मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करोनाचा बागुलबुवा

आशु जोग · · काथ्याकूट
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले. स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले. करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत. असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?

वाचने 33398 वाचनखूण प्रतिक्रिया 147

कॉमी 16/05/2022 - 20:37
प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?
डॉक्टर शंभर टक्के अनभिज्ञ असतात. लेकाच्यांना उगाच वाटते की वर्षानुवर्षे अभ्यास केला म्हणून आपण फार ज्ञानी झालो असं. तुमचा अभ्यास चुलीत घाला म्हणावं, आमच्याकडे गुगल असते, ट्विटर , फेसबुक वरून काय ती खरीखरी माहिती आम्हाला कळते. भेंडी, मी ऑफिसमधल्या डब्याच्या सुट्टीत दहा मिनिटात युट्युब आणि गुगलवरून कोव्हिड काय असते हे समजून घेतले, आणि तरी वर्षानुवर्षे अभ्यास करणारे (म्हणे) डॉक्टर मला व्यवस्थित समजावून सांगू शकत नाहीत- कोव्हिड काय, लस कशी काम करते वैगेरे वैगेरे.

sunil kachure 16/05/2022 - 21:57
Covid काळात हे स्पष्ट दिसले डॉक्टर स्वतः काहीच निर्णय घेवू शकतं नव्हते. निदान कसे करायचे,उपचार कोणी आणि कसे करायचे,कोणती औषध वापरायची ,ह्याचे स्वतंत्र dr ना नव्हते. Who किंवा सरकार च हे ठरवत होते. Dr ना स्वतःच्या मनाने उपचार करायला दिले असते तर covid लवकर नियंत्रणात आला असता.

In reply to by sunil kachure

विवेकपटाईत 26/05/2022 - 11:14
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला देणारी संस्था आहे. औषधी ठरविणे प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग पाहणारे अधिकारी /मंत्री करतात. प्रोटोकॉल मध्ये ठरवलेली औषधी देणे ही बंधनकारी नसतात. पण जर ती दिली नाही आणि रोगी दगावला तर त्याचे नातेवाईक हॉस्पिटल विरुद्ध केस करू शकतात. म्हणून आपल्या देशात कुठलेही शास्त्रीय परीक्षण न झालेली औषधे प्रोटोकॉल म्हणून दिल्या गेली. त्या औषधांचे रोगींवर दुष्परिणाम झाले. आता रोगी दगावण्याचे कारण औषधी होती की करोंना, हे दोन चार वर्षांत मेडिकल संस्था स्वीकार करतील.

In reply to by sunil kachure

विवेकपटाईत 26/05/2022 - 11:14
डब्ल्यूएचओ ही फक्त सल्ला देणारी संस्था आहे. औषधी ठरविणे प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग पाहणारे अधिकारी /मंत्री करतात. प्रोटोकॉल मध्ये ठरवलेली औषधी देणे ही बंधनकारी नसतात. पण जर ती दिली नाही आणि रोगी दगावला तर त्याचे नातेवाईक हॉस्पिटल विरुद्ध केस करू शकतात. म्हणून आपल्या देशात कुठलेही शास्त्रीय परीक्षण न झालेली औषधे प्रोटोकॉल म्हणून दिल्या गेली. त्या औषधांचे रोगींवर दुष्परिणाम झाले. आता रोगी दगावण्याचे कारण औषधी होती की करोंना, हे दोन चार वर्षांत मेडिकल संस्था स्वीकार करतील.

In reply to by आशु जोग

सुक्या 18/05/2022 - 21:50
आपल्या मताचा आदर आहे. पण मी साथीचे रोग व मेडीकल क्षेत्रातील तज्ञ लोकांचे म्हणने मानतो. ते म्हणता तेच खरे. गेल्या दोन वर्षांपासुन जगात या रोगाने हाहा:कार माजवला आहे. त्याचे परीणाम पाहतोच आहे. तेव्हा " रोगच खोटा आहे" हे तुमचे म्हणने माझ्या लेखी चुक आहे. बाकी तुमची मर्जी.

साहना 17/05/2022 - 01:37
मजेची गोष्ट आहे. मस्तिष्कशार्विका झाली जे नतद्रष्ट विचार सुचू लागतात त्यांत कोविड हा बागुलबुआ आहे हा साक्षात्कार प्रथम होतो (ट्रम्प प्रेम, वॅक्सीन विरोध, रशिया प्रेम वगैरे सिम्प्टम नंतर येतात). ह्या लोकांची शेवटची सिम्प्टम म्हणजे कदाचित स्टोक मार्केट मध्ये लाखाचे बारा हजार करून घेणे. कोविड हा निःसंशय पणे धोकादायक रोग आहे. ह्याने आधीच लक्षावधी (आणि कदाचित कोट्यवधी) लोकांचा अकाल मृत्यू झाला आहे. कोविड धोकादायक आहे ह्याचा अर्थ सर्व डॉक्टर, राजकीय नेते, इत्यादी इत्यादी मंडळी बरोबर आहे आणि अचूक आहेत असा होत नाही पण रोग धोकादायक आहे आणि व्हॅक्सीन्स हि त्यावरील चांगला तोडगा आहे हे सत्य आहे (ज्यांना मस्तिष्कर्षविका झाली नाही त्यांच्या साठी तरी). रिस्क मॅनॅजमेण्ट चा पाया म्हणजे धोकादायक गोष्टी आम्हाला १००% ठाऊक नसतात तरी सुद्धा ढोबळ मानाने आम्ही त्यासाठी तयार राहतो. त्यासाठी प्रसंगी पैसे खर्च करतो. विमा उतरवतो. एखाद्या गोष्टीची १००% काय पण १०% सुद्धा माहिती नसली तरी त्याच्या बाबतीत भरपूर काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यांत विवेक सुद्धा आहे. डॉक्टर लोकांना रोगाची १००% माहिती नाही ह्याचाच अर्थ त्या रोगाची आम्ही धास्ती घेतली पाहिजे असा होतो. हळू हळू जशी जास्त माहिती येईल तशी तशी आपण आपली प्रतिक्रिया बदलू शकतो. कोविड धोकादायक आहे ह्याचा अर्थ त्याला रोखण्यासाठी सरकारने जो धुडघूस घातला तो बरोबर आहे असा होत नाही. इतर सर्व सरकारी कारभाराप्रमाणे तिथे निष्क्रियता, भ्रष्टचार, सत्तेचा मद इत्यादी गोष्टी दिसून आल्याच आणि त्यामुळे प्रचंड नुकसान सुद्धा झाले. काही ठिकाणी हेच नुकसान मूळ रोगापेक्षा जास्त सुद्धा झाले असावे. पण ह्याचा अर्थ रोग धोकादायक नाही असा होत नाही.

करोना थोतांड आहे वगैरे म्हणणार्‍या लोकांना फाट्यावर मारावे. जगभरात लाखो लोक या रोगाने मेली आहेत किवा मरत आहेत. भले त्यातले अनेक जण आधीपासुनच रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण असतील. पण या रोगाने त्यांना शेवटचा फटका दिला नपेक्षा ते लोक अजुन काही वर्षे जगले असते. आमच्या फॅमिली डॉक्टर्स आणि ईतरही डॉ. लोकांच्या म्हणण्यानुसार हा जो काही संसर्गजन्य रोग आहे त्याचे व्हेरिअंट येतच राहणार आहेत. आणि आपल्याला त्याच्या बरोबर जगायची सवय करुन घेतली पाहिजे. जसे सर्दी,खोकला, साथीचे ताप हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत तसेच. जगभरात या रोगावर रामबाण उपाय कोणाकडेही नाही, सर्वजण चाचपडत उपचार करत आहेत, एकही लस न घेतलेले ,विनामास्क फिरणारे, गुटखे/तंबाखु खाउन थुंकणारे लोक मजेत जगताहेत आणि दोन दोन लशी, बुस्टर वगैरे घेतलेले आणि घरातच क्वारंटाइन राहणारे मरत आहेत. तेव्हा करोनापासुन वाचण्याचा एक असा काही नियम नाही. तेव्हा जमेल तेव्हढी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे, कुठल्याही आजारांकडे दुर्लक्ष न करणे,वेळेवर उपचार घेणे हाच काय तो मार्ग दिसत आहे.

sunil kachure 17/05/2022 - 13:09
किती ही काळजी घ्या,सर्व नियम पाळा covid हा हवेतून पसरणारा रोग आहे. तो होणारच च होणार. निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. ऐन रोगाच्या भरात नळ बाजार किंवा crofort मार्केट च्या भागात बिना मास्क लोक फिरायची. त्या च वेळी तिथे जाण्याचा योग आला तेव्हा बघितले. त्या भागात covid मुळे जास्त लोक ग्रस्त नव्हते. पॉश समजले जाणारे भाग covid ग्रस्त जादा होते.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 26/05/2022 - 12:35
कचरे बुवा निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. कचरे बुवा वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का हे पण असंच (नेहमीसारखं) न विचार करता टंकलंय? अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते. याचा अर्थ सांगता येईल का? साधा अर्थ असा आहे ज्यांनी लस घेण्याची काळजी घेतली त्यांच्यात गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण नि:संशय दृष्ट्या कमी आहे. काळजी घेणारे लोक कोण होते ज्यांचे वय किंवा/ आणि वजन जास्त होते ज्यांना मधुमेह हृदयविकार सारखा रोग होता. करोनाच काय सध्या फ्लूने मरणार्या लोकांत सुद्धा याच लोकांचे प्रमाण २०२० पूर्वी सुद्धा जास्त होतेच. यांची तुलना विशी पंचविशीच्या तरुणाशी करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. बाकी आकडेवारीने एक सोडून कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते. ती एक गोष्ट म्हणजे सत्य

रोग नविन असल्याने बागुल्बुवा आहेच. १० रुपयाचा हॅन्ड सॅनिटायझर ७५ रुपयाना विकणार्या कंपन्याना करोना हवा आहेच. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवणार्या कंपन्यानाही करोना हवा आहेच. लस बनवणार्या कंपन्यानी उखळ पांढरे केले व भविष्यतही त्यांना ते करायचे आहे. तोवर भारतात २०२० मध्ये ८०,००० मृत्यु टी.बी.ने झाले ह्याकडे दुर्लक्ष करु. गेल्या ३ वर्षात २२ लाख लोक कर्करोगाने दगावले ह्याकडेही दुर्लक्ष करू. २०२० मध्ये १,३०,००० लोक रस्ते अपघातात मरण पावले येथेही दुर्लक्ष करू व मास्क घालून फिरत राहू.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

sunil kachure 17/05/2022 - 14:04
फक्त दहा च surgical मास्क असलेले pkt आता मध्ये मागवले तेव्हा कविड नव्हता. किंमत 20 रुपये. त्या वर एमआरपी बघितली 75 रुपये होती. म्हणजे ह्यांनी covid काळात ते 10 मास्क 75 रुपयाला विकले होते. ऑक्सिजन मीटर कोणी विचारत नव्हतं....जेव्हा मीडिया नी ऑक्सिजन ,ऑक्सिजन म्हणून बोंब मारायला सुरुवात केली. तज्ञ त्यांचे अमूल्य विचार मांडू लागले तेव्हा oxymeter ची किंमत 2000 झाली त्या नंतर तज्ञ जास्त च बुद्धी ची चमक दाखवायला लागले किंमत 3500 वर गेली. त्याचा काही उपयोग होता का रोग नियंत्रणात येण्यासाठी हे फक्त तेच जाणोत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकस२१२ 26/05/2022 - 16:19
आपण वर्णन केलेलं घडले यावर कोणी शंका घेत नाहीये ,, पण ते झाले मनुष्य स्वभावातील घाणरडेपणाचे दर्शन पण म्हणून रोगाचं खोटा? काही देशात कोणत्याही रोग्याला वैद्यकीय व्यावसाय लुबाडतो असे मानले जाते... तर त्या व्यवसायातील असा दुष्ट प्रवर्ततींवर टीका जरूर कर पण मुळात रोगाचं नाहीत असे कसे म्हणू शकता .. काह्ही राजकीय दृष्टीने विचार केलं तर उद्योग बंद पडलेम हे ना उजवया विचहरसरणीला परवदणारे ना डॉय विचहरसरणीचं कामगारांना परवडणारे मग हे जे मी वरती न्हणतो तर हे कोण्ही सांगावे कि दोन्ही उजव्या सरकारांनी आणि दाव्या सरकारांनी कसे काय हो उद्योग बंद ठेवले ? आज आमचं देशात परदेशी विद्यार्थी यायचे कमी झाले आणि छोट्या वयवसायांना अर्ध वेळ काम करणारे कामगार मिळत नाहीत .. उजवे सरकार असूनही त्यांनी सुरवातीला तरी देश बंद ठेवला ? का? मूर्ख म्हणून , त्यांचे पाठीराखे उद्योजक किती ओरडेल असतील ! तरी उजवे असून त्यांनी बंद ठेवला

sunil kachure 17/05/2022 - 14:18
Who चे सर्व सदस्य,सर्व देशांचे सत्ता धारी,सर्व डॉक्टर्स,सर्व covid तज्ञ,सर्व covid संशोधक,लस निर्मिती करणारे,मेडिकल स्टोअर वाले, sanitizer, मास्क आणि covid वर औषध निर्माण करणारे . ह्या सर्वांची चोकशी जागतिक पातळीवर केली पाहिजे. ह्यांची संपत्ती किती पट वाढली ह्याची माहिती मिळेल. दुनिया बरबाद हे ठराविक मालामाल असेच चित्र दिसेल.

