Skip to main content

चायना मालाचा बट्ट्याबोळ...

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 05/10/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
चीन च्या वस्तू खरेदी करू नका --कैम्पेन जोरात चालुय.!!! । । मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की "या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय" आणि अजून पुढे म्हणजे... . Bla bla bla bla bla वगैरे वगैरे --/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं. मेसेज वाचला. थोडा विचार केला. ...--- अन त्याचा फोन मागितला. आय-फोन. 11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला. मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली. त्यावर क्लियरली लिहिलं होतं. "Designed in California. Assembled in China.". /// त्याला चूक कळालीच होती. पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की... "बापाला **** शिकवत जाऊ नको." /// मुद्दा असाय की... आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे. अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.?? फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता?? का????? दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार??? अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा?? का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये??? मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे? लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय. अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो??? की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड. तर एकूण वैलेंटाईन आला की "14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते... दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो. (ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.) अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???

वाचने 41754
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

अगदी हेच म्हणायचं होतं...! पण तरी ज्यांना परवडत असेल त्यांनी शक्य तितक्या प्रमाणात चिनी मालावर बहिष्कार घालावयास हवा.

In reply to by पाटीलभाऊ

पाटीलभाऊ सहमत... ज्यांना परवडता त्यांनी हे नक्कीच करायला हवा... कारण त्याने आपले दुसरे जे छोटे छोटे उत्पादक आहेत त्यांना नक्क्की फायदा होईल... 100% सहमत...

तस कराय्च म्हंटल तर आक्खी आयटी इंडस्ट्री झोपेल, कारण जवळ जवळ सगळच हार्डवेअर मेड इन चायना आहे. सगळ हार्डवेअर काढायचं म्हण्ट्ल तरी देखील प्रचंड नासाडी अन पुन्हा रीप्लेस करायला लागेल त्याच भांडवल. आहे का आपल्याकडे? हे फक्त आय्टीच, शिवाय, टेलीकॉम, इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर गुड्स आदी क्षेत्रे चिनने इतकी काबीज केलीत, की आपण अगदी ठरवुन नाही म्हंणालो, तरी ते शक्य नाही. मेक इन इंडिया जर का खरच यशस्वी झालं तर कदाचीत २० २५ वर्षांनी आपण चीनवरच अवलंबन संपवु शकू. २० २५ वर्ष ह्यासाठी म्हणतोय कारण, सगळ मॅन्युफॅक्चर करायला जो कच्चा माल लागणार, तो चीनने ऑलरेडी करार मदार करुन आपल्या जवळ घेउन ठेवलाय. अतीराष्ट्रवादी उन्मादक अवस्थेस प्राप्त झालेत अस वाटायला लागलंय. जवळ जवळ सगळ्या गोष्टींच इमोशनल भांडवल होत चाललंय. लॉजिस्टीकली विचार कोणी करायला तयार होतच नाहिये अस वाटतंय.

सर्व प्रथम हे सांगू इच्छितो कि माझा हि फोन चायना मेडच आहे. फोन , टीव्ही या वस्तू जास्तीत जास्त चायना मेड असतात. अशा महागड्या वस्तू फेकून देणे परवडणारे नक्कीच नाही पण इथून पुढे जी खरेदी करणार आहोत ती जास्तीत जास्त स्वदेशीच असावी अशी अपेक्षा करण्यात चूक काय आहे ? चैन मधून येणाऱ्या सगळ्याच वस्तू भारतात बनत नाहीत त्यामुळे सरसकट बहिष्कार टाकता येणार नाही पण ज्या वस्तू भारतात बनतात त्याचा वापर जर आपण सुरु केला तर भारतीय कारागिरांच्या हाताला रोजगार मिळेल. साधे उदाहरण . चायना चे कंदील , राखी घेण्यापेक्षा आपल्या इकडील भरपूर अपंग आणि होतकरू मुले या वस्तूंचे उत्पादन करतात. नेट वर पण याची बरीचशी माहिती मिळू शकते. एक छोटी सुरुवात उद्या बदल घडवू शकते.

In reply to by amit१२३

एक शंका, कंदील, पणत्या, फटाके वगैरे चायना मेड आहे की नाही हे कसे कळेल? मला वाटते स्वस्त आहे याव्यतिरीक्त कोणतीही खूण अश्या वस्तूंवर नसते.

In reply to by पुंबा

जर खरेदी डायरेक्ट बनवणाऱ्याकडूनच करणार असाल जसे पणती कुंभाराकडून आणि कंदील एखाद्या महिला बचत गटाकडून तसेच फटाके बनवण्यासाठी अनिल सारख्या भारतीय कंपन्या आहेत. थोडी शोधाशोध करावी लागेल पण मनाला वेगळेच समाधान लाभेल. शहरांमध्ये बहुतेक बचत गट आणि स्वयंसेवी संस्था अशा वस्तूंचे स्टॉल लावतात. दुकानदार बहुतेक वेळा चायना माल खरेदी करतात त्यामुळे त्यांच्याकडे भारतीय बनावटीच्या वस्तू मिळणे अवघड असते.

जिथे सुयोग्य स्वदेशी पर्याय उपलब्ध असेल (किमान) तिथे (तरी) पदरचे २ पैसे जास्त खर्च करुन विदेशी मालाच्या ऐवजी स्वदेशी माल विकत घेणे हे एक ग्राहक म्हणुन आपले कर्तव्य आहे. अर्थात ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना ही चैन परवडायची नाही पण ज्यांना हे परवडु शकते किमान त्यांनी तरी नक्कीच विचार करावा. १. उपभोक्त्यांच्या क्रयशक्तीनुसार स्वदेशीच्या पुरस्कारामुळे एतद्देशीय उद्योगांना फायदा होइल आणि त्यामुळे स्वदेशी रोजगार , औद्योगिकरण, कररुपी उत्पन्न इत्यादी वाचेल. २. जर हळु हळु करत विदेशी मालाला उठाव मिळेनासा झाला तर हळु हळु करत त्याची आवक कमी होइल. याचा अर्थ जो माल आधीच भारतात आला आहे तो वाया जाइल असे नाही कारण एकाएकी देशातली १२५ कोटी जनता विदेशी माल विकत घेइनासे होइल असे नक्कीच नाही खासकरुन त्याचा परिणाम जर घरगुती बजेट वर होणार असेल तर नक्की नाही. पण आयात कमी झाली तर परकीय गंगाजळी पण अर्थात शाबुत राहिल. आणी हा परिणाम हळु हळुच होइल. ३. उत्तम एतद्देशीय पर्यायांची लिस्ट नक्कीच मोठी आहे. अगदीच उदाहरण द्यायचे झाले तर विदेशी ब्रांडच्या कपड्यांऐवजी रेमंड चे कपडे वापरा. इतर कुठल्याही कापडापेक्षा रेमंडचा दर्जा खचित कमी नाही आणी दर्जाचा विचार केल्यास किंमती नक्कीच कमी आहेत. बर्‍याच विदेशी ब्रांड्सपेक्षा रेमंडचे कपडे द्सपटीने उत्तम आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना ना विदेशी ब्रँड परवडेल ना रेमंड. हा पर्याय आंजावर कळफलक बडवु शकणार्‍या मध्यमवर्गासाठी किंवा मध्यमवर्गासाठीच आहे. जाणीवपुर्वक आपण परदेशी कपड्यांची खरेदी टाळुन रेमंडचे कपडे घेउ शकत नाही का? घड्याळ घेताना बरेच लोक एक तरी घड्याळ उंची स्विस असावे म्हणुन षौक बाळागणारे असतात. अश्यांनी एक पर्याय म्हणुन उंची टायटन च्या घड्ञाळांचा विचार का करु नये? साबणाचे उदाहरण घ्या. पतंजली, खादी, फॅब इंडिया, अनुवेद, वादी यांचे साबण कुठल्याही परदेशी ब्रॅंडपेक्षा चांगले आहेत किंवा त्याच दर्जाचे आहेत. यापैके पतंजलीच्या किंमती देखील कम्पेरेबल आहेत. मग लक्स घेण्याऐवजी पतंजलीचा साबण का घेउ नये? की केवळ एका विशिष्ट पक्षाला विरोध म्हणुन बाबा रामदेव च्या कंपनीला विरोध करायचा? अनुवेदचे साबण किंचित महाग आहेत पण दर्जा बर्‍याच परदेशी साबणांपेक्ष अधिक चांगला आहे. फॅब इंडियाचे खुप महाग आहेत पण दर्जा अत्तुत्तम आहे. ज्यांना परवडते त्यांनी नक्कीच हा पर्याय निवडावा. ज्याना नसेल परवडत त्यांनी पतंजलीचा विचार का करु नये? स्वदेशी विरुद्ध विदेशी हा केवळ एक राष्ट्रवादाचा विषय नाही. त्याचा राष्ट्राच्या एकुण आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणामही लक्षात घ्यावा. स्वदेशी चळवळ म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद अशी भूमिका गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनाच्यावेळी आपण घेतली का? शिवाय एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी की सरकार सरसकट चायनीज मालावर बंदी आणू शकत नाही. एकदा फ्री ट्रेड पॉलिसी अंगिकारली असली की सरकारी पातळीवर त्याच्या विरुद्ध फतवे काढता येणार नाहित. सरकार प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष आवाहन नक्की करु शकते. पण बंदी नाही आणु शकत. त्यामुळे हा जो काही पर्याय अवलंबवायचा असेल तर तो ग्राहक पातळीवरच अवलंबवावा लागेल.

