Skip to main content

कपालभातीं, प्राणायाम

लेखक अर्जुन
Published on गुरुवार, 21/04/2016
मला खुप वर्षांपासून सायनसचा त्रास आहे. मला त्यावर आमच्या ओळखींच्यानी कपालभातीं, प्राणायाम करण्यास सांगितले. माझा सायनसचा त्रास खुपच कमी झाला, पण त्यामूळे मला कमी रक्तदाबचा त्रास सुरु झाला आहे. कपालभातीं, प्राणायाम न थांबवता रक्तदाब नियमित कसा राहील ?

वाचन संख्या 6147
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

प्राणायाम आणि कपालभाती यांचा रक्तचाप कमी होण्याशी सम्बन्ध असावा असे वाटत नाहि. या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे जरूर आहे. केवळ तर्कावर फायदा देणारे योगोपचार बंद करणे बरोबर नाही.

In reply to by रमेश आठवले

संबंध आहे. रक्तदाबाचा विकार असणार्‍यानी कपालभाती करु नये अथवा संथ आणि काळजीपूर्वक करावे असे मी वाचले आहे. http://www.yoga-for-beginners-a-practical-guide.com/kapalabhati-and-high-blood-pressure.html

तुमच्या खाण्यात एकदम काही मोठे बदल झाले आहेत का? कपालभाती आणि रक्तदाबाचा काही संबंध असेल असे अजिबात वाटत नाही.

प्राणायाम जाणकार व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन करावेत.

+१

रक्त्दाब वाढला की प्रथम आहारातले मीठ कमी करायचा सल्ला दिला जातो. तेव्हा रक्त्दाब कमी झाला आहे तर आहारातील मीठ किन्चित वाढवुन फरक पडतो का बघु शकता. कदाचित तुम्ही मीठ जरुरीपेक्षा कमी खात असाल. मी काही डॉक्टर नाही पण एक तर्क मान्डला. एसनी देखिल तेच सान्गितले आहे. डॉक्टरान्चा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते. माझ्या वाचनात आलेली एक लिन्क इथे देते आहे. जरुर वाचा. http://meethkitikhave.blogspot.in/

कपालभाती, इतर प्राणायाम , योगासने हे अतिशय चांगले आहे. पण टिव्हीवर बघून , पुस्तकात वाचून , तुनळीवर पाहून करणे अतिशय चूक आहे असे माझे मत आहे. प्राणायाम , योगासने वगैरे शिकवीणारी व्यक्ती निदान काही दिवस तरी प्रत्यक्ष समोरासमोर शिकवीणारी हवी असे माझे मत आहे. अशा बर्याचश्या व्यक्ती , संस्था आहेत त्या विनामूल्य वा नाममात्र पैसे घेऊन या क्रिया शिकवतात. स्पेशली तुम्ही जर कुठल्या आजारामुळे जर या क्रिया चालू करणार असाल तर जरूर तज्ञ व्यक्तिंचा सल्ला घ्यावा.

In reply to by उगा काहितरीच

+१०० मझ्या माहीती प्रमाणे सायनस, सर्दीचा त्रास असेल तर प्राणायाम टाळायला सांगतात व कपालभारती करायला सांगतात पण आपल्या अनुभवा नुसार प्राणायाम (व कपालभारती) केल्याने आपला सायनसचा त्रास कमी झाला. तर मुद्दा असाकि या बाबत अनेक मतमतांतरे सापडतील तेंव्हा तज्ञ व्यक्तिंचा सल्ला आवश्यक.

खूप तिखट खाल्ले का? कमी रक्तदाब हा रोग नव्हे.?मानेच्या मागच्या बाजूस मालिश करून घ्या.कोणत्याही डॅाक्टरच्या गोळ्या घेऊ नका.फसाल.

In reply to by कंजूस

मानेची मागची बाजू ? मान मागेच असते ना ? मानेची मागची बाजू म्हणजे गळा होईल ना ! बाकी गळ्याला मालिश केली तर रक्तदाबच काय सगळेच रोग ठीक होतील . ;-) . . हघ्या हेवेसांनलगे ;-)

In reply to by उगा काहितरीच

हाहा मानेलाच म्हणायला पाहिजे.बाकी साइनस हासुद्धा रोग नाहीच.ती एक प्रकारची रिअॅक्शनच असते.काही जणांना कोंदट,थंड,सर्द ,धुळीच्या जागी,बस कारचे सीट रेक्झिनस न पुसल्यामुळे त्यावरची धूळ यामुळे साइनस होते.त्या जागेंपासून दूर राहिल्यास साइनस होत नाही.नाकाला आतून सूज वगैरे.

In reply to by कंजूस

नियमित वाफ घेण्याने सायनसचा त्रास कमी होतो, बाकी व्यायाम पण बघू शकता जसे सूर्यनमस्कार, मध्यम गतीने धावणे वा वेगात चालणे. व्यायामाने अ‍ॅलर्जीचा त्रास हळू हळू कमी होतो.

मी प्राणायाम भत्रिका,कपाळ भाती, अनुलोम विलोम, अतिसार व ओमकार हे सर्व मागील ८ महिन्या पासून सुरु केले आहे, करयाला ३५ मिनटे लागतात व सकाळी आणि सायंकाळी करतो. हे करण्याचा मुख्य उदेश मला गासेस चा motion चा आणि उच्च रक्दाब (९५ तो १६०) असा त्रास होता. जून मध्ये योगा day च्या एक दिवस आधी प्राणायम सुरु केले मागील ८ मिहीन्या पासून दरोरोज करतो सकळी आणि सायंकाळी. हे सर्व नळी वर बघून सुरु केले. गासेस ९०% कमी झाले आणि बिपी लोवर (७८ तो ८४) & ऊप्पेर (११८ तो १२५) येतो आहे. बिपी ची गोळी पण बंद केली आहे. मी बाहेर देशात आहे त्या मुले सर्व काही नळी वरच बघून सुरु केले. मी हे सर्व न चुकता करतो. या बरोबर मी diet पण खूप कंट्रोल केले आहे. भारतात आल्या नंतर योग शिक्षकला भेटायचं ठरवले आहे. जर पुण्यात कुठे योगाचे center असेल तर सांगावे.माझा अनुभव योग बदल खूप सकारत्मक आहे. आसन कुठले पण करीत नाही. रात्री झोपण्या पूर्वी साधनेला बसतो आणि ४५ मिन्स तो ६० मिन्स करतो. फक्त आसनावर बसून रहातो जे विचार येतात ते येऊ देतो जी काही क्रिया होते ते बघत राहतो (हे मला काही वर्षा पूर्वी एका सत्पुरुषाने सांगतले होते कि साधना चालू करा, शंकर महाराजांचं स्मरण करून ते पण मी दरोज करतो.

प्रतिक्रियांबद्दल आभार, खाण्यामधे काही विशेष बदल नाही.मिठही कमी केले नाही. उलट माझे जेवणात थोडे जास्तच मिठ असते. मी खूप तिखटही खात नाही.

योगासनांनी रोग बरे होतात का? म्हणजे झाला अमुक रोग की कर हे आसन आठदहा दिवस आणि हो बरा असं.इतर कोणतेही औषध न घेता.

In reply to by कंजूस

सूर्य नमस्कार केल्याने बर्‍याच आसनांचा फायदा मिळतो व स्नायूंचे किरकोळ दुखणे असेल तर आराम मिळतो.

रक्त दाब नियंत्रणात आणण्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम , ओंकार गुंजण चांगले आहेत. व्यवस्थित शिकुन ट्राय करा. फायदाच होईल.

कपालभातीचा आणि उच्च रक्तदबाचा संबंध आहे; ज्यांना हा त्रास आहे त्यांनी कपालभाती अगदीच बंद न करता तीस तीस ची तीन आवर्तने करावीत एका वेळी तीस पेक्षा जास्त वेळा कपालभाती करु नये. सायनस साठी शुध्दीक्रीया अधिक फायदेशीर आहेत जलनेती आणि सूत्रनेती जरुर करा जलनेती केल्यानंतर कपालभाती करणे आवश्यक आहे. मात्र या क्रिया योग्य प्रशिक्षका मार्फत शिकून घेणे आवश्यक आहे. प्राणायाम देखील उपयुक्त आहेत विशेषतः अनुलोम विलोम उज्जेयी सारखे प्राणायाम करणे श्रेयस्कर आहे. मात्र क्रिया सकाळी सूर्योदयापूर्वी कराव्यात.

कपाल्भाती करणे म्हणजे उछ्वास जोराजोरात बाहेर टाकणे. श्वास आपण घेण्याची गरज नाही, ती क्रिया आपोआप घडतच असते. सुरवातीला एका मिनीटात किमान साठ वेळा ही क्रिया जमली पाहिजे. सरावाने हा वेग दुप्पट व्हावयास हवा. पोट जोराजोरात आतबाहेर करणे म्हणजे अग्निसार करणे होय. हा शुद्धिक्रियेचाच एक प्रकार आहे. गुढघ्यात किंचित वाक देवून , दोन्ही हात , गुढग्यावर ठेवून उभे रहावे. घेतलेला श्वास , पुर्णपणे बाहेर टाकून, पोट रिकामे असतांना, आत बाहेर करावे. श्वास जितका वेळ आतमध्ये घेतला जाणार नाही , तेव्हढ्या वेळात जितके शक्य होईल, तितक्या वेळा पोट आत बाहेर जलद गतीने करणे.