा विषय काढला होता. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kerala-cm…

वस्तुस्थिती नाकारणे हा अत्यंत वाईट पुरोगामी दळभद्रीपणा आहे.


In reply to by सुबोध खरे

आपले विधान सिद्ध करण्यासाठी ख्रिस्चन व कम्युनिस्ट लोकांची साक्ष घ्यावी लागते यातच काय ते आले. १ लव्ह जिहाद असे काही नाही असे केम्द्र सरकार ने लिहून दिले होते. २ मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र सरकार ने समिती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही. महिला बद्दल चा कळवळा बलात्कार्‍याना पेढे भरवले तेव्हाही दिसला असता तर बरे झाले असते.

In reply to by सुबोध खरे

यांच्या थापा उघडकीस येऊन तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच थापा पुढे रेटणे सुरू आहे.

In reply to by उनाड

धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे". आधी या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा माफी मागून दावा मागे घ्यावा.

In reply to by कॉमी

लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स जिहाद आहे कारण इथे लव्ह चा काहीही संबंध नाही. मुद्देसूद उत्तर खालील प्रकारे आहे आणि माझे वैयक्तीक मत आहे. १. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ? - पती मुस्लिम आणि पत्नी बिगर मुस्लिम. - सर्वसाधारण स्थितीत ह्यांची जोडी जमणे अशक्य असले पाहिजे. (म्हणजे सेलेब्रिटी, श्रीमंत व्यक्ती इत्यादी ह्यातून बाहेर पडतात कारण धर्म बाहेर लग्न करणे इथे सामान्य बाब असते) - पती काही तरी खोटे बोलून बिगर मुस्लिम मुलीला पटवतो. * खोटे पणाची काही उदाहरणे * आपला धर्म, आर्थिक स्थिती ,शिक्षण लपवणे . * आपली इतर लग्ने किंवा रखेल असेल ती लपवणे. - बिगर मुस्लिम मुलगी मुस्लिम बनते. - ह्यानंतर मुलीला सत्य कळते पण वेळ निघून गेलेली असते. - त्या लग्नातून बाहेर पडण्याची धडपड केली तर इस्लामिक कायदा किंवा हिंसेचा वापर. - कधी कधी लग्न सुद्धा होत नाही पण सेक्स केले जाते (खोटे बोलून). - mms बनवून ब्लॅकमेलिंग केले जाते. २. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ? उत्तर प्रदेश मध्ये २०२० मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण झाला त्यातील निकष माझ्या निकषापेक्षाही जास्त संकुचित होते आणि मागील ३ वर्षात तिथे ५०० केसेस रजिस्टर झाल्याचे कळते. आता उत्तर प्रदेश सारख्या भागांत बहुसंख्य गुन्हे नोंदवले सुद्धा जात नसतील. पण तरी सुद्धा हा आकडा बरोबर आहे असे धरल्यास ५०० केसेस माझ्या मते खूप आहेत. प्रत्यक्ष आकडा खूप मोठा असू शकतो. > हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ? माझ्या मते हा प्रश्न निरर्थक आहे. विविध प्रकारचे अत्याचार विविध प्रमाणात होत असले तरी सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून काही गुन्हे जास्त महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ देशांत असंख्य बलात्कार झाले असले तरी निर्भया कांड हे सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून सर्वांत मोठे ठरले. ह्या शिवाय हिंदू जनतेने कॉमन सेन्स वापरणे जास्त गरजेचे. बहुतेक वेळा मोठे शिक्षण घेऊन मत व्यक्त करण्यार्या इरफान हबीब किंवा रोमिला थापर ह्यांच्या पेक्षा आपल्या अशिक्षित आजीचे इतिहासाचे मर्मज्ञान जास्त चांगले असते. इस्लाम धर्मांत स्त्रियांचे स्थान जनावराच्या प्रमाणे आहे. विशेषतः काफ़िरांच्या स्त्रिया ह्या वेश्येप्रमाणे भोगायच्याच असताति हि इस्लामिक मानसिकता आहे. हे माझे मत नसून त्यांचा धर्मच सांगतो. आता आपला शेजारी हा लैगिक लंपट आहे अशी शंका सुद्धा आल्यास आपण आपल्या घरातील बायकामुलांना त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा नाही देणार का ? विषाची परीक्षा घ्यायची तरी कश्याला ? त्यामुळे आकडेवारी काहीही असली तरी आपल्या हिंदू मुलींना सावध करणे हा आपला अधिकार आहेच. आणि समजा लव्ह जिहाद खोटा आहे तर मग कायदा करायला विरोध का ? माझ्या मते कायद्याचे निकष खालील प्रकारे असतील. * प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. * लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे. * हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे. * ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे. --- हिंदू मुली ह्या मूर्ख आहेत असा लव्ह जिहाद चा अर्थ होत नाही. फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आपल्या समूहांत एकतेने राहतात. माझ्या माहितीतील ग्रूमिंग गॅंग मध्ये फार तर ५ लोक असतील. पण एकता असलेले ५ लोक, एकी नसलेल्या १ लाख लोकांवर भारी पडतात आणि हे फक्त लव्ह जिहाद ला लागू होत नाही तर क्रेडिट कार्ड फ्रॉड, टेली मार्केटिंग फ्रॉड, भुरट्या चोऱ्या इत्यादी अनेक ठिकाणी हाच रुल लागू होतो. इथे कठोर कायदे आणि त्यांची अंबलबजावणी हे महत्वाचे आहे (आपल्या देशांत कठीण आहे) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या लोकांचे प्रबोधन. ह्या शिवाय प्रबोधन हा आमचा अधिकार सुद्धा आहे. लव्ह जिहाद खोटे आहे तरीसुद्धा प्रबोधन करण्यात काय गैर आहे ?

