मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - भाग ३२

वामन देशमुख · · काथ्याकूट
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67268 वाचनखूण प्रतिक्रिया 309

manguu@mail.com 04/05/2018 - 07:55
http://www.freepressjournal.in/mumbai/thane-private-coaching-classes-to-protest-against-maharashtra-governments-new-policy/1201837 नवे रुल्स आले ? खाजगी क्लासवाल्याना 10000 रु रजिस्ट्रेशन फी शिवाय उत्पन्नाच्य 5 % सरकारला द्यायचे म्हणे ! इन्कम Tax , GST वेगळाच . मोघल इंग्रजाही इतके tax लावत नव्हते.

manguu@mail.com 04/05/2018 - 08:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार नाही तर सिधा रुपया सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. लाच म्हणून पैसे दिल्याशिवाय इथे कोणतेही काम होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कलबुर्गी, बेल्लारी आणि बंगळुरू या ठिकाणी झालेल्या रॅलीत हजर होते. त्या दरम्यानच्या एका भाषणात त्यांनी ही घणाघाती टीका केली आहे. ------------ मग हे त्यांना अटक का करत नाहीत ?

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com 04/05/2018 - 09:43
मोदी स्वतःच बोलतात .. सिद्ध रामय्या लाच खातात. तरीही ते action घेत नाहीत. म्हणजे मोदीनाही / भाजपालाही काही पोचत असेल का ? -------

खाजगी क्लासेस आता रेल्वे स्टेशन वर सुरू करावे. बऱ्याच अटींची पूर्तता होऊ शकेल. टॉयलेट, वेटींग रूम, पार्किंग... २ वर्षाच्या शिक्षेवर GST लावणार की नाही ?

प्रचाराला जोर येतोय. खाणसम्राट रेड्डींना बळ्ळारीमधून भाजपाने उमेद्वारी दिली आहेच.
The BJP has defended the move as a "compromise", claiming they are the party's best chances for a victory in the area. The Central leadership, which presumably approved the move, has been silent despite numerous Congress demands for an explanation.
कर्नाटकात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत असे मोदीनी म्हणायचे व त्याच्वेळी ह्या लोकांना तिकीटपण द्यायचे. https://www.ndtv.com/karnataka-news/karnataka-assembly-election-in-ballari-pm-shares-stage-with-corruption-charged-reddy-brother-1846737

बिटाकाका 04/05/2018 - 09:58
सं. मं. नी फक्त सतत एखाद्या पक्षाच्या बाजूने लिहिण्यावर आक्षेप घेतलेला आहे, सतत एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलण्यावर नाही. त्यामुळे दळण निवांत दळता येणार आहे.

In reply to by बिटाकाका

अभ्या.. 04/05/2018 - 10:14
जवारी संपली की गहू टाका, हाकानाका. कधीतरी स्वयंपाकाला बसावे लागेलच ना. आयुष्यभर दळण थोडीच चालणारे?

In reply to by अभ्या..

बिटाकाका 04/05/2018 - 10:27
आपल्याला काही करालेच लागत नाय ना भौ! त्यांचेच गहू, त्यांचीच जवारी आणि त्यांचीच बाजरी. आपण निस्तं नीट दळलं का ते बघा लागते. सैपाक बी तेहींच करते आणि जेवालेबी तेहींच वाढतेत. आपण कंदीमंदी जेवण कसे ते सांगा लागते. लै मंजी लैच मजा येऊ राह्यली!

In reply to by बिटाकाका

विशुमित 04/05/2018 - 11:44
तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात.>> ==>>विशेष सूचनेत मला जेवढे समजले त्या नुसार संपादक मंडळाला यावर जास्त आक्षेप आहे. सरकारविरोधी सतत लिहीत राहणे मी समजतो लोकशाहीसाठी पूरकच आहे. ज्याला बाजू घायची आहे त्यांनी अवश्य घ्यावी, फक्त तिथे वादा ऐवजी संवाद असावा, प्रत्येक सदस्याची एवढीच माफक अपेक्षा असावी.

In reply to by विशुमित

बिटाकाका 04/05/2018 - 11:55
तेच तर! दोन्ही गटांना वाटतंय कि ती सूचना समोरच्या बाजूसाठी लिहिलीय. काहीजणांनी तर ती सूचना प्रतिसादात सुद्धा वापरली. --------------------------------- एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही. ------------------------------ "मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.

In reply to by बिटाकाका

विशुमित 04/05/2018 - 12:33
एकांगी, खोट्या आणि विशिष्ट हेतूने लिहिलेल्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या ट्रोल पोस्ट (अर्थातच अधिकृत नसलेल्या) स्वतःचा विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी वापरणे हे लोकशाहीला पूरक आहे असे म्हणवत नाही.>> ==>> बहुतांशी बातम्या ह्या वृत्तपत्रीय असतात त्या एकांगी आहेत , खोट्या आहेत आणि विशिष्ट हेतूने लिहल्या आहेत हे सिद्ध करायचे काम कोणाचे आहे? ज्याचे त्या बातम्यांबाबत विरोधी/वेगळे मत आहे त्याने व्यक्त करावे. फक्त विषयाला धरून आणि सभ्य भाषेत एवढीच अपेक्षा. याने उलट एखाद्या घटनेकडे बघण्याचे विविध पैलू प्रत्येकाला समजेल आणि मला यामुळेच वाटते की हेच लोकशाहीसाठी पूरक आहे. आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच. मागे कदाचित मी देखील ह्या गोष्टी केल्या असतील पुढे त्या होणार नाहीत याची काळजी घेईन आणि इतरांनी देखील ती घ्यावी अशी आशा करतो. ==== "मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही." हे वाक्य जास्त महत्वाचे वाटते.>> ==>> काही सदस्यांच्या अँफेर डॉमिनन्स मुळे मिपाचे तसे चित्र दिसत होते, ते मोडीत काढणे जरुरीचे होते. मालकांनी केले ते उत्तम केले.

In reply to by विशुमित

माहितगार 04/05/2018 - 14:48
....आता कोणी विशिष्ट पक्षांविरुद्धचा राग बाहेर काढण्यासाठी खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, राजकीय नेत्यांचा एकेरी/ द्वेषयुक्त उल्लेख, फेकू, पप्पू, कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण असे काही उल्लेख करत असतील तर त्यांना समाज देणे महत्वाचे आहेच....
मी उलट्या दिशेने काही प्रतिसाद चाळण्यास घेतले त्यामुळे या प्रतिसादाचा काँटेक्स्ट माहित नाही. मी या चर्चांमध्ये सातत्याने डोके घालत नसल्याने मला कदाचित कमी त्रास जाणवत असेल , कुचेष्टेने विशिष्ट शांतताप्रिय धर्म, जातिसमूहाबद्दल अयोग्य सरसकटीकरण टाळावे ; मिपा सदस्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टिका टाळावी या बाबत सहमत आहे . पण राजकीय नेते आणि राजकीय पक्षांचा राग येत असताना तो व्यक्त होऊ नये हे तेवढेसे पटले नाही. माझे असे डिफेंड करणे मिपा धोरणात बसत नसेल तर संपादकांनी डिलीट करावे पण फेकू, पप्पू, हे शब्द आदर्श नसले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत बसावयास हवे चुभूदेघे खान्ग्रेस्स, राष्ट्रव्याधी, खाजप, हेही खपवून घ्यावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुम्ही (म्हणजे तुम्ही नव्हे कुणीही ) हे शब्द दडपले तर नव्या शब्दांचा शोध लावला जाईल द्वैअर्थी लेखनात भारतीय लोक तरबेज आहेत. भारतींयांची डोकी आणि तोंडे एवढ्या सहज बंद करता आली असती तर भारतीय लोकशाहीचा एव्हाना चीन झाला असता . असो

In reply to by अभ्या..

विशुमित 04/05/2018 - 11:36
जवारी संपली की गहू टाका, हाकानाका.>> ==>> ते करताना जातं बदललं पाहिजे ना ! ज्वारीवर गहूं टाकलं तर गव्हाचं पीठ वडाक येणारच. पण गव्हावर ज्वारी टाकली तर ज्वारीच्या पिठाला जास्त फरक पडत नाही. ज्वारी आणि गहू काय आहेत हे प्रत्येकाने आप आपले ठरवावे. (एके काळी अख्या गावाचे दळण दळण्याची चक्की चालवायचा अनुभव बोलतोय)

In reply to by mayu4u

विशुमित 04/05/2018 - 12:36
वडाक म्हणजे ज्वारी/बाजरीमुळे गव्हाचे पीठ करा काळपट दिसते किंवा चपाती नीट लाटली जात नाही. भाकरीचा फील येतो. पुणे/सोलापूर ग्रामीण भागात वापरला जातो.

पुंबा 04/05/2018 - 12:08
http://www.thehindu.com/opinion/op-ed/into-the-brave-new-age-of-irrationality/article23763781.ece?homepage=true उत्तम लेख.
The vigour with which the government is making an assault on the scientific temper only confirms that it is actually frightened of it. This is the reason why authoritarian regimes are often intolerant of those who champion the spirit of science, but encourage scientists who will launch satellites and develop nuclear weapons — even as they break coconuts, chant hymns and press “Enter” with their fingers laden with auspicious stones.
हा परिच्छेद विशेष आवडला.

