'हिंसक घटना' हे लोकशाहीचे अपयश की लोकशाही चालवणार्यांचे
सामाजिक, राजकीय कारणांनी होणार्या'हिंसक घटनांनी व्यक्तिग्त, सामाजिक, आर्थिक नुकसान या बद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. हिंसा होऊ नयेत या बद्दल सर्वजण सहमत असतात, पण कुठेतरी काही तरी बिनसते आणि रस्त्यावर हिंसा दिसते. गेली पाउणे दोनशे वर्षे वर्षोंवर्षे सरकारे विरोधी पक्ष आंदोलक आणि आंदोलनांची कारणे बदलतात पण रस्त्यावरची हिंसा टळत नाहीए. ती अगदी महात्मा गांधींच्या काळात टळली नव्हती, अगदी इतिहास काळापासून ते आज तागायत वेळ प्रसंगी हिंसा अंहिंसावाद्यांच्या नावेही होतात. ब्रिटीशांची परकीय सत्ता होती ती गेली . लोकांचे राज्य आले लोकांच्या अपेक्षा तक्रारी खदखद हि लोक्शाही मार्गाने कायदे मंडळात व्यक्त होऊन लोकांना न्याय मिळावा हा लोकशाहीचा उद्देश्य व्यवस्थीत पार पडत गेला तर सहसा सार्वजनिक हिंसेसाठी कारणे शिल्लक रहावयास नकोत.
माझा या चर्चेचा उद्देश्य केवळ सध्या चालू किंवा मागच्या ७० वर्षातील कोणत्याही विशीष्ट आंदोलनांना वेगळे काढून ब्लेम करण्याचा उद्देश्य नाही. कुठेतरी काही तरी बिनसत , लोकशाहीने अपेक्षित दखल नाही घेतली की स्पिल ओव्हर होत कुठे तरी हिंसक घटना घडते आपण तात्पुरते सुन्न होतो पण आंदोलनाची कारणे, सरकारे, विरोधी पक्ष बदलले तरी वर्षानुगतीक होणार्या हिंसा चुकत नाहीत. आता गेली सत्तर वर्षांपासुन ब्लेम करण्यासाठी परकीय राज्यकर्तेही नाहीत. तरीही सार्वजनिक हिंसा होतात हे अपयश लोकशाहीचे की लोकशाही चालवणार्यांचे ?
पुन्हा एकदा विषय सध्या चालू आंदोलना पुरता मर्यादीत नाही. माझ्या डोळ्या समोर गेल्या सुमारे पाऊणे दोनशे वर्षांचा सार्वजनिक हिंसाचाराचा इतिहास आहे. सहसा बहुतांश वेळा हिंसा छोट्याश्या पॉकेट्स(स्थळा) पुरत्या मर्यादीत असतात. बातम्या पोहोचवणारी साधने वाढल्यामुळेही सगळी कडे सतत हिंसाचारच चालू आहे असे वाटते . प्रत्यक्षात काही पॉकेट्स सोडली तर बाकी भाग शांत असतो. पण कोणत्याही सुसंस्कृत व्यवस्थेत एवढ्याही हिंसाचाराचे कारण / शक्यता शिल्लक का रहावी ? संतज्ञानदेव म्हणतात जो जे वांछिल तो ते लाहो. हव ते मिळवण्यासाथी हिंसेचा आश्रय घेण्याची वेळच येऊ नये, असे लोकशाही नेतृत्व हवे, अशी लोकशाही व्यवस्था हवी असा समाज हवा. तर असे लोकशाही नेतृत्व आपल्यातूनच निर्माण करण्यात जनता कमी पडते आहे ? लोकशाही नेतृत्व केवळ सरकारी पक्षाचे नव्हे तर सर्व बाजूचे कमी पडते आहे ? कि आपण निवडलेल्या लोकशाही व्यवस्थेत काही दोष राहून गेले आहेत आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे ?
मिपा संस्थळ शतकोंशतके चालेल ह्या अपेक्षांवर भरवसा ठेवऊनच मी चर्चा धागे काढतो. राजकीय चर्चा करणे बर्याचदा जिवावर येते पण समाजात खदखदणार्या विषयांवर चर्चा न होणे क्धी कुठे कधी कुठे कुणाच्या जिवनावर जाऊन पोहोचत असते. हि धागा चर्चा शतकी प्रतिसादाम्चॉ व्हावी लगेच व्हावी अशी कोणतीच अपेक्षा नाही. चर्चा सावकाश काळाच्या ओघात अगदी काही दशके लागली तरी चालतील अभ्यासपुर्ण जास्त समाजाला भावी काळ सुकर सौहार्दपूर्ण ठेव्ण्यासाठी मदत करणारी असावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रतिसादांची घाई टाळण्यासाठी आभार.
* अनुषंगिका पलिकडे अवांतरे, आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण, सुसंदर्भ, तर्कसुसंगत चर्चेसाठी आभार.
याद्या
9414
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
छान लिहिले आहे ,
डेव्ह फर्नांडिस साहेबांना "
या वरच्या
कारण कुणाही व्यक्ती, समुदाय,
In reply to या वरच्या by प्रसाद_१९८२
(संपादित)
मी धागा आत्ता काढला आहे . अशा
In reply to अकारण असभ्यता फ्लॅग, मि पा. मालकांनी नोंद घ्यावी by माहितगार
__/\__
In reply to मी धागा आत्ता काढला आहे . अशा by गणामास्तर
मालकांनी हाफिज सय्यद ( शारुख
ओके डोनूतात्या.
In reply to मालकांनी हाफिज सय्यद ( शारुख by ट्रम्प
__/\__
In reply to मालकांनी हाफिज सय्यद ( शारुख by ट्रम्प
हींसक घटना हे खरं तर हिंसा करणाऱ्या
हिंसा म्हणजे काय रे भाऊ?
ह्या धाग्यावर नक्की कोणती
१
In reply to ह्या धाग्यावर नक्की कोणती by रंगीला रतन
माझे आसाम समस्या विषयक
In reply to १ by माहितगार
२
In reply to ह्या धाग्यावर नक्की कोणती by रंगीला रतन
लेखकाचे नाव अहिंसावादी पाहिजे
हिंसा म्हणजे रक्तरंजित संघर्ष की आणखी काही
खाली काही उदाहरणे घ्या:
सामाजिक, राजकीय कारणांनी
In reply to खाली काही उदाहरणे घ्या: by वीणा३
राजकीय समस्या ह्या सामाजिक समस्येची प्रती छाया
सामाजिक, राजकीय कारणांनी
In reply to राजकीय समस्या ह्या सामाजिक समस्येची प्रती छाया by Rajesh188