Skip to main content

देशाविरुद्ध कारस्थान

देशाविरुद्ध कारस्थान

Published on 15/09/2018 - 03:24 प्रकाशित
सप्टेंबरच्या १४ तारखेला नांबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अशी पेपरात बातमी आली आहे. बऱ्याच लोकांना नांबी नारायणन कोण याबद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे, तर ते कोण हे आधी जाणून घेऊ. देशाचे लाडके राष्ट्रपती कलाम यांच्या जोडीने काम करणारे आणि त्यांच्या सारखेच प्रतिभावान म्हणून नांबी नारायणन ओळखले जातात. १९९० साली इसरो मध्ये हे दोघेही एकाच प्रोजेक्टच्या दोन भागांवर काम करत होते. श्री. कलाम हे रॉकेटसाठी लागणाऱ्या घनरूप इंधनावर तर नांबी नारायणन हे द्रवरूप इंधनावर काम करत होते. याच प्रोजेक्ट मध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात जगातील अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान या ५ देशांकडे हे तंत्रज्ञान होते आणि ते या देशांसाठी पैसे कमावण्याचे साधनही होते. यातल्या रशियाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दाखवली होती पण त्यात अमेरिकेने खोडा घातला. त्यामुळे मग हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करावे असे ठरवले गेले आणि त्यात नांबी नारायणन याची महत्वाची भूमिका होती. अचानक एके दिवशी केरळच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.ही बातमी प्रथम लोकल पेपर मध्ये आली मग तिथून ती राष्ट्रीय माध्यमात गेल्यावर नांबी नारायणन हे कसे देशद्रोही आहेत हे सिद्ध करण्याची स्पर्धाच चालू झाली. नांबी नारायणन ५० दिवस कोठडीत होते आणि त्यांच्यावर इसरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण यात गोवावे म्हणून दबाव आणण्यात आला, पण नांबी नारायणन त्याला बळी पडले नाहीत. खूप गाजावाजा झाला आणि इसरो सारख्या संस्थेचे नाव आले म्हणून शेवटी सीबीआयने ही केस हातात घेतली. त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्‍यांवरचे मुखवटे फाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल. या प्रकरणातील सहसंचालक श्रीकुमार यांचे नाव कदाचित तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. तर ही व्यक्ती २००२ मध्ये गुजराथचे पोलिस महासंचालक होती आणि मोदींना दंगलीच्या आरोपात गोवण्याच्या कारस्थानाचेही श्रीकुमार हेच सूत्रधार होते. या दोन्ही केसेस मध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करून तसेच माध्यमांना हाताशी धरून देशाविरुद्ध कारस्थान रचले गेले. यात मोदी हे राजकारणातच असल्याने आणी कणखर स्वभाव असल्याने राजकारणात टिकून राहिले. पण शास्त्रज्ञ असलेल्या नांबी नारायणन यांनी कणखरपणे लढा जरी दिला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द संपली. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले. यात श्रीकुमार, संजीव भट्ट सारख्या देशद्रोह्यांबरोबरच भारतातील काही प्रमुख मिडिया हाऊसेस सुद्धा सामील आहेत. कदाचित काही राजकारणीही सामील असण्याची किंबहुना पडद्यामागचे सूत्रधार असण्याची पण शक्यता आहे. येत्या काही काळात ही नावे आपल्यासमोर येतील अशी आशा करू. आज सुद्धा पेपरमध्ये आलेल्या या आणि या दोन बातम्यातील फरक बघा. तसेच भाऊ तोरसेकरांचा हा लेखही वाचावा. अश्या परिस्थितीतही क्रायोजेनिक इंजिन आणि इतर अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल इसरोचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. =============== संदर्भ : "डॉ. कलाम आणि नंबी नारायणन" : जागता पहारा (ब्लॉग) दुवा : https://jagatapahara.blogspot.com/2018/09/blog-post_14.html

याद्या 34679
प्रतिक्रिया 107
खरं खोटं देव जाणे, ते निकाल लागल्यावर कळेलच . पण एक आहे ते म्हणजे वैज्ञानिकांना किंवा उच्चविद्याविभुषित लोकांना जेव्हा राजकारणाला बळी पडावे लागते तेव्हा ती येनकेनप्रकारे देशाची अधोगती मानावी. श्री नाम्बी यांच्या लढ्याला प्रणाम . त्यांनी मानसिक तोल ( जरी कुटुंबीयांचा ढासळला तरीही ) सांभाळून जो लढा दिला आहे त्याची किंमत पैश्याने मोजता येणार नाही , पण ऐन कारकिर्दीच्या उमेदीत जर असे काही झालं नसतं तर त्यांनी देशाला नक्कीच स्पृहणीय यश मिळवून दिलं असतं .

तुमचा हा लेख म्हणजे तोरसेकर ह्यांनी लिहिले आहे ते इथे कॉपी केले आहे ( मधला परिच्छेद) असे वाटते आहे, तर तसे असले तर निदान श्रेय तरी द्यायला हवे.

घाई आणि थोडा आळस यामुळे थोडा भाग कॉपी केलेला आहे. आपकी पारखी नजर और... क्या केहने! निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. संपादक मंडळ - कृपया भाऊ तोरसेकरांचे नाव लेखात टाकावे - लेखाची प्रेरणा - भाऊ तोरसेकर. सर्वसामान्य वर्तमानपत्रांमध्ये ही फक्त बातमी म्हणून आलं आहे. पण भाऊंच्या लेखात हे सर्व किती निर्दयीपणे राबवण्यात आले आणि त्याचा देशावर कसा दूरगामी परिणाम झाला हे दाखवून दिलेलं आहे.

व्वाट्रोची ची आठवण झाली !!!! असे किती बगलबच्चे राजकीय पाठिंब्यावर 60 वर्ष भारताची धुळधान करत होते ?. 60 वर्षात काय ! काय ! केले , असे किती लोकांचे आयुष्य संपवले ? जागतिक स्पर्धेत औद्योगिक आघाडीवर भारत का कायम पाठीमागे राहीला ? देशद्रोही लोकांनी कोणास ठाऊक ? नंबी नारायण नीं हार न मानता लढत राहिले म्हणून उर्वरित आयुष्य स्वाभिमानाने जगू शकतील . नरसिंह राव यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यापासून सगळे बरबटलेले असणार .

हि प्रतिक्रिया: भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील डिसकलेमरच खरे तर त्यांच्या लेखनाच्या निष्ठेविषयी (जी प्रामाणिक स्वरूपाची नसून व्यक्तिपूजक स्वरूपाची दिसतेय) मत बनविण्यासाठी पुरेशी आहे. तरीही तत्कालीन केंद्र सरकारविषयी काही कलुषित मत प्रदर्शित करणाऱ्यांसाठी हि खालील सुची:
  1. या केसचा सर्व निकाल (अगदी नारायणन यांच्या वरील किटाळ दूर करणारे) हा वाजपेयींचे दीर्घ सरकार येण्याआधीच नारायणन यांच्या बाजूने दिला होता.
  2. सदरची केसमध्ये नारायणन यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे अशी भूमिका सिबिआईनेच मांडली आहे.
  3. नंतरची न्यायालयीन लढाई हि नुकसान भरपाई मिळण्यासाठीची होती.
  4. मुळात राजकीय नसणारी लढाई आता राजकीय स्वरूपाची बनविणे हा मोदी आणि नारायणन यांचा उद्देश दिसतोय.

In reply to by सर टोबी

चर्चा केंद्र सरकारच्या च्या दिशेने ओढून नेण्याचा तुमचा हेतू समजला नाही.

In reply to by सर टोबी

सर्वप्रथम लेख वाचून प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद. भाऊंनी किंवा मी कोठेही तत्कालीन किंवा विद्यमान केंद्र सरकारवर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाहीये. पण तुम्हाला तत्कालीन केंद्रा सरकारच्या या प्रकरणातील सहभागाबद्दल काही माहिती आहे का? भाऊ तोरसेकरांचे डिसकलेमर हे फक्त या लेखासाठी नसून जनरल आहे. ज्याप्रमाणे समस्त पुरोगामी जमात आणि न्यूज अँकर्स हे गेली २००२ पासून (आहा आता कसं बरं वाटलं!) मोदींच्या मागे लागलेत, नुसते खोटेनाटे आरोप नव्हे तर वाट्टेल ते अपशब्द सुद्धा वापरायला कमी करत नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांना त्या आरोपांतील व्यर्थता दिसतेय ते सहजपणे मोदींना सपोर्ट करतात. असो. नाम्बी नारायणन यांच्या बाबतीतला मुख्य मुद्दाच तुमच्या लक्षात आला नाही किंवा लक्षात येऊनही तुम्ही सांगत नाही. त्यांच्यावर आरोप लावले, केस झाली, निकाल त्यांच्या बाजूने लागला, त्यांना नुकसान भरपाई मिळाली हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम करणाऱ्या एका महत्वाच्या शास्त्रज्ञाला देश मुकला. हे देशाचं नुकसानच नाही का? म्हणून तर या लेखाचं शीर्षक देशाविरुद्ध कारस्थान आहे, फक्त नाम्बी नारायणन यांच्या विरोधातील कारस्थान असा नाहीये. तुम्हाला फरक कळेल अशी आशा आहे. यात कारस्थान नसावं किंवा देशाविरोधात काही कारस्थानं होत नाहीत अशी जर तुमची ठाम समजूत असेल तर, २००९ ते २०१३ या चार वर्षात ११ न्यूक्लिअर सायंटिस्ट रहस्यमयरित्या गायब झाले. यावर तत्कालीन केंद्र सरकारने काय केलं याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? अजूनही तुमचा विश्वास नसेल तर श्री. लालबहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू, डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू तसेच काँग्रेसमधीलच माधवराव सिंदिया व राजेश पायलट या सर्वांबद्दल काय म्हणाल? ज्या राफेल विमानावरून काँग्रेस एवढं वादंग माजवतंय, ते राफेल विमान घ्यायचं हे काँग्रेसने एवढी घोळवत का ठेवलं? बाजपेयीचं सरकार असताना त्यांनी १२६ विमानं घ्यायची म्हणून प्रस्ताव दिला होता. भारताला विमानांची गरज आहे हे माहित असून, मिग विमानांचे सततचे अपघात दिसत असूनही या गोष्टीला प्राधान्य का दिलं गेलं नाही? भारतीय जवानांची बुलेटप्रूफ वेस्ट ची मागणी पूर्ण व्हायला किती वर्ष लागली बघा. सियाचीन मध्ये तैनात असलेल्या जवानांना चांगली गूज डाऊनची जॅकेट्स तसेच स्लीपिंग बॅग्स पुरवण्यात का दिरंगाई करण्यात आली? देशाच्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांना गरजेच्या गोष्टी वेळेवर न मिळवून देणे यात तुम्हाला काहीच कारस्थान दिसत नाही? आपलं नशीब खरंच चांगलं आहे की आपली सेना या सगळ्या अडथळ्यांवर मात करूनही शत्रूला सामोरी जात आहे. काश्मिरात सैनिकांना फालतू दगडफेक्यांच्या हातून मार खावा लागतो पण तत्कालीन सरकार फक्त अतिरेक्यांच्या आणि दगडफेक्यांच्या मानवाधिकाराची चिंता करते आणि वर म्हणते सैनिक तर मरण्यासाठीच असतात? का तेव्हाच त्यांना पूर्ण अधिकार देऊन या अतिरेक्यांना मारायचे अधिकार दिले नाहीत? हे कुठलं कारस्थान होतं? वैयक्तिक पातळीवर नाम्बी नारायणन यांचा विचार केला तर साधं सोशल मीडिया वर कोणी दुसऱ्याला देशद्रोही म्हणलं तर केवढा राग येतो. इथेच मिपावर त्यावर किती चर्चा झाली आहे. नाम्बी यांच्या वर तर सरळ सरळ राज्यसरकारने आरोप लावून केस दाखल केली होती. देशासाठी एवढे महत्वाचे काम करणाऱ्याला हा किती मोठा मानसिक धक्का असेल? सामाजिक पातळीवर किती मानहानी झाली असेल? हे सगळं या पैश्यांच्या भरपाईने परत येणार आहे का?

In reply to by ट्रेड मार्क

केंद्र सरकारला मी का मध्ये आणतोय असा तुम्ही आणि अजून एका प्रतिसादात विचारणा झाली होती. मी फक्त तेवढ्याच मुद्द्याला उत्तर देईन. नाम्बी नारायणन यांच्याविरुद्धच्या खटल्यामध्ये सिबिआईची भूमिका महत्वपूर्ण ठरली असे दिसते आहे. सिबिआईच्या भूमिकेत नेहेमीच केंद्र सरकारच्या भूमिकेचे प्रतिबिंब असते आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचा उल्लेख केला आहे.

