Skip to main content

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 18/12/2022 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या माहितीसाठी अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे.. ब्राइट्स सोसायटी सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024 P M: ९१-२२-२५३७ ७३९६ 103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स ठाणे (w)-100602, भारत

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004 तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022 वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6

परिषदेचे वेळापत्रक: सकाळचे सत्र 9:00-9:30- चहा आणि नाश्ता 9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे भाषणे 10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS) 10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक). 11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर) १२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार 1:00-2:00 लंच ब्रेक 2:00-5:00 दुपारचे सत्र ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी 2:00-2:30 Speech by Aniket Sule 2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम) निमंत्रक: समीर शिंदे 2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार 3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA 5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश 5:30 पुढे चहा आणि नाश्ता टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.

आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.

वाचने 17336
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिले आहेत ते मूळ मुद्दे दखल घेण्यासारखेसुद्धा नव्हते कारण त्यांचा उद्देश परिषदेची किंवा परिषदेच्या हेतूंची चिकित्सा करण्याचा नव्हताच. मला नेहमीच एक खंत वाटते ती अशी - खंत सुरु -- भारतीय लोक अध्यात्मात बरेच पारंगत आहेत आणि आस्तिक्याततर त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. तरीही खूप वेळा नास्तिकांना त्यांच्या मुद्द्यांचा आणि विचारांचा प्रतिवाद करायला नेहमीच खूप उथळ मुद्दे उचलेले जातात. त्यामुळे हा वाद सध्याच्या भारतीय वातावरणात ९९ टक्के वेळेस अगदीच बेसिक आणि बोअरिंग होऊन जातो. शिवाय नास्तिकांना त्यांच्या वैचारिक पातळीवर/उंचीवर येऊन नास्तिकपक्षाच्या तोडीचा विचार आस्तिक देऊ शकत नाहीत. ते एकतर गुळमुळीत उत्तरे देतात किंवा छद्मविज्ञानाचा आधार तरी घेतात. त्यामुळे हा वाद/प्रकार मराठी संस्थळावर नेहमीच शिळ्य कढीला वादागणिक बेचव होणारा ऊत इतकाच उरला आहे. खंत समाप्त -- काही मुद्दे मी सुचवू इच्छितो. त्यांना आस्तिक कोणत्या पातळीवर याचा प्रतिवाद करतात हे पाहणे रोचक ठरेल. १. अधार्मिकता आणि नास्तिक्य : सुबत्ता असलेल्या समाजांत आणि विशेषतः स्त्रियाही स्वतंत्र आणि प्रगत आहेत अशा समाजांत अधार्मिकता नि:संशय वाढलेली दिसते. उदा. जर्मनीमध्ये जवळजवळ ४०/५० टक्के लोक अधार्मिक आहेत आणि मला वाटते पर्यायाने प्राथमिक पातळीवरचे नास्तिक किंवा अ‍ॅग्नोस्टिक आहेत. सांस्कृतिक नास्तिक असा प्रकार नसतो पण सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक असा प्रकार जरूर असतो. दुसरे उदाहरण म्हणजे दक्षिण