Skip to main content

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 02/03/2014 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

वाचने 23144
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

राहवत नाही म्हणून लिहित आहे. आतापर्यंत लोक फक्त फायदा होतो किंवा नाही या बद्दल लिहित आले. ज्योतीष शास्त्रामुळे( ज्योतीषांमुळे) अपरिमित नुकसान झालेल्या दोन मी स्वतः पाहिलेल्या घटना लिहित आहे. १) नौदलाचे हेलीकोप्तर गोव्याजवळ समुद्रात कोसळले आणि दोन्ही वैमानिक बेपत्ता होते. नौदलाच्या पाणबुड्यांनी ते समुद्रात जेथे बुडाले तेथे त्याचे अवशेष शोधून काढले. मधल्या कालावधीत एका वैमानिकाच्या बायकोला एका ज्योतिषाने सांगितले कि तुमचा नवरा कुठल्यातरी किनार्याला लागला आहे आणि बेशुद्ध आहे तुमची ग्रह दशा सुधारली कि परत येईल. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली आणि अपघातीमृत्यू म्हणून दोन्ही पायलटच्या बायकांना विमा, निवृत्तीवेतन, प्रोवीडंट फंड असे सर्व आर्थिक लाभ देण्याची वेळ आली त्यावेळी या बायकोने आपले यजमान मृत आहेत हे स्वीकारण्याचे नाकारले. जोवर ती त्या चौकशी अहवालाचा स्वीकार करीत नाही तोवर तो सैनिक( अधिकारी) missing in action(कामाच्या अनुषंगाने बेपत्ता) म्हणून मानावे लागते आणि बायकोला सात वर्षे पर्यंत अर्धाच पगार मिळतो आणि बाकी सर्व अनुषंगिक फायदे सात वर्षे पर्यंत मिळत नाहीत. नौदलाच्या पाणबुड्यांनी त्या अपघात केलेल्या कसून तपासणी मध्ये तेथे समुद्रात एक मूत्रपिंड आणि आतड्यांची काही वेटोळी सापडली होती. ती चौकशीसाठी जपून ठेवलेली होती.त्या अवशेषांची डी एन ए चाचणी केली गेली. त्या वैमानिकाच्या वडिलांचे डी एन ए त्या मूत्रपिंडातील आणि आतड्यातील पेशींच्या डी एन ए शी जुळले आणि त्यानंतर त्या वैमानिकाच्या वडिलांनी आपला मुलगा मृत झाला आहे हे मान्य केले आणि आपल्या सुनेलाही समजावले आणि या कहाणीवर पडदा पडला. सुदैवाने दुसर्या वैमानिकाच्या बायकोने हा अपघात मान्य केलेला होता( तिच्या यजमानांचे अवशेष सापडले नाहीत). जर पहिल्या वैमानिकाचे अवशेष जुळेल नसते तर सात वर्षे तिच्या मुलांना अर्ध्या पगारावर कोणतेही फायदे न मिळता जगावे लागले असते. शिवाय जोवर नवरा मृत घोषित होत नाही तोवर अनुकंपा तत्वावर बायकोला नोकरी देत आली नसती. आज ती नौदलाने दिलेले पूर्ण आर्थिक फायदे आणि नोकरी करून मुलांचे शिक्षण पुरे करू शकत आहे( नवरा गेल्याचे दुक्ख आयुष्यभराचे आहे पण त्याला कोणी काही करू शकत नाही. २) मी मुंबईतील एका मोठ्या कोर्पोरेट रुग्णालयात काम करीत असताना एक निम्न मध्यमवर्गातील रुग्ण हृदयविकाराच्या झटक्यानंतर भरती झाला. तो प्रथम एका छोट्या रुग्णालयात भरती झाला होता तेथून त्यांनी तातडीने आमच्याकडे त्याला हलविले दुर्दैवाने याला आलेला झटका इतका मोठा होता कि त्याला आणेपर्यंत तो बेशुद्ध होता आणि त्याचा मेंदू मृत झाला होता. सर्व उपाय करूनही फारसा फायदा झाला नव्हता.त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू होता. आता त्याला व्हेन्टीलेटर वरून काढण्यासाठी नातेवाईकांची परवानगी आवश्यक होती. मधल्या काळात त्यांना एका ज्योतिषाने सांगितले आहे कि त्यांच्या कुंडलीत मृत्युयोग नाही. यामुळे त्या रुग्णाच्या बायकोने कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू ठेवा असे सांगितले. मोठ्या रुग्णालयात अती दक्षता विभागात बिल फार झपाट्याने वाढत जाते. जेंव्हा त्या बायकोच्या खिशातील( उधार आणलेले इ ) सर्व पैसे संपले तेंव्हा मोठ्या मुश्किलीने तिने कृत्रिम श्वासोच्छ्वास बंद करण्यासाठी परवानगी दिली. यावेले पर्यंत तिच्या खिशातुन जवळ जवळ चार लाख रुपये खर्च झाले होते. तिला आणल्या दिव्शीच स्पष्टपणे सांगितले होते कि नवर्याचा मेंदू मृत झाला आहे तेंव्हा उगीच पैसे खर्च करून फायदा नाही. पण ज्योतिषावर विश्वास ठेवल्यामुळे तिचे अपरिमित नुकसान झाले. हेच चार लाख रुपये तिला फार मोलाचे होते.