In reply to by साहना

तिथल्या पोलीस यंत्रणेत असलेला सिस्टीमॅटिक बायस लक्षात घेता या बहुतांश केसेस खोट्या आहेत. मिसकॅरेज झालेल्या मुलीची केस तिथलीच, शिवाय तरुण मुलाने पोलीस स्टेशन मधल्या प्लॅस्टिक नळाला गळफास घेऊन 'आत्महत्या' केलेली केसही तिथलीच. सर्व मुस्लीम क्रूर असतात असे नव्हे, नात्यातील एखादी मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करू इच्छीत असेल तर तिला हजारदा विचार करायला सांगेन. पण 'लव्ह जिहाद' अशी फार मोठी कॉन्स्पिरेसी आहे हे मात्र उच्चवर्णीय हिंदुंची फेंटसी वा फोबियाच आहे.

In reply to by साहना

* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे. * लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे. * हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे. * ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे. https://www.bbc.com/hindi/india-65511298?xtor=AL-73-%5Bpartner%5D-%5Bbb… हे सर्व पाळूनही रिकामटेकडे विहिंप वाले सोडत नाहीत !

जो पर्यंत माझ्या घरी आग लागणार नाही मी सत्य स्वीकार करणार नाही. झोपून राहणार.

नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. प्रश्न अंतर्धर्मीय प्रेमविवाह करण्याचा नाहीये तर त्यानंतर चे सक्तीचे धर्मांतर हा आहे पण आपण काही हा मुद्दा लक्षात घेण्याचं मनस्थितीत दिसत नाहीत या उदाहरणात मुलगी गरिबी होती मग मदत जर या तरुणाला करयाची तर करडे कि लग्न ,, पण धर्मांतर का ?

प्रेम ला सुद्धा अटी लागू असतात हे माहिती नव्हतं का? धर्म बदलणार असलीस तरच माझं प्रेम आहे नाही तर नाही. बाकी चालू द्या

Group A, Indic religions: हिंदू, शीख, बौद्ध, जैन Group B, Non indic religions: इस्लाम, ख्रिश्चानिटी, जुडाइजम व इतर Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल. इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही. जोपर्यंत हे धर्मांध इस्लामी देश समूळ सेक्युलर होत नाहीत, तोपर्यत हिंदूंना सेक्युलरिझमचे डोस पाजणे बंद करा.

In reply to by चलत मुसाफिर

लव जिहाद तर लव जिहाद. पण जर हिंदू स्त्री शी मुसलमानाने प्रेमाने विवाह केला आहे तर त्याला पुढे अनेक विवाह करता येणार नाही असा बदल जरी त्यांच्या बाजुच्या कायद्यात करता आला तर पुष्कळ आहे. तो झाकीर नाईक तर स्त्री व पुरुष गाडीची दोन चाके असतात. लग्नानंतर दोन्ही चाके एकाच प्रकारची असणे गरजेचे असते. त्यामुळे स्त्रीचे धर्मांतरण आवश्यक ठरते असे तारे तोडत असतो. त्यातही मुसल्मानाचे चाक म्हणजे गाडीचे प्रॉपर चाक व हिंदू स्त्री म्हणजे सायकलचे चाक अशी मुद्दामुन अ‍ॅनॉलॉजी लावतो.

