Skip to main content

मिसळपाव मध्ये आपले विचार व्यक्त करण्याचा हक्क आहे का

स्वामि १ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
माझे या आधीचे चर्चेचे विषय मला कुठलाही पुर्व सुचना न देता वगळले गेले. ह्या चे काय कारण असु शकते
शब्दानुज

असे चार अोळीचे धागे काढणे मिपा धोरणात बसत नाही. संपादक मंडळाला असे धागे उडवण्याचा अधिकार आहे. नवे लेखन चर्चा येथे टिचकी मारल्यास (क्लिक केल्यावर) जे समोर येते ते पुर्ण वाचा.धागा थोडा मोठा काढा त्याची पार्श्वभूमी लिहा आपले म्हणणे व्यवस्थित मांडा. असे केल्यास धागा उडवला जाणार नाही.
08/04/2019 - 22:55 Permalink
स्वामि १

In reply to by शब्दानुज

पुढील वेळेस योग्य रीतीने लिहीन. महाराष्ट्रात रोज काहीतरी घडामोडी होतच असतात. रोज चर्चेसाठी विषय पाढवला तर चालेल का?
09/04/2019 - 08:35 Permalink
पाषाणभेद

In reply to by स्वामि १

तुमच्याच. पंतप्रधान बेरोजगार लिखाई योजनेत नाव नोंदवलेले आहे काय? नसल्यास त्वरीत नोंदणी करा. अन तुम्ही ज्या विषयावर लिहीत आहात तर मग कच्या मालाला कमतरता नाही आणि तुम्ही फारच चांगला दिवसाचा रोज पाडाल. समोर वर्तमानपत्र ठेवले की काढ धागा अन छाप पैसे. छान कल्पना आहे. कुणाला सांगू नका.
09/04/2019 - 09:17 Permalink
पाषाणभेद

चर्चेचे विषय कोणते होते याचा उल्लेख करूनच धागा काढायचा ना! अन तो हि उडवला तर मग नाव गुंफून जसे कवीता करतात ना नसा धागा काढावा. जसे: माझे नाव अमुक तमूक आहे. झेल घेतल्याने सामने जिंकता येतात. या. बसा. चहा पाणि घ्या. आणि काय नाष्टा वगैरे? धीर धरी धीर धरी सकळ गिरीधारी. चेच्चेन्यावर रशीयाने दमन केले. चमचा अन काटा कसे वापरावे? र्चे (येथे बाद) चेरापुंजी येथे पाऊस जास्त पडतो हि आता कथा झाली आहे. असे. असो. हलके घ्याल. काय समस्या आहे? काहीतरी कारण असेल.
08/04/2019 - 22:56 Permalink
Rajesh188

तुमच्या धाग्यावर जुने जाणते mipa कर कमेंट देत आहेत .म्हणजे तुमच्या धाग्यात स्पार्क आहे नाहीतर 1 सुधा कमेंट नसणारे धागे सुधा इथे आहेत. तुम्ही लिहीत रहा.
08/05/2019 - 19:22 Permalink