In reply to by सर टोबी

मुद्दा तुमच्या खरंच लक्षात येत नाहीये का? तुम्हाला फक्त काँग्रेसच्या केंद्र सरकारवरच बोलायचं असेल ते ठीक आहे, बोलूयात. त्यावेळेला केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं हे सगळ्यांना माहित आहे. सीबीआय त्यावेळेला तरी केंद्र सरकारच्या ताटाखालचं मांजर होती हे पण सगळ्यांना माहित आहे. पण मग आयबी कोणाच्या इशाऱ्यावर चालते? केरळ राज्य सरकारच्या? कारण हे चार्जेस केरळ राज्य सरकार आणि आयबी अश्या दोघांनी लावले होते. मग केंद्र सरकारचे एक मांजर पकडते आणि मग दुसरे मांजर येऊन सोडवते असं काही झालं का? बरं या सगळ्या कारस्थानात स्वतः नाम्बी नारायणन यांच्याबरोबरच अजून कोणाचे नुकसान झाले? तर देशाचे. कारण जे क्रायोजेनिक इंजिन २००० साली तयार झाले असते ते तयार कधी झाले याचा शोध घ्या बघू. या सगळ्याला एक मोठा कट का म्हणू नये याचं काही स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? इसरो क्रायोजेनिक इंजिन पूर्ण करायच्या जवळ आहे हे कोणाकोणाला माहित असणार? आयबी, सीबीआय कोणाच्या इशाऱ्यावर काम करणार? मग जर क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेले ५ देश भारताच्या क्रायोजेनिक इंजिन तयार करायच्या विरोधात होते, तर मग या देशांना भारतातूनच अंतर्गत मदत कोणी केली? अजून एक महत्वाचा प्रश्न - सीबीआयने आणि कोर्टाने आरोप मागे घेतल्यावर तत्कालीन केंद्र सरकारने नाम्बी यांना परत इसरो मध्ये रुजू करून घेतलं का? जर घेतलं तर ते ज्या पदावर काम करत होते त्याच पदावर आणि प्रोजेक्टवर काम करू दिलं का?

In reply to by सर टोबी

..........डिसकलेमरच खरे तर त्यांच्या लेखनाच्या निष्ठेविषयी (जी प्रामाणिक स्वरूपाची नसून व्यक्तिपूजक स्वरूपाची दिसतेय) मत बनविण्यासाठी पुरेशी आहे. हे तुमचे म्हणणे कितपत योग्य आहे ?? आपल्याल्या कदाचित माहित नसेल 'भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील नियमित वाचकवर्गाची संख्या आजमितीस एक कोटीच्या आसपास आहे'. दुसरे ब्लॉगवरील डिसकलेमर खरे तर त्यांची लेखन निष्ठेविषयीचा दर्शक नसून मोदीत्रस्तांनी ( तथाकथित आधुनिक बुद्धिवादी, विचारवंत, फुरोगामी वगैरे वगैरे यान्नी) त्यापासुन दूर रहावे म्हणुन दिलेला इशारा आहे. कारण खरी वस्तुस्थिती / विश्लेशण ही त्यांना मानवणारी नाही.

In reply to by ट्रम्प

@ ट्रम्प, आपण कुणाला माहितगार हे विशेषण बहाल करु इच्छित असाल तर काहीच हरकत नाही. पण माहितगार चा आयडी डू आय डी घेऊन आला आहे असे आडून सुचवत असाल तर पहिले महत्वाचे म्हणजे त्यात तथ्य नाही. आणि दुसरेही बर्‍याच महिन्यांनी माहितगार आयडी वाचन्मात्र मोड मध्ये गेला आहे तर वाचन मात्र राहू द्या ना. माहितगार आयडीच्या वैचारीक त्रासापसून मिपाकरांना उसंत मिळतीए कधी नाही ते मिळूद्यात की उसंत जराशी. :)

मुळात सर्वोच्च न्यायालयात जर शास्त्रज्ञ निर्दोष ठरले तर पोलिस अधिकार्‍यास एका वरीष्ठ शास्त्रज्ञाविरुध्द असा आरोप का करावा लागला? ही मागणी करणे योग्यच आहे. कारण त्यांच्या ज्ञानापासुन आणि कार्यापासुन वंचित राहुन देशाचे अभुतपुर्व नुकसान झाले हे नक्कीच खरे आहे. पोलिस महासंचालक दर्जाच्या माणसाला हे समजत नसेल हे समजणे बालिश पणाचे आहे. आरोप करण्याचे काय परीणाम होणार हे ती व्यक्ती समजुन असेलच.

नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस मध्ये अजुन एक नविन गोष्ट समोर आलेली आहे. केरळचे पुर्व मुख्यमंत्री कै. के करुणाकरन (काँग्रेस) ह्यांची सुपुत्री पद्मजाने केरळ काँग्रेसलाच ह्या केस मध्ये दोषी धरल आहे. के करुणाकरन ह्यांनी १९९५ मध्ये मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिलेला होता. त्या वेळेला काँग्रेसचे उम्मन चांडी व ए के अँटनी ह्यांनी संगनमत करुन इतर काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मदतीने कै. के करुणाकरन ह्यांना राजीनामा द्यायला भाग पाडल होत. नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस ह्याचाच एक भाग होता.

तैमुर चे वंशज गांधी घराण्याने देश कसा साळसूदपणे पोखरून ठेवला आहे ह्यावरून लक्षात येतंय . स्वविकसीत क्रयोजिनिक इंजिन तयार झाले तर तैमुर वंशजांचा मलिदा खायचा बंद होईल असा विचार करून जेष्ठ शास्रज्ञ नंबी नारायण यांच्या पाठीमागे हेरगिरी च्या चौकशीचे भूत लावून देण्यात आले असावे . खरं म्हणजे नंबी आणि कलाम तुलनात्मक एकाच पातळी वरचे . प्रश्न असा पडतो त्या खोट्या केस मध्ये फक्त नंबी का ? कलाम का नाही ? तर कमिशन बुडण्याच्या भीती मूळे गांधी घराणे किंवा सल्लागार चांडाळ चौकडी ला कलाम नां अडकवले तर अल्पसंख्याक म्हणजे च स्वाजातीतील लोक नाराज होतील म्हणून नंबी नां बळीचा बकरा बनवले असेल. @ सर टोबी च्या प्रतिसादात भाजप हा विषय राजकीय लढाई करत आहे . तर का करू नये , न्या लोया केस मध्ये लोयांचा मृत्यु नैसर्गिक होता हे त्यावेळी उपस्थित असलेले इतर न्यायाधीश आणि त्यांचे नातेवाईक सांगत असताना काँग्रेस च्या सुरजेवलाने सतत पप्रेसकॉन्फरन्स घेऊन लोयांच्या मृत्यू राजकीय बनवला नव्हता ?

In reply to by ट्रम्प

त्यांच्या राजकारणाचे विरोधक असणे वेगळे आणि पातळी सोडून टीका करणे वेगळे. आवरा स्वतःला

In reply to by अनन्त अवधुत

माझे आवरायचे राहू द्या तुम्ही स्वतः ला अगोदर सावरा . आठवून बघा दिग्विजय ,गांधी घराण्याची , मणिशंकर ची वक्तव्ये !!!! मी बापुडा इथं मिपावर ओरडत बसणार !! पण त्या मूर्खां नीं मीडिया समोर मोदी बद्दल भाजप बद्दल काय काय वक्तवे केली आहेत . चला एक वेळेस भाजप , मोदी बाजूला राहू द्या . त्या अफजल गुरू , दिल्ली बाटला हाऊस चकमक मधील मारला गेलेला आतेरिकी , इशरत जहां , परवा पकडलेले पाच कम्युनिस्ट , डोकलम च्या वेळी रागा चे चिनी राजदूत ला गुपचूप भेटणे ह्या घटना कशाच्या द्योतक आहेत ? देश खड्यात गेला तरी चालेल पण भाजपला सत्तेवरून काढण्यासाठी उद्या हत्ती , गाढवाला बापाचा दर्जा द्यायला कमी करणार नाही काँग्रेस आणि तिची पिलावळ .

In reply to by ट्रम्प

दिग्विजय ,गांधी घराण्याची , मणिशंकर ची वक्तव्ये
त्त्यांच्यी वक्तव्ये त्यांना भोवलीत. ते फळ भोगत आहेत. बाकी आपली मर्जी.

In reply to by अनन्त अवधुत

या सगळ्यांनी बरेच वेळा एवढी बेताल व्यक्तव्ये केली अगदी गाढव, नीच आदमी, खून का दलाल, मौत का सौदागर म्हणून झालं. मणिशंकर तर पाकिस्तानात जाऊन म्हणून आले की मोदींना सत्तेबाहेर करण्यासाठी मदत करा. हे सर्व काय फळ भोगत आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

पातळीसोडून व्यक्तीगत टिका टाळाव्यात हे खरेच पण या निमीत्ताने; मनेका गांधीनी घर सोडले/सोडवल्या नंतर इंदिराजी परत सत्तेत आल्या ज्ञानी झैलसिंगांना राष्ट्रपती केले तेव्हा एका युनूस नामे इंदिरा गांधी भक्ताने व्यक्तिगत टिका करणारी पातळी केवळ मनेका गांधीं बाबत सोडली नाही तर मनेका गांधीच्या आईलाही पातळी सोडून व्यक्तिगत बदनामी करणारा मजकुर लिहिला असावा . अशा पातळी सोडलेल्या मजकुराचे प्रकाशन ज्ञानी झैलसिंगांच्या हस्ते ठरले. लेखन स्वातंत्र्याचा हवाला देऊन, पातळी सोडलेला मजकुर चक्क काँग्रेस मुखपत्र नॅशनल हेरॉल्ड मधून प्रसिद्धीस दिला गेला असे हे इंडिया टूडे वृत्त म्हणते. vengeance का काय म्हणतात त्याची इंदिराजी कालीन उदाहरणे या एका वेगळ्या लेखातूनही दिसतात. (हा लेख गूगल कॅशे मधुन बघावा लागतो नंतर वाचनास उपलब्ध असणार नाही या अंदाजाने कॅशे उपलब्ध आहे तो पर्यंत वाचून घ्यावा) त्यावरुन त्या काळात इंदिरा गांधी कुठे पोहोचु शकत याचा अंदाजा येऊ शकतो.

In reply to by ट्रम्प

मग भले इंदिरा नेहरूंनी फिरोझ खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं असू दे आणि नंतर सोयीसाठी "गांधी" असं नाव घेतलेलं असुदे. नेहरूंनी किंवा इंदिरा गांधींनी किंवा नंतरच्या गांधींनी हिंदूंना डावलून मुसलमानांच्या हिताचे कितीही निर्णय घेतलेले असुदे. आपल्या जनतेचं प्रथम कर्तव्य काय तर राजघराण्याला वाचवणे हो की नाही? आता राहुल गांधी तर जनेउधारी ब्राम्हण झालेत, कैलास-मानसरोवरच्या यात्रेला पण जाऊन आले. त्यांच्या प्रवासातला एक फोटो बघितला नाहीत काय? भले त्यांनी कैलास-मानसरोवरचा एक पण फोटो टाकला नसेल म्हणून काय झालं? आधी परतीची तारीख १२ सप्टेंबर असताना अचानक १० लाच भारत बंद मध्ये सहभागी झाले तरी यात्रा पूर्ण केली का असले प्रश्न विचारायचे नसतात. बाकी लोकांनी मोदींना मौत का सौदागर पासून खून का दलाल वगैरे म्हणलेले चालेल बरंका. मोदी म्हणजे काय शेवटी चहावालाच, त्यांची अशी काय इज्जत असणार आहे?

In reply to by ट्रेड मार्क

मग भले इंदिरा नेहरूंनी फिरोझ खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं असू दे आणि नंतर सोयीसाठी "गांधी" असं नाव घेतलेलं असुदे.
हे खरे आहे का? Genuine question Sandy

In reply to by चांदणे संदीप

खर आहे. पण हा खान खुप चांगला भला माणुस होता.

In reply to by चांदणे संदीप

ते फिरोज खान कधीच नव्हते. फिरोज जहांगीर गांधी, असे त्यांचे नाव होते. पारशी माता -पित्याच्या पोटी जन्माला आले. त्यांचे आणि इंदिराचे लग्न हिंदू पद्धतीने झाले. आणि लग्न झाल्यावर सासरचे आडनाव म्हणून इंदिरा नेहरूंचे आडनाव गांधी झाले.

In reply to by चांदणे संदीप

त्यांचे नाव 'फिरोझ दारुवाला', ते नवे 'दारुवाला' हे आड्नाव कै. इंदीराकाकुंसाठी गैरसोयीचे असल्यामुळे, कै. इंदीराकाकु आपली कैफियत घेउन कै. मो. क. गांधी यांचेकडे गेल्या व आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली व आता आम्ही काय करावे अशी विचारणा केली तेव्हा कै. मो. क. गांधी यांनी आपले 'गांधी' हे आड्नाव लावण्यास सुचविले व ती पडत्या फळाची आज्ञा शिरसावंध्य मानून त्यादिवसापासुन कै. इंदीराकाकु 'इन्दिरा दारुवाला' ऐवजी 'इंन्दीरा गांधी' या नावे ओळखल्या जाऊ लागल्या.

In reply to by ट्रेड मार्क

हे मात्र फारंच झालं हं. जी गोष्ट अाजिबात माहीत नाही, त्याची खातरजमा न करता कसं काय लिहीता राव तुंम्ही? मी तुमचे माहितीपूर्ण प्रतिसाद वाचतो. मोदी समर्थन ठीक अाहे, पण त्या नादात धडधडीत फिरोज खान?

In reply to by स्वधर्म

काही म्हणा हे नेहरू गांधी घराण्याला रहस्यमयतेचा वारसा परंपरेने भेटला आहे . 1857 साल च्या उठावात इतर क्रांतिकारक धारातीर्थी पडले असताना व पंडित नेहरूंचे आजोबा गंगाधर नेहरू दिल्ली चे कोतवाल होते . त्या लढ्यात दिल्ली तील काही मुस्लिमांनी नेहरू घराण्याचा जीव वाचविला . पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू इंग्रजांच्या काळात कुठल्याही वादात न पडता कानपुर मधील एक मोठे यशस्वी वकील झाले . 1947 मध्ये काँग्रेस कमिटीने वल्लभभाई पटेल यांना पाहिले पंतप्रधान करण्याचा ठराव पास केलेला असताना गांधींनी कमिटीवर दबाव टाकून पंडित नेहरुंना पंतप्रधान केले . पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांची आई बी द्वारे 20 वर्ष हेरगिरी केली . पंडित नेहरुंना संसदेत प्रश्न विचारून घायाळ करण्यात सर्वात पुढे फिरोज गांधी असत , त्यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्या मूळे नेहरू च्या स्वच्छ सरकार वर डाग पडले , अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व विमा कंपन्या चे राष्ट्रीयकरन झाले . संजय गांधी च्या मृत्यू नंतर मेनका गांधी आणि वरूण गांधी यांना घराबाहेर काढण्यात आले .

In reply to by ट्रम्प

सर, मी ‘खान’ नावाबाबत विचारले होते. तुंम्ही मुद्दा फारच भरकटवलाय. तुंम्ही वर लिहीलेलं खरं खोटं ठरवण्या इतका माझा अभ्यास नाही. अाताशा कुणाहीबद्दल (मोदींसकट) कोणत्याही बाजूने माहीती मांडता येते. पण ते ‘खान’ कुठून अालं तेवढं सांगितलं तर बरं होईल. न पेक्षा ती चूक होती असं म्हणा. तुमच्या विदासकट लिहीण्याच्या सवयीचा अादर अाहेच.

In reply to by स्वधर्म

तुमची दिशाभूल झाली असं वाटलं असेल किंवा भावना दुखावल्या असतील तर सॉरी बरंका. काय आहे एकुणातच फिरोझ घांदी किंवा गांधी यांच्याबद्दलची माहिती बऱ्याच प्रमाणात दाबण्यात आली आहे. जी काही माहिती उपलब्ध आहेत त्यात २/३ प्रवाह आहेत. एक म्हणजे फिरोझ हे नबाब खान यांचे पुत्र पण फिरोझ बरेच लहान असतानाच नबाब खान यांचे निधन झाल्यावर फिरोझ यांच्या आईने जहांगीर घांदी यांच्याबरोबर लग्न केले. दुसरा मतप्रवाह म्हणजे घांदी हे पारशी होते आणि तिसरा म्हणजे घांदी हे मुसलमान होते. तर ते मुस्लिम होते का पारशी होते हा माझा मुद्दा नसून त्यांचा किंवा पर्यायाने इंदिरा गांधींचा, गांधी या नावाशी काही संबंध नव्हता/ नाहीये. केवळ महात्मा गांधींची लोकप्रियता वापरून घ्यावी आणि इंदिरा नेहरूंनी हिंदू नसलेल्या व्यक्तीशी लग्न केलं हे लपवावं म्हणून गांधी नाव धारण करण्यात आलं. हे नुसतं नाव धारण करण्यात आलंय, धर्म बदललेला नाहीये हे लक्षात घ्यावं. आता विषय निघालाच आहे तर अजून माहिती - इंदिरा या राजकारणाशी संबंधित असलेल्या एका श्रीमंत घराण्यात जन्मलेल्या एकुलत्या एक कन्या होत्या. नेहरूंकडे मद्य पोचवायला येणाऱ्या फिरोझ घांदी यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. कमला नेहरूंचा या लग्नाला सक्त विरोध होता तर जवाहरलाल नेहरू फक्त आंतरधर्मीय लग्न झालं तर भारतीय हिंदूंच्या मनातील प्रतिमेबद्दल चिंतीत होते. तर असं म्हणतात की इंग्लंडला जाऊन या दोघांनी मुस्लिम पद्धतीने विवाह केला आणि मग भारतात येऊन लोकांना दाखवण्यापुरता वैदिक पद्धतीने विवाह केला. मुस्लिम पद्धतीने विवाह करताना मुस्लिम चालीरीतींप्रमाणे इंदिरांना हिंदू धर्म सोडावा लागला आणि त्यांनी मैमुना बेगम हे नाव घेतलं. पुढे या जोडप्याला एक पुत्र झालं ज्याचं नाव राजीव ठेवण्यात आलं. परंतु याच काळात फिरोझ आणि इंदिरा यांच्यात बेबनाव झाला आणि दोघे वेगळे राहू लागले. याच कालावधीत इंदिरा गांधी मोहमद युनूस नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या आणि त्यातून संजयचा जन्म झाला. याशिवाय इंदिरा गांधींची बाकी बरीच अफेअर्स होती यात प्रमुख नाव म्हणजे नेहरूंचा पीए म्हणून काम करणारा एम. ओ. मथाई तसेच त्यांचे योग शिकवणारे धीरेन ब्रह्मचारी आणि नंतर फॉरेन मिनिस्टर दिनेश सिंग हे होत. मथाई यांच्या बरोबर त्यांचे अफेअर १२ वर्ष चालले. मथाई यांच्या Reminiscence of The Nehru Age या पुस्तकात त्यांनी "She" नावाचे एक पूर्ण चॅप्टर लिहिलं आहे, त्यात या संबंधाबाबत खुलेपणाने आणि विस्ताराने लिहिलं आहे. कथेरिन फ्रॅंक यांनी त्यांच्या The Life of Indira Nehru Gandhi या पुस्तकात सुद्धा इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल - लग्न, मुले आणि बाकी अफेअर्स याबद्दल लिहिलं आहे. अर्थात मधल्या काळात या पुस्तकांमधील गांधी घराण्याला आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढायला लावला गेला. तसेच फिरोझ गांधी, संजय गांधी यांच्याबद्दलची माहिती नाहीशी करण्याचाही बराच प्रयत्न झाला आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला. फिरोझ गांधी काय अगदी सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते एक अभ्यासू संसद सदस्य होते. जरी संसदेत ते फारसे बोलत नसले तरी जेव्हा बोलायचे ते अतिशय मुद्देसून आणि अभ्यासपूर्ण असायचं. जिवंत असतानाही त्यांना कायम बाजूला सारलं गेलं आणि जेव्हा वयाच्या फक्त ४८व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर तर त्यांची आठवण कुठेही राहू नये म्हणून यशस्वी प्रयत्न केले. काही लिन्का - https://www.news18.com/news/india/indira-gandhi-made-sure-feroze-was-sidelined-says-swedish-author-1533335.html https://www.ndtv.com/book-excerpts/during-indira-feroze-marriage-talk-of-her-affair-with-nehrus-secretary-1718052 https://www.outlookindia.com/magazine/story/the-truth-about-indira/211665 https://www.daily-sun.com/post/240757/Extramarital-affairs-of-Indira-Gandhi-revealed https://archive.org/stream/ReminiscencesOfTheNehruAgeBy-m-o-mathai/ReminiscencesOfTheNehruAgeBy-m-o-mathai-part-1of2_djvu.txt https://www.quora.com/How-did-Indira-Feroz-Khan-became-Indira-Gandhi https://www.quora.com/Does-the-husband-of-Indira-Gandhi-Feroz-is-a-Khan-or-Gandhi https://nehrufamily.wordpress.com/ टीप: नेहरू- गांधी खानदानाबद्दल बऱ्याच गोष्टी रहस्यमय आहेत. नक्की कोण काय होतं, त्याचं पुढे काय झालं याबाबत बरीच विस्कळीत माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मला जी माहिती मिळाली ती लिहिली आहे, १००% सत्याबद्दल मला स्वतःलाच खात्री नाही. पण ज्या प्रकारे माहिती दाबण्याचा अथवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यावरून एकूणच हे फार काही सरळ प्रकरण आहे असं वाटत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

मला ही माहिती नविन अाहे. मला वाटते की इंदिरा गांधींबाबत हे अनेक लोकांना माहिती नसावे. हे सत्य असेल, तर अापल्या अज्ञ जनतेबद्दल कीव येते. तसेच हल्ली इतकी माहिती पाहिजे तशी वळवून समोर अाणली जाते, की खरं काय खोटं काय हे समजणं सामान्य माणसासाठी अत्यंत अवघड अाहे. असेच सोनिया यांच्याबद्दल त्या का पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत, त्यांचा अातला अावाज इ. समजले होते. जन्माने भारतीय माणूस इटलीचा पंतप्रधान होऊ शकत नाही, अाणि भारतीय घटनेनुसार अापला कायदा हा त्या देशाचा कायदा भारतीयांबाबत कसा अाहे त्यानुसार लागू होतो. त्यावेळी अापल्या घटना समितीबाबत अादर दुणावला होता. बाकी कॉंग्रेसबद्दल मला कधीही समर्थन करावे असे वाटलेले नाही. तसेच तिथल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या घराणेशाहीबाबत मनापासून चीड अाहे. त्यामुळे भावना वगैरे दुखावण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा धन्यवाद.

In reply to by ट्रेड मार्क

"थापा मारा पण रेटून मारा" हे धोरण जोरदार सुरु आहे सध्या! असेही अश्या चर्चाना वैतागून बरेच लोक हळूहळू विरोध करायचा बंद झाले कि मैदान मोकळेच होईल!! :P लगे रहो...

In reply to by शब्दबम्बाळ

हो का ? मग तुम्हीच सांगा का बरे फिरोज गांधी ची माहिती दडवून ठेवली गेली असेल ? किंवा फिरोज गांधी बद्दल काय माहीत आहे ते सांगा . जसे महात्मा गांधी चे आफ्रिकेत रेल्वेतून खाली उतरवले गेले पासून तर ' हे राम ' पर्यंत कसे उदात्तीकरण केले आहे , पंडित नेहरू चे शौक चे पुरावे bbc कडे उपलब्ध असतांना इंटरनेट येण्या अगोदर शाळेत पहिल्या पंतप्रधान ची ' चांगली ' इमेज बिंबावण्यात आली , तसे फिरोज गांधी बद्दल का नाही केले गेले ? मला तर वाटतंय आख्या गांधी-नेहरू फॅमिली मध्ये फिरोज गांधी च फक्त आदर्श राजकारणी असतील . इंग्लंड राजघराण्यात येणाऱ्या सुनेची माहिती लग्न होण्याच्या चारपाच महिने आधी सगळ्या जगाला सांगितली जाते , इथं मात्र इटली च्या बाईचे माहेर आज पर्यंत अंधारात ठेवले गेले आहे . अंधारात ठेवण्या मूळे इटलीच्या बाईंच्या त्यांच्या पूर्वायुष्या बद्दल बऱ्याच सुरस कथा प्रसिद्ध झाल्या आहेत , जसे त्या लग्ना अगोदर हॉटेल मध्ये वेट्रेस होत्या तिथे आमच्या राजकुमारशी ओळख झाली . आता लहरी महंमद राजकुमारा बद्दल . तर आपल्या देशाचे भावी पंतप्रधान प्रत्येक वर्षी अचानक महिनाभर गायब होतात . त्याचे गायब होणे लपवून ठेवण्याचे काय कारण असेल हो ? कुठे जाऊन कसल्या मजा मारतात की त्या मजा सामान्य जनते पासून लपवून ठेवण्याची वेळ येते . 48 वर्षाचे झालेत लहरी महंमद तरी अजून परिपक्वता नाही . माझा 10 वर्षाचा पुतण्या आहे तो माझ्या मोबाईल च्या व्हिडिओ मधील लहरी महंमद च्या भाषणातील वक्तृव कौशल्य पाहून खदाखदा हसत असतो . 48 वय झालंय पण ज्याला गांभीर्याने बोलता येत नाही , जो 1 महिना अचानक गायब होतो अशा माणसाला तुम्ही भावी पंतप्रधान म्हणून मान्यता देताय ? कमाल आहे राव तुमची ?

In reply to by शब्दबम्बाळ

१२ सप्टेंबर रोजी एका माणसाची जयंती होऊन गेली. ज्याचे अत्यंत जवळचे नातेवाईक एकंदर

३८ वर्षे

देशाचे पंतप्रधान होते बायको (१५ वर्षे) मुलगा (६ वर्षे) आणि ज्याचा सासरा सुद्धा पंतप्रधान होता (१७ वर्षे) आणि ज्याची सून (१९ वर्षे) आणि नातू (२ वर्षे) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते/आहेत ज्याच्या नातेवाईकांची नावे देशांत शेकडो संस्था योजनांना दिली गेली आहेत. आणि त्यांचे नाव त्यांनी खासदार असताना स्थापन केलेल्या एकुलत्या एका संस्थेला दिलेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Feroze_Gandhi_College) Citing an RTI query, Naidu pointed out that Nehru-Gandhi family names were used for 450 difference schemes, projects and institutions. As per the RTI, 12 Central and 52 state schemes, 28 sports tournaments and trophies, 19 stadiums, 5 ariports and ports, 98 educational institutions, 51 awards, 15 fellowships, 15 national sanctuaries and parks, 39 hospitals and medical institutions, 37 institutions, chairs and festivals and 74 roads, buildings and places are named after 3 members of the Nehru-Gandhi family. https://www.news18.com/news/politics/kajal-iyer-in-chennai-648403.html असा माणूस नाही चिरा नाही पणती स्थितीत कुठे चिरनिद्रा घेत आहे हेही देशातील बहुसंख्य लोकांना माहिती नाही. यांचे मूळ नाव

फिरोझ घांदी होते गांधी नाही. ( पारशी लोकांमध्ये गांधी नावच नाही)

मग बायकोचे मुलांचे आणि नातवंडांचे नाव गांधी कसे झाले? हे असं विचारलं "थापा मारा पण रेटून मारा" असा आहेर मिळतोय बढिया है

In reply to by सुबोध खरे

छान माहिती !!! कदाचित नेहरूंच्या मुलीबरोबर फिरोज गांधी चे लग्न झाले नसते तर भारतीय इतिहासात हा तारा अजून चमकला असता , पण काँग्रेस च्या पूर्वपार चालत आलेल्या गलिच्छ राजकारणा मूळे फिरोजचें व्यक्तिमत्त्व झकोळले गेले .

