Skip to main content

मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???

लेखक वेताळ यांनी शनिवार, 11/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .

वाचने 34420
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

रजा अ‍ॅकेडमी चा ह्या मोर्च्यात पुढाकार होता. जगताप आणी गांगुर्डे नावाच्या दोन पोलिस अधिकार्याना ठेचून मारणारी हीच ती भिवंडीतली धर्मांध रजा एकेडमी. मुस्लिम तरुणांची माथी भडकवून त्याना बांग्लादेशी घुस्खोरांच्या बाजूने दगडफेक करण्यास प्रव्रुत्त करणार्‍या रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ?

In reply to by राजघराणं

रजा एकेडमी विरुद्ध राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ? त्यांची आई पण धर्मनिरपेक्ष? आहे अस म्हनतात की त्यांना अतिरेकी मेल्यावर रडु येतय.{ठाकरे म्हणतात तेच खर अनौरस च

In reply to by राजघराणं

प्रतिसाद पहिल्या पानावर यावा म्हणून घुसखोरी करतोय... क्षमस्व! ही म.टा.तली बातमी वाचून मन भरून आलं. डोळे पाणावले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (२६ / ११चा हल्ला) सूत्रधार अबू जुंदाल याला कसाब प्रमाणेच जेलमध्ये दररोज चिकन-मटणाची मेजवानी मिळत आहे. अबूच्या संरक्षणाची आणि दररोज संध्याकाळी रोजा सोडताना त्याला जेवण वाढण्याची जबाबदारी जेलमध्ये कार्यरत पोलिसांकडेच सोपवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने २००९ मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या आर्थर रोड जेलचे जेवण नाकारले होते. त्याने जेल कर्मचा-यांकडे बिर्याणी, भेजा फ्राय आणि मलई मागितली होती. रमझान सुरू असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, असा विचार करुन पोलिसांनी कसाब प्रमाणेच अबू जुंदालसाठी मेजवानीची व्यवस्था केली आहे. अबूला दररोज एक लिटर दूध, एक किलो सुका मेवा, एक ग्रॅम मलई, एक प्लेट भेजा फ्राय, एक पीस चिकन रोल, एक प्लेट कबाब देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त त्याला समोसा, मालपोवा, फिरनी आदी गोडधोड खाऊ घातले जात आहे. एटीएसच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे वृत्त मिड डे या इंग्रजी सायंदैनिकाने दिले आहे. जेलच्या नियमांनुसार, कोणत्याही कैद्याला दररोज सकाळी सात वाजता उपमा किंवा पोहे आणि चहा किंवा दूध नाश्ता म्हणून देण्यात येते. त्यानंतर दहा वाजता आमटी, भात, भाजी, चपाती असे जेवण दिले जाते. दुपारी साडेतीन वाजता पुन्हा असेच जेवण दिले जाते. या व्यवस्थेत वैद्यकीय कारण आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय बदल केला जात नाही. मात्र आधी कसाब आणि आता अबू जुंदालला मात्र विशेष वागणूक दिली जात आहे. अबू मूळचा बीडचा रहिवासी आहे. त्याला अती तिखट जेवण आवडत नाही. त्यामुळे त्याच्या जेवणाची व्यवस्था खास मुस्लिम वस्तीतल्या विशिष्ट हॉटेलमधून होत असल्याचे समजते. अबूच्या जेवणासाठी दररोज ५०० ते एक हजार रुपयांचा खर्च केला जात आहे. पाकिस्तानमधून आयएसआय आणि लष्कर - ए - तोयबाच्या सहकार्याने २६ / ११च्या हल्ल्याचे सूत्रसंचालन करणा - या अबू जुंदालला सरकारने जूनमध्ये सौदीमधून हस्तांतरण करारांतर्गत ताब्यात घेतले आहे . सध्या तो मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये आहे . अलिकडेच पोलिसांनी कसाब आणि अबू यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली होती, असेही एटीएसच्या अधिका-याने सांगितले.

In reply to by आंबोळी

मी पण आत्ताच ही धक्कादायक बातमी वाचली म.टा वर. त्या बातमीची खालील लिंक पाहा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms

In reply to by अमोल खरे

रोजचा जेवणाचा खर्च ५०० ते १०००???? भान*द मी हित पोटाला चिमटा घेउन कर भरतोय आणि माझ्या पैशाने हा भोस*चा माझ्याच देशात अतिरेक्यांना मदत करून भेजा फ्राय, चिकन-मटण आणि मलयी ओरपतोय.... का? तर हा ...... खरच मेरा भारत महान!!!

आसाम आणि म्यानमारमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी शनिवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची गर्दी जमत होती. सायंकाळी चारच्या सुमारास हा सुमारे १० हजाराच्या या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली.
-मटा यात कोणत्या धर्मनिरपेक्ष पक्षाचा उल्लेख आहे ब्वॉ?? ज्या दोन संघटनांचा उल्लेख आहे, त्या नावावरून तरी धर्मनिरपेक्ष वाटत नाहीत. की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष?

In reply to by तुषार काळभोर

की अहिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष? बरोब्बर बॉस. फक्त ते प्रश्नचिन्ह काढुन टाका. ज्यांना हिंदुंवर टिका करायला जाम मजा येते ते हिंदु सुद्धा धर्मनिरपेक्ष ह्या व्याख्येत येतात ह्याची नोंद घ्यावी.

In reply to by अमोल खरे

आता आपल्याच बोटचेपेपणामुळे आपल्याच घरात घुसखोरी करणार्यांविरुध्द काही करायची सोडाच, बोलायचीपण चोरी झाली आहे.. या आणि मारा..

हे कधितरी होणारच आहे हे माहित होतं... पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नाहि. माझ्या प्रीय भारतीयांनो... युद्ध औपचरीरित्या सुरु झालय बहुतेक... आणि एक समाज म्हणुन आपली जशी तयारी हवी होती, ति झालि नहिए... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

युद्ध किती तरी शतके आधीच सुरु झाले होते... तयारी मागे पण नव्हती, आज नाही आणि उद्या नसेल. फक्त भुतकाळात आपण युद्ध आहे हे निदान मान्य करत होतो आज ते मान्य करण्याची आपली तयारी नाही. उद्या समाज म्हणून आपण विचार करायला असू की नसू हे नक्की सांगता येत नाही.

In reply to by नाना चेंगट

युद्ध फार पुर्वीच सुरु झालय हे खरय. पण रायगडी (निर्वीवाद) आणि १९४७ ला दिल्लीत (थोडं वादग्रस्त) विजय मिळवला होता आपण. त्यानंतर युद्ध एका वेगळ्या स्वरुपात कंटिन्यु झालं... आणि त्याची तयारी म्हणावी तशी झाली नाहि अजुन :( अर्धवटराव

आपल्या धर्मनिरपेक्ष देशात आजच एका धर्मनिरपेक्ष पक्षाचा एक धर्मनिरपेक्ष नेता देशाचा (सलग दुसऱ्यांदा) उपराष्ट्रपती झाला म्हणून अभिनंदनपर सभा जमली होती. काही उत्साही लोकांनी उगीच आपले गम्मत म्हणून थोडेसे फटाके फोडले. आता त्यात काही जणांना दुखापती झाल्या, काही जण खपले, (भले ते पोलीस का असेनात?) बऱ्याच गाड्यांची वाट लागली, (त्या गाड्या पोलिसांच्या, प्रसारमाध्यमांच्या आणि अग्निशमन दलाच्या का असेनात?) तरी अश्या घटना घडायच्याच... मात्र हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रसारमाध्यमांनी त्याला लगेच धार्मिक रंग दिला. हिंदुत्ववाद्यांच्या अंकित असलेल्या पोलिसांनीही त्याला दंग्याचे स्वरूप दिले. याबद्दल हिंदुत्ववाद्यांचा निषेध...

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. :(

In reply to by पिंगू

च्यायला ह्या रझा अकादमी आणि ज्या कोणत्या तथाकथित संघटना आहेत, त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पोलीसांना अधिकार का दिले जात नाहीत? त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळूनसुद्धा.. Sad
पोलिसांचा "बाप" तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचा असल्यामुळे. आता बघा निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड आणि जनार्दन चांदूरकर (काँग्रेसला या दगडापेक्षा कोणी चांगला प्रवक्ता मिळत नाही काय?) आपल्याला पटवून देतील की या प्रकरणात सुद्धा हिंदू ग्रुप्स कसे अपराधी आहेत ते.

अहो अश्या घटना होताच असतात. म्हणून सगळ्या समाजाला का दोष द्यायचा ? प्रतिगामी कुठले ! अधोगामीच !

ह्या मुसलमानांना व्होटबँकेमुळे अति डोक्यावर बसवुन ठेवलंय. हरामखोर काँग्रेस नेते अन हे असले ग्रुप्स मिळुन देशाचं अफगाणिस्तान करणार दुसरं काही नाही.

फारच भयानक.... त्यांनी तर अमर जवान’ स्मृतिस्तंभाचीही नासधूस केली. १८५७ च्या शहिदांचा अपमान आहे हा. जे या देशालाच मानत नाही त्यांनी या देशात राहूच नये.

काल ओवेसीने लोकसभेत जे भाषण केले त्यात त्याने सरळ सरळ धमकीच दिली होती की मुस्लिम तरूणांचे तिसरे रॅडिकलाय़एशन होईल. त्याला टाईम्स नाऊ वरही बोलवले होते. पण त्याने त्याचे वाक्य मागे घ्यायला नकार दिला व लगेच ही दंगल.....काहितरी शिजते आहे हे खरे....

रमझान हा मुस्लिम बांधवांकरता एक सर्वश्रेष्ठ महिना आहे. तमाम बांधव एकत्र येतात. भाईचार्‍याचा पैगाम पसरवतात. अशा वेळी देश, राज्यांच्या सीमा गळून पडणे स्वाभाविकच आहे. (तसेही ह्या देशात जन्माला आलेले लोक योगायोगानेच आलेत. त्यांनी त्या करता अल्लाच्या दरबारी विशेष प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. ) ह्याच कारणाने त्यांना काल आसाम, बांगला व म्यानमारमधील भावा आणि बहिणीबद्दल भावना दाटून आल्या. आपण खरे तर ह्यातून विश्वप्रेम शिकले पाहिजे. ज्ञानेश्वरांचा महान संदेश हे भाईजन आचरणार आणत आहेत ह्याबद्दल त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावावी. जेव्हा मुस्लिम जनसागर आपल्या भावना व्यक्त करायला जमतो तेव्हा त्या लोटाला गवसणी घालणे मूर्खपणाचे आहे. त्यांना रेल्वे, बस, कार, जी वाहने उपलब्ध करून देता येतील ती फुकट द्यावीत. त्यांच्या संचलनाच्या, आंदोलनाच्या मार्गावरील लोकांनी आपापले व्यवहार त्या दिवसापुरते बंद ठेवावेत. तेव्हढा त्याग करणे जड नाही. वाटले तर त्याकरता सरकारकडून योग्य तितकी भरपाई घ्यावी. मुस्लिम बांधव तुमच्या बरोबर आहेतच. आणि मुख्य मुद्दा हा पोलिसांचा. जेव्हा जनभावना उचंबळून आलेल्या असतात तेव्हा त्यांना डिवचणारा, कायद्याचा अनाठायी धाक दाखवणारा पोलिसाचा पोषाख दिसताच कामा नये. पोलिसांची उपस्थिती दिसल्यामुळेच त्यातील काही हळवे लोक जास्त हळवे झाले हे कालच्या घटनांवरून दिसतेच आहे. तेव्हा पोलिसांना मंत्र्याच्या, सचिवांच्या दिमतीला पाठवावे. मुस्लिम मोर्चाच्या आसपास पोलिस दिसू नयेत. बिगर मुस्लिम लोकांना अल्लातालाच्या मेहरबानीचा लाभ होणार नाहीच. पण रमझानच्या पवित्र काळात असले आततायी वागून जहन्नम मधे होणारे आपले हाल, अत्याचार अधिक वाढवू नयेत. उलट असल्या आंदोलनांना आपल्या परीने मदद करून दीन ची मदत करावी. कुणी सांगावे दयाळू परवरदिगार तुम्हाला माफ करेलही!

In reply to by हुप्प्या

आजच्या लोकसत्तात दंगलीसंदर्भात एक बातमी आहे, शिंदेचा कठोर कारवाईचा इशारा, पण अफवा पसरवण्यांवर! :)

In reply to by हुप्प्या

नाही हो, त्यांना जहन्नुममध्ये जाण्याची भीती वाटली असेल. त्यामुळे हे जे काही 'व्यक्त होणं' होतं त्याबद्दल अफवा पसवणार्‍यांवर कारवाई करण्याबद्दल बोलले असावेत ते. देव करो असे सगळे संस्कारी आणि पापभिरु नेते लवकर जन्नतमध्ये जावोत. स्वर्गात जाण्यासाठी फार खडतर परिश्रम करावे लागतात म्हणे. कैलास आणि वैकुंठ ही त्यापुढची गोष्ट असते असं ऐकून आहे. अनुभव नसताना उगाच काही का बोला, नै का !!

मी मागे एका संस्थळावर ह्या संबंधात लिहिले होते. नुसते खरे होत नाही तर जरा लवकरच हे खरे होत आहे मला वाटले होते २०२० पासून हे सगळे सुरु होईल ज्यात लोकसंख्या डेन्सिटी वर लिहिले होते इंग्रजी मध्ये असल्या कारणाने लिंक देत आहे THE BANE OF POPULATION

शाकाहारी - मांसाहारी , बै - बुवा , निवासी अनिवासी , आस्तिक नास्तिक, बामन - बहुजन , इत्यादी इत्यादी वादात संस्थळांवर एकमेकांच्या उरावर बसणारे.. आज एकत्र हिंदू मधे convert होउन मुस्लिमान विरुद्ध बोलताना पाहून मौज वाटली उद्या भारतावर कुण्या अमेरिकेने य्द्ध केल्यास " हीच जनता 'भारतात ' बदलून " एकत्र येऊन लढा देईल .. परवा कुणी एलिअन ने "हमला" केल्यास " अक्ख जग एकत्र " येईल... तेंव्हा वरील वाद कुणास सुचणार नाहीत.. असो यावरून तरी कुणी बोध घेतल्यास ठीक.. नाहीतर आहेच परत येरे माझ्या मागल्या बाकी कुणी कसे वागावे .. निरीक्षण वेग्रे ... हॅ हॅ....

"मुसलमानांनी दंगल केली" असे सरळ सरळ का लिहिले नाही ? ? एरवी संघ, सनातन , हिंदू जनजागृती, भगवा दहशतवाद म्हणून बोंबा मारणारे सगळेजण तो दंगा "अल्पसंख्यांकांनी" केला असे मुळमुळीत का लिहितात ? सामनाचे आजचे टायटल भारी आहे "धर्मांध मुसलमानांनी केला जिहाद" !

