Skip to main content

अन्नाची नासाडी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 27/11/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर हा विषय बरेच दिवस मला छळत आहे पण कसा मांडावा समजत नाहिये. मी एका मोठ्या आय.टी. कंपनीत काम करतो जिथे साधारण २०-२५ हजार लोक कामाला येतात. कँपसमध्ये २-३ फूड कोर्ट आहेत आणि खायला प्यायला चंगळ आहे. तुमची जेवढा खर्च करायची तयारी असेल तसे अगदी २५ रुपयापासुन ५०० रुपयापर्यंत सर्व काही मिळते. खाउन झाले की लोक आपापल्या प्लेट घेउन खरकटे टाकायच्या खिड्क्यांजवळ नेउन ठेवतात.तिकडचे चित्र न बघवण्यासारखे असते. बर्‍याच डिशमध्ये अन्न तसेच वाया गेलेले /राहीलेले दिसते. चव न आवडणे, भूक नसणे, जास्त वाढलेले असणे कारण काहीही असो .शेवटी ते वायाच जाते. एका मोठ्या कंटेनरमध्ये सर्व जमा करुन बाहेर नेले जाते. अजुन एक चीड आणणारा प्रकार म्ह्णजे प्रोजेक्टमध्ये कोणाचा वाढ्दिवस असेल तर पूर्ण टिम फूड कोर्टमध्ये जमते,एक दोन जण केक घेउन येतात आणि हॅप्पी बर्थडे टू यु च्या गजरात तो कापुन नंतर त्याच्या चेहर्‍याला फासतात. किंवा फासायला एक आणि खायला वेगळा केक असतो . मी काही या सेलिब्रेशनच्या विरोधात नाही.पण अन्नाची नासाडी का? हे सर्व थांबवायला किंवा निदान कमी करायला काय करता येइल ?

वाचने 26718
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

चिपळूणात ह्या विरुद्ध पाटी पाहिली. 'नको असल्यास आधीच सांगावे. ताटात अन्न टाकल्यास ५ रुपये दंड करण्यात येईल.' हे मला १० टक्के सवलत देण्यापेक्षा जास्त योग्य वाटतं. ताटात टाकणार्‍यांची संख्या तशी, न टाकणार्‍यांपेक्षा, कमी असते. त्यामुळे लोकांना शिस्त लावताना, सवलती पोटी, उपहारगृहाच्या मालकालाच भुर्दंड पडेल. शिवाय ह्यांनी आधीच १०% किमती वाढविलेल्या आहेत ( नाही तर कसे परवडते?) असा गैरसमज जनमानसात पसरू शकतो. त्यामुळे पदार्थांच्या किमती रास्त ठेवून अन्नाची नासाडी करणार्‍यास दंड आकारणे जास्त व्यवहार्य आणि नैतिक ठरेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

'तु नही तो और सही' म्हणणारे पण असतात. त्यामुळे दंडापेक्षा सवलतच गिरर्‍हाईकाला जास्त आकर्षीत करेल. शेवटी मालकाला हॉटेल चालवताना विचार तर करावाच लागेल ना काका.. (मला असं वाटतं.. बाकी पेठकर काकांचा (मालकांचा) एक्ष्पेरिएन्चे जास्तच आहे म्हणा..)

In reply to by यसवायजी

उपहारगृह उत्तम प्रकारे चालत असेल तर दंडाचेही कौतुक होते. न चालणार्‍या उपहारगृहाला सवलतीच्या कुबड्या घ्याव्या लागतात. दुर्वांकुराचे नांव नक्कीच मोठे आहे. ते कांही न चालणार्‍या उपहारगृहांपैकी नाही हे मी जाणतो. मी एक सर्वसामान्य नियम सांगितला आहे. तसेच, स्थानपरत्वेही उपहारगृह मालकांची धोरणे बदलत असावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

