Skip to main content

प्रतिजैविके समज आणि गैरसमज.

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 06/07/2016 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

वाचने 129857
प्रतिक्रिया 349

प्रतिक्रिया

In reply to by गवि

मान्य... फक्त एक शंका, पेढा ओवाळण्याआधी "बाकी सगळे उपाय" मग का केले गेले - (म्हणजे गॅरेजवाल्याने; गाडी मालकाने नाही)? त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?

In reply to by असंका

त्यांना तर हे सगळं कालानुरुप गरम थंड माहित असतं ना?
हो ना. पण मालकाला घाई असते ना गाडी सुरु करायची. त्याची थांबायची तयारी नसते. आणि ५०% केस मधे गाडी "अशी" सुरु होत नसते हे ही त्याला (गॅरेजवाल्याला) माहित असते. --- कानडा

In reply to by कानडा

अच्छा? आपण काय म्हणत आहात ते आपल्याला नक्की माहित आहे ना? मी जे वाचलं - जे मला कळलं, ते मी वेगळ्या शब्दात मांडतो- माझं चुकत असेल, तर कृपया दुरुस्त करा- "५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात." हे असंच म्हणत आहात का आपण?

In reply to by असंका

"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय फाय/मॉडर्न गॅरेजवाले) गरज नसताना खुडबुड करून त्याचे पैसे वसूल करतात."
यात तथ्य असू शकेल. किमान असे मेकॅनिक खूप असण्याची सत्य शक्यता आहे. बट द्याट डजन्ट इन एनी वे ऑटोमॅटिकली मेक पेढा ओवाळणे मेथड जेन्युईन. मॉडर्न मेडिसिनचे अनेक प्रॅक्टिसकर्ते खरोखर अजिबात हिस्टरी विचारत नाहीत, नीट ऐकून घेण्याइतकाही वेळ देत नाहीत, साध्या शब्दात पेशंटला डायग्नोसिस आणि उपचार / उपचार न देण्यामागची कारणं असं नीट समजावून सांगायला लागणार्या एक्स्ट्रा पाच मिनिटांना ते महाग असतात.. तीन मिनिटांत एक पेशंट हाकलतात.. हे खरंच आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं पेशंटपर्यंत पोहोचतच नाही. मग अन्यांकडे वळलेल्या पेशंटांना "चांगले" अनुभव आल्याचं वाटतं.

In reply to by गवि

तो पेढा इकडे द्या बघू आधी.... उगाच बोनेट वर, इंजिन मध्ये, ओवाळुन लांब वगैरे करायचं असल्यास पेढे नाही माती दगड वगैरे घ्या. ;)