In reply to by चलत मुसाफिर

Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल. ग्रुप B मधून A मधे धर्म परिवर्तन करण्यासही कायद्याने बंदी असावी का? एखादयाला आपल्या धर्मातील तत्वे पसंत नसतील आणि दुसरा धर्म स्वीकारण्याची ईच्छा असेल तर कायाद्याने अडवता येईल का?

In reply to by चलत मुसाफिर

हिंदु पारसी व जुडाईझम मध्ये इन कमिंग अशक्य आहे. एखाद्या मुस्लिमाने हिंदू धर्म स्वीकारलाच तर त्याला कोणती जात देणार ?

In reply to by उनाड

तुम्ही उगा नसता लोड घेऊ नका. हिंदू समाज काय ते बघून घेईल. तुम्ही तुमच्या या बांगा अधोगामी धर्मीयांसमोर जाऊन द्या. कुराण, अपॉस्टसी, ब्लास्फेमी, चार लग्ने, हलाला वगैरे विषयांवर. जगलावाचलात तर तुमचे थरारक अनुभव मिपावर लिहा, वाचायला आवडेल.

In reply to by उनाड

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का?

In reply to by श्रीगुरुजी

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते. २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? हो. ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ?

In reply to by उनाड

या उत्तरांवरून हे स्पष्ट झालंय की इस्लामविषयी आपल्याला कणभरही माहिती नाही. तस्मात् लव्ह जिहादविषयी कोठून ज्ञान मिळणार?

In reply to by श्रीगुरुजी

मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत. इस्लाम हा तुमचा आदर्श आहे का? त्याची का उठाठेव ? बरं ते जाऊ द्या, सोपा प्रश्न, एका दलिताने कंटाळून मुस्लिम व्हायचा निर्णय घेतला, ते शक्य आहे ? ख्रिस्चन व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ? ब्राह्मण व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ?

In reply to by उनाड

दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दलित मुलीने ब्राह्मणाशी लग्न केले तर ती ब्राह्मण बनते. परंतु भारतीय घटना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला जात बदलू देत नाही. पण एखाद्या हिजराने सुन्नी व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? एखाद्या अहमदीने कुरेशी आडनाव घेणे शक्य आहे का? एखाद्या अहिंदूने धर्म बदलून हिजरा किंवा अहमदी बनणे शक्य नाही किंवा एखादा अहिंदू मॉर्मन किंवा असिरिअन ख्रिश्चन बनणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सुन्नी म्हणजे पहिल्या चारी खलिफांना मानणारे इतकेच तर आहे ना ? शिया म्हणजे हसन हा पहिला इमाम आहे आणि आधीचे तीन खलिफा मान्य नाहीत. मग शिया सुन्नी होण्यास किंवा सुन्नी शिया होण्यास काय अडचण आहे ? बाकी दावे माहीत नाहीत पण मॉर्मन लोक घरोघरी जाऊन बुक ऑफ मॉर्मन वाटत असतात. त्यामुळे मॉर्मन होता येत नाही हे पण खरे नसावे. (ह्यावर बुक ऑफ मॉर्मन म्हणून एक उत्तम संगीतिका आहे मॉर्मन प्रचारकांची थट्टा करणारी म्हणून माहितीये)

In reply to by श्रीगुरुजी

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल? तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते. २) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का? हो. ३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ? ४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का? नाही, पण इथे काय संबंध ?

In reply to by चलत मुसाफिर

Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी.
हे घटनाबाह्य ठरेल. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला हवा तो धर्म आचरण्याची मुभा दिली आहे. फक्त सक्तीचे वा प्रलोभन दाखवून केले गेलेले धर्मांतर नसावे.
इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही.
पाकिस्तानचा आदर्श समोर ठेवून भारताची राज्यघटना पुनश्च लिहावी असे आपणास वाटते काय ? अवांतर : अझरबैजान हे मुस्लिम बहूल (९७% लोकसंख्या) असलेले राष्ट्र घटनात्मक पातळीवर धर्मनिरपेक्ष आहे.