कंजूस 17/05/2022 - 15:37
आखरी अंतिम उपाय - पाण्यात तुरटी फिरवून गुळण्या करणे. माणसे पूर्वीही वेगवेगळ्या रोगांनी मरत होतीच. पण कोण किती पैसे खर्चून मरतो याने स्टांडर्ड वाढते ना!

गामा पैलवान 18/05/2022 - 23:08
आशु जोग, मी रोगच खोटा आहे असे म्हणतोय करोना नामे कोणताही विषाणू आजवर विलग करता आलेला नाहीये. त्यामुळे तुमचं म्हणणं खरं वाटतंय. हा रोग अथवा विकार जे काही असेल ते सर्दी ते फ्ल्यू या दरम्यानचं काहीतरी आहे. याच्यामुळे जर माणूस मरंत असेल तर त्याच्या / तिच्या शरीराची स्थिती सहव्याधींमुळे गंभीर आहे. प्राणघातक व्याधींवर उपचार करायचं सोडून जर करोनावर उपचार करीत बसलं तर जीव जाणारंच ना? आ.न., -गा.पै.

आशु जोग 21/05/2022 - 17:10
रोग खोटा आहे. मेलेले लोक हॉस्पिटलच्या तावडीत सापडल्यानंतर मेले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांचे देखील एक विधान आले होते. रेमेडीसिवर हे गरजेपेक्षा जास्त दिले जात होते ते दिले जाऊ नये. परंतु तोपर्यंत अनेक लोक औषधांमुळे मारले गेलेले होते. आणि हा बागुलबुवा आहे. यावर विश्वास असल्यामुळे लशीच्या वाटेला गेलेलो नाही. कोर्टात ज्या प्रकारच्या कबुल्या दिल्या जात आहेत त्यावरून या बागुलबुवाची खात्री पटते आहे.

तुम्हाला माहीत नसले तरी तुम्हाला स्वतःला करोना (कुठलाही वेरिएंट असुदे ) होऊन गेलाय. लक्षणे दिसली नसतील! आणि लक्षणे दिसत नसतानाही लोक स्वखुशीने हॉस्पिटल मधे अ‍ॅडमीट होतात आणि डॉक्टरही करून घेतात असं म्हणायचंय का तुम्हाला? >> उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा तुम्ही कुठल्याही करोना होऊन गेलेल्या व्यक्तिला भेटला नाही आत्तापर्यंत ? कुठल्या जगात राहताय ? बातम्या बघून ठरवता का कि करोना होता कि नाही ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

sunil kachure 26/05/2022 - 15:48
1माझ्या बाजू लाच covid ची rtpcr टेस्ट negetive आली पण त्रास होत होता. म्हणून xray काढण्याचा सल्ला दिला सामान्य लोकांनीच..श्वास घेण्यास त्रास covid निगेटिव्ह रिपोर्ट तरी दबाव टाकून भरती करायला लावले . व्यक्ती बरा झाला. २)एक नाही दोन नाही ७ ते ८ covid बाधित लोकांशी खूप जवळून संपर्कात होतो ते पण दोन चार तास. सहज सर्वांची rtpcr केली आणि आणि ती दूसरी टेस्ट पण केली बरोबर असणारे ८ जन covid positive मी एकटा निगेटिव्ह. विश्वास बसला नाही म्हणून परत टेस्ट केली परत negetive . close संपर्कात असून पण संसर्ग नाही .जे positive होते ते सर्व मस्त होते . तरी bmc मध्ये पाठवले.. आता बस झाले सोडा त्यांना असा पण दबाव टाकावा लागला. ३) covid positive एकाची आली थोडे सिरीयस लक्षण होती पण तो व्यक्ती घरातच विलगिकरण मध्ये गेला पाच सह दिवसात टणाटण ..दवाखान्यात गेला असता तर गेला असता... Covid पेक्षा उपचार मुळे लोक मेली आहेत हे मला पण खरे वाटते ४)माझी आई ८२ वर्षांची आहे वृध्द पना मुळे किरकोळ आजार covid काळातच हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो होतो. ते पण covid हॉस्पिटल ..ना तीला covid ची लागण झाली ना काही त्रास.

In reply to by sunil kachure

काही वाट्टेल ते बोलु नका. डॉक्टरांचा सरळ अपमान करताय तुम्ही ! इथुन पुढे काहीही झाले तरी जाऊ नका दवाखान्यात. 1माझ्या बाजू लाच covid ची rtpcr टेस्ट negetive आली पण त्रास होत होता. म्हणून xray काढण्याचा सल्ला दिला सामान्य लोकांनीच >> एक्स-रे काढतात अशावेळी ? मला वाटलं HRCT करतात. माहिती घ्या आधी नीट. आणि फोनवर टाईप करताय का ? इतकं गचाळ आहे म्हणून विचारलं. जे positive होते ते सर्व मस्त होते . तरी bmc मध्ये पाठवले.. आता बस झाले सोडा त्यांना असा पण दबाव टाकावा लागला. >> तसं मग सगळ्यांना जबरदस्ती लॉकडाऊन लावून बसवलेलेच होते ना ? स्वतःहुन कोण बसलं होतं ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

sunil kachure 26/05/2022 - 16:54
नाही . मी माझ्या अगोदर च्या एका कॉमेंट मध्ये पण लीहले आहे.डॉक्टर नी स्वतःच्या मनाने उपचार केले असते तर इतके मृत्यू झालेच नसते. मिळालेलं आदेश नी उपचार केल्या मुळे स्थिती बिघडले. असेच उपचार करा,हीच औषध ध्या,ह्याच टेस्ट करा असे निर्देश दिल्यामुळे डॉक्टर कडे करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही. ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. किती तरी लोक गंभीर परिणाम भोगत आहेत. ह्या वर एक शब्द तरी कोणी बोलत आहे का? Industrial वापरासाठी लागणारे विविध वायू चे सिलिंडर खाली करून त्याचा उपयोग ऑक्सिजन सिलिंडर म्हणून केल्या मुळे ब्लॅक फंगस आजार निर्माण झाला असा अंदाज खूप तज्ञ लोकांनी व्यक्त केला होता.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 26/05/2022 - 19:25
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. कचरे बुवा तुम्ही इतकं भंपक लिहिता आहात त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद करणे अशक्य आहे आणि कालापव्यय करण्यासारखे आहे. कधीही काहीही माहिती नसताना केवळ टंकायचं एवढच तुम्हाला माहिती आहे. ब्लॅक फंगस अनादी काला पासून भारतात आहे सर्वत्र पसरलेली आहे. तुमच्या पावावर किंवा मुरंब्यावर येणारी बुरशी आहे ती. करोना मुळे किंवा टोसिलीझुमॅब या औषधामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती अशा रोग्यांना हा आजार झाला होता. टाटा कर्करोग रुग्णालयात किंवा कर्क रोगावर उपचार करणाऱ्या इतर कोणत्याही रुग्णालयाला अनेक तर्हेच्या कर्करोगांवर केमो थेरपी घेणाऱ्या रोग्यांपैकी काही रोग्यांना ( विशेषतः ल्युकेमिया) हा आजार झालेला डॉक्टर कित्येक वर्षे पाहत आलेले आहेत. हा आजार जेंव्हा जेंव्हा प्रतिकार शक्ती कमी होते तेंव्हा होऊ शकतो तेंव्हा रोज काहीतरी टंकलेच पाहिजे हा अट्टाहास सोडून द्या.

In reply to by उन्मेष दिक्षीत

sunil kachure 26/05/2022 - 16:55
नाही . मी माझ्या अगोदर च्या एका कॉमेंट मध्ये पण लीहले आहे.डॉक्टर नी स्वतःच्या मनाने उपचार केले असते तर इतके मृत्यू झालेच नसते. मिळालेलं आदेश नी उपचार केल्या मुळे स्थिती बिघडली असेच उपचार करा,हीच औषध ध्या,ह्याच टेस्ट करा असे निर्देश दिल्यामुळे डॉक्टर कडे करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही. ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. किती तरी लोक गंभीर परिणाम भोगत आहेत. ह्या वर एक शब्द तरी कोणी बोलत आहे का? Industrial वापरासाठी लागणारे विविध वायू चे सिलिंडर खाली करून त्याचा उपयोग ऑक्सिजन सिलिंडर म्हणून केल्या मुळे ब्लॅक फंगस आजार निर्माण झाला असा अंदाज खूप तज्ञ लोकांनी व्यक्त केला होता.

In reply to by उन्मेष दिक्षीत

सुबोध खरे 26/05/2022 - 19:16
@उन्मेष दिक्षीत कुठे त्या कचरे बुवांच्या नादाला लागत आहात. टंकन करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि बॅण्डविड्थ आणि नेट स्वस्त आहे म्हणून काही तरी टंकत असतात ते. दिसामाजी काहीतरी टंकित जावे प्रसंगी अखंडित टंकित जावे एवढेच त्यांचे ब्रीद

In reply to by सुबोध खरे

कॉमी 26/05/2022 - 19:24
एकदम करेक्ट. लसी घेऊ नका, कोरोना पॉझिटिव्ह माणसाचा मुका घ्या, काय वाट्टेल ते करा असे म्हणावे वाटत आहे. बरं, कोरोना हा रोगच थोतांड आहे असे म्हणणारा माणूस २४*७ बेसमेंटमध्ये राहत असणार असे वाटत आहे. समाजात वावरणाऱ्या लोकांना आणि आजूबाजूला होणाऱ्या घटना ज्यांनी पहिल्या त्यांना हा रोग थोतांड आहे असे वाटणे शक्य नाही.