डॉक्टरसाहेब, काविळीवर आलोपथीचं काय मत आहे? एक स्वानुभव आहे. आम्ही ठाण्याला होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या धाकट्या भावाला कावीळ झाली होती. बारातेरा वर्षांचा होता. चार दिवस चरईतल्या एका आलोपथीवाल्याच्या दवाखान्यात सलाईनवर होता. तेव्हढ्यापुरती पोटदुखी थांबायची. सुई काढली की पोट बोंब मारायचं. पोटात चार दिवसांत अन्नाचा कण जाऊ शकला नाही. प्रचंड अशक्तपणा आलेला. शेवटी फ्याडॉच्या सांगण्यावरून घरी आणलं. नेमका त्याच दिवशी माझा मित्र मला भेटायला आला तर त्याच्याकडून एका आयुर्वेदिक औषधवाल्या गृहस्थांचा पत्ता मिळाला. ठाण्यातच रहायला होते. त्यांच्या घरी भावाला घेऊन आम्ही सगळे (आईबाबा आणि मी) गेलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दह्यात घालून औषध दिलं. दोन दिवसांत कावीळ उतरली. सोबत तीन महिने कडक पथ्य सांगितलं. ते आम्ही पाळलं. माणूस भला होता. कुटुंबीयही सालस होते. सेवाभाव म्हणून काविळीचं औषध द्यायचे. औषध विकण्यासाठी नाही असा दंडक होता म्हणून पैसे आजिबात घेतले नाहीत. तर मूळ प्रश्न असा आहे की आलोपथीच्या मते कावीळ म्हणजे काय? आणि ती दूर करावी का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा साहेब, मुळात कावीळ हा एक आजार नसून ते एक आजाराचे लक्षण आहे. आपल्या रक्तात असणारे हिमोग्लोबिन जेंव्हा विघटन पावते तेंव्हा त्यातील लोह हे शरीरात परत वापरले जाते आणि इतर घटक टाकून दिले जातात यातील बिलिरुबिन हा घटक तुमच्या यकृतातून स्रवला जातो आणि पित्ताशयात साठवला जातो आणि तो शेवटी आपल्या विष्ठेतून बाहेर टाकला जातो. ( विष्ठेस पिवळा रंग येण्याचे हे कारण आहे) शरीरातून आतड्यात हे बिलिरुबिन टाकण्याच्या प्रक्रियेला एक मर्यादा असते. त्यामुळे १)जर जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार झाले तर ते रक्तात पसरते किंवा २) आपल्या यकृताला सूज आली उदा. विषाणू जन्य कावीळ, दारू पिणे किंवा ३) यकृतातून आतड्यात उतरण्याच्या मार्गात अडथळा आला. उदा. पित्ताशयातील खडा, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंडाचा कर्करोग(स्टीव्ह जॉब्स यांना झालेला ) यातील कोणत्याही कारणामुळे हे बिलिरुबीननं आतड्यात पोहोचू शकले नाही तर ते रक्तात पसरते आणि ज्याला आपण प्रचलित भाषेत कावीळ म्हणतो तो रोग होतो. म्हणजेच कावीळ हा रोग नसून ते एक लक्षण आहे. कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात मग तुम्ही त्याला झाडपाल्याची औषधे द्या किंवा साबुदाण्याच्या गोळ्या द्या.या विषाणूंमुळे यकृताला सूज येते यामुळे आपल्या पित्त मालिकेवर दबाव पडतो आणि बिलिरुबिन आतड्यात उतरत नाही म्हणून आपले शरीर पिवळे पडते. आपली पचन शक्ती आणि प्रतिकार शक्ती बिघडून जाते आणि आपल्याला प्रचंड अशक्तपणा येतो. जेंव्हा ही सूज उतरू लागते तेंव्हा हा पित्त नलिकेवरिल दबाव नाहीसा होतो आणि वेगाने शरीरातील बिलिरुबिन आतड्यात उतरू लागते. चार दिवस आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन कावीळ बरी होत नाही म्हणून लोक इतर मार्गाला जातात त्या वेळपर्यंत तुमचे शरीर काविळीच्या विषाणूंना निष्प्रभ करण्याच्या मार्गाच्या शेवटास आलेले असते. त्यामुळे काकतालीय न्यायाने त्या वेळेस जे औषध घेतलेले असते ते गुणकारी म्हणून ठरवले जाते. मला स्वतः ला झालेली कावीळ ली कोणतेही औषध न घेता केवळ विश्रांती साधा आहार आणि जीवनसत्त्वे यांनी बरी झाली. विषाणू जन्य कावीळ सोडून इतर कावीळ अशा औषधे देणार्यांनी बरी करून दाखवावी उदा. हिमोलिटिक अनेमिया, पित्ताशयाच्या कर्करोग. हे माझे त्यांना आव्हान आहे.

In reply to by सुबोध खरे

सुखसाहेब, तुमच्या संयमाने समजावत राहण्याचा प्रचंड आदर वाटतो. पण लोक इन जनरल इर्रॅशनल गोष्टी अजिबात सोडू शकत नाहीत याची एव्हाना खात्री झाली आहे. बहुधा काहीतरी न समजणारी मिसिंग लिंक, काहीतरी तर्कापलीकडलं , काहीतरी फक्त डॉक्टर, गुरु वगैरेंनाच कळतं आणि आपल्याला कळत नाही अशाच गोष्टींचं आकर्षण जास्त असतं आणि विश्वासही. नेमकं कशाने काय होतं हा कार्यकारणभाव खरंच समजून घेणं अनेकदा रुक्ष, नीरस , रखरखीत असतं. त्यापेक्षा anecdotal इज मच मोअर अट्रॅक्टिव्ह.

In reply to by स्पा

काहीच नाही करायचं रे स्पा. फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच. कधीकधी असं समजावू पाहणार्याच्या तळमळीने कौतुकाची उबळ येते. व्यर्थताही दिसते. मागोमाग येणारे प्रतिसाद उबळही थांबवतात. धन्यवाद.

In reply to by गवि

फक्त समजून घ्यायचं आणि समजावणं थांबवायचं इतकंच. एका वाक्यात खूप मोठा अर्थ आहे हा गवि, मी आपला वैयक्तिक ऋणी आहे ह्या वाक्या करता :)

In reply to by स्पा

=))

In reply to by सुबोध खरे

कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे विषाणू आहे आणि त्यातील ९९ % रुग्ण स्वतःहून बरे होतात
७०-८० वर्षांपूर्वी लोक कावीळीला जीवघेणा रोग समजायचे...अगदी आजही या रोगाला लोक टरकून असतात असे का?

