Skip to main content

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 07/05/2021 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल... https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sa… -------- तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered… ------------- साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या ..... ----------- कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ... खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....

वाचने 58167
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

गोव्यांत मेडिकल तुरीसम जोरांत आहे कारण इंग्लंड आणि कानडा मधील लोक तिथल्या "फुकट" पण प्रचंड ताण असलेल्या सिस्टम ला कंटाळून गोव्यांत येऊन अपोलो मध्ये शास्त्रकिर्या करून मोकळे होतात. प्लेन चे तिकीट आणि पंचतारांकित हॉटेल मध्ये राहून सुद्धा हे सर्व स्वस्तांत पडते..

In reply to by साहना

माझा अनुभव वेगळा आहे. सिस्टिम पूर्णपणे socialist नाही. युरोप मध्ये --> - तुम्हाला पेन्शन आहे - तुम्हाला healthcare फुकट आहे - तुम्हाला schooling जवळपास फ्री आहे - sick leaves अनलिमिटेड आहेत . - वर्षा ला ३०-४० फ्री पेड leaves - taxation high आहे - रिटायरमेंट चे वय जास्ती आहे - healthcare मध्ये wait पिरियड जास्त आहे माझ्या मते जेव्हा मी एकटा राहत होतो तेव्हा अमेरिकन सिस्टिम बेटर वाटत होतं . आता फॅमिली सोबत आणि मुलं झाल्यावर खूप कमी खर्चं येतो . मला तर फक्त घरभाडे हाच एक मोठा खर्च आहे . बाकी स्कूल , बायको मी आणि मुलाचं मेडिकल खर्च निल . स्कूल निल. लायब्ररी निल . माझा मुलगा जर बिमार असेल तर मला फ्री सुट्टी मिळते . जर माझा हाथ मोडला तर मला फ्री मेडिकल आणि फुल सॅलरी मिळते .... रिटायरमेंट नंतर पेन्शन असल्यामुळे खूप सेविंग्स नाही करावी लागत . जर सेविंग नसेल तरी चालतं ....

In reply to by निपा

जर्मनीत ६ आठवडे म्हणजे ३० ऑस्ट्रेल्यात ४ आठवडेम्हणजे २० दिवस ( एकाच ठिकाणी १० वर्षे काम केल्यावर लॉन्ग सर्वी लिव्ह मम्हणून २ महिने पगारी राजा मिळते ) अमेरिकेत सुरवातीला तरी २ आठवडे म्हणजे १० दिवस ( ५ दिवसांचा आठवडा, आठवड्याचे ३

In reply to by साहना

फ्रांस च माहीत नाही पण जर्मनी बद्दल मात्र असा दावा करणे उचित होणार नाही - जर्मनी तील तांत्रिक क्षेत्रातील एक एक कंपन्या पहा .. मी हे जर्मन वयसायात काम करून तिथे जाऊन आल्यावर बोलतोय.... जर्मनी येवंध्या सुटीया देऊन सुद्धा जगभरात उत्तम दर्जाचाच माल पुरवते अर्थात "सुट्टी देणे आणि ती मागणे म्हणजे जणू कम्युनिस्ट असणे "अशी काही आपली समजूत असेल तर बोलणं खुंटल हा ऑस्ट्रेलियात बद्दल म्हणत असाल तर थोडी गोष्ट वेगळी हे मान्य...येथे कोणतीही गोष्ट बनवणे अतिशय महाग आहे तरीपण एकूण शोध लावण्यात हा छोटा देश बऱ्यापकी नाव मकावून आहे .. आणि कष्ट करून २५० वर्षात एक चांगला देश उभा केला आहे .

In reply to by चौकस२१२

फ्रान्स मध्ये आल्मोस्ट प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आहेत ... - ऑटोमोबाईल - IT - Aviation - बँकिंग - रिटेल - कापड / फॅशन ग्लोबल ५०० इंडेक्स मध्ये फ्रान्स च्या ३०-३५ कंपन्या आहेत. मी स्वतः फ्रान्स मध्ये काम केले आहे आणि प्रोडूक्टिव्हिटी काही वेगळी नाही ...

In reply to by साहना

माझ्या अनुभवात असे होत नाही . बरेचदा संसर्गजन्य आजार असताना सुद्धा लोक ऑफिस मध्ये येऊन बाकीच्यांना रिस्क मध्ये टाकतात. हे काही युरोप मध्ये होताना मी बघितलं नाही . उलट जर अश्या सुट्ट्या नसतील तर बिमारू लोकं कामावर येऊन स्वतःच आणि दुसऱ्याचं पण नुकसान करतात.

In reply to by निपा

हो मुले आणि फॅमिली असल्यावर कॅनडियन सिस्टम नक्कीच चांगली आहे कारण आपल्या फॅमिलीच्या आरोग्याचा खर्च इतर लोकांवर ढकलला जातो. त्यामुळे माझ्या ओळखीचे अनेक लोक वय झाल्यानंतर कॅनडा/युरोप मध्ये स्थायिक होतात. सुट्टी हा वेगळा विषय आहे. जबरदस्तीने सुट्टी देण्याची सक्ती केली कि त्या कंपनीची कार्यक्षमता आपोपाप कमी होते आणि त्यामुळे एकूण नफा, पगार इत्यादी कमी होतात. काही समाजांना हि पद्धत आवडते पण त्यामुळेच बे एरिया सारख्या भागाकडे स्पर्धा करण्याची त्यांची क्षमता राहत नाही .