कोरिया. आर्थिक. शैक्षणिक, सामाजिक प्रगतीप्रमाणे नास्तिक्याचे प्रमाणही वाढले आहे. माझ्या मते अधार्मिकीकरण हे नास्तिक्याकडे पडलेले सुरुवातीचे पाऊल आहे. खूप लोकांना त्यापलिकडे कट्टर नास्तिक व्हायची गरज वाटत नाही. २. माझ्या मते श्रद्धा हा सुद्धा उत्क्रांतिजन्य मानसिकतेचाच भाग आहे. त्यामुळे संपूर्ण मानवजातीचे मुलभूत अस्तित्त्व आमूलाग्र बदलल्याशिवाय आस्तिक्य संपणे जवळ जवळ अशक्य आहे. श्रद्धा आणि सौंदर्यानुभव यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे आणि अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य आहे. ३. अधार्मिकतेने प्रश्न सुटतात, नास्तिक्याने नाहीत - काही महत्त्वाचे भौतिक प्रश्न धर्म आणि धर्माचे अवडंबर यांनी तयार झालेले आहेत. उदा. इस्लामी मूलतत्त्ववाद. धर्माची ज्ञानाशी आणि सत्तेची सांगड आधुनिकीकरण आणि सुबत्तेने तुटते. त्यामुळे मानवी मनाच्या गरजांमध्ये श्रद्धेला खूप वरचे स्थान आहे. श्रद्धा आणि धर्म यांचा सांधा तुटणे चांगलेच आहे. परंतु श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे काही फारसे लाभदायक नाही. ४. मूलतत्त्ववादांमधला फरक - इस्लामी मूलतत्त्ववाद हा जैन मूलतत्त्ववादापेक्षा जास्त घातक आहे. उलट काही प्रसंगी जैन मूलतत्त्ववाद हा मानवजातीला, निसर्गाला उपकारक ठरू शकेल. तरीही कट्टर होणे वाईटच. कट्टर होणे म्हणजे रिजिड होणे. रिजिडिटी कधी चांगली असते? ५. मूलतत्त्वे आणि प्रॅक्टिस यांच्यातल्या तफावती - नास्तिकांना दोन पातळ्यांवर भांडावं लागतं. त्यांना मूलतत्त्वे कशी निरर्थक आहेत हेही पटवून द्यायला लागते आणि प्रॅक्टिस कशी चुकीची आहे हेही. हिंसेसाठी बदनाम झालेल्या गुजरात राज्यात अहिंसा हे मूलतत्व असणार्‍या जैन धर्माचा पगडा आहे!! ६. पंथांचे केंद्रीकरण/संस्थाकरण वाईट - भारतीय धार्मिक पंथांचे मुख्य प्रवाहाला जोडून घेण्याची धडपड, त्यांची उन्नयन करून घेण्याची लालसा घातक आहे. उदा. वारकरी पंथ. वारकरी पंथ स्वत:ला उन्नयन करून घेऊन अधिकाधिक रिजिड होत गेलेला आहे. त्यातली सोशल इक्विटी ही नावापुरतीच उरलेली आहे. वेश्येने अभंग रचण्याची मुभा देणारा आणि कालांतराने संतत्व देणारा हा पंथ आज 'स्त्रियांना चपलेची जागा द्यावी' (इंदुरीकर) इथवर येऊन पोचला आहे. त्यामुळे नास्तिकांनी अशा गोष्टींना टूल म्हणून वापरणे कितपत फायद्याचे आहे? ७. नास्तिकांनी नव्या परंपरा तयार केल्या पाहिजेत- अग्नि आणि पुरोहितांच्या साक्षीने लग्न नाही करायचे. ओक्के! मग त्याला पर्याय कोर्ट मॅरेज हे होऊ शकत नाही. नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का? त्यांचे सौंदर्यशास्त्र रचता येईल का? भारतीय नास्तिक याबाबतीत किती सृजनशीलता दाखवतात? एकाही नास्तिकाने याबाबतीत काही विशेष काम केले आहे हे मला तरी आठवत नाही. उलट ते १० रुपयांचा फॉर्म भरून आम्ही लग्न केले वगैरे नीरस गोष्टींनाच कौतुकाने सांगतात. त्यात काय बोडक्याचे कौतुक? मंगल अष्टकांचे उदाहरण घ्या - गेय काव्याचा उपयोग करून लाखो लोकांची लग्ने होतात. इथे साहित्य, कला आणि देवाचा संगम झाला आहे. नास्तिकांना देव वगळून काही असं साहित्य प्रसवता येईल का? ही परंपरा मूळातच नष्ट करून काय विशेष फायदा आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

उत्तम प्रतिसाद
धन्यवाद हणमंतअण्णा जी. आणि तुमच्या प्रतिसादामुळे आता खर्‍या अर्थाने चर्चेला सुरुवात झाली.
तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिले आहेत ते मूळ मुद्दे दखल घेण्यासारखेसुद्धा नव्हते कारण त्यांचा उद्देश परिषदेची किंवा परिषदेच्या हेतूंची चिकित्सा करण्याचा नव्हताच
बरोबर आहे. पण चर्चेच्या ठिकाणी दखल चर्चा करण्यापेक्षा गोंधळ करणार्‍याच्या हेतुने आलेल्यांकडे आधी लक्ष द्यावे लागते. एकतर त्यांच्या मुद्द्यांची (ते अदखलपात्र असलेत तरी) दखल घेवून त्यांना संयमाने पण ठामपणे उत्तर देवून शांत करणे किंवा हाताला धरुन बाहेर काढणे याशिवाय पर्याय नसतो. ..त्या शिवाय मुख्य चर्चा होवूच शकत नाही. हेच बघा ना धागा निघाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर तुम्ही प्रतिसाद दिलात .. याचाच अर्थ आधीच्या गोंधळात तुम्ही तुमचे विचार मांडू इच्छित नव्हता असे दिसते. असो. तुम्ही मांडलेले विचार बरेच गहन आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर नाही तरी काही मुद्यांवर माझ्या प्रतिक्रिया देत चर्चा सुरु ठेवतो.
मला वाटते पर्यायाने प्राथमिक पातळीवरचे नास्तिक किंवा अ‍ॅग्नोस्टिक आहेत
प्राथमिक पातळीवरचे नास्तिक ही संज्ञा तितकीशी स्पष्ट होत नाहीये. कृपया उदाहरणासहित स्पष्ट कराल काय ?
सांस्कृतिक नास्तिक असा प्रकार नसतो पण सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक असा प्रकार जरूर असतो
सांस्कृतिक नास्तिक म्हणजे काय ? सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक - म्हणजे कुटूंबात किंवा समाजजीवनात धार्मिक कार्यात वा उत्स्वात सहभागी होणारा पण मनाने नास्तिक असे काय ? धार्मिक सण वा उत्सव हे कुटुंबाला समाजाला एकत्र आणणारी असतात त्यामुळे हे साहजिकच असू शकते. चित्रपटात दाखवला जातो तसा एखादा कडव्या मनाचा नास्तिक बनण्याची गरज नाहीच. तसेही धार्मिक सण वा उत्सव यात खर्‍या अर्थाने धार्मिक विधीचा भाग अगदी थोडा असतो बाकी इतर अनेक गोष्टी असतात ज्यांचा अस्तिक वा नास्तिक असण्याशी संबंध नसतो तर फक्त मनाला आनंद देणार्‍या त्या बाबी असतात. उदा. दिवाळीचे उदाहरण घेतले तर लक्ष्मीपूजन वा दिवाळीतल्या इतर दिवशी केल्या गेलेल्या बाकी पुजा मिळून फारतर दोन-तीन तासाच्या होत असतील. पण दिवाळी निमित्ताने खरेदी, फराळ बनवले जाणे, मित्र आप्तेष्टांनी एकत्र येवून तो खाणे, फटाके वाजवणे (आता प्रदुषणाचा मुद्दा वेगळा- पण फटाके वाजवण्यात अनोखी गंमत आहे हे मान्यच) , रांगोळी काढणे , घराला रोषणाई करणे वगैरे अनेक गोष्टी आहेत ज्या मनाला आनंद देतात. मी नास्तिक असलो तरी यांतील बहुतेक गोष्टी मला आवडतात .. प्रत्यक्ष पुजेच्या वेळी मात्र माझी पत्नी पुजा करते तर मी जवळपास असतो आणि फोटोग्राफी करतो.
त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे आणि अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य आहे.
