Skip to main content

९/११ कारस्थान - काहि शोध

लेखक वडिल यांनी बुधवार, 22/12/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत. मायकल मोर सारख्या डाररेक्टर ने ९/११ फॅरनहाइट नावाचा बोधपट हि काढला आहे. ९/११ मागे कारस्थान हे कुणा १५ इस्लामी युवकांचे नसुन ते बहुतेक एका मोठया गुप्त यंत्रणेचे असावे असे अनेक पुरावे पुढे येत आहेत. गेल्या दहा वर्षात वयैक्तिक रित्या मला हि हे कारस्थान अमेरीकी सिआय ए मधिल काहि लोकांनी घडवुन आणले आहे असे वाटत आहे. ह्या कारस्थाना चा ठोक असा काहि पुरावा अमेरीकी सरकार देवु शकत नाहिये. १५ इस्लामी जिहादि इतक्या मोठ्या प्रमाणावर काहि करु शकतील असे पुरावे नाहित. गेल्या दहा वर्षात "बीन लादेन" नावाच इसम ह्या मागे आहे असे काहि पुरावे नाहित. "बीन लादेन" असा कोणी आहे का नाहि हि सुध्दा शंका आहे. ज्या इमारती पाडण्यात आल्या त्या केवळ २ तासात दोन विमानांनी पाडण्याची शक्यता कमी आहे. त्या अनेक स्फोट घडवुन २० मिनीटाच्या अंतरात पडल्या असे पुरावे आहेत. ९/११ च्या घटने च्या आधि केवळ १ आठवडा ह्या इमारतींचे विमे उतरवण्यात आले होते आणि ज्या लोकांना ह्याचा फायदा झाला ते सर्व ज्यु किंवा उच्च पदस्त सरकारी गुप्त हेर खात्यातील अधिकारी होते. ९ /११ ला पडलेल्या इमारती ( वर्ल्ड ट्रेड सेन्टर) मधे काम करणारे ४५% उच्च अधिकारी हे ज्यु होते पण ९/११ /२००१ ह्या दिवशी सर्व गैर हजर होते. मेलेल्या २००० लोकांन मधे फक्त १०-१५ ज्यु लोकांचा समावेश आहे. ९/११ घटने सारख्या घटने ची कवायत अमेरीकि गुप्तहेर संघटने ने १९९६ मधे केली होती अशी नोंद आहे. असे अजुन अनेक पुरावे आहेत. ९ /११ मुळे सर्वात फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो जॉर्ज बुश, चेनी आणि त्यांच्या मित्रांचा. शिवाय सर्व जागाकडुन मिळालेली सहानुभुती, अफगाणिस्तान आणि इराक वर हल्ले करण्याचे कारण ! ९/११ चे कारस्थान कोणी रचले हे जरी आत्ता सांगता येत नसेल तरी ते फायद्याचे मात्र जॉर्ज बुश, अमेरीका आणि काहि निवडक ज्यु लोकांचे होते हे खरे ! अमेरीकेचे खरे रुप जगापुढे येत आहे. विकिलिक्स हि ह्याची सुरवात आहे. ( अनेक पुस्तके आणि संस्थळे उपलब्ध आहेत जेथे हे पुरावे उपलब्ध आहेत)

वाचने 15387
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by श्रावण मोडक

अजुन ष्टार्सची वेंट्री नाय आली(म्हंजे सकाळ नसंल उजाडली..) . पॉपकॉर्न इंटरव्हलच्या टैमाला आणू. सध्या बसल्या बसल्या फक्क्या मारायला चणे-फुटाणे आणलेत आणि चपटी! या हिकडं...ह्या खुर्चीव बसा.. :)

अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ? http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे. अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?

In reply to by गांधीवादी

मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं. बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्‍यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं. इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्‍याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!

या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.

पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.

In reply to by अमोल खरे

का बरं ? अमेरीका काहिहि करु शकते... आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ? लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ? या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे. त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !

कॉन्स्पिरसी थियर्‍यांची जगात कमी नाही! (भारतातदेखिल कॉन्स्पिरसी थियर्‍यांचा एक मोठ्ठा कारखाना मध्य भारतात कुठेशी आहे, असे म्हणतात बॉ!)

अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्‍यातही त्याचा cunningness झळकून येतो. लाख छुपाओ छुप ना सकेगा राज ये कितना गहरा, दिल की बात बता देता है, असली नक़ली चेहरा !!

In reply to by वाहीदा

चंद्र स्वारी बद्द्ल काहि पुरावे नाहित... जे एफ केनडि चा खुन मात्र एक मोठे कारस्थानच होते हे नक्की.

२६/११ चा हल्ला पण भारताचीच कॉन्स्पिरसी आहे, कसाब हा खरं म्हणजे हिंदू आहे असं काहिसं कुठल्यश्या पाकी दूरचित्रवाणीवर दाखवलेलं आठवलं!

In reply to by वडिल

कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता? पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय). (भारतीय) अर्धवटराव

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत व्हायला प्रत्यवाय नसावा!! -चिंबोरी

In reply to by पिवळा डांबिस

बिका आणि पिडाकाका ह्यांनी सहमत असण्याचे मी समर्थन करतो. - छोटा डॉन

आता २६/११चा मुंबईवरील हल्ला आणि आधीचे भारतावर झालेले इतर दहशतवादी हल्लेही भारतानेच घडवून आणले असल्याचा शोधही लवकरच लाग्न्ण्याची शक्यता आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

अपुर्व .... जगात काहिहि अशक्य नाहि. अमिताभ बच्चन जीं चा "डॉन" हा सिनेमा तुम्हि पाहिला आहे का? खरा "डॉन" कोण हे शेवट पर्यंत कोणालाहि कळत नाहि.

९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो. दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे हसण्यावर घेण्या सारख नाहि हो बिपिन साहेब. इथे पुरावे आहेत. दहा वर्ष शोध झाला आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से... कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका) जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !! ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)

जाउ दे हो वाहिदा जी. बहुतेक बिपिनजी त्यांच्या हैद्राबादि आणि पाकिस्तानी बांधवां बद्दल काहितरी द्वेष बाळगुन असतील.

In reply to by वडिल

बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्‍यातील नाहीत येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही. सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच असो ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा

In reply to by वाहीदा

पावतीबद्दल धन्यवाद. मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.

मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..) राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून).. वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by योगी९००

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. बघु कधी वेळ मिळतो ते.

In reply to by वडिल

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. वा..!! लवकर लिहा ..वडिल जी तुम्ही एकदम कारस्थानी दिसता..

In reply to by योगी९००

खादाड माउ जी, प्रत्येक शोधकर्त्या ने किंवा वार्ताहाराने ( जरनालिस्ट) सजग राहुन प्रत्येक माहिती ला त्रयस्त पणे पहाणे जरुरीचे असते. तसेच मी करतो. कुठल्याहि गोष्टि वर १००% विश्वास ठेवणे चुकिचे असते. म्हणुन कुठल्याहि राजकारणी किंवा धार्मिक नेत्या वर कधिहि विश्वास ठेवु नका ! भले लोक तुम्हाला कारस्थानी म्हणो किंवा अजुन काहि !!!

In reply to by वडिल

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे लिहा लिहा. एका दिवंगत पंतप्रधानांची हत्या झालीच नाही. म्हणे. अतेरेक्यानी त्यांच्या डमीलाच ठार केले. त्या डमीचा देहसुद्धा मिळाला नाही. मात्र अतीरेक्याचा देह छिन्न्विछीन्न अवस्थेत काहोइना मिळाला. अतीरेक्याचा कॅमेरा सुद्धा एकदम सुस्थितीत मिळाला अर्थात ठार करणारे सुद्धा अतीरेकी नव्हतेच म्हणे.

In reply to by योगी९००

तुम्ही एकदम सी आय ए व के जी बी ची कटकारस्थाने अशी जगासमोर आणली तर मिपा वरील असांज अशी पदवी नक्कीच मिळेल .

भोपाळची वायु गळती अमेरीकेच्या रासायनिक युद्धाच्या तंत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून केलेला प्रयोग होता.

In reply to by रणजित चितळे

मी तर बरेच वेळा असेही ऐकले आहे कि 'मनमोहनसिंग नामक कोणी एक गृहस्थ ह्या देशाचे पंतप्रधान आहेत' म्हणे. लोक काय काहीही बोलतात.

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
मी असं ऐकलं आहे की हे तिघंही खरं तर जिवंत आहेत. त्यांचे तथाकथित मृत्यू ही कॉंग्रेसने सरकारी यंत्रणा वापरून निर्माण केलेली नाटकं होती. तसंच महात्मा गांधींची हत्या हेदेखील एक नाटकच होतं, असंही ऐकलं आहे. टिळकांच्या अस्तानंतर लयाला जाणारी मराठी ब्राह्मणांची अस्मिता कायमची खच्ची करण्यासाठी रचलेलं. कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. नक्की कशावर विश्वास ठेवावा कळत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

In reply to by रणजित चितळे

तुम्ही देखील मला माफ करा, कारण माझा युद्ध घडल्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता. कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे उघड सत्य घटनांवर कशा सहजपणे शंका घेतात हे दाखवण्यासाठी काहीतरी टोकाची उदाहरणं घेऊन (तिरकसपणे) मुद्दा मांडत होतो. कॉन्स्पिरसी थियरी मानणाऱ्यांना कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. कोणावरच विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक उत्तरात ते खुसपट काढू शकतात. म्हणून ते बहुतेक वेळी हास्यास्पद असतात.

In reply to by राजेश घासकडवी

>>कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. >> का? तुम्ही योजना तयार केली होती का काय? बोलण्यात काहीतरी तारतम्य बाळगा. कारगील युद्धात तुमच्या घरातलं कोणी शहीद झालं आहे का? असतं तर तुम्ही असा उचलली बोटं आणि लावली कीबोर्डाला, असा प्रकार केला असतात का?

In reply to by यशोधरा

आधीची उदाहरणं नीट वाचली असतीत तर हे तिरकसपणे लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. कोणीतरी केलेलं भंपक विधान मी ऐकलं, असं मी म्हटलं. याचा अर्थ मी त्यावर ठामपणे विश्वास ठेवतो असं मानून एकदम चिडू नका. वदंतांचं वर्णन म्हणजे सत्यावर विश्वास असा निष्कर्ष काही तोडफोड करणाऱ्या फलटणीच काढतात असं वाटत होतं.

In reply to by राजेश घासकडवी

तिरकस लिहिलंत हे लक्षात आलंच होतं. तरीही काही बाबतीत लेखणी चालवता येते म्हणूनच केवळ, आणि तिरकस बोलता येतेच केवळ, म्हणून तसे करायलाच पाहिजे असे नाही. कारगिल कदाचित काही जणांसाठी केवळ अनेक युद्धांपैकी एक युद्ध असू शकेल, पण काहीजणांसाठी तसे नसण्याचीही शक्यता आहेच. असो. चिडले नव्हते. इतके बेजबाब्दार विधान पाहून खेद झाला, पण चालूदेत.

कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

धार्मिक धाग्यांवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी स.मं. ने एक आयडी तयार करून असे धागे टाकण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि याचे पुरावे आहेत. -आजोबा.

In reply to by गांधीवादी

असं काय करताय तीर्थरूप? अमेरिकेला, शुद्धलेखनाला, आणि तार्किकतेला शिव्या घालायला मिपावर पुरावा लागत नसतो!!!