In reply to by पुंबा

गामा पैलवान 04/05/2018 - 21:04
लेखाखाली माझा प्रतिसाद दिलेला आहे. बघूया पेपरवाले छापतात का. Sanjay Rajoura is a fcuking idiot. In the very second sentence he equates science with rationality. What a balderdash! Many pathbreaking scientific discoveries were due to irrational thinking. Yeah, 'irrationality' is another name for 'out of the box' thinking. This comedian has made himself a laughing stock indeed! That's rationality, isn't it? :-D -Gamma Pailvan

अभ्या.. 04/05/2018 - 12:09
बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ… कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो. पुरे झालं आता हे सगळं! चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…
. सांगा बघु हे कुठले आहे?

अभ्या., अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 04/05/2018 - 14:27
...अरे निवडणूकीचा काळ आहे.. तेव्हा ताज्या घडामोडींमध्ये असे वाद-विवाद असणारच ना? ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..
माई , प्रतिसाद खालून वर चाळण्यास घेतल्यामुळे नेमका काँटेक्स्ट माहित नाही, पण ...ज्यांना ते नको आहे, त्यांच्यासाठी ठिपक्यांची मनोली,अनवट किल्ले, सुक्या सोड्यांचे कालवण, हिरवाईच्या गप्पा आहेतच की..' हि कॉमेंट लै आवडली :)

manguu@mail.com 04/05/2018 - 13:20
केनद्रात भाजपा आणि राज्यात काँग्रेस असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस राज्यशासन जबाबदार असते. केनद्रात काँग्रेस आणि राज्यात भाजपा असेल तर तिथल्या प्रश्नांना काँग्रेस केंद्र शासन जबाबदार असते. दोन्हीकडे भाजप असेल तर तिथल्या प्रश्नांना नेहरू जबाबदार असतात.

arunjoshi123 04/05/2018 - 14:27
https://rightlog.in/2018/05/dalit-group-tamil-nadu-stuns-nation-demand-withdrawal-sc-st-status/
In a move which is bound to stun the nation and upset a few political equations, members of the Devendra Kula Vellalars, who have the Scheduled Caste status, have made up their mind to relinquish the same. Yes, the Vellalars are all ready to give up the privileges that the Central, as well as the Tamil Nadu (where they hail from) governments provide them under the system of reservation.

In reply to by arunjoshi123

आरक्षणावर आधारलेले जातीपातींचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याच्या कारवाया करणार्‍यांच्या पायाखालचा गालिचा ओढून त्यांना धाराशायी करणार्‍या Devendra Kula Vellalars यांचे असंख्य आभार आणि अभिनंदन !!! दलित राजकारण नेहमीच केंद्रभागी असणार्‍या तामिळनाडूमध्ये असे घडावे, हे जेवढे आश्चर्यकारक आहे तेवढेच भविष्याबद्दल आशादायी आहे ! भारतिय सामाजिक व्यवस्थेच्या वाटचालीतला ही घटना नक्कीच मैलाचा दगड ठरेल. भारत हा जगातील फक्त एकुलता एक देश असावा जेथे विविध समाज (आणि विशेषतः त्यांचे नेते), "आपला समाज कसा इतरांपेक्षा जास्त मागासलेला आहे, त्याच्यात स्वतःच्या धमकेवर काही करण्याची कशी ताकद नाही आणि म्हणून सरकारने त्याला विशेष सोयी-सवलती-आरक्षण इत्यादी दिले पाहिजे" यावर आपली शक्ती खर्च करण्यात धन्यता मानत आहेत. या पार्श्वभूमीवर Devendra Kula Vellalars यांचींही कृती विशेष उठून दिसत आहे. सामाजिक दृष्ट्या अती-अविकसित समजल्या जाणार्‍या SC प्रकारातील एका समाजघटकाने हा "सामाजिक वैचारिक प्रगल्भतेचा" पायंडा पाडावा हे विशेष !!! इतर सर्व समाजघटकांनी त्यांचा हा स्वाभिमानी आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर भारतात खर्‍या अर्थाने उर्जितावस्था यायला वेळ लागणार नाही. त्या बातमीत त्या समाजाच्या नेत्यांची उद्धृत केलेले खालील वाक्य वाचून कोणाही स्वाभिमानी भारतियाला त्यांच्याबद्दल अभिमान आणि आदर वाटल्याशिवाय राहणार नाही... In their words, “…that the community is seen as just a vote bank. And as we want upward mobility and progress, the group has decided to pull out of the SC list.” Devendra Kula Vellalars समाजाचे परत एकदा असंख्य आभार आणि अभिनंदन !!!

arunjoshi123 04/05/2018 - 14:52
https://rightlog.in/2018/05/madrasa-rape-01/
In the aftermath of the Kathua rape case, we witnessed another phony outrage by the self-appointed moral guardians of society. However, none were as revolting as the placard carrying actors from Bollywood. When Bollywood did manage to muster its voice, it was only to malign an entire community and its religious symbols. One actress, who has named her son after a genocidal maniac who reveled in the sexual exploitation of women, was also seen carrying a placard. Another actress whose father can be seen beside Dawood, the dreaded underworld don, in pictures that were doing the rounds on social media, was also seen carrying a placard that appears to target the Hindu faith more than the actual perpetrators of the heinous crime. And there is a third one who felt reduced to female genitalia after watching Padmaavat. There is no outrage from their side, and considering their glorious track record, it will be worthless to expect anything from them.
भाषांतर: कठुआ येथील बलात्काराच्या घटनेनंतर, आपाल्याला स्वघोषित नितिमत्तेच्या रक्षकांचा एक लटका, दांभिक संताप बघायला मिळाला. तरी, फलकधारी बॉलिवूड अभिनेत्यांइतका उद्रेक कोणाचाच नव्हता. शेवटी बॉलिवूडकारांना जेव्हा आपली गर्जना करता आली तेव्हा ती केवळ एका विशीष्ट समुदायाचे प्रतिमाहनन करण्यासाठी नि त्याच्या धार्मिक चिन्हांचा अपमान करण्यासाठी होती. यात एक अभिनेत्री अशी होती जिने आपल्या मुलाचे नाव विकृत वंशविच्छेदकाच्यापाठी वा वासनांधापाठी ठेवलेले. दुसरीचा पिता दाऊद शेजारी दिसे. आणि तिसरीला राणी पद्मावतीची कथा पाहून आपण एक योनी उरलो आहोत (म्हणजे राणी = योनि) असे वाटलेले. त्यांचेकडून संताप व्यक्त झालेला नाही नि अतीत पाहता होणारही नाही.

In reply to by arunjoshi123

manguu@mail.com 04/05/2018 - 15:26
इतरांच्या नावानची इतकी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्य पोरांना नरेंद्र देवेंद्र अर्जुन परशुराम नथुराम अशी सुंदर सुंदर नावे ठेवावीत.

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 04/05/2018 - 18:46
इतरांना नावावरुन सल्ले देणार्यांनी , ईतरांच्या धर्मा बद्दल अर्वाच्च्य लिहीण्यापेक्षा स्वतःच नविन धारण केलेल्या ईस्लाम धर्माबद्दल लिहा !!

arunjoshi123 04/05/2018 - 15:01
https://rightlog.in/2018/05/sikh-punjab-congress-01/ ============================
Twenty three chapters which include lessons on Sikh Gurus, their teachings, the struggle of the Sikhs against the Mughals, the Sikh empire including chapters on Sher-e-Punjab Maharaja Ranjit Singh, the Anglo-Sikh War are among the the deletions by the PSEB.
======================
Adding to the controversy, Professor Gurmeet Singh Sidhu, HoD, Religious studies, Punjabi University has stated that PSEB had omitted major parts of Sikh history and that the version present in the books was factually wrong and that there was a clear distortion of history. If this is the state of affairs in Punjab, where Sikhism was born and took shape, what can we expect the other states to be studying about Sikh history?
या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल? ================

In reply to by arunjoshi123

विशुमित 04/05/2018 - 15:29
या वादंगात भर घालत, धर्म अभ्यासाचे प्राध्यापक श्री गुरमीत सिद्धू म्हणाले गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता. पंजाबात शिखांच्या इतिहासाची ही अवस्था आहे तर अन्यत्र काय होइल?>> ==>> भावा नवनवीन साधने उपलब्ध झाली की इतिहासात बदल होऊ शकतो की ? गाळलेला बहुतांश भाग इतिहासाचा विपर्यास होता असे म्हणाऱ्या प्राध्यापकांनी पुरावे सादर करावेत आणि वादावर पडदा टाकावा. ==== यात मुघल आलेत म्हणून काही विवेचाना आली आहे का उजव्यांना आय मिन rightlog वाल्याना??

arunjoshi123 04/05/2018 - 15:11
https://rightlog.in/2018/05/cambridge-analytica-congress-india-01/
काँग्रेस पक्षास भारतीय लोकांबद्दलची विविध स्रोतांमधून मिळालेली माहिती (चांगल्या प्रकारे) वापरून सहाय करणारी केंब्रिज अनालिटिका ही कंपनी दुर्दैवाने बंद पडली आहे. ===========================
While he doesn’t deny that his employers might have worked with other political parties as well, the Congress party was nonetheless their biggest and most trusted client in India.
(भारत देशाच्या विकासास अत्यावश्यक अशी ही) सेवा अन्य कोणी घेत असेल वा नसेल, काँग्रेस हे कंपनीचे सर्वात मोठे आणि खात्रीचे गिर्‍हाईक होते असं कंपनीचे अधिकारी म्हणतात.