ज्या मनात "ईश्वर आहे व तो जगाचे नियंत्रण करतो" ही श्रद्धा अतिशय घट्टपणे रुजली आहे तेथून ती दूर करणे खूप जास्त कठीण असते, कारण श्रद्धा एकटी येत नाही ती सोबत आशा आणि भिती अशा भावनांनाही घेवून येते. आणि खासकरुन भितीच्या भावनेवर विजय मिळवणे हे कठीण असते. त्यामुळे बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात बुद्धी भावनेपुढे पराजित होते. मी व माझ्या पत्नीने "कॉसमॉस" नावाची हिंदी रुपांतरित एक माहितीपट वेबसिरीज आवडीने पाहिली. त्यात महास्फोट, विश्वाची निर्मिती, पृथ्वीचा इतिहास, डार्विनच्या सिध्दांतानुसार झालेली उत्क्रांती ई सर्व खूप विस्ताराने व छान पद्धतीने दाखवले आहे. माझ्या पत्नीलाही मालिका आवडली, आणि त्यातल्या कोणत्याच सिद्धांताबद्दल तिचा आक्षेपही नव्हता - किंवा तिला ते सर्व पटले होतेच. तेव्हा मी तिला विचारले की "या मालिकेत ईश्वराच्या अस्तित्वाचा उल्लेखही नाही. मग तरी अजून अस्तिक आहेस का ? असशील तर तु मालिका फक्त मनोरंजन म्हणून बघितलीस काय ?" यावर तिचे उत्तर की "दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत" मला वाटते या विरोधाभासाचे उत्तर म्हणजे तुमचे वरील विधान होय. पण "घाला घालणे" हा शब्दप्रयोग नकारात्मक वाटतो. आणि श्रद्धा म्हणण्यापेक्षा कल्पनाविश्व म्हणणे अधिक योग्य होईल.. त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे असे म्हणण्यापेक्षा मी कल्पनाविश्वातुन बाहेर येणे असे म्हणेन. या कल्पनाविश्वात काही काळ रमणे हे मनाला समाधान देणारे असू शकते पण मनाचा 'डिफॉल्ट मोड' हा वास्तवाशी जुळलेला हवा, कल्पनेशी नको असे मला वाटते. याचे दुसरे सोपे उदाहरण मी असे देईन की मी जेव्हा शोले चित्रपट (किंवा कोणताही चित्रपट) बघतो तेव्हा जय, वीरु, ठाकूर, गब्बर ई पात्रे मला त्यावेळी खरी - जिवंत वाटतात, मी काही वेळ त्यांच्या सुख दु:खाशी समरुप होतो. ठाकूरचे कुटूंबा मारले जाते तेव्हा मलाही दु:ख होते. एखाद्या प्रसंगात जय ने असे करायला पाहिजे होते , वीरु ने तसे करायला हवे होते वगैरे वाटते.. खरेतर हा सगळा केवळ एक खेळ आहे जो सलीम-जावेद आणि रमेश भाऊंनी आपल्यापुढे उभा केला आहे हे माहित असतेच पण तरीही या कल्पनेच्या भावविश्वात स्वतःला झोकून दिल्याशिवाय त्या चित्रपटाचा आनंद मी घेवू शकत नाही. चित्रपट संपल्यानंतरही काहीवेळ त्यातली पात्रं माझ्या मनात रुंजी घालतात. क्वचित एखाद्या चित्रपटातील एखादे पात्र मनात अगदी घर करते, पुन्हा पुन्हा आठवत रहाते. पण तरी ते सर्व केवळ कल्पनेचे विश्व. मनाच्या डिफॉल्ट मोडमध्ये त्याला स्थान नाही. एखाद्या पात्राने मांडलेले काही विचार अगदी छान असू शकतात आणि ते मी आठवून माझ्या आयुष्यात त्यावर अंमलही करु शकतो ...नव्हे ते माझ्या जीवनाचे तत्वज्ञानही बनू शकते पण त्याचे श्रेय त्या काल्पनिक पात्राला नाही तर ते पात्र चितारणार्‍या खर्‍याखुर्‍या लेखक-दिग्दर्शकाला नाही का ? पण तुम्ही म्हणता तसे अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य अवघड आहे.. फक्त मी आधीच्या प्र्तिसादात म्हंटले त्याप्रमाणे संस्कारक्षम वयात योग्य वेळी नास्तिकतेचा परिचय आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ज्या अस्तिकांना निदान समजत आहे की "बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात माझ्या भावनांचे पारडे जड असल्याने मी नास्तिक होवू शकत नाहीये" त्यांनी निदान आपल्या मुलांना तरी "तुला अस्तिक व्हायेचे की नास्तिक याचा निर्णय तुच विचारांती घ्यायचा आहे" इतके स्वातंत्र्य अगदी नि:संदिग्धपणे द्यायला काय हरकत आहे ?