दुहेरी नुकसान योग होता असा तर्क आणखी एक ज्योतिषी काढेल .आडांख्यांचा आधार घेऊन किती चालायचे याचे तारतम्य हवेच .

In reply to by बॅटमॅन

लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची.... असो. मला समाजप्रबोधन करण्यात इन्टरेस्ट नाही. ...हर एक दुजेसे ज्यादा सयाने है!

In reply to by कवितानागेश

लोकांच्या ज्योतिषाबद्दलच्या कल्पनांची....
त्या पेपरमध्ये नक्की काय चूक आहे ते सांग गं. लोकांच्या कल्पनांशी करायचेय काय? लोक तर बह्वंशी मूर्खच असतात. समाजप्रबोधन वैग्रे जाऊदे खड्ड्यात. तो तीन पानांचा पेपर नक्की कुठे चुकला आहे इतकं समजलं तरी बास आहे आमच्यासारख्यांना. असो.

अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. चाचणी 'ज्योतिषांची' आहे कि 'ज्योतिष शास्त्राची' ? लीमाउजेट चा 'ज्याम कंटाळा येतोय, तरी लिहितेय..' हा प्रतिसाद वाचा. मला जे म्हणायचं तेच exactly त्यांनी म्हनला आहे .
डॉक्टरची परिक्षा दुसरा डॉक्टर करू शकतो याच कारण असं की "मेडिकल सायन्स" हे शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध होउन मान्यताप्राप्त झालं आहे.
शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करणारे त्या विषयातले तज्ञ असावे लागतात न. दुसरी गोष्ट अशी कि चाचण्या घेताना त्यासाठी काही माध्यम असावी लागतात. जसा कि ह्या केमिकल मध्ये ते केमिकल मिसळला कि हे तयार होतं. इथे हि केमिकल्स माध्यम म्हणून काम करतात . तसा फलज्योतिष शास्त्राची चाचणी घेण्यासाठी अशी कोणतीही माध्यम उपलब्ध नसतात. मग ती कशी करायची ?

In reply to by म्हैस

@अत्रुप्त आत्मा ,बॅटमॅन नुसता हसण्यापेक्षा नक्की काय म्हणायचं ते सांगा. >>> आधी तुंम्ही घाटपांडे काकांचा ब्लॉग अख्खा वाचा! मग कदाचित तुंम्हाला आमच्या हसण्याचे कारण कळेल. :)

In reply to by म्हैस

ठीक आहे परत लिहितो, ज्योतिष शास्त्राचं मॉडेल तयार करणे, आणि ते तज्ञांकडून तपासणे, ही फार नंतरची गोष्ट झाली "आकाशातील ग्रहतार्‍यांच्या आपल्या जन्माच्या वेळी असलेल्या भासमान स्थितीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो" फक्त हा दावा तपासायचा आहे... त्यासाठी प्रचंड ज्ञानाची गरज नाही, फक्त १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे "हो" आहेत का हे पहावे लागेल...

In reply to by आबा

>>> १) सारख्या कुंडल्या असलेल्यांच्या आयुष्यात एकाच प्रकारच्या घटना घडतात का? एक उदाहरण देतो. माझ्या ओळखीचे एक जुळे भाऊ-बहीण आहेत. दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत. त्यांच्या आयुष्यातील मला आढळलेले साम्य - (१) दोघांनीही एकाच महाविद्यालयातून शास्त्र शाखेत पदवी घेतली (भावाने भौतिकशास्त्रात व बहिणीने संख्याशास्त्रात. द्वितीय वर्षापर्यंत दोघांचेही सर्व विषय समान होते. फक्त शेवटच्या वर्षात विषय बदलले.) (२) दोघांनीही विद्यापीठात संगणक शास्त्राच्या मास्टर्स पदवीची प्रवेश परीक्षा दिली. दोघांनाही प्रथम यादीत प्रवेश मिळाला नाही. दोघेही प्रतिक्षा यादीत होते. कालांतराने बहिणीला कसाबसा प्रवेश मिळाला. भावाला न मिळाल्यामुळे त्याने बाहेरून संगणक प्रशिक्षण घेतले. (३) दोघांनीही माहिती तंत्रज्ञान विषयात करिअर केले. (४) दोघेही लग्नानंतर अमेरिकेत एकाच शहरात स्थायिक झाले आहेत. (५) दोघांनाही एकच अपत्य आहे. (६) दोघांचेही लग्न मुलगा/मुलगी पाहून, ठरवून झाले. दोघांचेही जोडीदार त्यांच्याच जातीतलेच आहेत. अजून एक उदाहरण आहे. दोन भिन्न कुटुंबातील महिलांचा जन्मदिवस एकच आहे. जन्मवेळ नक्की माहिती नाही. पण दोन तासांच्या फरकाने जन्मलग्न बदलते. त्यामुळे कुंडली काही प्रमाणात एकच व काही फरक आहेत. (१) दोघीही पुणे शहराच्या आसपास जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. (२) दोघी हिंदी व मराठी हेच विषय शिकवत होत्या. (३) दोघीही वर्णाने सावळ्या, दिसायला सर्वसाधारण व चष्मा होता. (४) दोघीही दिर्घायुषी आहेत. >>>> २) ज्यांच्या आयुश्यात सारख्या घटना घडतात त्यांच्या कुंडल्या एकाच प्रकारच्या असतात का? अशांच्या कुंडलीत काही ग्रहयोग एकसारखे असतात. घटस्फोट, शिक्षण, काही विशिष्ट रोग्/आजार हे अशी विशिष्ट ग्रहस्थिती असलेल्या बहुसंख्य कुंडल्यात दिसून येतात.

In reply to by श्रीगुरुजी

दोघेही काही मिनिटांच्या अंतराने जन्माला आले. त्यांच्या कुंडल्या अर्थातच बहुतेक सारख्या आहेत.
या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात..

