खुप दिवसांनी काथ्याकुटा करावासा वाटातोय म्हणुन म्हंटलं धागाच काढावा.
मला सांगा तुम्हा सर्वांना रोजची आंघोळ नाही झाली तर काहीतरी चुकल्याचुकल्यासरखं किंवा कसंतरीच वाटंतं का?
मला रोजंच पुजाअर्चा करायचीच असतेच असं नाही म्हणजे मी कधी कधी एकदम देवभक्त बनतो आणि चांगलं शुचिर्भुत झाल्यावर मन लावुन पुजा करतो. प्रसन्न वाटतं. तर कधी कधी आठवडाभर करतही नाही. मन का राजा.
पण आंघोळ ही रोज केलीच पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. रोज आपली आन्हिकं वेळच्या वेळी झाली पाहिजे म्हणजे आटोपलं की झालं.
घामामुळे किंवा सकाळी शौचास जावुन आलो तर आता शुचिर्भुत व्हावे असे वाटाते म्हणुनही वाटत असेल पण आपण आंघोळ करतो.
पण काही कारणाने जर का उशिर झाला म्हणजे संध्याकाळ पर्यंत कं नीच्या कामात अडकलो किंवा पालिकेने काही कारणास्तव पाणी पुरवठा बंद केला आणि घरातले पाणी संपले तर आंघोळ तशीच राहते अशा वेळी "अरे रे आज आपण आंघोळ नाही केली म्हणुन काहीतरी मनासारखं नाही झालं असं वाटत राहते". तुम्हाला तसे जाणावते का?
कधी कधी आठवड्यातुन एक दोनदा घराची झाडालोट , साफसफाई करतो म्हणौन जरा उशिरा होतो तेव्हा चालते कारण अंग घामाजलेले असते म्हणुन करावी लागतेच.
पण एरव्ही माझा काटाक्ष असतो की रोज सकाळीच आपली आन्हिक उरकले की दिवसभर काही कसला तणाव नाही.
आणि एकदा वेळ टळली की संध्याकळी कंटाळा येतो आणि आंघोळ राहिली म्हणुन पण मनावर तणाव येतो जास्त नाही पण हलका.
तुम्हाला काय वाटते तुम्ही रोजच न चुकता आंघोळ करता का?
वर्गीकरण
वाचने
3210
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सवयीचा भाग असल्याने असे होते.
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे.
हाच लेख शोधत होतो.