In reply to by मृत्युन्जय

प्रतिसाद आवडला ! जिथे सुयोग्य स्वदेशी पर्याय उपलब्ध असेल (किमान) तिथे (तरी) पदरचे २ पैसे जास्त खर्च करुन विदेशी मालाच्या ऐवजी स्वदेशी माल विकत घेणे हे एक ग्राहक म्हणुन आपले कर्तव्य आहे. स्मार्टफोन आणि पॉवर बँक दोन्ही फार मोठ्या प्रमाणात विकल्या जाण्यार्‍या वस्तू आहेत, त्यामध्ये आपण अजुन मागे का ?बरेचसे स्मार्टफोन ब्रँन्ड हे तर चीनी आनी,चिनी कंपन्यांनी ताब्यात घेतले आहेत किंवा मेड इन चायना आहेत. इथे मोठा बदल घडायला हवा. रामदेव बाबाची सर्व उत्पादने उत्त्म असुन मी जितक्या जमेल तितक्या सर्व वस्तू त्यांच्याकडुन घेतो. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Petition to White House seeking to declare Pakistan 'a state sponsor of terrorism' makes new record

In reply to by मृत्युन्जय

बर्‍याच विदेशी ब्रांड्सपेक्षा रेमंडचे कपडे द्सपटीने उत्तम आहेत.
विदेशी ब्रँडचे कपडे कुठले आहेत? तुम्हाला ८०-९० टक्के युरोपियन नावाचे शर्ट, टीशर्ट वगैरे दिसतात ते पूर्ण पणे भारतीय मालकीचे ब्रँड आहेत. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी पिटर इंग्लंड, जॉन मिलर वगैरे नावे दिली आहेत. जे क्वचित काही ब्रँड बाहेरच्या देशांचे आहते, त्यांचे पूर्ण उत्पादन आणि वितरण भारतात्च होते. फक्त नाव वापरण्याची रॉयल्टी देशाबाहेर जाते, जी फारच कमी असते. त्यामुळे रेमंड्स वापरा नाहीतर अ‍ॅरो, पैसे भारतातच रहातात. तशीच परीस्थिती लक्स किंवा इतर उत्पादनाची. त्यातली बरीसची भारतातच तयार होतात आणि पैश्याचा प्रचंड मोठ्ठा हिस्सा भारतातच रहातो. वर त्यातले काही उत्पादक भारतात असला माल तयार करुन निर्यात करतात, म्हणजे पैसे भारतातच येतात. -- जसे मारुती मधे सुझुकीचा ५०% पेक्षा जास्त हिस्सा आहे. त्याच्या रॉयल्टी साठी जितके डॉलर भारताच्या बाहेर जातात त्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक डॉलर मारुती निर्र्यात करुन मिळवते. मारुती ऐवजी काय प्रिमिअर घ्यायची का?>

आपण घालायच्या बंदी अगोदर समजा चायनानेच भारतात माल पाठविणे बंद केले तर ...आपण समर्थ आहोत का ? आपण चायना म्हणजे फक्त किरकोळ वस्तू समजतो ..त्यापेक्षा खूप अवाढव्य देवाण घेवाण सुरु आहे

In reply to by rain6100

खूप अवाढव्य देवाण घेवाण सुरु आहे
सहमत, टॉईज, प्लास्टिक हाउसहोल्डस आणि इलेक्ट्रोनिक्स वगैरे सोडा, सोलापूरसारख्या गावातल्या सगळ्या मोठ्या प्रेसवाल्यांना (६-७ जण) चिनी पेपरमिलने ग्वांगझाऊ सहित मकाव फिरवून आणले. आता सिनारमास, बिल्ट (बल्लारपूर इंडस्ट्रीज), विंध्य सारख्या पेपरएवजी चायनामेक आर्टपेपरचा स्टॉक वापरात आहे. डायरेक्क्ट डिलिव्हरी पुणे नाहीतर दुसर्‍या डेपोतून होते. चक्क ४० टक्क्याचा फरक आहे किमतीत असे कन्फर्म ऐकून आहे. एका विद्वानाला हे बोललो तर "जाउदेत की, चिनी पर्यावरणाचाच नाश होईल झाडे तोडून" हे उत्तर मिळाले. आता गप्पच राहणे श्रेयस्कर.

In reply to by rain6100

तर मग चीनी माल आपण दुसर्‍या देशांमधून विकत घेउ शकतोच. अर्थात तसे होण्याची शक्यता निगेटिव्ह आहे.

स्वातंत्र्यापूर्वीची स्वदेशी चळवळ आणि आताचा अँटी-चिनी स्वदेशी उन्माद यातला मूलभूत फरक व्हॅल्यू चेन या साखळीतल्या कड्या पाहू: कच्चा माल मिळवणे --> उत्पादन --> वितरण (हे अतिसुलभीकरण आहे. व्यवसायानुसार यात बदल होतात. उदा० टेलिकॉम व्हॅल्यू चेन पुष्कळच वेगळी दिसते. या सर्व कड्यांना एकाच वेळी दिल्या गेलेल्या 'सेवा' यात धरल्या नाहीयेत. रिसर्च, डेव्हलपमेंट ही धरली नाहीये.) प्रत्येक टप्पा त्या वस्तूच्या मूल्यात काही वाढ करतो. किंवा दुसर्‍या अर्थाने - किमतीतला काही भाग प्रत्येक टप्प्याला 'देता' येतो. स्वातंत्र्यापूर्वी अनेक वस्तूंबाबत कच्चा माल भारतातच पिकवला जायचा, आणि तयार प्रॉडक्ट चढ्या किमतीला भारतातच विकलं जायचं. उदा० कापड. कापूस भारतात पिकवला जायचा. तो इंग्लंडात निर्यात केला जायचा (रु.१०). मँचेस्टरच्या गिरण्यांतून मांजरपाट कापड भारतातच विकलं जायचं (रु. १००). म्हणजे, व्हॅल्यूचेनची पहिली आणि शेवटची कडी भारतातच होती, पण मलिदा मात्र इंग्लंडात जात होता. जेव्हा दादाभाई नौरोजींनी "ड्रेन ऑफ वेल्थ" म्हणून डरकाळी फोडली तेव्हा व्हॅल्यू चेनच्या मधल्या कडीचा हा मलिदा भारताबाहेर जाऊ नये या हेतूने "स्वदेशी" आणि नंतर भारतीय भांडवलदारांच्या हाती न जाता अंत्योदय व्हावा म्हणून चरखा आदि गोष्टी घडल्या. पण मुद्दा असा होता, की मँचेस्टर गिरण दहा रुपयाला कापूस घेत होती आणि शंभर रुपयाला विकत होती. उत्पादनाच्या टप्प्याची मूल्यवृद्धी इंग्लंडमध्ये अडकली होती. ---------------------------- चिनी मालामध्ये मूल्यवृद्धी भारतातच राहते आहे हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे. कारण इथे सर्वात जास्त मूल्यवृद्धी करणारा टप्पा वितरण हा आहे, उत्पादन हा नव्हे. ---------------------------- त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी कापडाला विरोध आणि स्वातंत्र्योत्तर काळात चिनी मालाला विरोध हे "मालगुडी डेज"ची तुलना "होणार सून मी..."शी करण्यासारखं आहे.

In reply to by आदूबाळ

चिनी मालामध्ये मूल्यवृद्धी भारतातच राहते आहे हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे. कारण इथे सर्वात जास्त मूल्यवृद्धी करणारा टप्पा वितरण हा आहे, उत्पादन हा नव्हे.
डांगेअण्णांच्या खालच्या प्रतिसादातूनः
रस्त्याच्या कडेला चायनिज गॉगल्स, घड्याळी इत्यादी विकणारे बघत असाल, एक चष्मा बल्कमधे वीस रुपयाला मिळतो, तो विक्रेता त्याचे शंभर ते दिडशे घेतो. घड्याळींचेही तसेच. ग्राहक देत असलेल्या किंमतीच्या दहा टक्क्यात माल घरपोच मिळतो. एवढ्यातच शेतीसाठी लागणारे एक यंत्र मी इथल्या बाजारात इथल्या उत्पादकांचे बघितले. साडेपाच हजार रुपये किंमत होती, बल्कमधे घेतले तर साडेतीन पर्यंत मिळणार होते. अलिबाबा डॉट कॉम वरुन ते फक्त सातशे-आठशे रुपयात मिळत होते. म्हणजे चायनिज मालावर रग्गड नफा आपल्याच स्वदेशी लोकांना मिळतोय.

In reply to by आदूबाळ

चिनी मालामध्ये मूल्यवृद्धी भारतातच राहते आहे हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे. कारण इथे सर्वात जास्त मूल्यवृद्धी करणारा टप्पा वितरण हा आहे, उत्पादन हा नव्हे. बरेच गैरसमज आणि अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद. पण यावर आपण सविस्तर लिहा (म्हणजे आमच्यासारख्या अनेक अज्ञानी लोकांची दृष्टी उघडेल) अशीही आपल्याला विनंती आहे.

