Skip to main content

सोने : बघावे, घ्यावे की -----

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 20/12/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.- आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो. एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो. सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे. असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या, बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा विक्रीची तीव्रता कमी अधिक असते. कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात. (१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce' असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो या अर्थी.) या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या खेळाचे प्रयोग अनेकदा होतात. असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे. ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात. आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो ? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो द्यावी.

वाचने 71878
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल
परकीय चलनातले कमी व्याजाचे कर्ज जागतीक चलनाच्या अस्थीर विनिमय दरामुळे महागही ठरू शकते. जागतीक मंदीच्या काळात देशाची निर्यात घटल्यास हे कर्ज फेडणे अजुनच कठीण होउन बसते.

सोने हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. खरेंनी म्हटल्याप्रमाणे २००७ ते २०१२ याकाळात सोन्यात अनैसर्गिक वाढ झाली. तीच आज अनेकांच्या बोकांडी बसली आहे. चांदीने २०११ मधे बहुधा ७५हजार पर्यंत दर घेतला होता. आज काय परिस्थिती आहे? माझ्या माहितीतल्या अनेकांनी त्याकाळात सोने विकून चांदी घेतली आता पस्तावत आहेत. अशा प्रकारच्या खेळात जे चढलेला रंग पाहून शेवटी भाग घेतात ते वाईट हरतात. हेच रीअल इस्टेट मधेही झालं. सोनं दागिन्यांच्या स्वरुपात तर कधीच घेऊ नये. आज मंगळसूत्र करायला किमान ३ तोळं शुद्ध सोनं लागतं. त्यात मजुरी किमान ३०० रुपये प्रतिग्राम. म्हणजे ९००० रुपये + ७५००० रुपये सोनं = ८४००० रुपये. हेच मंगळसुत्र विकत घेऊन लगेच दुसर्‍या दुकानात त्याच दिवशी विकायला गेलं की ते होतं पुढीलप्रमाणे: घट २५% म्हणजे २२.५ ग्रॅम गुणीले घेण्याचा भाव (नेहमी २०० ते ४०० असा कितीही कमी असू शकतो.) म्हणजे सुमारे ५५ हजार रुपये हातात मिळतात. तर ८४-५५ = २९ हजार रुपये घेतल्यासरशी घालवणारी वस्तू अ‍ॅसेट कशी काय असू शकते? बरेच लोक तर घेतलेले सोने कधीच विकत नाहीत. काहीही झाले तरी. अगदी भिकेला लागायची वेळ आली तरी. माझ्या माहितीतल्या एक गृहीणी दर तीन-चार वर्षांनी जुने सोने मोडून नवीन दागिने करतात. म्हणजे नवीन दागिन्यांवर सरळ सरळ सराफाला सोन्याच्या किमतीच्या ५०% पर्यंत फुकट किंमत अदा करतात. काही वर्षांनी त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की आपल्याकडे उपलब्ध सोन्याचे मूल्य आपण खर्च केलेल्या पैशांशी जुळत नाही तेव्हा काय होईल देवजाणे. परत ज्या सोनाराकडून सोने घेता तोच सोनार ते परत विकत घेतो. दुसरा घेत नाही. मला तर अशी शंका आहे की खर्‍या सोन्याचे दागिने बाजारात मिळतच नसावे. किंवा २४ क्यारेटच्या नावाखाली १८क्यारेटचे दिले जातात. लाखाचे बारा हजार करायचे असतील तर नाजूक, भयंकर कलाकुसर असणारे दागिने घ्यावे. हौसेला मोल नसते म्हणून ठिक पण सोन्यात 'गुंतवणूक' करणे शुद्ध मूर्खपणा आहे. ३५ हजाराने विकत घेतलेलं सोन्याचे आज २५ हजार भाव आहेत. तेही २ वर्षात. पुढे दहा वर्षांत तरी ते ३५ पार करेल अशी अजिबात आशा दिसत नाही.

नुकतीच सरकारने लाँच केलेल्या gold bond scheme ला अल्प प्रतिसाद का मिळाला? धातू स्वरूपातील सोन्यातील गुंतवणूकीपेक्षा नक्कीच उजवी होती ही स्किम. माझ्यामते फक्त अडाणीच लोकं सोने (धातू)खरेदी करतात.

In reply to by मार्मिक गोडसे

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे. ही हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायला प्रत्यक्ष सोने अंगावर असणे आवश्यक ठरते, नुसतं कागद मिरवायला काय कामाचा ? म्हणून लोकांचा कल प्रत्यक्ष सोने घेण्याकडे असतो, गोल्ड बाँड घेण्याकडे नाही. कारण गुंतवणुकीची भावना कमी अन हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायची भावना जास्त असते. सणासुदीला आजही मी एखादी नखशिकांत दागीन्यांने मढलेली मुलगी/सुवासीनी बघतो तेंव्हा मन प्रसन्न होते. म्हणून हो हौस मौज अन प्रतिष्ठेपायी सोने अवश्य थोडे थोदे खरेदी करत चला पण त्याला आर्थीक गुंतवणूक अजिबात मानु नका.

तुमचे सोने सरकारकडे ठेवा त्यावर तुम्हाला सोनेरुपीच व्याज मिळेल या स्किमचे काय स्थिती आहे सध्या?

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे
पहीले प्रतिष्ठा कमवा, नंतर अंगावर खोटे सोने घातले तरी समोरचा ते सोने खरे समजतो. लग्नकार्यात माझी आई कर्णफूल व कडे बेंटेक्सचे वापरते अजुनही कोणाला शंका आली नाही. हौसही होते, मिरवताही येते, बचतही होते व मुळात असलेल्या प्रतिष्ठतेला त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

सोन्यासोबत फार भावना असतात हो लोकांच्या चिकटलेल्या. तुम्ही लिहले तेच लिहायला मघाशी आलो होतो. पण सोडून दिले. ते बोलतायत तसा विचार समाजातला बहुसंख्य वर्ग करतो. तुमच्या-माझ्यासारखा विचार करणारे फार थोडे. त्यामुळे सोडाच. माझ्या ओळखीतल्या एक गृहीणींचे खायचे-खर्चाचे वांदे आहेत पण लग्नकार्यात दिड किलोचे दागिने घालून फिरतात.

जर पी पी एफ ला मर्यादा ठेवली नसती तर , कर्मचार्‍यांनी , अमर्याद ( वेतनापेक्क्षा जास्त ) पैसा गोळा केला असता , तोही भ्रष्टाचाराने , आणि असा हा वरचा काळा पैसा ( ब्लॅक मनी ) , ' पांढरा ' ( व्हाईट मनी ) झाला असता, शिवाय सरकारचे आयकराचे उत्पन्न , तेही बुडाले असते.