In reply to by कॉमी

sunil kachure 26/05/2022 - 20:08
Corona थोतांड होता असे नी कुठे लीहले आहे? Corona नीट हाताळायला गेला नाही त्या बाबंत भीती पसरवली गेली . उपचार योग्य दिशेने झाले नसावेत अशा अर्थाचा माझा प्रतिसाद आहे . न्यूज चॅनेल, समाज मध्यम ,ह्यांनी अंतरांजित माहिती पसरवली त्या मुळे भीती चे वातावरण निर्माण झाले. जे उपचार केले गेले त्याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. त्या वर खरेच सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. पुढे त्या चुका त्या मुळे टाळता येतील. ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. हा पण प्रश्न आहेच.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 26/05/2022 - 20:20
उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. म्हणजे कोणा कोणाला काय काय उपचार व्हायला हवे होते आणि ते झाले नाहीत ते एकदा डिटेलवार मध्ये जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य समिती इंडियन मेडिकल असोसिएशन या सर्वाना सांगून टाका. म्हणजे पुढच्या महामारीच्या वेळेस सर्व लोक जागृत राहतील हा का ना का त्या वर खरेच सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. हायला मला वाटलं तुम्हाला सगळं माहिती आहेच ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. fungas नव्हे fungus तुम्हाला काय fun gas फन गॅस (गमतीचा वायू) वाटला काय? विचार न करताना टंकताय निदान स्पेलिंग तरी ठीक लिहा कि.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 27/05/2022 - 16:21
उपचार चुकीचे झाले असे फक्त मला वाटतं. 1.हाइड्रोक्लोरोक्वीन ते रेमेडेस्वीर बिना कुठल्याही प्रमाण प्रोटोकॉलमध्ये का दिली गेली याचे उत्तर एम्स ते आईएमए कुणाही जवळ नाही. 2. जागतिक आरोग्य संघटना फक्त सल्लागार संस्था आहे. औषधी विकसित करण्याची त्यांच्या जवळ कुठली यंत्रांना नाही. उपचार पद्धतीचा निर्णय प्रत्येक देशातील स्वास्थ्य विभाग घेतो. 3. आयएमए एक असोसिएशन आहे ज्यात 20 एक हजार डॉक्टर सदस्य आहेत. आयएमए जवळ ही रिसर्च लॅब इत्यादि नाही. डॉक्टरांच्या हितांचे रक्षण हे संस्थेचे उदेश्य आहे जसे आणि मजदूर संघटनांचे असते. या शिवाय फार्मा कंपन्यांचे हित जपणे ही असते. त्यामुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले. हे सत्य सर्वांनाच माहीत आहे. ब्लॅक fungas वर कोणी च का बोलत नाही. आपल्या देशात फक्त पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूट या संस्थेने कोविड आणि ब्लॅक फंगस वर वास्तविक रिसर्च केले आणि ते जागतिक दर्जाच्या जर्नल्स मध्ये प्रकाशित ही झाले. (https://www.patanjaliresearchinstitute.com/covid-19.php )अर्थात ते प्रकाशित होऊ नये म्हणून देशातील मेडिकल माफियाने औषध कंपन्यांच्या दलालांनी मोठ्या प्रमाणात दबाव टाकला. प्रत्येक रिसर्च प्रकाशित कारला सहा ते एक वर्ष लागायचे. शेवटी सत्य हे स्वीकार करावेच लागते. By Daily Excelsior -21/01/2022 A team of scientists at Patanjali Research Institute has found classical ayurvedic nasal drop ‘Anu taila’ effective against the black fungus (mucor), by using sophisticated scientific technologies. The intractable mucormycosis caused by Mucorales primarily targets immune compromised individuals. The first-line therapy, intravenous liposomal Amphotericin B and surgical debridement of necrotic tissue, is contraindicative in individuals with compromised kidneys. https://sfamjournals.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/jam.15451 ‘Anu taila’ effective against black fungus: Patanjali … बाकी कारोंना , मी आणि ज्या भागात राहतो ते बिंदापुर एक्स्ट. एक लेख लिहणार आहे.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 30/05/2022 - 10:01
@ विवेकपटाईत हाइड्रोक्लोरोक्वीन ते रेमेडेस्वीर बिना कुठल्याही प्रमाण प्रोटोकॉलमध्ये का दिली गेली. कुठलेही औषध उपलब्ध नसताना हि दोन्ही औषधे प्रायोगिक पुराव्यावर (empirical evidence) दिली गेली. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध भारतीय लष्कर आपल्या सैनिकांना वर्षानुवर्षे मलेरिया च्या बचावासाठी देत आले आहे आणि ज्या प्रमाणात ते दिले गेले त्याचा कोणताही साईड इफेक्ट गेल्या ५० वर्षात आढळलेला नाही. रेम्डेसीव्हीरच्या उपयोगाबद्दलचे उपलब्ध शोध निबंध हे संशयास्पद होते आणि त्याचा वापर आपल्या औषधविक्रीसाठी पाश्चात्य कंपन्यांनी केला हि वस्तुस्थिती आहे परंतु त्यामुळे रुग्ण दगावले याला कोणताही पुरावा नाही. कारण ज्या प्रमाणात आणि जितके दिवस ते दिले गेले त्याचा कोणताही साईड इफेक्ट आढळलेला नाही. या दोन्ही औषधांचा म्हणावा तितका फायदा होत नाही हे दिसल्यावर त्याचा वापर थांबवण्यात आला. आयएमए जवळ ही रिसर्च लॅब इत्यादि नाही. डॉक्टरांच्या हितांचे रक्षण हे संस्थेचे उदेश्य आहे जसे आणि मजदूर संघटनांचे असते. या शिवाय फार्मा कंपन्यांचे हित जपणे ही असते. हे (सध्यापुरते) मान्य केले तरी त्यामुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले. आय एम ए मुळे शेकडो डॉक्टर आणि लाखो रोगी मृत्यूमुखी पडले या विधानाला कोणताही शेंडा किंवा बुडखा नाही.

चौकस२१२ 26/05/2022 - 16:08
जगभर जे काही झाले त्यात सरकार कडून चुका झाल्या असतील ( मग ते सरकार दावे असो वा उजवे आणि विकसित देशातील असो किंवा विकसनशील ) आणि या चुकांवर टीका टिपण्णी करने हा नागरिकांचा अधिकार आहे हे मान्य असले तरी "उचलली जीभ लावली टाळ्याला या उक्ती प्रमाने " हा रोग, रोगचं नाही "किंवा "धोकादायक नाही "किंवा "थोतांड आहे " हे म्हणणारे बेजबाबदार आहेत. जगभरची येवढि सरकारे / शास्त्रन्य / वैद्य एकाच वेळी अशी गंडू शकतात ? अशक्य

गामा पैलवान 26/05/2022 - 21:21
सुबोध खरे डॉक्टर, तुमचा इथला संदेश वाचला. १.
अतिदक्षता विभागात काम केलेल्या सर्वच डॉक्टरांचे स्वतःचे अनुभव असे आहेत कि जेवढे मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते.
तुमच्याच शब्दांत विचारतो की वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का ? की हा देखील सांगोवानगीचा आकडा आहे? बाकी, करोना जर इतका घातक आहे तर वारंवार चाचणी करून लोकांना का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून? २.
ज्यांनी लस घेण्याची काळजी घेतली त्यांच्यात गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याचे प्रमाण नि:संशय दृष्ट्या कमी आहे.
तर मग शेन वॉर्न, रफायेल नदाल यांना कसले त्रास होत होते? ज्योकोव्हिच का लस घेत नाहीये? तब्ब्येत ठीक नसल्याच्या कारानार्थ मायामी ओपन टेनिस स्पर्धेतनं विक्रमी प्रमाणावर माघारी का घेतल्या गेल्या? आणि करोनावरील लस म्हणजे नेमकं काय? फायझरला लशीत m-RNA टाकून जनुकोपचार का करावा लागतोय? जनुकोपचाराची आवश्यकता पडावी इतका करोना खरंच घातक आहे का? उत्तर साधं सोपं आहे. करोना हे एक थोतांडच आहे. च महत्त्वाचा. आणि लस हे त्याहूनही मोठं थोतांड आहे. ३.
हा आजार जेंव्हा जेंव्हा प्रतिकार शक्ती कमी होते तेंव्हा होऊ शकतो
ये हुई ना बात. हाच नियम करोननास लागू करायला हवा. बस इतकंच. कित्येक लोकांना करोना झाल्याचं कळंतही नाही. कारण त्यांची प्रतिकारशक्ती शाबूत असते. म्हणजेच करोनास आटोक्यात आणण्यासाठी धडधाकट माणसाची प्रतिकारशक्ती पुरेशी आहे. फक्त ते प्रस्थापितांना मान्य नाही. ४.
करोनाच काय सध्या फ्लूने मरणार्या लोकांत सुद्धा याच लोकांचे प्रमाण २०२० पूर्वी सुद्धा जास्त होतेच.
करोना हा फ्ल्यू सारखाच रोग आहे. युरोपपुरतं म्हणायचं झालं तर इ.स. २०२० पूर्वी फ्ल्यूच्या हंगामात वयस्कर व्याधीग्रस्त दगावायचे. त्याचंच आता करोना असं बारसं केलंय. असो. बाकी, डॉक्टर सुझान हम्फ्रीझ यांनी लशीविषयी लिहिलेल्या पुस्तकाची चिरफाड करा, अशी तुम्हाला खूपदा विनंती केली होती. पुस्तक वाचलंत का? नसल्यास इथे दुवा आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/ तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं असणार, अशी माझी शंका आहे. त्यातले निष्कर्ष तुमच्या मताप्रमाणे नाहीत म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 26/05/2022 - 23:04
मृत्यू किंवा गंभीर आजार झाले त्यात ९५ % + लोक लस न घेतलेले होते.
तुमच्याच शब्दांत विचारतो की वरील विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला काही पुरावा देता येईल का ? की हा देखील सांगोवानगीचा आकडा आहे?
गामाजी, मी नम्रपणे तुम्हाला आठवण करून देतो कि ह्याचा आधार मी आपल्या चर्चेत दाखल केलेला, तेव्हा भारतात ९७% कोव्हिड मृत्यू लस न घेतलेल्यांच्यात झालेत असे दाखवलेले. त्यावर तुम्ही नीती आयोगाचे पॉल म्हणतायत त्या वक्तव्याचा विपर्यास करून काहीतरी प्रत्युत्तर दिलेले. पॉल ह्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढला हे मी तुम्हाला दर्शवले आणि ते तुम्ही मान्य केले. पण मूळ मुद्द्यांकडे तुम्ही परत आला नाही, आणि माझा पेशन्स सुद्धा तिथे संपला होता. हे चर्चा परत सुरु करण्याचा उद्दिष्टाने नाही. तर इथे खरे डॉक्टरांनी सुस्पष्टपणे त्यांचा व्यक्तिगत अनुभव सांगितला असता तुम्ही त्यांच्याकडे आधार मागत आहात. आणि मी मागे आधार आणि आकडेवारी दिली ती तुम्ही चुकीच्या प्रकारे खोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यानंतर साफ दुर्लक्षच केले. ह्याला काय म्हणायचं ?!

In reply to by गामा पैलवान

करोनाला तुम्ही मॉडर्न फ्लु म्हणताय ना ? फ्लु असु दे नाहीतर बर्ड फ्लु असु दे ! लोक गेले ना ? आणि जायचे ते ट्रिटमेंट मुळे वाचले ना जायचे ? लस घेतल्यामुळे आज ते कमी आले आणि मास्क लावून फिरावे लागत नाही ना ? किती लोकांनी काय काय एफर्ट घेतले त्याच्यासाठी ? लस नसती तर अजूनही मास्क लावूनच फिरत असता तुम्ही ! व्हेअर इज द अ‍ॅक्नॉलेजमेंट ? एखाद्या करोना वॉर्ड ला भेट दिली आहे का तुम्ही ? तुम्हाला तेच विचारतो, तुम्ही एकाही करोना झालेल्याला भेटला नाही का ? ( तुम्हालाही हा थोतांड नावाचा आजार होऊन गेला आहेच ! ) नाहितर कॉमी म्हणतात तसे तुम्ही २४*७ बेसमेंट मेंबर होतात. टिप : मला स्वतःला झाला होता आणि बायकोलाही माझ्यामुळे, तिला हॉस्पिटल ट्रिटमेंट घ्यावी लागली आणि ती बरी झाली , काय काय झाले आणि किती परिणाम झाला ते मला माहिती आहे ! महिनाभर तरी विकनेस राहातो, श्वास कमी पडतो, थोडा मेमरी लॉस पण होतो. बट एवरिथिंग इज फाईन नाऊ , व्हाय, बिकॉज ऑफ ट्रिटमेंट ऑन टाईम! नशीब तुमच्यासारखे डॉक्टर नाहीत जे म्हणतात हे सगळे थोतांड आहे, का ? कारण ते डॉक्टर आहेत ! टाईमपास म्हणून कॉन्स्पिरसी थिअरी स्प्रेड करणारे नाहीत ! ते अ‍ॅकच्युअल ग्रांउंड वर्क करतात !

In reply to by उन्मेष दिक्षीत

सुक्या 27/05/2022 - 04:48
व्हेअर इज द अ‍ॅक्नॉलेजमेंट ? काय पण अपेक्षा बॉ तुमच्या ... स्वतः वर आले की हेच लोक पृष्ट्भागाला पाय लाउन पळतात. वर तोंड करुन विदा द्या म्हणतात ... दुर्लक्ष करा ..

In reply to by सुक्या

सुक्या 27/05/2022 - 04:51
बाय द वे. कालच मी फायझर चा तिसरा डोस घेउन आलो. ज्यांना थोतांड वाटते त्यांना वाटु द्या. आजारी पडलो तर हे लोक जेवण थोडी बनवुन देणार आहेत.