दुसर्‍या धाग्यावर मृत्यूंजय यांना हा प्रतिसाद दिला होता, त्यांचे उत्तर अपेक्षित होते, त्यांनी अजून दिले नाही. विषयाच्या निमित्ताने तोच प्रतिसाद इथे जसाच्या तसा चिकटवत आहे. http://misalpav.com/comment/881194#comment-881194
जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले.
उत्तम विचार आहे मृत्यूंजय साहेब, पण स्वदेशीची नेमकी व्याख्या काय असावी ह्या प्रश्नावर अडलो बघा. आपल्या देशात बनणार्‍या वस्तू कि मल्टीनॅशनल (बाहेरच्या देशात नोंदणीकृत असलेल्या, मूळ बाहेर असलेल्या) कंपनीच्या नसलेल्या वस्तू? बाहेरुन फार कमी माल बनून येतो. स्वदेशी उत्पादनांतही काही कोर, पेटंटेड प्रॉडक्ट्स-टेक्नॉलॉजी बाहेरची असते. मग मालक भारतीय की अभारतीय एवढाच निकष लावायचा का? तसे केले तर आपल्याच काही देशबंधूंच्या पोटावर पाय येईल कदाचित. मी नाशिकमधे राहतो, इथल्या काही अभियांत्रिकी कंपन्या दिग्गज अशा अभारतीय ब्रॅण्ड्ससाठी उत्पादन करतात, अनेक ठिकाणी कार्ससाठी, बाईकसाठी लागणारे स्क्रू, नटबोल्ट इत्यादी बनवणारे छोटेछोटे उत्पादक आहेत. २०१३-१४ मधे वाहन उद्योगावर आलेल्या अल्पशा मंदीमुळे अनेक महिने इकडचे काही प्लान्ट्स बंद होते, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अभारतीय कंपन्या अनेक स्वदेशी उत्पाद्कांकडून वस्तू बनवून फक्त रॅपर आपल्या नावाचे चिटकवतात. आजच्या ओपन मार्केट पॉलिसीमुळे स्वदेशी-विदेशी असा फारसा भेद राहिला नाही असे वाटते. फक्त नफा कोण नेतो असे बघायचे तर त्याबद्दल अ‍ॅज ए सी. ए. तुम्हीच जास्त नीट सांगू शकाल. सर्व उत्पादन चायनातच होणार्‍या चायनिज मालाबद्दल तक्रार असेल तर साधं उदाहरण देतो. रस्त्याच्या कडेला चायनिज गॉगल्स, घड्याळी इत्यादी विकणारे बघत असाल, एक चष्मा बल्कमधे वीस रुपयाला मिळतो, तो विक्रेता त्याचे शंभर ते दिडशे घेतो. घड्याळींचेही तसेच. ग्राहक देत असलेल्या किंमतीच्या दहा टक्क्यात माल घरपोच मिळतो. एवढ्यातच शेतीसाठी लागणारे एक यंत्र मी इथल्या बाजारात इथल्या उत्पादकांचे बघितले. साडेपाच हजार रुपये किंमत होती, बल्कमधे घेतले तर साडेतीन पर्यंत मिळणार होते. अलिबाबा डॉट कॉम वरुन ते फक्त सातशे-आठशे रुपयात मिळत होते. म्हणजे चायनिज मालावर रग्गड नफा आपल्याच स्वदेशी लोकांना मिळतोय. ग्राहकाने शेवटी आपला फायदा बघावा, वस्तू-सेवेचा दर्जा बघावा, कंपनी-उत्पादन स्वदेशी की विदेशी या भानगडीत पडणे गरजेचे नाही असे माझे मत. कोणत्या लिन्क्स कुठे जुळलेल्या असतील ते आपल्यास ठावूक नसते. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by संदीप डांगे

चांगला प्रतिसाद आहे. नक्कीच विचार करण्याजोगा. धन्यवाद. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास ज्या कंपन्यांचे मालक भारतीय आहेत अश्या कंपन्या स्वदेशी. मी अश्याच कंपन्यांना प्राधान्य देतो. उदा.: डाबर, पतंजली, व्हिडीओकोन, रेमंड. कलर प्लस चे कपडे अतिशय सुंदर असतात आणि तो लायसंस ब्रांड आहे. रेमंड कडे लायसंस आहे बहुधा. तरी मी पसंती देताना रेमंडला देतो. दुसरी पसंती अश्या कंपन्यांना देतो ज्यांचे उत्पादन भारतात होते. उदाहरण द्यायचे झाल्यास मदुरा गारमेंट्सचे बरेच ब्रँड्स. इथे अर्थात एक ग्राहक म्हणुन मी दर्जाचा विचार करतोच करतो. टाटा मोटर्स ही भारतीय कंपनी असुनही गाडी घेताना मी इंडिगो अथवा तत्सम गाड्यांचा विचार केला नाही. त्यातल्या त्यात मारुतीचा विचार केला (पण नाही आवडली त्यांची गाडी पण). घेताना विदेशी कंपनीची गाडीच घेतली. टीव्ही घेतानाही एकदा व्हिडीयोकोनला पसंती दिली. पण दुसर्‍यांदा परदेशी कंपनीचा टीव्ही फार म्हणजे फारच स्वस्तात मिळाला तेव्हा तो घेतला. इतर घरगुती उत्पादने घेताना मात्र सुयोग्य पर्याय उपलब्ध असेल तर मी स्वदेशीला नक्कीच प्राधान्य देतो. विदेशी वस्तु घेताना त्यातला काही फायदा एतद्देशीय उद्योगांना होतही असेल पण स्वदेशीचा सगळा (किंवा जास्तीत जास्त) फायदा घरात राहतो ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. स्वदेशी चळवळीचा सगळ्यात मोठा अडसर म्हणजे सुयोग्य स्वदेशी पर्याय उपलब्ध नसणे. जिथे आहेत तिथे स्वदेशीलाच प्राधान्य द्यावे या मताचा मी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला "जास्त" फायदा होइल. त्यामुळे प्रतिसादाची सुरुवातच मी जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल तिथे स्वदेशी वापरणे नक्कीच चांगले. या वाक्याने केली. आणी ज्या प्रतिसादाचा संदर्भ आपण वरती दिला आहे त्या वाक्याचा शेवटही याच वाक्याने केला. त्यामुळे विदेशी वस्तु म्हणजे सगळाच्या सगळा फायदा बाहेर जातो असे नाही हे मला नक्कीच मान्य आहे पण स्वदेशी मालामध्ये तो फायदा बर्‍याच अंशी भारतातच राहतो. बादवे स्वदेशीची माझी व्याख्या म्हणजे "स्वदेशी उत्पादन + स्वदेशी ब्रँड + एतद्देशीय मालक". यापैकी एक एक निकष कमी करत जाउ तशी तशी माझी पसंती कमी कमी होत जाइल. पण पुर्ण स्वदेशी पर्याय उपलब्ध नसेल किंवा सुयोग्य नसेल तर मी अर्थात पुर्ण परदेशी मालाचा देखील विचार करेन. थोडक्यात माझा स्वदेशीला पाठिंबा ग्राहकाभिमुख आहे. स्वदेशीच हवी हा अट्टाहास नाही. साबणाची रॅश उमटली तरी चालेल पण लक्स न वापरता पतंजली वापरेन हा अट्टाहास नाही. किंवा स्वदेशी आहे म्हणुन ६००० रुपये किलोचा कॉटेज इंडस्टॄचा हँडमेड कोको बटर साबण वापरेन पण स्वस्तातला विदेशी साबण वापरणार नाही असेही नाही. पण दर्जा चांगला असेल आणी किंमतीत थोडाफारच (थोडा जास्त अर्थात. कमी असेल तर प्रश्नच नाही) फरक असेल तर मी नक्कीच स्वदेशीला पसंती देइन / देतो. होप धिस क्लॅरिफाइज :)

२-४ वेळा बीजिंग ला जाऊन आलोय व्यावहारिक बोलत नाही पण त्या लोकांकडे खूप डेडिकेशन आहे आणि प्रोफेशनलपणा पण . चक्क जागा गेली तरी ती लोक काहीच बोलू शकत नाहीत ना मोर्चे ना उठाव . काही झालं तरी ते देशाच्या बाजूने उभे आहेत . कारण त्यांचं सरकार त्यामुळे हा सगळा व्यापार वाढतोय. मालावर बहिष्कार वैग्रे सध्या आपल्याला जमेल पण ज्यांना तेच परवडतं त्यांचं काय? . ते देश पाहतील कि पैसे पाहतील ??? आपल्याला सध्या हे जमणार नाही आणि बहिष्कार वैग्रे पण जमणार नाही .

In reply to by वरुण मोहिते

देशाचा फायदा आणि नागरिकांचा फायदा यात काही फरक असतो काय ह्याबद्दल माझं कंफुझन आहे जरा..