In reply to by arunjoshi123

असेल नसेल नाही रे अरूण. सर्व पक्षांनी ह्या पद्धतीचा वापर केला आहे. Cambridge Analytica's Indian partner lists BJP, Congress, JD(U) in client list https://www.theweek.in/news/india/2018/03/21/cambridge-analytica-indian-partner-lists-bjp-congress-jdu-in-client-list-oveleno-business-intelligence.html

arunjoshi123 04/05/2018 - 15:54
http://www.panchjanya.com/Encyc/2018/4/30/dharmo-main-dikhawati-samanata.html
हमें समझना चाहिए कि हमारे मार्ग भिन्न होंगे। सभी एक ही मार्ग पर नहीं चल सकते, न ही एक ही धर्म का या तथाकथित 'शाश्वत मूल्यों' तक का पालन कर सकते हैं। नतीजतन, हमें एक-दूसरे के मार्गों का मूल्यांकन करने से, या जबरदस्ती उन समानताओं को ढूंढने से बचना चाहिए जो होती ही नहीं हैं। हमें भिन्नताओं का सम्मान करना सीखना होगा। यह कोई प्रतियोगिता नहीं है। हमें दूसरे धर्मों को केवल बर्दाश्त' ही नहीं करना चाहिए, उनका सम्मान भी करना चाहिए। मैं आपके मार्ग का सम्मान करता हूं और आप मेरे मार्ग का सम्मान करें (मगर जरूरी बात यह है: सम्मान दोनों ओर से होना चाहिए, किसी एक ओर से नहीं)।
भाषांतर - आपल्याला कळायला हवं कि आपले मार्ग भिन्न आहे. सर्व जण एकाच मार्गावर चालू शकत नाहीत आणि सर्व जण एकाच धर्माचे वा कोणा शाश्वत मूल्यांचे पालन करू शकत नाहीत. परिणामतः, आपण एकमेकांचे मूल्यमापन करणे वा ज्या मूळात नसतातच त्या समानता शोधणे हे प्रकार टाळले पाहिजेत. आपण विविधतांचा सन्मान करायला हवा. धर्मांत अशी कोणती स्पर्धा लागलेली नाही. आपण अन्य धर्मांना केवळ सहन करावे असे नव्हे तर त्याचा आदर केला पाहिजे. मी आपल्या मार्गाचा सन्मान करेन नि आपण माझ्या. एक मात्र आहे कि सन्मान दोन्ही बाजूंनी हवा, एकच नव्हे.

In reply to by arunjoshi123

खरे आहे पण हे सगळ्याना कळायला हवे- One may follow a different religion, different culture, philosophy, language and style of eating but everyone living in India is a Hindu, asserted the RSS chief Mohan Bhagwat http://www.thehindu.com/news/national/everyone-living-in-india-is-a-hindu-mohan-bhagwat/article22852200.ece

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 04/05/2018 - 16:59
माई आजकाल प्रशस्तीपत्रे देण्याच्या घाईत दिसताय. प्रत्येक जण आपापली प्रार्थना आणि जिवन पद्धती चालू ठेऊन स्वतःस हिंदू म्हणून घेऊ शकतो - सर्वांना हिंदू म्हटल्याने काही नुकसान अथवा अपायकारक होत नसावे- इतपत हिंदू शर्माची व्याख्या व्यापक आहे - अनलेस हिंदू म्हणण्या बद्दल बागुलबूवा उभाकरणे महत्वाचे असल्यास - असा बागूल बुवा उभा करण्याचे फायदे बागूलबूवा उभाकरनार्‍यांना मिळतात हे मान्य. भारतात राहणारे तेवढे हिंदू हि व्याख्या परदेशात जाणार्‍या / राहणार्‍या हिंदूंसाठी तापदायक आहे. भारतात राहणारे सर्व हिंदू म्हणवता येत असतील तर अमीष त्रिपाठींनी जे काय भाषण लिहिले ते पाय परदेशातील अन्य धर्मीयांसाठी ? हा एक विरोधाभास पांचजन्यकरांनी सोडवाव्यास हवा असे वाटते. आम्ही अजोंजी क्वोट केलेल्या त्या अमीश त्रिपाठींच्या विचारांबद्दल साशंकता खाली व्यक्त केली आहे. आडून वीषमतेचे समर्थनाची शक्यता हि सर्वांना हिंदू म्हणण्या पेक्षा गंभीर असावी. असो.

In reply to by माहितगार

manguu@mail.com 04/05/2018 - 20:15
I = ( H , M , C ......... ) I is a name of a set H , M, C are the elements. Element ≠ set. सादं सोप्पं आकरावीचं गणित हाये. ( म्हण्जे आमच्या काळात ११ वीला हुतं. आता ९-१० ला आलं असंल )

In reply to by arunjoshi123

माहितगार 04/05/2018 - 16:47
अमीश त्रिपाठींची मांडणी प्रथम दर्शनी लाजवाब वाटली तरी , या भूमिके बाबत काही साशंकता वाटतात. बेसिकली ज्या मुल्यांना तथाकथित म्हणवल जाऊ शकत त्यांना शाश्वत म्हणवल जाऊ शकत काही? हि पहिली शंका. 'सर्व धर्म समान नसतात' या वरुन पुन्हा एकदा दिवाकरांच्या जातीभेदाचे आडून समर्थन करणार्‍या नाट्यच्छटेची आठवण आली. हि मांडणी हाताची पाची बोट एकसारखी नसतातच्या धर्तीवरची असते. या वर सर्वात मोठी आशंका या अर्ग्यूमेंटच्या आडून विषमता, विषतेची वागणूक , हिनत्वाची वागणुक , सुधारणांना विरोधकरणार्‍या शब्दपुजेचे समर्थन होणार नाही ना ही वाटते . सर्वात अडचणीची बाब सर्व धर्मिय धर्मांध हमसब भाई भाई म्हणतील आणि शब्दपुजेस बाजूस ठेऊन सुधारणावादी पाऊले उचलणार्‍यांना एकटे पाडतील हि यातील मोठी भिती वाटते.

#MeToo turmoil: 2018 Nobel Literature Prize postponed by a year सन २०१८ चा नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी न देता सन २०१९ मध्ये देण्याचे ठरले आहे. दुसर्‍या महायुद्धामुळे १९४३ साली असे घडले होते. त्यानंतरचा असा हा पहिला प्रसंग आहे. याबद्दल, पुरस्कारासाठी नाव/नावे निश्चित करणार्‍या Swedish Academy ने, जाहीर केलेले कारण : अ‍ॅकॅडेमीच्या सभासद/अधिकार्‍यांच्या अस्विकारार्ह कृतींपासून सावरायला आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी अ‍ॅकॅडेमीला काही वेळ आवश्यक आहे. या अस्विकारार्ह कृती म्हणजे अ‍ॅकॅडेमीच्या काही सभासद/अधिकार्‍यांची लैंगिक गैरकृत्ये आहेत. लैंगिक शोषणाविरुद्ध सद्या जगभर चाललेल्या #MeToo (पक्षी: माझ्यावरही लैंगिक अत्याचार झालेला/ले आहे/त, असे पिडितांनी उघडपणे सामाजिक माध्यमांत जाहीर करण्याच्या) मोहीमेमुळे जगभर उच्च्पदस्थ आणि ताकदवर लोकांनी (high and mighty) केलेली गैरकृत्ये मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. स्विडीश अ‍ॅकॅडेमीचे हे प्रकरण त्यापैकी एक आहे. त्या कृत्यांबद्दल अ‍ॅकॅडेमीच्या संबंधीत सदस्यांनी पश्चातापही व्यक्त न करता सारवासारव करण्याचे धोरण अवलंबिले आहे. अर्थातच त्याबद्दल, विशेषतः सर्वसाधारण स्विडिश जनतेत आणि एकंदरीत नोबेल पारितोषिकाशी संबंधित जगभरातील शास्त्रज्ञ/लेखक/संस्था/कार्यकर्ते/लेखक/इत्यांदींमध्ये प्रचंड रोष आहे. अ‍ॅकॅडेमीचे आजन्म सभासदत्व असलेल्या १८ पैकी (आत्तापर्यंत) ७ जणांनी राजिनामा दिला आहे. आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या इतक्या मान्यवर संस्थेत स्वीडनची मानहानी करणारा गलिच्छ गैरप्रकार होऊनही, "परदेशी लोकांनी स्वीडनला भेट देऊ नये यासाठी" किंवा "स्विडन या देशाची नाचक्की करण्यासाठी", स्वीडनमध्ये अथवा जगभरात इतर कोठेही मोर्चे/लेख/मेणबत्ती मार्च/इत्यादी आयोजित केले गेलेले नाहीत. कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डँबिस००७ 04/05/2018 - 16:53
सही पकडे है आप , डॉ साहब ! भारताची नाच्चक्की जगभरात करणारे भारतीयच आहेत हीच देशाची मोठी खंत आहे !! सोशल मिडियावर , हिदु लोकच हिंदु समाजावर काहीही माहीती न घेता गरळ ओकत स्वतः मोठ्या पुरोगामी असल्याचा आव आ णत असतात ! हल्लीच कठुआ रेप केस नंतर, बेंगळुरुत रहाणारी एक केरळची हिंदु स्त्री म्हणते की ती उबर किंवा ईतर भाड्याच्या गाड्यांवर हिंदु देवतांची चित्रे लावणार्या गाड्यातुन प्रवास करणार नाही कारण हिंदु लोक रेप करणार्यांचे समर्थन करतात ! हीच्या स्वतःच्या केरळ राज्यात रेप करणार्या गुन्हेगाराला मुस्लिम व कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिलेला त्या प्रकरणाबद्द्ल तीला विचारल तर तिला त्याबद्दल काहीही माहीती नव्हती. सवंग प्रसिध्दी साठी सोशल मिडीयावर काहीही लिहीण्याची सध्या फॅड आलेली आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 04/05/2018 - 17:10
डॉक , तुमच्या प्रतिसादातील मतितार्थाशी सहमत, या बाबत आधीच्या एका धायात भूमिका मांडून झाली आहे.
कितीही पुढारलेला देश असला तरी, स्वीडनला भारतापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे, यात वाद नाही !
हे वाक्य उपरोधाने लिहिले असल्यास ठिक पण ऑदरवाईज आपल्याला कदाचित वेगळ्या अर्थाने / पद्धतीने लिहायचे असावे म्हणून लक्ष वेधले .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव 04/05/2018 - 17:21
'पिंक' चित्रपट कर्त्यांना जगभरातुन कौतुकाचे मॅसेज आले होते, तसच चित्रपटात मांडलेली समस्या केवळ दिल्लीपुरती मर्यादीत नसुन सर्वत्र अनुभवायला मिळते असंही बर्‍याच जणांनी सांगीतलं त्यांना. विशेषतः स्वीडनमधुन बरच काहि ऐकायला मिळालं त्यांना.