In reply to by टवाळ कार्टा

माझ्या माहितीप्रमाणे हेपेटायटीस बी व पाचापैकी इतर एक कोणता तरी असे लिव्हर वर गंभीर परिणाम करणारे प्रकार आहेत. ते झाले तरच हा रोग जीवघेणा ठरतो.

In reply to by सुबोध खरे

काविळीत विश्रान्ति व स्निग्ध सेवन टाळणे हे दोन महत्वाचे उपचार आहेत असे आहे काय? तसेच आडवे झाले काही एन्झाईम्स शरीर क्रियेत भाग घेतात किंवा घेत नाहीत या कारणास्तव काविळीत आडवे पडून आराम करणे याला खास महत्व आहे असे आहे का खरे साहेब ?

In reply to by चौकटराजा

यकृत हा शरीरातील रासायनिक प्रक्रियांचा कारखाना आहे आणि तो कधीच बंद पडत नाही. त्याला सूज आलेली असताना त्यावर भार टाकणे हे श्रेयस्कर नाही. don't flog a tired horse. आडवे झोपल्याने आपल्याला तसा काही परंतु उभे राहून आपण दमता आपल्याला श्रम होतात तसे आडव्याने होत नाही. एवढंच

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, आता असं बघा की, चार दिवस भाऊ इस्पितळात दाखल होता. सुईपाणी लावलं होतं. पण जरा म्हणून सुई काढली की पोटदुखी उसळी मारायची. प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती आणि अशक्तपणा जाम वाढला होता. फ्याडाँच्या मते चार दिवसांत कावीळ उतरायला हवी होती. पण तसं काहीएक चिन्ह नव्हतं. मग फ्याडाँच्या सल्ल्यानेच आयुर्वेदिक औषध केलं. याअगोदर कधीही आयुर्वेदिक औषध केलेलं नव्हतं. आता परिस्थितीच अशी उद्भवल्याने दह्यातलं औषध केलं. ज्या दिवशी सकाळी पहिली मात्रा (डोस) घेतली त्याच दिवशी संध्याकाळी भाऊ व्यवस्थित हिंडूफिरू लागला. हा योगायोग होता का? कावीळ हा जीवघेणा आजार (किंवा लक्षण) आहे. दोन प्राणघातक केसेस डोळ्यासमोर घडल्या आहेत. (एक अगोदर आणि एक नंतर.) त्यामुळे भावाची विकारमुक्ती हा माझ्यामते तरी योगायोग नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

खरं तर खऱ्यांना ठाऊक नाही की तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे कुणाशी कुस्ती खेळणं आहे. तेव्हा योगायोग जौद्या. तुमची होम्योपदीने केलेली अँजिओप्लास्टी कशिये? सिग्रेट सोडली की नाही अजून?

In reply to by आनंदी गोपाळ

डॉक्टर साहेब, आपण स्वतंत्र लेख लिहा बरं, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ते तरी कळेल. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, कांजिण्या हा ऑटो इम्युन आजार आहे असे परवा परवा पर्यंत आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर सांगत होते. निदान मला तरी आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरने असेच सांगितले होते. तेच आधुनिक शास्त्राचे डॉक्टर आता कांजिण्यांवर औषधे देउ लागले आहेत हे खरे आहे ना? असे असेल तर काय समजावे ? म्हणजे पूर्वी त्यांच्याकडे औषध नव्हते म्हणून ऑटो इम्युन असे ठोकून तर दिले नाही ना ? माझ्या निष्कर्षांमधे गल्लत असेल पण तपशील अचूक आहेत. तुम्ही यावर कदाचित प्रकाश टाकू शकाल . हेच आधुनिक शास्त्रांचे डॉक्टर अगदी आत्तापर्यंत तूप खाऊ नका असे सांगत होते आणि हेच लोक आता ओमेगा-३ की कायसे असते म्हणून तूप खा असे सांगू लागले आहेत. विज्ञान परिवर्तनीय असते हे मान्य आहेच पण काल एक सांगितले आज एक सांगितले असे होऊ लागले तर आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय समजायचे ? आधुनिक मेडिसिन क्षमतेत कमी पडले किंवा पारदर्शकतेत कमी पडले म्हणून लोक ओल्टर्नेटीव्हज कडे वळले असे वाटते. आपण तज्ञ आहात म्हणून हे निव्वळ उत्सुकतेपोटी विचारत आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