In reply to by संदीप डांगे

असतो. फरक असतो. जास्त लांब कशाला ? इथे मुंबई मुनसिपालिटी चा वार्षिक अर्थसंकल्प 40,000 कोटी रुपयांचा असतो. भरपूर फायद्यात आहे ना मुनसिपालिटी ? पण लोक आहेत का फायद्यात ? खुश आहेत का ? रेटिंग काय देतील लोक खुशीचे - 1 ते 10 स्केल वर ?

In reply to by अभिजित - १

अर्थसंकल्प चाळीस हजारकोटीचा असण्याचा आणि नफ्याचा नक्की काय संबंध आहे ते कळले नाही. तसेच अर्थसंकल्पाच्या नफ्यातोट्याशी लोकांच्या खुशी-नाखुशीचा संबंधही. देश आणि देशाचे नागरिक ह्यात फरक असतो काय हा मूळ प्रश्न.

In reply to by संदीप डांगे

हा घ्या देश आणि देशातील माणसे यांच्यातील फरक. मोदी साहेबाना देश एकदम जबरदस्त करायचा आहे. करप्शन संपले नसले तरी कमी करायचा प्रयत्न ते करत आहेत. पण मग पार्टी ला फंडिंग कुठून आणायचे ? मग तूर डाळ प्रकरण सुरु होते. बेपारी लोकांना खुली सूट आहे साठेबाजीची. थोडक्यात लोकांच्या खिशातून पार्टी फंडिंग . देश भक्कम / लोक कंगाल .. ( तुमि आमी नाही पण इतर गरीब लोक तर नक्कीच कंगाल )

"चिनी मालाची देशात आवक का करावी ?" याचे अर्थकारण आणि समाजकारण याबाबत जी कारणे इथे चर्चिली जात आहेत यापैकी बहुतेक कारणे "चिनी मालाची अमेरिकेत आवक का करावी ?" यासाठीही सांगितली गेली होती व ती जनतेच्या गळी उतरवलीही गेली होती. त्या मालाचा उठाव व्हावा यासाठी लोकांना सहज कर्ज (थेट कर्ज आणि सहजपणे मिळणारी क्रेडिट कार्ड्स) उपल्ब्ध व्हावे अश्या प्रणालीही व्यवहारात आणल्या गेल्या होत्या. त्याचा परिणाम अमेरिकन मार्केटमध्ये चिनी मालाचा सुळसुळाट होण्यात, अमेरिकन उद्योगधंदे बुडण्यात, सर्वसामान्य अमेरिकन नागरीक कर्जात बुडण्यात, चीन सधन बनण्यात आणि चीनने कमावलेल्या पैश्यांपैकी काही अमेरिकन बाँड्जमध्ये गुंतवणूक करून त्यांना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचे स्थान मिळविण्यात झाला आहे व त्याचा पुरेसा फायदा (लिवरेज) चीन जागतिक राजकारणात घेत आहे. हा फार जवळचा इतिहास आणि चालू वस्तूस्थिती आहे. भारत आणि अमेरिकेत एक फार मोठा फरक आहे. अमेरिका आजही जगातील सर्वात मोठी सामरिक महासत्ता आहे आणि त्या जोरावर आणि त्यांच्या युरोपियन दोस्तांच्या चीनविरोधाच्या मदतीने, जगात आपले सामरिक-राजकिय-आर्थिक स्थान कसेबसे का होईना पण राखून आहे. भारताची अवस्था अमेरिकेसारखी झाली तर त्याने प्रेमाने (अर्थसहाय्याने) अथवा जबरदस्तीने (सामरिक ताकदीने) आपल्या बाजूला वळवावा असा जागतिक महत्वाचा कोणी देश नाही. (केवळ चीनविरोधासाठी का होईना, पण) अमेरिका किंवा युरोपियन देशांनी भारताची बाजू घेतली तरी ती "त्या देशांनी लावलेल्या बोलीची किंमत" चुकविल्याशिवाय मिळणार नाही, हे नक्की. थोडक्यात, भारताची "इकडे आड तिकडे विहीर" अशी अवस्था होईल. तेव्हा, भारताने केवळ आपले आजचे संकुचित आर्थिक हितसंबंध बघून धोरण ठरविण्याऐवजी; दूरगामी फायदे-तोटे पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल. हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य माणसाला रोजच्या भाकरीच्यापुढे काळजी करण्या एवढी माहिती आणि/अथवा ताकद आणि/अथवा प्रगल्भता नसते. स्वतःच्या रोजच्या विवंचना आणि आजूबाजूचे लोक काय म्हणतात यावरून त्यांचे बहुतांश विचार ठरतात. म्हणूनच, प्रगल्भ तज्ञांनी दूरगामी विचार करून देशाचे (व पर्यायाने नागरिकांचे) दूरगामी हितसंबंध डोळ्यासमोर ठेऊन त्यांची मते मांडली तरच देशाच्या व पर्यायाने नागरिकांच्याही फायद्याचे होईल. बाकी, उत्तम विचारमंथन चालू आहे. त्यातून समतोल विचार बाहेर यावे अशी अपेक्षा व इच्छा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ही दुसरी बाजू खरेच काळजी करण्याजोगी आहे हे नक्की. थोडक्यात स्वदेशीवाल्यांची थट्टा करायची म्हटली तरी हा प्रतिसाद लक्षात ठेवावा लागेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारताने केवळ आपले आजचे संकुचित आर्थिक हितसंबंध बघून धोरण ठरविण्याऐवजी; दूरगामी फायदे-तोटे पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल
हे नक्की कोणाचे काम आहे? प्रस्तुत विचारांवरुन तरी हे सरकारी यंत्रणा व राष्ट्रधुरिणांचे काम आहे असे दिसते. मार्केट, उत्पादक, व्यापारी, ग्राहक ह्यांचा (सहसा) कोणताही देश नसतो. अशा वेळेस एक देश म्हणून जागतिक स्तरावर टिकून राहणे व त्याचवेळेला आपले राजकिय, आर्थिक फायदे नीट जोपासणे हेही करणे शक्य व्हावे ह्यासाठी देशपातळीवर (सरकार, सरकारी यंत्रणा व राष्ट्रधुरिणलोक्स) काय काम झाले पाहिजे हा प्रश्न विचारावासा वाटतो. तसेच सांप्रत सरकारचे ह्याबाबतीत काय धोरण आहे किंवा काय चालू आहे किंवा होणार आहे हेदेखील. दुसरे असे की, हे माझे मत अर्थात, जर अमेरिकन अनुभव ताजा आहेच तर त्यापासून काही शिकून नवे डावपेच अवलंबणे शक्य आहे. जसे की चीनमधून स्वस्तात मिळणारा माल घेऊन त्यावर मिळणार्‍या गडगंज नफ्यातून शिल्लक बाजूला काढून मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी वापरणे. म्हणजे कसं ते नीट सांगता येत नाहीये पण आपण 'आत्ताच, लगेच, ताबडतोब' चीनीमालाला समांतर व्यवस्था उभारु शकत नाही मग ती उभारेपर्यंत स्वस्त चीनीमाल घ्यावा, त्यातून देशी उत्पादकांच्यासाठी सुविधा उभ्या कराव्या. हे कितपत व कसे शक्य होऊ शकते याबद्दल शंका आहेच. चीन आज जे धोरण वापरत आहे तेच धोरण कधीकाळी अमेरिका वापरत असे (असा प्रचारतरी चालू असे) हे अंधुकसे आठवते. म्हणजे देशी मालाची भाव व दर्जात प्रचंड कोंडी करायची की त्यायोगे स्पर्धक संपून जातील व एकछ्त्री अंमल होईल. आता हे धोरण मी तरी गेले वीस-पंचवीस वर्षे ऐकून आहे. असे खरोखर झाल्याचे कितपत दिसते? चीननेही असेच काही धोरण आखलेले असेल तर त्याचे परिणाम भारतावर कितपत होतील? चीनी मालात अनेक प्रकार आहेत. १. ज्यात काही मोजके घटक फक्त चीनी असतात. जसे की इलेक्ट्रीकल किंवा इलेक्ट्रोनिक प्रणाली, बोर्ड्स, एलईडी लाईट्स, छोट्या मशिन्स इत्यादी. बाकीचे ९० टक्के कॉम्पोनंट्स, त्याची बांधणी किंवा डिझाईन संपूर्णपणे देशी असते. म्हणजे फ्याक्टरी भारतात पण कॉम्पोनंट्स चीनमधून आयात होतात. २. असे काही ज्यात संपूर्ण बनावट, डिझाईन, घटक, बांधणी सर्व काही चीनी असतं, फक्त भारतीय ब्रॅण्ड चे नाव चिटकवले जाते. उदा. कार्बन मोबाइल्स. ३. संपूर्ण ब्रॅण्डसकट चीनी माल. जसं की झिओमी (शिओमी) फोन्स. ह्या तीन्ही प्रकारात चीनला नाकारणे कितपत शक्य आहे ह्यावरही विचार मांडले गेले तर स्वागत आहे. ----------- अवांतर किंवा समांतरः द्राक्षबागांमधे मोठ्या प्रमाणावर व वेगाने फवारणीसाठी इटालियन कंपनीने मशिन्स बनवलेले व बरीच विक्री नाशिकभागात झाली. पावडर फवारणी करणारे एक छोटे यंत्र सुमारे सव्वालाख रुपयाला आहे. तेच यंत्र संगमनेरच्या एका यंत्र-उत्पादकाने केवळ ६७ हजाराला (किरकोळ विक्री किंमत) सर्व देशी घटक वापरुन तयार केलेले कालच कळले. उद्या चीनने तसेच यंत्र वीस हजाराला उपलब्ध केले तर (जे शक्य आहे) 'भारतीय' ग्राहक म्हणून द्राक्षबागाइतदाराने काय करावे?

