Skip to main content

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 05/06/2021 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....


वाचने 71340
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

बुधवारी देशात corona नी मरण पावलेल्या लोकांची संख्या आहे ६१४८ ही संख्या अचानक का वाढली.देशभरात corona बाधित आणि corona ni मृत्यु पावणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असताना अचानक मृत्यू का वाढले . कोर्टाने कानाखाली जाळ काढल्या मुळे बिहार सरकार नी पहिल्याच वेळेस खरी आकडेवारी जाहीर केली त्या मुळे अचानक corona ni मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढली. एकट्या बिहार मध्ये गेल्या २४ तासात .५४२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. काही राज्य corona बाधित लोकांची संख्या आणि मृत्यू लपवत आहेत हे ओरडून तज्ञ सांगत आहेत त्यांच्या कडे साफ दुर्लक्ष करून आपलाच अजेंडा भक्त पुढे रेटत आहेत. फक्त बिहार नीच कोर्टाच्या दणक्याने खरी माहिती पहिल्यांदाच दिली यूपी नी खरी माहिती दिली तर आकडा खूप भयानक असेल. त्या पुढे महाराष्ट्र आणि केरळ मधील आकडेवारी अत्यंत किरकोळ असेल.

In reply to by Rajesh188

जे बिहार ने काल केलं ते महाराष्ट्र सरकार गेले 15-20 दिवस करतय, मराठी वर्तमानपत्रे आणि news चॅनेल्स वरती महाराष्ट्रातील दैनंदिन करोना बळींची संख्या कमी असते परंतु त्याचवेळी mygov.in आणि covid19india.org मात्र राज्यातील बळींची संख्या ही जास्त असते. कदाचित काही मृत्युची दखल त्यावेळी घेतली जात नसेल परंतु नंतर ते दाखवले जात असतील.

ग्रामीण भागात,दुर्गम भागात लोकांना corona म्हणजे काय हे माहीतच नाही.अगदी प्राथमिक आरोग्य सुविधा पण तिथे अस्तित्वात नाही,बोगस डॉक्टर हीच त्यांची आरोग्य सुविधा .अशा भागात ना टेस्ट झाल्या असतील ना मृत्यूचे कारण शोधले गेले असेल. मागास राज्यात तर भीषण अवस्था असेल. त्या मुळे च सरकारी आकडेवारी ही खरी नसावी असाच अंदाज आहे.आणि त्या मध्ये राज्य सरकार चा कल च दुर्लक्ष करणे ,लपवणे ह्याच्या कडे आहे.

प्रतेक राज्यात असणारे प्रती व्यक्ती सरकारी डॉक्टर्स. प्रति राज्य असणारे सरकारी चालू स्थिती मधील दवाखाने. प्रति राज्य covid सेंटर ची संख्या. प्रति राज्य आरोग्य सुविधा ची अवस्था. प्रति राज्य आरोग्य सुविधेवर होणार खर्च. प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब. प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब ची शमाता आणि लोकसंख्या ह्याचे गुणोत्तर. अशा अनेक घटकांचा विचार करावा लागेल.

In reply to by Rajesh188

हि आकडेवारी काढुन त्याचे कोष्टक इथे प्रकाशित करुन सकल मि.पा.स उपक्रुत करावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना.