मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट

केशवसुमार · · काथ्याकूट
अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत.. आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत.. कृपया अधिक माहिती द्यावी.. (काळजी ग्रस्त)केशवसुमार

वाचने 13958 वाचनखूण प्रतिक्रिया 49

मदनबाण 25/07/2008 - 15:23
बंगलोरवासी मिपाकरांनी काळजी घ्या !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मदनबाण 25/07/2008 - 15:30
http://www.josh18.com/showstory.php?id=259171 मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

स्वाती दिनेश 25/07/2008 - 15:44
बंगलोरातले मिपाकर सुरक्षित आहेत अशी आशा! स्वाती

मेघना भुस्कुटे 25/07/2008 - 15:47
मी आत्ताच घरी पोचलेय. सुदैवानं सगळे लो इण्टेसिटीचे स्फोट होते... संध्याकाळपर्यंत सगळं नॉर्मल चालू व्हावं... आपापली खुशाली कळवा रे बाबांनो....

In reply to by मेघना भुस्कुटे

मनस्वी 25/07/2008 - 15:54
जपून रहा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

श्रीमंत दामोदर पंत 25/07/2008 - 15:56
बेंगलोर मधील मिपाकर आपआपली खुशाली कळवा रे......... सर्व मिपाकर काळजीत आहेत.....

आर्य 25/07/2008 - 15:56
ईकडे अजुन तरी परीस्थिती अटोक्यात आहे. सगळी कार्यालये / शाळा सोडून देण्यात आल्या आहेत आर्य (बेंगलोर वासी)

अभिज्ञ 25/07/2008 - 16:03
अजून तरी सर्व काहि ठिक आहे. माझ्या ओफिसजवळच दोन ठिकाणी हे ब्लास्ट झाले आहेत.(माडिवाला व अडुगोडी.) पोलिसांनी सर्वांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. संध्याकाळपर्यंत सर्व काहि सुरुळीत होइल अशी आशा आहे.

मुक्तसुनीत 25/07/2008 - 16:03
सर्व बेंगलोर वासी मिपा करांच्या आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या सुरक्षिततेबद्दल सदिच्छा व्यक्त करतो ...

विसोबा खेचर 25/07/2008 - 16:10
सगळे बंगलोरवासी मिपाकर सुखरूप असावेत हीच प्रार्थना...!

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 25/07/2008 - 20:06
सगळे बंगलोरवासी मिपाकर सुखरूप असावेत हीच प्रार्थना...! मिपाकरच नव्हे... तर सगळेच बेंगलोरवासी सुखरूप असावएत हीच प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 25/07/2008 - 16:22
बाबांनो काळजी घ्या रे. आणि स्वतःची काळजी घेताना रस्त्यातल्या एखाद्याला मदतही करा...मुंबईचा आदर्श ठेवा समोर. सगळं काही नक्की ठीक होईल. आई जगदंबेला काळजी आहे.

शेखर 25/07/2008 - 16:26
सर्व बेंगलोर वासी मिपा करांच्या सुरक्षिततेबद्दल ईश्वरचरणी प्रार्थना. शेखर
सर्व बेंगलोरवासियांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहे. (घडलेल्या दुर्घटनेत एक स्त्री मृत्युमुखी पडली त्याचा खेद आहे.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रियाली 25/07/2008 - 16:51
सर्व बेंगलोरवासियांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहे. (घडलेल्या दुर्घटनेत एक स्त्री मृत्युमुखी पडली त्याचा खेद आहे.)
असेच. काळजी घ्या!

विकास 25/07/2008 - 17:09
असल्या घटना सातत्याने घडत रहातात या बद्दल खेद वाटतो. सर्वजण खुशाल असतील अशी प्रार्थना.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) 25/07/2008 - 17:30
माझ्या ओळखीतले सगळे जण ठीक आहेत. डॉन्याशी बोलणं झालं. अनुराधा ऑफीस मधे असल्याचं त्यानी सांगितलं. मेघनानी वर पोस्ट टाकलाय. अभिज्ञ ठीक असल्याचं मदनबाण नी कळवलं. ओळखीतली बाकीची जनता पण ठीक आहे

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

केशवसुमार 25/07/2008 - 17:38
खुशाली कळवल्या बद्दल धन्यवाद.. सगळे जण काळजी घ्या..एकमेकांच्या.. घरच्यां लोकांच्या संपर्कात रहा.. केशवसुमार

यशोधरा 25/07/2008 - 17:37
जोशी सायब, हमको विसर्‍या ना!! काय राव!! असो , मी पण ठीकच आहे :) थ्यांकू, थ्यांकू मिपावासी :)

विसोबा खेचर 25/07/2008 - 17:45
चला, सगळे ठीक आहेत हे पाहून खरंच बरे वाटले! :)

छोटा डॉन 25/07/2008 - 17:48
हो रे, मी घरी पोहचलो आहे ... बाकीच्या मिपाकरांची सुद्धा खबर घेतली आहे. सगळे व्यवस्थीत आहेत. काळजी नसावी ..... वातावरण निवळले आहे. रोड सुद्धा पुर्वीप्रमाणे ओसंडुन वहात आहेत ... माझ्या घरापासुन ५ मिनीटे अंतरावर स्फोट झाला ... पण लोकं पुन्हा जिगर दाखवुन उभी राहिली आहेत. सामान्य जनजिवन सुरळीत चालु आहे ... मी एका हॉटेलात चहा पिऊन घरी आलो .... घटनेत मॄत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीबद्दल व इतर जखमींबद्दल सहानभुती वाटते आहे .... चीअर्स टु बेंगलोर्स स्पीरीट !!! प्राऊड बेंगलोरकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

सुनील 25/07/2008 - 17:52
सर्व सुखरूप हे वाचून बरे वाटले. घटनेत मॄत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीबद्दल व इतर जखमींबद्दल सहानभुती वाटते आहे .... निश्चितच. ताज्या बातमीप्रमाणे ३ लोक मृत्युमुखी पडले असे कळते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by छोटा डॉन

श्री 25/07/2008 - 18:41
पण लोकं पुन्हा जिगर दाखवुन उभी राहिली आहेत. सामान्य जनजिवन सुरळीत चालु आहे ... ========================================================== जिगर म्हणावे कि आपल्या भावना आता बोथट होत चालल्या आहेत, कदाचित दहशतवाद मुळापासुन निपटुन न टाकणारी राजकिय निष्क्रियता आपल्याला आहे त्यातच सुख मानायला शिकवतेय.

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 25/07/2008 - 18:28
चला, सगळे ठीक आहेत हे पाहून खरंच बरे वाटले! हेच म्हणतो ! साई कृपा ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 25/07/2008 - 18:38
सात नाही आठ विस्फोट झाले..... आताच ५.३० च्या आस पास एक झाला.... एक मृत्युमुखी ! :( दुवा : http://www.josh18.com/showstory.php?id=259171 राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

चिमणी 25/07/2008 - 19:59
परत स्फोट झाला? :( सगळे काळजी घ्या. सुखरूप रहा.

चित्रा 25/07/2008 - 20:30
अतिरेकी कारवायांमुळे वाईट वाटणे, राग येणे, नित्याचेच झाले आहे. त्यात काही नवीन नाही. "Gopal Hosur, joint commissioner, crime, said that there was nothing to worry. He said that the blasts were low intensity in nature. He assured the people that the situation was under control." हे वाचून हसावे का रडावे, कळेना.

In reply to by चित्रा

प्रकाश घाटपांडे 25/07/2008 - 20:40
"Gopal Hosur, joint commissioner, crime, said that there was nothing to worry. He said that the blasts were low intensity in nature. He assured the people that the situation was under control." हे वाचून हसावे का रडावे, कळेना.
ही बाब केवळ वस्तुस्थिती निदर्शक असते. अफवा पसरु नयेत म्हणुन घेतलेलि ती काळजी असते. अफवा ही बातमीपेक्षा जास्त वेगाने पसरते.लोकांच्या डोळ्यासमोर लगेच मुंबईचे बॉम्बस्फोट येतात. हानी ती हानीच हे तात्विक विवेचन करण्याची ती वेळ नसते. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

देवदत्त 25/07/2008 - 21:33
ही बाब केवळ वस्तुस्थिती निदर्शक असते. अफवा पसरु नयेत म्हणुन घेतलेलि ती काळजी असते. सहमत. आजकाल आधीपेक्षा जास्त वेगाने अफवा पसरतात. म्हणून मी ही बंगळूरूमधील माझ्या मित्रांना फोन करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला.

In reply to by चित्रा

आपला काय रिस्पॉन्स असता? लोकांमधे घबराट पसरू नये, अफवांचे पेव फुटू नये, विशेषतः आपल्याकडे त्या फारच वेगाने परिणाम करतात, ह्या साठी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे असेच सांगावे लागते! गोपाल होसूर पार घामाने डबडबून, टेंशनने थरकापलेला असला तरीही त्याला असेच सांगावे लागते! त्या पातळीवर वावरत असताना असलेल्या मानसिक ताणाची कल्पना करा! आपणच आपल्या अधिकार्‍यांवर विश्वास दाखवला नाही तर कोणी दाखवायचा? चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रकाश घाटपांडे 25/07/2008 - 21:40
गोपाल होसूर पार घामाने डबडबून, टेंशनने थरकापलेला असला तरीही त्याला असेच सांगावे लागते!
सहमत आहे. जनतेला धीर देणे महत्वाचे . असंतोषापुढे जगातील कुठली ही सुरक्षा व्यवस्था थिटी असते. प्रकाश घाटपांडे

लिखाळ 25/07/2008 - 21:24
हे तर भयंकरच ! मी लगेच सकाळ पाहिला तर त्यात आता नउ स्फोट झाले असे म्हणत आहेत. पण केंद्रिय गृहमंत्र्यांनी लगेच या कृतीचा निषेध केला आहे चांगले. अशीच तीव्र स्वरुपाची परिणामकारक उपाययोजना अश्या कृत्यांना आळा घालते. -- (खिन्न) लिखाळ.

देवदत्त 26/07/2008 - 13:12
सकाळ मध्ये दिलेल्या बातमीनुसार "स्फोटानंतर काही वेळातच मोबाईल कंपन्यांनी काही काळासाठी आपले 'आपले नेटवर्क' बंद ठेवले होते" ह्यामागचे नेमके प्रयोजन काय?
  • अफवा पसरण्यास थोडाफार प्रतिबंध?
  • एकाच वेळी अनेक कॉल आल्यामुळे यंत्रणा कोलमडण्याची/बंद पडण्याची भीती.
  • की आणखीही काही?
वास्तविक अशा वेळी फोन चालू असले तर लोकांना एकमेकांची खुशाली/सुरक्षितता-असुरक्षितता तसेच त्या भागातील सद्य परिस्थिती कळविण्यास सोपे पडते. तसेच त्या भागातील लोकांना पुढे काय पाऊल उचलावे ह्याबाबतही थोडा विचार कळू शकतो. पण जर फोन बंद असले तर अवलंबून रहावे लागते ते बातम्या वा तत्सम यंत्रणांवर. पण ह्याचाही आजकाल उपयोगापेक्षा गोंधळ वाढविण्यात हातभार लागू शकतो.

मदनबाण 26/07/2008 - 19:36
Six blasts rock Ahmedabad, 6 injured "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

ब्रिटिश टिंग्या 26/07/2008 - 19:43
सत्तेची हाव असणारे केवळ खुर्ची टिकवण्यात वेळ घालवत असतील तर दुसरं काय होणार? :( (उद्विग्न) टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 26/07/2008 - 19:47
सहमत. रिडीफ वरील लेख वाचण्यासारखा ! http://www.rediff.com/news/2008/jul/25kp.htm राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

देवदत्त 26/07/2008 - 20:50
राजे, मी माझी प्रतिक्रिया लिहिल्यावर तो लेख वाचला. तिथे ही तेच म्हटले आहे. Any time now, the state government will start blaming central intelligence agencies for not alerting them. The Centre, in turn, will blame some unpronounceable outfit whose benefactors are across the border. आणि सुरक्षिततेचे म्हणाल तर खरोखरच जास्त काहीच केले जात नाही. असे काही घडले तरच थोडी सुरक्षितता वाढवतात. पण मग पुन्हा तेच. २००५ मध्ये बंगळूरूच्या ITPL च्या बेसमेंट मध्ये बाँब ठेवल्याचा फोन आला होता. त्यामुळे संध्याकाळी ४:३०/५ च्या आसपास सर्व कार्यालये रिकामी केली होती. आम्ही मग खाली ITPL बागेत येऊन उभे होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की अजून १-२ तास ही तपासणी चालेल. त्यामुळे मग मी माझ्या गट नेत्याला (टीम लीडर) विचारून घरी गेलो. वास्तविक ITPL मध्ये शिरताना कंपनीचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. पण ह्या घटनेच्या दुसर्‍या दिवशी मी माझे ओळखपत्र न दाखविता कार्यालयात जाऊ शकलो होतो.

ब्रिटिश टिंग्या 26/07/2008 - 19:51
पहिल्यांदा जयपुर नंतर बेंगलोर आणि नंतर अहमदाबाद! तिन्ही भाजप सरकारांची राज्ये! :( काही लिंक मिळतेय का?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

देवदत्त 26/07/2008 - 20:36
तसे असेल तर १९९३/२००६ चे मुंबईतील बॉम्बस्फोट व इतरही काँग्रेस सरकारच्या राज्यात झाले. त्याची लिंक का लावू नये? ही वेळ मुख्यतः लोकांना मदत करण्याची, त्यांना धीर देण्याची असून गुजरातचे गृहमंत्री आणि आता यशवंत सिन्हांनी हेच सांगितले की तिनही राज्यात भाजपचे सरकार होते, त्यांना टार्गेट केले जातेय. आणि जर तुम्ही म्हणताय की केंद्र सरकार (काँग्रेसचे) ह्याला कारणीभूत आहे तरी त्या राज्यात तुमचेच राज्य आहे ना? मग तुम्ही घेतली का खबरदारी? तुमची ह्यात हार नाही का? मुख्य म्हणजे ही वेळ आहे का आरोप करण्याची? अरे ह्या महत्वाच्या वेळी लोकांना जर अशा गोष्टींवरून चिथावले तर पुढे काय?

In reply to by देवदत्त

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 26/07/2008 - 20:41
http://www.josh18.com/showstory.php?id=260161 " गुजरात के शहर अहमदाबाद में सिलसिलेवार 12 बम धमाके होने की देश भर में प्रतिक्रिया हुई है और राष्ट्रपति प्रतिभा पाटील तथा प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने इन धमाकों की कड़ी निंदा की है। " राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by देवदत्त

ब्रिटिश टिंग्या 26/07/2008 - 20:51
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की सद्यपरिस्थितीत केवळ भाजपा सरकार असणार्‍या राज्यांमध्येच हे प्रकार चालु आहेत्.....किंबहुना बर्‍याच न्युज चॅनेल्सनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे. सेकंडली, मी कोणावरही आरोप करत नाहीये परंतु >>अरे ह्या महत्वाच्या वेळी लोकांना जर अशा गोष्टींवरून चिथावले तर पुढे काय? याच्याशी १००% सहमत!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

देवदत्त 26/07/2008 - 21:03
मी तुमच्या लिहिण्यावर आक्षेप नाही घेतला :) मी फक्त त्या वाक्यावर (कोणीही म्हटले असो) ती प्रतिक्रिया लिहिली. कारण नेमके त्याच वेळी मी यशवंत सिन्हांचे ते वाक्य ऐकून संगणकावर आलो होतो. माझ्या प्रतिक्रियेत 'तुम्ही, तुमचे राज्य' म्हणजे भाजपा संदर्भात होते.

In reply to by देवदत्त

ब्रिटिश टिंग्या 26/07/2008 - 21:06
:)

सँडी 31/07/2008 - 10:31
अह मदाबाद ची बातमी ऐकुन मन सुन्न झालय... रात्रिचा १ वाजलय्..नाहि झोप येनार आज... का? का ही लोक दुसर्‍यांच्या जीवावर उठली आहेत? हे कुठेतरी थांबायला हवं! पण कसं??????????????????????????