Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आयुर्हित on Sun, 01/12/2014 - 19:04
दृश्य १: कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु? ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात? "नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का? दृश्य २: गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ॥ नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥ दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें| बरें पाहतां गूज तेथेचि आहे| करीं घेउं जातां कदा आडळेना| जनीं सर्व कोंदाटले तें कळेना ॥ श्लोकार्थ: या दृष्य सृष्टीत जे सहज दिसत नाही त्याचा सूक्ष्म विचाराने शोध घ्यावा. शुध्द विचाराने नीट पाहिले की त्याचे गूढरहस्य तेथेच दडलेले आढळेल. मात्र ते हातात प्रत्यक्ष घेता येणार नाही. कारण ते इंद्रियांना कदापि जाणवत नाही. वस्तूमात्रात ते ओतप्रोत भरलेले असूनही सहजासहजी कळून येत नाही. जे जगतात चर्मचक्षूंना दिसत नाही त्या ब्रह्माचाच शोध घेऊन अनुभव पाहावा. हा उपदेश वरवर पाहिल्यास चमत्कारिक वाटेल. पण विचारांती हाच योग्य ठरेल. जे बाहेर दिसते तेच पाहण्याची दृष्टीला सवय असते. पण पुष्कळ ठिकाणी महत्त्वाची वस्तू अंतरात गुप्त असते. नारळातील खोबरे बाहेर दिसत नाही, आत असते. नरोटी फेकून तेच घ्यावे लागते. असेच परमार्थात आहे. समर्थ म्हणतात, ‘प्रगट तें जाणावें असार| आणि गुप्त तें जाणावें सार| गुरुमुखें हा विचार| उमजो लागें॥ (दासबोध)ब्रह्म हे चर्मचक्षूनें दिसत नसले तरी अनेक सज्जनांनी ज्ञानचक्षूने ते अनुभविले असून त्यासंबंधी सर्वांची एकवाक्यता आहे. मग ते डोळ्याला दिसत नसले तरी नाही असे कसे म्हणता येईल? म्हणून त्या संत आनंताचा शोध घेण्याचे कष्ट घेतले पाहिजेत कारण त्यापासून बुध्दिग्राह्य अशा आत्यंतिक शाश्वत सुखाचा लाभ आहे. चंद्रावर वास्तव्य, अणुसंशोधन या क्षणिक सुखाच्या गोष्टी विज्ञानांत स्तुत्य, प्रगतीच्या व मानवी ज्ञानाच्या द्योतक ठरतात, तर चंद्रालाही जी तेज पुरविते व अणूलाही जी वस्तू आधार आहे ती वस्तू आपण स्वत: असल्याचा अनुभव घेणे हा मानवाचा महापुरुषार्थ नव्हे का? सृष्टीयंत्रात कोणतीही गडबड न माजविता सस्वरुपाची ओळख पटवून घेणे यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. एखाद्या सृष्ट पदार्थाचे ज्ञान असावयाचे पण आपण स्वत: कोण याचे ज्ञान नसावयाचे हा आत्मघातच. म्हणून न दिसणार्याण ब्रह्माचाच शोध घे, असे समर्थ म्हणतात. ज्ञानाने बुध्दीवरील अज्ञानाचे आवरण दूर झाले की स्वयंप्रकाश आत्मा आहेच. चर्मचक्षूने न दिसणारी वस्तू ज्ञानचक्षूने शोधिली पाहिजे. अशा बर्या> रीतीने पाहत गेल्यास ब्रह्म हे सर्वत्र अगदी जवळ असून जणू काय गुप्त असल्याचे आढळून येईल. डोळ्यासमोर डोळ्यात असूनही त्यांना न दिसणारी अशी ही अजब वस्तू आहे. सर्व ठिकाणी भरलेली असूनही एखाद्या पदार्थाप्रमाणे हातावर देण्यासारखी ही वस्तू नाही. समर्थ सांगतात, करी घेतां नये टाकितां न जाये| ऐसें रुप आहे राघवाचें॥ राघवाचें रुप पाहातां न दिसे| डोळां भरलेसे सर्व काळ॥ स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे| कांही येकासारिखे नव्हे| ज्ञानदृष्टीवीण नव्हे| समाधान॥ (दासबोध) परब्रह्माचा सुगावा लागेल व त्याच्याशी तादात्म्य होईल अशी ज्ञानदृष्टी सज्जन देऊ शकतात. त्यांच्याकडून होणार्याे महावाक्योपदेशाने ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते. असे सुद्गुरुकडून ज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणांतून सुटका नाही. पदार्थापलिकडे चिरंतन अशी ही वस्तू आहे व तेच आपले स्वरुप आहे, हे कळून येते. ब्रह्म हा कांही एखादा पदार्थ नाही की जो चटकन हातात देता येईल. तो एक अनुभव आहे व तो ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे. पण हा अनुभव कसा घ्यावा याचा संकेत म्हणजे निश्चअय हा सद्गुरूंकडूनच होतो. समर्थ सांगतात,पदार्थाऐसे ब्रह्म नव्हे| मा तें हाती धरून द्यावें| असो हे अनुभवावें| सद्गुरूमुखें॥ (दासबोध) हा निश्चहय खुणेने कसा होतो हे समजण्यासाठी शाखाचंद्रन्यायाचा दृष्टांत समर्थांनी दिला आहे. अगदी सूक्ष्म कोर असलेला शुद्ध द्वितीयेचा चंद्र दिसत नाही. तो ज्याने पाहिलेला असतो तो न पाहिलेल्यास झाडाच्या विवक्षित फांदीची खूण दाखवून त्या दिशेने पाहावयास सांगतो, त्या खुणेच्या दिशेने पाहिले की चंद्रकोर दिसते. चंद्रदर्शनानंतर तो खुणेची फांदी सोडून देतो व चंद्रच पाहात राहतो. असेच सज्जनांच्या विवेचन श्रवणाने घडते. परब्रह्म हा चंद्र, महावाक्य ही फांदी, मुमुक्षु हा चंद्र पाहण्याची इच्छा करणारा व सज्जन सद्गुरू हे ज्याने आधीच चंद्र पाहिलेला असतो तो. हे श्लो्काचे विवरण झाले. येथे तत्त्वे पंचीकरण बरोबरच महावाक्याचे स्वरुप काय हे ठाऊक असणे जरुरीचे. कारण आत्मज्ञानासाठी महावाक्य उपदेश महत्त्वाचा विषय असून त्याचे विवरण हे मुख्य ज्ञान आहे, असे समर्थ म्हणतात. महावाक्याचे विवरण| हे मुख्य ज्ञानाचे लक्षण| शुद्ध लक्ष्यांशे आपण| वस्तूच आहे॥ (दासबोध) हे मुख्य ज्ञानदान ब्रह्मनिष्ठ, अनुभवी अशा सद्गुरूकडूनच व्हावयास हवे. चार वेदांची प्रत्येकी एक अशी चार महावाक्ये आहेत. ऋग्वेद – प्रज्ञानं ब्रह्म॥ यजुर्वेद – अहं ब्रह्मास्मि॥ सामवेद – तत्त्वमसि॥ अथर्ववेद – अयमात्मा ब्रह्म॥ चारीही महावाक्ये ब्रह्मात्मैक्य म्हणजेच जीव हा ब्रह्मस्वरूपच असा बोध करितात. महावाक्यरूप शाखेवरून संत हे ब्रह्मचंद्राची दिशा दाखवितात. परंतु मनन व अभ्यास या दोन डोळ्यांनी मुमुक्षूनेच याचा प्रत्यय घेतला पाहिजे असा या श्लोाकाचा भावार्थ आहे. यावरून जीव =ब्रम्ह म्हणजेच गॉड पार्टीकल्स तर नाहीत ना? अशी दाट शंका येते. तदृश्य ३: जयपूरमधे पायाची शस्त्रक्रिया सुरु आहे,जे अमेरिकास्थित भारतीय डॉक्टर पारेख करत आहेत आणि जगभरात हि दृश्ये आंतर्जालावर LIVE बघितली जाऊ शकतात. हा नवा शोध जगासमोर आला तो म्हणजे गुगल ग्लास ह्याच्या सहाय्याने डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतांना नजर न हटवता आपल्या चर्मचक्षुंच्या सहाय्याने रुग्णाचे क्ष किरण/ MRI scan बघू शकतो व फोटो व वीडीओ देखील काढू शकतो व ही दृश्ये आंतर्जालावर पाठवली जाऊन दुसऱ्या ठीकाणी असलेल्या डॉक्टरांची मदत हि instantly घेऊ शकतो. आजच्या या जगात जो पर्यंत सद्गुरू भेटत नाही तो पर्यंत चर्मचक्षुंवरच आपली श्रद्धा/विश्वास ठेवत असतो, यात काही गैर नाही. कळावे, लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत ता.क. संपादक मंडळाने सांगितल्याप्रमाणे हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो.येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे! बुद्धीवादी चर्चा करणाऱ्यांनीच ह्यात प्रतिसाद द्यावा हि नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
  • 21671 views

