http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/09/article259627.ece/%E0%A4…
पवार घराण्यात जन्माला येणे ही एकमेव पात्रता असणार्या सुप्रियाताईसाहेब सुळे यांनी असा सल्ला दिला की आंदोलन करताना सामान्य लोकांच्या एस टीची जाळपोळ न करता नेत्यांच्या गाड्या जाळा! वा!
एस टी ची नासधूस करू नका हे म्हणणे ठीक आहे. पण हे नेत्यांच्या गाड्या जाळण्याबद्दलच्या काड्या कशाला सारताय?
एक जबाबदार वारसदार आपलं खासदार असले टाळ्याखेचक डायलाग मारते हे कितपत उचित आहे?
अर्थात पिताश्रींचे योग्य प्रशिक्षण असले तर उद्या बाईसाहेब सफाईदार कोलांटी उडी मारुन त्या जळणाच्या उपदेशाला वेगळेच वळण देतील हेही शक्य आहे.
नेत्यांच्या गाड्यांभोवती मोठी सुरक्षा असते. ती कशी भेदायची ह्यावर काही टिपा द्यायला हव्या होत्या. स्वतःची वा आपल्या "जाणत्या" तीर्थरुपांची गाडी आपणहून आंदोलकांना उपलब्ध करुन द्यायला हवी होती.
उद्या सत्ताभ्रष्ट झाल्यावर आपण काय प्रकारची आंदोलने करणार आहोत ह्याची चुणूक राष्ट्रवादींने दाखवली आहे की काय अशी शंका येते.
आंदोलक असे करण्यात यशस्वी ठरले तर ताईसाहेबांचे बंधू योग्य तो फवारा मारून अग्निशमन करतील काय? असो.
एकंदरीत असली भाषणबाजी करुन माकडाच्या हातात कोलित दिले असे व्हायला नको.
वाचने
3538
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटलं राव्हल्याबद्दल काही
ओय्य ... राव्हल्या कोन ?
In reply to मला वाटलं राव्हल्याबद्दल काही by प्यारे१
युथ पावर(र) आणि ढेमोक्रसी(र)
In reply to ओय्य ... राव्हल्या कोन ? by प्रसाद गोडबोले
कुडीयोंका है जमाना.
काल राजसाहेबांनी मात्र सरकारी
त्यात काय!
लै भारी !
पण ताई बोलतायत त्यात तथ्य आहे