In reply to by सुक्या

मागील वर्षी दोन फायझरचे डोज घेतले. कालच तीसरा पण घेतला. २६ जानेवारीला कोणाच्यातरी संपर्कात आलो व लक्षणे दिसून आली. मीत्रच डॉक्टर व माझा सुद्धा बराच अनुभव.ताबडतोब उपचार केले.एक आठवड्यात ठिक झालो. महिनाभर अशक्तपणा होता.मुलीला व नातीला पण लक्षणे दिसली पण वय आणी रोग प्रतीकारक शक्ती म्हणून जास्त त्रास नाही झाला. सौ मधुमेह ग्रासीत उचित दक्षता घेतल्याने काहीच परीणाम नाही. या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले. संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले. वैद्यकीय व्यवस्थापनाच्या प्रदीर्घ अनुभव आहे व केलेले विधान हे पुर्ण जबाबदारीने केले आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुक्या 28/05/2022 - 04:24
मी पण डिसेंबर च्या पार्टीत कुणाच्या तरी संपर्कात आलो. घरात सारे पॉझीटिव आले. १० दिवस त्रास झाला पण लक्षणे सौम्य होती. जिभेची चव घेण्याची क्षमता व नाकाची वास घेण्याची क्षमता जवळ्पास २ अठवड्यांनी परत आली. वॅक्सीन चे दोन डोस आधीच घेतल्यामुळेच लक्षणे सौम्य राहीली. संधीसाधूनी वाहत्या करोनात हात धुवून घेतले. ही जमात कुठेही हात धुवुन घेते. त्याला ईलाज नाही. गरजेच्या काळात लुटने हेच ह्या लोकांना माहीत असते. या महामारी मधे डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी काम व्यवस्थित केले. १००% सहमत. यात डॉक्टर/ पोलिस / ईतर कर्मचारी हे सारे आले.

In reply to by sunil kachure

सुनील जी, फायझर चे पहिले दोन डोज एक महिन्याच्या अंतराने तर तीसरा डोज,बुस्टर दहा महिन्या नंतर. सर्व डोज फुकट आहेत. पहिल्या दोन डोज घेतल्यावर दहा $ इन्सेंटिव्ह म्हणून सरकार देते. इथे लसीकरणाला बराच विरोध आसल्याचे वाटले. भारताच्या तुलनेत अमेरिकी लोकसंख्या कमी व लोकांचा विरोध म्हणून लस फुकट देणे व वर इन्सेंटिव्ह देण्यामागचा कारणे असू शकतात.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 27/05/2022 - 09:40
तुम्ही गुपचूपपणे पुस्तक वाचलं असणार पुस्तके गुप्तपणे वाचायची सवय नाही आणि गरजही नाही. असे अनेक लोक मला अनेकदा असून तमुक पुस्तक वाचा आणि अभिप्राय द्या सांगतात. एकतर मला त्यात रस नाही आणि फुकट घालवायला तितका वेळ ही नाही. यात डॉ मनू कोठारी सारख्या के ई एम च्या ऍनाटॉमीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले पुस्तकही होते ज्यात कर्करोग हे एक थोतांड आहे असे लिहिलेले आहे. (दुर्दैवाने डॉ मनू कोठारी हे पुढे कर्करोगाने कैलासवासी झाले हा भाग अलाहिदा) बाकी तुमच्या सारखे करोना हे एक षडयंत्र आहे असे बोलणारे अनेक लोक आहेत. मी कुठे प्रत्येकाशी वाद घालत बसू? आम्ही अमुक तमुक स्वामींच्या अंगाऱ्याने बरे झालो पासून होमिओपॅथी मुले आमचा कर्करोग बरा झाला असे छातीठोक पणे सांगणारे लोक सुद्धा मला भेटत असतात अशा प्रत्येकाशी वाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा इतर अनेक विधायक कामे करता येण्यासारखी आहेत. आणि करायला काहीही नसेल तर मी छानपैकी झोप काढेन.

चित्रगुप्त 27/05/2022 - 08:37
कोविड खरा की खोटा, हा एक प्रश्न आहेच, पण कोविड टेस्टा किती विश्वसनीय आहेत, हाही मोठाच प्रश्न आहे. कालच माझा मुलगा, सून आणि त्यांच्या दोन लहान मुली भारतातून अमेरिकेला परत गेले. विमानात बसण्यापूर्वी चोवीस तासाचे आत केलेल्या चाचणीत निगेटिव्ह असणे आवश्यक होते, त्याप्रमाणे जवळच्या एका लहान हास्पिटलातून (प्रत्येकी चारशे रुपये देऊन) चाचणी करवली. आधी त्यांनी आधार कार्ड आणि पासपोर्ट दाखवा, अमूक फॉर्म भरा, यात दीड तास घालवला. रात्री साडे आठ वाजता निकाल आले, त्यात सुनबाई पॉझेटिव्ह आल्या, मोठीच पंचाईत झाली. मग धावपळ करून (खूप गवगवा असलेल्या -) 'लाल पॅथ लॅब' मधे गेलो, त्यांनी रिपोर्ट चोवीस तासांनंतर मिळेल, असे सांगितले, तोवर थांबणे शक्यच नव्हते. मग दुसर्‍या एका मोठ्या चकाचक हास्पिटलात इमर्जन्सीमधे गेलो. (तिथले एकंदरित वातावरण वगैरे बघून मला वाटले इथे काही हजार रुपये घेतील, पण दीडशे रुपयेच लागले). त्यांनी चाचणी करून लगेचच निगेटिव्ह असल्याचे सांगून तासाभरात रिपोर्ट दिला. आता कोणता रिपोर्ट खरा आणि कोणता खोटा. मुळात या चाचण्या तरी खर्‍या आहेत का ? मला प्रश्न पडलाय की माझे काही परिचित (तरुणांपासून वृद्धांपर्‍यंत विविध वयाचे) कोविड पॉझिटिव आले म्हणून इस्पितळात भरती झाले आणि लाखो रुपये खर्चून शेवटी मृत्यु पावले (एकाला तर चाळीस लाख लागले, तोही मृत्यु पावला) ते खरोखरीच पॉझिटिव्ह होते का ? असले तरी त्यांना दिले गेलेले उपचार योग्य्/आवश्यक होते का? असले तर ते का मृत्यु पावले ? याउलटआम्ही दोघे (पतिपत्नि - वय ७० आणि ६५) जुलाई २०२० मधे कोविडग्रस्त होऊन महिनाभर त्रस्त होतो, परंतु इस्पितळात न जाता, कोणतेही औषध न घेता घरीच हळू- हळू पूर्णपणे बरे झालो. काहीतरी मोठाच लोच्या आहे हे कोविड प्रकरण.

In reply to by चित्रगुप्त

सर टोबी 27/05/2022 - 09:48
बिल गेट्सचे साथीचे आजार येणार अशी भविष्यवाणी आणि कोविड ची साथ अजून किती दिवस टिकणार यासंबंधीची वक्तव्य संशय घ्यायला पुरेशी आहेत . विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कोलमोडून पडेल अशा तऱ्हेने आपल्या नागरिकांना रोगराई आणि दहशतवादाची भीती घालने असे प्रकार चालूच असतात. त्याचाच हा प्रकार हाताबाहेर गेला असे वाटण्यास पुष्कळ वाव आहे.

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 27/05/2022 - 09:48
कोविड टेस्टा किती विश्वसनीय आहेत, RTPCR हि चाचणी ६३ % अचूक आहे याचा अर्थच असा आहे कि १०० पैकी ३७ जणांची हि चाचणी नेगेटिव्ह येते. यामुळेच जर रुग्णाचे ऑक्सिजन चे प्रमाण कमी झाले असले तर किंवा रुग्णाला काही त्रास होत असेल तर त्याचा HRCT( HIGH RESOLUTION CT SCAN) केला जात असे आणि त्यात विशिष्ट छाया दिसल्या तर तो करोना आहे अशी खात्री बाळगून रुग्णावर उपचार केले जात असत. HRCT ची अचूकता साधारण ९७ % इतकी असते. HRCT मध्ये रुग्णाला किंचित का होईना किरणोत्साराचा उपसर्ग होतो आणि हि चाचणी महाग पण आहे यामुळे हि सर्वच रुग्णांसाठी केली जात नसे. दुसरी कोणती सोयीची आणि स्वस्त चाचणी उपलब्ध नसल्यामुळे RTPCR हीच चाचणी वापरली जाते. कोव्हीडचे ९५ टक्के रुग्ण स्वतःहूनच बरे होत असत. उरलेल्या पैकी ३.५ % रुग्णांना बरे होण्यासाठी औषधोपचार लागत असे आणि १.५ % रुग्ण उपचारांविना किंवा उपचारकेल्यावरही दगावत असत. भारताची लोकसंख्याच १४० कोटी आहे मग त्यात १ टक्का सुद्धा १ कोटी ४० लाख होतात. यामुळे अशा षडयंत्र कहाणी प्रसारित केल्या जातात आणि चवीचवीने चघळल्या जातात.. याला काही इलाज नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 01/06/2022 - 05:38
चित्रगुप्त साहेब आपण एक सुन्य नागरिक अहहत, जगात फिरलेले अहहत म्हणून विचारतो ( कॉन्स्पिरसी वाले वाटत नाही म्हणून ) - जगभर कोविद मधेय अनेक चुका झालाय आहेत, वैद्य, सरकार, सामाजिक संस्था लोक आणि हात धुवून घेणार उद्योग सगळ्यांचं कडून पण म्हणून हे काहीतरी लोच्या चे प्रकरण/ थोतांड आहेम हा रोग सर्वसामान्य इन्फ्लुएंझाच आहे आणि त्याचा उगाच बागुलबुवा असे तर आपले म्हणणे नाही ना ? कारण लोच्या असले तर जगातील एवढी सगळी मंडळी गंडली तर म्हणजे "केवढा मोठा लोचा " असणार .. आणि तसे असले तर आपण म्हणूयात जग मूर्ख आहे "दे dISARV इट ! "..परंतु इस्पितळात न जाता, कोणतेही औषध न घेता घरीच हळू- हळू पूर्णपणे बरे झालो." स्पष्ट विचारतो आपल्याला कोविद होऊन पण फार त्रास झाला नाही... पण ते उलटे झाले असते तर आपली प्रतिक्रिया अशीच असती का? असो ( हे खालील चित्रगुपत ना उद्देशून नाही ) बर दूसरा मुद्दा असा कि या काळात फक्त भारत नाही तर इतर देशात हि हे घडत होते आणि चांगले वाईट सगळी कडे घडले मग काही लोक जे भारतात घडले तेच ग्राह्य धरून सर्व जगात हे असेच असणार असे का म्हणतात कोण जाणे .. ( पेट्रोल जणू काही फक्त भारतातच महाग झाले हा जो कांगावा तसेच काहीसे ) एकवेळ असे धरुयात कि भारतासारखाय देशात वैद्यकीय वयवसाय हा अगदी डागळलेला आहे , डाक्तरच औषदहसह दुकान चालवतो आणि रुग्णाला तेथूनच औषध गया असे सांगतो असे मी बघितलंय ( अर्हताःत हे काही सर्व भरतोय विदयानं लागू होत नाही एक टोकाचे उदाहरण म्हणून ) पण ज्या देशात डॉक्टर चे उत्पन्न हे अश्या गोष्टींवर अवलंबून नसते तिथे सुधा डॉक्टर वयसायाने खबरदार्या घेतलाय कोविद च्या बाबतीतही ( उदाहरण येथे सर्वसाधारण डॉक्टर एका भेटीसाठी ५५ गुणिले ५५ रु एवढेच घेतो पण त्यातील सरकारच त्याला ३७ देते .. काही डॉक्टर तर ३७ मध्येच भागवतात आणि असले जोडधंदे त्यानं करावे लागत नाहीत .. मग तरी देखील येथील डॉक्टर करोना ला गांभीर्याने घेतो ... सरकार उजवे ( म्हणजे ट्रम्प दादांसारखे अँटी वॅक्सीन जणू ) तरी करोडो डॉलर खर्चून सर्व जनतेला लस पुरवते .. त्यांचे पाठीराखे मोठे उद्योग त्यांना बंद राहायला भाग पाडते - कान्तास सारखी फायद्यात चालणारी विमानसेवा घ्या किंवा परदेशी विद्यार्थ्यांवर करोडो डॉलर कमावणारी विदयापीठे ... मग असे उजवे सरकार हे असे का करेल? ज्यानं सरकारी बजेट हे नेहमी तोट्यात जाऊ नये असे वाटते ते प्रचंड कर्जाचाच डोंगर का उभा करतील? हे सगळे सामाजिक आणि राजकीय मुद्दे धरले तर हा जगभरचा साथीचा महारोग नव्हता असे कोणाची म्हणायची हिंमत आहे ? फक्त कॉन्स्पिरसी वाले आणि भिंतीला तुंबड्या लावणाऱ्यांची

sunil kachure 27/05/2022 - 10:26
ह्याचा सरळ अर्थ आहे ३७ % लोक चुकीची covid positive दाखवली गेली . आणि निरोगी लोकांवर प्रोटोकॉल नुसार covid चे उपचार केले गेले. त्यांना मानसिक त्रास झाला . निरोगी व्यक्ती लं covid वर वापरली जाणारी औषधे दिली तर त्याच्या शरीरावर काही तरी त्या औषधांचा विपरीत परिणाम झाला असेल. " औषध म्हणजे mild विष च " असे मी कुठे तरी वाचले आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 27/05/2022 - 11:15
नाही. ३७ % लोकांमध्ये ती पॉझिटिव्ह आली नाही. यामुळेच डॉक्टरांनी आपली ऑक्सिजनची पातळी मोजत राहण्यास सांगितले होते आणि ज्यांची पातळी कमी झाली किंवा त्यांना कोणता त्रास असेल किंवा ताप येणे, तोंडाची चव जाणे, वास जाणे सारख्या भावना झाल्या/ लक्षणे आली त्यांचा HRCT केला. आणि त्याप्रमाणे उपचार केला.

