Skip to main content

रामसेतु

लेखक पुरणपोळी यांनी गुरुवार, 25/10/2007 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
रामसेतु वरुन वाद सुरू आहे.. करुणानिधिनी पातळी सोडली आहे.. ह्या विषयावर आपले काय मत आहे..

वाचने 34332
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

ओ हो तुम्हाला पण विचारल गेलं का मत.. पुढच्या वेळेला स्पष्ट करेन हं..कि फक्त स्वत:ची मते असलेल्यांनीच मत द्यावे..

In reply to by पुरणपोळी

का हो, माझे स्वतःचे मत नसणे हे एक प्रकारचे मत नाही का? - (संभ्रमित) आजानुकर्ण

म्हणजे सोडूनच देण्यासारखा आहे. मला काहीही नाही मत मांडायचे... कशाला उगिच राजकारणात शिरा? - प्राजु.

In reply to by प्राजु

या विषयावर आम्हाला काहीही मत मांडायचे नाही. कशाला उगीच राजकारणात शिरा, पोहे, ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्राजु

हो तू कोल्हापुरातच ठिक आहेस..

In reply to by पुरणपोळी

आनि तू दुधात कालवल्यावरच ठीक हायेस... ही ही ही (मटन भाकरी) खेडूत

या दोन्ही संकेतस्थळांवर फेरफटका मारा. मुबलक मते-मतांतरे वाचता येतील. ह्येच माजं मत!

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).

स्पष्टिकरण: ह्या विषयावर म्हणजे रामसेतुवर मत विचारले होते.. प्रशन : राजकरणा वर चर्चा जर नको असेल तर तो विषय का ठेवला आहे?

In reply to by पुरणपोळी

दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं? माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?

In reply to by विकेड बनी

उसने पूछा, "यह रामसेतू, रामसेतू क्या होता है... " मैने कहा, "ऐ बालक, यूं समझ राम से' तू हैं..." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

कोणी हि पुन्हा पुन्हा मत नाहि विचारलेलं... तुझ काहि मत नव्हतं तर आलास कशाला? दुसरी बरी काम नहित वाटत तुला..उचलली ( फुटकळ) जीभ आणि लावली टाळ्याला

In reply to by पुरणपोळी

पुरनपोळी कावली की वो!! करा बाबा चर्चा न्हाईतर जायाची रडत.. उं उं उं!!!! उगी उगी !!

ए बाबा गपगुमान म्होरं हो बिगिबिगि उगा टकूच फिरवू नगं

In reply to by पुरणपोळी

अग बाई.. पुरन पोळी जास्त तापू नकस गं करपून जाशील उगा! :-)))

तु काय डोक्यावर पडला होतास का? कारण नसताना उगाच वटवट करु नकोस

In reply to by पुरणपोळी

दादागिरी करतेस काय? तू दादाच असणार, उगीच भोळी पोळी बनत्येस. आता आणखी करपू नकोस, जळल्याचा वास येईल.

विचारतो आहेस का सांगतो आहेस? काय फरक पडतो , तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते अजून वेळ गेलेली नाहि गप्प बस आता

In reply to by पुरणपोळी

> तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते ...मला मधल्यामध्ये फुकट बदनाम कशाला करता?

आता वरील सर्व सदस्यांनी उपक्रम येथे जावून आमच्या प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेला हा दुवा वाचावा. उगाच काय बोचकारताय एकमेकांना? आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं

In reply to by धनंजय

...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

स्वतःची ओळख उघड केल्या बद्दल धन्यवाद

आम्हा दोघांनाच चर्चा करायची असेल, तर ती तुम्हा नीरस `बघ्या'समोर कशाला बरे करावी?

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे. राम नाम सत्य है! रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. सहमत. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

> (अर्जुनाचा शंख) हे 'अर्जुनाने केलेला शंख' अशा अर्थी घ्यावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-) अभिजित

In reply to by जुना अभिजित

युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

प्रत्येक जण शंख फुंकायचा का? श्रीकृष्णाकडेही शंख होता म्हणे... - (प्रश्नग्रस्त) आजानुकर्ण अवांतर युद्धाच्या वेळी शनिवारी रविवारी सुट्टी असायची का? वीकएंड वगैरे? - (वीकएंड प्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे. संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे. अभिजित

In reply to by जुना अभिजित

पाच पांडव व पांचजन्य यांचा काही संबंध आहे का? आणि सात दिवसांचा "आठ"वडा कसे काय? सातवडा का नाही? (शंकाखोर) आजानुकर्ण

In reply to by जुना अभिजित

पण महाभारतात ती मोडली आहे. प्रत्यक दिवशीच मोडली की काही दिवशी? जयद्रथाचा वध तर त्या टाईम प्लीज प्रकारातच केला होता की. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

हो ना! शिवाय लिंबूटिंबू अभिमन्यूला टपकवणे पण चुकीचे होते.

In reply to by जुना अभिजित

अभिजित, ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय? आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना.. ( सामान्यतः गोड) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्‍याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती. तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत. उघड्या मनाचा अभिजित (ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)

In reply to by पुरणपोळी

पुरणपोळे, तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्‍या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव. तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले. पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by पुरणपोळी

दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे. असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?

In reply to by पुरणपोळी

स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते. खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या. तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे. असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा). देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

देवद्त्त खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले.. म्हणजे ह्या "काहीही नाही प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) . या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण "" शेवटच्या नाहि माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?

In reply to by पुरणपोळी

चूकभूल द्यावि घ्यावि आजानुकर्णाचि प्रतिक्रिय होति ती.. ईतक्या आघाड्या सांभाळत आहे त्यामुळे जरा ईकडे तिकडे झाले. (खजिल) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल? पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर) बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

तेज, तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि

In reply to by पुरणपोळी

तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे
अगं पण तू नीट लिहायला शिक. उद्धट असं लिहितात.
ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि
चिडली चिडली पुपो चिडली! :))))) पुपो तापली आणि गटटरगुम फुगली. बरं! बरं! उत्तर देणार नाहीस तर प्रश्न मिटला. भांडण संपलं माझ्याकडून.

आता कोणी तरी थांबले पाहिजे असे वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी थांबलो. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

सगळं आपोआप इटालिक दिसतय की सोनियाच्या काड्यांचा चष्मा घातलाय मी? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

मिसळपाव खाताना त्याची मजा लुटूया.. हसा बघू आता सगळे जण...:)))))( हसा म्हणजे... हळूच बरं का..!) प्राजु.