arunjoshi123 04/05/2018 - 16:11
https://www.thequint.com/news/india/baahubali-writer-vijayendra-prasad-film-on-rss
KV Vijayendra Prasad, the writer behind blockbusters such as Baahubali: The Beginning, Baahubali: The Conclusion, Bajrangi Bhaijaan and Mersal is now busy scripting an ambitious film on the history and journey of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS). बाहुबली या सिनेमाचे लेखन श्री विजयेंद्र हे आर एस एस वर एका सिनेमाची स्टोरी लिहित आहेत. संघाच्या प्रवासाची ती रोचक समरी असेल. ======================= एका मेधावाम समीक्षकाने सदर चित्रपटाची प्रि-स्क्रिप्ट स्टेजची रिव्हू केली आहे. ती इथे पाहायला मिळेल. https://www.dailyo.in/humour/film-rashtriya-swayamsevak-sangh-rss-bollywood-hindutva-baahubali-screenwriter-kv-vijayendra-prasad/story/1/23858.html

arunjoshi123 04/05/2018 - 16:46
https://www.financialexpress.com/india-news/amu-jinnah-prohibitory-orders-imposed-in-aligarh-internet-services-suspended-top-developments/1155888/
---------------------- हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.

In reply to by arunjoshi123

माहितगार 04/05/2018 - 17:46
स्वार्थ आणि हित्संबंध देशाच्या हिता विरोधी सांभाळले गेले तर भारतीयांची देशभक्ती भक्कम राहील याची हमी देणे अवघड -त्यामुळे देशविरोधी भूमिका घेण्यासाठी जीनाच पाहिजेत असे काही नसावे - आणि तसे म्हटले तर पाकीस्तानी बांग्लादेशी शेवटी त्याच भारतीय रक्ताचे. पण तरीही फाळणी पुर्वी जरी जीनाम्चे चित्र लावले असले तरीही फाळणी नंतर तो सन्मान चालू ठेवावा हे उचित नाही . आणि उचित नसाण्याच्या गोष्टॉ मोजायच्या तर अल्पसंख्यत्वाच्या नावा खाली वेगळ्या शिक्षणाची चूल मांडणे ते वेगळ्या लिपी जोपासणे साशंकतेचे असावे. असो.

In reply to by arunjoshi123

हे चित्र उतरावले तर दुसरी फाळणी करण्याची प्रेरणा घेण्यासाठी कोणी उरणार नाही ही साधी गोष्ट विरोधकांना समजत नाहीय.
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते? अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात. त्यांना प्रेरणा कुठून मिळते?... असो. The University said portraits of all life members of the student union hang there. Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition. थोडक्यात ते पोर्ट्रेट पाकिस्तानचे संस्थाप़क म्हणून लावले नाही आहे. भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.

In reply to by विशुमित

डँबिस००७ 04/05/2018 - 18:42
केक बिर्यानी चालत नाय, पण देशातल सरकार उलथवायला पाकिस्तानकडेच मदत मागण , चीनच्या सुरक्षा अधिकार्यांची गुपचुप भेट घेण जरा जास्तच होत !!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अनेक देशवघातकांच्या घरी,गुन्हेगारांच्या गळ्यात साईबाबा,कुठलातरी स्वामी.. फोटो,लॉकेट्स असतात
पूज्य व्यक्ती , आध्यात्मिक व्यक्तीचे फोटो व सामाजिक कर्तुत्व असलेले व्यक्ती याची तुलना अप्रस्तुत वाटते.
भाजपाच्या लोकांना झालय तरी काय? हेच कळत नाही आहे.
आत्यंतिक राष्ट्रवाद! मग तो दाखवण्यात थोडं जास्त होतंय कधीकधी . पण विरोधक संधी बनवत आहेत . किंवा आलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करू पहात आहेत.

In reply to by उगा काहितरीच

विजय मल्ल्या,नीरव मोदी ह्यांना पकडून सरकार जेलमध्ये घालेल का? ते दोघे कोठे आहेत, काय करता आहेत हे सरकारलाही माहित आहे.मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राघव 04/05/2018 - 19:32
माझ्यासारख्या सामान्य माणसाला; ज्याची यांना व यांच्यासारख्या सर्वांना कायद्याने शिक्षा व्हावी अशी साधी अपेक्षा आहे, पण स्वतः पकडून आणत नाही; त्याला राष्ट्रवाद नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मे २०१९ पर्यंत पकडून येथे आणले तर राष्ट्रवाद वगैरे म्हणण्याला अर्थ उरतो. ..
हे एकच पॕरामीटर आहे का ? अजून पण अनेक कांगोरे असतील ना ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 04/05/2018 - 19:36
Jinnah, a founder member of the University Court, had also been given this honour before Partition.
१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . २) ज्याचा आधी सत्कार केला गळ्यात ताईत घातला असा असा राम त्याच्या कृती अवैध ठरल्या नंतर कुणी त्याचा तरीही ताईत करुन घातला तर अभिव्यक्ती स्वातम्त्र्यात बसेल पण स्पृहणीय रहाणार नाही तसेच हे जीनाम्चे प्रकरण आहे , भले फाळणी पूर्वी तुम्ही त्याचा फोटो लावला असेल देशाच्या फाळणीच्या घृणास्पद कृतीनंतर त्याचा फोटो जपणे स्पृहणीय नाहीच पण त्या माणसाच्या कृतीने फाळणीच्या वेळी झालेली हिंसा नंतर झालेली युद्धे आणि स्वकियांशिच लढण्यावर होणार्‍या युद्ध सामग्रीवरचा खर्च पाहता अशा व्यक्तीचा फोटो अजूनही बाळगणे स्पष्टपणे सांगावयाचे झाल्यास निंदनीय आहे हे नक्की . ३) अर्थात या निंदेसाठी मी हिंसेचे समर्थन करणार नाही पण हा विषय पुन्हा पुन्हा आग्रहाने निंदा करण्या जोगा नक्कीच आहे.

In reply to by माहितगार

खरे आहे. मग नथुराम गोडसेचे जे उदात्तीकरण केले जाते तेही थांबवायला हवे. आत्ता आत्ता पर्यंत विकास्,डेवलप्मेंटची भाषा करणारे(व त्या दिशेने खरोखरीच प्रयत्न करणारे) पुन्हा ईतिहासाची उजळणी का करू लागले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बिटाकाका 05/05/2018 - 08:51
माईसाहेब, फक्त अलिगढ युनिव्हर्सिटी म्हणजे भारत नव्हे आणि तिथे निषेधाची भाषा करणारेच फक्त विकासाची भाषा वापरणारे आहेत असे नव्हे. उगाच सरसकटीकरण करून विकासाची आणि निषेधाची भाषा करणारे एकच आहेत दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नको. ------------------------------------ प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच परत एकदा आझादीचे नारे लावायची संधी मिळाली, एएमयु ते जेनयु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 05/05/2018 - 09:48
१) बाकीच्यांच्या दहा चुकांमुळे प्रति पक्षाने केलेली अकरावी चूक चमर्थनीय असेलच असे नसते . * जे निंदा जनक वाटते त्याची निंदा करावी.