विवेकपटाईत 27/05/2022 - 11:48
करोंना काळात ही भारतात मृत्यू दर विशेष वाढली नाही. Death Rate Growth Rate 2022 7.380 0.490% 2021 7.344 0.480% 2020 7.309 0.490% 2019 7.273 0.500% याचा अर्थ एकच वास्तविक बळी करोंनाचे कमी आणि दूसरा आजार + करोंना जास्त. करोंना नसता झाला तरी त्यातले अधिकान्श वर गेले असते. या शिवाय करोंना पेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल. बाकी मेडिकल माफियाने लोकांना भरपूर लुटले.

In reply to by कॉमी

sunil kachure 27/05/2022 - 13:03
कौमी ह्यांचा हा अडगा प्रतिसाद आहे. त्यांच्या ह्या प्रतिसाद चा खूप च लो आहे.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी 27/05/2022 - 20:39
संख्याशास्त्रीय मॉडेलिंग नुसार जितके मृत्यु अपेक्षित होते त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक जगभरात आणि भारतात मेले आहेत.

In reply to by कॉमी

sunil kachure 27/05/2022 - 21:20
१)Covid चे चुकीचे निदान २(Covid वर चुकीचे उपचार ३(Covid ची अतिशोक्ती करून सांगितलेली भीती त्या मुळे. जे अनेक रोगांनी त्रस्त होते त्यांना उपचार मिळालेच नाहीत. ४)गल्ली बोलतील डॉक्टर नी प्रॅक्टिस करणे बंद केले होते.हॉस्पिटल मध्ये covid चाच बोलबाला होता त्या मुळे असंख्य आजार नी ग्रस्त असणाऱ्या लोकांना उपचार मिळाले नाहीत. ५)मानसिक दबाव आणि अनामिक भीती हे पण मृत्यूचे कारण होवू शकते. ही अशी बाकी कारणे पण त्या काळात मृत्यू वाढण्यास कारणीभूत होती.

In reply to by sunil kachure

कॉमी 27/05/2022 - 21:37
तुमचे स्वतःचे मत असेल तर तसे स्पष्ट लिहा, नाहीतर सांख्यिकी आधार आणा. तुमचे मत तुमच्यापुरते ठेवा. उगाच परत परत तेच तेच निराधार मत लिहून दुसऱ्यांचे मतपरिवर्तन होत नाही. त्यासाठी आधार द्यावा लागतो.

In reply to by कॉमी

sunil kachure 27/05/2022 - 22:13
तुम्ही तरी कुठे तुमच्या मताला आधार दिला आहे. "सांख्यिकी आधार नुसार Covid काळात मृत्यू वाढले" असे तुम्ही लीहाले आहे पण ते वाढलेले मृत्यू covid मुळेच झाले आहेत ह्याचा काही आधार आहे का? मुळात जगात कोणत्या सरकार नी किंवा विश्वासू संस्थेने त्या बाबत अभ्यास तरी केला आहे का? Who, सोडून बाकी दुसऱ्या कोणत्या ही जागतिक संस्थेचा अभ्यास अहवाल तुमच्या कडे असेल .आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला असेल की covid काळात जे मृत्यू वाढले हे covid मुळेच . तर च ह्या तुमच्या मताला मान्य करायला कोणालाच हरकत नसेल.

In reply to by sunil kachure

sunil kachure 27/05/2022 - 22:20
Covid विषाणू चीन मधील वुहान लॅब मधूनच जगात पसरला . असे खूप लोकांना वाटतें पण who ने ते कधीच मान्य केले नाहीं कारण वुहान लॅब मध्ये कोणकोणत्या देशांची आणि लोकांची भागीदारी आहे ह्या वर चर्चा झाली असती. असे corona विषाणू माणसात कसा आणि कोठे प्रथम संक्रमित झाला ह्या वर. .कोणीच चर्चा करणार नाही. जागतिक मीडिया सर्व फालतू बडबड करेल पण covid चा उगम कुठे झाला. ह्या वर चर्चा सत्र चालवणार नाही.

In reply to by sunil kachure

कॉमी 27/05/2022 - 22:25
मी त्यावर एक संबंध धागा काढला होता त्यावर तुमच्या जुन्या अवतारात तुम्ही ज्ञानकण सुद्धा वाटले आहेत प्रभू. त्यामुळे ते पहा.
Who, सोडून बाकी दुसऱ्या कोणत्या ही जागतिक संस्थेचा अभ्यास अहवाल तुमच्या कडे असेल .आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला असेल की covid काळात जे मृत्यू वाढले हे covid मुळेच .
हायला, WHO सोडून दुसरा स्रोत द्या म्हणे. का ? WHO असं सहजासहजी उडवून लावायला काय गल्लीतले पोरगे आहे काय?आणि तुमच्या कडे काहीही आधार नाही आणि दुसर्याचा आधार, तोही WHO चा उडवून लावत असाल तर तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. (तसाही कधी नसतोच म्हणा.) बरे, WHO ने फक्त माहिती एकत्र केली आहे. त्यांनी काय माहिती तयार केली नाहीये. अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक देशांनी त्यांच्या एक्सेस मोरटालिटीचे आकडे स्वतःहून दिले आहेत. ते स्वतःहून गुगल करून शोधा आणि तपासा आणि मग बोला. आणि मी तुमचे आधार विचारले आहेत, ते विसरू नका.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 30/05/2022 - 09:45
करोंना पेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल इतका धडधडीत असत्य मी गेल्या अनेक दिवसात मिपावर पाहिलेलं नाही यात सत्यापेक्षा पूर्वग्रह आणि एकांगी विचार कितीतरी जास्त आहे.

sunil kachure 27/05/2022 - 13:06
त्यांच्या प्रतिसाद चा दर्जा खूप च लो आहे असे वाचावे. .आणि एडिट करण्याची सुविधा mipa नी उपलब्ध करून द्यावी.

sunil kachure 27/05/2022 - 13:18
आडगी उत्तर देवू नका. यूट्यूब वरील कॉमेंट वाचल्या सारखे वाटते. चीप कॉमेंट यूट्यूब वर खूप असतात.

sunil kachure 27/05/2022 - 13:26
उद्योगात वापरले जाणाऱ्या विविध वायू चे सिलिंडर खाली करून . तो शास्त्रीय रीती नी साफ न करता त्या मध्ये ऑक्सिजन भरून तो तो ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरल्या मुळे. काळी बुरशी ह्या भयानक आजारचे लोक बळी ठरले हे सत्य च असावे. येथील जाणकार लोकांचे काय मत आहे. काळी बुरशी हा भारतात अस्तित्वात असला तरी अगदी दुर्मिळ आजार होता. पण covid काळात भारतात .त्याचे प्रमाण प्रचंड वाढले ह्याचे कारण च . हे दूषित ऑक्सिजन सिलिंडर होते का?

sunil kachure 27/05/2022 - 13:32
ज्याला तिसरी लाट म्हणतात ती दक्षिण आफ्रिकेत सुरू झाली. मीडिया रिपोर्ट नुसार . दक्षिण आफ्रिका नी लगेच जगाला माहिती पण दिली. त्या माहितीचा प्रचंड आक्रमक प्रचार आणि प्रसार सर्व मीडिया नी केला. पण हा ओमिक्रोन चा परावर्तित विषाणू अतिशय सौम्य असून त्या पासून धोका नाही. उलट फायदाच आहे . तो डेल्टा साठी पण प्रतिकार शक्ती निर्माण करत आहे. हे दक्षिण आफ्रिकेतील तज्ञ लोकांच्या मताचा मात्र मीडिया नी प्रचार किंवा प्रसार केला नाही. दक्षिण आफ्रिकेत ज्या वेगात रुग्ण वाढले त्याच वेगात ते कमी पण झाले. जास्त नुकसान न करता. सर्वात कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.

कॉमी 27/05/2022 - 14:25
सूनिल कचूरै ह्यांचा सगळे आडगे प्रतिसाद आहेत. त्यांच्या ह्या प्रतिसाद चा खूप च लो आहे. आडगी उत्तर देवू नका. यूट्यूब वरील कॉमेंट वाचल्या सारखे वाटते. चीप कॉमेंट यूट्यूब वर खूप असतात.

गामा पैलवान 27/05/2022 - 19:59
सुबोध खरे डॉक्टर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
पुस्तके गुप्तपणे वाचायची सवय नाही आणि गरजही नाही.
मग उघडपणे वाचून आणि खरंखोटं का करीत नाही तुम्ही ? २.
असे अनेक लोक मला अनेकदा असून तमुक पुस्तक वाचा आणि अभिप्राय द्या सांगतात.
मी त्या अनेक लोकांमध्ये मोडंत नाही. मी नीतिमत्तेचा महामेरू आहे. मी सांगतो म्हणून वाचा ३.
एकतर मला त्यात रस नाही आणि फुकट घालवायला तितका वेळ ही नाही.
का बरं रस नाही? ते तुमच्याच क्षेत्रातलं पुस्तक आहे. लेखिका सुझान हम्फ्रीझ या नावाजलेल्या व प्रमाणित ( = certified ) मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांना अमेरिकेतल्या मेन ( Maine ) मधल्या रुग्णालयात काम करायचा तसेच रॉबर्ट वूड जॉनसन वैद्यकीय विद्यापीठात सहायक प्राध्यापकीचा अनुभव आहे. त्यांचं कथन तुम्हांस वेळ फुकट घालवणारं वाटतं. हे चर्चच्या मध्ययुगीन बिशपसारखं आहे. बायबलाच्या दोन पुठ्ठ्यांच्या मध्ये जे काही लिहिलंय तेच खरं आहे असा पोपच्या चमच्यांचा अट्टाहास असे. गालिलीयोने केलेले प्रयोग प्रत्यक्षात बघायला रस होता कोणाला? तुम्हीही आलोपाठी मेडिसिनल चर्चचे पादरी झालेले आहात. लशीकरणाला २५०+ वर्षांचा इतिहास आहे आणि तो काळाकुट्ट आहे. पण ते वाचण्यात तुम्हांस रस नाही. आणि बाता कसल्या मारता की म्हणे दुराग्रहांची शांती करता येत नसते. तुम्ही करताय ती एक प्रकारची अरेरावी आहे. जमल्यास ती सोडा. हे लिहितांना मला अजिबात आनंद झालेला नाही. ४.
यात डॉ मनू कोठारी सारख्या के ई एम च्या ऍनाटॉमीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले पुस्तकही होते ज्यात कर्करोग हे एक थोतांड आहे असे लिहिलेले आहे. (दुर्दैवाने डॉ मनू कोठारी हे पुढे कर्करोगाने कैलासवासी झाले हा भाग अलाहिदा)
सध्या विषय करोना व लस हा आहे. पण कर्करोगासंबंधी एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवेन. ५.
बाकी तुमच्या सारखे करोना हे एक षडयंत्र आहे असे बोलणारे अनेक लोक आहेत. मी कुठे प्रत्येकाशी वाद घालत बसू?
वाद घालीत बसण्याची आजिबात गरज नाही. सुझन हम्फ्रीझ यांचं पुस्तक वाचून खरंखोटं केलंत तरी पुरेसं आहे. ६.
आम्ही अमुक तमुक स्वामींच्या अंगाऱ्याने बरे झालो पासून होमिओपॅथी मुले आमचा कर्करोग बरा झाला असे छातीठोक पणे सांगणारे लोक सुद्धा मला भेटत असतात
करोनाची लस काय वेगळी आहे? ७.
आणि करायला काहीही नसेल तर मी छानपैकी झोप काढेन.
लशीकरणाचा इतिहास वाचण्यापेक्षा झोप काढणे तुम्हांस अधिक महत्त्वाचं वाटंत असेल तर लवकर जागे व्हा. असो. एक सांगा मला. करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? तो इतका खतरनाक खरंच आहे का? जर तो इतका घातक आहे, तर मग लोकांना वारंवार चाचणी करून का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय? आणि ते आरटी-पीसीआर खरंच चाचणी आहे का? विकिवर त्यास वर्धनतंत्र म्हणजे amplification technique असं म्हंटलंय. हे चाचणी केंव्हापासनं झालं? ते नेमकं कसली चाचणी करतं? रोगाची लागण ( = clinical infection ) म्हणजे काय? आणि ही लागण या तंत्रामुळे कशीकाय सिद्ध होते? जरा उलगडून सांगणार का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 30/05/2022 - 10:09
करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? फायझर मॉडर्ना च्या लशी या जनुकीय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत. त्याचा जनुकीय उपचारांशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही. या नात्याने सर्व जातीच्या संकरित बियाण्यापासून मिळालेल्या अन्नधान्याचे सेवन म्हणजे पण जनुकीय उपचार होतील. आपला दुराग्रह आणि पूर्वग्रह फार टोकाचा आहे तेंव्हा माझ्या वाक्प्रचारात बदल करून आता असे म्हणावे लागते कि आकाशातील ग्रहांची शांती करता येते पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.