एक ग्राहक म्हणून मला दुर्वांकुरची पद्धत बरोबर वाटते. मी जेव्हा जागेवर बसतो तेव्हा मला माहिती असते की मला २०० रुपये द्यावे लागणार आहेत. त्यातले २० कमी झाले तर उत्तमच आहे. काही कारणाने मी ताट पुर्ण रिकामे नाही करु शकलो तर चूक माझी आहे आणि मी पुर्ण पैसे भरेन जे भरण्याची मानसिक तयारी मी आधीच केली आहे. एखाद्या माणसाला सवलत देण्याचा अधिकार उपहारगृहचालकाला नक्कीच आहे. शिक्षा देण्याचा नाही. जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील. शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल. मेनु कार्डावर, हॉटेलमध्ये आणि अगदी टेबलावर जरी ही दंडाची सूचना स्पष्टपणे लिहिली असेल तरी शेकडा दहा टक्के लोक आम्ही हे वाचलेच नाही अशी भूमिका घेइल्. अगदी त्याला हे स्प्ष्टपणे सांगितले जरी तरी त्याला हे ज्यादा आकार देणे अपमानास्पदच वाटेल. याउलट सवलत नाही मिळाली तर ठीक आहे म्हणून कोणीही सोडुन देइल. दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल. सवलत मिळवण्यावरुनही एक दोन जण कटकट करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ती संख्या खचितच कमी असेल.

In reply to by मृत्युन्जय

जर उपहारगृह चालक पोलिसाच्या भूमिकेत शिरला (दंड वगैरे) तर त्याची आणि गिर्‍हाइकांची भांडणे होतील.
'दंड केला जाईल' असे म्हंटले म्हणजे लगेच पोलीसाच्या भूमिकेत शिरला असे होत नाही. दंड भरला नाही तर लगेच ऊपहारगृहाने पाळलेलेल गुंड गिर्‍हाईकाला बदडून, उचलून बाहेर फेकून देत नाहीत. समजावून सांगितले जाते असे करू नका. हे गैर आहे. दंडापोटी रक्कम वसूल करणे हा उद्देश नसून पाटी पाहून अन्नाची नासाडी करणार्‍यांचे प्रमाण कमी व्हावे ही त्यामागील भावना आहे. पाटी लिहून ठेवली म्हणजे लगेच दंड वसूल केला जातो असे नाही. ह्या उलट सवलतीच्या फलकाच्या बाबतील अटीची पूर्तता करणार्‍या गिर्‍हाईकास सवलत ही द्यावीच लागेल. उपहारगृहात हात धुवायच्या जागीही 'केस विंचरू नयेत', 'नाक शिंकरु नये', 'घसा खाकरू नये', 'ताटात हात धुवू नयेत' वगैरे वगैरे सूचना फलक असतातच त्यापैकीच हा 'ताटात अन्न टाकले तर ५ रुपये दंड केला जाईल' एक फलक. दंड केलाच जाईल असे मला वाटत नाही. पण फलकाचा परिणाम नक्की होतो. (माझ्यावर तरी झाला होता) त्या मागिल भावना ओळखून गिर्‍हाईके समंजसपणा दाखवतात. आपल्याला हवे तेवढेच ताटात वाढून घेतात.
शिवाय ताटाचा दर जर १८० असेल तर जेवायला बसताना गिर्‍हाइकाची मानसिकता १८० भरण्याचीच असते. जर त्याला २०० रुपये भरण्याची सक्ती केली गेली तर तो आपसूक बिथरेल
दंडाची रक्क्म फक्त ५/- रुपये आहे. म्हणजे १८०/- भरायची मानसिकता असणार्‍याला खरोखर दंड वसूल करायचा म्हंटला तरी फक्त १८५/- रुपये खर्च येईल. शिवाय त्याची चूक त्याच्या पदरात घातल्यावर तो कांही कटकटही करणार नाही. उलट पुढच्या वेळी तो ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेल. सवलतीच्या धोरणात सर्वांनीच ताट साफ केले तर ते ताट प्रत्येकाला १६२/- रुपयाला पडेल. आणि तोच दर वाजवी आहे असे सिद्ध होईल (कारण १६२/- रुपयातही उपहारगृह मालकाला अपेक्षित फायदा आहेच) आणि १८०/- हा दर अवाजवी आहे असा समज गिर्‍हाईकांमध्ये पसरेल. (दुर्वांकूराचे दर मला माहित नाही. पण इतर उपहारगृहांपेक्षा नक्कीच १०% जास्त असतील असे मला वाटते आहे. असो.) अजून एक सवलत मला ठाऊक आहे. ती म्हणजे, 'होम डिलीव्हरी वर १०% सूट देण्यात येईल.' गिर्‍हाईकांनी ओसंडून वाहून जाणार्‍या उपहारगृहातील ही पाटी आहे. त्या मागील व्यवहार असा आहे की गिर्‍हाईकाने आपल्या घरी जेवण मागवले तर जे टेबल त्याने उपहारगृहात अडवून ठेवले असते ते मो़कळे राहून तिथे दूसरे गिर्‍हाईक बसू शकते आणि विक्री वाढते. इथे सूट दिल्याने कमी होणारा फायदा वाढीव विक्रीतून भरून निघतो त्यामुळे वाजवी किमतीच्या खाली दर लावण्याचे समर्थन होते. मूळ दर अवाजवी वाटत नाही.
दंडात्मक कारवाईने उपहारगृहातल्या कटकटी वाढतील. मॅनेजरला दुसरे काही काम नसल्यासारखे त्याला लोकांशी या पॉलिसीवरुन हुज्जत घालत बसावे लागेल.
असे कांही घडत असल्याचे मी तिथे असतानाच्या एका तासात जाणवले नाही. उलट त्या फलकाचे गिर्‍हाईकांकडून कौतुक होत असल्याचे दिसून आले. शिवाय फलकातील वेगळेपणामुळे ती एक 'बातमी' होऊन, बाहेर गेल्यावरही चर्चा होऊन (जशी इथे होत आहे) त्यामागच्या मूळ भावनेचा, अन्नाची नासाडी करू नये, प्रसार होण्यास मदत होत आहे.