अप्पासाहेब कांजिण्या हा विषाणूजन्य रोगाचा आहे आणि तो "ऑटो इम्युन" कधीच नव्हता. आजही हा रोग मर्यादित स्वरूपाचा आणि स्वतः हून बरा होणारा आहे. लहानपणी कांजिण्या झाल्या तर त्या लवकर बऱ्या होतात पण मोठेपणी जर हा आजार झाला तर तो जास्त तीव्रतेचा असतो. यावर पूर्वी औषधे होती पण ती आजच्या इतकी सुरक्षित नव्हती. या आजारावर औषध दिल्याने त्याचा येणार ताप पाच दिवस ऐवजी दोन दिवसात आटोक्यात येतो वयस्कर माणसांना या रोगातून होणाऱ्या गुंतागुंती उदा. न्यूमोनिया सारखेच आजार टाळता येतात. याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे कांजिण्यांच्या विषाणू मुळे उत्तर आयुष्यात होणार "नागीण" हा रोग आपल्याला होत नाही.नागीण हा रोग आपल्या नसे मध्ये सुप्त किंवा निष्क्रिय अवस्थेत राहतात आणि जेंव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेंव्हा परत जागृत होऊन आपल्याला नागीण होते. हे टाळायचे असेल तर औषध घ्यावे लागते. अन्यथा कांजिण्या हा रोग आठवडा ते १० दिवसात पूर्ण बरा स्वतःहून होतो.

होमिओपदीची औषधे एवढी छान असते तर होमिओपदीचे डाक्टर आम्हाला पण आधुनिक औषधं प्रिक्राइब करता यावी ही मागणी का करतात?

In reply to by अनुप ढेरे

ढेरे साहेब साधं सरळ आहे "प्रच्चंड" प्रमाणात रोगी बरे होत असले तरी ते ५ % च असतात. मग इतर ९५ टक्के च काय? माझ्या मित्राचे वडील म्हणाले ते बरोबर -- BHMS किंवा BAMS किंवा BUMS(युनानी) चे प्रवेश एम बी बी एस च्या अगोदर संपतात का? जाऊ द्या झालं. अशी उगाच कुणाच्या चड्डीला हात घालू नका.

डॉक्टर साहेब, धाग्याच्या त्रिशतकपूर्तीवेळी तुम्हाला एक किलो साबुदाणा, मराठी माध्यमाची पुस्तकं आणि अल्कोहोल असं दिलं तर आवडेल का?

In reply to by धनंजय माने

ससुरे तोहर कारण हमर अंतडीया हस हस के लपेटा मार देईस, पहले हमर अंतडीया ठीक करने का इलाज म जो लागत आयेगा ओकर भुगतान करीबे करो तुम =)) =)) =))

In reply to by आनंदी गोपाळ

लो तेरी तो! आपको का बताए पॅरामिलिटरी का भंगटा!!, ऐसा समझो हमारे वास्ते बंद है अस्पताल औरो उपरसे इ धनंजया हमर जबडा भी दुखाई दिया हसा के

ज्या रोगांमुळे माणसे मरतात (जर वेळेत उपचार नाही झाले तर...उदा. टिबी)...अश्या रोगांसाठी होमिओपदीकडे औषधे आहेत का?

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही कुठून आले!!! ज्या रोगांमुळे माणसं मरत नाहीत (..उदा मायग्रेन/अर्धशिशी) ...अश्या रोगांसाठी मॉडर्न मेडिसीन्कडे औषधे आहेत का?

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही मला थोडीच विचारत होतात? तुम्ही तुमचे प्रश्न विचारतो होतात, मी माझे प्रश्न विचारत होतो इतकंच. म्हणलं सगळे प्रश्न एकत्र असले की उत्तर मिळायचा चान्स वाढेल कदाचित. थोडी वाट बघू या. कुणी ना कुणी नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तरं देइल.

In reply to by असंका

तुम्ही तुमचे प्रश्न विचारत होता तर "तुम्ही कुठून आले!!!" असे का विचारले माझया प्रतिसादावर बाकी तुम्ही उत्तर ना देता शेपूट घालणार हे माहीतच होते झेपत नाही तर उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जावेच का =)) टीप - वरील वाक्यात काहीही अश्लील नाहीये, पुलंनीच लिहिले आहे ते

In reply to by टवाळ कार्टा

आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर? बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे. पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही... आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाही भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.