In reply to by साहना

कारण आपल्या फॅमिलीच्या आरोग्याचा खर्च इतर लोकांवर ढकलला जातो. हा सिनिकल (दोषैकदृष्टीचा) पद्धतीचा विचार झाला माफ करा पण आपण हे विसरत आहात कि ज्या पाश्चिमात्य देशात अशी सोशालिस्ट + भांडवलषयी याचे मिश्रण आहे तिथे आयकर पण माणूस भरपूर भरतो... आणि मग अश्या सुविधा चा लाभ वेळ पडली तर घेऊ शकतो ... तेव्हा सर्व फक्त एका चष्म्यातून पाहू नका ... आता हा समतोल कसा साधायचा त्यात मतभेद असू शकतात नॉर्वे ते नु झीलंड यात फरक आहे .. अमेरिकेतील एक पद्धत आहे त्यात फायदे तोटे दोन्ही आहेत ना पण म्हणून तीच योग्य असे होत नाही (आणि हे सर्व आपण पाश्चिमात्य देशांबद्दलच बॊलतोय त्यामुळे येथे इंडोनेशिया किंवा मेक्सिओ चे उदाहरण नाहीये घेत आहोत ) जबरदस्तीने सुट्टी देण्याची सक्ती केली कि त्या कंपनीची कार्यक्षमता आपोपाप कमी होते हो? मग जर्मनीतून आणि फ्रांस आणि अगदी आळशी समजल्या जाणाऱ्या इटली तुन जागतिक दर्जाची कशी हो काय उत्पादने निर्माण होतात? सांगाल ? बर जाता जाता एक जुना विनोद प्रॉडक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला आवडेल प्रश्न : " ऑस्ट्रेल्यात जर गाडी खरेदी कार्याची असेल ( म्हणजे ऑस्ट्रेल्यात बनलेली* ) तर खात्री करून घ्या कि ती शुक्रवारी किंवा सोमवारी बनलेली नसेल का? उत्तर कारण शुक्रवारी औझी येणारी वीकएंड चा विचार करीत असतो आणि सोमवारी गेलेल्या वीकएंड चा विचार करीत असतो... तेव्हा या दोन्ही दिवशी गाडी कशी बनेल सांगता येत नाही ... * असो सांगण्यास अतिशय दुःखच होते कि सुरवातीला फोर्ड , होल्डन ( स्थानिक ) टोयोटा , मिटूसुबीशी या गाड्या येथे बनायच्या .. आत फक्त आयत केली जाते ... बहुतेक हि प्रॉडक्टिव्हिटी असावी कारणीभूत किंवा कम्युनिस्ट विचारसरणीची ४ आठवडे सुट्टी !!! जेवहा शेवटी फोर्ड ने प्राण सोडला तेव्हा खात्री पटली कि माझ्यासारख्याला भोसरी, नाशिक, गुरगाव , चीन, जर्मनी अश्या ठिकाणी जास्त वाव आहे ! माझा एक मित्र बॉश ऑसस्ट्रेलीया मध्ये काम करितो.. येथे बॉश ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट उतपादनात आहे ... स्थानिक धंदा बसला तरी त्यांचा धंदा चालू होता खास करून यूरोपातील कंपन्यांसाठी... मी त्याला विचारले कि काय रे ऑस्ट्रेल्यात हे असे सगळे महाग मग तुमचा धंदा कसा काय चालतो ... तो म्हणाला - सगळे काही फक्त ताशी दरावर नसते - - यूरोपातील कंपन्यांना ऑस्ट्रेलियात असे काम देणे ( दर्जाचे डिझाईन चे काम ) आवडते कारण - स्थिर असा नोकर वर्ग - स्थिर इकॉनॉमी आणि स्पष्ट वयहार - चांगलं शिकलेले लोक - युरोप सारखीच साधारण तांत्रिक पद्धत मग थोडे पैसे जास्त असले तरी हरकत नाही आणि प्रॉक्टीव्हिटी हि तशी वाईट नाही ( सांगकामे पणा कमी, हो सर हो जायेगा असे सगळे म्हणत नाहीत ) असो प्रॉडक्टिव्हिटी हा एक खास विषय आहे .... मी काही त्यातील तन्य नाही पण उदाहरण देतो - आशियायीव पद्धत ते सुद्धा भांडवलशी सिंगापुर मध्ये किंवा चीन : जेवयची सुट्टी १ तास , त्यामुळे संध्यकाळी घरी उशिरा जाणे - ऑस्ट्रेलियातील पद्धत : जेवयची सुट्टी १/२ तास . लवकर काम संपवा आणि घरी जा .. कुटुंब बरोबर वेळ घालवा - आशियायीव पद्धत : साहेब जो पर्यंत घरी जात नाही तो पर्यंत हाताखालचे लोक घरी जात नाहीत .. मग प्रॉक्टीव्हिटी वाढते कि कमी होते..

