Skip to main content

लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 18/09/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ? आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही. --------------- श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक

वाचने 31459
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

हे होणारच होते, पाकिस्थानच्या सततच्या खोडसाळपणाला हे उत्तर मिळणारच होते.आपल्या सैन्य दल व सरकारचे अभिनंदन !