In reply to by अँग्री बर्ड

बरोबर आहे. आता अल्पसंख्यांक कोण हा शोधाचा विषय आहे. दंगेखोर नेहमी मुसलमानच का असतात ? पुन्हा असं कै म्हंटलं की "धर्मनिरपेक्ष" लोकांना त्यांच्यासाठी पान्हा फुटतो.

तिस्ता सेटलवाड , महेश भट , शबाना आजमी , प्रभृतींची मते - हलकासा निषेध वगैरे वाचण्यास उत्सुक ! त्यांच्या "सहित" - आपले क्लिंटनजी काय म्हणतात ते ही !

In reply to by तर्री

अशा प्रसंगी हलकाफुलका निषेध करणारी मिपा जमात अनुपस्थित आहे. रेल्वेचा गोंधळ झाल्यावर टीसी मंडळी गायब होतात तसेच ! त्यामुळे माझ्या अल्पमतीने मी त्यांची उणीव भरून काढतो. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एखाद्या प्रसंगाचे भडक वर्णन ऐकून त्यावर आपले मत बनवणे तितकेसे योग्य वाटत नाही. तशात जालावर उलट सुलट मते, दावे व्यक्त होत आहेत. त्यामुळे असमंजस दूर झाला तर पहावे म्हणून माझा प्रतिसाद टंकतो आहे. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की केवळ योगायोगाने भारतात जन्मलो आणि तोही बहुसंख्य हिंदू धर्मात म्हणून मी त्याची बांधिलकी मानावी असे मला बंधनकारक वाटत नाही. कारण त्याकरता काही विशेष प्रयत्न केल्याचे मला स्मरत नाही. त्यापेक्षा माझ्या उच्च शिक्षण संस्थेचा मला जास्त अभिमान आहे हिंदू धर्मातील इतक्या त्रुटी पाहिल्या आहेत की आता बाकी कुठल्या धर्माचे काहीच खटकेनासे झालेले आहे. असो. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रसंगाबद्दल इतकेच म्हणता येईल की असे प्रकार भविष्यात होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे जे झाले ते काही बदलता येत नाही त्यामुळे त्यामागे कोण आहेत वगैरे वायफळ चर्चा करू नयेत. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. याच अनुषंगाने प्रसिद्ध म्यानेजमेंट गुरु डॉ. अनिर्बाण घोष ह्यांचा एक लेख वाचल्याचे स्मरते. रमजानच्या काळात कुठलीही हिंसक वा भडक वक्तव्ये करण्यास मनाई आहे. आणि हा अतिशय प्राचीन, आवर्जून जपलेला नियम आहे. कालच्या घटनेतील तथाकथित अल्पसंख्य लोकांचे वागणे याच्याशी विसंगत होते. आणि त्यामुळेच असे म्हणायला जागा आहे की कुठेतरी पाणी मुरते आहे. हिंदू बहुसंख्य असणारी प्रसारमाध्यमे कित्येकदा नको इतके धर्मप्रेम दाखवतात. उत्साहाच्या भरात आसाम वा म्यानमार ह्या ठिकाणच्या बातम्या एकांगीपणे छापतात. यानेही समाजात तेढ निर्माण होऊ शकते. पत्रकारितेतील सामंजस्य टिकवायची जबाबदारी आजचे पत्रकार गंभीरपणे पार पाडत नाहीत. त्यामुळेही असे प्रसंग घडत असतील. अशा प्रसंगी गृहमंत्री मग ते राज्याचे असोत वा देशाचे. यांचेच ऐकावे. पत्रकार, बातम्यांकडे साफ दुर्लक्ष करावे असे मला वाटते. थोडक्यात आजच यावर काही मत करणे गैर आहे. पूर्ण, हवी तशी माहिती मिळाल्यावरच, योग्य तो पक्ष दोषी आहे हे कळल्यावरच त्यावर मत देता येईल. माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये.

In reply to by हुप्प्या

खास करुन "माध्यमांची राईचा पर्वत करायची वृती विसरु नये." (देशाचे, समाजाचे राई राई एव्हढे तुकडे पडले तरी विषेश नाहि... तसंही भारत हा काहि देश नव्हता आणि हिंदु नावाचा कुठला धर्म देखील नाहि. उगाच या कडबोळ्यांची काळजी का करावी...) अर्धवटराव

दार उघड बया दार उघड!

गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. मुंबईत ज्या रितीने राझा अॅकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे. वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे? http://rashtrarpan.blogspot.in/2010/12/bane-of-population.html

अप-डाऊनच्या दिवसातली गोष्ट आठवली. आमच्यातले एक सहप्रवासी ती सांगत असत. त्यांच्या गो ष्टी ऐकायला आसपासच्या डब्यातले लोक येऊन गर्दी करत. एका ब्रिटिशकालीन घरांत एक कुटुंब रहात होते. मरताना बापाने वडीलभावास उपदेश केला की कोणत्याही परिस्थितीत तू धाकट्याला अंतर देऊ नकोस. बाप मेल्यावर धाकटा लगेचच वाटणी मागू लागला. वडीलभावाने घरातच दोन भाग केले. स्वयंपाकघर मात्र एकच होते. पुढे दोन्ही भावांची लग्ने झाली. धाकटा सारखाच काहीतरी मागत असे. मोठा ते देऊन टाकत असे. मोठ्याची बायको यावर खूपच नाराज होती. पण मोठ्याचे धाकट्यावर अतोनात प्रेम! धाकटा मग आणखी खोल्या मागू लागला. त्याही दिल्या गेल्या. शेवटी तर हद्दच झाली. धाकट्याने मोठ्याच्या बायकोवरच हक्क सांगितला. मोठा डोकं धरुन बसला. त्याची बायको संतापून म्हणाली," आता तरी तुम्ही तुमचा षंढपणा सोडणार आहात की नाही "? मोठा तसाच बसून राहिला. मोठ्याच्या बायकोचा संयम सुटला. तिने गांवपंचायत बोलावली. पंचायतीने निवाडा दिला. मोठा या मागणीवर हरकत घेणार नसेल तर आम्ही काही करु शकत नाही. मोठ्याची बायको रडू लागली. दु:खातिरेकाने केस उपटू लागली. एवढेच बोलून आमचे मित्र ही गोष्ट आटोपती घेत. नवीन श्रोते उत्सुकतेने विचारत, 'मग पुढे काय झाले?" त्यावर आमचे मित्र म्हणत," त्याचा निवाडा आता तुम्हीच करायचा आहे." श्रोते उद्विग्न मनःस्थितीत काढता पाय घेत.

प्रतिसादाची जागा चुकली म्हणून का. टा. आ. आ.

काल मी सकाळीच आझाद मैदानाच्या बस स्टॉपवर उभा होतो,मोठ्या संख्येने मुस्लीम लोक तिथे येत होते,परंतु नंतर तिथे असे काही घडेल असे वाटले नव्हते ! हे सगळे दाढ्या कुरवाळण्याचे परिणाम ! भोगा आता तुमच्या कर्माची फळ ! अफजलखानाचा कोथळा काढण्याचे पोस्टर जिथे उभे राहु शकत नाही ! त्या शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची काय दशा झाली आहे ते ! नुसते पुतळा उभारुन उभारुन राज्यात शिवराज्य नसतं हे दिसुन आल... देशात घुसखोरी करुन जवळपास अडीच लाख नागरिकांना (आसाम मधील) बेघर करणार्‍यांबद्धल यांची ममत्व दाखवण्याची हिम्मतच कशी झाली ? कारण आपण दाढी कुरवाळत राहिलो ! महिला पोलिसांचा विनयभंग जिथे झाला त्या राज्यात कायद्याची अवस्था कशी झाली आहे, ते तुम्हीच सांगा आता ! :(

भारत हा देश चर्चा करण्यासाठी आणि वाद विवादातही एक पातळी राखून बोलण्यासाठी आहे. अनेकदा सांगूनही काही नागरिक जातीय मोर्चे काढतात असे दिसून येतेय. भारतात कुठल्याही जाती, धर्म, पंथ आदींवर नकारात्मक टीका करण्यास मनाई आहे. ज्यांना हा नियम मान्य नाही. त्यांनी यापुढे भारतात राहण्याची तसदी घेऊ नये ही विनंती. भारत केवळ भारतिय लोकांसाठी आहे. भारतिय म्हणून रहाणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या धर्माचा अभिमान मिरवणार्‍यांनी इकडे येऊच नये. तसेच कुणा एका धर्माचा द्वेश करणार्‍यांनी सुध्दा येऊ नये. - मिसळमोहन सिंग

शांततामय राहणार असेल तर, मोर्चा काढण्यात as such गैर काहीही नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, दंगल घडविण्याच्या हेतूनेच मोर्चा काढला गेला होता. हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांवर येते. दंगल प्रकरणी २३ जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. तेव्हा पुढे काय कारवाई होते ते पाहणे श्रेयस्कर. त्या दृष्टीने राज ठाकरे यांचे वक्तव्य योग्य म्हणावे लागेल. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15455950.cms

In reply to by सुनील

हे उघडच इंटेलिजन्स फेल्युअर आहे. ??? कदाचित नसेलही .... ज्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास प्रतिबंध केला त्यांचे काय? ----------------------------------------- स्वाक्षरी बनवण्यास टाकली आहे.

In reply to by सुनील

मुंबईतल्या हिंसाचाराचा निषेध. मॉब मेंटॅलिटी किती विध्वंसक होऊ शकते हे दिसून आलं. Imagine there's no countries It isn't hard to do Nothing to kill or die for And no religion too Imagine all the people living life in peace...

थोडक्यात दिलेल्या मजकुराचा धागा आणि बर्‍याच उपरोधिक प्रतिक्रिया वाचल्या. उपरोध समजला. मुस्लिमधार्जिणं वर्तन आपल्या सरकारी यंत्रणेचं / राजकारण्यांचं असतं हे प्रतिसादांतून कळलं. हिंदूंचं अशा बाबतीत विरोधाचं धोरण बोटचेपं असतं हेही अधोरेखित झालं. आता ... अशा वेळी इन गिव्हन कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, कोणत्या प्रकारे परिस्थिती अधिक चांगल्या रितीने हाताळायला हवी होती आणि यापुढे आता कोणी काय अ‍ॅक्शन्स घेतल्या (या केसशी संबंधित आणि भविष्यासाठी अधिक जनरल उच्चस्तरीय पातळीवर) तर ते न्याय्य / योग्य / उचित ठरेल हे बिनउपरोधिक वक्तव्याने सांगता येईल का?

In reply to by मृत्युन्जय

हॅ हॅ हॅ. आम्हाला कसलेही मोड आलेले नाहीत. @ मृत्युंजय.. बघितलंस, उपरोधिक नको म्हणून विनंती केलीय ना.... ? वर मी एका शब्दानेही कसलाच "विचार" मांडलेला नसून उपरोध सोडून थेट भाषेत सांगावं की वस्तुनिष्ठरित्या अशा वेळी आणि पुढे काय करायला हवं? असा ओपन एंडेड प्रश्न विचारला तरी विचारवंताचा आरोप आलाच की..

In reply to by गवि

ओक्के. म्ग सरळ उत्तर असे आहे की त्या जमावाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. त्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडे होते, त्यांनी अमर जवान स्मारक तोडले. हा जमाव नक्कीच देशद्रोही होता. अश्या लोकांना तत्काळ गोळ्या घालुन ठार करणे सयुक्तिक होते. पुढे काय करायला हवे? १. मायनोरिटीचे लांगुलचालन कमी केले पाहिजे. २. देशद्रोह्यांना अश्या परिस्थितीत बघताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले पाहिजेत. ३. धर्माधिष्ठीत संस्थांना मेळावे भरवण्यास मनाई केली पाहिजे. ४. रझा अकादमीच्या नेत्यांना प्रथम गोळ्या घातल्या पाख्यमंत्रे ५. देशद्रोह हा सर्वोच्च पातळीवरचा गुन्हा ठरवला पाहिजे आणि त्यासाठी वेगळी जलदगती न्यायालये हवीत आणि किमान शिक्षा फाशी असली पाहिजे.

In reply to by मृत्युन्जय

सरळसोट उत्तराबद्दल धन्यवाद. म्हणणं मान्य आहे असं नव्हे पण ते स्पष्ट आहे हे महत्वाचं. मुद्दा क्रमांक १ सोडला तर इतर मुद्दे स्पष्ट अ‍ॅक्शनेबल दाखवतात. बरोबर किंवा चूक असले तरी स्पष्ट मुद्दे असणं आवश्यक.. मी खरोखर प्रामाणिकपणे मतं जाणण्यासाठी विचारलं होतं. मला खास सेक्युलरप्रेम आहे किंवा हिंदूअ‍ॅलर्जी आहे किंवा केवळ बॅलन्स्ड प्रतिक्रियांसाठी मुळमुळीत बोलणं मान्य आहे असं मुळीच नव्हे. अगदी "मानवधर्म" हाही एक आडमुठा धर्मच आहे असं मी मानतो.

In reply to by गवि

आता परीस्थीती कशी हाताळायची याचा उहापोह करण्यापेक्षा शिक्षा काय केली पाहीजे हे ठरवणं जास्त महत्वाचं. लोकसत्तात वाचलं की ठरवुन दंगल घडवली...रझा अकादमी, कुर्ल्याची अजुन एक संस्था वगैरे दोषी आढळलेत. १) त्यांच्याकडुन जी काय जाळपोळ झाल्याने नुकसान झालंय त्याची भरपाई घ्यायची. २) जे लोकं पकडलेत त्यांच्यावर - जर भारतीय नागरीक आहेत हे सिद्ध झालं तर - देशद्रोह केल्याबद्दल काय ती शिक्षा द्यायची ३) महीला पोलिसांचा विनयभंग करणार्‍यांना महीला पोलिसांच्या ताब्यात देउन त्यांचं ढुंगण फुटेपर्यंत फोडुन काढायचं असं माझं मत...पण ते कायद्याने शक्य नाही म्हणुन जे काय शक्य आहे ते करावं ४)उगाच "आम्ही शांततामय मोर्चा काढला पण कुठुनसे लोकं आले अन दगडफेक केली" वगैरे भंपकपणा सुरु केला तर त्या मौलव्यांना सरळ पोलिसी कामकाजात दखल देतात म्हणुन आत टाकुन द्यायचं...हाच न्याय त्या सेटलवाडसारख्यांना पण लागु करायचा. पण यातलं काहीही होणार नाही त्यामुळे काँग्रेसला अन मुसलमानांना शिव्या देण्याखेरीज काही करु शकत नाही.

In reply to by शिल्पा ब

>> ४)उगाच "आम्ही शांततामय मोर्चा काढला पण कुठुनसे लोकं आले अन दगडफेक केली" वगैरे भंपकपणा सुरु केला ४)उगाच "आम्ही शांततामय रथयात्रा काढली पण कुठुनसे लोकं आले अन बाबरी मशीद तोडली" वगैरे भंपकपणा सुरु केला तर काय करायचे ते पण सांगून टाका.