"तथाकथीत" महाराष्ट्रद्रोह्यांच्या लिस्ट मध्ये अ‍ॅडवायला अजुन एक नाव मिळाले... लिंक

In reply to by श्रीगुरुजी

सोनोवाल नक्कीच चांगले नेते आहेत. त्याप्रमाणे हिमंत बिस्व सर्मा हे एक चांगले स्ट्रॅटेजिस्ट आहेत आणि सोनोवालांइतकेच लोकप्रियही आहेत. सी.ए.ए प्रकरणानंतरची आसामातील परिस्थिती त्यांनी कौशल्याने सांभाळली. सोनोवाल २०११ मध्ये भाजपत आले तर सर्मा २०१५ मध्ये. त्यामुळे मागच्या वेळेस सोनोवालांचा दावा नक्कीच वरचढ होता. पण एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत त्याप्रमाणे दोघांनाही राज्यात ठेवणे धोकादायक होईल असे नेहमी वाटायचे. कारण सर्मा सुध्दा महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद होऊन नवी डोकेदुखी व्हायला नको. आता सर्मांना मुख्यमंत्री केल्यानंतर सोनोवालांना केंद्रात चांगले मंत्रीपद द्यायला हवे असे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोनोवाल बऱ्यापैकी कार्यक्षम मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा केंद्रात करून घेतला पाहिजे.

माझा अनुभव वेगळा आहे. सिस्टिम पूर्णपणे socialist नाही. युरोप मध्ये --> - तुम्हाला पेन्शन आहे - तुम्हाला healthcare फुकट आहे - तुम्हाला schooling जवळपास फ्री आहे - sick leaves अनलिमिटेड आहेत . - वर्षा ला ३०-४० फ्री पेड leaves - taxation high आहे - रिटायरमेंट चे वय जास्ती आहे - healthcare मध्ये wait पिरियड जास्त आहे माझ्या मते जेव्हा मी एकटा राहत होतो तेव्हा अमेरिकन सिस्टिम बेटर वाटत होतं . आता फॅमिली सोबत आणि मुलं झाल्यावर खूप कमी खर्चं येतो . मला तर फक्त घरभाडे हाच एक मोठा खर्च आहे . बाकी स्कूल , बायको मी आणि मुलाचं मेडिकल खर्च निल . स्कूल निल. लायब्ररी निल . माझा मुलगा जर बिमार असेल तर मला फ्री सुट्टी मिळते . जर माझा हाथ मोडला तर मला फ्री मेडिकल आणि फुल सॅलरी मिळते .... रिटायरमेंट नंतर पेन्शन असल्यामुळे खूप सेविंग्स नाही करावी लागत . जर सेविंग नसेल तरी चालतं ....

पाकिस्तानी कलाकारांवरील निर्बंध हटवले? झी थिएटरच्या नवीन मालिकेत माहिरा खान ---------- https://maharashtratimes.com/entertainment/pakistan-actress-mahira-khan… ------------ भारतातील कलाकारांकडे टॅलेंट नाही आहे का? पैसा भारतीयांचा आणि पोसायचे पाकिस्तानी कलाकारांना... साधू हत्याकांड झाले, तेंव्हा एका तरी पाकिस्तानी कलाकाराने निषेध व्यक्त केला का? किंवा आत्ता करोनाच्या काळात काही आर्थिक मदत तरी दिली का? अर्थात, उदारमतवादी हिंदूंना तरी किती समजावून सांगणार?

अखेर पाकिस्ताननं मान्य केलंच! “कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा”, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं स्पष्ट! -------------- https://www.loksatta.com/desh-videsh-news/article-370-pakistan-foreign-… -------- म्हणूनच भाजप हवा .... 70 वर्षांत कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, भाजप शिवाय पर्याय नाही....

In reply to by मुक्त विहारि

70 वर्षांत कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, भाजप शिवाय पर्याय नाही.... हे खरचं... पण भाजपाने त्यानादात पुन्हा पुढिल ७०वर्ष देखील सुधारणे जमणार नाही अशा चुका करणे टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे. अन्यथा चायना आणी भारताच्या नगरीकांचे भवीश्यातील हाल तितकेच समान असतील.

