Skip to main content

"मी न मोजलेले आनंदी क्षण"

Published on शनीवार, 21/05/2016
मी न मोजलेले कितीतरी आनंदी क्षण कितीतरी आले. साले मोजायचेच कशाला? ते त्यावेळी तर उपभोगायचे असतात. रामदासांच्या आणि सर्वसाक्षांच्या बरोबर, पारशी बेकरीत खाल्लेल्या गार्लिक ब्रेडची चव विसरीनही कदाचित, पण.... त्यांच्या बरोबरची मैफिल विसरणे कसे शक्य आहे? त्याच्याच जराशा अलिकडे-पलिकडे, राणीच्या बागेतले ते नुलकरांच्या बरोबर वृक्षांची ओळख विसरीनही कदाचित, पण.... त्या कट्ट्याच्या निमित्ताने झालेली विमेंची ओळख आणि विमें बरोबर झालेली सात जन्माची दोस्ती कशी विसरेन. असेच कधीतरी वल्लींच्या बरोबर, लेणी बघण्याचा, की लेण्यांच्या संगतीत रमलेल्या वल्लींना, बघण्याचा बेत ठरतो. कुणी तरी लगेच धागा काढतो. घारापुरी किंवा असेच कुठलेतरी स्थळ ठरते. वल्ली आणि वल्लींचे शिष्यगण जमायला जास्त वेळ पण लागत नाही. बरेच सुंदर क्षण आपोआपच पोतडीत जमा होतात. कोण कुठला गारूडी (जॅक डॅनियल) आणि पनीरवाले बाबा (दीपक कुवैत) येतात. परत एकदा मदनबाण अत्तरांच्या कुप्या घेवून येतो. त्या अत्तरांचा वास विसरीनही कदाचित....पण..... तलावपाळीच्या साक्षीने झालेला तो कट्टा विसरणे कसे शक्य आहे? असे बरेच क्षण आयुष्यात आले आणि ते क्षण सतत लक्षांतही राहिले. आयूष्य हे असेच असते. उत्तम मित्रांच्या साथीने घालवलेले क्षण आठवत, दिवस सार्थकी लावायचा...की.... उगाच, दू:खाचे उमाळे सोडत, एकलकोंडेपणे, आपलेच आयुष्य काळवंडून घ्यायचे आयुष्य ! ही तर एकोप्याने राहण्यातली मज्जा आहे... तो उपभोगायला खरेच वेळ कमी पडतो.

वाचन संख्या 3722
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by संजय पाटिल

+ १ सध्यातरी आमच्यासाठी दिल्ली खूपच दूर आहे.

आयला...तुम्ही पण कवीतेच्या पाठी लाग्लात =)) *नंदी पॅलेस कट्टेकर्यांना अनुल्लेखाने मारल्याबद्दल कच्कून निशेढ....वचपा पुढल्या कट्ट्यात काढ्ला जैल

In reply to by टवाळ कार्टा

हे तर मुक्तक असल्याने, "काथ्याकुटात" टाकले आहे. नंदी पॅलेसच न्हवे तर असे बरेच कट्टे, नुकताच झालेला पुण्याच्या कट्ट्याचा उल्लेख पण केलेला नाही आहे. बाद्वे, परत एकदा एखादा घरगूती कट्टा करायचा का?

छान लिहिलंय. मुविंकाकांसारखा डायहार्ड मिपाप्रेमी मित्र म्हणून मिळायला देखील भाग्य लागतं. मिपामुळेच केवळ हे शक्य होतं.

In reply to by प्रचेतस

ह्याला अनुमोदन.... आमची बायको म्हणते, "मिपा ही रत्नांची खाण आहे, पण इथे "रत्नपारखी" व्हायला लागते.इथे "गाजरपारख्यांचे" काम नाही."

In reply to by मुक्त विहारि

आणि वरील दोघांचा स्नेहही मिपा मुळेच मिळाला हेही सुर्य प्रकाशाइतके साफ सत्य आहे. मिपा सौर उर्जेतला नाखु

माझे ही आनंदाचेच क्षण खालील प्रतिसाद वाचला आणि अरुण देशपांडे यांचे एक स्नेही यांना दोन दिवसापूर्वी फोन केला mobile वर नीट ऐकू येईना म्हणून landline वर बोलत बसलो विषय अर्थातच तुम्हाला केलेली मनाई हा होता फक्त एक तास सदोतीस मिनिटे बोलत होतो असे फोन ठेवल्यावर लक्षात आले . हे क्षण मला मिळण्यास तुम्ही निमित्य झालात आणि कळवण्यासाठी कारणही झालात श्री.अरूण देशपांडे ह्यांच्या सौर शेतीला भेट दिली. मुक्त विहारि - Thu, 12/05/2016 - 17:42 त्यांच्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल, मला कुठल्याही प्रकारे लेखी माहिती द्यायला, त्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल इथे माहिती देता येत नाही.

In reply to by देशपांडे विनायक

हे एक वेगळेच व्यक्तीमत्व आहे आणि त्यांचे विचार प्रत्येकाला पटतीलच असे नाही. शिवाय त्यांच्याबद्दल माहिती देतांना, माझ्याकडून काही गैर-समजूत होईल, अशी शब्द रचना पण होवू शकते, केवळ ह्याच कारणासाठी, त्यांनी नकार दिला. मला पण त्यांचा हा विचार पटला, म्हणून मी पण तो विषय जास्त लांबवला नाही.

In reply to by मुक्त विहारि

आम्ही ही त्यांच्या विचारावर आणि इतर काही विचारावरच बोलत होतो म्हणूनच ते क्षण आनंददायी होते अरुण देशपांडे यांचे हे स्नेही हौस म्हणून शेती करत असून त्यांच्याशी तुम्हाला बोलावयास आवडेल असे वाटते म्हणून तुम्ही माझा उपयोग करू शकता

In reply to by देशपांडे विनायक

अरूण देशपांडे ह्यांच्या स्नेह्यांचा मोबाईल नंबर व्यनि केलात तर उत्तम.

रुलाओगे क्या? बाकी हा लेख निरवानिरवीचा का वाटतोय मला?

आयुष्य ! तो उपभोगायला खरेच वेळ कमी पडतो. खरंय... याची प्रचीति वेळ निघून गेल्यावर कळते...

In reply to by स्पा

कधीतरी, कुठल्या तरी क्षणाला... एखाद्या व्यक्तीशी ओळख होते आणि एक प्रगाढ मैत्री होवून पण जाते. असो, बाकी, जून मध्ये पनीरवाल्या बाबांना भेटायला येणार ना?

In reply to by स्पा

माणस जोडणे त्यांच्या संगतीत आनंद घेणे हा मुविंचा सहज स्वभाव वाटतो. दवणीय नाही वाटत त्यांची ती प्रसन्न शैली आहे मांडण्याची जगण्याची. दवणीय हा वेगळा आजार आहे.