Skip to main content

नेक्स्ट इज व्हॉट ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 18/10/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी बाबांना दोन रुपये लिटरने फटफटीच्या टाकीत पेट्रोल भरताना बघितलं. आता सत्तरी गाठली (मी नव्हे, पेट्रोलने.. !!) फोन सगळ्या गावात एकादोघांच्या घरी होते. काळे जड ठोकळ्यासारखे. कटर्र कटर्र आवाज करत डायल करण्याचे. पेजर येऊन "वा.. काय टेक्नॉलॉजी आहे.." म्हणण्याच्या आत जुने झाले. आता मोबाईल सगळ्यांकडे आहे.. वरुन थ्री जी आलं.. टॅब तीनहजारात येऊ घातलाय.. फार पूर्वी पंजाबात अतिरेकी होते. मग काश्मिरात, आता मध्यपूर्वेत.. आणि जगभरात.. फास आवळतो आहे असं फीलिंग सगळीकडे आहे. आर्थिक बाबतीत आता युरोपमधे जबरदस्त क्रायसिस आहे.. आपण यातले अडाणी.. पण ऐकून ऐकून इंटरेस्ट येतोच. कंझ्युम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी वाढती लोकसंख्या नाही असं काही म्हणतात.. काही म्हणतात की वेल्फेअर पद्धतीने (कमावणार्‍यांनी रिटायरांचा भार उचलायचा) चाललेली त्यांची व्यवस्था आहे. त्यात कमावणारी लोकसंख्या आणि रिटायर्ड लोकसंख्या यांचं प्रमाण उलटं होत चालल्याने समस्या उभी राहात आहे. त्यांना कदाचित लोकसंख्या वाढवायला लागेल. किंवा बाहेरच्या देशांतून नागरिक आणावे लागतील. काहीजण म्हणतात की भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू.. उडणारी कार ही बालकथांमधे किंवा फँटसी पिक्चरमधे असायची. आता अनेक कोटींची का होईना पण शक्य कोटीतली अशी कार बनली आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर आली तरी त्यात चॅलेंजेस खूप आहेत, ट्रॅफिक आणि कायद्याचे. पण तरीही ती आता अशक्य गोष्ट राहिली नाही. मरण हे एजिंग प्रोसेसमुळे येतं.. या प्रोसेसवर इतकं संशोधन झालं की आता वय वाढण्याची प्रक्रिया अमर्यादित लांबवणं शक्य होऊ घातलंय. अर्थात मनुष्य अमर होणं हेही आता प्युअर फँटसी म्हणून मानता येणार नाही. या प्रकारे नैसर्गिक मरण टाळता आलं तरी अपघात, इजा, हत्या यांनी येणारं मरण टाळता येणार नाही. पण नैसर्गिक मरण टाळता येणं हेही नसे थोडके. सुरुवातीला हे अमरत्व महागडं असेल पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर सगळ्या नवीन शोधांच्या किंमती इव्हेंच्युअली स्वस्त होत जाऊन सर्वांना परवडण्याजोग्या होतातच. असं झालं तर मग जिवंत राहण्याविषयीच्याच शेकडो समस्या येतील. नवीन जन्म बंद करावे लागतील. स्पेसमधे प्रवास करणं हे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांना शक्य झालं होतं. आता स्पेस टुरिझम फार दूर नाही. सध्या महाग आहे पण वीसतीस वर्षांत तेही केसरी टूरतर्फे जावं इतकं सहज होईल. एड्सवर औषध अजून नाही. प्रसार झपाट्याने होतोय. तापमान वाढतंय, बर्फ वितळ्तंय. इन्फ्लेशन म्हणजे नेमकं काय? ते वाढतंय.. झिंबाब्वेसारख्या देशांत किमान लाखालाखांच्या नोटा छापाव्या लागताहेत. महागाई किती वाढेल? मुंबईत तीन वर्षांपूर्वी दहा लाखात मिळणारा फ्लॅट आज चाळीस लाखाचा झालाय आणि मुंबईच्या थोडं बाहेर दहा वर्षांपूर्वी चाळीस लाखात मिळणारा जमिनीचा प्लॉट वीस कोटीचा झालाय. किंमती अनंतापर्यंत वाढत जातील? घराची किंमत तीनशे कोटी आणि पगार एक कोटी अशी स्थिती खरंच येईल? आणखी काय काय होईल जगात? ...................................... हे सर्व वेडंवाकडं मिश्रण वर छापण्याचं कारण हे, की मला येणार्‍या शंभरेक वर्षांबाबत तुमच्या कल्पना जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या मते: कोणते शोध प्रत्यक्षात येतील? तंत्र किती पुढे जाऊ शकेल? की त्याला लोक विटतील? कोणत्या इव्हेंट्स / घटनांमुळे जगात जबरदस्त बदल होतील? आपली / आपल्या पुढच्या पिढीची लाईफस्टाईल कशी असेल? आर्थिक बाबतीत काय स्थिती असेल? माणसं सहज शंभरी गाठतील का? आणखीही अनंत मतं आणि विचार (आपापल्या वर्किंग फिल्डशी संबंधित किंवा जनरलही) आपल्या मनात येत असतील, किंवा आता येतील.. ते इथे मांडून आपली काही फोरसाईट दिलीत तर खूप आनंद होईल. आजच्या दिवसात जगावं, उद्याचा विचार करु नये अशी एक फिलॉसॉफी आहे, तिचा आदर करुन इथेच त्याची पोच देतो. कारण अशा स्वरुपाच्या प्रतिसादाने विचार पुढे जाणार नाही, म्हणून केवळ ते न म्हणण्याची विनंती करतो. मी स्वतःपासून सुरुवात करतो: काय होऊ शकेल याच्या कल्पना: -बँका फक्त मीडिएटर राहतील आणि कर्ज देऊ इच्छिणारा ग्राहक कर्ज घेऊ इच्छिणार्‍याला बँक या एजंटमार्फत थेट कर्ज देईल. -लग्न ही संकल्पना कालबाह्य -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य. ................. ............. नेक्स्ट इज व्हॉट??