एस 05/05/2018 - 00:36
चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारावर प्रतिविषाणू ठरू शकेल असा रेणू शोधण्यात भारतीय संशोधिकेला यश आले आहे. सध्या तरी प्री-क्लिनिकल फेजमध्ये असले तरी ह्या संशोधनाचा उपयोग करून या आजारावर औषध शोधले गेल्यास ती फार मोलाची घटना ठरू शकेल. https://www.news18.com/news/india/iit-roorkee-researchers-discover-molecule-that-fights-chikungunya-1738743.html मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा मुख्यत्वे विकसनशील देशांत जास्त आढळणाऱ्या आजारांवर प्रतिबंधक लशी लवकरात लवकर शोधल्या गेल्या पाहिजेत. परंतु औषधनिर्मिती कंपन्यांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी उच्छ आणि मध्यम उत्पन्न गटांना जास्त भेडसावणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित करून नफा मिळवण्यात जास्त रस आहे असे दिसते.

गामा पैलवान 05/05/2018 - 01:41
माईसाहेब,
खरोखर पोर्ट्रेट ,चित्र पाहून देश तोडायची प्रेरणा मिळते?
हाहाहा! याविषयी माहित नाही. पण क्वेट्टानजीकचं जिनाचं घर बघून बलुची मुस्लिमांना ते पेटवून द्यायची प्रेरणा नक्की झाली. आस्वाद घ्यावा म्हणतो मी : https://www.youtube.com/watch?v=hsy2La6tpi4 आ.न., -गा.पै.

manguu@mail.com 05/05/2018 - 12:40
Old video of PM Modi rally in Varanasi shared as Udupi rally ahead of Karnataka elections. Desperate BJP tries to influence voters with old videos. https://www.altnews.in/old-video-of-pm-modi-rally-in-varanasi-shared-as-udupi-rally-ahead-of-karnataka-elections/ कर्नाटकातील जनता मोदी व भाजपला नाकारत असल्याने भेदरलेली भक्त मंडळी आता वाराणसी मधील मोदीजींच्या रॅलीचा जुना व्हिडिओ पोस्ट करुन तो कर्नाटकातील उडुपी येथील रॅलीचा असल्याचे भासवत आहेत. असे खोटे व्हिडिओ पसरवून लोकांची दिशाभूल करुन मते मागण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर यावी ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

In reply to by manguu@mail.com

बिटाकाका 05/05/2018 - 13:21
मंगूसाहेब, घोडामैदान लै लांब नाय, जनता कुणाला नाकारतेय ते कळेलच. शिवाय कोण भेदरलेले आहे तेही कळेलच. उडुपी मध्ये मोदींना खूप सपोर्ट मिळाला, हा बघा विडिओ इंटरनेटवर, आता भाजप ला मतदान करा. लैच मज्जा! ------------------------------ उगाचच इकडचे तिकडचे तथाकथित भक्तांचे फॉर्वर्डस पाहण्यापेक्षा उडुपीच्या सभेचा ओरिजिनल विडिओ पण पहा. स्वतः बघितलेलं बरं असतं. ----------------------------- उत्तरे देता येत नाहीत म्हणून जोडून तोडून विडिओ बनवायच्या शोकांतिकेपेक्षा हि शोकांतिका बरीच म्हणायची.

manguu@mail.com 05/05/2018 - 13:26
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय तसातसा प्रचारही आक्रमक होत चालला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमाकुरू येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस गेल्या अनेकवर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे पण त्यांना गरीबांसाठी काहीही करता आलेले नाही. काँग्रेस पक्ष भारतातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले.

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 05/05/2018 - 20:05
इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरीबांना मुर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोट बोलत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची किंवा गरीबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत असे मोदी म्हणाले. मोदीजी अगदी बरोबर बोलत आहेत. देशातल्या जनतेने निर्धार करुन धर्मावर, जातीवर समाजाला वेगवेगळ्या गटात वाटणार्या राजकीय पक्षाला सत्तेच्या स्पर्धेतुन बाद करावे व मोदीजींचे हात बळकट करावेत, तसेच कोणत्याही छोट्या व्यवसाय करणार्यां उद्योजकांनी पुढे येऊन सरकारला लागु असलेले वेगवेगळे कर देऊन सहकार्य करावे व देश उभारणीत आपला वाटा उचलावा !! मोदीजींनी आधार कार्डला असलेला सर्व विरोध मोडुन काढून सर्व स्तरावर आधार कार्ड सक्तीचे केले पाहीजे. प्रत्येक काम, व्यवहार आधार कार्डला संलग्न झाला पाहीजे , कॅश पैश्याचे व्यवहार कमीत कमी करुन जे कोण कॅश मध्ये काम करतात त्यांच्यावर कडक नजर ठेवायला पाहीजे.

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com 05/05/2018 - 21:27
काँग्रेसने गरीब केले म्हणे. १९४७ साली आपला पणजोबा , २००० सालच्या पणतवापेक्षा जास्त उत्पन्न मिळवत होता, याचे प्रुफ देणारा एकही गरीब मला तरी दिसलेला नाही. १९४७ पासून चार पिढ्या झाल्या , तरी एखादा माणूस , तोही गुजरातेतला गरीबच ! चूक कुणाची काँग्र्सची ! आणि मग इतर काही लोक श्रीमंत झाले, ते कशाच्या जिवावर ?

डँबिस००७ 05/05/2018 - 21:48
चला म्हणजे आता कर्नाटक निवडणुका जिंकण्याच काँग्रेसचे स्वप्न स्वप्नच रहाणार आता ! बेंगळुरू कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ सातच दिवस उरले असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १२० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात सोने, दारू आणि इतर साहित्याचा समावेश आहे. येत्या १२ मार्चला कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ५ लाख लीटर दारू जप्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ६७.२७ कोटी रुपयांची रोकड, २३.३६ कोटी रुपयांची पाच लाख लीटर दारू आणि ४३.१७ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. या व्यतिरिक्त या कारवाईत आता पर्यंत १८.५७ कोटी रुपयांचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

In reply to by manguu@mail.com

माहितगार 06/05/2018 - 10:13
'सारे एका माळेचे मणी' नावाचा वाक्प्रचार माहिती आहे का ? जो पर्यंत दोनच्यावर वेळा निवडून येण्यावर बंधन घातले जात नै तो पर्यंत गोंधळ संपणार नाही. (राजकारणावर टिका करताना रंगांचा अनमान होऊ नये म्हणून काही रंगवाचक शब्द टाळले - )

डँबिस००७ 05/05/2018 - 21:49
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला फक्त आठवड्याचा कालावधी उरला असताना भाजप आणि काँग्रेस अधिकच आक्रमकपणे प्रचार करू लागले आहेत. शिमोगाच्या गडम येथील आजच्या धडाकेबाज प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत वातावरण अधिकच तापवले. 'देशभरात झालेल्या पराभवामुळे काँग्रसला चिंता नव्हती, मात्र कर्नाटकात आपला पराभव होणार हे लक्षात आल्याने काँग्रेसला चिंता सतावू लागली आहे. याचे कारण म्हणजे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने इथे एक टँक बनवला आहे. या टँकद्वारे जनतेचा पैसा लुटला जातो. हा पैसा थेट पाइपने दिल्लीत पोचतो. जर सरकारचा पराभव झाला, तर काँग्रेससाठी पैसा कुठून येणार, हीच चिंता काँग्रेसला सतावत आहे', अशी गंभीर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेस पक्षावर केली आहे. काँग्रेसला वसुली माफियांची चिंता करप्शनचा टँक भरण्यासाठी काँग्रेसने राज्यात वसुली माफियांचे एक नेटवर्कच तयार केल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला. इथले सरकार गेल्यास या माफियांचे काय होईल, याचीही चिंता काँग्रेसला सतावत आहे. २०१४ पूर्वी कोळसा, हेलिकॉप्टर, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा झाले आणि याच पैशातून काँग्रेसचे काळी कृत्ये सुरू असल्याचा आरोप करत मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

झेन 06/05/2018 - 08:23
निवडणूकीपूर्वी कुठलाही पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री गोष्टी जाहीर करतो जसे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, १ रूपयात तांदूळ वगैरे ...हे सगळे भ्रष्टाचारात का मोडत नाही ? ईलेक्षन कमिशनला यात काही चुकीचे वाटत नाही का पावर नाही.

manguu@mail.com 06/05/2018 - 18:26
मध्य प्रदेशचे भाजपा आमदार गोपाल परमार यांनी लव्ह जिहाद आणि बालविवाह याबाबत विचित्र विधान केलं आहे. बालविवाहांमुळे लव्ह जिहादच्या घटनांवर आळा बसेल असा अजब दावा त्यांनी केला आहे. उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळतं, उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं परमार म्हणाले. पूर्वी कमी वयातच मुलामुलींची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं-मुली चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,’ असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. ‘मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,’ असं परमार म्हणाले.

manguu@mail.com 06/05/2018 - 19:29
कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांची प्रचारादरम्यान एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना येडियुरप्पा म्हणाले, की जे मतदार मतदान करणार नाहीत अशांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रांवर आणा आणि भाजपाला मत देण्यासाठी भाग पाडा, हे विधान येडियुरप्पांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत.