In reply to by असंका

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं. खाली एक जण काहीतरी वेगळेच अर्थ लावत आहे या वाक्याचे त्यामुळे हा खुलासा करत आहे. माझ्या डोक्यात असले विचार येत नाहीत. कुणाच्या तरी डोक्यात येउ शकतील हेही माझ्या लक्षात आलं नाही, नाही तर मी असं लिहिलंच नसतं. तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....

In reply to by असंका

आमच्याही डोक्यात सब्य इच्चारच अस्तात. http://www.misalpav.com/comment/856894#comment-856894 हाच संदर्भ घेऊन लिहिलंय तिथे. आता तुम्हाला वैट्ट वाट्टे तं आम्ही काय करावं बा? बाकी दांभिक म्हणजे काय रे भाऊ?

In reply to by असंका

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं.
कोणत्या धाग्यावर कधी यायचे याचे काही नियम असतात का? इतका वेळ या धाग्यात जी चर्चा सुरु आहे त्यावरुन मला एक शंका विचारावीशी वाटलेली...कोणीही "उत्तर" दिले असते तरी चालले असते...ते न होता तुम्हीच सरसकट मला अ‍ॅलोपॅथीवाल्यांमध्ये ढकलून उलट प्रश्न विचारत आहात
तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....
झाले गेले गंगेला मिळाले...माझ्याबाजूने कोणताही वैयक्तीक आकस नाही

In reply to by असंका

आपल्या पहिल्या प्रतिसादापासून वाचा व आपणच सांगा महोदय, आपण दांबहिकपणाव्यतिरिक्त काय केले आहेत?

In reply to by असंका

आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर?
दोन्हीत बराच फरक आहे
बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे.
इतका वेळ जशी उत्तरे तुम्ही दिलित तसेच मीही करत आहे
पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही...
मुळात प्रश्न तुमच्यासाठी अथवा कोणा एकासाठी नव्हताच...जे लोक होमिओपॅथीची बाजू घेत आहेत त्यांच्यासाठी होता...तुम्ही स्वतःवर ओढून घेतलात
आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाही
ते संपादकांसाठी होते ;)
भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.
असे काही करण्यापेक्षा बरीच इतर चांगली कामे आहेत माझ्याकडे

In reply to by असंका

"ज्या लोकांना अर्धशिशी आहे, त्यांनी एरंडेल घ्यावे. म्हणजे त्यांना पूर्ण शिशी होईल" आजचेच व्हॉट्सॅप फॉर्वर्ड. बाकी, मायग्रेन म्हणजे नक्की काय, त्यात शरिरात काय होते? (रक्तवाहिन्यांना), सिंटिलेटिंग स्कोटोमा म्हणजे काय? ट्रिगर फॅक्टर्स कोणते, अर्गट अल्कलॉईड्स काय असतात, कॉफीचा व मायग्रेनचा काय संबंध, इ. प्रश्न होम्योपाद्सना जरा इच्चारून बघा, मग मॉडर्न मेडिसिनातल्या मायग्रेन उपचारांबद्दल बोलणे सुरू करा. तुमच्यासारख्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या माणसानं, किमान गूगल तरी करून पहायचं होतं, असं मला तरी वाटतं बा!

In reply to by आनंदी गोपाळ

वरील प्रतिसाद 'असका' नामक तैलबुद्धी, व सर्वज्ञानी व्यक्तीमत्वास आहे, हे नमूद करतो.

In reply to by टवाळ कार्टा

तुम्हाआम्हाला समजते, कारण तुम्ही आम्ही सामान्य आहोत. ते असामान्य, कुशाग्र बुद्धीमत्तेचे, सर्वज्ञ, तैलबुद्धी इ. आहेत. त्यांना समझवून साम्गावे लागते, की सगळेच आपापल्या आईच्या पोटातून येतात. आपण चुकीच्या ठिकाणून आलो नसलोत, तर कोण कुठून आले हा प्रश्न मुळातच गैरलागू व स्वतःचे प्रगाढ ज्ञान प्रदर्शित करणारा असतो, हे यांना उमजेल तो सुदिन. ;)

In reply to by आनंदी गोपाळ

ते "खाली ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत" तसे "वर ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत" असे लोकांना दिसत नाही, असे यांना वाटते का?