In reply to by गामा पैलवान

एक सांगा मला. करोनावर जनुकोपचार खरंच करावे लागतात का? तो इतका खतरनाक खरंच आहे का? जर तो इतका घातक आहे, तर मग लोकांना वारंवार चाचणी करून का पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय? आणि ते आरटी-पीसीआर खरंच चाचणी आहे का? विकिवर त्यास वर्धनतंत्र म्हणजे amplification technique असं म्हंटलंय. हे चाचणी केंव्हापासनं झालं? ते नेमकं कसली चाचणी करतं? रोगाची लागण ( = clinical infection ) म्हणजे काय? आणि ही लागण या तंत्रामुळे कशीकाय सिद्ध होते? जरा उलगडून सांगणार का?
प्रश्न योग्य आहेत आणि उलगडा झाला पाहिजे. -दिलीप बिरुटे

आज दै.सकाळ पुणे आवृत्तीनुसार करोनाच्या नव्या व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले. सर्व जण गृहविलगीकरणात बरेही झाले. एक नऊ वर्षाचा मुलगा सोडून सर्वांनी कोवीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते त्यात एक बुष्टर डोसवालाही होता, सर्वांना सौम्य लक्षणे होती. सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला. ( कप्पाळ बडवणारी स्मायली) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 29/05/2022 - 14:01
प्राडॉ, अवघ्या एकदीड कोटी लोकसंख्येच्या पुण्यात तब्बल सात रुग्ण आढळले. काय भयाण हाहाकार माजला असेल, नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 30/05/2022 - 10:11
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर्वांनी काळजी घ्या. नाय तर पुन्हा ढोल, ताशे, दिवा-बत्तीचा टास्क पूर्ण करावा लागेल. च्यायला, आयुष्यात लैच पाणचट टास्क पाहावा लागला. ng>आकाशातील ग्रहांची शांती करता येते पूर्वग्रहाची आणि दुराग्रहाची नाही.

sunil kachure 29/05/2022 - 17:43
पोलिओ डोस सारखे प्रतेक घरी जावून प्रतेक व्यक्ती ची covid टेस्ट केली तर किती तरी covid positive सापडतील. अगदी नवीन variant चे पण सापडतील. प्रयोग म्हणून पुण्यातील किंवा कोणत्या ही शहरातील एका भागात हा प्रयोग करावा. आता मित्र झाला आहे corona विषाणू.

गामा पैलवान 30/05/2022 - 13:48
सुबोध खरे डॉक्टर,
फायझर मॉडर्ना च्या लशी या जनुकीय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या आहेत.
करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी एव्हढं प्रगत जनुकीय तंत्र का वापरावं लागतंय? आणि त्या लशीत नेमकं काय द्रव्य आहे? आणि ते करोनाचा नायनाट कसं करतं? की करोना नष्ट न करता फक्त शरीराच्या प्रतिकारयंत्रणेस करोनाची ओळख करवून दिली जाते? याबद्दल चकार शब्द कोणी सांगंत नाही. म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत. कृपया त्यांची शांती करणे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 30/05/2022 - 19:55
करोनासारख्या किरकोळ विषाणूसाठी 6,311,139 हा आजपर्यंतच्या जगभरातील मृत्यूचा आकडा आहे. म्हणूनंच मी पूर्वग्रह बाळगले आहेत. आपल्या पुर्वग्रहांची शांती करणे हि माझी जबाबदारी नाही. ज्याला कुणाला वेळ असेल, हौस असेल आणि न थकता कंटाळता वितंडवाद करण्याची क्षमता असेल तिकडे प्रयत्न करा असे आपल्याला नम्रपणे सांगणे आहे.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 31/05/2022 - 02:04
सुबोध खरे डॉक्टर, ६३,११,१९६ हा फुगवलेला आकडा आहे. करोनासंगे मृत याचा अर्थ करोनामुळे मृत असा नाही. बाकी, लशीमुळे प्रतिपिंड उलटून नेमका विरुद्ध परिणाम कसा साधला जातो यासबंधी इथे एक लेख आहे : https://health.ucdavis.edu/news/headlines/antibodies-mimicking-the-virus-may-explain-long-haul-covid-19-rare-vaccine-side-effects/2021/11 असे प्रकार पूर्वीही घडलेत. त्यास Original Antegenic Sin असं म्हणतात. लशीमुळे मुख्य प्रतिकारयंत्रणेची झालेली मोडतोड असं सामान्य भाषेत म्हणता येईल. सुझान हम्फ्री यांच्या पुस्तकातनं घेतलेला उतारा (पी डी एफ पान २५२ ) :
Before the vaccine era, naturally acquired disease usually provided comprehensive long-term immunity because natural immunity involves a more broad-spectrum response to the entirety of the bacteria and their toxins. Remember that being immune to any degree does not stop the bacteria from flying around and entering the airway. When a naturally immune person reencounters whooping cough bacteria, the body will efficiently respond and clear them from the system. This is not necessarily true of vaccinated people.
करोनाच्या लशीबाबत हे अभ्यास झाले आहेत का? तुम्ही माझ्या समर्पक प्रश्नांना पूर्वग्रह ठरवून बगल देताय हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आ.न., -गा.पै.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 19:59
कचरे बुवा तुमचा टंकणारा मेंदू आणि विचार करणारा मेंदू यात काहीच सामंजस्य नाही याचे कारण काय असेल या प्रश्नाचे उत्तर द्या मग मी गामा पैलवान यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा विचार करेन

कॉमी 30/05/2022 - 14:07
असे प्रश्न सगळ्यांनी, बालवाडीच्या मुलांनी सुद्धा विचारले पाहिजेत. मी कॉमर्स विद्यार्थी आहे. पहिल्यांदा फ्लाईट मध्ये चढत होतो तेव्हा पायलटला १०००००० प्रश्न विचारले. विमान कसे उडते ? कोणत्या धातूपासून बनवले आहे ? इंजिन काम कसे करते ? इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नक्की काय असते ? संदेशवहन कसे होते ? बटणं काम कशी करतात ? पायलट मला म्हणाला हे मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. तुम्ही ११ वी १२ वी फिजिक्स सुद्धा केले नाहीये. मी म्हणलं अहो पण त्याशिवाय मी विमानात कसं बसू ? हे सगळं मला समजावून सांगणे तुमची जबाबदारी आहे. बरं, अधनमधन विमानं क्रॅश होतात कि नाही ? मग मी तुमचे विमान क्रॅश होणार नाही हे तपासायला नको काय, तुम्ही लाख तपासात पण मी पुन्हा तपासणे हे माझे कर्तव्य आहे. तुमची संस्था कितिका मोठी असेना, कितिका लाखो लोकांनी तपासले असेना, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मी व्यक्तिष: तपासणारच आहे. पायलटने सिक्युरिटी बोलवून मला हाकलून लावलं.

In reply to by कॉमी

सुक्या 31/05/2022 - 02:02
ते एयरोडायनॅमिक्स / हाड्रॉलिक्स थोतांड आहे हे नाही सांगितले का? हाड्रॉलिक्स ऑइल वापरण्या ऐवजी पाणी वापरु शकतो पण तमाम विमान कंपण्या मॅकले छाप वागतात व किंमत वाढवण्यासाठी पाण्या ऐवजी ऑइल वापरतात. यावर हाड्रॉलिक्स चे दोन तीन शोध निबंध त्या पायलट्च्या तोंडावर फेकायला पाहिजे होते .. पुढच्या वेळी लक्षात ठेवा ..

In reply to by कॉमी

गामा पैलवान 31/05/2022 - 02:07
कॉमी, विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात. तुमचे प्रश्न मात्र रास्त आहेत, याबाबत शंका नाही. लशीच्या बाबतीत माझे प्रश्न कोणास करू? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे 31/05/2022 - 13:05
विमान आस्थापनाच्या संशोधन ( R & D ) , व्यवहार ( Operations ) इत्यादि विभागांस विचारायचे प्रश्न वैमानिकास विचारायचे नसतात. हायला मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय? आदार पुनावाला किंवा अल्बर्ट बुर्ला याना विचार कि. कशाला उगाच माझ्या मागे लागताय?

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 31/05/2022 - 13:14
मग हे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना कशाला विचारताय? खरे साहेब तुमच्या ह्या प्रतिसाद वर मना पासून हसलो. लस निर्मिती आणि लसी चे शरीरावर अल्प किंवा दीर्घ परिणाम आणि लसी ची शरीरात होणारी रासायनिक अभिक्रिया . आणि त्या मधून मिळणारा रिझल्ट. ह्याच्या डॉक्टर लोकांचा काही संबंध नाही हे गा . मा आणि बाकी लोक पण उत्तम समजतात. मग जे आपले क्षेत्र च नाही त्या लसी चे समर्थन तुम्ही मोठ्या आत्मविश्वास नी का करत होता.

In reply to by sunil kachure

गामा पैलवान 31/05/2022 - 16:55
sunil kachure, मस्त नेम धरलाय तुम्ही. उद्धव ठाकऱ्यांनी डॉक्टरांना काय कळतं असे उद्गार काढले होते. त्याची अशी पुष्टी मिळेलसं कधी वाटलं नव्हतं. आ.न., -गा.पै.

sunil kachure 30/05/2022 - 14:23
वाचा आणि शांत बसा. इथे सर्व शिक्षित आहेत. भौतिक,जीव,रसायन,शास्त्र सर्व लोकांनी उत्तम शिकली आहेत. कोणाला बालवाडी चा विद्यार्थी समजू नका. बकवास करण्या पेक्षा उत्तर ध्या त्यांच्या प्रश्नानं ची.

In reply to by sunil kachure

कॉमी 30/05/2022 - 14:30
गुगल करा- Pfizer vaccine how it works. पहिल्या पानावर CDC, न्यू यॉर्क टाइम्स, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, न्यूझीलंड गव्हर्नमेंट, ऑकलँड युनिव्हर्सिटी न्यूझीलंड ह्यांचे लेख आहेत. नीट वाचा.