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे तो जोशात केलेले विधान असणार. मागे शरद पवारांनीही सभेत "एकदा गावात मतदान केलेत के मग शाई पुसा व मग परत येऊन मुंबईत मतदान करा.." असे आवाहन केले होते. http://www.dnaindia.com/mumbai/report-sharad-pawar-asks-voters-to-erase-ink-vote-twice-1971676

manguu@mail.com 06/05/2018 - 21:58
अलिबाग: इंटिरियर डिझायनर अन्वय मधुकर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 'रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णब यांनी पैसे थकविल्यामुळे नाईक निराश होते त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं.  अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी आहे. शुक्रवारी ते अलिबाग जवळील कावीर येथे आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या नोकरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं. नाईक यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा आदींनी पैसे थकविल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी या तिघांविरोधात नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाईक यांच्या ७३ वर्षीय आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

एस 06/05/2018 - 23:37
'शुक्रतारा' या गाजलेल्या भावगीताने मराठी रसिकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे दुःखद निधन झाले. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

रात्री ९.३० ला कलर्स वर "आपल मराठी बीग बॉस' नामक कार्यक्रम पाहण्यात आला. आतापर्यंत हिंदी बीग बॉस हा सर्वात भीकार कार्यक्रम आहे अशी समजून होती ती खोटी ठरली. उषा नाडकर्णी,अनिल थत्ते हे दोन सोडले तर बाकी सर्व नविन कलाकार दिसत होते. आपण एक सेलिब्रिटी आहोत व आपणास लाखो लोक ओळखतात अशी सर्वांची समजून असावी. हा अनिल थत्ते माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी गगनभेदी नामक साप्ताहिक की मासिक चालवायचा. रंगीबेरंगी कपडे,वेशभूषेत तो विदूषकासारखा न दिसतो तर नवल. ७२ वर्षीय दमा,डायबेटीसने त्रस्त असणार्या उषा नाडकर्णी नक्की येथे का आल्या हा प्रश्न पडतो. एकेमेकांच्या अंगावर धावून्,लाथा मारेपर्यंत ही मंडळी गेली. कोणत्याच चॅनेलवर काहीच पाहण्यासारखे नसेल तर हा कार्यक्रम पहावा. thatte

manguu@mail.com 07/05/2018 - 15:51
काँग्रेसने किमान कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्नाटकच्या जामखंडी येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर कर्नाटकात आढळणा-या मुधोल कुत्र्यांकडून काँग्रेसने देशभक्ती शिकावी असा सल्ला मोदींनी दिला. उत्तर कर्नाटकमध्ये आढळणा-या मुधोल कुत्र्यांचा नुकताच भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आला आहे. मुधोल कुत्रे म्हणजे शिकारी कुत्र्यांची एक जात आहे. भारतीय लष्करामध्ये सामील होणारी मुधोल ही भारतीय कुत्र्यांची पहिली प्रजाती आहे. उत्तर कर्नाटकच्या जामखंडी येथील बागलकोटमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत मोदी बोलत होते. ”ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चेविरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, अशा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला दुसऱ्याकडून शिकायचं नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा”. मोदी पुढे म्हणाले, ”मला माहितीये की त्यांना (काँग्रेस) खूप अहंकार आहे. देशातील लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यामुळे मुधोल कुत्र्यांकडूनही ते काही शिकतील अशीही मला अपेक्षा नाही”. काँग्रेसचा दर्जा इतका खालावला आहे की, पक्षाचा एक नेता ‘भारत के टुकडे होंगे’ अशी नारेबाजी करणा-यांमध्ये गेला आणि त्यांना समर्थन दिलं असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील देशविरोधी नारेबाजीच्या प्रकरणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जेएनयूच्या परिसरात गेले होते, त्यावरुन मोदींनी राहुल यांना हे खडेबोल सुनावले.

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com 07/05/2018 - 15:55
विरोधी पक्षाला कुत्रा म्हणणे निषेधास्पद आहे. भारतविरोधी घोषणा jnu , up त दिल्या अशा वावड्या भाजप उठवत असते, पण ऑडिओ , व्हिडीओ फेक का निघतात ? एकालाही अटक का होत नाही ?

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे ते त्यांना देशभक्ती शिकायला सांगत आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसचे माजी नेते एस.एम.कृष्णा भाजपात डेरेदाखल झाले. त्यांनी कोणाकडून देशभक्तीचे ट्रेनिंग घेतले हे मोदी/शहांनी सांगायला हवे. गेल्या महिन्यात अफझलपूर(कर्नाटक)चे आमदार मलिकय्या गुत्तेदार हे देखील काँग्रेसमधून भाजपात सामील झाले. त्याना कोठून ट्रेनिंग मिळाले हे देखील स्पष्ट व्हावे. guttedar https://en.wikipedia.org/wiki/Malikayya_Venkayya_Guttedar

manguu@mail.com 07/05/2018 - 18:11
कर्नाटकात पाच दिवसांनंतर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि भाजपाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आपल्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, आता हेच आरोप त्यांच्या अंगलट आले आहेत. कारण, सिद्धरामय्या यांनी भाजपाच्या या तीनही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. माफी मागा किंवा १०० कोटींची नुकसान भरपाई द्या असे सिद्धरामय्या यांनी नोटिशीत म्हटले आहे. अ

जेम्स वांड 07/05/2018 - 18:21
ताज्या घडामोडी धाग्यावर टेनिस सोडून स्क्वॅश खेळणे सुरू झालेले दिसते आहे, ते ही सिंगल्स, उचलली रॅकेट का हाणला भिंतीवर टोला !!!

In reply to by जेम्स वांड

ट्रेड मार्क 07/05/2018 - 19:18
याचे कारण म्हणजे फक्त एका पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांवर कारवाई होणार आहे, विरोधात बोलणाऱ्यांवर नाही. त्यामुळे मंगुजींची (आदराने उल्लेख करायला पाहिजे! उगाच कारवाई व्हायची) काळजी मिटली.

In reply to by ट्रेड मार्क

manguu@mail.com 07/05/2018 - 19:54
एका पक्षाच्या बाजूने बोलणे आणि विरोधी पक्षाच्या आयडी ना अपमानास्पद बोलणे सुचनेतील महत्वाचा भाग हा असेल असे वाटते

In reply to by ट्रेड मार्क

जेम्स वांड 07/05/2018 - 19:54
कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन बोलायलाही मनाई हुकूम बजावण्यात आलेला नाहीये, तर हिरीरीने बाजू लढवल्यावर जर प्रश्न शंका वगैरे आल्या तर त्यांना शांतपणे प्रश्नकर्त्याची हुर्यो न उडवता उत्तरे न देणाऱ्याकरता ती सूचना आहे, संबंधितांना मंगुचा सतत पाणउतारा करणे, त्याला काहीबाही बोलणे हा धंदा थोडक्यात बंद पडलाय जणू. मंगुल्या आहे थोडा डॅम्बीस , पण पक्षीय राजकारणावर बोलतो, मुसलमानांची बाजू लढवतो, कोणावर वैयक्तिक झालेला दिसला तर दाखवा मंगुल्याचा पण उद्धार करून टाकू, हाकानाका तेवढं विकटीम कार्ड खेळून मिपा मालक अन चालकांवर अन्याय करीत भलते सलते आरोप करू नका, ही नम्र विनंती. आजवर जे वाटेल ते बोलायचा पास मिळाल्यावाणी बडबडत असत त्यांना फक्त आपण बोलतो त्याची उत्तरे द्यावी लागतील, अन कोणावरही हेटाळणी युक्त कॉमेंट्स करता येणार नाही इतकं फक्त सूचना म्हणते, वैयक्तिक बोलणाऱ्या कुठल्याही पार्टी समर्थकांस ते समसमान लागू होतंय. मिपा प्रशासन आम्ही तुमच्या मताला सहमत आहोत अन तुमच्या अभिनंदनीय कार्याचे आम्हाला कौतुक वाटते (रामशास्त्री मोड ऑन) वांडो

In reply to by जेम्स वांड

lakhu risbud 07/05/2018 - 21:20
संपादक मंडळाला पण त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये एवढा अर्थ आहे हे पण आत्ताच कळाले असेल.अर्थ लावणारे सोईस्कररित्या पाहिजे तो अर्थ लाऊन विरोधी बाजूला टोमणे (!) मारायची संधी साधून घेत आहे.

In reply to by lakhu risbud

जेम्स वांड 07/05/2018 - 21:23
मिस्टर रिसबुड (पुलंचा चाहता) वांडो सोईस्कर अर्थ लावून मालकांना अन संपादक मंडळाला कोण बोल लावतोय ते वर नीट दिसतंय, तुम्हाला पण मालकच चूक वाटतायत का?