In reply to by बाळ सप्रे

>>> या उदाहरणावरुन या जुळ्यांचे भविष्य बर्‍यापैकी सारखे ठरले याला समान कुंडली (पक्षी- त्यावेळची ग्रहस्थिती सारखी होती) हे कारण अजुनही सिद्ध होत नाही. कुंडलीपेक्षा ज्या वातावरणात वाढले त्यातील समानता, एकमेकांवरील प्रभाव ही कारणे जास्त योग्य वाटतील. याउलट त्याच वेळी जन्मलेल्या इतर मुलांच्या भविष्यातील समानता दाखवता येईल का ?? तरच हे सिद्ध होउ शकेल . त्यातही consistency हवीच.. जी जुळ्यांच्या उदाहरणात देखिल नाहिये.. कारण जीवनात समानता नसणारी कित्येक जुळ्यांची उदाहरणे पहायला मिळतात.. याकडे बघण्याचे पूर्णपणे परस्परविरोधी दृष्टिकोन असू शकतात. माझ्या दृष्टीने या जुळ्या मुलांची आयुष्ये म्हणजे एकाच स्थानकातून एकाचे वेळी सुटलेल्या व एकाच दिशेने व एकाच गतीने जाणार्‍या दोन शेजारच्या रुळांवरील गाड्या आहेत. दोघांचीही आतापर्यंतची आयुष्ये जवळपास एकसमान घटनांनी भरलेली आहेत. हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल. पण एकाच घरातील जुळ्या नसलेल्या भावंडांची आयुष्ये समान वातावरणात वाढून सुद्धा पूर्णपणे भिन्न असलेली अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. त्यामुळे एकाच घरात जन्मलेली जुळी मुले व जुळी नसलेली मुले यांची तुलना केली तर जुळ्या मुलांचे आयुष्य बरेचसे एकसारखे दिसते पण जुळ्या नसलेल्या मुलांची आयुष्ये बरीचशी भिन्न असतात असा निष्कर्ष काढता येईल व त्यासाठी ग्रहस्थिती कारणीभूत आहे असेही म्हणता येईल. (जुळ्या मुलांचे अजून एक उदाहरण म्हणजे पोलिसदलात उच्च पदावर गेलेले जुळे अवस्थी बंधू). मी दिलेल्या दुसर्‍या उदाहरणात दोन भिन्न कुटुंबात एकाच दिवशी एकाच शहरात जन्मलेला दोन महिलांची माहिती दिली आहे. त्यांची प्रत्यक्ष जन्मवेळ मला माहीती नाही परंतु जन्मदिवस एकच आहे. त्यांच्याही आयुष्यात बराचसा सारखेपणा दिसलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हा योगायोग आहे असाही काही जणांचा दृष्टीकोन असू शकेल
जेव्हा एकाच वेळी जन्मलेल्या अनेक मुलांचे भविष्य सारखे दाखवता येईल तेव्हा तो नियम ठरेल .. तिथपर्यंत तो योगायोगच !!

In reply to by आबा

माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. त्यावरून हे मी नक्की सांगू शकतो की ग्रहस्थितीचा जीवनावर नक्कीच परीणाम होतो. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्यानुसार त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये दिसून येतात व ती रास त्या व्यक्तीची जन्मरास समजली जाते. उदा. जन्माच्या वेळी मिथुन राशीत चंद्र असेल तर ती व्यक्ती मिथुन राशीची असते. मिथुन राशीच्या व्यक्ती बोलण्यात अतिशय चतुर, बोलक्या व अत्यंत धारदार, जिव्हारी लागेल अशा बोलणार्‍या असतात. कन्या रास असणारे बहुतेक नास्तिक आढळतात तर मीन व कर्क राशीच्या व्यक्ती अत्यंत श्रद्धाळू, देवभोळ्या अशा असतात. वृषभ व तूळ या दोन्ही रसिक राशी, पण वृषभ हे शृंगारिक रसिक असतात व तूळवाले कलाप्रेमी असतात. कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावावरून त्या व्यत्कीची जन्मरास ओळखता येते तसेच कोणत्याही व्यक्तीच्या राशीवरून त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो. या अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या. याचा काय उपयोग आहे? जन्मवेळच्या ग्रहस्तिथीचा व नंतर तत्कालीन ग्रहस्थितीचा आयुष्यावर नक्कीच प्रभाव पडतो व त्यानुसार आपली दिशा ठरवायला मदत होते. उदा. पोलिस इन्स्पेक्टर हा कधीही मीन/कर्क अशा मृदु स्वभावाच्या राशींचा नसावा. त्यासाठी मेष, मकर अशा राशींच्या कर्तव्यकठोर व धाडसी व्यक्तीच योग्य ठरतात. मिथुन राशीच्या व्यक्तींशी वाद घालण्याच्या भानगडीत पडू नये. मी पूर्वी एक हलकाफुलका लेख लिहिला होता. वेळ असल्यास जरूर वाचावा. http://www.misalpav.com/node/24104

In reply to by श्रीगुरुजी

ही राशीनुसार स्वभाववैशिष्ट्ये ही हलकाफुलका लेख वाचण्यापुरतीच ठीक असतात. :-) त्याहुन जास्त त्यात तथ्य नसते !!

घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे.
तुम्हाला घडणार्‍ञा गोष्टी मनासारख्या वाटत नसल्याप्रमाने का उत्तरे लिहताय ?
अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या. तुम्हाला प्रतिसाद समजलं नसेल तर सोडून द्या. ज्याला उद्देशून लिहिलंय त्याला समजलं ना मग बास

In reply to by म्हैस

@घाटपांडे काकांच्या ब्लोग वर हसताय होय. मग ठीक आहे. >>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..........म्हशी, वाचायला'च येत नाही होय अजुन? मग र्‍हायलं! :p

In reply to by आत्मशून्य

अहो नाहीच वाटत मला घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या.
जरा नामस्मरण वाढवा मग!

पूर्वीच्या काळी लोकाना आजच्या सारखे बरेच उद्योग वगैरे काही नसत. वीजेचा शोध लागलेला नव्हता. रात्री टीव्ही बघण्याची सिनेमाच्या तिसर्‍या शो ची काही सोय नव्हती. तीन पाळ्यात काम कारणारे कारखाने ही नव्हते. आजच्या सारखी सामान्य लोकात बर्यापैकी देखील सुबत्ता नव्हती. मग माणसाने एक करमणूक शोधून काढली.रात्री आकाशात तासंतास डोळे लावून पहात रहायचे. त्यात बदल काय होतात हे समजून घ्यायचे. विज्ञानातील प्रगति यथातथाच असल्याने मानवी जीवनात घडणार्‍या अनेक घटनांचा अर्थ लावता येत नसे. सबब एका बाजूला आपले जीवन कसे घडत असेल या मागे पृथेवीवरील घटकांखेरीज काही घटक बद्ल घडवून आणत असतील काय अशा उत्सुकतेपायी आकाशातील हालचाल व आपले नशीब यांचा संबंध आहे असा ग्रह मानवाने करून घेतला. मग जलद हालचाल कोण करतो तर चंद्र . म्हणून चंद्राला रास ठरवण्यात महत्व प्राप्त झाले. कारण त्याची हालचाल जास्तीत जास्त कॉम्बेनेशन निर्माण करू शकते. मग कोण लुकलुकतात कोण नाही यावरून ग्रह व तारे, तसेच कधीतरी उगवणारे धूमकेतू यांचा प्रवेश या कोम्बीनेशन मधे झाला. हळू चालणारा शनि , वर आकाशात कधीही न येणारे बुध व शुक्र व बाकीचे असा फरक समजून आला. मग आणखी निरूद्योगी लोकानी युती, प्रतियुती, दशा महादशा असल्या गोष्टी घुसडवून हे शास्त्र जीवनाइतकेच अतर्क्य करून टाकले. तार्‍याना या तथाकथित शास्त्रात काहीही महत्व नाही कारण त्यांचे अचलत्व.बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने तारकाना महत्व मिळणे शक्य नव्हते. मग त्यांचा उपयोग फक्त एखाद्या नाटकात मागचा पडदा असतो त्याप्रमाणे नक्षत्रांच्या आकृती ग्रह्स्थानांच्या संदर्भासाठी झाला. आज जगातील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अस्तिकांची व जोतिष शास्त्रावर विश्वास न ठेवणार्‍यांची संख्या जास्त आहे. नस्तिकांचा या शास्त्रावर अबलंब जवळ जवळ शून्य असतो. पण देव मानणारे देखील फालतू कारणासाठी पूर्वीसारखे पंचांग हातात घेऊन आज काय आमावास्या आहे का शनिवार आहे का वाईट दिवस आहे का, खरेदी करू का असे काही पहात बसत नाही. एकच प्रयोग करून पाहाण्यासारखा आहे. गुरूपुष्यामृत नसतानाही सोने स्वस्त करून पहा खरेदी होते की नाही ते.