In reply to by ट्रम्प

अजून एक माझे वडील राजकारणाचे थोडे अभ्यासू आहेत , त्यांनी मला ह्या बद्दल थोडा वेगळा सांगितलं ह्या बाबतीत कि फिरोज हे "खान" होते , नेहरूंचा त्यांच्या आणि इंदिरा जि च्या लग्नाला नकार होता कारण ते मुस्लिम होते , त्यांना गांधी हे आडनाव आपले बापूजी ह्यांनी दत्तक घेऊन दिले कारण कि त्यांचा लग्न व्हावा तिथून ह्या बाई साहेब गांधी झाल्या नक्की काय हे मला सुद्धा आजच आपण दिलेल्या दुव्या वरून माहित पडला ... नक्की काय खरा आणि काय खोटा फक्त नेहरूंनाच माहित कारण तेच पंडित आहेत पण खूपच रोचक तथ्य आज समजली ... हा धागा म्हणजे अजून खूप काही सांगून जाईल असा वाटते

In reply to by सुबोध खरे

पारशी लोकात गांधी नाव नाही, पण अरबी लोकात घांदी हे नाव नक्कीच आहे. अल घांदी हे दुबईतल्या फेमस कंपनीच नाव आहे !

In reply to by सुबोध खरे

गंमत म्हणजे पारशी (किंवा मुसलमान जे काय असेल ते) आजोबा आणि हिंदु आज्जी, त्यानंतर पारसी (किंवा मुसलमान जे काय असेल ते) बाप आणि ख्रिश्चन आई यांचा मुलगा स्वतःला जान्हवेधारी हिंदु ब्राह्मण म्हणवुन घेतो. अवघड आहे.

In reply to by मृत्युन्जय

पारशी आजोबा , हिंदू आज्जी आणि ख्रिश्चन आई म्हणजे हे गांधी कुटुंबीय खरेच धर्मनिरपेक्ष कि हो !

नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस देशाच्या सुप्रिम कोर्टाने फाशी दिलेल्या याकुबला चुकीच्या पद्दतीने शिक्षा दिली अस मानणार्या काँग्रेसला नांबी नारायणन सारखा ईनोसेंट माणसाला चुकीच्या पद्दतीने अडकवलेल दिसल नाही. नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस ह्या केस मध्ये खुप खोलवर चौकशी झालीच पाहीजे. त्यामु़ळे देशाच्या विरुद्द कोण कोण काम करत आहेत, त्यांचे देशाबाहेर कोण कर्ते करवते आहेत, त्यांचे काय काय प्लॅन्स आहेत हे सुद्दा कळेल.

In reply to by डँबिस००७

आणि नम्बी नारायण यांच्या जीवाशी , देशप्रेमाशी डावपेच खेळल्या नंतर कोर्टाने नारायण यांना निर्दोष ठरविले पण काँग्रेस च्या युवराजनां इतर विषयावर उठसुठ ट्वीट करण्याची सवय असतांना त्या विषयावर सूचक मौन बाळगले आहे . नारायण यांच्या बरोबर च्या चार शश्रज्ञा पैकी एकाचे निकालाच्या दिवशी शुक्रवारी पहाटे निधन झाले . त्या माणसाला मरेपर्यंत अपमानित जीवन जगावे लागले . त्या बद्दल काँग्रेस पक्षाला खंत ना खेद .

२००४ मध्ये अटलजींच्या सरकारला लोकांनी निरोप दिला होता... जनतेसाठी तेंव्हा 'shining India' एक थट्टेचा विषय बनला होता... आताही काही लोक तशीच धमकी देत आहेत...काही हरकत नाही, या थट्टेने काय नुकसान केले यांवर बोलूया म्हणजे यापुढे लोकांना लक्षात येईल... ९० च्या दशकात इराण ने जगातील सर्व विकसित देशांना सांगितले की ते त्यांच्या समुद्रकिनारी असणाऱ्या चाबहार या प्रदेशात एक मोठे बंदर बनवणार आहेत,त्या प्रकल्पाचे बांधणीचे कंत्राट घेण्यासाठी ते जगभरातील देशांना आमंत्रित करीत आहेत...परंतु कुठल्याही देशाने त्या प्रकल्पाचे कंत्राट घेतले नाही कारण, तेंव्हा इराण वर प्रतिबंध लादले गेलेले होते...हा पूर्ण प्रकल्प थंड बस्त्यात गेला...२००१ साली एप्रिलमध्ये पंतप्रधान अटलजींनी प्रचंड आंतरराष्ट्रीय दाबावाला झुगारून इराणचा दौरा केला....हा दौरा उघडपणे अमेरिकेस दिलेला एक संकेत होता...पोखरण अणूविस्फोटानंतर अमेरिकेने भारतावर प्रचंड निर्बंध लादले होते...आणि नेमक्या याच वेळी अटलजींनी केलेला इराण दौरा आणि उभय देशांतील व्यापारिक करार हे उघडपणे अमेरिकेस संदेश देणारे होते की, 'आमच्याकडे इतर मार्ग आहेत आणि आम्ही ते शोधून काढणार'...इराणने भारतास चाबहार बंदर निर्माणकरिता आमंत्रित केले व भारतास हर तऱ्हेची मदत (समर्थन) विना अट देण्याचे वचन दिले... या भेटीनंतर भारताने 'land lock' देशांची (जे देश चहुबाजूंनी भूप्रदेशाने वेढलेले आहेत, समुद्रसीमा नाही असे) सुचि बनवून वरील प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर काम सुरू केले...अभ्यासाअंती असे लक्षात आले की, भारताने जर हे चाबहार बंदर विकसित केले तर भारतातील व्यापाऱ्यांना इराण,अफगाणिस्तान, तजाकीस्तान,करगिस्तान, उजबेकिस्तान,अर्मेनिया, अजरबैजान,तुर्कमेनिस्तान,जॉर्जिया या देशनसोबतच पूर्ण लत्वीय देशांसारखे 'land lock' देशांची बाजारपेठ उपलब्ध होईल...इथे भारताला धान्य,भाज्या,फळे,औषधी,इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यासोबतच अन्य जिनसांचे व्यापार करण्यासाठी उत्तम रस्ता उपलब्ध होईल...प्रकल्पाचा 'feasibility report' (व्यवहार्यता अहवाल) प्राप्त झाल्यानंतर भारताने २००३ मध्ये इराणचा चाबहार बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव स्वीकारला...याकरिता भारताने इराणला १५० दशलक्ष डॉलर कर्जाऊ देण्याचे प्राथमिक लक्ष्य निश्चित केले...साल २००४ आले आणि जनतेने अटलजींच्या सरकारला 'रिटायर्ड' केले...२००२ मध्येच भारत इराण आणि रशियाने एक ऐतिहासिक करार केला होता ज्याचा उल्लेख पुढे येईलच... २००४ ते २०१५ या काळात चाबहार बंदराचे काम अगदी कासवगतीने सुरू होते...याकाळात भारताने निर्माणकार्यत जो अक्षम्य विलंब केला त्याचा फायदा चीन ने पाकिस्तान सोबत मिळून उठवला आणि चीन व पाकिस्तान ने CPEC (China Pakistan Economic Corridor) करार केला, ज्याच्या अंतर्गत चीन ने चाबहार पासून फक्त ७० मैल अंतरावर असलेल्या 'ग्वादार' येथे बंदर निर्माण सुरु केले...आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दरम्यानच्या काळात भारत सरकारने अमेरिकेच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानात भरपूर प्रमाणात 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स' करण्यात अभूतपूर्व तत्परता दाखवली आणि भारताने अफगाणिस्तान मार्गे इराणच्या सीमेपर्यंत रस्ते बांधले...तिकडे चीन ने चाबहार निर्मिती मधील सुस्तीचा फायदा घेऊन सर्व 'land lock' देशांना आपल्या देशात बनलेल्या मालाने भरून टाकले...इथे भारत पिछाडीवर गेला... २०१५ मध्ये भारताच्या मोदी सरकारने व इराणने चाबहार वर काम सुरू केले... तत्काळ भारताने यासाठी जानेवारी २०१५ मध्ये एक PSU बनवले,त्याचे नाव आहे IPGPL (Indian Ports Global Private Limited) ज्याद्वारे इराणच्या Aria Bandaer Iranian Port & Marine Services Company (ABI) सोबत ६ मे २०१५ रोजी चाबहार निर्मितीसाठी करार केला. या सर्व घडामोडींपश्चात आत्तापर्यंत चाबहार संबंधित महत्वाचे मुद्दे... १) नोव्हेंबर २०१७ मध्ये चाबहारच्या पहिल्या फ़ेज चे काम पूर्ण झाले आणि माल वाहतुक सुरू झाली...भारताने अफगाणिस्तानसाठी गव्हाने भरलेले जहाज कांडला बंदरात पाठवले..यापूर्वी भारताला अफगाणिस्तानात माल पाठवण्याकरिता पाकिस्तानातील प्रदेशातून जावे लागत होते...पण आता भारताला 'land lock' देशांना माल पाठविणे खुपचं सोपे झाले आहे. पाकिस्तानच्या प्रदेशात जाण्याची गरज उरली नाही. २)पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये इराण भारतास चाबहार बंदर वापरण्याकरिता पुर्णपणे सोपवणार आहे. ३)भारत चाबहार बंदरास पूर्ण १० वर्षांसाठी वापरेल,त्यांनतर त्याचे संचालन इराणकडे सोपविले जाईल. ४)भारत बंदरातील २ बर्थ कायमस्वरूपी वापरणार. ५) चाबहार निर्मिती करीता भारताने इराणला १५० दशलक्ष डॉलर कर्जस्वरूपात दिले आहेत. ६)चाबहार बंदरास भारतीय सैन्याच्या पूर्ण देखरेखीखाली भारतीय कंपनीने निर्माण केले आहे. ७)१० वर्षासाठी बंदराचे संचालन भारत सरकारची कंपनी IPGPL कडे असेल. ८)भारत सरकारला या बंदराकडून प्रतिवर्षी २२ दशलक्ष डॉलर्स चा अतिरिक्त महसूल मिळेल. ९)मनमोहन सरकारने अफगाणिस्तान ते इराण सीमेवरील जेहदान पर्यंत आणलेल्या रस्त्यास आता चाबहार पर्यंत पूर्ण केले गेले असून अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातील गाव जे जेहदान शी जोडते ते आहे जरंज...भारतानेच जरंज ते अफगाणिस्तानाच्या आत अगदी दलाराम पर्यंत रस्ता बनवला आहे...हे सर्व काम भारताने केले आहे व त्यासाठी भारतीय कंपन्यांना कंत्राटं मिळाली आहेत. १०)चाबहार मधील प्रत्येक कामात भारताला ३०% सवलत मिळत राहणार. ११)भारताला आवश्यकतेनुसार कधीही या बंदराच्या क्षमतेच्या ७५% पर्यंत वापरता येणार आहे. १२)माल वाहतुकीसाठी भारत आता चाबहार पासून रशिया पर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करणार आहे. यासाठी भारत-अफगाणिस्तान-इराण-रशिया-तुर्कमेनिस्तान-तजाकीस्तान-उजबेकिस्तान-किरगिस्तान या देशांमध्ये करार झाले आहेत. १३) चाबहार पासुन रशिया पर्यंत रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर मुंबई ते रशिया या ७२०० किमी अंतरावरील माल वाहतुकिस लागणारा ४२ दिवसांचा कालावधी हा कमी होऊन अवघे १४ दिवस इतका होईल. १४)मुंबई ते रशिया या ७२०० किमी वाहतूक पट्टयास नाव दिले आहे International North South Transport Corridor.ज्यामध्ये समुद्र आणि जमिनीतुन रस्ता असेल. ह्या NSTC प्रकल्पासाठी भारत-इराण आणि रशिया या देशांत मे २००२ मध्ये अटलजींच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करार करण्यात आला होता.पुढील महिन्यात हा कॉरिडॉर सुरू होऊन एक इतिहास रचला जाणार आहे. १५)नितीन गडकरी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये सांगितले होते की डिसेंबर २०१८ पर्यंत चाबहार बंदर पूर्णपणे तयार होऊन सर्व आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करून पुर्णतः कार्यरत होईल..आणि पुढच्याच महिन्यात हे पूर्णपणे तयार होऊन भारताला सोपविण्यात येणार आहे...Work completed as targeted! पूर्वी आम्ही shining india ची थट्टा केली आणि आता मोदींच्या विदेश दौऱ्यांचीही करत आहोत...पण कधीतरी त्या मागील कार्य व त्याचे होणारे परिणाम यांना गंभीरपणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..! -मूळ लेखक Ranjay Tripathi अनुवाद © संकेत कुलकर्णी https://indianexpress.com/article/research/narendra-modi-iran-visit-chahbahar-port-deal-2817180/

In reply to by ट्रेड मार्क

आवडला हा लेख, माहितीपूर्ण आहे. पडद्यामागे बरेच नाट्य घडत असते पण त्याची माहिती अशी बऱ्याच काळाने मिळत जाते.