प्रतिक्रिया

Submitted by आयुर्हित on Tue, 01/14/2014 - 15:27

In reply to धन्या श्री ! by विटेकर

Permalink

"भेदाभेद अमंगल"

तू मी आपण असले भेद तेव्हा नव्हतेच ! सारे एकच होते ! आणि पुन्हा एक होणार आहोत .. नव्हे आताही एक्च आहोत , तो अज्ञानाचा पडदा दूर केला की झाले !
१००% सहमत मानले विटेकर सर आपणास! विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 01/14/2014 - 15:28

In reply to धन्या श्री ! by विटेकर

Permalink

जाऊ दया, मरु दया...

फक्त एक सांगा, या ओव्या ज्ञानेश्वरीमधील आहेत का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/14/2014 - 15:37

In reply to जाऊ दया, मरु दया... by धन्या

Permalink

दासबोध.

दासबोध.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 01/14/2014 - 15:43

In reply to जाऊ दया, मरु दया... by धन्या

Permalink

धनाजीराव

ज्ञानेश्वरी ही तुकारामांनी लिहीली का ज्ञानेश्वरांनी? कारण वरच्या अभंगात तुकारामांचा उल्लेख जाणवला म्हणुन विचारले हो(आमचा गावठी प्रष्ण हो )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 01/14/2014 - 15:45

In reply to धनाजीराव by अनिरुद्ध प

Permalink

आमच्या माहितीप्रमाणे

आमच्या माहितीप्रमाणे सच्चिदानंदबावांनी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/14/2014 - 15:54

In reply to आमच्या माहितीप्रमाणे by बॅटमॅन

Permalink

हा हा.

हा हा. गविंचं लेखन टंचनिका माफ करा टंकनिका करत असली तरी श्रेय गविंना देता ना? ;) @ अनिरुद्ध प, धन्यानं तो प्रश्न विटेकर काकांनी दिलेल्या ओवीच्या संदर्भात विचारला असावा. आपला प्रतिसाद कुणाच्या खाली तिरका आला आहे ते पाहिले की लक्षात येतं बघा. आपल्या लाडक्या आयुर्हित ह्यांनी नंतर वेगळा अभंग मांडला तो तुकाराम महाराजांचा आहे. (@अनिरुद्ध प, ख व चेक करावी)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Tue, 01/14/2014 - 16:04

In reply to आमच्या माहितीप्रमाणे by बॅटमॅन

Permalink

हो हो

ते तर स्वता धनाजीरावानी धागा काढुनच सिद्ध केले आहे,पण मला वरच्या श्री आयुर्हित यानी दिलेल्या ओव्या बद्दलच्या प्रष्णाबद्दल वाटल्या म्हणुनच कारण धनाजीरावान्चा प्रष्ण हा कोणाला होता तेच कळले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 01/14/2014 - 16:11

In reply to हो हो by अनिरुद्ध प

Permalink

ही ही

वरती एकदा "हा हा" आणि एकदा "हो हो" असा प्रतिसाद आला म्हणून माझा "ही ही " ( की हि हि असा असायला हवा ?) आता पुढचा हु हु असा असला पाहीजे की हू हू ????
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Wed, 01/15/2014 - 12:01