In reply to by डँबिस००७

जेम्स वांड 07/05/2018 - 22:15
तुमचे नाही आले आजवर इतके लक्षात राहण्यालायक, स्वतःला इतकं महत्वाचं समजू नये बुआ :D

In reply to by अभ्या..

जेम्स वांड 07/05/2018 - 20:06
स्वतःला जनरल सर्वात उठबस असणारे अन मिपा मालकांच्या शब्दाबाहेर नसलेले मानतो. बाकी "आपल्या गटाचा" शेम्बुड गोड म्हणत मालकांनाच नाक मुरडायचा प्रताप करायला खासे धारिष्ट्य लागते बुआ, आपल्यात ते नाही, काळ सोकावतो म्हणतात न बेंबट्या तो हा असा!

In reply to by manguu@mail.com

sagarpdy 08/05/2018 - 11:07
https://en.wikipedia.org/wiki/Syed_Ahmad_Khan १० वी पर्यंतची इतिहासाची पुस्तके परत वाचून घ्या.
Suppose that the English community and the army were to leave India, taking with them all their cannons and their splendid weapons and all else, who then would be the rulers of India?.... Is it possible that under these circumstances two nations—the Mohammedans and the Hindus—could sit on the same throne and remain equal in power? Most certainly not. It is necessary that one of them should conquer the other. To hope that both could remain equal is to desire the impossible and the inconceivable. But until one nation has conquered the other and made it obedient, peace cannot reign in the land - Syed_Ahmad_Khan , March १८८८ (सावरकरांचे वय : ५ वर्षे,जीनांचे वय : १२ वर्षे)

In reply to by manguu@mail.com

बिटाकाका 08/05/2018 - 11:09
कैच्या कै! संदर्भ देता का? १९२३ पासून मुस्लिम नेत्यांनी द्विराष्ट्र संकल्पनेसाठी भारतातील सगळ्या नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरु केल्या होत्या असे दाखले आढळतात. १९३८ तर खूप उशिरा येतं आणि ज्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यातील एक सावरकर होते. त्या बैठकीत काय निष्कर्ष काढण्यात आला याचा संदर्भ देता का? १९२४ साली लाला लजपत राय यांनी द्विराष्ट्र संकल्पनेला पाठिंबा दिला होता याचे संदर्भ खोटे आहेत का?

In reply to by manguu@mail.com

जेम्स वांड 08/05/2018 - 11:13
मंगू तो काँग्रेस पक्षाचा मंगू आहे म्हणून तू त्याची बाजू घेऊ नको गडे, द्विराष्ट्रवाद संबंधी १९३८ मध्ये 'सावरकर - जिन्हा' भेट झाली होती तिलाच 'जिन्हा सावरकर' भेट पण म्हणता येईल, मणिशंकर शंख म्हणतोय की तुम्ही (पक्षी पाकिस्तानी) चुकीचे शिकवतायत अन द्विराष्ट्रवादाचे जनक सावरकर होत, पण जर तुझे विधान ग्राह्य धरले तर जिन्हा अन सावरकर दोघेही जनक होत द्विराष्ट्रवादाचे! असे किमान पाकिस्तानी लोकांनी म्हणायला हरकत नाही, त्यामुळे मणी चूक बोलला त्याने तिथल्या त्याच्या चेल्याचपाट्यानां 'तुम्ही अर्धवट शिकवताय' म्हणायला हवे होते. रच्याकने द्विरष्ट्रवादी विचार जर खरेच सावरकरांचे होते तर आजवर बिलं गांधींच्या नावे का फाटतायत? अन त्यांना जीव का द्यावा लागला? म्हातारबाबा उगाच खाया पिया कुछ नही ग्लास फोडा बाराना झालेत काय?

In reply to by manguu@mail.com

बिटाकाका 08/05/2018 - 11:45
कृपया त्या बैठकीच्या निष्कर्षांचा असेल तर संदर्भ द्या! त्या एकाच बैठकीत हा निर्णय घेऊन फाळणी करण्यात आली असा चुकीचा अर्थ आपल्या वाक्यातून निघत आहे.

In reply to by manguu@mail.com

गब्रिएल 08/05/2018 - 12:06
या बोटावर्ची थ्युंकी त्या बोटावर कर्न्याच्या कलेत मंगूसाय्बांचा हात धर्नारा आक्क्या दुनियेत घावनार नाय. त्यात्लं नोबेल बकशीश मंगूला यक्दम नक्की बर्का ! ;) =)) =)) =))

In reply to by गब्रिएल

जेम्स वांड 08/05/2018 - 12:56
तुमचा मूळ आयडी शोधण्यात कोणालाच रस नाहीये हो, कश्याला ओळख लपवायला व्याकरण आणि शुद्धलेखनाची आयमाय करताय, म्हणायचं ते नीट लिहून मांडा की!

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड 08/05/2018 - 13:01
बक्षीस म्हणून २१/- देता येतीलच, नाही नाही द्याच थुंकी बोटे वगैरे करण्यासाठी, पण त्याने मांडलेल्या मुद्द्यावर प्रतीमुद्दाही द्या (असला तर), नाहीतर व्यक्तिगत टीका गणली जाऊ शकेल बहुदा ही. मुद्दे देने बिटाकाकांकडून शिकू शकता. (शिकायची इच्छा असली तर), काकांशी वादविवाद म्हणजे मजा असते एकदम रिफ्रेशिंग अन बुद्धिवर्धक प्रकार. :)

In reply to by जेम्स वांड

विशुमित 08/05/2018 - 13:08
मिपावर संपादक मंडळाने भरारी पथक चालू केले पाहिजे, असे वाटते. सापडला की फाड पावती, ते पण सगळे कलम वगैरे व्यवस्थित लावून. म्हणजे सर्वाना मिपा वाहतुकीचे नियम व्यवस्थित समजतील आणि सिग्नल तोडणार नाहीत.

In reply to by जेम्स वांड

बिटाकाका 08/05/2018 - 11:44
द्विराष्ट्र संकल्पना आणि फाळणीचा परिणाम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण यापैकी कशालाही फक्त गांधींना दोष लावणे बेजबाब्दारपणाचे आणि बेसलेस आहे असे मला वाटते. त्या वेळची परिस्थिती कदाचित द्विराष्ट्र संकल्पनेला रोखू शकली नसती. पण फाळणीची अंमलबजावणी, कदाचित इंग्रजांच्या दबावाखाली, अत्यंत घाईघाईने करण्यात आली असावी. अगदी सीमाही ठरल्या नसताना फाळणीची आणि स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि हिंसेला सुरुवात झाली. त्या काळाच्या नेत्यांचा जनतेवरील प्रभाव बघता हे आधी परिपकवपणे हाताळता आले असते का?

In reply to by sagarpdy

माहितगार 08/05/2018 - 14:04
We need better statesmanship than Mr. Gandhi and Mr. Jinnah have shown
बाकी मांडणी काय आहे माहित नाही, पण आंबेडकरांशी या वाक्या पुरता सहमत आहे, जीनांनी स्वतःच्या आणि समुह स्वार्था पोटी अख्खे उपमहाद्वीप आज अण्वस्त्र युद्धाच्या कगारीवर जाऊन उभे आहे हे जीनांच्या स्टेटमनशीपचे -म्हणजे त्यांनी दाखवलेल्या उत्पात मुल्याचे- चांगले उदाहरण ठरत नाही. आणि गांधींनी जीना आणि समुदायाने दाखवलेल्या उत्पातमुल्यापुढे बोटचेपेपणा करावा हे हाती गीता ठेऊन फिरणार्‍याने नेतृत्व म्हणून श्रेयस केले का ? यात त्याम्ची स्टेटमनशीप कुठे दिसली ? या बद्दलची साशंकता वाटते. नथुरामचे कृत्य स्पृहणीय नव्हते , पण आंबेडकर म्हणतात तसे गांधींनी स्वतःच्या व्यक्ती पुजेस कुठेतरी आवार घालण्याची, काँग्रेस विसर्जनाचा विचार केला तसा स्वतःच्या व्यक्तिपुजेच्या विसर्जनाचा विचार करणे वावगे ठरले नसते म्हणजे , इतर नेत्यांना स्टेटमनशीप मध्ये सहभागाची अधिक संधी मिळाली असती.

In reply to by बिटाकाका

माहितगार 08/05/2018 - 12:35
ब्रिटीशांनी १८५७ अनुभवानंतर हिंदू - मुस्लीम फूट पाडण्याचा विडा उचलला आणि यशस्वी केला - तत्कालीन अँग्लो इंडीयन वृत्तपत्रे आता सहज उपलब्ध होत नाहीत म्हणून त्यांचा नतद्रश्टपणा ठळकपणे पुढे येत नाही , दुसरे असेकी १९ व्या शतका पासूनच रशिया व्ह्याया सेंट्रल एशिया अफगाणिस्तानातून येऊन आपल्या आर्थीक साम्राज्यास धक्का लावेल हि सातत्याची भिती पुढे कम्युनीझमच्या भितीत परावर्तीत झालेली होती, त्यामुळे ब्रिटीशांना अफगाणीस्तानापर्यंत वेळ प्रसंगी हस्तक्षेप करता येईल एवढा इलाका भारता पासून वेगळा ठेवण्यात रस होता , त्या दृष्टीने अगदी राष्ट्रभक्त मुसलमांनानाही प्रलोभने दाखवून फुटतील याची काळजी ब्रिटीश घेत होते यात जीना आलामा इक्बाल इत्यादी मडंळींनी संधी साधली, अर्थात ब्रिटीशाम्नी तोडा आणि फोडा केले म्हणून स्वतःचे राष्ट्र प्रेम विसरुन देशद्रोह करणार्‍या जीना आणि आलामा इकबालांची आरती ओवाळता येत नाही. असो.