In reply to by ट्रेड मार्क

महत्वपूर्ण माहिती सहित प्रतिसाद आहे . वाजपेयी आणि मोदीं यांची झपाट्याने काम करण्याची वृत्ती सर्वश्रुत आहेच . मला चांगलं आठवतंय , शाईनिंग इंडिया ही घोषणा भाजपला महागात पडणार हे त्या वेळेस भाजप समर्थकांना सुद्धा वाटत होते . आणि झालंही तसेच , त्या वेळी त्या काळात गरीब व गरीब मध्यमवर्गीय यांचे जीवनमान पाच वर्षात लगेचच सुसह्य होऊ न शकल्या मूळे त्यांनी भाजप ला कोलदांडा घातला . त्यांचे ही बरोबर आहे रोजचे जीवन संघर्षमय असतांना आंतराष्ट्रीय पातळीवरील भारताचे सन्माननीय स्थान , नदीजोड प्रकल्प , सुवर्णचतुष्कोन महामार्ग प्रकल्प हे मुद्दे त्यांच्या बुद्धी च्या क्षमते बाहेरचे होते .

In reply to by ट्रेड मार्क

सुंदर माहितीपूर्ण प्रतिसाद ! अशी माहिती देण्यापेक्षा, दुर्दैवाने, माध्यमांचे जास्त लक्ष सनसनाटी निर्माण करण्याकडे असते.

यांच्या विस्तृत प्रतिसादाचा मी निषेध करतो. १ कोथींबीर चे भाव खाली आलेले नाहीत २ माझ्या भागातील कोपर्यावरचा कचरा उचलला जात नाही आणि मोदींचं लक्ष्य नाही तिथे ३ मला न झालेल्या नुकसानीची भरपाई, अनुदान मिळत नाही, पुरावे मागतात लेकाचे? ४ परदेशातून एक चाकलेट सुदीक नाही आणलं आम्हाला. ५ बाद केलेल्या सगळ्या नोटा परत आल्या आहेत सबब कुठेही काळ्या रंगाचे पैशे सापडले नाहीत माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे पंधरा दिवस वाया गेली (त्या काळात कितीतरी देशकार्य केलं असतं मी) सबब या चाबाहारचा मला उपयोग नाही, पुन्हा एकदा निषेध चाबा(हार्ट) बंदर नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by नाखु

=)) =)) =)) चाबा(हार्ट) बंदर नाखु वाचकांची पत्रेवाला "आणि पीसीएमसीच्या उंदीर मारण्याच्या विभागातील कनिष्ठ लिपिक" हे राहिलंच की ! ;) =))

In reply to by नाखु

खरंय... नुसतं एवढंच नाही तर हे मोदींनी केलं म्हणून आम्हाला आवडत नाही. दुसरं म्हणजे चबहार मध्ये पण चहा आहे आणि म्हणून मोदींनी यात एवढा इंटरेस्ट घेतला.

In reply to by नाखु

खरे तर १०० , ५०० व २००० सर्व नोटा रद्द झाल्या पाहिजेत . सर्व नागरिकांना एकाच कार्डावर फुकट व्यवहार करता आले पाहिजेत . लोकपाल स्थापन झाला पाहिजे , पण खात्री आले मोदी काय " उपरावाला " देखील हे करणार नाही .

In reply to by चौकटराजा

उपरवाला ला मानत नाहीत त्यांनी काय वाचावे म्हणतोय मी !!! वाचता वाचता वाचलेला वाचक नाखु

In reply to by नाखु

नास्तिकान्च्या देवाचा उल्लेख असा होतो ... अगदी देवा सारखे भेटलात.... त्यात काही राम नाही.. देवाच्या मनातच नव्हते... तो देव माणूस आहे...... देव तारी त्याला कोण मारी...अरे देवा आता काय करायचं ? ... ते वरच्या देवालाही शक्य नाही.... ई ई ई

In reply to by चौकटराजा

या धाग्याचा विषय जरा वेगळा आहे. मोदींबद्दलची नाराजी व्यक्त करण्यासाठी श्री. अभिजित-१ यांनी काही धागे काढले आहेत. जिथे ते स्वतःच फारसे फिरकत नाहीत, तुम्ही तिकडे भर घातलीत तर तेवढेच ते धागे वर येतील.

इंदीरा गांधींच्या धर्माबद्दल एव्हढं आकांडतांडव का केल्या जातं कोण जाणे. भारतीय राजकारणी आणि सत्ताधीश या नात्याने त्यांची नीयत आणि काबिलीयत याविषयी फारतर बोलावे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने राजकारणी लोकांनी वैयक्तीक आयुष्यात लफडी करु नये हे ठीक. पण अदरवाईज त्यांच्या वैयक्तीक आयुश्याशी आपल्याला काहि घेणंदेणं नसावं. राहिला त्यांचा धर्म... तर त्यांचा अंत्यसंस्कार हिंदु रितीने चिताग्नी देऊन झाला. विषय संपला. त्या मुस्लीम जरी असत्या आणि रीतसर दफनविधी झाला असता तरी त्यात गैर काहीही नाहि. नेहेरु घराण्यातल्या व्यक्तींनी आपलं खाजगी आयुष्य जनतेपासुन लपवुन ठेवलं असेल तर त्यात जनमानसाची चुक जास्त मोठी आहे. आपण अजुनही पर्फॉर्मन्स बेस्ड सिस्टीम घडायला देत नाहि.

In reply to by अर्धवटराव

काही जातीयवादी महाभाग, असे काही लोकांची जात धर्म शोधत हिंडत बसतात जणू त्या घराण्याशी सोयरिक जुळवायची आहे. वरून दुसर्याना पुरोगामी जातीयवादी विशेषणं लावून मोकळे! मिपावर नसतील बहुतेक लोक अशी, नाय??

In reply to by अर्धवटराव

विचार बदलण्यास प्रवृत्त करणारा प्रतिसाद , चांगले विचार मांडले तर प्रतिसाद सुद्धा चांगले भेटतील , हळूहळू का होईना समाज सुसंस्कृत होईल . सर्वात प्रथम स्वतःचे विचार विषधारी लोकांनी बदलणे गरजेचे आहे

In reply to by अर्धवटराव

इंदिरा "गांधीं"च्या धर्माबद्दल कोणी आकांडतांडव करत आहे असं मला वाटत नाही. इथे मिपावर नाही आणि बाहेर पण कोणी करतंय असं दिसून येत नाही. माझ्या या प्रतिसादाचा उद्देश फक्त त्यांनी "गांधी" हे आडनाव का स्वीकारलं हे स्पष्ट करण्याचा होता. ते सांगताना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या जवळच्या व त्यांच्या बद्दल संशोधन केलेल्यांनी काय लिहून ठेवलंय याचे दाखले हे देणं मला श्रेयस्कर वाटलं. भावना दुखावल्या असतील तर परत एकदा क्षमा मागतो. राजकारणातील अश्या स्थानी पोचलेल्या लोकांनी आयुष्य तशीही फारशी खाजगी रहात नाहीत, त्यातून जर एवढी प्रकरणं असतील तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे कोणाला तरी फेवरिझम किंवा निर्णय थोडे का होईना बायस होऊ शकतात असं म्हणण्यास वाव आहे. पण अदरवाईज त्यांच्या वैयक्तीक आयुश्याशी आपल्याला काहि घेणंदेणं नसावं. मान्य करायचं म्हणलं तर मग तसाच न्याय सगळीकडे असला पाहिजे. अटलबिहारी बाजपेयीचं अविवाहित राहणं किंवा मोदींचं बायकोपासून वेगळं राहणं यांची हेटाळणी गांधी परिवाराच्या तुलनेत फारच झाली असं तुम्हाला वाटत नाही? किंबहुना इंदिरा गांधी ज्या काळात होत्या त्या काळात तर भारतीय समाजात अशी लफडी करणे निषिद्ध मानले जात होते, त्यामुळेच तर ही आणि इतर गांधी परिवाराची सर्व प्रकरणे पद्धतशीररित्या दाबून ठेवण्यात आली. बाकी विशुमित साहेबांसाठी - आम्ही पुरोगामी कोणाला म्हणतो हे स्पष्ट आहे. पाहिजे तर अजून उदाहरणं देतो - १. शशी थरूर, दिग्विजय सिंग ईई नेत्यांची बरीच प्रकरणे चव्हाट्यावर येऊनही, थरूर यांचे तर पाकिस्तानी पत्रकाराबरोबर संबंध उघड होऊनही तिकडे ढुंकूनही न बघता मोदी आणि शहा यांनी कोणा एका मुलीवर पाळत ठेवायला सांगितली म्हणून जास्त चर्चा करतात. २. संजय गांधी, माधवराव सिंदिया, राजेश पायलट ई. पासून ते वद्रा कुटुंब (रॉबर्ट सोडून), सुनंदा पुष्कर वगैरे रहस्यमयरित्या मृत्यू पावतात पण त्याचे काही न वाटता इशरत जहाँला उगाच मारण्यात आलं म्हणून आरडाओरडा करतात. ३. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला सुवर्णकाळ मानतात पण फक्त मोदींची नोटबंदी मात्र ज्यांना खुपत राहते. ४. भारतामध्ये हल्ले करणारे सर्व अतिरेकी मुस्लिम असल्याचे सिद्ध होऊनही तेव्हा मात्र दहशतवादाला धर्म नसतो म्हणणारे पण २-४ हिंदूंना खोट्या केस मध्ये अडकवल्यानंतर हिंदू दहशतवाद म्हणणारे किंवा त्याला विरोध न करणारे किंवा त्याविषयी न बोलणे योग्य समजणारे. ५. आसारामबापूंवर आरोप झाले किंवा कठुआ केस मध्ये पुजाऱ्यावर आरोप झाल्यावर की समस्त हिंदू गुरूंवर बोट उचलणारे पण ७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारे मौलवी किंवा नन वर बलात्कार करणाऱ्या बिशप बद्दल फारश्या बातम्या येत नाहीत त्याचे काही न वाटणारे किंवा चर्चा करावीशी किंवा प्लाकार्ड घेऊन व्हिडीओ बनवावेसे न वाटणारे. ६. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कितीतरी धार्मिक दंगली होऊनही, शीख हत्याकांडांसारखे पंथावर आधारित हत्याकांड होऊनही, फक्त २००२ मधील (आहा, आता जरा बरं वाटलं!) दंगलीवर बोलणारे आणि त्यातही सोयीस्कररित्या गोध्रा ट्रेन मध्ये जाळून मारले गेलेले हिंदू विसरणारे. ७. मुस्लिमांकडून बळजबरीने होणारे आणि ख्रिश्चन लोकांकडून आमिषे दाखवून होणारे धर्म परिवर्तन तसेच त्यांचे लोकांना "व्याधीमुक्त" करणारे विनोदी कार्यक्रम नजरेआड करणारे पण कीर्तन, हिंदू बुवांचे धार्मिक विवेचन वा योग वगैरेंची चेष्टा करणारे. आणि असेच कितीतरी..... जर इंदिरा गांधींच्या खाजगी आयुष्याबद्दल न बोलता फक्त राजकीय आयुष्याबद्दल बोलावे अशी मागणी असेल तर मग तोच न्याय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना पण लावला पाहिजे अशी आमची प्रतिगामी मागणी आहे.

In reply to by ट्रेड मार्क

आणि प्रत्येकाने आपापल्या न्यायाने सुख भोगावे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय बारामती. जय नागपूर.

In reply to by ट्रेड मार्क

राजकारणी लोक्स स्वतःहुन आपली जानवी-टोप्या मिरवायचे थांबणार नाहि. त्या टोप्यांखालचे मेंदु तपासुन बघायला जनता उत्सुक नाहि. मोदि-मंडळ वि. गांधी मंडळ हा सामना एका मर्यादेपलिकडे आमचं मनोरंजन करु शकत नाहि. बरं, या सगळ्यांना चार समजुतदारीच्या गोष्टी सांगाव्या हि आमची ऐपत नाहि... मग आम्हि कोणत्या वाटेने जावे??

In reply to by ट्रेड मार्क

गुजराथमध्ये २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी दंगल उसळत असे. २००२ मध्ये एकदाच धडा शिकवल्यावर पुढची १२-१३ वर्ष एक तरी दंगल झाली का? झाली असेल तर उदाहरणाने दाखवून द्या.
हे वाक्य ट्रेड मार्क यांचेच आहे. मिपावरती कुठल्याही दंगलीबद्दल असे वाक्य धडधडीतपणे कोणी केले नसावे कदाचित! इथे त्यांचा पूर्ण प्रतिसाद पाहता येईल. दंगलीला "धडा शिकवण्याची" उपमा देऊनही मी त्याचे समर्थन करत नव्हतो असे म्हणायला मोकळे! आणि इथे "कोण पुरोगामी" वगैरे सांगत बसलेत. ज्यांना दंगलीत मरणाऱ्या कोणाच्याही जीवाची किंमत नाही आणि जेव्हा स्वतः किंवा स्वतःच्या नातलगांपैकी कोणीही अशा दंगलीमध्ये दगावण्याची शक्यता वाटत नसते तेव्हाच माणूस दंगलीसारख्या गोष्टींचे समर्थन करू शकतो. आणि असल्या विचारांची माणसे हल्ली उजळ माथ्याने इतरांना उपदेशाचे डोस पाजत असतात आणि "पुरोगामी" ठरवत असतात. तुमच्यासाठी तरी मी पुरोगामीच आहे आणि तुमच्यासारख्या विचारांच्या माणसांना विरोध करणारच आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

दंगलीला "धडा शिकवण्याची" उपमा देऊनही मी त्याचे समर्थन करत नव्हतो असे म्हणायला मोकळे! अशा लोकांनी प्रत्यक्ष दंगलीचा अनुभव घेतला तर चुकूनही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाहीत.