In reply to ही ही by विटेकर

Permalink

विटेकर काका

हू हू पर्यन्त ठिक आहे पण त्यापुढे तू तू लागायला नको म्हणजे मिळवले कसे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 01/14/2014 - 16:19

In reply to हो हो by अनिरुद्ध प

Permalink

ते तर स्वता धनाजीरावानी धागा

ते तर स्वता धनाजीरावानी धागा काढुनच सिद्ध केले आहे
मी काहीही सिद्ध केलेलं नाही हो. परब्रम्हातून माया वेगळी होताना, बिग बँग होताना, इतकंच काय ज्ञानदेवांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहून घेताना मी हजर नव्हतो. माझं ते लेखन कथा स्वरुपातील होतं जे माझ्या वाचनावर आधारीत होतं. त्यात तथ्यांश असेलच असं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 01/14/2014 - 10:59

In reply to >>कारण माया ही परब्रह्मातूनच by मारकुटे

Permalink

कशीबशी!!

कशीबशी!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/14/2014 - 02:16

Permalink

ऑ नो.

नॉट अगेन.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 01/14/2014 - 09:37

Permalink

का हो अर्धवट राव

तुम्ही "रेडी टू थिंक" वाले ना ? मग आता द्या की उत्तर !
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/14/2014 - 10:39

In reply to का हो अर्धवट राव by विटेकर

Permalink

उत्तर दिलय तर..

पण प्रश्न काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 01/14/2014 - 10:42

Permalink

प्रश्न

प्रश्न असा आहे की " कशी?"
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 01/14/2014 - 10:49

In reply to प्रश्न by विटेकर

Permalink

वा वा

आमच्या सत्यसंकल्पात सामिल झाल्याबद्दल आभारी आहोत. >>प्रश्न असा आहे की " कशी?" -- आता असते एकेकाची मर्जी. आपण व्यक्ती/अव्यक्तीस्वातंत्र्य स्वीकारलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/14/2014 - 13:25

In reply to वा वा by अर्धवटराव

Permalink

>>>सत्यसंकल्पात

>>>सत्यसंकल्पात सातत्य आवश्यक असण्याची पहिली पायरी तुम्ही यशस्वीतेनं पार पाडली आहे. एका धाग्यावर केलेला सत्यसंकल्प दुसर्‍या धाग्यावर आणून आवश्यक विस्कळीतपणा बर्‍यापैकी जमतो आहे. कीपीटप! =))
  • Log in or register to post comments

Submitted by बर्फाळलांडगा on Tue, 01/14/2014 - 10:50

Permalink

आपणास लेखाच्या टायट्ल मधे गुगल आणलेले भावते काय ?

त्यातून आपणास काही विशेष सुख मिळते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Tue, 01/14/2014 - 12:26

Permalink

ओढवून घेतलेले लाडकेपण

बुद्धीवादी चर्चा करणाऱ्यांनीच
अशी अटच घातल्याने निर्बुद्धींनी जे जे लिहिले ते ते पहावे, समजले तर वाचावे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 01/14/2014 - 18:24

Permalink

मला असले धागे आवडत नाहीत

मला असले धागे आवडत नाहीत *NO*
  • Log in or register to post comments

Submitted by मारकुटे on Wed, 01/15/2014 - 12:25

In reply to मला असले धागे आवडत नाहीत by प्रसाद गोडबोले

Permalink

उगी उगी

उगी उगी क्लिक करु नाही अशा धाग्यांना ...
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on गुरुवार, 01/16/2014 - 14:34

Permalink

वितेकरनचे सगळे प्रतिसाद आवडले

वितेकरनचे सगळे प्रतिसाद आवडले आणि त्यांच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत आहे. .
  • Log in or register to post comments

Submitted by भृशुंडी on गुरुवार, 07/03/2014 - 05:00

Permalink

खत्त्तरनाक लेख.

खत्त्तरनाक लेख. अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com