In reply to by manguu@mail.com

माहितगार 08/05/2018 - 13:41
ब्रिटीशांना रशियाच्या वाटणार्‍या परंपरागत भितीचा इतिहास , त्या भितीने ते किती ग्रासलेले असत आणि आताही असतात, हा मोठ्या अभ्यासाचा विषय असावा.

In reply to by manguu@mail.com

अर्धवटराव 08/05/2018 - 17:52
जिना, सावरकर वगैरे मंडळी कुठे, कोणाला भेटल्या मला नाहि माहित. गुजरात इलेक्शनच्यावेळी मणीभाऊ काहितरी बरळला आणि भाजपला निसटता फायदा झाला (हे एक गृहीतक). तसच काहितरी आता होईल अशी शक्यता जाणवली.

Senior advocate Kapil Sibal on Tuesday withdrew the petition challenging vice-president and Rajya Sabha chairman Venkaiah's Naidu decision to reject the notice of removal motion against CJI Dipak Misra from the Supreme Court. या वेळेस, न्यायालयाकडून, अजून एकदा थोबाडीत बसण्याअगोदर गाल काढून घेऊन काँग्रेस+ ने, कर्नाटक निवडणुकीकडे पाहत, आपल्या नाटकाचा अजून एक अंक आटपता घेतला ! गेल्या चार-सहा महिन्यांचा आलेख पाहता २०१९ च्या मध्यवर्ती निवडणूकीअगोदर या नाटकाचे अजून किती अंक पहायला लागतील ते सांगता येणार नाही. देशाच्या सगळ्या वैधानिक संस्था-पदांवर विनापुरावा शिंतोडे उडवत बसण्याचे उद्योग करण्याऐवजी, "स्वतःचे चार गुण आणि भविष्यात करायची इच्छा असलेले दोन प्रकल्प" जनतेसमोर मांडले असते तरीसुद्धा जनतेची जराशी सहानुभूती त्यांना मिळाली असती. स्वतःला घटनातज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातले वरीष्ठ वकील म्हणवणार्‍या लोकांचे असे सर्व नियम-पायंडे सोडून चाललेले वर्तन केवळ खुद्द त्यांच्यासाठीच नामुष्कीचे नाही तर त्यांच्या पक्षांची जनमानसातली पत दिवसेदिवस खालीखाली नेत आहे. हे इतक्या विद्वान समजल्या जाणार्‍या मंडळींच्या ध्यानात येत नाही हे अगम्य आहे !!! (कपाळावर हात मारणारी स्मायली) की, सर्वस्वी अगतिक होऊन ते "विनाशकाले... " या न्यायाने सतत असे वागत आहेत ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेम्स वांड 08/05/2018 - 13:06
कसलं नीट लिहिलंय काका, आवडलं अन पटलं ही, मणिशंकर पाकिस्तानात अन सिब्बल कोर्टात जबरी काम करत आहेत असेच म्हणावे लागेल

धाग्यात ताज्याच घडामोडी असाव्यात ही अपेक्षा.! पूर्वी मराठी मंडळी गप्पांना बसली की गप्पांच्या ओघात नेहमी नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना येत. गप्पांचा शेवट "सगळे गांधींमुळे झाले' म्हणायची पद्धत होती. काळ बदलला पण ढाचा तोच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com 08/05/2018 - 13:37
गांधी आडवा येतो .या नावाचे एक नाटक आहे म्हणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 08/05/2018 - 13:38
नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना
सध्या तरी चिरंजिवी आहेत . गौतम बुद्ध अपेक्षांना कमी ठेवले म्हणजे अपेक्षा भंगाचे दुख्ख येण्याची शक्यता कमी होते असे म्हणाले असावेत (चुभूदेघे)

बिटाकाका 08/05/2018 - 14:32
युपीएचे पीएम उमेदवार घोषित झाले म्हणायचे काय? https://www.ndtv.com/india-news/why-not-rahul-gandhi-says-ready-to-become-pm-1848869?pfrom=home-topscroll http://www.republicworld.com/india-news/politics/rahul-gandhi-declares-himself-as-the-pm-candidate-says-i-will-be-the-pm

In reply to by बिटाकाका

काँग्रेस व भाजपा, दोघांचेही उमेद्वार ठरलेलेच आहेत रे बिट्या.'एकमताने निवडीचा' फार्स मग नंतर खेळला जातो. कर्नाटकात पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर आली तर यशाचे सगळे श्रेय काँग्रेसजन राहूल ह्यास देतील..व बिगर-भाजपा असंतुष्ट पक्ष पुढार्यांना जरा बळ मिळेल.

In reply to by बिटाकाका

माहितगार 08/05/2018 - 15:13
बिटाकाका हे काय ? राहूलनाच युपिएचे उमेदवार करायचे हे आपले मागेच ठरले होते ना ? मग हे माहित नसल्यासारखे काय दाखवताय ? :))

In reply to by माहितगार

बिटाकाका 08/05/2018 - 15:50
मी "घोषित" केले का असं म्हणतोय. काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याचा मार्ग निवडेल का अशा अर्थाने. नंतर बहुमत आल्यावर करतीलच पण आधी घोषित करून मोदी वि. राहुल गांधी असं रूप आधीपासूनच देतील का?

In reply to by बिटाकाका

विशुमित 08/05/2018 - 18:20
माझ्या मते काँग्रेस आणि भाजप ने शहाणे असतील तर दोघांना आप आपल्या पार्टी तर्फे राहुल आणि मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी घोषित करू नये. त्यामुळे काय होऊ शकते -- जनतेच्या आताच्या ट्रेंड नुसार भाजप अल्प मतात येईल आणि त्यांना युतीतील इतर पक्षांची मदतीने खिचडी सरकार चालवावे लागेल, जे मोदींना आता जेवढे सोपे वाटते तेवढे नसणार आहे कारण हे मित्र पक्ष मागचे सगळे हिशोब चुकते करणार. काँग्रेस ची तर काय हालत होईल हे मी सांगायची गरज नाही. याचा सर्वात जास्त फायदा स्थानिक पक्ष उठवणार. ====

In reply to by विशुमित

बिटाकाका 08/05/2018 - 20:58
भाजप ला घोषित वगैरे करण्याचे काहीच कारण दिसत नाही. भाजपचा सेलिंग पॉइंटच मोदी असल्याकारणाने ते उमेदवार असणे निर्विवाद आहे. कांग्रेसचा सेलिंग पॉईंट राहुल ठरतील का हा मुद्दा आहे.

In reply to by माहितगार

येत्या तीन महिन्यातील आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाचे भाव ठरवेल प्रधान सेवकांची लोकप्रियता.

विशुमित 08/05/2018 - 19:58
जिना वगैरे या विषयावर अकारण अतिरिक्त वेळ घालवण्यापेक्षा राविश कुमारचा प्राईम टाईम मला खुप आवडतो. डायनामिक रल्वेमंत्रीना त्यांच्या कामाचा आरसा दाखवला आहे. https://youtu.be/tEsJgW99rhc

In reply to by विशुमित

बिटाकाका 08/05/2018 - 20:54
रेलवे का उशिरा येतात याची काही कारणमीमांसा केली आहे का? जर केली असेल तर मग ठरवता येईल ना कि रेल्वे मंत्री यासाठी काय करू शकले असते? ओपन बायस्ड पत्रकारिता करणारे पत्रकार साहेब हवा तसा डेटा वापरण्यात एक्सपर्ट आहेत असे माझे मत नम्रपणे नमूद करू इच्छितो. ---------------------- खाली कोरावर हा प्रश्न टाकण्यात आला होता, एक दोघांनी काही शक्यता आणि कारणे टाकली आहेत. ती पाहता हा प्रॉब्लेम सोडवणे जादूची कांडी फिरवण्यासारखे नसावे असे दिसते. रेल्वेचे काम लगेच दिसणे अवघड आहे, रेल्वे तोट्यात न जाऊ देता बऱ्याच गोष्टी बदलायच्या असल्या कारणाने मी तरी गोयल साहेबांना वेळ घेऊ देणे पसंत करेन. https://www.quora.com/Why-trains-in-UP-and-Bihar-are-running-late-even-if-there-is-no-fog -------------------- या लिंकवर लोकांनी त्यांचे रेल्वेतल्या बदलांबद्दलचे मत नोंदवले आहे. https://www.quora.com/in/Has-Indian-railway-improved