अधार्मिकतेने प्रश्न सुटतात, नास्तिक्याने नाहीत ...
. सामान्य लोकांकरिता अस्तिकता आणि धार्मिकता या वेगळ्या गोष्टी नाहीतच. अस्तिकता हा धार्मिकतेचाच एक भाग आहे. अस्तिक राहून अधार्मिक असणे हे तत्वतः शक्य वाटत असले तरी वास्तववादी नाही. कारण अस्तिकतेचा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या धर्मातुन येतो तो सिद्धांत मानायचा आणि धर्म नाकारायचा असे कसे होवू शकेल. मग त्याकरिता ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य करणारा पण इतर कोणतीही धार्मिक पथ्ये, नीति नियम न सांगणारा असा एक नवीनच धर्म वा पंथ निर्माण करावा लागेल. इतर कोणतेही नियम नकोत म्हणजे असा ईश्वर निराकारच असला पाहिजे, कारण त्याला आकार दिला की नियम आलेत.. म्हणजे गणपतीचा आकार असला की त्याला नैवेद्यात मोदक आवडतो.. शंकराचा आकार असला की त्याची आराधना सोमवारी करायला हवी वगैरे.. पण मग तो ईश्वर निराकार असायला पाहिजे हा देखील नियम. मुळात सगळाच डोलारा काल्पनिक पण त्यातले नियम मात्र वास्तवात येवून मानवापेक्षा वरचढ ठरु लागतात.
श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे काही फारसे लाभदायक नाही
बहुतांशी असहमत. "आपल्या पाठिशी कुणीतरी आहे" ही भावना श्रद्धेतुन जन्म घेते आणि ती बहुतकरुन कमकुवत मनाला आधार देणारी आहे हे मान्य. आणि श्रद्धेचा संस्कार अशी भावना माणसाच्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो हे खरे, पण त्याबरोबर इतर अनेक भावनाही जन्म घेतात. म्हणजे "देव सुद्धा माझ्या मदतीला नाही येत" आणि तत्सम भावना. देव आहे या श्रद्धेचा व्यत्यास "दानव आहे" असाही होतो. मग जादुदोणा, नजर लागणे , करणी वगैरे अंधश्रद्धांवरही सहजच विश्वास ठेवला जातो. माझी पत्नी रोज देवापुढे दिवा लावते आणि असे केल्याने "मनाला बरे वाटते".. इथपर्यंत ठीक आहे पण मग एखादे दिवशी घाई गडबडीत दिवा लावायचा राहून गेला आणि ती तशीच घराबाहेर पडली की "आज देवापुढे दिवाही नाही लावला" ही चुटपूट तिला दिवसभर त्रास देते. तिला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो.. त्याने तिला बरे वाटणार म्हणून माझी अर्थातच काही हरकत नसते (किती तेल वाय गेले वगैरे फालतु शंका मी काढत नाही बरं) पण मग चुकून एखादे वेळा तो दिवा विझला की त्याने तिच्या मनाला होणारा त्रास मला बघवत नाही. मग सांगा श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे लाभदायक का ठरु नये ?
त्यामुळे नास्तिकांनी अशा गोष्टींना टूल म्हणून वापरणे कितपत फायद्याचे आहे?