र्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. अरारारारा आता बघा मेणबत्ती घेऊन मोर्चा काढणारे कसे तुमच्या मागे लागतील .. पहिला फलक असेल " आकडेवारी द्या असे किती हिंदू शीख जैन धर्मांतरित झाले: दुसरी पाटी असेल: "मूलभूत हक्कांची पायमल्ली... " आणि अर्थातच पुढील घोषणा " घर वापसी चालते तर धर्मांतर का नाही - घर्वप्सी हे गेलेल्याने परत येणे असे आहे ,, नसलेल्याला येन केन प्रक्रारे धर्म बदलायला लावणे असे नाही ,, हे अर्थातच हे पुरोगामी विसरतात "

In reply to by चौकस२१२

अशा मेणबत्ती महाभागांकडे दुर्लक्ष करावे. इस्लामी धोक्यावर उपाययोजना हा आपला कळीचा मुद्दा नजरेआड होऊ देता कामाचे नाही. तिथे मेणबत्तीचा वापर निराळ्या प्रकारे करावा लागला तर डगमगू नये.

धर्मांतरावर बंदी आणा वैगरे सगळ्या fantasy आहेत. असल्या fantasy मध्ये रमायचे असेल तर रमत रहा. हिंदूंना बॉक्स मध्ये ठेऊन इतर विश्वासोबत संपर्क तोडून द्यावा अशी मागणी झाली धर्मांतर रोखण्यासाठी तरी आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे जेहोवा विटनेस पण नाही आणि धर्मांतर करवून का होईना खायला देणारे मिशनरी पण नाही. सगळा प्रॉब्लेमच संपला.

In reply to by कॉमी

हे कडक धर्मांतरविरोधी नियम इस्लाममध्ये का आहेत आणि मुसलमान समाजात त्यांना सर्वमान्यता का आहे यावर जरा टिप्पणी करा पाहू.

In reply to by चलत मुसाफिर

इस्लाम फारच आदर्शवत दिसतो तुम्हाला. इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे. तुम्हाला त्या धर्माचे अनुकरण करायचे आहे, मला नाही.

In reply to by कॉमी

जर तुमच्या मते इस्लाम धर्म अधोगामी का काय तो असेल, तर हिंदूंच्या मानगुटीवर का बसताय? हे सगळे ज्ञान वाटायला जामा मशिदीत जा की. हातीपायी धड परत आलात तर तुम्हाला ताबडतोब एक दहीमिसळपाव पार्टी माझ्यातर्फे. :-)

In reply to by चलत मुसाफिर

तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी. दोघे एकत्र जाऊ नंतर दहीमिसल खायला.

In reply to by कॉमी

सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी त्याबद्दल न्यायालय किंवा सरकार काहीच करणार नाही परंतु शांतताप्रेमी एखादे वेळेस "सर तन से जुदा" करतील. आणि जामा मशिदीत शुक्रवारी तसे केलेत तर नक्कीच "सर तन से जुदा" करतील बाकी चालू द्या

In reply to by कॉमी

इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे. + ७८६ म्हणून तर या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोरपंथात कोणालाही जाण्यास बंदी असावी, या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथानुयायांचे फाजिल लाड करण्यास बंदी असावी आणि या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथातून कोणास सुटका हवी असेल तर त्यांना पाठिंबा व मदत द्यावी.

In reply to by कॉमी

एकेकाळी राम मंदिर, कलम 370चा अंत, भाजपला पूर्ण बहुमत, काँग्रेस- शिवसेना युती, त्रिपुरा- बंगालमधून कम्युनिस्टांची हकालपट्टी वगैरेसुद्धा fantasyच होत्या हे विसरू नका :-)

अशा धाग्याना अनुल्लेखाने मारावे. शेजारी आग लागली म्हणुन गंमत बघणार असाल तर ती आग आपल्या घरादाराचा कधी घास घेईल समजणार नाही ईतके लक्षात घेतले पाहीजे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चोरून घुसणाऱ्या अशा वैचारिक रोहिंग्या जिहादींना प्रत्येक चोरखिंडीत गाठून उघडे पाडले पाहिजे. मोकळे रान देणे बरोबर नाही. ही चर्चा अनेकजण वाचत असतात. तातडीने प्रतिवाद झाला नाही तर समाज गैरसमज करून घेतो आणि जागोजागी छुपे पाकिस्तान उगवतात. हा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

1919 साली जगातील धर्मांध कट्टर मुसलमानांनी तुर्कस्थानातील जागतिक इस्लामी खलिफाच्या समर्थनार्थ 'खिलाफत' नावाचे आंदोलन आरंभिले. खिलाफत आंदोलनाचे ध्येय होते इस्लामी राज्याचे रक्षण आणि निर्मिती. अश्या या आंदोलनाला गांधींनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसला ही द्यायला लावला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलं की खिलाफत ही आफत आहे. भारतीय जनतेची हिंदुसमाजाची दुर्दशा होऊ नये, देशाचे तुकडे पडू नयेत, जातिभेद जातिद्वेष नष्ट आहेत, जन्मावर आधारित उच्चनीचता नष्ट होऊन समाजात समानता यावी यासाठी समाजचिंतक सावरकरांनी सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी लिहिली एकुण ३८ भाग आहेत.