In reply to by daredevils99

कैच्याकै तुलना ! जरा दाढ्या कुरवाळण्यापलिकडे विचार करायचा प्रयत्न करा. बाकी - ये तो सिर्फ झांकी है काशी मथुरा बाकी है असं म्हणुन तुमच्यासारख्या दाढी कुरवाळणार्‍या अन दाढीवाल्यांच्या पण बथ्थड डोक्यात काही जात नसेल तर गुर्‍हाळ चालु द्या. अजुन एक : आमचा बाबरी - बाबर या मोगलाची मशीद - तोडली याला हरकत नाही अन बाकीविषयी वर उत्तर आहेच. हे एक झालं - बाकी मुद्यांवर बरोब्बर तोंड बंद ठेवलं

In reply to by शिल्पा ब

हे एक झालं - बाकी मुद्यांवर बरोब्बर तोंड बंद ठेवलं बाकीचे नंतर बघू. पण हा मुद्दा भंपकपणाचा होता हे मान्य आहे तर :)

In reply to by daredevils99

१. अयोध्येचे राममंदिर होणे आवश्यकच होते कोणत्याही मार्गाने ते झाले. हिंदूंची बळकावलेली जागा हिंदूंनी परत घेतली त्यात काहीही गैर नाही. २. सरकार मुसलमानांसमोर शेपूट घालते हि वस्तुस्थिती आहे. मोदिंनी दाखवलेले धैर्य, कडकपणा आपल्या सरकारने दाखवला पाहीजे. ३. शेवटी राष्ट्राशी निष्ठा असणारे देशप्रेमी लोक इथे राहणार का मक्केशी निष्ठा राखणारे मुसलमान याचा फैसला एक ना एक दिवस झालाच पाहीजे. मग त्यासाठी पडेल तो खर्च.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

:)) :)) :)) माझा मुद्दा भंपकपणा बद्दल होता. बाबरी मसजीद पडल्यावर आनंद व्यक्त करण्याऐवजी हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खाचा दिवस होता असे म्हणणे हे भंपकपणाचेच आहे. बाकी तुमचे चालू द्या

In reply to by daredevils99

शिवाजी महाराजांनी अफजल खानाला लिहीलेल्या पत्रांमधे आपण स्वतः फार घाबरलेले आहोत, खानसाहेब आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्याना घाबरून आम्ही प्रतापगडावर जाऊन बसलो आहोत तेव्हा खानसाहेबानी कृपा करून आम्हाला भेटायला इकडेच यावे असे लिहीले होते. खान जावळीत आला आणि सोलला गेला. त्यामुळे शिवाजी महाराजाना भंपक म्हणायचे का? मी तर म्हणेन तो हुतात्मास्मारक फोडणारा मुसलमान जो होता त्याच्या घरी मुसलमानी वेष घेऊन जावे. त्याला हुतात्मा स्मारक फोडल्याबद्द्ल त्याचे अभिनंदन करावे, तू कौमसाठी किती मोठे काम केलेस असे म्हणावे, त्याच्या घरी इफ्तार करावा, जेव्हा सदर कृत्य त्या मुसलमानाने केले हे पक्के होईल तेव्हा त्याला सिगरेट पिण्यासाठी बाहेर आणून आपणच पानातून वगैरे विष घालून मारावा. परत तो मरून पडेल तेव्हा आपणच मोठ्या मोठ्याने शोक करावा "अरे अपराधी असला म्हणून काय झालं? त्याल शिक्षा द्यायला कायदा आहे ना!" असे जे सगळे त्या दिवशीच्या कटात सामील असलेले २-३ हजार होते त्याना टिपून टिपून मारावे. मग त्याला उजाडमतवादी भंपकपणा का म्हणेनात? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15484890.cms अशा भंपक देशात भंपकपणाचा प्रतिकार भंपकपणानेच करावा.

१. "बळाचा वापर केला तर जमाव अजुन प्रक्षुब्ध होइल या भितीने बळाचा वापर केला नाही" असे साक्षात मुंबैच्या पोलिस कमिशनरचे वक्तव्य आहे. या माणसाने असे वक्यव्य केल्यानंतर ताबडतोब राजीनामा का दिला नाही हे कळाले नाही. अमर जवान स्मारक फोडले महिला पोलिसांचा विनयभंग केला ५० गाड्या जाळल्या वार्ताहारांना बेदम मारहाण केली पोलिसांना धुतला पोलिसांची शस्त्रे पळवली सामान्य लोकांना जखमी केले यानंतर अजुन नक्की काय केले असते म्हणजे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे आणि बळाचा वापर केला गेला पाहिजे असे माननीय कमिशनर साहेबांना वाटले? ज्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला त्यात कदाचित कमिशनर साहेबांची कोणी नातेवाईक नव्हती. असली असती तर कमिशनर साहेबांनी असाच धीरोदात्त संयम दाखवला असता काय हे जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे. २. टीव्हीवर बातम्यांमध्ये आणि नंतर वर्तमानपत्रातही दंगेखोरांचा आकडा बदलत होता. आधी ५०,००० मग २५,००० मग १५,००० मग १०,०००. सगळ्यात ताजा आकडा १६,०००. नक्की किती होते? आणि हा जमाव एकाएकी प्रक्षुब्ध कसा झाला? ३. आसाम मधील हिंसाचारात म्रूत्युमुखी पडलेले बहुतांश लोक हिंदु आहेत. बेघर झालेले ३००,००० लोकही हिंदुच बहुसंख्य आहेत. बेघर झालेले मुस्लिम बांग्लादेशी आहेत आणि आपल्या देशात बळाने घुसलेले आहेत आणि मूळ भारतीयांना हुसकावुन लावत आहेत. असे असताना चोराच्या उलट्या बोंबा सार्थ करत "रझा अकादमी" हिंसक मेळावे का आयोजित करत आहेत? नक्की मुस्लिमांवर काय अन्याय झाला असे त्यांचे मत आहे? ४. हा दंगा हिंदुंनी केला असतात तर आत्तापावेतो त्याला "भगवा दहशतवाद " म्हटले गेले असते. याला कोणीही हिरवा दहशतवाद का म्हणत नाही आहे? ५. दंगा रझा अकदमी ने घडवुन आणला हे मिडीयाला माहिती नव्हते काय? मग शनिवारी एकाही चॅनेलवाल्याच्या **त नाव घेउन आरोप करण्याचा दम नव्हता काय? धर्माधिष्ठित जाळपोळ चालु असताना " आसाम मधील हिंसाचाराविरोधात धर्मनिरपेक्ष" संस्थेने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले असे पुचाट विधान वाहिन्यांवरुन का होत होते? आसाम मधील हिंसाचाराच्या विरोधात हिंसाचार झाला म्हणजे तो हिंदु संघटनांनी केला असा सरळ संदेश सामान्य जनतेपर्यंत पोचत नाही काय? (कारण आसाममधील हिंसाचारात हिंदु जनताच पोळुन निघते आहे). शिवाय हिंसक वळण लागले असे म्हणुन हा हल्ला पुर्वनियोजित नव्हता असे का सूचित केले जाते आहे? हिंसा करणारा जमाव मुस्लिम होता म्हणुन केवळ "धर्मनिरपेक्ष संस्था" असे मधाचे बोट लावले गेले काय? ६. ५०,००० (किंवा १५००० जे काय असेल ते) त्यापैकी केवळ २३ लोक पकडले गेले हे पोलिस यंत्रणेचे दारुण अपयश नाही काय? ७. ३००० चा जमाव जमेल असे वाटत असताना २० - २५ हजार लोक जमतात. ते हल्ल्याच्या आणि दंग्याच्या पुर्वतयारीने आलेले असतात आनि तरीही पोलिस यंत्रणेला याचा पत्ताही लागत नाही हे आपल्या गुप्तचरयंत्रणेचे दारुण अपयश नाही काय? ८. मेलेल्या लोकांमधील एकाचा हजारोंच्या साक्षीने आज अंत्यविधी झाला. त्याने अशी नक्की काय मर्दुमकी गाजवली होती की त्याच्या मयतीला हजारो लोक जमले? तो एका रात्रीत हिरो कसा झाला? त्याचे नक्की काय कर्तुत्व आहे? की केवळ मुसलमान असणे आणि दंग्यात सहभागी होणे पुरेसे होते?

फटू बघितला आणि जन्माचे सार्थक झाले. हिंदू आणि हिंदू संघटना ह्यांना अहिंसावाद, बंधूभाव, सर्वधर्मसमभाव वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या कुठे आहेत ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला पाहिजे ... काहीतरी पाचकळ जमाव आणि चिथवणी वाली कलमे नकोत. कुठल्या देशात (इस्लामिक जाउदेत) - अमेरिका, रशिया, युके, जपान, जर्मनी, मलेशिया, सिंगापूर, वाट्टेल तो बरा देश घ्या -- कल्पना करता येईल का की देशाच्या मूळ अस्मितेच्या गोष्टीवर असा हल्ला केल्यावर काय कारवाई होईल ? जिथे सार्वभौमत्वावर हल्ला करणार्‍या अफझल गुरूची केवळ तो एका धर्माचा आहे म्हणून पाठराखण होते. जाणारे वॉच अँड वॉर्ड चे नि:शस्त्र जिवानिशी गेले... या पार्श्वभूमीवर जमावाच्या दंगल आणि जाळपोळीवर काही विशेष कारवाई होईल असे वाटत नाही..

In reply to by परिकथेतील राजकुमार

सैनिकी पेशा हा केवळ एक धंदा किंवा व्यवसाय असा पाहिला जावा असे काही विचारवंत म्हणत असतात. त्यामुळे त्याचे कौतुक किती करावे असा प्रश्न आहे. नाना (नव आंजाविचारवंत)

In reply to by नाना चेंगट

कौतुक नक्कीच करायले हवे. सध्याचं युग आहेच व्यावसायीकरणाचं, स्पर्धेचं. खरं तर सगळ्यांच पेश्यांच धंदा असं वर्गिकरण करायलं हवंच त्यात मग सैनीकी पेश्या सोबत राजकारणी, समाजसेवा हा पेशा सुद्धा आलाच. आणि मी तर हे सुद्धा म्हणेन की, जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर या सर्व धंद्यांचं "आउटसोर्सींग" करायला हरकत नाही म्हणजे काय गुणवत्तेत वाढ होईल आणि खर्च सुद्धा बराच कमी व्हायला मदत होईल. माझ्या सारख्या :) "कर" भरणार्‍यांना तेव्हढंच एक समाधान. [बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, फिलीपाईन्स वै. वै. सारखे देश म्हणे "आउटसोर्सींग" च्या दृष्टीने फायदेशीर ठरतील]

In reply to by परिकथेतील राजकुमार

हिंदू आणि हिंदू संघटना ह्यांना अहिंसावाद, बंधूभाव, सर्वधर्मसमभाव वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या कुठे आहेत ? ---- वैग्रे वैग्रे शिकवणारे सध्या काही काळ लांब राहतील. कारणे खाली दिली आहेत; १) कितीही निष्णात वकीली बुद्धी वापरली तरी वरील घटनेचं आणि घटनेला जबाबदार असणार्‍यांचं समर्थन करणारे मुद्दे मांडता येणार नाहीत. २) मन जरी वरील घटनेचं समर्थन करायला बघत असलं तरी डोकं या वेळेस साथ देत नसल्यामुळे लांब राहणेच आवश्यक होणार. ३) लांब राहणेच बरे आहे अन्यथा समर्थन करावं लागेल पण जर समर्थन केलं तर तर्कशुद्ध मुद्दे मांडता येणार नाहीत आणि समर्थन नाही केलं तर निषेध करावा लागेल आणि त्या करिता मन तयार होणार नाही :) [ अवांतरः पुर्वी मला काही प्रश्न पडायचे, जसे की महान अश्या या भारत देशावर, या महान देशातील महान नागरीकांवर इतर देशातील व्यक्तींनी/ देशांनी कसे काय १००० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं ? सत्ता गाजवीली ? आणि हे थोडे की काय म्हणून या महान आणि पराक्रमी देशातील रहिवाश्यांनी या सत्ताधार्‍यांना फक्त स्विकारलंच नाही तर त्यांना महान (ग्रेट!) वगैरे संबोधलं, त्यांच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या (चाकरी करून) आणि हे कमी झालं म्हणून की काय त्यांचे धर्म सुद्धा स्विकारलेत. सध्या मला असे प्रश्न पडत नाहीत. कारण अश्या प्रश्नांची उत्तरे ही एकाच शब्दात सापडली आहेत आणि तो शब्द म्हणजे "मानसिकता". जेव्हा काल/परवा सारख्या घटना घडतात तेव्हा हेच लक्षात येतं की अश्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडत राहतील. काहीच बदललेलं नाहीय. "मानसिकता" अजूनही तीच आहे. तीच राहणार.] [अति अवांतरः एक मुंबईवासी म्हणून पुढिल बॉम्ब स्फोटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवलेली आहेच. आता काय मज्जाच :) आणखी एक कारण सापडलंय बॉम्ब स्फोट करायला. (नव्या घटनेच्या सीडी तयार होत असतील सर्क्युलेशन करता. "शांततेत मोर्चा काढणार्‍या मुस्लिम युवकांवर धर्मांध पोलिसांनी गोळीबार केल्या मुळे काही निष्पाप युवकांना जिव गमवावा लागला, काही बघ्या निष्पाप युवकांना लाठीमार खावा लागला, कोठडीत जावं लागलं अत्याचार सहन करावे लागलेत वै. वै.)]

In reply to by परिकथेतील राजकुमार

छ्या! प्लीज, याला धार्मिक रंग देऊ नका. अतिरेकी वगैरेंना धर्म नसतोच.. दहशतवाद हाच त्यांचा धर्म... विसरता कसे हो तुम्ही??

In reply to by श्रीरंग

कोण म्हणतयं असे? हिंदु दहशतवाद नावाचा प्रकार तुम्हाला माहित नाही काय? या सगळ्याच्या पाठीमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे काय हे तपासावे लागेल.. अशा वेळी आम्हाला आमच्या दिग्गी राजांची फार फार आठवण येते ब्वॉ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रकाटाआ

In reply to by पंतश्री

व्हिडिओ पाहिला.... त्या गर्दीतून पास होणार्‍या गाडीत आपण वा आपले कोणी असते तर्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.... मुंबै सारख्या महाराष्ट्राचे व देशाचे नाक असणार्‍या शहरात इतक्या संख्येने गोळा होउन धुडगुस घालणार्‍या या बांगलादेशी लांड्याना बघून आपल्या धर्मनिरपेक्षपणाचे कौतुक करावे की यांची भीड चेपवणार्‍या तिस्ता सेटलवाडी प्रवृत्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी....