तीन दिवस टीबी ट्रेनिंगमध्ये बिजि असल्याने लिहिता आले नव्हते. १. ट्रेनिंग का होते हे महत्वाचे. २००० साली सरकारने टीबीसाठी एक आड एक दिवस उपचाराची नवीन पद्धत आणली, तेंव्हा सांगितले होते की जुनी रोज औषध घ्यायची पद्धत तितकीशी चांगली नाही, म्हणून ही नवी पद्धत आणली आहे. आज २०१६ साली, पुन्हा तीच जुनी पद्धतच चांगली आहे यावर सरकार, जागतिक आरोग्य संघटना व सर्व तज्ञांचे एकमत झाले असुन पुन्हा जुनी पद्धत आता सुरु होणार आहे. तात्पर्य : एखादी प्रचलित पद्धत चुकीची / निरुपयोगी आहे, असे नंतर सिद्ध झाले, हे अ‍ॅलोपथीतही होऊ शकते. मग होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अ‍ॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे? २. होमिओपथीची कुठलीही थेअरी म्हणे लाच घेऊन मांडली होती. असे अ‍ॅलोपथीत घडत नसेल की काय ? का, अ‍ॅलोपथीवाले सारे सोने चांदी मृत्तिकेसमान मानणारे संत आहेत ? ३. एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ? होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे. त्यांच्यावर शंका का घ्यायची म्हणे? पुढार्‍यानी काढलेली कॉलेजेस / कमी मार्कवाले अ‍ॅलोपथीला न मिळालेले तिथे जातात म्हणे , इ इ फोडणी घालुन त्यांच्यावर चिखलफेक व्हायला नको होती. ४. ट्रिचुरेशन / खलणे इ वर भाष्य करायची आमची ताकत नाही. पण घोटून केलेली कॉफी , पाण्यात उकळून मग दूध घालणे, दुधात कॉफी मिसळणे... वस्तू त्याच ठेउन पद्धत बदलली तरी चव बदलते. मिक्सरमधली चटणी व पाट्यावरली चटणी यात फरक असतो, इतके लिहायचे ज्ञान नक्कीच आहे.

In reply to by चंपाबाई

होमिओपथीची कुठलीशी थेअरी ....

In reply to by चंपाबाई

मोगाखान होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अ‍ॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे? पण ती थिअरी चुकीची आहे असे होमे पदीचे लोक म्हणत नाहित ना तिथेच तर गोची आहे. त्यानि आपली थिअरी बदलावी (मग सगळंच डोलारा कोसळेल ना). एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ? उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपवताय? मी एम बी बी एस केलं त्यानंतर तीन वर्षे सगळे रुग्ण पाहिले त्यानंतर परत अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा देऊन रेडियोलॉजिस्ट झालो त्यानंतरही लष्करात २० वर्षे नोकरी करेपर्यंत आपल्याला सर्वच रोगी पाहायला लागतात हेही त्याच प्रतिसादात लिहिले होते त्याचे तुम्हाला विविक्षित विस्मरण(selective amnesia) झाले काय. मूळ मुद्दा मी आधुनिक शास्त्रातच एम बी बी एस केले आहे होमेपदी किंवा युनानी नव्हे. तेंव्हा ती औषधे देण्याचा मला हक्क कायद्याने दिलेला आहेच. (आपल्या माहितीसाठी इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट १९५७) होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे -- मग त्यांनी आपलीच औषधे द्यावीत की कशाला सरकारकडे भीक मागावी की आम्हाला पण आधुनिक औषधे द्यायची परवानगी द्या. आणि कशाला आधुनिक औषधाच्या साईड इफेक्ट्स चा डांगोरा पिटावा ते त्रिचूरेशन आणि सक्सेशन करून त्यात ६६ भाग लॅक्टोज आणि ९९ भाग पाणी मिसळतात तेवढे वाचले नाही वाटतं. आणि त्यातील परत एक भाग घेऊन त्यात ६६ भाग लॅक्टोज /९९ भाग पाणी घालतात. असे २० वेळा केले की ते औषध २० पटीने "स्ट्रॉन्ग" होते. घोटून केलेली कॉफी मध्ये १५ लिटर पाणी घालून पिता काय? किंवा पाण्यात उकळून मग दूध घालणे यात १००० लिटर पाणी मिसळता काय? रच्याकने --तुम्ही होमे पदी वाले काय ? की टी बी ला होमेपदी देता येते काय याचे ट्रेनिंग घ्यायला गेला होतात? तीन दिवसांच्या "बिझि" नेस चा डोंगर पोखरून उंदीर सुद्धा नाही झुरळच निघाले. असो. कुठे तरी जळल्याचा वास येतोय