पाकिस्तानी कलाकारांवरील निर्बंध हे काय महाराष्ट्र सरकारने हटवले काय ? असतील सुध्दा महाराष्ट्र सरकारद्वेष्टे हे सुध्दा सिध्द करतील. काहि दिवस झी थिएटरच्या मालकांनी चालवलेले झी न्युज हे चॅनेल पहा. रोज ७० वर्षाचा हिशोब मांडतात. या झी ग्रुपचे मालक रोज ७० वर्षाचा हिशोब मांडतात, भारतातील कॉग्रेस पक्ष व कॉग्रेस पक्ष समर्थक देशाचा पैसा कसा लुटतात याचे विश्लेषण करतात, आणि झी ग्रुपचे मालक कसे गळ्यापर्यंत रुतले आहेत (किती वर्षे रुतले आहेत) हे पध्दतशीरपणे झाकतात. झी न्युज काय करते, रोज ७० वर्षाचा हिशोब मांडते आणि स्वताचे कर्ज पुढे ढकलते. सब गंदा है पर धंदा है ये...... चंदिगढच्या भा़जपा खासदार किरण खेर मॅडम आठवतात का ? त्याच त्या खासदार मॅडमनी मेंबर ऑफ पार्लामेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट (MPLADS) निधीतुन १ कोटि दान दिले हा मेंबर ऑफ पार्लामेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट (MPLADS) निधी जनतेच्या करातुन व सरकारच्या कमाईतुन बनतो, खासदारांच्या खिशातील पैशातुन बनत नाही. या भा़जपा खासदार किरण खेर मॅडम अभिनयातुन पैसा कमवतात (एक कमाइ स्त्रोत आहे). पण या भा़जपा खासदार किरण खेर मॅडम पाकिस्तानी सिरीयलच्या सुत्रधार आहेत. या पाकिस्तानी सिरीयलच्या प्रशंसक आहेत. https://www.india.com/entertainment/zee-launches-new-channel-zindagi-wi… (या लिंकवर किरण खेर यांच्या सहभागाचा ऊल्लेख आहे शोधाल तर सापडेल.) ही लिंक पहा यात उल्लेख आहे कि भा़जपा खासदार किरण खेर मॅडम पाकिस्तानी सिरीयलच्या सुत्रधार आहेत . सुत्रधार म्हणजे या भा़जपा खासदार किरण खेर मॅडम पाकिस्तानी सिरीयल भारतीय चॅनेलवरुन प्रसारीत होत असताना पाकिस्तानी सिरीयल भारतीय जनतेला समजावुन सांगत असत. मस्त आहे ना भाजपा समर्थक अनुपम खेर कॉग्रेस पक्षाचा ७० वर्षाचा हिशोब मांडतात कॉग्रेसला शिव्या देतात आणि अनुपम खेर यांच्या भाजपा खासदार पत्नी पाकिस्तानी सिरीयलची प्रशंसा आणि जाहिरात करुन पैसे कमवतात. हा विरोधाभास नाही हे अंधभक्त पुन्हा सिध्द करतील. यात देशाचे हित कसे हे पण सिध्द करतील. माहिरा खानचा फायदा सोडा आधी किरण खेर आणि अनुपम खेरचा फायदा शोधा

In reply to by लिओ

किरण खेरने जो काही निधी दिलाय तो जनतेसाठीच दिलाय ना? संसदेच्या ७८६ खासदारांपैकी किती जणांनी निधी दिलाय? काही आमदार एक महिन्याचा पगार देणार आहेत म्हणे. हि सुद्धा जनतेने भरलेल्या कराच्या पैशातूनच आहे ना? जिंदगी ही वाहिनी २०१७ मध्येच बंद झाली आहे. झी गटाचे पाकिस्तानप्रेम बरेच जुने आहे. २००५ मध्येच झीने सारेगमप किंवा तत्सम कार्यक्रमात दोन पाकड्यांना संधी दिली होती. सध्या ते ही वाहिनी पुन्हा सुरू न करता झी५ या नावाने ओटीटी वर पुन्हा येण्याच्या प्रयत्नात आहेत.

In reply to by आग्या१९९०

अदनान सामीचा पूर्वोतिहास - सामी २००१ पासून मुंबईत भारतीय व्हिसा घेऊन रहात होता. त्याच्या पाकिस्तानी पारपत्राची मुदत २०१० मध्येच संपली होती व पाकिस्तानने त्याच्या पारपत्राचे नूतनीकरण केले नव्हते. वास्तविक त्याच्या पारपत्राची मुदत संपण्याच्या आतच त्याला भारतातून घालवून देणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन सरकारच्या आवडत्या देशातील आवडत्या पंथाचा तो असल्याने त्याला येथेच राहून दिले. २०१३ मध्ये त्याचा वास्तव्याचा व्हिसा संपल्यानंतर सुद्धा त्याने व्हिसाची मुदत वाढविण्यासाठी अर्ज न करता तसाच रहात होता. हे कायद्याचे उल्लंघन होते. म्हणजे २०१३ मध्ये ना त्याच्याकडे अधिकृत पारपत्र होते ना वास्तव्याचा परवाना होता ना भारताचे नागरिकत्व होते. परंतु तो निवांत मुंबईत रहात होता. सिंगापूरमध्ये वास्तव्याची मुदत संपल्यानंतर १ अधिक दिवस जरी वास्तव्य केले तरी ताबडतोब तुरूंगात टाकतात. इतर अनेक देशांमध्ये मुदत संपल्यानंतर वास्तव्य केले तरी किमान शिक्षा डीपोर्टेशन आहे व नंतर देशात येण्यावर कायमची बंदी घातली जाते. माझ्या एका सहकाऱ्याने अमेरिकेत काही महिने असे वास्तव्य केल्याने त्याच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी कायमची बंदी आहे. २०१३ मध्ये सामीच्या वास्तव्याची मुदत संपल्यानंतर त्याला हाकलण्याऐवजी मुंबईचे पोलिस आयुक्त शिंत्रे स्वतः त्याच्या घरी गेले होते व त्याला व्हिसा नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. अर्थात यात रालोआ सरकार सुद्धा मागे नाही. त्यांच्या काळातच २०१५ मध्ये सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. बनाना रिपब्लिक मध्ये वेगळे काय होते? भारतीय नागरिकत्व नसतानाही रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय मुंबईत ८ सदनिका खरेदी केल्याने २०१९ मध्ये सामीला ५० लाख रुपये दंड झाला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अन्यथा अशा प्राण्याला कीमान मोदी सरकारच्या काळात तरी बाहेरचा रस्ता दाखवायला पाहीजे होता. २०१३ मध्ये सामीच्या वास्तव्याची मुदत संपल्यानंतर त्याला हाकलण्याऐवजी मुंबईचे पोलिस आयुक्त शिंत्रे स्वतः त्याच्या घरी गेले होते व त्याला व्हिसा नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. अर्थात यात रालोआ सरकार सुद्धा मागे नाही. त्यांच्या काळातच २०१५ मध्ये सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. धिस इज रेडीक्ल्युलॉस