मी स्वतः पुरत पहिले बघतो,जेवढ पाहिजे तेव्हढे घेणे आणि घेतले तेवढे संपवणे. माझ्या बरोबर कोणी जेवत असेल आणि ताटात काही टाकले की मोठा असेल तर आवडले नाही म्हणून सांगतो आणि बरोबरचा मित्र असेल तर सरळ लाज काढतो. एखाद्या पदार्थाची चव बिघडली असली तर मालकाला वाद घालून टेस्ट करायला लावतो. आधी तुझ काय जातय, मी पैसे देतो, कशाला शहाणपणा शिकवतो वेगॆरे व्हयाच पण आजकाल माझ्याबरोबर जेवणारे मित्र स्वतःहून संपवण्याचा प्रयत्न करतात आणि हसत/चेष्टेत का होईना सॉरी म्हणतात. जग एका दिवसात बनले नाही त्यामुळे बदल पण एका दिवसात होणार नाही

पुण्यातले दुर्वांकुरवाले मानकर जर ताटात काही टाकले नाही तर १०% सवलत देतात म्हणे बिलात. हा पण चांगला प्रयोग आहे.

In reply to by कपिलमुनी

सवलत नंतर सुरु झाली असावी (मी जाउन आल्या नन्तर)

जाड जालाय्सा.... देशात उपाशी बालके असताना अन्नाची ही नासाडि?

अन्न वाया गेले की फार मानसिक त्रास होतो. आग्रह करु करु खायला घालणार्‍या लोकांपासून लांब राहतो. मला आग्रहाचा त्रासही होतो व चीड ही आहे.

पूर्ण सह्मती.

पुर्वी वरपक्षाकडील चिमुरड्या पोरीचे ताट देखील स्वतंत्र पान म्हणून मोजावे लागायचे. हल्ली बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली आहे ते एक बर आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बुफे मुळे अन्नाची नासाडी कमी झाली अस फार दिसून येत नाही ,उलट पहिल्यांदाच जास्त नाही घेतले तर कांउटर बंद होईल आश्या पद्धतीने "भरगच्च" ताट घेऊन अत्य अल्पोहार करणारेच जास्त. आणी हे जर दाखवून दिले तर "तुझ्या @@@@चे टाकतोय का असा अविर्भाव" हमखास.

काही महाभाग बुफे मध्ये देखील अगदी भरमसाठ वाढून घेतात कारण काय कोण सारखं सारखं रांगेत उभे राहणार. आणि मग हेच अन्न मग सरळ टाकून देतात.

ना युद्ध चालूय ना म्हादुश्काळ. उणिव आहे ती फक्त व्यवस्थेची जी सर्वाकड़े अन्न विकत घेण्या इतपत पैसा वितरित करेल.... उगा वाया जाणारे अन्न वाचवून किती पोटे भरणार ? आज दान करालहि उद्या सुधा ते शक्य असेल का?