In reply to by संदीप डांगे

असा प्रश्न येईलयाची कल्पना होतीच. त्यामुळे आधिच लिहिलेला खालील प्रतिसाद वाचावा. वरच्या अवांतरच्या संदर्भात... चीन हुकुमशाही आहे. त्यामुळे तो... (अ) जबरदस्तीने कमी ठेवलेले कामगारांचे पगार (आ) अनेक प्रकारच्या उघड आणि छुप्या सबसिडिज आणि (इ) चलनाच्या दरात चलाखीने केलेले बदल इत्यादी गैरवाजवी गोष्टी वापरून आपला माल स्वस्तात विकू शकतो... यालाच डंपिंग असे म्हणतात. हे जरी आंतरराष्ट्रिय कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे, तरी आपल्या राजकिय-सामरिक व UN मधिल स्थानाचा गैरफायदा घेत चीन ते करत आहे. या सगळ्याचा परदेशात स्वस्त माल विकून त्याचा उपयोग स्थानिक उद्योगधंदे बंद पाडण्यासाठी केला जातो. एकदा बाजारपेठेतील इतर सर्व प्रतिस्पर्धी नेस्तनाबूद झाले की त्या देशाला आयातीवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मग त्या वस्तूंचे भाव आपल्या नियंत्रणात ठेवून ते हवे तसे वाढवणे शक्य होते. थोडक्यात आजचा फायदा पुढच्या काही वर्षांत केवळ तोट्यात परावर्तीत होत नाही तर त्याचे देशाच्या परावलंबित्वातही रुपांतर होते, जे जास्त धोकादायक असते. हा एक प्रकारचा देशात पाय न ठेवता केलेला नवीन आर्थिक वसाहतवाद म्हणायला हरकत नाही. आशियातल्या आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांत चीन हा मार्ग अनुसरत आहे. याचसाठी सुजाण राजकारणी, विषयातले तज्ञ, कारखानदार, विपणन तज्ञ आणि ग्राहक यांनी एकत्रितपणे आपल्या सर्वांचा केवळ आताचा संकुचित फायदा न बघता दूरगामी विचार व कृती करणे जरूरीचे आहे. जे असा विचार व कृती करतात ते सबळ महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे जातात (याला शॉर्ट कट नसतो), जे असा विचार करू शकत नाही ते उलट्या दिशेने प्रवास करतात... या दृष्टीने अमेरिकेचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अजून एक महत्वाचे... WTOच्या काही कायद्यांमुळे देशाने आवक मालावर किती व कशी बंधने घालावी यावर सीमा येतात. आयातीच्या फायद्याने गब्बर बनणार्‍या व्यापार्‍यांना आपल्या कृतीने देशावर भविष्यात काय परिणाम होतील याचा विचार अथवा चिंता करण्याची गरज सहसा वाटत नसते. त्यांच्यासाठी लोक तो माल किती प्रमणात खरेदी करतील हा एकच एक घटक आयातीसाठी महत्वाचा असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आज जागरूकता दाखवली नाही तर... भविष्यात अमेरिकेसारखी परिस्थिती भारतात झाली तर, देशावर चिनी वरचढीचा दबाव सुरु झाल्यावर, आयात व्यापाराने गब्बर झालेले फार थोडे व्यापारी, कमावलेल्या पैश्यांची मदत घेऊन, पाश्चिमात्य देशांत पलायन करून तेथे मजेत राहू शकतील. मात्र, भारतात उरलेले इतर सर्व नागरीक चीनी दबावाखाली सारखेच दबले जातील... त्यांनी चिनी मालाला विरोध केला होता की त्याचा पुरस्कार केला होता, यावरून काहीच फरक पडणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव मिळाला तसंच अमेरिकन कंपन्यांनाही चीनमध्ये शिरकाव करता आला. अमेरिकन कंपन्यांचा नफा स्वस्त मनुष्यबळ मिळाल्यामुळे आणि चिनी तरुणाईचं आयतं मार्केट मिळाल्यामुळे वाढला. त्या नफ्याची अमेरिकेत पुनर्गुंतवणूक झाली नाही आणि अमेरिकन कंपन्यांनी हा नफा इतर देशांमध्ये शिरकाव करायला वापरला. त्यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांना जरी त्रास झाला तरी अमेरिकन कंपन्यांना झाला नाही. हे आपल्याकडे कदाचित होणार नाही. एकतर अमेरिकन कंपन्या महाप्रचंड आहेत. भारतीय कंपन्या त्या पातळीला अजून पोचलेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आणि लोकसंख्या वाढीचा दर मंदावणं. त्यामुळे चीन ही बाजारपेठ म्हणून हळूहळू अनाकर्षक बनते आहे. भारत लगेचच त्या परिस्थितीत पोचेल असं नाही. दुस-या शब्दांत सांगायचं तर आपले आज जे weak points आहेत, त्यांचा पुढे कदाचित फायदा होऊ शकेल.

In reply to by बोका-ए-आझम

चिनी मालाला जसा अमेरिकेत उठाव मिळाला तसंच अमेरिकन कंपन्यांनाही चीनमध्ये शिरकाव करता आला. यामध्ये "आयात करणार्‍या व्यापार्‍यांनी देशाच्या नागरिकांच्या जिवावर आपले खिसे भरले" हे सर्व त्या देशाच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे झाले काय ? नाही. याचमुळे, अमेरिका "राजकारणी नागरिकांच्या भल्याकरिता" चालवत नसून "तिथल्या बलाढ्य वित्तसंस्था त्यांच्या व्यवस्थापकमंडळाच्या व गुंतवणूकदारांच्या भल्याकरिता" चालवत असल्याचे म्हटले जाते. सद्याचे आर्थिक संकट व त्यावर अमेरिकेने केलेल्या उपायांचा इतिहास पाहता या आरोपात बरेच तथ्य दिसते. *** भारतीय कंपन्या त्या पातळीला अजून पोचलेल्या नाहीत. याचाच सरळ अर्थ असा की भारतिय कंपन्यांना केवळ "वस्तूंच्या ठराविक वेळासाठी कमी ठेवलेल्या किंमती" या एकमेव स्ट्रॅटेजीने दिवाळखोर बनवणे शक्य आहे. हा अमेरिकेला पूर्वी किंवा सद्या असलेल्या धोक्यापेक्षा फार मोठा धोका आहे... याचे मुख्य कारण अमेरिका व भारत यांच्या राजकीय-सामरीक ताकदीत असलेल्या प्रचंड तफावतीत आहेत. (भारतामध्ये चीनच्या आक्रमक आर्थिक चढाईपासून सावरायला आधार घेण्याइतकी राजकीय-सामरीक ताकद नाही.) *** त्यामुळे चीन ही बाजारपेठ म्हणून हळूहळू अनाकर्षक बनते आहे. भारत लगेचच त्या परिस्थितीत पोचेल असं नाही. तसे पाहिले तर आताही भारत-चीन व्यापारात चीनचा $४०० कोटीचा फायदा होत आहे. याचाच अर्थ असा की भारताला भविष्यात चीनमध्ये निर्यात वाढवणे कठीण आहे. पण, चीनला आपल्या मालाच्या किमती गैरव्यवहारी कारवायांनी कमी ठेऊन भारतात निर्यात वाढवणे सोपे आहे. चीनची आतापर्यंत जगाशी व्यवहार करतानाची धोरणे पाहिली तर चीन भारताची निर्यात वाढू देण्याची शक्यता अजिबात नाही, उलट त्यात समस्या निर्माण करेल हेच सत्य आहे. हे न समजणे मुर्खांच्या नंदनवनात राहणे होईल. जो देश UNच्या सिक्युरिटी काऊंसिलचा स्थायी सदस्य आहे आणि तरीही केवळ भारताला विरोध करायचा आहे याच कारणासाठी स्वतः UNने अतिरेकी म्हणुन जाहीर केलेल्या संघटनेच्या हाफिज सईद या सर्वोच्च नेत्याला अतिरेकी जाहीर करायला विरोध करत आहे, यावरून चीन किती आणि काय भारतविरोधी राजकिय-आर्थिक कारवाई करू शकेल याचा अंदाज बांधणे फार कठीण पडू नये.