वाचने 35664
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

@मदनबाण प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे १. निंदा, नालस्ती, टवाळी , चिमटे, गुद्दे , सूड, खून, बलात्कार ,पाशवीपणा ह्या गोष्टी बहुदा खूपच वाढतील असा वाटतंय. लोक सुसंस्कारित राहणार नाहीत. २. सगळ्यात मोठा परिणाम तापमान आणि पर्यावरणामुळे होईल असा वाटतंय . तसाच accidents चा प्रमाण बरंच वाढून सामूहिकरीत्या माणसं मरण्याच प्रमाण वाढेल असं वाटतंय . ३. display आणि automobile मध्ये नवीन शोध लागतील. nanotechnology चा वापर वाढेल . पण medical field मध्ये नवीन शोध लागणार नाहीत असं वाटतंय. माणसं वयाची ३० तरी गाठतील कि नाही अशी शंका आहे . :-( ४. धर्मसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. जगबुडी होऊन भयानक मानवसंहार झाल्यानंतर (तरी) माणसाचा देवाच्या अस्तित्वावर पुनर्विचार होईल. ५. लग्नसंस्था अस्तित्वात रहाणार नाही. माणसं प्रजननासाठी लैंगिक संबंध ठेवणार नाहीत. क्लोन्स आणि टेस्ट्ट्यूब बेबीजच होतील.

भारत, ब्राझील वगैरे देशांकडून हे युरोपियन मदत मागतील.. कोणी म्हणतात की त्याबदल्यात आपण त्यांना अटी घालू आणि आपल्या लोकांना तिथे पाठवू..>> असे झाले तर फार छान ! -लग्न ही संकल्पना कालबाह्य / कुटुंब व्यवस्था नामशेष ! -भारतीयांना अमेरिका / युरोप यांचे दरवाजे पुन्हा सताड खुले. -अवकाशप्रवासाची सहज उपलब्धता -एड्स / कॅन्सरवर मूलगामी उपाय -मानवी मेंदूची मेमरी अन्य डिव्हाईसमधे ट्रान्सफर करुन घेणे शक्य.>> हे शक्य आहे!

अद्भुत भाग ३ प्रेषक, मंदार कात्रे, Sun, 10/03/2013 - 08:35 8 आज आपण एक नवीन तंत्र अभ्यासणार आहोत. त्याला Future Progression असे म्हणतात.अमेरीकेतील काही तज्ज्ञ संशोधक आणि Hypnotists यांनी हे तंत्र शोधून काढले आहे. दुसर्याा दिवशी पहाटे तीन वाजता पुन्हा गुरुजींनी त्याला उठवले. ध्यानाच्या गुंफेत गेल्यावर परत कालप्रमाणेच सम्मोहन सुरू झाले. ...... मी 1 ते 10 अंक म्हणतो.... आता तू भविष्यात जाणार आहेस. हे 2236 साल आहे.तुझ्या आसपास जे घडत आहे ते मला सांग पाहू....................... तुझे नाव काय? बार्बरा पुखरेस्ट तुझे वय काय? 134 वर्षे मी न्यू टेक्सास अंडरवॉटर सिटीमध्ये असते. तुझ्या नावावरून तू एक स्त्री आहेस हे मी ओळखले. तुला मी बार्बरा म्हणून हाक मारू का? हो चालेल ना. तुझे वय इतके जास्त कसे? आणि तुम्ही पाण्याखाली कासेकाय राहता? इ.स.2120 साली लागलेल्या काही आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधांमुळे मानवाचे आयुर्मान वाढले होते . सध्या मानवाचे सरासरी आयुर्मान 200 वर्षे आहे. कॅन्सर आणि एड्स सारख्या रोगांवर आता गोळ्यांचा तीन महिन्यांचा एक कोर्स पुरा केल्यास कॅन्सर आणि एड्स सुद्धा बरे होतात. मृत्युचे प्रमाण कमी झाल्याने आणि वयोमान वाढल्याने पृथ्वीवर लोकसंख्या बेसुमार वाढली . आणि त्यामुळे सर्वांना राहायला,पोसायला जमीन कमी पडू लागली. त्यामुळेच अंडरवॉटर आणि अंडरग्राऊंड सिटीज बनवल्या गेल्या. ................ तुझ्याबरोबर आणखी कोण आहे?/ अॅन आहे तो कोण आहे? अर्धमानव म्हणजे? म्हणजे मानवी शरीराशी तंतोतंत जुळणारी तशीच यंत्रणा वापरुन कृत्रिम-रित्या बनवलेला रोबोट .फक्त दर आठवड्यातून एकदा त्याला रीचार्ज करावे लागते... आणि त्या रोबोमध्ये अॅलेक्स नावाच्या एका व्यक्तीचा आत्मा आहे ,जो 2057 साली मृत झाला होता. तो कसा काय? 2187 मध्ये एक नवीन महत्त्वपूर्ण शोध लागला ज्याने मानवी जीवन आणि मृत्यू यांच्या परिभाषाच बदलून टाकल्या . या शोधामुळे ज्या मृत व्यक्तींचे आत्मे astral plane वर suspended animation या अवस्थेत आहेत, त्यांना रोबोटमध्ये implant करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. अच्छा. म्हणजे हे भुतानी माणसांना झपाटण्या सारखेच दिसतेय... नाही.अगदी तसेच काही नाही. पण पूर्वीच्या काळात दुष्ट आत्मे सामान्य माणसांना झपाटून त्रास द्यायचे ,पण आता तसे होत नाही. Astral plane वर आता कायदा आणि सुव्यवस्था आहे. गुंड आणि समाजविघातक दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्याना रोबॉट्स मध्ये प्रवेश नाकारला जातो. अच्छा ,मग या अॅनला म्हणजेच अॅलेक्सला पूर्वीचे काही आठवते का? हो. तो जीवंत असताना 2010 साली त्याने हिमालयात जावून साधना केलेली होती. रोहन देसाई नावच्या मित्राबरोबर त्याने एका तिबेटी मठात बुद्धिस्ट गुरूंकडून दीक्षा घेतली होती. अच्छा ,म्हणजे आता अॅन आणि तुझे संबंध कशा प्रकारचे आहेत? अॅन एक पुरुष रोबोट आहे आणि मी एक जीवंत स्त्री. पण तरीही आम्ही जोडीदाराप्रमाणेच राहतो. म्हणजे नवरा-बायको? हो. आणि शारीरिक संबंध देखील? त्यात काय विशेष?अॅन अन्य कोणत्याही जीवंत पुरुषा पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मला तृप्तिचे सुख देवू शकतो. फक्त त्याच्याकडून अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कृत्रिम fertility centre ची मदत घ्यावी लागते. असे का? कारण 21 व्या शतकाच्या उत्तरार्धात ढासळलेल्या पर्यावरण संतुलनाचा दुष्परिणाम , अन्नातील विषारी औषधांचा दुष्प्रभाव आणि सेक्सविषयीच्या लोकांच्या अतिविकृत संकल्पना ,तसेच अनियंत्रित सेक्स यामुळे मानवाची जनन-क्षमता कमी झालेली होती. यास्तव मग कृत्रिम-रीतीने स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग मशिनद्वारे करून प्रयोगशाळेत मानव जन्माला घातले जावू लागले. ही सर्व बालके अतिशय सुनियंत्रित वातावरणात आणि आवश्यक ती सर्व पोषकद्रव्ये देवून ,रोगप्रतिकारक औषधे देवून वाढविली जातात. आणि बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर आई किंवा बाबांच्या ताब्यात दिले जाते. आई किंवा बाबा? का? कपल्स नाहीत का? बरेच पुरुष व स्त्रिया अर्धमानवा सोबतच राहतात . काही तर पूर्ण यंत्रमानवा सोबतही! त्यामुळे आजकाल शुद्ध मानवी जोडी पाहायला मिळणे मुश्किलच आहे. नाही म्हणायला भारतात काही ठिकाणी अजूनही पूर्ण मानवी कपल्स आहेत. जे देवांची पूजा आणि देवळांची व्यवस्था वगैरे पाहतात ! ...... http://www.misalpav.com/node/24187

रोहित शेट्टी अॅन्ड ग्रेन्डसन्स प्राॅडक्शनचा स्पेस शटलच्या अवकाशात उसळणार्‍या टक्कर असलेला 'गोलमाल १००' नावाचा टूकार चित्रपट येईल.

धागा वाचून सुहास शिंरवळकरांच्या अनुभव पुस्तकातील "योगायोग" या कथेची आठवण झाली. पुढे काय? याचं अगदी तंतोतंत वर्णन त्यांनी त्या कथेत केलं आहे. :)

The Island, oblivion इ. व इतर हॅालिवुडपटात यथार्थ चित्रण आहेच, परंतु अंतिमत: प्रेम ही भावना राहीलच. बाकी प्रदूषण व भेसळ यामुळे "सिडलेस" मानव जमात निर्माण होऊन मानवाचा निसर्ग मार्ग मोडुन निसर्गावर मात केल्याच्या आविर्भावात "वैज्ञानिक शोध" ने उपकृत भावना जोपासली जाईल. पुढे जाऊन मानवी मनातील विचारांवर नियंत्रण इथपर्यंत झेप/मजल जाईल का? हा प्रश्न.

आत्ताच्या मानवाच्या लोभी आणि हव्यासामुळे काय होउ शकते ह्याचे उत्तम चित्रण WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय. ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा.

In reply to by एक एकटा एकटाच

WALL-E ह्या अनिमेटेड चित्रपटात फार चांगल दाखवलय.ज्यांनी हां चित्रपट अजुन पाहिला नाहिए त्यांनी तो आवर्जुन पहावा. या चित्रपटा बद्धल बरंच ऐकल आहे,पहावयास हवा. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

In reply to by गवि

४ जी बद्धल अजुन जास्त वाचलं नाहीये... परंतु मागच्या वर्षी फास्ट इंटरनेट टेस्ट घेतली होती त्याचा एक दुवा दिल्याचा आठवतो. तो परत इथे देतो. 'Fastest ever' broadband passes speed test स्मार्ट टिव्ही एक वेगळा बदल घडवेल का ? याचा हल्ली विचार करतोय. सध्या याचा अनुभव घेतोय आणि स्मार्ट टिव्हीवर मिपा वाचन तसेच युटूब पाहताना मजा आली. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ने ब्राह्मोस मिसाईल अन सुखोई 30 एमकेआय एकत्र केलेत , बहुतेक हे जगात पहिल्यांदा झाले आहे !! , तसेही ब्राह्मोस हे जगातले सर्वाधिक घातक क्रूझ मिसाईल समजले जातेच, ह्या एका तांत्रिक प्रगतीमुळे परत एकदा ताकदीचा तराजू भारताच्या बाजूने झुकला आहे, भारतीय वायुसेना अन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अभियंते तंत्रज्ञ अन वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन

एच आय व्ही वर औषधे आहेत.

https://m.economictimes.com/news/international/business/china-introduce… ५० वर्षे सलग चालणारी बॅटरी आणि तीही नाण्याइतक्या आकाराची. आण्विक बॅटरी इतक्या छोट्या आकारात येणे हा मोठा ब्रेक-थ्रूच आहे.