In reply to by गॉडजिला

यूपीए सरकारने चूक केली असेल, परंतू हिंदूंच्या नाकावर टिच्चून शत्रू देशातील गायकाला हिंदुत्ववादी पक्ष भारताचे नागरिकत्व देतो, तरीही येथील हिंदू एकत्र येऊन त्याच पक्षाला बहुमताने केंद्रात निवडून देतो आणि बंगालमध्ये कांगावा करतोय आम्हाला मारतात म्हणून.

In reply to by आग्या१९९०

यूपीए सरकारने चूक केली असेल हायला तुम्ही चक्क मान्य करताय? आज सूर्य कुठे उगवलाय?

In reply to by सुबोध खरे

आज सूर्य कुठेही उगवला तरी नागरीकांसमोरील अंधार तसाच राहील जर चूक मान्य करायचं शहाणपण इतर पक्ष दाखवणार नाहीत.

In reply to by सुबोध खरे

सध्याच्या केंद्र सरकारने अदनानला भारतीय नागरीकत्व का दिले ह्याचे उत्तर द्या. सूर्य योग्य दिशेलाच उगवतो, वाळूत डोके खूपसून बसत नाही.

In reply to by आग्या१९९०

पाकिस्तानात कट्टर मुसलमानांकडून छळ होत असेल तर कोणत्याही धर्माचा नागरिक भारतात आश्रय घेऊ शकला पाहिजे. धर्मधारीत नागरिकत्व कशाला हवे?

In reply to by आनन्दा

पाकिस्तानी मुस्लिमांनी भांडूण भारताचा तुकडा पाडला की, अत्ता त्यांच्यावर तिथे अत्याचार होत असेल तर परत भारतामध्ये आश्रय कशाला द्यायचा? पाकिस्तानी हिंदूंना मात्र आश्रय दिला पाहिजे. कारण त्यांना भारत सोडून कुठलाच देश जवळ करणार नाही.

In reply to by आग्या१९९०

ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी. बादवे, अदनान Anglo-pakistani आहे.

In reply to by आग्या१९९०

बादवे, अदनान Anglo-pakistani आहे. घातले शेपूट. इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा!

In reply to by आग्या१९९०

घातले शेपूट. इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा! नेहमीप्रमाणेच घातलं शेपूट. हे खाली लिहिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. नेहरू-राजीव गांधी-नरसिंहरावांनी पाकड्यांना नागरिकत्व दिले तर डोळे, कान, तोंड वगैरे पंचेंद्रिये बंद करून झोपेचं सोंग घेणे आणि इतरांनी दिले तर बेंबीच्या देठापासून कांगावा! ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी.

In reply to by श्रीगुरुजी

नेहरू नरसिंह रावांचे निर्णय तुम्हाला योग्य वाटतात का ? नसतील तर मोदींनी केल्यावर लगेच नेहरू आणि नरसिंह रावांचा दाखल देण्यात काय मतलब आहे ? त्याउलट तुम्हीच सद्य घटनेकडे नेहरूंचे नाव काढून दुर्लक्ष करता आहात असे वाटते.

In reply to by आग्या१९९०

प्रतिसादातील तथ्यांकडे अपेक्षित दुर्लक्ष. आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते कार्टं, हेच दिसून येतं.

In reply to by श्रीगुरुजी

आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते कार्टं, हेच दिसून येतं. ठिक आहे तुमचाही पप्पूच. पप्पू पप्पू पप्पू.

In reply to by आग्या१९९०

पप्पू चांगला का वाईट हे ठरवा आधी. हे म्हणजे पप्पूने केलेल्या राफेल आरोपांसारखं झालं. एकीकडे म्हणायचं की बोफोर्स दलाली प्रकरणात केले गेलेले आरोप खोटे होते आणि दुसरीकडे म्हणायचं की राफेल घोटाळा म्हणजे भाजपचे बोफोर्स आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते तुम्ही ठरवायचं आहे पप्पू चांगला की वाईट. दोन्ही अपत्ये आपलीच आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारताचे नागरिकत्व देऊन तत्परतेने "भारतरत्न" दिले जाते. इथले कलाकार पाकिस्तानात जाण्याच्या लायकीचे. तरीही आम्ही येथे हिंदूंचे संघटन करणार. तोंड करी बाता... जाऊ दे सगळाच गोंधळ आहे.