In reply to by संदीप डांगे

वरच्या व इतर प्रतिसादांत याबाबत पुरेसे स्पष्ट केलेले आहे. इथले वाचक-लेखक सुबुद्ध आहेत. त्यामुळे तेच तेच परत स्पष्ट करण्याने फार फायदा होणार नाही असे वाटते. तेव्हा आपला अंतिम फायदा कशात आहे याचा त्यांनी विचार करावा आणि तो का करावा याबद्दल मी लिहिले आहे. त्याबद्दलचा विचार करून स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यास त्यांना लोकशाहीत पूर्ण परवानगी आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्पष्ट बोलायचे तर तुमचे सर्व प्रतिसाद हे चीनची भीती दाखवणारे व 'चीनी मालाचा ग्राहकांनी बहिष्कार करावा' ह्याची भलामण करणारे वाटले. जर असे असेल तर तसे स्पष्ट बोलण्यास तुम्हाला काय अडचण आहे हे कळले नाही. व्यक्तिशः मला, आपल्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तिकडून ठोस व परिणामकारक उपायांच्या चर्चेची अपेक्षा होती. तुमच्याच प्रतिसादांवरुन बोलायचे झाल्यास, चीनी मालाबाबत सरकारी धोरणे स्पष्ट असणे व देशविरोधी (दूरगामी वा निजगामी) असल्यास (तसेच कितीही व्यापारीहितउपकारक असली तरीही) ताबडतोब बदलणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी मार्केट, ग्राहक, व्यापारी हे कोणत्याही देशाचे नसतात हे आधीच म्हटले आहे. त्यामुळे 'ओनस इज ऑन गवर्नमेंट'. त्याबद्दल सरकार काय करत आहे हे विचारण्याची व स्पष्टपणे बोलण्याची परवानगी असावी लोकशाहीत? :) तसेच चीनी मालाला विरोध हा तकलादू आहे. कारण अंतिम ग्राहकास माल किंवा त्याचे कॉम्पोनंट्स चीनी वा जापानी वा अमेरिकी ह्याची माहिती असेलच असे नसते व त्याची अपेक्षा करणेही अवाजवी आहे. तसेच 'स्वदेशी' म्हणजे 'इंडिजिनियसली स्वदेशी' असे सर्वच बाबतीत शक्य नाही ही आजची प्रॅक्टीकल परिस्थिती आहे. सर्वच्या सर्व चीनी माल नाकारायचा तर देश ठप्प होईल, (कोणताही, फक्त भारतच नाही). ह्यात परत ओनस इज ऑन गवर्नमेंट. देशांतर्गत चीनी-समांतर माल उत्पादनाला करसवलती, उद्योगसंधी, उद्योगचालनात आर्थिक व इतर मदत, लक्षावधी बेरोजगार व रिकाम्या बसलेल्या तरूणवर्गाला (विशेषतः ९० टक्के असूनही घरी बसलेल्या) अल्पमोबदल्यावर कामास लावणे, मार्केटींगसाठी मदत ही सरकारनेच करणे अपेक्षित असेल. कारण एक देश म्हणून 'फक्त सरकार' काम करु शकते. व्यापार्‍यांकडून तशी अपेक्षा करणे म्हणजे परत परमिटराज आणल्यासारखे होईल. तसेच व्यापार्‍यांना नाहक देशद्रोहाच्या कैचीत पकडल्यासारखे भासते. सामान्य ग्राहकांनी सुजाण, चौकस, सुबुद्ध व्हायचे म्हटले तर बाजारपेठच बंद पडेल, चीनीच काय देशी मालही विकल्या जाणे दुरापास्त होईल. कारण सद्यस्थितीत बाजारात विकल्या जाणार्‍या चाळीस ते साठ टक्के गोष्टी मानवी जीवन जगण्यास अनावश्यक आहेत. ७०-८०च्या दशकातही लोक आज अस्तित्वात असलेल्या अनेक वस्तूंशिवाय जगलेच की. एका बाजूने आपल्याला खुली अर्थव्यवस्था त्याच्या फायद्यांसाठी हवी पण त्याच्या तोट्यांसाठी आपल्याकडे कोणतीही उपाययोजना नाही. सामान्य ग्राहकांनी चीनी मालावर (तोही सहज दृश्य, जसे की दिवाळीचे दिवे इत्यादी फुटकळ, सुमारे ०.००१%) बहिष्कार टाकून म्हणजे देशांतर्गत मागणी कमी करुन चीनी आयात बंद होईल हे दिवास्वप्न आहे हे जितक्या लवकर चीनीमालविरोधकांना कळेल तेवढे ते इतर प्रॅक्टिकल पर्यायांचा (जे अजून पुढे यायचे आहेत) विचार सुरु करतील असे वाटते. (मेगाबायटीची खोड मेल्याशिवाय जाणार नाही त्यामुळे क्षमस्व, तसेच काही अधिक-उणे झाल्यास माफी असावी.)

In reply to by संदीप डांगे

सामान्य ग्राहकांनी चीनी मालावर (तोही सहज दृश्य, जसे की दिवाळीचे दिवे इत्यादी फुटकळ, सुमारे ०.००१%) बहिष्कार टाकून म्हणजे देशांतर्गत मागणी कमी करुन चीनी आयात बंद होईल शक्य त्या चिनी बनावटीच्या वस्तु टाळुन तशाच प्रकरच्या भारतीय वस्तु प्राधान्य देउन खरेदी करणे , त्यात सर्व रकारच्य वस्तु आल्या, ' दिवाळीचे दिवे इत्यादी फुटकळ, सुमारे ०.००१% ' या ०.००१% टक्केवारीचा शोध कसा लागला ?

In reply to by ओम शतानन्द

>>> 'सुमारे' शब्द नै बघितला? तसेच अमितदादा यांनी दिलेली लिंक बघावी, आणि दिवाळी दिव्यांचा टक्का तुम्हीच सांगावा,

In reply to by संदीप डांगे

'सुमारे' शब्द नै बघितला? 'सुमारे" च्या नावाखाली कहीही टक्केवारी लिहिता येइल , त्याला काही अर्थ नाही

In reply to by संदीप डांगे

महोदय, 70 बिलियन डॉलर च्या व्यवहारातले तुम्हीच सांगा दिवाळी दिवे किती ते? नुसते दिवे नाही , तत्सम वस्तु , या वस्तुन्चा व्यापार नक्किच ०.००१% पेक्श जास्त आहे केवळ स्वस्त म्ह्णुन चिनी वस्तु घेणे हे सामजिक भान नसल्याचे लक्शण आहे ,

In reply to by संदीप डांगे

"ओनस इज ऑनगव्हर्नमेंट" हे फसवे व पळवाट शोधणारे विधान आहे... खरे म्हणजे "ओनस इज ऑन गव्हर्नमेंट अ‍ॅड सिटिझन्स टुगेदर" हे जास्त योग्य आहे. आपण आपले खिसे भरणे/सांभाळणे चालू ठेवायचे आणि केवळ सरकारला दोष देत रहायचे ही धोकादायक पळवाट झाली. कारण सरकारला आंतरराष्ट्रिय स्तरावर आपली पत राखण्यासाठी केवळ आपल्या देशाच्या फायद्याच्या स्वार्थी धोरणांना चिकटून राहणे शक्य नसते... उदा. WTO, पर्यावरणसंबंधी संस्था, आंतरराष्ट्रिय संबंध राखणे, इत्यादींमध्ये वजन राखून ठेवण्यासाठी देशाच्या एखाददुसर्‍या फायद्याला मुरड घालावी लागते. नागरिकानेही आपला सर्व स्वार्थ सोडून रस्तावर यावे अशी अपेक्षा करणे अवास्तव होईल. मात्र, ज्याला जमते तेवढी राष्टभक्ती मनात ठेऊन केवळ देशाच्या फायद्याचे जे जमेल ते करावे. कारण जर देश आर्थिक-राजकिय स्तरावर बलवान राहिला तरच देशाच्या नागरिकाला काही भविष्य आहे. दुर्दैवाने, सरकारनेच सर्व करावे, मतदान केले की नागरिकांची जबाबदारी संपली असे बर्‍याच भारतियांना वाटते ही वस्तूस्थिती आहे. हा विचार बहुतेक आपल्या धार्मिक-समाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे असे मला वाटते. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाराही परिक्षेपूर्वी देवाला प्रसाद चढवून उत्तम मार्कांकरिता प्रार्थना करतो व देव तसे करेल यावर विश्वास ठेवतो. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, आपल्या दिवाणखान्यात आणि मिपासारख्या संस्थळावर तावातावाने चर्चा करून सरकारला आणि इतर राजकारण्यांना धारेवर धरणारे अनेकजण मतदानाच्य दिवसाच्या सुट्टीचा उपयोग मतदानाकरिता न करता सहल किंवा इतर मनोरंजनाकरिता करताना दिसतात. कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीत नागरिकांचा केवळ मतदानातच नाही तर सतत सक्रिय सहभाग असतो. याला सहभागी लोकशाही (पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी) म्हणतात. "भारतात आणि अनेक विकसित देशांत अनेक गोष्टींत इतका फरक असण्याचे काय कारण असावे?" हा प्रश्न माझ्या मनांत सतत असतो. त्यामुळे, मी भटकत असलेल्या देशांत या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जरूर करतो. भटकंतीत एखाद्या देशाच्या पर्यटक आकर्षणाकडे माझे जेवढे लक्ष असते तेवढेच कुतुहल मला अश्या देशविशेषांसंबंधी वाटते. माझ्या विकसित देशांच्या भटकंतीत मला पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी हाच समान दुवा दिसला आहे. त्यामुळे वरचे वाक्य केवळ पुस्तकी वाक्य नाही, याबाबत माझ्या मनात संशय नाही. माझ्या "न्यू यॉर्क" लेखमालेत आतापर्यंत मी जेथे संबंधित आहे तेथे याबाबतीतले उदाहरणासह अनुभव व त्यांचे विश्लेषण मांडले आहे. असे अनेक दाखले पुढेही येतील. "मी मला आज फायद्याची वाटते ती कृती करेन, मात्र सर्व जबाबदार्‍या इतरांनी आणि सरकारने उचलून मला भविष्यातही सुबत्ता आणि सुरक्षा मिळवून द्यावी", हे वास्तविक नाही हे ज्या देशाच्या नागरिकांना पटले आहे, त्या प्रमाणे ते सहभागी कृती करतात, आणि आपल्या परिसराच्या/देशाच्या (जाती-धर्माच्या नव्हे) विकासाठी जरूर तो सतत दबाब आपल्या (सरकारातील व विरोधी पक्षातील, दोन्ही प्रकारच्या) राजकारण्यांवर आणतात; तेच देश विकसित झालेले आहेत. आपणही त्या दिशेन पावले टाकायला सुरुवात केली, तर भविष्यात भारत विकसित देश होईल यात मला संशय वाटत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आपल्या परिसराच्या/देशाच्या (जाती-धर्माच्या नव्हे) विकासाठी जरूर तो सतत दबाब आपल्या (सरकारातील व विरोधी पक्षातील, दोन्ही प्रकारच्या) राजकारण्यांवर आणतात; तेच देश विकसित झालेले आहेत. आपणही त्या दिशेन पावले टाकायला सुरुवात केली, तर भविष्यात भारत विकसित देश होईल यात मला संशय वाटत नाही. >> इथे भारतात कोणी जास्त नाक खुपसले अशा प्रकारात तर त्याचा सत्येंद्र दुबे नाहीतर सतीश शेट्टी होतो.