In reply to by कॉमी

sunil kachure 30/05/2022 - 14:42
गा. पे नी आणि बाकी लोकांनी पण तो वाचला आहे..तो लेख फक्त तुमच्या साठी नव्हता. तुम्ही एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र बुध्दी चे आहात.. तुमचं मत सांगा. चुकीचे असले किंवा बरोबर असले तरी ते तुमचे मत असेल .ते वाचायला आवडेल.

sunil kachure 30/05/2022 - 14:51
हिंदू स्थान युनिलिव्हर च्या पोर्टल वर गेले की fair and lovely कसा गोरा रंग मनाच्या चेहऱ्याला देते ह्याचे शास्त्रीय समीकरण दिलेली असतात. पण त्या थापा असतात. जाहिरात असते. इतके स्व बुध्दी असणाऱ्या व्यक्ती लं नक्कीच समजते. स्व बुद्धी नसेल तर कोणतेच प्रश्न पडत नाहीत.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 30/05/2022 - 20:05
कचरे बुवा औषध आणि सौंदर्य प्रसाधने यांच्या बद्दल माहिती देण्यासाठी असणारे कायदे, त्यांच्या घटकांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाच्या चाचण्या कशा करायच्या आणि त्या उत्पादन विपणन या वर कोणती नियंत्रणे असावीत याबद्दल चे कायदे आणि त्यावर लावला जाणारा कर ( ५% आणि २८ % वसेक /GST) हे वेगळे आहेत. एकदा हि माहिती करून घातली असती तर फायझरची लस आणि फेअर अँड लव्हली सारखे गोरे करणारे सौंदर्य प्रसाधन याची तुलना केली नसतीत

sunil kachure 31/05/2022 - 13:01
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://api.nationalgeographic.com/distribution/public/amp/science/article/a-rare-black-fungus-is-infecting-many-of-indias-covid-19-patientswhy&ved=2ahUKEwiM4euhmon4AhXk7TgGHYbiBLMQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3W4N0TBtCuhxcU_Ggc6y5k काळी बुरशी निर्माण होणें हा अत्यंत दुर्मिळ आजार covid काळात मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक लोकांना डोळे गमवावे लागले,जबड्यात दोष निर्माण झाला .आणि मृत्यू पण झाले. पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. मीडिया तर काळी बुरशी मधील( का ) हा शब्द पण वापरायला कच घाईल. Covid वर उपचार करताना स्टरोईड चा अतिरिक्त वापर ह्या मुळे हा काळी बुरशी हा दुर्मिळ आजार भारतात वाढला असे निष्कर्ष आहेत. बाकी कारणे पण आहेत च. पण कोणी चुकून पण काही बोलणार नाही ह्या विषयात. वर लिंक दिली आहे. वाचण्याची तसदी घ्यावी.

सुबोध खरे 31/05/2022 - 13:12
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. हे तुमचे अगोदरचे वाक्य काहीही माहिती न घेता टंकलेलं त्यावर मी प्रतिसाद दिला होता ब्लॅक फंगस अनादी काला पासून भारतात आहे सर्वत्र पसरलेली आहे. तुमच्या पावावर किंवा मुरंब्यावर येणारी बुरशी आहे ती. आणि आता पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. हे भंपक वाक्य टंकलंय

sunil kachure 31/05/2022 - 13:29
ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार

sunil kachure 31/05/2022 - 13:29
ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार

sunil kachure 31/05/2022 - 14:04
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.washingtonpost.com/world/2021/05/11/india-covid-black-fungus/&ved=2ahUKEwjSvemJqIn4AhXa7DgGHY3EBYgQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3kxXTw9Ee0Fcz-XQK_OoFM पूर्ण जग covid काळात ब्लॅक fungus ह्या बुरशीचे माणसाला का इन्फेक्शन झाले ह्याची कारणे समजून घेत आहेत.चुका मान्य करत आहेत. पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. अजब देशाची गजब कहाणी.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 31/05/2022 - 18:48
पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. आपण कुठेही काहीही न वाचता केवल टंकन करताय म्हणून भारतीय डॉक्टर कुठे आणि किती याबद्दल चर्चा करतात याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. म्हणून हे भंपक वाक्य टंकलंय. उचलला हात आणि बडवला कळफलक

गामा पैलवान 31/05/2022 - 16:57
लोकहो, स्पेनमध्ये लशीकरणाची खोटी प्रमाणपत्रे देणारे घपलाजाळे पकडले. उच्चभ्रू लोकांना खरी लस टोचून घायची नाहीच्चे मुळी. का ते मी सांगायला हवंच का? संबंधित बातमी ( इंग्रजी दुवे ) : १. https://libertyrising.substack.com/p/over-2000-high-profile-spanish-paid २. https://www.euronews.com/2022/01/25/spain-arrests-seven-suspects-for-selling-fake-covid-certificates-in-eu हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ? गूगळण्यासाठी : https://www.google.co.uk/search?q=%22operation+jenner%22+spain आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ?
पैसेवाले ( उदा. टॉम क्रूज ) अत्यंत निर्बुद्ध गोष्टींच्या (उदा. चर्च ऑफ सायंटॉलॉजी ) मागे लागतात हा काय शहाणपणा असतो का? लशीने जीवनमरणाची सीमा कशी अधोरेखित होते हे मी माझ्या काकांच्या कोविड निधनाने आणि काकूंच्या वाचण्याने फार जवळून पाहिले आहे. कितीही तर्क लढवले तरी, अगदी लस हा प्लासिबो उपचार असून प्लासिबो म्हणूनच जीवनदायिनी आहे असे जरी १०० टक्के सिद्ध झाले तरी मी तिचे महत्त्व अजिबात अमान्य करणार नाही. सर सलामत तो लशी पचास म्हणून लशीही पचवू. आपला विनीत, हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गामा पैलवान 11/06/2022 - 14:12
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुम्ही म्हणता तसं त्यांना आपण महामूर्ख समजून चालू. त्या यादीत फार्मा-मार या स्पेनमधल्या औषध आस्थापनाचा अध्यक्ष ( फार्मा कंपनीचा प्रेसिडेंट ) आहे. त्याचं नाव जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो. औषध आस्थापनाच्या अध्यक्षाचा औषधावर विश्वास नाही आणि लोकांना टोचायला निघालेत. जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो किती नावाजलेला आहे ते इथे वाचायला मिळेल ( इंग्रजी लेख ) : https://247newsaroundtheworld.com/trending/was-dr-sousa-faro-arrested-for-fake-vaccination-charges/ आ.न., -गा.पै.

आशु जोग 03/06/2022 - 00:55
गामा पैलवान आणि दिलीप बिरुटे यांचे प्रतिसाद आवडले. बाकी थोतांड असलेल्या रोगाची अंधश्रद्धा जपण्याचा सध्याचे डॉक्टर लोक किती प्रयत्न करीत असतात ते आता दिसते आहे. डॉक्टरां इतके रोगावर कुणाचे प्रेम असणार ?

कॉमी 03/06/2022 - 09:36
थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये वाढत आहेत. बहुतेक रात्री कुलूप फोडून डॉक्टर आत घुसत असणार आणि रात्रीतून लोकांवर औषधांचा भडिमार करत असणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह येणार.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 03/06/2022 - 19:03
कुठे लोकांशी वितंडवाद घालत बसताय? People will always believe what they want to believe. This is due to the fact that people wish to create their own truths; anything but the truth that's real. My creed is simple: Let them! Their beliefs don't alter your truth. Moreover, your attempt at altering them won't do any good for you.”

In reply to by कॉमी

गामा पैलवान 04/06/2022 - 11:47
कॉमी, अंगात करोना सापडलेले लोकं करोनाचे रुग्ण खरोखरीच आहेत का? क्लिनिकल इन्फेक्शन म्हणजे काय? आणि ते पी.सी.आर तंत्राच्या सहाय्याने कसं निश्चित करता येतं? आ.न., -गा.पै.

In reply to by सुक्या

sunil kachure 05/06/2022 - 13:03
मुख्यमंत्री साहेबांची सूचना पाळणे हे तुमचे कर्तव्य च आहेत.संजय साहेब राज्य सरकार चे निर्णय सांगत अस्तात त्यांचे पण ऐकावे लागेल. महाराष्ट्र मध्ये आता वास्तव्य करत नसाल तर इतक्या विषयात लक्ष देवू नये .

In reply to by sunil kachure

सुक्या 05/06/2022 - 14:33
साहेब, मी महाराष्ट्रात राहतो की नाही हा मुद्दा गैरलागु आहे. मामु म्हणतात मास्क लावा .. तुम्ही म्हणतात मामु जे बोलतात ते करा. आता हा तुमचा प्रतीसाद बघा .. यात तुम्ही म्हणता आहात की कितीही काळजी घ्या हा रोग होणार. तसेच निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. मग मी काळजी घेउन का आजारी पडु? (http://misalpav.com/comment/1141360#comment-1141360) आता मामु म्हणतात काळजी घ्या .. तुम्ही म्हणता काळजी घेउ नका .. मग कोण खरे बॉ? एकतर मामु खोटे बोलत आहेत किंवा तुम्ही .. काय करावे ब्र? आडाण्याला मार्गदर्शन करावे .. उपकार होतील.

In reply to by सुक्या

गामा पैलवान 05/06/2022 - 14:09
हाहाहा, तोंडास डायपर लावून आत्तापर्यंत कोणता रोग बरा झाला आहे? की कुठली साथ आटोक्यात आलीये? &‌#129318;&‌#8205;&‌#9794; -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुक्या 05/06/2022 - 14:35
गा मा .. डायपर ?? जरा अती होतय. (तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास)

In reply to by सुक्या

गामा पैलवान 05/06/2022 - 18:50
सुक्या, मी नाही हो, लोकंच असं म्हणताहेत : https://www.google.co.uk/search?q=%22face+diapers%22 बाळाला कसा डायपर घालतात, तसा सरकारला जनतामुखास लंगोट नेसवायचाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चित्रगुप्त 05/06/2022 - 20:00
हे अमेरिकन पण काय काय धंदे शोढून काढतील... हा टीशर्ट २३ डॉलरात विकला जातो आहे (म्हणे) खखोदेजा. . आणि खानावळीवर बोर्ड लावले जात आहेत (म्हणे) .

In reply to by सुक्या

>> तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास थकले नाही हो, कॉमन सेन्स नसणार्यांशी कोण प्रतीवाद करत बसणार ? बाकी गामा आणि त्यांच्या प्रश्नांवरुन मला जुदाई मधला परेश रावल आठवला!

In reply to by उन्मेष दिक्षीत

सुक्या 14/06/2022 - 04:24
गामा ज्याचा आधार देउन "फेस डायपर" वगेरे बोलत आहेत ... ते फ्लोरिडा मधले एक हॉटेल आहे. तेव्ह्डे एकच. जौ दे. आपण का भुगा करायचा डोक्याचा!! बाकी परेश रावल - चे प्रश्न म्हणजे खरच नमुने होते . . . ... :-)

In reply to by सुक्या

गामा पैलवान 15/06/2022 - 17:10
सुक्या, इथे उत्तर आयर्लंडाविषयी ब्रिटीश सरकारने एक अहवाल प्रकाशित केला आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.gov.uk/government/publications/education-recovery-in-early-years-providers-spring-2022/education-recovery-in-early-years-providers-spring-2022 वरील पानावर जाऊन कृपया Impact on children यावर सर्च मारणे. त्या परिच्छेदात करोना निर्बंधांचे ( टाळेबंदी, मुखलंगोट, इत्यादि) अर्भक व लहान मुलांवरील दुष्परिणाम नोंदवलेले आहेत. करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चित्रगुप्त 15/06/2022 - 22:06
करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे.
लगे रहो गापैभाई. असे एकदम वरीजनल - हटके - टोकाचे विचार करणारे, अभ्यास करणारे आणि त्यानुसार मते मांडणारे लोक समाजात असणे अत्यंत गरजेचे आणि समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आणि उपयोगी असते हे मानवी इतिहासात वारंवार दिसून आलेले आहे. मानवी संस्कृतीचा गाडा पुढे पुढे ओढून नेण्यात अशा व्यक्तींचाही मोलाचा वाटा असतो. तस्मात लगे रहो आणि आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचा अविष्कार करत नवनवे विचार मांडते रहो. 'थोतांडोपचार' हा शब्द प्रचंड आवडल्या गेला आहे.