अग्निकोल्हा तुम्ही आजतक वर असता काय ! नाही म्हणजे तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात

एक किलो तांदूळ शेतात तयार होण्यासाठी ५००/७०० लिटर पाणी लागते. नेरळ येथील भडसावळे यांच्या "सगुणा बाग" येथे याविषयी सविस्तर माहिती मिळते. अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी लहानपणीच प्रबोधन होणे आवश्यक आहे. अलीकडेच कल्याण ला एका हॉटेलात पाटी पाहिली " Food is God do not waste it " असो देव म्हणून का होईना नासाडी थांबवण्याचे आवाहन आवडले या निमित्ताने एक श्लोक हि आठवला. वदनी कवल घेता नाम घ्या मातृ भू चे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषीवल क्रुशिकर्मि राबती दिन रात्र श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण होते चित्त होण्या विशाल ||

प्रकाश घाटपांडे यांचे नि माझे एवढे एकमत कसे होते कोणास ठाऊक. लग्नातला आग्रह ही तर तिडीक आणणारी गोष्ट आहे. त्यातही वराच्या किंवा वधूच्या लांबच्या नात्यातल्या नातेवाइकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. एका जवळच्या लग्नातली गोष्ट, लोकांची जेवणे आटोपत आली, पंगत उठायला लागली तेव्हा मुलीच्या वयोवृद्ध काकांना हुक्की आली. ते गुलाबजामाचे पातेले घेवून आले आणि ज्यांच्याशी ओळख पाळख नाही अशाही लोकांना आग्रहाने वाढायला लागले. एका तरुण मुलापाशी आले. त्याने जेवण संपवून पान अगदी स्वच्छ केले होते. तो एकच वाढा म्हणत असताना त्यांनी जास्त वाढले वर मखलाशी "माझं गणित कच्चय, एक म्हटलं की मी दोन वाढतो" तो तरुण मुलगा खवळलाच, "भांडाभांडी वादावादी सुरु झाली" ते आजोबा छोटं तोंड करुन माघारी निघून गेले...

In reply to by आशु जोग

आग्रह माझ्या शारिरिक व मानसिक प्रकृतीला मानवत नाही हे मी प्रथम स्पष्ट पणे व नम्र पणे सांगतो. तरीही काही लोक ऐकत नाही. मग मी आवडत नसताना आग्रह करणार्‍या लोकांकडे मी परत कधीही जात नाही असे स्पष्टपणे सांगतो. ऐकत नसलेल्या जुनाट लोकांवर मी " तुम्हाला वाढायच तेवढ तुम्ही वाढा मला जेवढ खायच तेवढ मी खाईन. अन्न वाया गेल्याचे पाप तुम्हाला लागेल." असे सांगतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हा असा अतिआग्रह एका मारवाडी मित्राच्या लग्नात झाला होता. जेवण तर एकदम गोड आणि तुपाळ. त्यात आम्ही मुलाकडचे असल्याने अतिआग्रह करुन वाढतच होते. कसेबसे संपवले. नवर्‍यामुलाची तर कीवच येत होती. जो तो येत होता आणि लाडू भरवून्(कोंबून) जात होता. बिचार्‍याच्या पोटाचे काय झाले असेल देव जाणे. आम्हीही त्याची बिकट परिस्थिती जाणून आहेरात हाजमोला दिला. :)

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी देखील असच करतो. ऐकत नाही म्हणजे काय? पाप पुण्याच्या निमित्ताने का होइना पण बरोबर ताळ्यावर येतात!

खरच आय टी कंपन्यांमधे खुपच नासाडि होते अन्नाचि . वाडपि पण बदा बदा वाधत जातो नको म्ह्ट्ल तरि.

यावर मी थोडा विचार केला होता …एक वेब साईट काढायची आणि तिथे गरजू संस्था आणि हॉटेल, मंगलकार्यालये यांना जोडायचे…अनेक नवीन कल्पना यात घालता येतील…कोणी वेब डेव्लोपर आणि मदत करायची इतरांची(तुम्हा सर्वांची) इच्छा असेल तर निश्चित प्रयोग करून बघू शकतो…!!!

In reply to by पुतळाचैतन्याचा

डेव्लोपर ये क्या होता है !