मुद्दा क्र ६ नीटसा कळाला नाही. नास्तिक कोणत्या गोष्टींना टूल म्हणून वापरत आहेत ?
नास्तिकांनी नव्या परंपरा तयार केल्या पाहिजेत- अग्नि आणि पुरोहितांच्या साक्षीने लग्न नाही करायचे. ओक्के! मग त्याला पर्याय कोर्ट मॅरेज हे होऊ शकत नाही. नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का?
पण सध्यातरी धार्मिक पद्धतीने लग्न वा कोर्ट मॅरेज असेच पर्याय कायद्यानुसार उपलब्ध आहे. तसेही लग्नाचे महत्व आता फारसे धार्मिक स्वरुपाचे राहिले नसून ते कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर आहे अन्यथा नास्तिकांसाठी लग्न काय आणि लिव्ह ईन काय सारखेच की. लग्नाकडे फक्त धार्मिक परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर विवाहाविच्छेदाचा पर्याय राहणारच नाही (अपवाद मुस्लिम धर्म -त्यात तलाकची सोय आहे. इतर धर्मांत - जसे हिंदू , जैन, बौद्ध , ख्रिश्चन , शीख ई धर्मात विवाहविच्छेदाची सोय आहे असे ऐकण्यात नाही - चुभुदेघे)
नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का?
नास्तिकांची संख्या ती किती ? नास्तिक व्यक्तीला नास्तिक जोडीदार मिळण्याची मारामारी आणि परंपरा कुठल्या तयार करणार .. उलट बहुधा नास्तिक लोकांना जोडीदाराच्या वा कुटूंबाच्या इच्छेखातर धार्मिक विधिवत लग्न करावे लागते.. मी ही तसेच केले :( असो. कोर्ट मॅरेज करणारे फक्त नास्तिकच असतात असे नाही.
उलट ते १० रुपयांचा फॉर्म भरून आम्ही लग्न केले वगैरे नीरस गोष्टींनाच कौतुकाने सांगतात. त्यात काय बोडक्याचे कौतुक?
अरसिक असणे आणि नास्तिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी. फॉर्म भरुन लग्न केला ती झाली कायदेशीर औपचारिकता. पण लग्न केले, आयुष्याचा जोडीदार मिळाला या गोष्टीचा आनंद (झाला असल्यास) साजरा करण्यास ना कायद्याचा अडसर आहे ना नास्तिकतेचा.. जंगी पार्टी केली जावू शकते.. बाकी ज्याची त्याची आवड. कुणी अरसिक असल्यास त्यात नास्तिकतेचा काय दोष ? आणि विधिवत केलेला विवाह थाटामाटात झाला तरी त्यातल्या फक्त सात फेरे, मंगलाष्टक ई धार्मिक विधींचे श्रेय धर्माचे (ज्यांत आजकाल फारसा रसही कुणाला नसतो- पण औपचारिकता म्हणून केले जातात) बाकीचा थाटमाट, उंची कपडे, महागडा मेक अप, रोषणाई, भरगच्च जेवण, बूट चोरणे वगैरेंचा धर्माशी वा अस्तिकतेशी काय संबंध ? धार्मिक विधींत वधू-वरांचे आईवडील , मामा ईत्यादिंची उपस्थिती लग्नात अपेक्षित आहेत मग चुलत नणंदेच्या जाऊच्या भावाच्या सासर्‍यांना निमंत्रण देण्यात आणि स्थानिक आमदाराचा सत्कार करण्यात अस्तिकतेचा काय विषय ? फार काय हळद लावणे देखील धार्मिक नाही.. लग्नात व लग्नानंतर वधू वरांनी छान दिसावे यासाठिची 'स्किन केअर' ट्रीटमेंट आहे ती. शेतात किंवा मनरेगात उन्हात काम करुन त्वचा रापली असल्याने नास्तिक असला तरी हळद लावायला हवी यामुळे मधुचंद्र रोमांचक होईल. एसीत बसून काम करणार्‍यांनी नाही लावली हळद तरी चालू शकेल :)