In reply to by लिओ

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम मिळू नये असे मला काय गरजेचे वाटत नाही. द्यायचे तर द्या, जे बघायचे ते बघतील. नक्की काय प्रॉब्लेम आहे पाकिस्तानी कलाकारांसोबत ? मुक्ताविहारी यांनी "पाकिस्तानी कलाकारांनी साधू हत्याकांडाचा निषेध केला नाही" असा तर्कशुन्य मुद्दा मांडला आहे, हसूच आले. मुवि जी, कोणी कोणी निषेध केला आणि केला नाही अश्या सगळ्या घटनांना कव्हर करणारे आणि सगळ्या सेलेब्रिटींना कव्हर करणारे पुस्तक किंवा साईट आहे काय ? असेल तर सांगा, म्हणजे ख्रिस्तोफर नोलन, तारांटिनो, बच्चन वैगेरे लोकांनी कुठेकुठे कशाकशाचा निषेध केला हे बघून त्यांचा सिनेमा बघायचा कि नाही ठरवता येईल.

In reply to by कॉमी

आपल्या साठी जे अतिरेकी आहेत ते पाकिस्तानी जनते साठी हिरो आहेत, समजा पाकिस्तानी कलाकार भारतात आले, करोडो नाही तर कमीत कमी लाखों मध्ये कमवून गेले आणि तिकडे जाऊन त्यांचा हिरो लोकांना म्हणजेच आपल्या साठी अतिरेकी असलेल्या लोकांना दान केले तर मग नुकसान कोणाचे होणार? मुळात पाकिस्तान हे आपले शत्रू राष्ट्र आहे, पाकिस्तानी जनते साठी तुमच्या मनात राग नसेल तर तो तुमच्या पुरता ठीक आहे परंतु पाकिस्तानी कलाकारांना आर्थिक फायदा तो पण भारतीय जनते कडून नको व्हायला.

In reply to by रात्रीचे चांदणे

फार फेच्ड आहे. अतिरेक्यांना पैसे देण्यासाठी फक्त फिल्म स्टार लागतात काय ? पाकिस्तानचे फिल्मस्टार भारतातून जे कमावतात ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत नगण्यच असणार आहे. हे झाले तर ते होईल वैगेरे ने काय वाट्टेल ते आर्ग्युमेन्ट करता येतील. पण इथे काय तर्क दिसत नाही. कुठल्या भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकाराने आतंकवाद्यांना पैसे दिल्याचे उदाहरण आहे ? मला बुवा आली जफर जबर आवडतो, अतिफ अस्लमची गाणी आवडतात. भारतीय निर्माते सुद्धा पाकिस्तानात चिक्कार पैसे कमावतात.

In reply to by कॉमी

विषय कलाकारांचा आहे म्हणून मी कलाकारांचे उदाहरण दिल, पाकिस्तानि लोकांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा होईल अशी कुठलीही गोष्ट भारताने केली नाही पाहिजे. कुठल्या भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकाराने आतंकवाद्यांना पैसे दिल्याचे उदाहरण आहे अतिरेकी तर आपल्या साठी आहेत, त्यांच्या साठी ते हिरोच आहेत. पाकिस्तानी कलाकार कुठे दान करतेत हे आपल्याला कस माहिती. खुदद पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये आहे. भारताचं जाऊ द्या UN designated कितीतरी अतिरेकी पाकिस्तान मध्ये उजळ माथ्याने फिरत असतात, आणि अशा देशातील कलाकारांसाठी आपण कशाला पायघड्या पसरायच्या.

In reply to by रात्रीचे चांदणे

पाकड्यांना भारतात काम देऊन पैसे देणे म्हणजे पाकिस्तानची म्हणजे पर्यायाने अतिरेक्यांची अर्थव्यवस्था बळकट करणे. भारताने पाकिस्तानबरोबरील राजनैतिक संबंध तोडले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

अँग्लो पाकिस्तानी असले नागरिकत्व दिले की चालते आणि पूर्ण पाकिस्तानी असले की (नागरिकत्व जाऊदे, आपल्या गुणधर्मांमुळे मिळणारे कामसुद्धा) द्यायचे नाही, हे फारच arbitrary निर्णय आहेत तुमचे.

In reply to by कॉमी

13 May 2021 - 3:08 pm | श्रीगुरुजी माझा सर्वात पहिला प्रतिसाद वाचा. तुम्हीच पारायणे करत बसा त्याची. अदनानला नागरिकत्व, पद्मश्री. त्याचे पिताश्री काय करत होते १९६५ मध्ये पाकिस्तानात?