लोकसत्तात तर म्हटलय की मौलवीनं पोलिस अधिकार्‍यांच्या समोरच प्रक्षोभक भाषण दिलं, वरिष्ठ पोलिस अधिकारी दंगेखोरांना पकडणार्‍या पोलिस शिपायांनाच दम देउन त्यांना सोडायचे आदेश देत होते... लोकसत्तातली बातमी : 'रझा अकादमी आणि अन्य मुस्लीम संघटनांच्या मोर्चानंतर उसळलेला हिंसाचार हा पूर्वनियोजितच होता, असे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. हा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. घटनास्थळी सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि चार उपायुक्त असा ताफा, तसेच दंगल नियंत्रण, तसेच शीघ्र कृती पथके असूनही हिंसाचार रोखता न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किंबहुना पोलिसांना सुरुवातीला या हिंसाचाराचा अंदाजच आला नाही, असेही चौकशीतून स्पष्ट झाल्याचे कळते. आझाद मैदान पोलिसांकडे मोर्चा आणि निदर्शनांसाठी परवानगी मागण्यात आली होती. या वेळी फक्त एक हजार कार्यकर्ते येतील, असा अंदाज होता. परंतु ट्रक भरभरून प्रत्यक्षात १५ हजार आंदोलक तेथे आले. शंभर जणांचा एक गट आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून आला तो घोषणा देत दगडफेक करीतच. त्यांच्याकडे दगड कोठून आले याचीही चौकशी केली जात आहे. यापैकी काही लोकांकडे रॉकेल तसेच पेट्रोल होते. त्यांनी सुरुवातीलाच पोलिसांच्या गाडय़ांवर हल्ला चढविला. हातातील झेंडय़ांच्या काठय़ा तोडफोडीसाठी वापरण्यात आल्या. महापालिका मार्ग ते मेट्रो जंक्शन या मार्गावर आंदोलकांनी एकाच वेळी हिंसाचार सुरू केला, असेही या चौकशीत उघड झाले आहे. या आंदोलकांकडे हातोडेही होते, असेही स्पष्ट झाले आहे. ५०-५० जणांचा गट बाहेर का सोडला जात होता, हेही अनाकलनीय असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापैकीच एका गटाने सात महिला शिपायांचा विनयभंग केला. बेहरामपाडा, गोवंडी आणि भेंडीबाजार येथील गटाने हिंसाचारात भाग घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना या जमावाने ठरवून मारहाण केली. परंतु त्यांच्या सुटकेसाठी कोणीही आले नाही. दंगलखोरांना पकडून आणणाऱ्या पोलिसांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का दम दिला जात होता, हे अनाकलनीय असल्याचे या वेळी हजर असलेल्या एका पोलिसाने सांगितले. एका उपायुक्ताने दंगलखोराला रंगेहाथ पकडले तरी त्याला सोडून देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशा वेळी दंगलखोरांवर पाण्याचा माराही करण्यात आलेला नाही, असेही दिसून येत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे कळू शकलेले नाही. मात्र याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या उपस्थितीतच मौलवीचे प्रक्षोभक भाषण.. बरेली येथील मौलाना अब्दुल कादिर यांचे प्रक्षोभक भाषण सुरू झाले तेव्हा दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश व्यासपीठावर होते. त्यानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली, असेही स्पष्ट झाले असले तरी या मौलवीवर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. '

"बरेली येथील मौलाना अब्दुल कादिर यांचे प्रक्षोभक भाषण सुरू झाले तेव्हा दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश व्यासपीठावर होते." मग तर हे अपेक्षितच आहे.. हेच ते मिरज दंगलीच्या वेळेचे!..

एकंदर हा धागा धर्मनिरपेक्ष पक्षांबद्दल टिकेचा सुर लावत आहे असे दिसते. नुकत्याच काही चर्चांमधे काही संस्थांविषयी टिकेचा सूर आहे म्हणून तशा अर्थांचे प्रतिसाद अप्रकाशित केले होते. ह्या धाग्याला सुद्धा तसाच नियम लावून धर्मनिरपेक्ष पक्षांबद्दल टिकेचा सूर असलेले प्रतिसाद अप्रकाशित करावे अशी मी संपादक मंडळाला नम्र विनंती करत आहे.

भिवंडीमधे पोलिसांची भिषण हत्या करण्यात आली होती तेव्हाच तर खरे आपण सावध व्हायला हवे होते,त्याचे परिणाम या हिंसाचारात दिसुन आले. सरकार आणि पोलिस यंत्रणा आपले काहीही करु शकत नाही हे यांना पुरते कळुन चुकले आहे आणि त्यामुळेच यांना मोकळे रान मिळाले ! मुस्लीम माथेफिरु जमावाची महिला पोलिसांचे कपडे फाडण्या पर्यंत मजल गेली, तो पर्यंत बाकीचे पोलिस काय गोट्या खेळत होते ? हीच अवस्था मुस्लीम महिलांची झाली असती तर ? विचार करुन पहा जरासा ! या लोकांनी रहावयाचे इथे,खावयाचे इथे आणि निष्ठा मात्र दुसरीकडे ठेवायची ! आता सोनिया बाईंना देखील यांचा पुळका येईल आणि आसामात जाऊन यांच्या बांग्लादेशी पिल्लावळीची चौकशी करुन येतील की नाही ते पहा. आज दिवसभरात बाबा रामदेव यांना प्रचंड कव्हरेज देत असल्याने मिडिया मंडळी या दंग्याला जवळपास विसरुन गेल्याचे वाटले... असो. त्यांच्याकडुन पाठपुरावा होईल हीच अपेक्षा ठेवतो. जाता जाता :--- http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-08-12/india/33167075_1…

आमच्या आजोबांच्या काळात घडलं ते पुन्हा नक्कीच होणार. देशाची थोडीफार कदर असणारा जनसामान्य म्हणून ज्या गोष्टीची भीती वाटत होती;अगदि आपल्या मृत्युपश्चातही जे होउ नये असं वाटत होतं; ते ह्या हयातीतच पहावं लागणार. :(

आसाम मधल्या 'घुसखोरांच्या' समर्थनार्थ(!) मुंबईमध्ये १६ हजार देशद्रोही जमावेत?? 'वसुधैव कुटुंबकम' ची कमाल झाली म्हणायची ! बाकी मोर्चामुळे कोन्ग्रेस ची सोयच झाली, बांगलादेशींना शोधून शोधून रेशनकार्डे न द्यावी लागता एक गठ्ठा एकाच ठिकाणी मतदार मिळाले. ता.क. हुल्लडबाजांची खरी मागणी "आम्हालाही रोज बिर्याणी पाहिजे" अशी होती आणि वाटपात घोळ झाल्याने गोंधळ झाला असेही समजले आहे !

आसाम मधल्या 'घुसखोरांच्या' समर्थनार्थ(!) मुंबईमध्ये १६ हजार देशद्रोही जमावेत?? हा आकडा फार कमी आहे. मुंबईमध्ये एक मिनी बांग्ला देशच आहे .

In reply to by अशोक पतिल

आशोकराव, तुम्ही तो मिनीबांग्लादेश त्या अबू अझमीला दाखवून तो २ कोटी रुपयाचा चेक का घेत नाही? उगाच खोटे आरोप करायचे म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही का के ती दंगल नायजेरीयन ड्रग्जमाफियांनी केली होती.... उगाच गरीब बिचार्‍या मुसलमानांचे नाव घ्यायचे काम नाय... तो पर्‍या फॅब्रिकेटेड फोटो टाकतो इथे... त्याचे कॅफे आहे.... त्याला असे फॅब्रिकेशन सहज शक्य आहे.

मज्जाय बुवा.... त्याकाळात (२०१२) मध्ये मुंबै, आसाम्,दिल्ली,गुजरात वगैरे कुठल्याच ठिकाणी जायला व्हिसा लागायचा नाही. आणि तेव्हा आपले forefathersपण फुल टाइम इंडियात रहायचे म्हणे. त्यांना आपल्या सारखं आश्रित म्हणून ह्या युरोप /अमेरिकेत रहायची वेळ नव्हती आली कधी. मजा करत बसले हे आणि आमच्यावर ही वेळ ओढवली. . . वरील ओळी फक्त काही दशकातच आपल्याच पुढच्या पिढीकडून ऐकाव्या लागू नयेत म्हणजे मिळवली.

ज्या काही जणाना पोलिसांनी पकडलंय, त्यांची काय अवस्था केली जात असेल या बद्दल काही अंदाज? माझा अंदाज जर खरा असेल तर या पैकी निदान काही जण तरी मरण्याची भीक मागत असतील. आपल्याला जर एवढा राग येतो तर पोलिसांना किती येत असेल?

In reply to by काळा पहाड

हो कदाचित त्यांची चामडी लोळवत असतील चार भिंतींच्या मध्ये ...किंवा त्यांना बिर्याणी देखील मिळत असेल चापून खायला. पण जर पहिला पर्याय बरोबर असेल तर हेच पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी ओलीसासारखे का वागत होते. तेंव्हाच का नाही त्यांचे हात सरसावले? तेंव्हा यांचे हात कुणाच्या **** कुरवाळत होते? -------------- अवांतर वाचन .... इथे टिचकी मारा

पेपर स्टॉलवर सामन्याच्या मुखपृष्ठावर परा यांनी दाखवलेला फोटो पाहिला. असं सत्य दाखवण्याचं धाडस सामना सारखं वर्तमानपत्रच करू शकते. मुसलमान समाजातल्या काही व्यक्तींविषयी बर्‍याचजणांना आदर आहे. एवढंच काय हिंदी कलाकार कादर खान मराठीतून "शिका आणि मोठे व्हा!" अशी सह्याद्रीवर यशवंत विद्यापिठाची आपल्या बांधवांसाठी जाहिरात करतात तेंव्हा कुठेतरी आपलेसे वाटतात. महाबळेश्वचे मुसलमान जेंव्हा हेल काढून सातारकडची बोली भाषा बोलतात तेंव्हाही मातीतलेच वाटतात. पण दुर्दैवाने त्यांच्याच कळपात, असे कातडं पांघरलेले देशद्रोही भरले आहेत. चित्रात दाखविलेला, स्मारकावर हल्ला करणार्‍या इसमाला कुठल्या अर्थाने देशात राहण्याचा अधिकार आहे? अशा देशद्रोह्यांमुळे सामान्य माणसाने ह्या समाजाकडे तिरस्काराने नाही पाहिलं तरचं नवलं. स्वत:ला देशप्रेमी म्हणवून घेणार्‍या, समजणार्‍या आणि खरोखरच असणार्‍या मुसलमानांनी अशा संघटनांपासून नुसतंच अलिप्त राहणं आता पुरेसं नाही अशा देशद्रोह्यांना पकडून पकडून (अगदी चुन चुन के) हाकलून लावण्यासाठी त्यांनीच चळवळ उभी केली पाहिजे.

In reply to by सुधीर

गुजराथ मधे जो मार्ग आचरला किंवा जो मार्ग अमरनाथ च्या वेळेला जम्मूतील हिंदूंनी आचरला तोच आपणही आचरला पाहीजे. मुसलमानांची आर्थिक नाकेबंदी करायची. पण इथे समस्त हिंदू बांधवांना मुसुलमानाकडची बिर्यानी खाल्ल्याशिवाय चालत नाही ना. नाहीच तर इराण्याकडचे मटन पॅटीस. घ्या बसवून डोक्यावर त्यांना.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तळपायाची आग मस्तकात जाते. अजून नको असले फोटो. पोलिसांच्या हातून २ च्या एवजी अशा देशद्रोह्यांचे २०० बळी पडायला हवे होते. आता यांना शोधणार कधी अन पकडणार कधी?

In reply to by नितिन थत्ते

बांगड्या न भरलेले मर्द लोक यांना शोधून काढतील अशी आशा वाटते. म्हणजे, अर्थातच, आपण देखील यांना शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहात हे या मुळे समजले. :-) त्या शिवाय जर स्त्रीयांनी शोधले अथवा शोधायला मदत केली तर चलणार नाही का?

In reply to by विकास

एकूण वक्तव्ये वाचून असे वाटते आहे की बांगड्या घातल्या की धर्मांध/गुन्हेगार वगैरेंना शोधण्याची क्षमता ऑपॉप कमी/नाहीशी होते. तेव्हा स्त्रियांनी शोधायचे असेल तर त्यांना बांगड्या घालून चालणार नाही. आणि स्त्रियांनी बांगड्या घातल्या नाहीत तर ते मुतालिकांना चालणार नाही. मग मुतालिक* मोडतोड जाळपोळ स्त्रियांचा विनयभंग वगैरे करतील आणि चक्र चालू राहील. *प्रातिनिधिक नाव आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हॅहॅहॅ... बांगड्या भरण्याचा "अर्थ"चाचांना कळत नाही काय ? असो... त्यांच्या कडुन अश्या प्रतिसादा पेक्षा दुसरी अपेक्षा कशी करणार ? ;) ‘त्या’ सात महिला पोलीस अद्यापही भेदरलेल्या..

In reply to by सुधीर

एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार आणि अनुभवानुसार काही मतं तयार होतात आणि बर्‍याचदा ती पुढे अनुभवानुसार बदलतात सुद्धा. असो, काही आयडींच्या व्यासंगावर, काहींच्या बेरकीपणावर तर काहींच्या लेखणीवर प्रेम आणि आदर आहे. तो कमी व्हायचा नाही. मतभेदामुळे काही कटूता आल्यास माझ्याकडून ह्याच धाग्यावर मुठमाती देतो आणि हा विषय इथेच संपवतो.

एक काळा दिवस............................................... :(

आझाद मैदान परिसरातील घटनेच्या निमित्ताने धर्मांधतेचे राजकारण खेळून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार शिवसेनेकडून सुरू आहे . यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती आहे . त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून सुरू असलेला जळजळीत प्रचार त्वरित थांबवावा . - अबू आझमी , समाजवादी पार्टी या धर्मांध शिवसेनेवर त्वरीत बंदी घातली पाहिजे... मुर्खलेकाचे किती वेळा सौहार्द बिघडवणार आहेत काय माहिती? तो राज ठाकरे पण " अता सरकार काय कारवाई करते ते बघतोच" असली चिथावणी खोर भाषा वापरतो....

च्यायला या कॉंग्रेसींच्या अन समाजवादींच्या....यांनाच लक्ष करुन मारलं पाहीजे...हरामखोर साले. कोणीच कसं यांचं काही वाकडं करु शकत नाही ?

नेहमी शिवसेना - भाजपलाच मतदान करावे हया निश्कार्ष्या पर्यंत आलो आहे. भले ते काही न करोत. ह्यांचा माज खपवून नाही घेणार. म.ना.से. सारख्या छोटया पक्षापासून खरा धोका आहे ! ते "मराठी" मते खातात. अर्थात ते युतीला मिळाले तर प्रश्न नाही. केवळ एक गठ्ठा मतांचा हा माज आहे.