In reply to by शब्दबम्बाळ

बरंच उत्खनन केलंत की! पण अजून तुमची ठराविक वाक्य घेऊन बोलायची सवय सुधारली नाही वाटतं. एवढे कष्ट करून इथे तो प्रतिसाद आणण्यापेक्षा मी तिथेच जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं द्या की. मी अजूनही माझ्या वाक्यावर ठाम आहे - २००२ आधी गुजराथ मध्ये किती दंगली झाल्या याचा आकडा बघा आणि नंतर किती झाल्या हे सांगा. बरं हे २००२ च्या दंगलीमध्ये फक्त मुस्लिमांवर हल्ले झाले हे तुम्हाला म्हणायचं असेल तर दंगलीची सुरुवात कुठून झाली? ट्रेनच्या डब्यांची दारं बाहेरून बंद करून आग कोणी लावली? त्यात जिवंतपणी कोळसा होऊन मेलेले लोक कोण होते? तर मी पुरोगामी त्यांना म्हणतो जे दंगलीचा ट्रिगर असणारी ही घटना सोयीस्करपणे डोळ्याआड करून फक्त नंतर झालेल्या दंगलीकडे बोट दाखवून फक्त मुस्लिम कसे बिच्चारे हे सांगत बसतात. मी आधीही म्हणलं आहे की मी दंगलीचे समर्थन केलेलं नाही आणि करत नाहीये. पण जर एक समाजगट सतत काही ना काही कारण काढून अशांतता पसरवत असेल, दंगली करत असेल तर एकदाच धडा शिकवणे हेच त्यावरचे उत्तर आहे असे माझे मत आहे. तुमच्या मते काय वाटेल तेव्हा मुस्लिमांनी दंगली कराव्या आणि हिंदूंनी मारले जावे हे योग्य आहे का? हिंदू दहशतवाद म्हणून ओरडणाऱ्यांची लक्तरे कोर्टानीच काढली आहेत. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना उगाच खोट्या खटल्यात गोवण्यात आलं हे सिद्ध झालं आहे. २००२ मध्ये मोदींनी मुस्लिमांना मारण्यासाठी पोलिसांना मोकळे सोडले या आरोपाचीही कोर्टाने लक्तरं काढली आहेत. याउलट जगभर झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात मुस्लिमांचा हात सतत सिद्ध झालेला आहे. मला फक्त हेच दाखवून द्यायचं आहे. झाडून सगळे मुस्लिम दहशतवादी असतात असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. पण तुलनात्मक संख्या बघितली तर मुस्लिम जास्त आक्रमक आहेत. तुम्हाला आणि गोडसे साहेबांना एक सांगतो - माझा जन्म मुंबईचा आणि नंतरची २०-२२ वर्षे मी मुंबईत दादर मध्ये राहिलो आहे. त्यामुळे मुंबईतल्या दंगली आणि बॉम्बस्फोटसुद्धा प्रत्यक्ष पहिले आहेत. ४ दिवस कर्फ्यू नंतर संध्याकाळी २ तास बाहेर जायची परवानगी दिल्यावर ८ पदरी आंबेडकर रोडच्या डिव्हायडर वर जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत जीपवरच्या तोफा घेऊन सैनिक उभे असलेले पण बघितलं आहे. एवढंच नव्हे तर गॅंगवॉर आणि त्यावेळची दहशत सुद्धा अनुभवली आहे. त्यामुळे मी स्वतः दंगलीचा आणि दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यामुळेच माझे असे मत आहे की या लोकांना डोकं वर काढून दिलं नाही तर शांतता राहते. आता शब्दबंबाळ किंवा गोडसे यापैकी कोणी दंगलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय का सांगा बघू?

In reply to by ट्रेड मार्क

दंगलीचा आणि दहशतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यामुळेच माझे असे मत आहे की या लोकांना डोकं वर काढून दिलं नाही तर शांतता राहते. ठीक आहे. तुमच्या ओळखितले किती निरपराध ह्यात मारले गेले? किंवा दंगलीत नेमके किती निरपराधांचे बळी गेले? नेमका धडा कोणाला शिकवला गेला? भिवंडीत १९९२ नंतर एकही जातीय दंगल घडली नाही. आयपीएस सुरेश खोपडे ह्यांनी नेमके काय केले ह्याचा जरा अभ्यास करा, तुमच्या डोक्यातील 'धडा' शिकविण्याचे भूत उतरायला मदत होईल.

In reply to by ट्रेड मार्क

संपादक महोदय, मिपावरती असे विखारी विचार चालणार आहेत का ते बघून घ्या! इथे सरळ सरळ एकदाच धडा शिकवायची( दंगलीच्या माध्यमातून) उघडपणे भाषा केली जात आहे. उद्या जर अश्या चिथावणीतून काही अप्रिय घटना घडली तर सदर व्यक्ती त्याची जबाबदारी घेणार आहे का हे बघून घ्या. नाहीतर मिपावर नसते बालंट यायचे. असेही देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशातल्या कायद्यांनी फारसा फरक पडत नाही त्यामुळे कृपया देशातल्या लोकांनी असल्या विचारांपासून आणि ते पसरवण्यापासून लांबच राहावे. हिंदू/मुस्लिम/पुरोगामी/सेकुलर अशी वेगवेगळी भुते तयार करून नेहमीच लोकांना घाबरवण्यात येत, आता तर निवडणूक तोंडावर येत आहेत... कुठल्याही ठरला जाऊ शकतात लोक! नोकऱ्या, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते हे विषय सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असायला हवेत पण त्यापासून त्याला भटकवून नेहमीच तो धोक्यात कसा आहे आणि कोणीतरी त्याला मारायलाच कसे बसलेले आहे हे सतत बिंबवत राहायचे चालले आहे... मला या विषयावर अश्या विखारी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. मी आधीपण म्हणालो आहे, देशात न्यायालये आहेत आणि कोणीही कायदा मोडला तर त्याला शिक्षा करण्यास ती समर्थ आहेत! लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये...

In reply to by शब्दबम्बाळ

असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे.

In reply to by शब्दबम्बाळ

लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये... अगदी बरोबर

In reply to by शब्दबम्बाळ

कशाला उगाच कांगावा करताय? मी काय म्हणतोय हे तुमच्या अजूनही लक्षात आलं नसेल तर अवघड आहे. मी काही हिंदूंनी उगाच दंगल करून इतरांना कापून काढावे हे सांगत नाहीये, तर दुसऱ्या बाजूने जर गोध्रा ट्रेन कांडासारखे काही घडले तर गप्प बसू नये हे म्हणतोय. तुमची अपेक्षा काय इतर धर्मियांनी हिंदूंना काही पण करावे आणि हिंदूंनी गप्प बसून राहावे अशी आहे काय? तिघांनी सारखेच प्रतिसाद दिले आहेत, त्यामुळे तिघांनाही एकत्रच उत्तर देतो. मार्मिक गोडसे - भिवंडीत १९९२ नंतर एकही जातीय दंगल घडली नाही. भिवंडीत मुस्लिम लोकांची लोकसंख्या किती प्रमाणात आहे हे बघा. बाकी हे मॉडेल जर एवढा यशस्वी आहे तर बाकी ठिकाणी का लागू केलं नाही? बाकी तुम्ही दंगल अनुभवली आहे का याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. शब्दबम्बाळ - इथे सरळ सरळ एकदाच धडा शिकवायची( दंगलीच्या माध्यमातून) उघडपणे भाषा केली जात आहे. तुमचे आकलन कमी पडतेय हे परत एकदा सिद्ध केलंत. विषय गुजराथ दंगलीचा आहे आणि त्यासंदर्भात मी म्हणलंय की २००२ च्या आधी वर्षातून एकदा तरी धार्मिक दंगल होणाऱ्या गुजराथ मध्ये, २००२ नंतर किती दंगली झाल्या याचा शोध घ्या. हेच मुंबईत किती दंगली झाल्या आणि दहशतवादी हल्ले झाले? गुजरातची हद्द पाकिस्तानला जोडून आहे. तशीच राजस्थान आणि पंजाबची पण आहे. पण २००२ नंतर गुजराथमध्ये एकदम शांतता कशी काय नंदू लागली? बरं तिथे काही मुस्लिम रहात नाहीत असं नाहीये. असेही देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशातल्या कायद्यांनी फारसा फरक पडत नाही मला वाटलंच हा विषय येणार. माझ्यामते फक्त एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तुमचे बाहेरील परिस्थितीविषयीचे ज्ञान कमी आहे. बाहेरच्या देशात काय चाललंय ते जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही उत्खनन करून काढलेल्या या धाग्यावरील माझे प्रतिसाद नीट लक्ष देऊन वाचा. हिंदू/मुस्लिम/पुरोगामी/सेकुलर अशी वेगवेगळी भुते तयार करून नेहमीच लोकांना घाबरवण्यात येत, आता तर निवडणूक तोंडावर येत आहेत गंमत ही आहे की पुरोगामी/ सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या काळात भरपूर दहशतवादी हल्ले झाले. पण आता हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर गेल्या ४.५ वर्षात एक तरी झाला का? हेच २०१४ च्या आधी काँग्रेसच बोंबलत होती की नरेंद्र मोदी सत्तेवर आले तर देशभर दंगे होतील आणि त्यांना तथाकथित सेक्युलरांची पण साथ होती. कित्येकानी मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाऊ असे म्हणले होते. तर सेक्युलर सरकारांच्या काळात दंगे, दहशतवादी हल्ले होतात पण कट्टर म्हणवल्या जाणाऱ्या सरकारच्या काळात एक पण होत नाही हे कसं काय याविषयी तुमचं आकलन सांगा बघू. नोकऱ्या, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, रस्ते हे विषय सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे असायला हवेत पण त्यापासून त्याला भटकवून नेहमीच तो धोक्यात कसा आहे आणि कोणीतरी त्याला मारायलाच कसे बसलेले आहे कायदा व सुव्यवस्थेबद्दल वर सांगितलेलं आहे. आता तुमचा रोख जर बीफ वरून झालेल्या काही हत्यांकडे आहे तर मग तुम्ही झापड लावून फक्त दाखवलं जातंय तेवढंच बघताय. आरोग्य/ रस्ते यावर मोदी सरकारने गेल्या ४.५ वर्षात बरंच काम केलं आहे. जरा गुगलून बघितलं तर कळेल (फक्त cache क्लिअर करा). मला या विषयावर अश्या विखारी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. माझ्या सरळ स्पष्ट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत हे या आधीही सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही चर्चा तर करत नाहीच. मी आधीपण म्हणालो आहे, देशात न्यायालये आहेत आणि कोणीही कायदा मोडला तर त्याला शिक्षा करण्यास ती समर्थ आहेत! अरे वा! याच न्यायालयांनी मोदींना निर्दोष सोडलंय तर राजमाता आणि राजपुत्र यांना ५००० कोटींच्या घोटाळ्यात बेल दिलाय. त्यामुळे पुढेमागे शिक्षा झालीच तर तुमचे हे बोल लक्षात असुद्या. लोकांनी कायदा हातात घेऊन "निवाडा" करण्याचा किंवा "धडा शिकवण्याचा" प्रयत्न कृपया कधीही करू नये... मी असं कुठेही म्हणलेलं नाहीये. दंगल होते तेव्हाची परिस्थिती आणि मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. जर तुमच्यावर कोणी हत्यार घेऊन धावून आला तर तुम्ही पोलिसांची वाट बघणार का प्रतिकार करणार? म्हणूनच मी विचारलं की तुम्ही दंगल कधी अनुभवली आहे का? त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. अभ्या - असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे. कसला प्रचार? कसली चिथावणी? उगाच अर्थाचा अनर्थ करू नये ही विनंती. माझे सर्व प्रतिसाद एकदा तटस्थपणे वाचावेत, तरी जर चूक वाटत असेल तर काय चूक ते स्पष्ट करावे. मी कुठल्याही पक्षाचे मुखपत्र चालवत नाही तसेच मी कुठल्याही एका विचारसरणीला बांधील नाही. मला जे योग्य वाटेल तेच मी बोलतो/ लिहितो. आता ते लिहायला पण बंदी आहे का? माझ्या विचारस्वातंत्र्यावर बंदी आणायचा प्रयत्न का करताय?