कानडा आणि अमेरिका ह्यांची तुलना सुद्धा शक्य नाही कारण साधे आहे लोकसंख्या बघा ! कानडा ३० मिलियन , ऑस्ट्रेलिया २६ आणि अमेरिका ३०० + आणि युके ६० + एकवेळ ऑस्ट्रेलिया आणि कानडा ची तुलना होऊ शकते .. त्यामुळे प्रतेक्य देशाची पद्धत वेगळी.... त्यामुळे प्रतेक् पद्धतीत काही तरी "भिकार" असणार आणि काही तरी उत्तम सरसकट सगळेच "भिकार" असे म्हणणे योग्य होत नाही याशिवाय अमेरिकेतील या शेतररातील शोध आणि त्याचा फायदा प्रथम अमेरिकेला च होतो साहजिक आहे .. मी जेव्हा जेवहा वैद्यकीय उपकरणात काम केल्या तेव्हा तेव्हा कंपनी चा हाच उद्देश कि आधी अमेरिकन एफडीए नंतर योरीपण आणि मग जपान आणि मग ऑस्ट्र्रेल्यान .. कारण बाजारपेठच तशी आहे ) असो व्यद्यकीय सेवेकडे वळूयात कानडा युके मध्ये अरोयोग्य सेवेत ज्या त्रुटी आहेत ( इलेक्टिव्ह सर्जरी साठी खूप वेळ थांबावे लागणे इत्यादी ) तशाच काही ऑस्ट्रेलीयत आहेत आणि भारतीय स्तहलन्तिरात यावर नेहमीच अशी चर्चा चालू असते .. जसे भारतात किंवा साहनाजी म्हणतात तसे अमेरिकेत स्पेशालिस्ट ला पटकन भेटतात येते पण ऑस्ट्रेलियात येत नाही हि एक नेहमीची तक्रार असते या मागे कारण मला असे वाटते कि " भारतीयांना पैसे असले तर पटकन सेवा मिळते " याची " सवय " झाली आहे त्यामुळे तसे तिथे करता येते, येथे तसे करता येत नाही म्हणून चिडचिड ( पैसा फेको तमाशा देखो, पैसा नसला तर रस्त्यावर ) कानडा चे माहित नाही पण आयस्ट्रियातील काही चांगले आणि वाईट दोन्हही मांडतो येथे खांजागी आणि सरकारी असे मिश्रण आहे ( कदाचित अमेरिकेतील भांडवलशाही चे एक टोक एक टोक आणि यूरोपातील सोशॅलिस्टांचे चे दुसरे बघून येथे जरा मध्यम मार्ग अवलंबला असावा ) - डॉक्तरांना खाजगी सेवा देण्याची पूर्ण मुभा आहे , याशिवाय खाजगी इस्पितळे हि आहेत - जनरल प्रॅक्टिशनर हा खाजगीच असतो सरकार दोन गोष्टी करते , जि पी आणि इतर सर्व विवाद्यकीय सेवांचे दरपत्रक आहे , समजा तुमचाच जि पी भेटीसाठी ६० डॉलर आकारात असेल तर मेडिकरे त्यातील ३३ तुम्हाला देते .. काही डॉक्टर ३३ मध्येच भागवतात .. - मेडिकेअर साठी उत्पन्नाच्या साधारण १ ते दि ड टक्के मेडिकेअर लेवी भरावी लागते - खाजगी मेडिकल इन्शुरन्स आहे आणि तो लोकांनी घ्यावा म्हणून सरकार त्यासाठी सवलत देते अमेरिकेत जे ऐकले आहे कि नोकरी गेली कि मेडिकल इन्शुरन्स गेला तसे येथे नाही , मेडिकल इन्शुर्सने पाहिजे तर तुम्ही तुमचाच स्वतःचाच घ्याचा असतो नोकरी शी संबंध नाही - नोकरी वर इजा झाली तर सरकार तुम्हाला काही रक्कम देते या "सिस्टीमम" मध्ये त्रुटी नाहीत असे अजिबात नाही , एकीकडे आपत्कालीन सेवा आणि बाळंतिणीची सेवा उत्तम , जवळ जवळ सर्व पॅथोलोजी/ रेडिओलॉजि फुकट आहे ( खाजगी ठिकाणी करणे आणि सरकार जो दर देते त्यात ते भागते ) आहे बरयाच औषधांवर सरकार सूट देते तर दुसरी कडे इलेक्टिव्ह सर्जरी ला फार वेळ लागतो .. दत्तचीकीत्सा पूर्ण खाजगी आहे आणि त्याला ना सरकार मदत करते ना विमा ! त्यामुळे "सरसकट भिकार" संबोधने हे चुकीचे ठरेल .. अमेरिकेतील "सिस्टीम" चे पण वाभाडे काढता येतील ... आम्रिकेतील मिपाकर यावर पण प्रकाश टाकतील अशी अपेक्षा करतो .. तोपर्यंत अमेरिकेतील सिस्टीम "भिकार आहेच" असे मि तरी म्हणणार नाही

In reply to by चौकस२१२

भारतीयांना वाट बघण्याची सवय नाही . हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे . सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे अशक्य . गर्भधारणे पासून तर डिलिव्हरी पर्यंत डॉक्टर ची गरज लागत नाही पण भारतात फ़क्त गायनॉकॉलॉजिस्ट लागतेच . आम्ही इथे फुकट IVF केली आहे पण गरिबांना भारतात मिळते का हे ऑपशन ? किंवा अमेरिकेत ?

In reply to by निपा

सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे अशक्य .
हे देश किती पण सुधारलेले असोत आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा डंका पिटत असोत पण जर मी डॉक्टर कडे केव्हा जायचे हे दुसरे कोणी ठरविणार असेल तर मग कठीण आहे.

In reply to by धर्मराजमुटके

नाही . general practitioner (डॉक्टर) ठरवतो कि तुम्हाला स्पेसिऍलिस्ट ला रेफेर करायचे कि नाही . बरेचदा आपण डॉक्टर ला पुश करू शकतो . व्यक्ती स्वत्रंतयाचा इथे संबंध नाही .