In reply to by चौथा कोनाडा

त्यांच्या पत्नीने लिहिलेले पुस्तक लवकरच प्रदर्शित होत आहे. आता भारतरत्न मिळणे फार दूर नाही.

उद्या भारतीय मूळ हिंदू असलेल्या पण पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ? मग त्यांची जात कोणती लावायची ? चातुर्वर्ण्यात कुठल्या वर्णात स्थान द्यायचे ? आपले असलेले दलीत बौद्ध झाले तरी यांचे सोवळे सुटेना . असल्या संकुचित वृत्तीमुळे हिंदू धर्माची अधोगती झाली आहे. इतर धर्म जर प्रसार करत असतील तर कालानुरूप बदल घडवून हिंदू धर्म कसा प्रसार करायचं हे बाजूला .. अरण्यरुदन करण्यात फक्त पुढे असे धर्म पंडितांचे झाले आहे

In reply to by कपिलमुनी

बौद्ध धर्म हा भारतीय आहे. इस्लाम non indic आहे. मूळ वर्णव्यवस्था ही जन्माधारित अजिबात नव्हती. सध्याची जातिव्यवस्था हा सनातन धर्मातील वर्णाश्रमाचा पूर्ण विपर्यास आहे. हिंदु धर्माने कधीही धर्मपरिवर्तन मोहिमा काढलेल्या नाहीत, उलट विविध जनसमूहांना त्यांच्या धार्मिक विश्वासांसह सामावून घेतलेले आहे. शिवपूजक आणि विष्णुपूजक हे शेकडों वर्षांपूर्वी सरळसरळ वेगळे धर्म होते. आता एकाच कुटुंबात एक व्यक्ती शिवपूजक, दुसरी विष्णुपूजक, तिसरी उभयपूजक व चौथी नास्तिक असू शकते. इस्लामला (सध्या तरी) हे असले काही मान्य नाही.

In reply to by कॉमी

ऋषी विश्वामित्र ते ऋषी वाल्मीकि, भरपूर पुरावे आहेत. सवडीने वाचा, घाई नाही. मूळ मुद्दा वेगळा आहे. चर्चा भलतीकडे नेण्याचे हे डाव आता लोक ओळखतात.

In reply to by चलत मुसाफिर

विश्वामित्र ऋषींनी काय लिहिले ? शंबुक वध लिहिणारे वाल्मिकी का ? मुद्दा वेगळा कसा ? कपिल मुनींच्या प्रश्नावर तुम्ही उत्तर दिले त्यातला सेंट्रल मुद्दा आहे हा.

In reply to by कपिलमुनी

पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ? आर्य समाज त्यांना हिंदू करून घेतो. बाकी जात लावणे हे भारतीय कायद्यात आवश्यक नाही. "केवळ हिंदू, जात नाही" असे लिहिलेले चालते. आमच्या वर्गातील ९६ कुळीने आपल्या पुणे विद्यापीठाच्या अर्जात तसे लिहिलेले मी स्वतः पाहिलेले आहे. ( अर्थात आपल्याला जातीवर आधारित आरक्षण हवे असले तर कठीण आहे)

In reply to by विवेकपटाईत

ज्याला इस्लाम, इस्लाममधील विविध जाती व पंथ, इस्लामी कट्टरतावाद, लव्ह जिहाद इ. विषयी शष्प ज्ञान नाही त्याला हे अजमेर प्रकरण वाचायला सांगून उपयोग काय? त्याला ते समजणार नाही आणि त्यात काही चूकही वाटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

इस्लाम बद्दल इतके ऑब्सेसिव्ह होण्यापेक्षा वेद, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, षडदर्शने , मीमांस वगैरेंचा अभ्यास केला अस्ता तर बरे झाले असते.

