राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत.
दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे.
मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते.
मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.
वाचने
37309
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
कच देनी मार देली खिचके तमाचा.
In reply to हिहीही by शा वि कु
कच देनी मार देली खिचके तमाचा.
In reply to हिहीही by शा वि कु
हम्म
हे योग्य विश्लेशण!
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
केजरीवाल यांच्या यशात श्री
केजरीवाल यांच्या यशात श्री
In reply to केजरीवाल यांच्या यशात श्री by सुबोध खरे
एकंदरित केजरीवलांचा विजय
In reply to केजरीवाल यांच्या यशात श्री by दुर्गविहारी
मनोवृत्तीत फरक
टंकलेखन करताना