In reply to by निपा

तरीही हे unfair नाही का? मला कोणत्या डॉक्टर ला भेटायचे आहे हे ठरवणारा तो कोण? समजा मला डॉ अबक ला भेटायचे आहे, आणि जीपी ने मला डॉ यझ ला भेटायला सांगितले तर मग काय करायचे?

In reply to by आनन्दा

मेडिकल सल्लागार आणि सोयी यांच्या तुटवड्यामुळे हा इन्कनविनियन्स आहे. हे unfair वाटले, आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे असे वाटले, तरी, ज्यांना कधीही आरोग्य सेवा परवडणार नाहीत त्यांना सुद्धा ह्या सेवा ह्या व्यवस्थेत मिळतात. बायपास सर्जरी ते कॅन्सर उपचार- सगळे मिळते. पैसे नाहीत म्हणून कोणी उपचारांविना राहत नाही. हे माझ्या मते फार महत्वाचे आहे. प्रत्येक समाजात, मग तो कॅपिटालिस्ट असो वा सोशलिस्ट, व्यक्तिस्वातंत्र्यावर एका प्रमाणात, कमी किंवा जास्त, बंधने असतातच. त्यामुळे, व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने असावीत का, हा प्रश्न नसतोच, तर किती असावीत हा प्रश्न असतो. माझ्या मते इथे end justifies the means a thousand times over. जेव्हा तुटवडा दूर होण्याइतपत तांत्रिक प्रगती होईल, तेव्हा हा इन्कन्व्हिनियन्स काढण्यासाठी प्रयत्न होतील.

In reply to by आनन्दा

कुठल्याही व्याधी साठी तुम्ही डॉक्टर कडे जाता . तोच डॉक्टर तुम्हाला स्पेसिऍलिस्ट कडे रेफेर करतो . तो डॉक्टर पूर्णपणे तुमच्या साठी काम करत असतो . फॅमिली डॉक्टर म्हणा . बहुतेक वेळी तोच /तीच डॉक्टर तुम्हाला particular व्याधी च्या स्पेसिऍलिस्ट कडे पाठवते . आपल्या कडे पण असेच होते . तुम्ही हा G P बदलू शकता . पण specialist हे लोक faceless असतात . म्हणजे हार्ट specialist कोण असेल ते आपल्याला ठरवता येत नाही. भारतात आपण हे स्वतः ठरवू शकतो . पण तुमच्यावर same quality चे उपचार होतात .

In reply to by आनन्दा

आनन्दा तुमची समजूत चुकीची आहे जि पी जेवहा तुम्हाला स्पेशालिस्ट ला भेट असे सुचवतो तेवहा तो १-२ नावांची शिफारस करतो... आणि त्यातूनही तुम्ही तुमच्या आवडीचा स्पेशालिस्ट पाहिजे असल्यास तुम्ही विचारू शकता बाकी निपा म्हणाले ते बरोबर आहे आणि पुढे यांनी पण छान वीवेचन केले आहे

In reply to by चौकस२१२

मी वरील विधान ऑस्ट्रेलियातील पद्धती बद्दल केले आहे युके नाही .. येथे जि पी आणि स्पेशालिस्ट हे दोन्हीही खाजगी असतात , कधी कधी स्पेशालिस्ट हा सरकारी रुग्न्यालयातील असू शकतो हा तेव्हा मात्र जो असतो तो .. हे खरे एकूणच संपूर्ण खाजगी किंवा संपूर्ण सरकारी अशी दोन टोके ना गाठता मध्य गाठता येऊ शकतो ..

In reply to by धर्मराजमुटके

जर मी डॉक्टर कडे केव्हा जायचे हे दुसरे कोणी ठरविणार अहो कोण म्हणलं कि हे दुसरे कोणीतरी ठरवते? रोतूम्हीच ठरवता कि कधी डॉक्टर कडे जायचे ते तेथील यंत्रणेची नक्की माहिती आहे का? हा आटा ऑस्ट्रएल्यात स्पेशालिस्ट कडे जाण्यासाठी आधी गेनेरळ प्रॅक्टिशनर शी सल्ला मसलत करावी लागते ते खरे आहे पण गैर काय त्यात !

https://www.loksatta.com/mumbai-news/maha-vikas-aghadi-government-focus… ---------------- या यादीत आता विजयकु मार गौतम यांची भर पडली. गौतम हे राष्ट्रकू ल क्रीडा घोटाळ्यातील आरोपी असून, निवृत्तीच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिलला त्यांना केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने गौतम यांना चौकशीसाठी नोटीस बजावली. तरीही त्यांची फे रनियुक्ती झाल्याने राज्य सरकारच्या भूमिके विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. -----------

In reply to by मुक्त विहारि

राज्य सरकार म्हणजे सगळंच प्रश्नचिन्ह आहे. सचीन वाझे प्रकरण आठवलं !

In reply to by चौथा कोनाडा

ह्या सरकार बद्दल चांगले बोलावे.... आणि ह्या सगळ्या बातम्या लिखित स्वरूपात आहेत. वर्तमान पत्रात येतात, त्याच आहेत....

“तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ.... ------------ https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-mla-ranjit-kamble-dh… ------------ काय बोलावं, ते सुचेना.....