In reply to by गामा पैलवान

सुक्या 15/06/2022 - 22:29
आता तुम्ही गोल पोस्ट बदलताय !! आधी मास्क मुळे कुठलाही साथ रोग बरा झाला नाही .. सबब मुखपट्टी ची गरज नाही हा तुमचा मुद्दा होता. आता तुम्ही मुखपट्टी/टाळेबंदी मुळे लहान मुलांवर काय परीणाम झाला यावर आला आहात. नेहेमीचेच आहे ते, नवीन काही नाही. असो. मुद्याकडे येउ या. या कोरोना च्या साथीमुळे जगात अगदी सगळीकडे सोशल / ईमोशनल / शैक्षणीक बाबतीत प्रभाव पडला आहे हे खरे आहे. ह्युमन इंटर्‍याक्षन मुलांच्या बाबतीत अगदी गरजेचे आहे हे नक्की. पण शैक्षणीक नुकसान जरा जास्त झाले आहे. तरी बर्‍याच ठीकानी (यात भारत ही आला) ऑनलाईन क्लास घेतले गेले. यात शिक्षकांबरोबर पालकांचीही जबाब्दारी तितकीच होती. आपला पाल्य काय शिकतो आहे. त्याला समजते आहे की नाही हे पाहण्याची जबाब्दारी त्यांची पण होती. जगात लागलेल्या टाळेबंदी मुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान झाले हे मात्र खरे आहे. दुसरा मुद्दा मुखपट्टी मुळे २ वर्षे वयाच्या मुलांवर झालेला परीणाम. खरे तर लोक मुखपट्टी बाहेर वापरत होते. घरात नाही. त्यामुळे मुले बोलताना त्यांना ओठांची हालचाल बघताच आली नाही हा मुद्दा गैर्लागु आहे. तो डे-केयर मधे जाणार्‍या मुलांच्या बाबतीत खरा जरी असला तरी मुले घरी आई - बापाला पाहुन / त्यांच्या शी बोलुन भाषा शिकतात हे ही तितकेच खरे आहे. बाकी लस / थोतांड यावर आपला पास.

विवेकपटाईत 13/06/2022 - 17:08
सुबोध खरे यांच्या प्रतिसाद करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल इतका धडधडीत असत्य मी गेल्या अनेक दिवसात मिपावर पाहिलेलं नाही यात सत्यापेक्षा पूर्वग्रह आणि एकांगी विचार कितीतरी जास्त आहे. साहेब तुम्ही गूगल सर्च करा किंवा त्या औषधींच्या साईट वर ही तपासू शकता. प्रोटोकॉल मधील औषधींचे वाईट परिणाम 1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. त्यातले एक ही औषध करोंना विषाणू वर प्रभावी नव्हते हे विशेष. बाकी काही औषधे प्रोटोकॉल मधून बाहेर ही झाली. पण त्यांनी किती हजार कोटींचा धंधा केला हे ही माहिती असेल. मला खोटे म्हंटले तरी काही फरक पडत नाही. करोंना सोबत चुकीची औषधी दिली नसती तर मरण्याचे प्रमाण कमी झाले असते. जी औषधी डॉक्टरांना वाचवू शकत नव्हती ती रुग्णांना वाचवेल यावर विचार .... आपले आणि रुग्णांचे प्राण वाचविण्यासाहती अधिकान्श डॉक्टर या काळात काढा इत्यादि आयुर्वेदिक औषधी घेत होते आणि रुग्णांना ही देणे सुरू केले होते (प्रोटोकॉल मध्ये नसतानाही) यात दिल्लीतले अधिकान्श मोठी हॉस्पिटल्स होती. बाकी औषधी ही फक्त औषधी असतात. पैथी या आधारावर भेदभाव करणे मूर्खता असते. त्यामुळे आयएमए ह्या संस्थेवर ही प्रश्न चिन्ह आहेत.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 13/06/2022 - 18:36
1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. या सर्व गोष्टी करोनाच्या विषाणू चा थेट प्रभावामुळे होत असत हे हि डॉक्टरांना माहिती आहे. या शिवाय डेक्सामेथासोन या औषधामुळे सुद्धा रक्तातील साखर वाढते हे डॉक्टरांना माहिती आहेच परंतु डेक्सामेथासोन या औषधामुळे ३३% अधिक लोकांचे जीव वाचलेले आहेत हे अनेक चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. बाकी रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब हि औषधे बहुतांशी निरुपयोगीच ठरली यातही संशय नाही त्यात औषधी कंपन्यांनी भरपूर पैसा केला हेही सत्य आहे परंतु

करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य

आहे यात मुळी सुद्धा शंका नाही

In reply to by सुबोध खरे

सुक्या 14/06/2022 - 04:34
ह्या सगळ्या बाबतीत आपली हर्ड मेंटॅलिटी कारणीभुत आहे. रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब ही औषधे मला वाटते फक्त भारतात दिली जात होती. ईतर ठिकाणाची मला कल्पना नाही. किंवा त्या कंटेंट ची ईतर औषधे असावीत. पण भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. तीच बाब व्हॅकसीन ची. सुरुवातीला कुणीच व्हॅकसीन घ्यायला तयार नव्हते. मग अचानक सगळे केंद्रावर गर्दी करु लागले .. मग आमदार / खासदार यांच्या चिठ्या घेउन लोग व्हॅकसीन शोधत बसले. काळ्या बाजारातुन व्हॅकसीन विकत घ्यायला लागले ... जशी लाट ओसरली तशी ही केंद्रे परत रिकामी झाली. आता पुन्हा केसेस वाढत आहेत .. काही दिवसांनी परत लोक बुस्टर घ्यायला विना मास्क गर्दी करतील .. मग परत सरकार च्या नावाने शिमगा .. की सरकार काहीच करत नाही ते ..

In reply to by सुक्या

सुबोध खरे 14/06/2022 - 12:15
भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. साथ ज्यावेळेस आपल्या शिखरावर होती त्यावेळेस एक टोकाचा उपाय म्हणून सर्व रुग्णांवर स्टिरॉइडचा वापर झाला हि वस्तुस्थिती. कारण डेक्सामेथासोन हे एकच औषध कोव्हीड मध्ये गुणकारी आहे हे सिद्ध झाले आहे. अनेक वेळेस रेमडेसीव्हिर देऊन फायदा होत नाही हे डॉक्टरांना माहिती होते तरी रुग्णांच्या दबावाखाली ते दिले गेले. तसेच एक शेवटचा उपाय म्हणून डेक्सामेथासोन हेही दिले गेले आणि त्यामुळे निदान ३० % रुग्णा चे प्राण वाचले हि वस्तुस्थिती.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 15/06/2022 - 12:23
सुबोध खरे डॉक्टर, या ३० % प्रमाणाचा काही स्रोत आहे का? बाकी, करोनावर उपचार म्हणून आयव्हरमेक्टिन या औषधाची चर्चा का होत नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure 14/06/2022 - 13:01
कारोना व्हायरस नवीन आहे .त्या बाबत काही माहीत नाही. जणू पृथ्वी ची निर्मिती झाल्या नंतर करोडो वर्षांनी 2020 मध्येच जा व्हायरस पृथ्वी वर अस्तित्वात आला. Corona virus नवीन आहे ,ओळखीचा नाही असे छाती बडवून जग भरात सर्व डॉक्टर आणि संशोधक सांगत होते. Dr हा घटक आरोग्य विभागात सर्वात घालचा घटक आहे हे माझे मत परत इथे व्यक्त करतो. पण संशोधक पण नवीन आहे नवीन आहे हेच सांगत होते. आणि dr खरे दावा करत आहेत. Covid मुळे. किडनी ,लिव्हर, वर परिणाम होतो हे dr ना माहीत होते. Good जोक. व्हायरस नवीन आहे ह्या दव्यानंतर फक्त प्रयोग केले गेले आणि उपचार मुळेच लोक मेली. व्हायरस नी मेली नाहीत. ज्यांनी उपचार घेतले नाहीत ते वाचले.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे 14/06/2022 - 19:32
कचरे बुवा आपला पगार किती? आपण बोलता किती? सार्स (SARS) किंवा मर्स(MERS) हे पण कोव्हीड सारखेच करोना जातीचेच विषाणू आहेत आणि त्यामुळे पण माणसांना रोग होऊन सार्स मुळे ७५० च्या वर माणसे मेलेली आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus https://en.wikipedia.org/wiki/2002%E2%80%932004_SARS_outbreak मर्स(MERS) हा उंटांना होणार रोग माणसात पसरला आणि मध्यपूर्वेत त्याची साथ आली होती https://www.who.int/health-topics/middle-east-respiratory-syndrome-coronavirus-mers#tab=tab_1 त्यामुळे करोना विषाणू शरीरावर कुठे परिणाम करतात याची थोडी फार माहिती डॉक्टरना होतीच. फक्त कॉव्हिडची साथ एखाद्या वावटळीसारखी आली त्यामुळे जगभरची आरोग्यव्यवस्था कोलमडली. बाकी तुम्हाला काही सांगणे हे पालथ्या घड्यावर नव्हे तर फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. कुठूनही टाका ते बाहेरच जाणार

In reply to by उन्मेष दिक्षीत

sunil kachure 14/06/2022 - 21:26
१)प्रतिसाद पहिला. किडनी,लिव्हर वर corona विषाणू परिणाम करतो हे dr ना माहीत होते. २)मी प्रतिवाद केल्यानंतर . प्रतिसाद २) मार्स ,sars मुळे dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होतो हे थोडेफार माहीत होते..इथे थोडेफार हा शब्द महत्वाचा आहे. आजुन कोणी प्रतिवाद केला तर dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होत असावा असा संशय होता. अशी पलटी खरे साहेब मारतील.

In reply to by सुबोध खरे

विवेकपटाईत 16/06/2022 - 09:41
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य खरे साहेब करोंना वर उगाच दोष देण्यात अर्थ नाही. ही लिंक बघून खात्री करा Common Side Effects Anemia (low number of red blood cells) Fever Kidney damage Hypotension (low blood pressure) Nausea Vomiting Increased liver enzymes https://www.bing.com/search?q=side+effects+of+remdesivir&filters=dtbk:%22MCFkcl92MV9zaWRlX2VmZmVjdHMhZHJfdjFfc2lkZV9lZmZlY3RzIWJiZTQyNmFlLWIxYjMtN2MzMi1mZjE0LWRiNjRjZWE3Y2E1Mw%3d%3d%22&FORM=DEPNAV बाकी तुम्ही औषधांच्या साईट वर जाऊन खात्री करू शकतात. तुम्ही १०० असत्य म्हंटले तरी सत्य बदलणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे 16/06/2022 - 10:11
you get a skin rash that may include itchy, red, swollen, blistered or peeling skin you're wheezing you get tightness in the chest or throat you have trouble breathing or talking your mouth, face, lips, tongue or throat start swelling You could be having a serious allergic reaction and may need immediate treatment in hospital. https://www.nhs.uk/medicines/paracetamol-for-adults/ Paracetamol overdose is one of the leading causes of acute liver failure. https://britishlivertrust.org.uk/researchers-shed-new-light-paracetamol-causes-liver-damage/#:~:text=Paracetamol%20overdose%20is%20one%20of%20the%20leading%20causes%20of%20acute%20liver%20failure,-Posted%20on%3A%201st&text=Paracetamol%20overdose%20is%20one%20of%20the%20leading%20causes%20of%20liver,of%20poisoning%20has%20eluded%20them. आपण रोज घेत असलेल्या क्रोसीन किंवा पॅरासिटामॉल या औषधाचे आहेत जे औषध गरोदर पणात सुद्धा सुरक्षित समजले जाते म्हणून क्रोसीन मुळे रोगापेक्षा जास्त त्रास होतो म्हटल्यासारखे आहे. रेम डेसी व्हिरला साईड इफेक्टस आहेत म्हणून त्याने कोव्हीड रोगापेक्षा जास्त लोक मेले असे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे.

sunil kachure 14/06/2022 - 13:15
दलाल. मीडिया आणि बाकी बरेच. ह्यांनी बोंब नाही मारली तर 4th कथित corona लाट आली कधी आणि गेली कधी हे पण माहीत पडणार नाही. पण दलाल बेंबी च्या देटपासून बोंब ठोकणार . दलाली मिळाली पाहिजे ना.

गामा पैलवान 15/06/2022 - 12:26
सुबोध खरे डॉक्टर,
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य
त्याचं काय आहे की मृताच्या अंगात करोना सापडला तर तो ३० दिवसांनीही करोनाचा मृत्यू म्हणूनच धरायचा. भले क्लिनिकल इन्फेक्शन नसलं तरीही. मात्र करोनाची लस टोचून घेतल्यावर आठवड्यात मृत्यू झाला तरीही तो लशीमुळे झालेला मृत्यू धरायचा नाही. या दुटप्पी निकषांमुळे लसमृत्यू दडपले गेले आहेत आणि करोनामृत्यू फुगवले गेले आहेत. आ.न., -गा.पै.