In reply to by उनाड

मी इस्लाम किंवा इतल कोणत्याही धर्माबद्दल ऑब्सेसिव्ह नाही. माझा हिंदू व इतर धर्मांचा थोडाफार अभ्यास आहे. लव्ह जिहाद वगैरे अस्तित्वात नाही असे असत्य दावे करणाऱ्यांविरूद्ध मी लिहितो. हिंदू धर्माला घातक असणाऱ्या गोष्टींचे जे समर्थन करतात त्यांचा मी विरोध करतो. ज्याला मुस्लिम धर्माची, त्यातील जातींची व पंथाची, विचारसरणीची कणभरही माहिती नाही त्याने असे असत्य दावे केले तर मी खोडून काढतो. असो. आपण मुस्लिमातील सर्व जाती-पंथ, चालीरीती, प्रपोगंडा, ब्रेनवॉशिंग, क्रोर्य, फसवणूक इ. विषयी माहिती मिळवावी असे सुचवितो.

मी काय म्हणतो .. मी मिपावरी या विषयी अनेक तावातावाने पाडलेले लेख. प्रतिसाद पाहतो. शक्यतो मी दूर राहतो. पण आज एक शंका विचारतो.. या विषयातील तज्ञाने विदा पूर्वक माहिती द्यावी. लव जिहाद हा फक्त भिन्न लिंगी व्यक्ती मध्ये होतो. का. समजा दोन स्त्रिया आहेत (एक हिंदू एक मुस्लिम) त्यांनी लग्न केले, नंतर हिंदू स्त्री ने इस्लाम स्वीकारला तर हे प्रकरण लव जिहाद प्रकरणात गणले जाईल का ?

In reply to by आंद्रे वडापाव

इस्लामला समलिंगी विवाह मान्य नाही. तस्मात् असला प्रकार होणे अशक्य. मुळात खूप लहान वयात मुलीचे लग्न लावून देत असल्याने व धर्माचा मुलींवर सुद्धा प्रचंड पगडा असल्याने अशी जोडी जमणे अत्यंत दुर्मिळ. अजून एक म्हणजे सर्व इस्लामी देशात समलैंगिक विवाहास कायदेशीर बंदी आहे. अर्थात समलैंगिक संबंध असणाऱ्यांची संख्या (म्हणजे गे किंवा बायसेक्शुअल)) सौदी अरेबियात खूप मोठी आहे. विशेषतः अगदी लहान मुलांबरोबर गे प्रकारचे संबंध ठेवणाऱ्या अरबांची संख्या मोठा आहे. टर्की तर गे लोकांची राजधानी म्हणता येईल. एकीकडे आपण कट्टर धार्मिक आहोत याचे सतत जाहीर प्रदर्शन करायचे, इस्लामला समलैंगिक संबंध मान्य नाहीत म्हणून याविरुद्ध अत्यंत कठोर शिक्षा द्यायची पण त्याचवेळी लहान मुलांशी अनैसर्गिक संबंध ठेवायचे असा ढोंगीपणा येथे दिसतो.

In reply to by आंद्रे वडापाव

अरेच्चा मला वाटलेले की हा धागा भारताविषयी (भारताच्या काँटेक्ष्ट मध्ये) आहे.. इथ तर सौदी तुर्क आणि इस्लामिक जग असा गोल्पोस्त शिफ्ट झाला.. असो विदा पूर्वक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

In reply to by आंद्रे वडापाव

छे विदा बिदा काय विचारायचं नाय इथे. विदा विचारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं उलट, कारण विदा विचरण्यामागे त्यांचा अजेंडा असतो. बिना विदा श्रद्धापूर्वक आमचे मत मानले पाहिजे नाहीतर तुम्ही अजेंडा वाले आहात. पुरावे द्या असे ओरडणारे लोकं ओरडतील ओरडतील आणि नंतर गप्प बसतील. आपण आपली श्रद्धा सोडायची नाई, चील मारायचे.

In reply to by कॉमी

अनेकांनी विदा देऊनही त्याचा येथे काय संबंध असे धागाकर्ता विचारतोय. हे वाचावे. थोडा शोध घेतला तर टर्की गे लोकांबद्दल हजारो संकेतस्थळे दिसतील.

उच्चभ्रू , आपल्याला दिसणारे सिनेस्टार बिनधास्त आंतरधर्मीय विवाह करतातच की.लव्ह जिहाद म्हणजे धर्मांतर करण्यासाठी आटापिटा,ब्रेन वॉश हे सरळसरळ आहे की.