In reply to by ट्रेड मार्क

माझ्या प्रतिसादात मोदी, काँग्रेस, बीफ, राजमाता असल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या एकाच दिशेने जाणाऱ्या विचारांमुळे किंवा "दिव्य दृष्टीमुळेच" दिसले असावे कदाचित! कारण सामान्य वाचकाला किंवा खुद्द मलाही बरेच शोधून असे काही दिसायचे नाही. असो, तुमचे असले विचार जरा स्पष्टपणे दाखवून देणे इतकेच मला करायचे होते बाकी संपादक मंडळ बघून घेईल... वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by शब्दबम्बाळ

तुम्हाला तुमचे प्रतिसाद स्पष्टपणे कळले किंवा मांडता आले तरी खूप झालं. हा विषयच काय पण माझ्या इतर विषयांवरच्या प्रतिसादांवर तुम्ही किंवा इथे कांगावा करणारे कोणी मुद्देसूद उत्तरं देऊ शकलेलं नाहीये. संपादक मंडळ बघून घेईल हे तुम्हाला आत्ता कळलं काय? आधी उगाच संपादक मंडळ इकडे बघा आणि तिकडे बघा म्हणून कशाला सांगत होतात? संपादक मंडळाला त्यांची जबाबदारी माहित आहे, त्यांना जर माझे प्रतिसाद आक्षेपार्ह वाटले तर उडवायला माझी काही हरकत नाही हे या आधीही मी स्पष्ट केलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमचा जन्म कधी होणार आहे हे कळलंय का?

In reply to by ट्रेड मार्क

भिवंडीत मुस्लिम लोकांची लोकसंख्या किती प्रमाणात आहे हे बघा. १९९२ पूर्वी भिवंडीत दंगली झाल्या तेव्हा मुस्लिम लोकसंख्या प्रचंड होती का? काहीही लॉजिक लावताय. बाकी हे मॉडेल जर एवढा यशस्वी आहे तर बाकी ठिकाणी का लागू केलं नाही? तुमच्या विचारसरणी सारखे असतात प्रत्येक सरकारमध्ये ,हाच मोठा अडथळा असतो. जेव्हा राज्यसरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात कमी पडते तेव्हाच जातीय दंगली होतात. बाकी तुम्ही दंगल अनुभवली आहे का याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीये. तुमच्या ओळखितले किती निरपराध ह्यात मारले गेले? किंवा दंगलीत नेमके किती निरपराधांचे बळी गेले? नेमका धडा कोणाला शिकवला गेला? ह्यांचे उत्तर तुम्ही दिले नाही. तूम्ही तर कपडे संभाळणाऱ्यांपैकी दिसतात.

In reply to by मार्मिक गोडसे

माझे जवळचे किती लोक मारले गेले यात तुमचा भलताच इंटरेस्ट दिसतोय. मी आकडा सांगितला तर उद्या प्रूफ मागाल. मृत्यू प्रमाणपत्र दाखवलं तर याच दंगलीत मारले गेले हे सिद्ध करा म्हणाल. मूर्खपणाला आणि पुरोगामीत्वाला काही सीमा नसते म्हणतात. मूळ मुद्दा गुजराथ दंगलीचा आहे आणि त्यात दंगल कधी अनुभवली आहे का याची मला विचारणा झाल्यावर मी फक्त सांगितलं की माझा जन्म मुंबईचा असल्याने मी मुंबईच्या दंगली बघितल्या आहेत. अजून एक मुद्दा स्पष्ट करतो - माझा दंगलींना किंवा कुठल्याही मारहाणीला किंवा अतिरेकाला पाठिंबा नाही. तुमच्या विचारसरणी सारखे असतात प्रत्येक सरकारमध्ये ,हाच मोठा अडथळा असतो १९९२ नंतर किती काळ कुठल्या राज्यांमध्ये पुरोगामी (पक्षी: काँग्रेस आणि सहयोगी) सरकारे होती आणि किती राज्यांमध्ये प्रतिगामी (पक्षी: भाजप आणि सहयोगी) सरकारे होती हे जरा नीट तपासून बघा. फक्त महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर १९६० पासून थे १९९५ पर्यंत सलग (१९८० सालातील ११२ दिवसांची राष्ट्रपती राजवट सोडता) काँग्रेसचे राज्य होते. त्यानंतर १९९५ ते १९९९ शिवसेना+ आणि नंतर ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत काँग्रेस+ चे सरकार होते. माझ्या सारखी विचारसरणी असलेले काँग्रेसमध्ये कोण आहेत हे स्पष्ट करावे. अजून एक म्हणजे या काळात महाराष्ट्रात किती दंगली आणि दहशतवादी हल्ले झाले हे बघावे. आता माझा मुद्दा परत एकदा स्पष्ट करतो - याच काळात गुजराथमध्ये कोणाची किती सरकारे होती बघा. १९९५-९६ मधला काळ वगळता आधी सगळी काँग्रेस+ ची सरकारे होती, नंतर मार्च १९९८ पासून सलग भाजपचे सरकार आहे. यात २००२ च्या दंगली नंतर एकतरी दंगल किंवा अतिरेकी हल्ला गुजराथ मध्ये झाला का? याचं कारण तुमच्या मते काय असावं? करताय थोडा विचार? सांगू शकाल कारण? दंगल करणाऱ्यांना धडा मिळाला का हेडमास्तर कडक असला की शाळेतली टगी पोरं गप्प बसतात त्यातला प्रकार असावा? का दोन्हीचा एकत्रित परिणाम असावा? तूम्ही तर कपडे संभाळणाऱ्यांपैकी दिसतात. तुम्ही तर नंतर व्हिडिओ बघून स्वतः अनुभव घेतला म्हणणाऱ्यातले दिसताय!

In reply to by ट्रेड मार्क

अजून एक मुद्दा स्पष्ट करतो - माझा दंगलींना किंवा मारहाणीला किंवा अतिरेकाला पाठिंबा नाही. गुड. मग धडा शिकविण्याच्या कोणत्या पद्धतीला तुमचा पाठिंबा आहे?किंवा गुजरातमध्ये कोणती पद्धत वापरली गेली होती?

In reply to by मार्मिक गोडसे

माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता तुम्ही माझ्या प्रतिसादातली निवडक वाक्य उचलून मलाच प्रतिप्रश्न करताय. याचा अर्थ असा की तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीयेत किंवा उत्तर देणे अवघड वाटत आहे. असो. मला असा प्रॉब्लेम नसल्याने मी नक्कीच उत्तर देऊ शकतो. मग धडा शिकविण्याच्या कोणत्या पद्धतीला तुमचा पाठिंबा आहे? मी स्वतःहून कोणाला उगाच त्रास द्यायला जात नाही. पण समोरचा त्रास देत असेल तर एकदा, दोनदा सांगून समजावून बघतो आणि तरीही नाहीच ऐकलं तर मग योग्य वेळ बघून असा धडा शिकवतो की परत माझ्या नादी लागणार नाही. धडा कोणता द्यायचा आणि कसा द्यायचा हे मला दिल्या गेलेल्या त्रासावरून आणि तत्कालीन परिस्थितीवरून मी ठरवतो. गुजरातमध्ये कोणती पद्धत वापरली गेली होती? २००२ दंगल हा पुरोगाम्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुले त्यावर बराच अभ्यास झाला असेल. तुम्ही सांगा बघू अशी कुठली पद्धत वापरली गेली की सर्वधर्मीय तिथे शांततेने राहू लागले? गुजराथमध्ये २००२ नंतर मोठी म्हणावी अशी एकही दंगल झाली नाही हे खरं आहे ना? मग आता तुम्ही हे कसं साध्य झालं असावं याच तुमचं आकलन सांगा टीप: मी मला वाटलेले कारण माझ्या प्रतिसादांमधून आधीच सांगितलेले आहे, ज्यावर तुम्ही आणि अजून १-२ जणांनी एवढा कांगावा केला. त्यामुळे परत तोच प्रश्न मला विचारू नये.

In reply to by ट्रेड मार्क

२००२ दंगल हा पुरोगाम्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुले त्यावर बराच अभ्यास झाला असेल. तुम्ही सांगा बघू अशी कुठली पद्धत वापरली गेली की सर्वधर्मीय तिथे शांततेने राहू लागले? पुरोगाम्यांचे जाऊद्या ,गुजरात दंगलीचा तुमचा अभ्यास जास्त दिसतोय. छातीठोकपणे गुजरातमध्ये ' धडा ' शिकवला इतकंच तुम्ही सांगताय. म्हणून नक्की काय धडा शिकवला ह्याबद्दल उत्सुकता आहे. गुळमुळीत बोलू नका, बिनधास्त बोला, कोणी काय कांगावा केला ह्याकडे दुर्लक्ष करा. कर नाही त्याला डर कशाला?

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क , इथं पण दुर्लक्ष करा !!! गोडसे भाऊ , पन्नास वेळा सांगून सुध्दा तेच तेच विचारले जात आहे . एव्हढी जर हौस आहे तर जा गुजरात मध्ये आणि विचारा ' त्या 'लोकांना काय धडा शिकवला ? कसा धडा शिकवला ? कुऱ्हाडीचा दांडा नका बनू राव ! तिकडे स्लीपर सेल वाले आतेरिकी लोकांना ब्लास्ट होई पर्यंत मस्त सांभाळतात . आज पर्यंत एक ही केस अशी नाही की मुस्लिम लोकांनी स्वतः पुढे येऊन सांगितलंय ' आमच्या वस्ती मध्ये अमुक एक व्यक्ती सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे किंवा आमच्या तरूणांची माथी भडकवत आहे ' . झालंय का कधी असं ? मग तुम्हाला का एव्हडा पुळका आलाय ? शीख हत्याकांड नंतर राजीव गांधींनी सुद्धा ' बडा पेंड गिरता है तो धरती हिलती है ' हा डायलॉग मारला होता तसं गुजरात मधील एकूण एक हिंदू तुम्हाला ' चांगला धडा शिकवला , त्यामुळे 2002 नंतर एक ही दंगल झाली नाही ' हेच ऐकवणार . मग तुम्ही त्या तमाम हिंदू लोकांना या विधानाचे स्पष्टीकरण मागू शकता का ?

In reply to by मार्मिक गोडसे

कसली गुळमुळीत उत्तरं देताय राव! मला जे सांगायचंय ते मी माझ्या प्रतिसादांमध्ये आधीच सांगितलंय. पण तुम्हाला काहीच उत्तर देता येत नाहीये त्यामुळे गोलगोल फिरणं चाललंय. ट्रम्प साहेब सांगत आहेत तसं जरा गुजराथमध्ये फिरून चर्चा करून घ्या. खरी परिस्थिती तुम्हाला तिथून कळेल, पुरोगामी वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेल बघून असंच गोलगोल फिराल. कोणी काय कांगावा केला ह्याकडे दुर्लक्ष करा. कर नाही त्याला डर कशाला? कोण सांगतंय? हाहाहा

In reply to by ट्रेड मार्क

मला जे सांगायचंय ते मी माझ्या प्रतिसादांमध्ये आधीच सांगितलंय तुमचा ' तो ' प्रतिसाद इथे डकवायला इतके आढेवेढे कशाला? उपाय इतका प्रभावी आहे तर का लपवत आहात?

In reply to by शब्दबम्बाळ

तथाकथित पुरोगाम्यांनी एक फुल जरी गोध्रा जळीतां साठी वाहिले असते तर त्यांचे पुरोगामीत्व जातिवादावर वरचढ ठरले असते . दंगली भडकण्यास काही अंशी पुरोगामी सुध्दा जबाबदार असतात . गोध्रा हत्याकांड झाले तेंव्हा पुरोगाम्यांना सर्वधर्म समभाव आठऊन गोल गोध्रा हल्लेखोरां बद्दल अवाक्षर न काढता उंदराच्या बिळात जाऊन बसले , त्यावेळी कुठल्याही पुरोगाम्यांनी गोध्रा जाळीत लोकां बद्दल आपुलकी दाखवून मुस्लिम लोकांचे कान उपटण्याची हिंमत दाखवली नाही . उलट गोध्रा केस कशी बनावट आहे या बद्दल कथा रचण्यात मशगुल झाले . शेवटी क्रिये ची प्रतिक्रिया उमटल्या नंतर तमाम भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांना जातीयवादी ठरवून मोकळे झाले . पुरोगामी लोकांचा ही जी भेदभाव ठेवण्याची वृत्ती आहे तीच जातीयवादाला खतपाणी घालत आहे .

In reply to by ट्रम्प

" अशा लोकांनी प्रत्यक्ष दंगलीचा अनुभव घेतला तर चुकूनही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाहीत. " याचा अर्थ " 65 वर्ष काँग्रेस बरोबर काळ्या पैशाची फळे चाखणारे पुरोगामी चुकूनही काँग्रेस ला विरोध करणार नाही " असा ही होऊ शकतो . भाजप सरकारने म्हणूनच सगळ्या एन जी ओ नां ( फक्त पुरोगाम्यांच्याच असतात हे ही विशेष ) देणग्या बद्दल ऑडिट करायला सांगितले व ज्यांनी नाही केले त्यांची मान्यता रद्द केली .

In reply to by शब्दबम्बाळ

....तुमच्यासाठी तरी मी पुरोगामीच आहे आणि तुमच्यासारख्या विचारांच्या माणसांना विरोध करणारच आहे....
माणसांना विरोध करण्याबद्दलची समस्या माणसांना विरोध करुन सोडवणे रंजक असावे.