In reply to by अभिजित - १

तुम्ही म्हात्रेसाहेबांच्या निवडलेल्या वाक्यसंदर्भत बोलायचे तर मग भारत देश अविकसित राहण्याबद्दल काँग्रेसला जी सततची दूषणे (गेली साठ वर्षे इत्यादी) दिली जातात ती चुकीची असून खरे गुन्हेगार भारतीय जनताच आहे असे दिसते, कारण विकसित होण्यासाठीचा उचित दबाव त्यांनी काँग्रेसवर (किंवा विरोधी पक्ष म्हणून भाजप)आणलेला दिसत नाही,

In reply to by संदीप डांगे

मी वर बोल्ड अक्षरांत लिहिले आहे... "ओनस इज ऑन गव्हर्नमेंट अ‍ॅड सिटिझन्स टुगेदर" या चर्चेत तुम्ही माझ्या म्हणण्यातले केवळ अर्धेच उचलले आहे हे तुमच्या ध्यानात आले काय ? (हे मुद्दाम करत असल्यास भारतीय राजकारणात उत्तम भविष्य आहे ! :) ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फक्त तेवढेच उचलले आहे हे मुद्दाम म्हटले आधीच, ;) तुमच्या पूर्ण प्रतीसादाचे सविस्तर उत्तर देतो सवडीने, अर्थात त्यात फार मतभिन्नता येणार नाहीये आपल्या दोघांत, :)

In reply to by संदीप डांगे

अविकसित राहण्याबद्दल काँग्रेसला जी सततची दूषणे (गेली साठ वर्षे इत्यादी) दिली जातात ती चुकीची असून खरे गुन्हेगार भारतीय जनताच आहे असे दिसते,
हो, पूर्ण ओनस भारतीय जनते वरच आहे. राजकारणी , एखादा आमदार, नगरसेवक खोटे बोलुन एकदा निवडुन येइल. पण त्याचा ५ वर्षात झालेला बंगला आणि पजेरो गाडी बघुन सुद्धा तोच पुन्हा निवडुन येतो ना. युरोप, अमेरीका सध्या चांगल्या परीस्थितीत ( भारता पेक्षा ) त्याला कारण त्यांचे नागरीक हेच एकमेव आहे. --------- ह्या उलट व्हेनेझुएअला नी प्रचंड तेल निर्यात करुन सुद्धा आत्ता नागरीकांवर भुके मरण्याची वेळ आली आहे. तसेच अर्जेंटीना सारखा अत्यंत नैसर्गीक संपत्ती असलेला आणि खुप कमी लोकसंख्या असुन सुद्धा संमृद्धी नाही, कारण तिथले नागरीक.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत.
तसे पाहिले तर आताही भारत-चीन व्यापारात चीनचा $४०० कोटीचा फायदा होत आहे
भारत चीन व्यापारात व्यापाराची तफावत आहे 53 बिलियन डॉलर म्हणजे 5300 करोड डॉलर चीन च्या बाजूने. भारत जेवाडी चीन ला निर्यात करतो त्याच्या 6 ते 7 पट आयात करतो. चीन मधून येणाऱ्या काही वस्तू नक्कीच दर्जेदार आहेत, पण बऱ्याच स्वस्त वस्तूंचे चीन भारत धरून भरपूर देशात अक्षरशः डम्पिंग करतो. दुवा चीन भारतातून होणाऱ्या निर्यातीवर बंधने घालतो किंवा अडथळे उभे करतो. पण आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात लोकांनी बहिष्कार वैगेरे तकलादू गोष्टी आहेत, सरकार पण जास्त काही करू शकत नाही. याला एकमेव उपाय भारतीय उत्पादने दर्जेदार आणि innovative बनवणे तेही स्वस्तात. तसेच चीन मधून येणाऱ्या स्वस्त आणि दर्जेदार गोष्टींचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होतो, पण दीर्घ काळासाठी चीन वरील अवलंबित्व भारताच्या हिताचं नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने भारत आणि तैवान यांच्यातल्या व्यापाराचा अभ्यास करावा लागला होता. तैवान चेंबर्स आॅफ काॅमर्स, जे मुंबईला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आहे - त्यांच्याकडून असं समजलं की -१. भारत आणि तैवान यांच्यातील Hardware - Software या स्वरुपाचं सहकार्य वाढतं आहे. २. भारताने अधिकृतपणे One China Policy मानलेली आहे. म्हणजेच भारत तैवानला स्वतंत्र देश मानत नाही. मग हे शक्य आहे ना की चिनी आयात म्हणून ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्यात तैवानी वस्तूंचाही अंतर्भाव असेल? उदाहरणार्थ HTC ही तैवानीज कंपनी आहे. तिची भारतातील विक्री ही देखिल वीच्या नावाखाली दाखवली जात असेल. हा अर्थातच अंदाज आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तैवान आणि चीन एकच नाहीत हे जग मानते आणि भारतानेही तेच मानून चीनवर एक प्रकारचा राजकिय दबाव ठेवणे भारताच्या भल्याचे आहे. "उच्च तत्वांच्या मागे लागून दुसर्‍या देशाच्या फायद्याच्या गोष्टी करणे आणि त्याबदल्यात आपला काहीच फायदा करून न घेणे" याला जागतिक राजकारणात बावळटपणा (नेविटी) म्हणतात... आणि भारताची सर्व रंगांची सर्व सरकारे आजपर्यंत या विषयात पीएचडी केली आहे असे वागत आली आहेत. (अ) १९६५चे युद्ध जिंकले, (आ) बांगला देश स्वतंत्र केला, ९३००० युद्धकैदी पाकिस्तानला सन्मानाने परत केले (त्यातले ३००० मानवाधिकारांचा खून करणारे गुन्हेगार होते), (इ) इंडस वॉटर ट्रिएटीत पाकिस्तानच्या फायद्याची कलमे टाकली, (ई) तिबेट चीनचा असल्याचे मानून टाकले या सगळ्यांच्या बदल्यात भारताला ३ शत्रूदेश (नजिकच्या दिवसांत बांगला देश या यादीतून बाहेर गेला आहे असे दिसत आहे) आणि त्यांच्या स्थानिक कुरापती व आंतरराष्ट्रिय राजकारणात सतत विरोध सोडून काय मिळाले आहे ? यामुळे, आंतरराष्ट्रिय राजकारणात भारताची "एक बलवान पण अभिमानाचा अभाव असलेले घाबरट राष्ट्र" ही प्रतिमा झाली होती. त्यामुळे छोट्या मोठ्या देशालाही भारताला टपल्या मारण्याची भिती वाटत नव्हती. या प्रतिमेत गेल्या काही महिन्यांत फरक पडतो आहे असे संकेत आहेत... हे भविष्यात सतत चालू रहावे अशी इच्छा आहे... कारण तसे झाले तरच भारताला काही अभिमानाचे भविष्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या प्रतिमेत गेल्या काही महिन्यांत फरक पडतो आहे असे संकेत आहेत... हे भविष्यात सतत चालू रहावे अशी इच्छा आहे... कारण तसे झाले तरच भारताला काही अभिमानाचे भविष्य आहे. +१०० Foxconn ही अशीच तैवान बेस्ड कंपनी आहे,ही तीच आयफोन बनवणारी कंपनी असुन आता मेकइन इंडिया अंतर्गत $5 billion ची गुंतवणुक महाराष्ट्रात करणार आहे. { मागच्या वर्षा पासुन याला सुरुवात देखील झाली आहे. :) संदर्भ :- Boost for 'Make in India': Foxconn to invest $5 billion in Maharashtra { ऑगस्ट २०१५ } मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