In reply to by तर्री

नेहमी शिवसेना - भाजपलाच मतदान करावे कशाला? कसाबला कंदाहारला पाठवायला? त्यापेक्षा बिर्याणी खातोय ते परवडेल.

अरूण पटनाइक म्हणतात की ' मी परिस्थिती फार चांगल्या रीतीनं हाताळली, नाहीतर १९९२ सारख्या दंगली उसळल्या असत्या ' ...हसावं का रडावं या वक्तव्याला हेच कळत नाहीये आयोजकांपैकी एक पठाण ( हे स्वत: पोलिस होते पूर्वी ) : मोर्चाला माणसं जमावीत म्हणून आम्ही एसएमएस, एमएमएस ( हे फॅब्रिकेटेड आहेत असं ऐकलं ), फेसबुक वापरलं ...मैदानातल्या कुण्णी म्हण्जे कुण्णी एक दगडसुद्धा बाहेर फेकला नाही फक्त बाहेरच्या जमावानच दंगा केला... आणि ते मेलेले २, त्यांचा दफनविधीही कित्ती शांततेत पार पडला म्हणे. मिसगाइडेड , मिसइनफर्ड युथ वगैरे वगैरे विशेषण देणं चालू आहेत......मोदींना शिव्या घालणारे सगळे टिव्ही चॅनल्स वृत्तपत्त्रं, मेणबत्ती ब्रिगेड, आंतरजालीय कंपू भूमिगत आहे... कुठेतरी कुणीतरी मुसलमानांना मारलं म्हणे तर इकडे दंगा ? आणि तेही पाकिस्तान, सिरीया, लिबिया, इजिप्त, टुनिशिआ वगैरे सोयिस्कर ठिकाणं विसरून फक्त म्यानमारच...मग इतर देशांत मारतात यांना तेंव्हा गळे का काढतात. या न्यायानं पाकिस्तानात जितक्या हिंदूना त्रास दिला / बेघर केलं तसं यांना केलं तर चालेल का... बाकी ते म्यानमार मधले मुसलमान बांग्लादेशात घुसले की बांग्लादेशी त्यांना परत बोटीत बसवतात आणि देतात सोडून समुद्रात आणि ते मग त्यातले बरेचसे बुडून मरतात....युनाइटेड नेशन्स बांग्लादेशला म्यानमारी निर्वासितांना मदत घ्या तुमच्याकडे आम्ही मदत करतो अशी विनंती करतेय बरेच दिवसांपासून आणि बांग्लादेश अजिबातच बधत नाहीये.. पुण्यात १० नॉर्थइस्ट च्या विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स्वर हल्ला झालाय. इकडे जर कोणाचे मित्र, कलिग्ज असतील नॉर्थइस्टमधले तर त्यांना एकटं-दुकटं जाउ देउ नका त्यांच्याबरोबर ग्रुपनं रहा, सावध रहायला सांगा त्यांना काहीदिवस

In reply to by पुष्करिणी

आंतरजालीय कंपू भूमिगत आहे... त्यांची बौद्धिक क्षमता फक्त तिरकस आणि बकवास लेखना पुरती मर्यादित आहे ! हे या निमित्त्याने अधोरेखित झाले.

मेलेल्या हिंदुत्वावर रजा अ‍ॅकेडमी ने फुंकर घातली आहे. जर ठिणगी पेटली तर रजा अ‍ॅकेडमी काँग्रेस सकट बुडेल

In reply to by राजघराणं

हॅ हॅ हॅ असे काही होत नाही पुरोगामी लोकांनी निवांत हिंदुत्वाला शिव्या देत रहाव्या !

In reply to by नाना चेंगट

पुरोगामी लोकांनी निवांत हिंदुत्वाला शिव्या देत रहाव्या !
तुला विचारवंत म्हणायचे आहे का नानबा ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

विचारवंत = पुरोगामी हेच बरोबर. हिंदुत्वात कुठले पुरोगामीत्व? ते आपले जुनाट स्मृती चावत बसणार...

In reply to by राजघराणं

आयला भिजलेल्या लाकडांवर विझलेल्या मेणबत्तीमुळे ठिणगी पेटेल असे वाटतेय यांना. तुमच्या अफाट कल्पनाविलासाला आणि दुर्दम्य आशावादाला माझा सलाम.

जाती धर्माबद्दल लिहण्याला बंदी घातली होती म्हणुन एका विशिष्ठ समुदायाला मी धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केला होता. आता भारत देशात त्या समुदयाला धर्मनिरपेक्ष म्हणुन ओळख कॉग्रेस पक्षाने दिली आहे. ते कधी दंगा करत नाहीत,सर्व गोष्टी समजुतीने करत असतात असा त्याच्या विषयी ग्रह गेल्या २० वर्षात सर्व भारतात त्यानी जोपासला आहे. त्याच धर्तीवर मुंबई पोलिसानी त्याना आंदोलनाला परवानगी दिली होती.मोर्च्यातल्या लोकानी पोलिसाना त्याचा गोड पण जोरदार धक्का दिल्यामुले मुंबई पोलिस सैरभैर झाले आहेत. आता ते आपली ही अवस्था पुर्ववत करण्यासाठी मावळ किंवा वारकरी किंवा मनसे सारख्या आंदोलनाची वाट पहात असतील. कारणतसल्या दंगेखोर लोकाना पाहिले की ह्याचे पुरषत्व जाग्रुत होत असते.पोलिसांबद्दल ची भिती मात्र समाजातुन त्या दिवशी पासुन निघुन गेली आहे. महाराष्ट्राचे कट्टर नेते श्री आर आर पाटिल आबा ह्यानी परत एकदा बोलबच्चन म्हणुन आपण किती योग्य आहोत हे दाखवुन दिले आहे.राज ठाकरेच्या टोल्याला प्रतिटोला देताना त्यानी सांगितले कि मी शेपुट आत घालणार्‍यापैकी नाही तर शेपुट पिरगळण्यार्‍या पैकी आहे.तर आबा ग्रामिण भागात शेपुट दोन वेगवेगळ्या वेळी पिरगळतात तेव्हा आपण कोणत्या उद्देश्याने पिरगळणार ते महत्वाचे आहे. आता तर धर्मनिरपेक्ष समाजाचा पवित्र महिना चालु असल्यामुळे आबा व कार्यकर्त्यानी आपाआपले शेपुट आठवडाभर म्यान करुन ठेवायचे ठरवले आहे.

In reply to by वेताळ

राज ठाकरेच्या टोल्याला प्रतिटोला देताना त्यानी सांगितले कि मी शेपुट आत घालणार्‍यापैकी नाही तर शेपुट पिरगळण्यार्‍या पैकी आहे. हॅहॅहॅ... च्यामारी ! यांची शेपुट पिरगळ्याची "ताकद" आझाद मैदानात कुठे दिसली नाही ते ? सरळ सरळ सांगा ना की मुसलमानांचा "पवित्र" महिना असल्याने शेपुट पिरगळ्याची ताकद उपास करण्यात खर्च केली जात आहे ते ! या पवित्र महिन्यात देशद्रोही लोकांनी चॉपर्,कोयते यांचे वार करुन यांची उरली सुरलेली शेपुट सुद्धा छाटुन टाकली आहे,तर शेपुट घालायला शेपुट उरली कुठे ? पोलिस खात्याला त्यांच्या महिला पोलिसांची इज्जत वाचवता आली नाही आणि सरकारची इज्जत चव्हाट्यावर मांडली गेली.

झालंय ते निषेधार्हच होतं. तोडफोड, मारझोड आणि जाळपोळीसाठी जवाबदार लोकांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा केली गेली पाहिजे. या सभेच्या आयोजकांकडून झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई वसूल केली जावी. (जस्टीस डी.पी.मोहन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार 'सार्वजनिक जागी विरोध आणि निषेध करण्यासाठी जमणार्या लोकांकडून आधीच एक ठराविक रक्कम प्रशासनाकडून डीपॉझीट म्हणून जमा केली जावी आणि जर काही नुकसान घडले तर त्या रकमेतून त्याची भरपाई व्हावी' .हि शिफारस जशीच्या तशी अमलात का आणली जात नाही कोण जाणे?) लोकांना प्रक्षुब्ध करणारी भाषणे करणाऱ्या व्यासपीठावरच्या नेत्यांना कडक शब्दात समज दिली गेली पाहिजे. पत्रकारांना मारझोड, पोलीस महिलांचा विनयभंग या खरच जिव्हारी बोचणार्या घटना आहेत. माझ्या धर्माच्या लोकांनी असे केले याचा खूप खेद वाटतो. लोकशाहीत शांततापूर्ण निदर्शनांचा हक्क नागरिकांना मिळालेला आहे पण त्याचा अर्थ कुणालाही दंगे करण्यासाठी ढाल म्हणून तो हक्क वापरता येऊ नये. या संपूर्ण घटनेची कसून आणि निरपेक्ष चौकशी व्हावी. इथे फक्त मी एक मुस्लीम म्हणून ‘विरोधासाठी विरोध’ करण्यासाठी मुस्लिमांची बाजू घेणार नाही. जर एखादी गोष्ट चूक आहे तर ती आहेच. सध्याचा काळ फार अस्वस्थ करणारा आहे. एका धुमसत्या सीमारेषेवर आपण वावरत आहोत असे सारखे जाणवते आहे. वरील सर्व प्रतिक्रिया वाचून आज मी इथल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती करू इच्छितो कि संतापाच्या भरात त्यांनी माणुसकीला पारखे होऊ नये. आता रमजान ईद येईल मग त्याच्यानंतर गणेशोत्सव , नवरात्र. हि नाजूक वेळ आहे. आपण सगळ्यांनीच समंजस भूमिका पार पाडली पाहिजे. शेवटी कुठल्याही दंग्यांमध्ये निष्पाप माणसंच जास्त मरतात. कुणी आईवडिलांना पारखा होतो कुणी मुलाला, आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगली जाते. हकनाक माणसं मरतात. एक भारतीय आणि त्यावरही एक माणूस म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय ' गोष्टी रॅडीकलाईज करू नका’. काही दिवसांपासून मोबाईलवर फिरणारे SMS , MMS बघितले आहेत. त्यातले म्यानमार आणि आसाम मधल्या हिंसेचे फोटो खूप बीभत्स आहेत. कुणाचीही टाळकी भडकतील असे. फेसबुक वर सुद्धा हे फोटो पद्धतशीरपणे पसरवले जात आहेत. हे कोण करतंय याचा तपास पोलिसांनी करून त्या लोकांना अद्दल घडवावी. राजकीय हितसंबंध असणारे ग्रुप्स असतील तर त्यांना लोकांसमोर आणावे. राजकीय पार्ट्यांच्या स्वार्थात या देशातील जनता किती पोळली जाणार आणि हे कधी थांबणार देव जाणे. आसाम मध्ये मुसलमानांना खरोखर टार्गेट करून मारले जात आहे. BTC (Bodo territorial council ) या संस्थेची यात सक्रीय भूमिका आहे. एकेकाळी बोडोलँड साठी हिंसक चळवळ चालवणाऱ्या BLTF (Bodo Liberation Tigers Force ) शी या संस्थेची पाळेमुळे जोडलेली आहेत. हिंसाचार त्यांना नवा नाही. पैसा आणि शस्त्र मुबलक उपलब्ध. पण भारतीय जनता पार्टी "असाममध्ये फक्त हिंदू जनताच पोळून निघते आहे " अशी धादांत विधानं करून लोकांना भडकवत आहे. बोडोंबद्दल मुग गिळून गप्प. पुढल्या निवडणुकीत स्वबळावर जिंकू शकत नाही हे पाहून नजीकच्या काळात 'हिंदुत्व' हे जुनं कार्ड फारच आक्रमक रित्या वापरलं जाईल असं दिसतंय. त्यासाठी BLTF सारखी भुतं मदतीला घेतली जातील. देशभर दंग्यांचा गुजरात पॅटर्न कदाचित वापरला जाईल अशी भीती वाटत आहे. कॉंग्रेसने व्होटबँकेसाठी बांगलादेशी निर्वासित जमा केले त्यांना मारूनच टाकले पाहिजे का ? योग्य पद्धत्तीने त्यांना त्यांच्या देशात परत पाठवू शकत नाही का ? ज्या देशाच्या निर्मितीकरिता आपण जबाबदार भूमिका पार पाडली, जो देश आपला शेजारी आहे त्या देशातल्या निर्वासित लोकांना आपण योग्य वागणूक देऊ शकत नाही का ? ती आपली नैतिक जबाबदारी नाही का ? अमेरिकेने मेक्सिकोतून येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न जसा सोडवला तसा तो आपण नाही का सोडवू शकत ? श्रीलंकेतून तमिळ, तिबेटमधून तिबेटीयन, नेपाळमधून येणारे नेपाळी यांना जशी वागणूक मिळते किमान तशी वागणूक नाही दिली तरी 'जीवे मारणे' हे अति होतंय असं नाही का वाटत ? कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या मुस्लिमांबद्दल वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल या आशेने फार दिवसांनंतर मिपावर आलो आणि वरील काही प्रतिसाद वाचून मन पार उद्विग्न होऊन गेलं. माणुसकी जपा एव्हडीच सगळ्यांना विनंती.

In reply to by हारुन शेख

लोकांना प्रक्षुब्ध करणारी भाषणे करणाऱ्या व्यासपीठावरच्या नेत्यांना कडक शब्दात समज दिली गेली पाहिजे. फक्त समज ? का ? चिथवणीखोर भाषण करुन हिंसा करण्यात प्रोत्साहन देणार्‍यांना चांगल फटकुन काढले पाहिजे की, आयुष्यात असे भाषण ठोकण्याची हिंमत तर सोडा पण ब्र देखील काढता येउ नये ! सध्याचा काळ फार अस्वस्थ करणारा आहे. एका धुमसत्या सीमारेषेवर आपण वावरत आहोत असे सारखे जाणवते आहे. हे हिंदूंना कळेल तो सुदिन ! वरील सर्व प्रतिक्रिया वाचून आज मी इथल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती करू इच्छितो कि संतापाच्या भरात त्यांनी माणुसकीला पारखे होऊ नये. असले सल्ले हिंदूंना देण्यापेक्षा तुमच्या बांधवांना देण्याचे आपण विसरला होतात काय ? हिंदूंच्या सहिष्णुतेची फळे आझाद मैदानात दिसुन आली ! आता रमजान ईद येईल मग त्याच्यानंतर गणेशोत्सव , नवरात्र. हि नाजूक वेळ आहे. आपण सगळ्यांनीच समंजस भूमिका पार पाडली पाहिजे. हे तुमच्या मुल्ला,मौलवी आणि उलेमा मंडळींना समजवा जरा ! एक भारतीय आणि त्यावरही एक माणूस म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय ' गोष्टी रॅडीकलाईज करू नका’. ओवेसीने लोकसभेत सरळ सरळ धमकीच दिली होती की मुस्लिम तरूणांचे तिसरे रॅडिकलाय़एशन होईल, तेव्हा आपण कुठे होतात ? काही दिवसांपासून मोबाईलवर फिरणारे SMS , MMS बघितले आहेत. त्यातले म्यानमार आणि आसाम मधल्या हिंसेचे फोटो खूप बीभत्स आहेत. कुणाचीही टाळकी भडकतील असे. १२ महिने २४ तास इस्लाम खत्रे मे है, अशी बांग देणार्‍यांची टाळकी फिरलेली असतात हे आम्हाला ठावुक आहे. आसाम मध्ये मुसलमानांना खरोखर टार्गेट करून मारले जात आहे. BTC (Bodo territorial council ) या संस्थेची यात सक्रीय भूमिका आहे. एकेकाळी बोडोलँड साठी हिंसक चळवळ चालवणाऱ्या BLTF (Bodo Liberation Tigers Force ) शी या संस्थेची पाळेमुळे जोडलेली आहेत. हिंसाचार त्यांना नवा नाही. पैसा आणि शस्त्र मुबलक उपलब्ध. पण भारतीय जनता पार्टी "असाममध्ये फक्त हिंदू जनताच पोळून निघते आहे " अशी धादांत विधानं करून लोकांना भडकवत आहे. असं असेल तर अडीच लाख बोडो बेघर झाले ते केवळ तिकडच्या सरकारच्या कॄपेने का ? बाकी बिजेपीच म्हणाल तर त्यांची अवस्था त्यांच्या श्री अडवाणींनी बिकट करुन ठेवली आहे,आसाम विषयी चर्चा करताना ते म्हणाले की याला हिंदू-मुस्लीम संघर्ष म्हणुन पाहु नका,तर विस्थापित आणि स्थानिक बोडो असे पहा...आणि मग कॉग्रेसच्या चारित्र्यावर घसरले,मूळ मुद्दा राहिला बाजुला ! त्यांना त्यांच्याच पक्षाने एका रथात बसवुन कायमच्या रथयात्रेला पाठवण्याचे दिवस जवळ आले आहेत हे दिसुन आले. कॉंग्रेसने व्होटबँकेसाठी बांगलादेशी निर्वासित जमा केले त्यांना मारूनच टाकले पाहिजे का ? कोण म्हणत्म त्यांना ठार मारले पाहिजे ? कॉग्रेसवाले तर बांग्लादेशींविरुद्ध वागु लागले तर त्यांच्या मतांचे काय ? २०१४ टार्गेट आहे याचा तुम्हाला सोयिस्कर रित्या विसर पडलेला दिसतो ! इथे मुंबईत सुद्धा बांग्लादेशी आहेत,तर आसाम मधल्यांची चिंता कोण करणार ? इथे रहा रेशकार्ड मिळवा आणि देशद्रोही मोर्चे काढा ! दुसरे कुठले देशभक्तीपर योगदान ही मंडळी देणार ? बाय द वे पाकिस्तानातुन २०० हिंदू कुटुंबे अत्याचाराला कंटाळुन हल्लीच हिंदूस्थानात आश्रयाला आली त्यांच्या बद्धल सभा घेण्यासाठी, आणि त्यांच्या अन्याया बद्धल वाचा फोडण्यासाठी मुल्ला / मौलवी पुढे का आले नाहीत ? का वाचा बसली होती त्यांची ? कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या मुस्लिमांबद्दल वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. पाकिस्तानच्या पॅटर्न टॅकचे कबरिस्तान करणार्‍या अब्दुल हमिदचे आम्ही भक्त आहोत,पण इथेच राहुन या देशाशी देशद्रोह करण्या विषयी करुणा वाटण्याचे कारणच काय ? स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल या आशेने फार दिवसांनंतर मिपावर आलो आणि वरील काही प्रतिसाद वाचून मन पार उद्विग्न होऊन गेलं. माणुसकी जपा एव्हडीच सगळ्यांना विनंती. रमझानच्या पवित्र महिन्यात आपण इथे येण्याची तसदी घेतलीत त्या बद्धल मंडळ आभारी आहे. आपली माणुसकीची व्याख्या काय ती कळली !

In reply to by मदनबाण

झक्कास ! अगदी अगदी हेच म्हणेन ! हिंदू पेटून उठत नाहीत हीच तर खरी बोंब आहे ! पण असे एखादे स्फुल्लींग पाहीले की थोरल्या महाराजांची पुण्याई अजून सम्पलेली नाही याचे समाधान वाटते. त्यांना बरोबर कळले दहशतवाद कसा संपवायचा ते ! बोलून चालून सोनिया पाववाली आणि रोमन .. तिचे मरु दे , ती कशाला आपलं मढं घेऊन रडेले? पण चव्हाण आणि पाटील ?कसले घरबुडवे हे ? यांनी अनुक्रमे कराड आणि तासगांवला जाऊन पिठाची गिरणी चालवावी... नाही तर डालग्यात कोंबड्या आणि तुमानी घालून मुलाण्याचा धंदा करावा...! धकाधकीचा मामला| कैसा घडे अशक्ताला | नाना बुद्धि शक्ताला| म्हणोनी शिकवाव्या ||२२|| व्याप होईल तों राहावें| व्याप राहातां उठोन जावें | आनंदरूप फिरावें| कोठें तऱ्ही ||२३||

In reply to by हारुन शेख

फेसबुक वर सुद्धा हे फोटो पद्धतशीरपणे पसरवले जात आहेत. हे कोण करतंय याचा तपास पोलिसांनी करून त्या लोकांना अद्दल घडवावी. बरोबर आहे हो! उगाच फोटो पसवतात हे लोकं ! मारल्या लाथा अमर जवान स्तंभाला तर काय इतकं रागवायचं? सहीष्णुता काय ती नैच मेली ! ज्या देशाच्या निर्मितीकरिता आपण जबाबदार भूमिका पार पाडली, जो देश आपला शेजारी आहे त्या देशातल्या निर्वासित लोकांना आपण योग्य वागणूक देऊ शकत नाही का ? ती आपली नैतिक जबाबदारी नाही का ? अगदी ! उगाचच लोकं घुसखोर म्हणतात हो या बांग्लादेशींना ! नैतीक जबाबदारी म्हणुन अजुन काही हिंदु बायका - मुलींना त्यांच्यासमोर पाठवावं - यावेळेस नागडं करुनंच पाठवावं म्हणजे बिचार्‍यांच्या कपडे फाडायचा त्रास तरी वाचेल. कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या मुस्लिमांबद्दल वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. नै तं काय! सगळे मुसलमान असे नसतात कै ! पण सगळे दंगेखोर अन अतिरेकी मुसलमानंच का असतात ओ मिंया? मला तर बै कैच कळत नै ! पण तुम्ही किनई अज्जिबात काळजी करु नका...कसाबला नै का जिवंत ठेवला ? हे दंगेखोर तर साधी गोष्ट आहे...गृहमंत्री अगदी मवाळ माणुस आहे म्हणे. त्यांना सांगा की आत्ता पकडलेल्या निष्पाप लोकांना सोडायचे आदेश देतील ! म्हणजे तसेही देतीलच म्हणा!

In reply to by शिल्पा ब

फेसबुक वर सुद्धा हे फोटो पद्धतशीरपणे पसरवले जात आहेत. हे कोण करतंय याचा तपास पोलिसांनी करून त्या लोकांना अद्दल घडवावी. बरोबर आहे हो! उगाच फोटो पसवतात हे लोकं ! मारल्या लाथा अमर जवान स्तंभाला तर काय इतकं रागवायचं? सहीष्णुता काय ती नैच मेली !
हारून शेख यांचा प्रतिसाद नीट वाचला असेल तर ते फेसबुकवर फिरणार्‍या अमर जवान स्मारकाच्या नासधूशीच्या किंवा गायींच्या हत्येच्या छायाचित्रांविषयी बोलत नसून मुसलमानांच्या कत्तलींविषयीच्या चिथावणीखोर चित्रांविषयी आणि मजकूराविषयी बोलत आहेत. बाकी चालू द्या. शेवटी गाय मारली जात असल्याचे चित्र काही चिथावणीखोर म्हणता येणार नाही.

In reply to by हारुन शेख

थिअरोटिकली तत्वतः सहमत. काही दिवसांपासून मोबाईलवर फिरणारे SMS , MMS बघितले आहेत. त्यातले म्यानमार आणि आसाम मधल्या हिंसेचे फोटो खूप बीभत्स आहेत. कुणाचीही टाळकी भडकतील असे. आपण सिरीया, इराक, अफगाणिस्थान, पाकिस्तान- बलुचिस्तान, इजिप्त, लिबिया इ. महत्वाची ठिकाणं विसरलात का आपण ? जर आपल्याल माहित नसेल तर माहिती करुन घ्या प्लीज. आणि हे जे म्यानमार / आसाम मधले MMS आहेत हे फॅब्रिकेटेड आहेत ... जर हाच न्याय वापरायचा झाला तर जे झालं त्याचे फोटो , सीसीटिव्ही फुटेज, महिला पोलिसांचा केलेला अपमान यावर जर रागानं प्रतिक्रिया / प्रतिसाद आले ( ते सुद्धा फक्त लिहून आंतरजालावर ) चिडायच काहीच कारण नाही कारण तुमच्या मते असे फोटो SMS , MMS पाहून केलेला धुडगुस जस्टिफाइड आहे... आणि म्यानमार मधले मुसलमान बांग्लादेशात घुसले की बांग्लादेशी त्यांना परत बोटीत बसवतात आणि देतात सोडून समुद्रात आणि ते मग त्यातले बरेचसे बुडून मरतात....युनाइटेड नेशन्स बांग्लादेशला म्यानमारी निर्वासितांना घ्या तुमच्याकडे आम्ही मदत करतो अशी विनंती करतेय बरेच दिवसांपासून आणि बांग्लादेश अजिबातच बधत नाही. ह्याबद्दल सुद्धा आपण अनभिज्ञ दिसता. बांग्लादेश त्यांच्या देशांत म्यानमारी मुस्लीमांना पाय सुद्धा ठेउन देत नाहीये मग आपल्याला बांग्लादेशीबद्दल इतकी कणव का? >>स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल ... हो ना, स्वातंत्र्यदिनाच्या ४ -५ दिवस आधीच / रमझानच्या पवित्र महिन्यात सैनिकांच्या स्मारकाची अवहेलना जिथे होते तिथे वाचणं बिचणं काय घेउन बसलात शेखसाहेब? आणि माणुसकीचं म्हणाल तर त्यासाठी समोरचासुद्धा माणूसच असावा लागतो ..जनावरापेक्षासुद्धा खालच्या पातळीवर जाउन कृत्य करणार्‍यांबाबत कशी आणि का माणुसकी दाखवायची.

In reply to by हारुन शेख

>>सध्याचा काळ फार अस्वस्थ करणारा आहे. एका धुमसत्या सीमारेषेवर आपण वावरत आहोत असे सारखे जाणवते आहे. -- खरय. आणि हि घुसफुस आज ना उद्या फार स्फोटक होणार आहे. त्याकरताच हे चाललय. यु ऑल्सो नो दॅट >>वरील सर्व प्रतिक्रिया वाचून आज मी इथल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती करू इच्छितो कि संतापाच्या भरात त्यांनी माणुसकीला पारखे होऊ नये. -- आमेन. पण माणुसकीला पारखं करण्याचा पद्धतशीर डाव टाकल्या जातोय त्याचं काय... >>शेवटी कुठल्याही दंग्यांमध्ये निष्पाप माणसंच जास्त मरतात. कुणी आईवडिलांना पारखा होतो कुणी मुलाला, आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगली जाते. हकनाक माणसं मरतात. एक भारतीय आणि त्यावरही एक माणूस म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय ' गोष्टी रॅडीकलाईज करू नका’. -- हे सर्वात कटु वास्तव :( >>आसाम मध्ये मुसलमानांना खरोखर टार्गेट करून मारले जात आहे. -- हाच तुमच्या विचारसरणीचा मुख्य प्रॉब्लेम आहे. टार्गेट मुसलमानांना नाहि तर निर्वासीत होऊन आलेल्या आणि आता राजकीय महत्वाकांक्षी बनलेल्या लोंढ्यांना केले जात आहे. उद्या जर महाराष्ट्रातुन हिंदु तिकडे गेले (काय पण उदाहरण आहे...) आणि आपली पॉवर दाखवायचा प्रयत्न केला तर त्यांनाही गोळ्या खाव्या लागतील. "इस्लाम खतरेमे है" ची अफुची गोळी तुम्ही कुठवर घेणार? >>BTC (Bodo territorial council ) या संस्थेची यात सक्रीय भूमिका आहे. एकेकाळी बोडोलँड साठी हिंसक चळवळ चालवणाऱ्या BLTF (Bodo Liberation Tigers Force ) शी या संस्थेची पाळेमुळे जोडलेली आहेत. हिंसाचार त्यांना नवा नाही. पैसा आणि शस्त्र मुबलक उपलब्ध. -- BTC ज्यांच्याशी लढतेय त्यांच्याकडे शस्त्रास्त्र, पैसा, विदेशी शक्तींचा पाठींबा वगैरे नाहि असं म्हणायचं आहे का? >>पण भारतीय जनता पार्टी "असाममध्ये फक्त हिंदू जनताच पोळून निघते आहे " अशी धादांत विधानं करून लोकांना भडकवत आहे. -- असा रिपोर्ट खुद्द सरकारने दिला आहे... बी जे पी ने नाहि. >>पुढल्या निवडणुकीत स्वबळावर जिंकू शकत नाही हे पाहून नजीकच्या काळात 'हिंदुत्व' हे जुनं कार्ड फारच आक्रमक रित्या वापरलं जाईल असं दिसतंय. त्यासाठी BLTF सारखी भुतं मदतीला घेतली जातील. देशभर दंग्यांचा गुजरात पॅटर्न --कदाचित वापरला जाईल अशी भीती वाटत आहे. -- भाजप ला जर पुढील १०० वर्ष सत्तेपासुन दूर रहायचं असेल तर ते असं करेल. तुम्हाला कोण आणि का असं विचीत्र तत्वज्ञान ऐकवतय? >>कॉंग्रेसने व्होटबँकेसाठी बांगलादेशी निर्वासित जमा केले त्यांना मारूनच टाकले पाहिजे का ? -- अजीबात नाहि. कुणाही सहृदय व्यक्तीला असं वाटणार नाहि. पण निर्वासीतांनी आपण दुसर्‍या देशात आश्रीत आहोत, त्यांचे उपकार मानुन शक्य तोवर परत फिरायचे सोडुन स्थानीक जनतेच्या पोटावर पाय देतो म्हटलं तर कोण ऐकुन घेईल? >>योग्य पद्धत्तीने त्यांना त्यांच्या देशात परत पाठवू शकत नाही का ? -- त्यांना जायची ईच्छा आहे का? किंबहुना ते परत जाण्यासाठी आले आहेत कि भारताचा पुर्वोत्तर भाग पोखरुन काढण्यासाठी ? >>ज्या देशाच्या निर्मितीकरिता आपण जबाबदार भूमिका पार पाडली, जो देश आपला शेजारी आहे त्या देशातल्या निर्वासित लोकांना आपण योग्य वागणूक देऊ शकत नाही का ? ती आपली नैतिक जबाबदारी नाही का ? -- एका लिमीटमध्ये ति निश्चित भारताची जबाबदारी आहे. पण निर्वासीतांनी आपण निर्वासीत आहोत हे ध्यानात ठेवायला हवं ना... एका पॅरासाईट प्रमाणे जर ते होस्ट कंट्री पोखरुन काढत असतील तर उपाय काय? सर्वोच्च न्यायालयाने याविषयी किती भयंकर कमेंट्स दिलेत ते बघितलं का? >>अमेरिकेने मेक्सिकोतून येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न जसा सोडवला तसा तो आपण नाही का सोडवू शकत ? -- मेक्सीकोतून आलेले निर्वासीत अमेरीकेचा तुकडा पाडायला पाठवलेले लोंढे नाहित . ज्यादिवशी त्यांनी तसं केलं त्यादिवशी अमेरीका त्यांना काय हाल करुन परत पाठवेल हे सांगायला नको. >>श्रीलंकेतून तमिळ, तिबेटमधून तिबेटीयन, नेपाळमधून येणारे नेपाळी यांना जशी वागणूक मिळते किमान तशी वागणूक नाही दिली तरी 'जीवे मारणे' हे अति होतंय असं नाही का वाटत ? -- तमीळ, तिबेटीयन, नेपाळी निर्वासीत म्हणुन येतात आणि निर्वासीत म्हणुन जगतात... पाकिस्तानचा पाठेंबा घेऊन भारताचे लचके तोडायचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचीही गत फार वेगळी होणार नाहि (होऊ नये रादर) रजा अकादमीने मुस्लीम कैवार घेऊन या समस्येकडे बघणे आणि त्याला भारतातल्या मुस्लीमांचा पाठींबा असणे हि गोष्ट उर्वरीत भारतीयांना अस्वस्थ करणं स्वाभावीक आहे. असो. सध्यातरी "जे जे होईल ते ते पहावे" यापलिकडे काहि करण्यासारखं नाहि. अर्धवटराव

In reply to by हारुन शेख

कॉंग्रेसने व्होटबँकेसाठी बांगलादेशी निर्वासित जमा केले त्यांना मारूनच टाकले पाहिजे का ? योग्य पद्धत्तीने त्यांना त्यांच्या देशात परत पाठवू शकत नाही का ?
हो का? कशासाठी? काय गरज आहे आम्हाला? भिकारडे ते भिकारडे आणि वर आमच्या देशातल्या नागरिकांना त्रास देतायत ना? तुम्हाला का एवढा त्यांचा पुळका?
ज्या देशाच्या निर्मितीकरिता आपण जबाबदार भूमिका पार पाडली, जो देश आपला शेजारी आहे त्या देशातल्या निर्वासित लोकांना आपण योग्य वागणूक देऊ शकत नाही का ? ती आपली नैतिक जबाबदारी नाही का ?
मायला ही काय भानगड आहे? उद्या म्हणाल त्यांना जेवण द्या. घर द्या. काय ठेका घेतलाय का? याच हरामखोरांनी ९ भारतीय सैनिकांची घृणास्पद हत्या केली होती ना? काय नैतिक बितीक जबाबदारी नाहिये. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं.
अमेरिकेने मेक्सिकोतून येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न जसा सोडवला तसा तो आपण नाही का सोडवू शकत ? श्रीलंकेतून तमिळ, तिबेटमधून तिबेटीयन, नेपाळमधून येणारे नेपाळी यांना जशी वागणूक मिळते किमान तशी वागणूक नाही दिली तरी 'जीवे मारणे' हे अति होतंय असं नाही का वाटत ?
तुलना जरा चुकतीये. तिबेटियन नेपाळी वगैरे लोक धर्मांध नाहियेत. या लोकांनी मुकाट सरहद्दीपलिकडे निघून जावं आणि त्यांना मारायची काही गरज नाहिये. कुणाला गोळ्या वाया घालवाव्या वाटतील?
कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या मुस्लिमांबद्दल वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल या आशेने फार दिवसांनंतर मिपावर आलो आणि वरील काही प्रतिसाद वाचून मन पार उद्विग्न होऊन गेलं. माणुसकी जपा एव्हडीच सगळ्यांना विनंती.
"दंग्यांचा गुजरात पॅटर्न" या वाक्यावरुनच कल्पना आली की तुम्ही तीस्ता सेटलवाड च्या पक्षाचे. दरवेळी मुसलमान काहीतरी दंगा करणार आणि बाकिच्यांनी संयम बाळगायचा ना? आणि वर तुम्ही "हिंदुत्व वाद्यांच्या" नावे बोंबलायला मोकळे!

In reply to by काळा पहाड

मदनबाण, शिल्पा ब, पुष्करणी, अर्धवटराव आणि काळापहाड..... तुम्ही असे मिळून एकट्याला घेरलेले बघुन मला अभिमन्युची आठवण झाली.... दुष्ट , धर्मांध कुठचे.....

In reply to by आंबोळी

उलट भरतातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नशिबी , जात-धर्म-भाषा वगैरे भेदभाव न करता, अभिमन्युचे प्राक्तन येऊ द्यायचे नाहि हा आमचा प्रयत्न. पण जर कुणी मुद्दाम चुकीची भुमीका घेत असेल वा त्याला घ्यायला भाग पाडले जात असेल तर काळजी करण्याचं कारण निश्चित आहे... अर्धवटराव

In reply to by हारुन शेख

बाग्लादेशींसाठी आझाद मैदानावर दंगल करणारे गुंड आणी त्यांच्यासाठी कीबोर्ड झिजवणारे विचारजंत यांना एकाच तागडीत तोलावे लागेल काश्मिरमधल्या भारतीयांच्या हिंसाचाराविरोधात रझा आकादामीने एक ब्र तरी काढला आहे का? नसेल तर म्यानमारमधले मुस्लीम गेले तेल लावत, आणि आसाममधले सगळे गुंड हे बांगला देशातून घुसून पुन्हा तिथे अत्याचार करत आहेत म्हणून बोडोंनी त्यांना धुतले. तरीही त्यांच्याशी निष्ठा सांगायची असेल तर स्वत:ला भारतीयही म्हणवून घेऊ नये. आपली ओळख कोणती? निष्ठा कुठे आहेत? आणि हा चौदा ऑगस्टच्या मस्तीचा जल्लोष आहे का? नेभळट्ट सरक ार आणि माध्यमांनी स्वातंत्र्यदिनाला समोर ठेऊन रझा आकादमी आणि तिच्या समर्थकांना हे प्रश्न खडसावून विचारण्याची गरज आहे. कोणत्याही धार्मिक आधारावरचे पागलखाने सहन करण्याचा भारतीयांचा संयम आता संपला. देशाचा कायदा हातात घेण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही धार्मिक गटाला नाही हे बडग्यासहित सांगितले तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे यापुढे देशाच्या नेतृत्वाने शेपटी घालून बुजगावण्यासारखे वागू नये एवढीच वाजवी अपेक्षा तुम्हीआम्ही ठेवू शकतो ज्याकडे आतातरी कान देऊन ऐकण्याची आणि कृती करण्याची जबाबदारी सरकारने उचलून दाखवावी.

'काही' हा शब्द वापरलात तो महत्वाचा आहे ! बाकी ती मांजरे अशी का असतात ते एक अश्मयुगापासूनचे कोडे आहे !

अबु आझमी म्हणतो की शिवसेनेमुळे सौहार्द बिघडेल http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15484508.cms ह्या निर्लज्ज माणसाने जे घडले त्याचा निषेध केल्याचे वाचले नाही. कोट्यावधी रुपयाच्या मालमत्तेचा चुराडा केला, दैनंदिन व्यवहार ठप्प केले, कित्येकांची रोजीरोटी त्या दिवसापुरती बुडाली. विनयभंग, मारहाण, पोलिस व्यवस्थेवर ताण हे सगळे केलेल्या लोकांविरुद्ध मूग गिळून बसायचे. कदाचित त्यांना समर्थन द्यायचे, कुणाला चुकुनमाकून अटक झालीच तर योग्य तिथे राजकीय वजन वापरुन त्यांना सोडवायचे, असले आततायी धंदे करणारा हा नराधम शिवसेनेने संताप व्यक्त केला तर त्याबद्दल तोंड वाजवत आहे. शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे या घटनेबद्दलचे अभिप्राय, प्रतिक्रिया हे इतके बुळबुळीत, मिळमिळित आणि संतापजनक आहेत की कुठल्या सेक्युलर स्कूलमधे हे लोक नियमितपणे धडे गिरवत आहेत की काय असे वाटेल! मुस्लिम लांगूलचालनाची थोर, प्राचीन, काँग्रेसी परंपरा अगदी जीवापाड जपली आहे. हे घातक आहे. कुठेतरी ह्याचा उद्रेक होणारच.

काही बाबतीत रागावुन चालत नाही हे खरे आहे. नेमकी म्यानमार व आसाम मधील परिस्थिती समजावुन घेतली तर तुम्हाला मुस्लिम असल्याचा स्वःताबद्दल राग निर्माण होईल. निर्वासित लोकाना सामावुन घेण्याची जितकी कुवत एकाद्या देश्याची असते तितके लोक ते सामावुन घेतात. पंरतु ज्यावेळी निर्वासित लोक मुळ नागरिकाच्या हक्कावर ,त्याना मिळणार्‍या सुखसोयीवर अतिक्रमण करु लागतात त्यावेळी अशी स्फोटक परिस्थिती निर्माण होते. भारतात तर प्राचिन काळापासुन निर्वासित लोकाना सामावुन घेतले गेले आहे.पण कोणत्याही मुस्लिम देश्यात आजतागायत कोनत्याही निर्वासित समाजाला सामावुन घेतले गेले नाही आहे.ज्यु,पारसी,इराणी,सिंधी ,बाग्लादेशी अश्या किती तरी देश्याचे लोक भारतात अगदी आनंदाने राहतात. मग मुस्लिम लोक इतक्या सहजतेने का राहु शकत नाहीत?आजही कित्येक ज्यु इस्त्रायल ला न जाता भारतात राहतात. मग हे मुस्लिम अजुनही हिरव्या झेंड्याचे कौतुक का करतात?.तर त्याना देश किंवा राष्ट्रप्रेम ह्या पेक्षा आपली जात व धर्म अत्यंत प्रिय असतो. अन ह्याच गोश्टीचा इतर लोकाना राग येतो. म्यानमारचे अत्याचाराचे जे फोटो दाखवले जातात ते तर थायलंड मधील पुरबळीचे फोटो आहेत. एक स्वःताला पेटवुन घेतलेल्या तरुनाचा फोटो तर तिबेट्टीयन तरुणाने चीन राष्ट्राध्यक्षाच्या भारतभेटीच्या वेळचा फोटो आहे्ए समजुन न घेता अशिक्षित मुस्लिम भारताची सुरक्षा वेठिस धरत आहेत्.रमजान पवित्र महिन्यात जर पाकिस्तानात हिंदु पोरी बाटवुन लग्ने केली हे चालत असल्यावर भारतात किंवा इतर देश्यात का म्हणुन हा पवित्र महिना पाळला गेला आहे? म्यानमार ने आपल्या देशातील निर्वासित लोकाना परत बांग्लादेश्यात पाठवायला सुरुवात केल्यावर्,बांग्लादेश सरकारने त्याना लगेच बोटीतुन बसवुन समुद्रात सोडुन दिले आहे. त्यात उपासमारी ने मरणार्‍या लोकांची फोटो बघितल्यावर भडकनारे तुम्ही ,त्या बांग्लादेश्यावर गरळ का ओकत नाही?त्यांना जर रमजान महिण्यात लोकाना उपाशी मारायला लाज वाटत नसेल तर इतरानी का सहिष्नु रहावे?आसामधे तर स्थानिक बोडो लोकाना मुस्लिम मारत असल्यावर ते तरी कसे गप्प बसतील? लोकसभेत गरळ ओकणार्‍या ओवेशीला निवडुन देणारे मुस्लिमच आहेत ना?आसामचा मुस्लिम खासदार दंगे करण्याची भाषा करतो त्याला निवडुन कोन देते? मग हिंदुंबद्दल बोलणार्‍या भाजप-शिवसेनेला निवडुन देण्यार्‍यावर तुमचा राग का?

In reply to by श्रीरंग

यापैकी एकाही प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहित. ++++++++++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ कध्धिही मिळणार नाहित.

प्रथमपासून भारतीय असलेले नागरिक आणि बेकायदेशीरपणे घुसलेले बांगलादेशी नागरिक (उपरे) यांच्यातली तेढच आसाममधील अशांतता आणि त्यातून झालेली हिंसा यांच्या मुळाशी आहे. याला हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप कुणीही देता कामा नये. या घुसखोरांनी आसामी लोकांच्या नोकर्‍या पटकावणे, कांहींही नागरी हक्क नसताना दादागिरी करणे वगैरे गोष्टी करून तेढ निर्माण केलेली आहे. याच्या मुळाशी कॉंग्रेसच पक्षाचे १९४७ सालापासूनचे "गठ्ठा-मतपेटी"चे धोरण आहेच. अलीकडे या धोरणामुळे काँग्रेसला झालेला फायदा पाहून "हम किसीसे 'कॉम' नहीं" म्हणत लालू, मुलायम यांचे आणि असेच इतर पक्षही हे "गठ्ठा-मतपेट्यां"चे राजकारण करू लागले आहेत हे भारताचे दुर्दैवच. यावेळी मुलायम 'उत्तर प्रदेशा'त सत्तेवरही आले. देशाची पर्वा कुणाला आहे? (पक्षपातळीवर कुणाला असलीच तर मला तरी ती आज फक्त भाजपा, रास्वसं, शिवसेना अशा कांहीं पक्षांच्याकडेच दिसते. या मुद्द्यावर कांहीं सभासदांबरोबर माझा मतभेद होणार याची मला जाणीव आहे. पण माझे तरी हेच मत आहे.) "मुंबईच्या आझाद मैदान परिसरात जे घडले तो प्रकार फक्त देशद्रोहाचाच फूत्कार आहे. मुस्लिम संघटना फतवे काढतात व त्या फतव्याबरहुकूम मुसलमान जिहादचे नारे देत रस्त्यावर उतरतात. मुंबईसह राज्याला वेठीस धरतात. ही अराजकाचीच सुरुवात आहे. मुस्लिमांची ही मस्ती देशाला महाग पडणार आहे " हे बाळासाहेबांचे उद्गार १०० टक्के खरेच आहेत. ज्यांनी या दंगली घडवून आणल्या त्यांना देशद्रोही मानून या गुन्ह्याला साजेशी कठोर कारवाई झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. बेगडी सर्वधर्मसमभाव (pseudo-secularism) बस्स झाला. दोन दिवसांपूर्वी दिग्विजयसिंगांनी आडवाणींवर टीका करताना "तुम्ही आगीत तेल ओतत आहात" असा आरोप शहाजोगपणाने केला. पण ही आग त्यांनीच ६०-६५ वर्षांपासून लावलेली आहे याचा त्यांना सोयिस्करपणे विसर पडला आहे हे स्पष्ट दिसते. पण बाळासाहेब विसरलेले नाहींत ही आनंदाची गोष्ट आहे. जय शिवसेना!

आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. आँ? "धर्मांध" असे लिहायला निघालेली लेखणी नेहमीच्या चाकोरीच्या संवयीमुळे "धर्मनिरपेक्ष" लिहून बसली कीं काय?

मी काही वर्षापासुन शिवसेनेची साथ सोडली आहे. पण परवा टीव्हीवर दंगा बघितल्या नंतर मुंबईला शिवसेनेची किती गरज आहे हे लक्षात आले.आपण किती ही समजुतदार असलो तरी ज्यावेळी अशी हिंस्त्र दंगल आपल्या दाराशी येते तेव्हा शहाणपणा आपोआप फोल ठरतो.फाळणीच्या काळात घडलेल्या दंगलीत सापडलेल्या लोकाची हालात किती वाईट झाली असेल्?

सर्वधर्मसमभाव, उदारमतवाद, अहिंसावाद,चारित्र्य, इमानदारी वै. वै ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त चर्चा करण्यापुरत्या, दुसर्‍यांना उपदेश देण्यापुरत्याच मर्यादित ठेवायच्या असतात. प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनात, आचरणात आणायच्या नसतात हे सत्य सामान्य जनतेला ठाउक नसल्यामुळेच अशा तीव्र प्रतिक्रीया उमटतात :) (देव भलं करो आणि राजकीय नेते सामान्य जनतेला हे सत्य लवकरात लवकर शिकवो) [ अवांतरः ज्यांनी कोणी स्मारक तोडले त्या व्यक्तींना कॄपया पकडण्याची किंवा अटक करण्याची तसदी घेउ नये. "कर" भरणार्‍या जनतेचा पैसा विनाकारण व्यर्थ घालवू नये. त्या व्यक्तींना स्मारक तोडल्या बद्दल करून करून कोणती शिक्षा करणार ? फाशीची शिक्षा करणार ? ती नक्कीच करता येणार नाही आणि जिथे कित्येक वर्षांपासून फाशीची शिक्षा दिलेल्या आतंकवादींना फासावर लटकवण्याची हिंमत होत नाहिये तिथे बिचार्‍या या स्मारक तोडणार्‍या व्यक्तींना तरी शिक्षा देण्याचं धैर्य कसं होणार ? जाउ द्या... हिंदीत काय म्हणतात ते "चलता है", दुसरं एक मोठं स्मारक बांधा काही करोड रुपयांचं काही लोकांना रोजगार मिळेल :) ]

या दंगलीचा निषेध, पुण्यामधील स्फोटांचा निषेध म्हणून शांततामय मेणबत्ती मोर्चा काढावा असा विचार आहे -- असो स्वातंत्र्यदिनालाही फार उत्साह वाटू नये असे वातावरण या लोकांनी केले आहे. जिथे खावे तिथेच .... अशा वृत्तीची माणसे ही. पण या देशातील भारतीयांची सहनशक्ती ही त्यांची कमजोरी समजू नये. तो जसा शांत राहू शकतो तसाच तो पेटूही शकतो. शिवाजीमहाराज चाणक्य हे आमचे आदर्श आहेत. आम्ही पेटू तेव्हा तंजावर ते पेशावर ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. ---

लादेन मारला गेल्यावर दु:खी होणारे लोक या देशात आहेत सद्दाम हुसेन ला फासावर लटकवल्यावर लखनौमधे निषेध मोर्चा काढणारेही आहेत बांगलादेशींना फटकवल्यावर आसू ढाळणारेही इथे आहेत या वृत्ती वेळीच नियंत्रणात आणायला हव्यात --

"पाकिस्तानातील अत्याचाराला कंटाळून भारतात स्थलांतर करणा-या हिंदूंना दिलासा देणारा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. या पीडित हिंदू स्थलांतरितांनी नियमानुसार मागणी केल्यास त्यांना दीर्घकालीन व्हिसा देण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानातील धर्मांध मुस्लिमांकडून गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. बंदुकीचा धाक दाखवून तरुण हिंदू मुली व नववधूंच्या अपहरण केले जात आहे. या छळाला कंटाळून अनेक हिंदू कुटुंबे तीर्थयात्रेच्या नावाखाली हिंदुस्थानात धाव घेत आहेत. यातील अनेकांना पाकिस्तानात पुन्हा जायचे नाही. मात्र, त्यांना केवळ महिनाभराचा व्हिसा मिळाला आहे. या व्हिसाची मुदत दीर्घकाळासाठी वाढवून मिळावी, अशी स्थलांतरीतांची मागणी आहे. याबाबत बोलताना केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग म्हणाले, ' दीर्घकालीन व्हिसाची तरतूद भारतात आहे. मात्र, त्यासाठी काही अटी-शर्थींच्या अधीन राहून ठराविक वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. तशी मागणी झाल्यास व्हिसा निश्चितच देण्यात येईल. ' " म.टा मधील बातमी. म्हणजे समजा काही कारणाने एखाद दुसरी अट अर्जकर्त्याला पुर्ण करता आली नाही (जीव मुठीत घेउन पाकिस्तानातून पळून आलेत... सगळीच कागदपत्रे जवळ असतीलच याची ग्यारेंटी नाही... साधे गाडीचे लायसेन काढायला गेलो तर हे घेउन या ,ते घेउन या म्हणून १० वेळा परत पाठवतात... इथे तर व्हिसा द्यायचाय) तर या कुटूंबाना जबरदस्तीने परत पाकिस्तानात पाठवणार का? या हिंदूना निर्वासिताचा दर्जा का नाही मिळणार? भारतात येउन दंगली घडवणार्‍या बांगलादेशी निर्वासीतांना इथे रेशनकार्ड मिळतात आणि या हिंदूना अटी आणि शर्ती पुर्ण करण्याची जबरदस्ती का? शिवाय वर बातमीत म्हणल्या सारखा कुठला छळ या बांगलादेशी मुसलमानांचा त्यांच्या देशात होतो म्हणून त्यांना इकडे निर्वासित व्हावे लागते? इथल्या (सर्वधर्मिय) नागरीकांना त्रास देणार्‍या बांगलादेशीं मुसलमानांना रेशनकार्डे आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूना अटी आणि शर्ती????? भारत देश्/सरकार हिंदूच्या बाबतीत आकसाने वागतोय असे वाटत नाही का? आझादमैदानाच्या धर्तीवर कराचीत्/इस्लामाबाद मधे हजारो हिंदूनी मोर्चा काढून जाळपोळ केली अशी एखादी बातमी कोणी दाखवू शकेल काय?

In reply to by आंबोळी

पाकिस्तानातील हिंदूंनी भारतात येण्या ऐवजी स्विडन, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि कॅनडा येथे आश्रय मागितला पाहिजे. या देशांना मायभूमीत जीवाचा असलेल्या लोकांना आश्रय दिलाच पाहिजे अशी तरतूद (जिनिव्हा?) आंतरराष्ट्रिय करारात आहे. या अंतर्गत, त्यांना ऑस्ट्रेलिया येथे आल्यावर काही बेसिक गोष्टी पुरवल्या जातात. इंग्रजीच्या शिक्षणाची सोय केली जाते. नोकरी मिळेपर्यंत जगण्यासाठी असा भत्ता दोन वर्षे दिला जातो. सध्या या तरतुदीचा लाभ घेऊन येथे मोठ्या इराकी, इराण, अफगाणी आले आहेत! अनेक पाकी पण अफगाणी म्हणून घुसले आहेत! आणि येतच आहेत!! त्यात हिंदू मात्र कुठेच नाहीत कारण, त्यांना अशी तरतूद आहे हेच माहिती नाही. तेव्हा कुणाला शक्य असेल तर ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचवा. अर्ज कसा कुठे करायचा वगैरे आवश्यक माहिती हवी असल्यास मी काढून देऊ शकेन. व्यनि करावा!

हारूनभाऊ >> कुठे काहीही झालं कि लगेच सरसकट सगळ्या *** वाट्टेल तसे आणि वाटेल त्या अभद्र भाषेत बोलणारे लोक मिपावर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वातंत्र्यदिना निमित्त काही चांगलं वाचायला मिळेल या आशेने फार दिवसांनंतर मिपावर आलो आणि वरील काही प्रतिसाद वाचून मन पार उद्विग्न होऊन गेलं. माणुसकी जपा एव्हडीच सगळ्यांना विनंती. आता मिपाकरांनाच सांगा माणुसकी जपा म्हणून. दंगल मिपाकरांनी केली होय ? बांगलादेशींचा फार कळवळा असेल तर तुमच्या घरातील २ खोल्या का देत नाहीस त्यांना... --

एका चॅनेलवरील चर्चेत हे ऐकले. ह्या दंग्यामधे अमुक इतक्या महिला पोलिसांना विनयभंगासारख्या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असे वाचायला मिळाले. आता एक प्रश्न असा आहे की महिला पोलिस कशासाठी उपस्थित होत्या? मोर्चे, निदर्शने यात जर बायका उपस्थित असल्यास त्यांचा बंदोबस्त करायला महिला पोलिस असतात. आता ह्या मूळ मोर्चामधे कुणी महिला दिसत नाहीत. निदान कुठल्या व्हिडियोत वा फोटोत तरी कुणी मुस्लिम महिला दिसत नाहीत. मग इतक्या मोठ्या संख्येने महिला पोलिसांना आणायला कुणी सांगितले? धार्मिक मुस्लिम मोर्चामधे मुस्लिम बायकांना स्थान नसते इतकी साधी उघड गोष्ट पोलिसांना ठाऊक नाही? हा काय मूर्खपणा आहे का निष्काळजीपणा आहे? आणि त्याकरता कुणाला दोषी ठरवणार का?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15523829.cms ह्या मोर्चात सामील झालेला आणि जिवावर उदार होऊन पोलिसांची रायफल पळवणारा वीर सलीम चौकिया पोलिसांना सापडला! वा. बहुधा "वरची" कनेक्शन कमी पडली असावीत. बघू या ह्या भाद्दराला शिक्षा होते का पारितोषिक मिळते ते!

बरखाताई म्हणतायत नॉर्थ इस्टची लोकं घरी सुट्टीला चालली आहेत. जोडून सुट्ट्या बिट्ट्या आहेत आणि सणही आहे म्हणूलोक्ते घाबरून निघून जातायेत अशा अफवा पसरवू नयेत. ज्या 'मिसइन्फर्म्ड मिसगाइडेड' वगैरे लोकांची मुखकमले सीसीटिव्ही वा फोटोंत आली आहेत त्यांना पोलिसस्टेशन इतकी सुरक्षित जागा कोणतीच नाही त्यामुळे त्यांच्या वकिलांनी सरेंडर करा असा सल्ला दिलाय पण अशा धर्मप्रिय लोकांना सण तुरूंगात काढायचा नाहीये त्यामुले इद नंतर ते सरेंडर करणार आहेत असं वाचलं

बरखा दत्त ह्या बाई फक्त करिअर माईंडेड आहेत. त्यामुळे त्या फक्त पोलिटीकली करेक्टच बोलतात. त्यांचे बोलणे नेहमी एकाच दिशेचे असते.

गृहराज्यमंत्र्यांनी "मिसळपाव" या मराठी संकेतस्थळावरील "मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???" ही गहन, सडेतोड, रोखठोक चर्चा वाचुन, सदर धाग्यावरील हृदयाला हात घालणार्या प्रतिसादांची मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीने चर्चा करुन सदर धाग्याची लिंक मा.पंतप्रधान यांचेकडे पाठविली आहे. तस्मात आमचा दिल्लीचा वार्ताहर असे कळवतो आहे की........ पंतप्रधानांनी झाल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे. आणी यापुढील प्रत्येक देशव्यापी निर्णय मी मिपावरील चर्चा वाचुनच घेईन हे नमुद केले आहे. दोषींवर कठोर्/ कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. देशातील जनतेचे संरक्षण हे आमचे पहिले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले आहे.त्यासाठी प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येईल. देशातील जनतेने अफवांवर विश्वास ठेवु नये. याव्यतिरिक्त शेवटचा गुन्हेगार जो पर्यन्त गजाआड जात नाही तोपर्यन्त मी आमरण उपोषण करेन इति. रझा अकॅडमी चालक

म्यानमारी मुस्लिमांसाठी धर्मांधांनी अमर जवान फोडला बांग्लादेशी मुस्लिमांसाठी शिकले सवरलेले धर्मपरायण गळे काढत आहेत पाकमधले हिंदू विस्थापित होत आहेत पुण्यातल्य अन बंगलोरमधल्या ईशान्य भारतीय हिंदूना पळून जावे लागत आहे. विवेकाची भाषा कोणाला कळत नसेल तर पुरोगामित्वाचे कुंकू पुसून उघड्या बोडक्याने मैदानात यावेच लागेल

लाज वाटते काल पुण्यातून २००० इशान्य भारतीय पळून गेले. आज १००० पळून गेले. इतकी वर्षे त्याना चिंकी - चिंकी म्हणून आमच्याच लोकानी हिणवले. आज दीड दमडीचे भिकार मुस्लिम गुंड त्याना धमक्या देत आहेत. त्या ईशान्येतल्या हिंदूना जिवाची भिती वाटली आणी पुण्याचे तथाकथित देशभक्त इतक्या वर्षात त्यांच्या मनात रक्षणाचा विश्वास निर्माण करू शकले नाहीत. ६५ वर्ष झाली देश स्वतंत्र होउन. अजुनही दीड दमडीच्या भिकार गुंडामुळे भारतीय नागरीकांना स्थलांतर करावे लागते. मान खाली गेली. लाज वाटली स्वत:चीच राज ठाकरेंचे आंदोलन मिडियाने चघळ चघळ चावले. त्यात १० लोक सुद्धा विस्तापित झाले न्हवते. राजना फॅसिस्ट हिटलर वगैरे ठरवले... फिरररर उगला जहर .. बर ठीक आहे.. मग ह्या हजारो लोकाना विस्थापित करणार्‍या मुस्लिमांच्या टगेगीरिला काय म्हणायचे ?