त्यांच्या वैयक्तीक आयुश्याशी आपल्याला काहि घेणंदेणं नसावं. राहिला त्यांचा धर्म. मग जानवी घालून वेगवेगळ्या मंदिरांना भेट देणारे लोक कोण हो? किंवा हिरवी टोपी घालून इफ्तार पार्टी ला जाणारे लोक कोण असतात? आणि त्यांनी आपली संपत्ती कशाला जाहीर करायला हवी आहे निवडणुकी पूर्वी ते सुद्धा शपथपत्र देऊन. ते सर्व बंद करा म्हणजे एका एकरात पाच कोटी रुपये उत्पन्न देणारी जगातील सर्वात फायद्याची शेती पण करायला लागणार नाही. एकदा तुम्ही खिडकीत बसलात कि लोक शुक शुक करणारच. लोकांनी शुकशुक करू नये हि अपेक्षा साफ चुक आहे. वर https://www.misalpav.com/comment/1010716#comment-1010716 लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल लोकांना काहीच म्हणायचे नाहीये. दांभिक सुडोसेक्युलर पेक्षा शुद्ध मुसलमान किंवा किरिस्ताव हा हिंदूंना जास्त जवळचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

लोकांनी शुकशुकच काच, अवघा हलकल्लोळ करावा... पण या सगळ्या खटाटोपाने आपल्या पदरी काय पडणार याचा विचार प्रथम करावा. सिस्टीम राबवणार्‍यांची कुवत आणि कर्म बाजुला ठेऊन नुसतं त्यांच्या कुंडल्याच बघतो म्हटलं तर ते लोकं हिरव्या टोप्या आणि जानवीच दाखवतील.

In reply to by अर्धवटराव

क्त समान न्याय इतरांनाही लावावा हे आमचं मागणं आहे. पण या सगळ्या खटाटोपाने आपल्या पदरी काय पडणार याचा विचार प्रथम करावा तटस्थ नजरे बघायला गेलं तर जे काही चांगले वाईट निर्णय त्या त्या वेळेला तत्कालीन नेत्यांनी घेतले त्याची चर्चा करून आपल्या पदरी फार काही पडणार नाही. पण काही निर्णय त्यावेळेला फार मोठी उलथापालथ करणारे तर काही दूरगामी परिणाम करणारे असतात. जसे की आणीबाणी हा त्यावेळेला फार मोठी उलथापालथ करणारा निर्णय होता. दुसरा म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार ज्याची परिणीती शिखांची नाराजी ओढवून घेण्यात झाली . जर नेहरू-गांधी परिवाराची लीगसी फक्त कर्तृत्वाच्या बाजूने बघायची झाली आणि फाळणीच्या काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला प्रगतीपथावर नेण्याचे श्रेय जर त्यांना दिले जात असेल तर फाळणीच्या वेळेला परिस्थिती नीट न हाताळणे, हिंदूंची झालेली फरफट, काश्मीर प्रश्न, चीनची घुसखोरी, अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन, हिंदूंना देण्यात आलेली दुय्यम वागणूक, बांगलादेशचा सीमाप्रश्न नीट न हाताळणे, लायसन्सराज आणून लाचखोरीची कुरणे तयार करणे, एकूण भ्रष्टाचाराला पाठिंबा मिळेल अशी इकोसिस्टिम तयार करणे, उत्तरपूर्व राज्यांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष (ज्यामुळे तिथे सीमाप्रश्न निर्माण झाले) ईई. अशी बरीच यादी लांबवता येईल. दुसऱ्या बाजूने विचार करता, हे सगळं होऊन गेलं, ज्याचे परिणाम जनतेने भोगले किंवा भोगत आहेत. पण मग पुढील नेत्यांची निवड करताना तरी काळजी घ्यायला पाहिजे ना? ज्याच्या हातात आपण सिस्टिम द्यायला बघतोय त्याची कुवत आणि आत्तापर्यंतची कर्म काय आहेत? केवळ गांधी परिवारात जन्मला म्हणून ज्याला पंतप्रधान बनवण्यासाठी सगळे काँग्रेसी कष्ट करत आहेत त्या राहुल गांधींची कुवत काय आहे? आतापर्यंत एक संसद सदस्य म्हणून किंवा अगदी काँग्रेस उपाध्यक्ष/ अध्यक्ष म्हणून त्याची कर्म काय आहेत? ज्या अमेठीने पूर्वापार गांधी परिवाराला निवडून दिलं त्या अमेठीची परिस्थिती काय आहे? आपल्या मतदारसंघाला जे इतक्या वर्षात सुधारू शकले नाहीत ते देश काय सुधारणार हा प्रश्न गैरवाजवी आहे का?

In reply to by ट्रेड मार्क

युवराजांच्या पुर्वजांची कर्मं बघितली तर देशाचा थोडाफार हालहवाल कळेल. त्यांची बायोग्राफी बघितली तर मनोरंजनाचा मसाला मिळेल. त्याचा उपयोग आपला आपण ठरवायचा. असो.

25 Sep 2018 - 11:02 pm | अभ्या.. असल्या चिथावणीखोर प्रचाराचा निषेध करून संपादक मंडळींना पुन्हा एकदा विनंती करतो, नका हो कुणा पक्षाचे अथवा विचारसरणीचे मुखपत्र बनवू देऊ मिपाचे. -- मला या माणसाची कमाल वाटते. इतरांनी शिवसेना व त्या पक्षाच्या नेत्यांविरोधात काही जरी मिपावर लिहिले तर हा माणूस त्या प्रतिसादाचा/प्रतिसादकर्त्याचा, प्रतिकार हिरहिरिने करतो मात्र इतरांनी असेच काही केले/लिहिले तर तो माणूस मात्र एकाद्या पक्षाचा भक्त, प्रचार/प्रसार करणारा ठरतो ? -- या असल्या लोकांमुळे राजकिय विषयांवर अभ्यासू लिहिणारे, अनेक लेखक मिपापासून दूर झाले.

In reply to by प्रसाद_१९८२

कमाल तर आहेच, पन गंमत काय आहे ना की जितके शिवसेना विषयावर प्रतिसाद दिलेत त्याच्यपेक्षा कितीतरी जास्त लेखन कथा आणि इतर विषयावर लिहिले आहे. फक्त राजकारण आणि त्यातल्या त्यात विशिष्ट पक्षाला वाहून घेन्यासाठी आयडी नाही माझा. मुंबई पुण्याच्या शिवसेनेपेक्षा माझ्या भागातले शिवसेनेचे मला दिसलेले काम वेगळे आहे आणि फक्त तेच नोंदवलेले आहे. तेही धागे वगैरे न काढता. विरोध झाला की त्याला कुठल्यातरी पक्षाचे नाहीतर करंट फॅशननुसार देशभावनेचे लेबल लावायची पद्धत तुमची तुम्हाला लखलाभ. बादवे जरा ते अभ्यासू लिहिणारे कोण आयडी दूर गेले ते कळले तर बरे होईल. त्यांना प्रत्यक्ष विचारता तरी येईल माझा काय त्रास झाला ते.

राग मानू नका !!! पण खास करून जयंत कुलकर्णी साहेब कुठल्याही राजकीय वादात न पडता ध्रुव ताऱ्यासारखे मिपावर अढळ आहेत , व आपल्या नवनवीन लेखा द्वारे सर्वांच्या ज्ञानात भर घालत आहेत . त्या प्रमाणे राजकारण सोडून इतर विषयावर लिहणार्यांनी स्वतः ला राजकीय विषयावर प्रतिसाद देताना मर्यादा घालून घेतल्या म्हणजे ते अचानक ट्रोल न होता आदरणीय स्थानावर विराजमान होतील .

In reply to by ट्रम्प

वोव ट्रम्पतात्या, एकच नंबर. राग आज्याबात नाय. माझी खूप इच्छा आहे ध्रुव ताऱ्या प्रमाणे मिपावर अढळस्थानी विराजमान होण्याची. जयंतकाका त्यांच्या सकस लिखाणाने झाले आहेत त्यांच्याबद्दल आदर आहेच पण ते राजकारणावर काही मत नोंदवत नाहीत म्हणून त्यांना अढळस्थान मिळाले आहे हे माहीत नव्हते. येनिवे तुमचा फंडा आवडला आहे फक्त थोड्या शंका आहेत. म्हणजे इतर विषयावर लिखाण करायचं पण राजकारणावर गप्प बसायचं, असा की, इतर विषयावर लिहून राजकारणात फक्त मोदिसमर्थनार्थ लिहायचे, की इतर काहीही लिहा पण मोदींविरोधात काही लिहू नका. म्हणजे तुम्ही म्हणताहात त्या लेखनाच्या मर्यादा स्पष्ट कळल्या म्हणजे त्या फॉलो करून लवकरात लवकर अढळस्थानी विराजमान व्हावे म्हणतो. जरा लवकर सांगितले तर बरे.

In reply to by अभ्या..

ख्या !! ख्या !!! डोळे पाणावले बघा आमचे ! मिपावर असं आमच्या बद्दल आदरयुक्त शब्द येत नाही वो कधी, तुम्हाला चार गोष्टी सांगायला मला ज्ञान असते तर मी सुद्धा लेखांचा रतीब लावला नसता का ? मिपावर कथा , कविता , इतिहास वरील लेखन किंवा पर्यटन अश्या विषयावर लिहून मिपाला समृध्द करणारे आयडी कमी झाले आहेत अस वाटतंय . मग जे काही सेनापती शिल्लक आहेत ते आमच्या सारख्या क्षुल्लक सैनिकांच्या हल्ल्याला बळी पडून मिपावर येण्याचे टाळतात , म्हणून जयंत काका प्रमाणे ' आपुला मार्ग वेगळा ' ध्येया प्रमाणे वाटचाल ठेवली तर ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहून वेळप्रसंगी इतरांना मार्ग दाखवताल . सध्या मिपावर मोदींभक्ता चे पीक जोरात आहे , पाऊस वेळेवर नाही पडला तर ते पीक / गवत वाळून जाणार आहेच . ते गवत कापण्या साठी तुमच्या सारख्या धुरंधर सेनानी तलवार घेऊन उतरू नये असं या गरीबाला वाटले , एव्हढच .

देशाविरुद्द कारस्थान करुन देशाअंतर्गत दुफळी माजवुन देशाला कमकुवत करण्याच काम करणार्या पाच अर्बन नक्षल लोकांविरुद्द सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज आलेला आहे. गेल्या महीन्यात देश भरातुन पाच लोकांच्या धर पकडीवर सर्वोच्च न्यायालयात रोमिला थापर व ईतर चार लोकांनी (अर्बन नक्षल) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. ह्या याचिकेची सुनावणी करता अर्बन नक्षल गँग कडुन प्रशांत भुषण नावाचा अजुन एक अर्बन नक्षल कंबर कसुन काम करत होता. आज आलेल्या निकाला मुळे ह्या अर्बन नक्षल गँग चे तोंड पडलेले आहे. पण ह्या अर्बन नक्षल गँग कडुन देशाला किती मोठा धोका आहे हे अजुन प्रकर्शाने समोर आलेले आहे.

Elgar Parishad Probe: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री फडणवीस नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई करत केलेल्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पुणे पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिलं जात असेल तर आपण कोणाला समर्थन देत आहोत याचा विचार केला गेला पाहिजे असंही मुख्यमंत्री बोलले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाच्या विरोधातील कट, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करुन, अंतर्गत वाद निरमाण व्हावा हा प्रयत्न उघड होत आहे असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हा वादाचा विषय असू शकतो. त्यावेळी अनेकजण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप करत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले होते. मात्र यामुळे देशाविरोधात कट रचला गेला हा मुद्दा दुर्लक्षित करु शकत नाही’. न्यायालयाने काय निर्णय दिला ? सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यासोबतच पाचही जणांच्या स्थानबद्धतेत चार आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने पाचही जणांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित नसल्याचं सांगताना पोलिसांकडून बळाचा वापर झाला नसल्याचं स्पष्ट केलं. सोबतच आरोपी कोणत्या तपास संस्थेने तपास केला पाहिजे याची निवड करु शकत नसल्याचं सांगत एसआयटीन नेमण्यास नकार दिला. आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाने या पाच जणांविरुद्ध

सकृत दर्शनी पुरावा आहे

असे स्पष्ट म्हटले आहे. (म्हणूनच याना जामिनावर सोडण्यास किंवा विशेष तपास आयोग नेमण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.) म्हणजेच यांची अटक हि राजकीय हेतूंनी प्रेरित नाही हे स्पष्ट होते. शिवाय त्यांना खालच्या कोर्टाने जामीनावर न सोडता अटकेत टाकले तर न्यायालये पक्षपाती आहेत किंवा सरकार न्यायालयावर दबाव टाकत आहे असा आरोप करणे पुरोगामी लोकांना कठीण जाईल.

सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत (original) न्यायसन नाही तर आव्हान देण्याचे न्यायासन(appelate) आहे. म्हणजेच सामान्य फौजदारी खटला थेट सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही. मूलभूत हक्कांचा प्रश्न असेल तर (भारतीय घटना कलम ३२) त्यात सर्वोच्च न्यायालय लक्ष घालू शकते. अगदी रीट अर्ज सुद्धा ऐकण्याचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नाही तर तो उच्च न्यायालयाला आहे.(भारतीय घटना कलम २२६) त्यामुळे त्यांनी जामीन हवा असेल तर खालच्या कोर्टात जा असेच याचिका कर्त्यांना सांगितले आहे तसेच सरकारला सुद्धा जर पोलीस/न्यायालयीन कोठडी हवी असेल तर परत खालच्या कोर्टातच जावे लागेल.

ह्या सर्वोच्च कोर्टाच्या निकालानंतर अर्बन नक्षल ईंदिरा जयसींग नावाच्या वकिलांने सरळ सरळ चीफ जस्टिस श्री दिपक मिश्रायांच्या वरच टिकास्त्र सोडल आहे. अर्बन नक्षल आता हताश होत आहेत हेच आता पुढे येत आहे . खरोखरच देश द्रोही लोक आहेत ही अर्बन नक्षल गँग !