In reply to by मदनबाण

तात्कालीक फायद्यासाठी चीनवर दूरगामी अवलंबित्व येणार असेल (जागतिक महासत्ता असलेल्या किवा होण्याची इच्छा असलेले देश २५ ते ५० वर्षे पुढचा विचार करून मग कृती करतात) तर त्या ऐवजी तजपान, जपान व दक्षिणपूर्वेतल्या इतर चीनविरोधी (किंवा चीनची भीती वाटणार्‍या) देशांबरोबर दोघांचा फायदा असणारे आर्थिक-राजकिय करार करण्याचा दूरगामी विचार भारताने करणे जरूर आहे. त्यामुळे आपले कोणा एका देशावर अवलंबित्व न राहता सधनतेकडे वाटचाल करता येईल. शिवाय तुम्ही दिलेल्या उदाहरणातील चीन आणि तैवानच्या कृतीत जमीनअस्मानाचा फरक आहे... चीन केवळ तयार वस्तू आपल्याला विकतो, याचा अर्थ खरेदीची सर्व किंमत चीनमध्ये जाते. तैवानी कंपनी भारतात कारखाना उभारणार आहे. म्हणजे, तैवानी कंपनीचा हिस्सा सोडून बाकी फायदा भारतात राहील. याशिवाय भारतियांना रोजगार मिळेल व स्थानिक सप्लायर कंपन्यांना काम मिळेल हे वेगळेच. अजून पुढे जाऊन, मूळ कंपनी व सप्लायर कंपन्यांमुळे व त्यांच्या कामगारांमुळे अनेक (घरे, रेस्तराँ, मनोरंजनाचे व्यवसाय, रस्ते, इत्यादी) स्थानिक विकासकामे होतील ते वेगळेच. हे व इतर अनेक छोटेमोठे फायदे (कॅस्केडिंग इफेक्ट्स) "मेक इन इंडिया" मुळे होतील. या प्रकल्पात केवळ महानगरे नव्हे तर दुसर्‍या ते चवथ्या स्तरावरची भारतिय शहरे विकसित करण्याची जबरदस्त ताकत आहे. मात्र, या प्रकल्पांचे जमिनीवरचे फरक दिसायला २ ते ५ वर्षे लागतात. मात्र त्यामुळे भारतात तयार होणार्‍या वस्तू भारतियांना योग्य किमतीत मिळतील व अधिक उत्पादन निर्यात करून परकिय चलन मिळविता येईल. महत्वाचा मुद्दा असा की, कारखाना भारतात असल्याने ती कंपनी भारताचा (देशाचा किंवा नागरिकांचा) गैरफायदा घेणार नाही हे पाहणे सरकारला आणि स्थानिक कायदासंबंधी संस्थाना सुलभ असेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"एक बलवान पण अभिमानाचा अभाव असलेले घाबरट राष्ट्र" ही प्रतिमा झाली होती
हे असे का झाले असावे? त्या पातळीवर काम करणारी माणसे अतिशय हुषार आणि उच्च विद्याविभुषित असतात ना ? पंतप्रधान पदी सुध्दा अतिशय कणखर स्त्री होती , मग मुत्सुद्यीगीरीत आपण कुठे कमी पडलो ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक बलवान पण अभिमानाचा अभाव असलेले घाबरट राष्ट्र उच्च तत्वे मुळात तत्वांच्या गोष्टी वगैरे करणे पोट भरुन झाल्यावर करणे छान दिसते. गरिबांच्या तत्वांना ईतर कोणी काय्येक किंमत देत नाही.

हे फेसबुकी /व्हाट्सअप वरचे फॉर्वर्डस म्हणजे एक जोक असतो. मला पण एक व्हाट्सअप फॉरवर्ड आला. चिनी वस्तू वापरू नका आणी आपला देश वाचवा. सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाप्रमाणे हे मेसेज फॉरवर्ड करणे एक मह्त्वाचे कार्य आहे. लगेच करा. --- मी एकच उत्तर पाठवले. तुम्ही ज्या मोबाईल मधून हा मेसेज पाठवलाय तो मोबाईल मुळात मेड इन चायना आहे का नाही ते सांगा आणी असल्यास तुम्ही काय करणार आहेत ते देखील सांगा. गेले 3 दिवस उत्तराची वाट बघतोय.

In reply to by संदीप डांगे

'मोबाईल चायना मेड आहे म्हणून मी फेकून देत आहे' (मी शेंगा खाल्ल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही ह्या धर्तीवर वाचावे) असे बाणेदारपणे उत्तर देऊन फेकायचा ना :)

In reply to by अभिजीत अवलिया

=)) =)) अवांतरः शेंगा खाल्या नाहीत ते सिद्ध करावे लागेल, अन्यथा टरफले उचलावीच लागतील - इति केजरीवाल व कंपू

In reply to by संदीप डांगे

आम्ही टरफलासकट शेंगा खाऊन तुम्हाला (पुराव्याचा) ठेंगा दाखवू. इति काका-पुतण्या कंपनी

In reply to by नाखु

आले हो आले खालील प्रमाणे उत्तर आले. 'ह्या ह्या ह्या .... चायना मेड आहे. लक्षातच आले नाही.' फोन काय फेकून देत नाहीत लोक. संपली देशभक्ती. म्हणजे कसे असते 'देशभक्ती म्हणजे देशासाठी काही तरी भरीव काम करणे'. फुल ना फुलाची पाकळी. मग कुणी बाबा आमटे सर्व सुखाचा त्याग करून कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात जीवन व्यतीत करतात तर कुठे कुणी भापकर गुरुजी सगळी आयुष्यभराची पुंजी खर्ची करून ५७ वर्षे कष्ट करून एकट्याने ४० किमीचे रस्ते बनवून गावकऱयांची सोय करतात. प्रत्येक जण एवढे अचाट काम करू शकत नाही हे खरे. पण निदान जे करतात त्यांना थोडी तरी मदद करण्यापेक्षा किंवा एखाद्या छोट्या कामात स्व:त भाग घेण्यापेक्षा व्हाट्सअप वर मेसेज पाठवणे / १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला बेंबीच्या देठाने भारतमातेच्या विजयाच्या घोषणा देणे / पाकिस्तानचा झेंडा जाळणे हे देशभक्ती लोकांना दाखवण्याचे सर्वात सोपे उपाय.

अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा?? हे लोजिक मुर्खपणाचे आहे , भारतात बनलेली , भारतात बनविलेली वस्तु नाकारुन तशाच प्रकरची चिनी उत्पादकाने बनविलेली वस्तु विकत घेणे म्हणजे भारतीय उत्पादकन्चे नुकसान करणे , वरील आय फोनचे उदहरण चूक आहे कारण आय फोन हा आउट सोर्स करुन बनविलेला आहे .

लेख भावना - काळजाला हात इत्यादि इत्यादि ने भरलेला असल्याने फॅक्ट बेस्ड नाहिये. डोक्टर म्हात्रे ह्याचे सगळे प्रतिसाद अभ्यासपूर्ण आणि सुयोग्य आहेत. ब्रिटिशांनी केलेल्या वसाहतवादातले तोटे-खर्च वगैरे टाळून आपण नव्या वसाहतवादाकडे केव्हाच वाटचाल केली आहे. (जग अमेरिकेच्या कसं मुठीत आहे! ) ड्रॅगन पुढची पायरी आहे! डोक्टर म्हात्रे प्लीज शक्य असल्यास एक लेख लिहा ह्या विषयावर सलग.

धाग्याच्या शतक पूर्तीनिमित्त धागाकर्ते आणि प्रतिसाद देणार्यांचे चायना दीपमाळा आणि चिनी भुईनळे देऊन सत्कार करण्याचे जाहीर करत आहेत हो !!!! अखिल मिपा शतकपूर्ती सत्कार समिती अध्यक्ष : जेपी (संन्यस्त ) सचिव : नाखुन चाचा टिप :( दिल्लीवाली ) फॅशन दौर में ग्यारंटी अपेक्षा करे. (पुणेरी) : दिपमाळा आधीच पेटवून पाहाव्यात आणि फटाके आधी वाजवून पहावे नंतर तक्रार चालणार नाही.

In reply to by महासंग्राम

चायना दीपमाळा आणि चिनी भुईनळे देऊन सत्कार अरेरे, सगळे पाणी पालथ्या घड्यावर पडले !!! ;) =))

चीन बर्‍याच गोष्टी निर्यात करतो त्याला लागणारा कच्चा माल तो आयात देखील करतो... आपल्या देशात मारले गेलेले अनेक वाघ चीन मध्ये मेडिसीन रुपात कन्व्हर्ट झालेले आहेत्,वाघाचा जवळपास प्रत्येक भाग वेगवेगळी औषधी आणि "टॉनिक्स" तयार करण्यात तिथे वापरले जातो. करण्यात वापरला जातो. ५-६ दिवसांपुर्वीच अश्याच पण जरा वेगळ्या चायनीज इंपोर्ट बद्धलची बातमी वाचली होती ती इथे देतो. China's quest to buy up global supply of donkeys halted by African nations Why China is importing thousands of donkeys from Africa मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations