मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नमालिका

हेरंब · · काथ्याकूट
स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या देशासमोर प्रामुख्याने गरिबी, अशिक्षित वर्ग असे दोन तीनच प्रश्न होते. स्वप्नं मात्र भरपूर होती. आता इतक्या वर्षांनंतर पाहिले तर काय दिसते? सगळ्या स्वप्नांचा चुराडा आणि भरपूर जटील प्रश्न! सरकारी संस्कृतीप्रमाणे कुठलेच प्रश्न मुळाशी जाऊन सोडवायचेच नसतात. आता जे मोठे प्रश्न आहेत त्याची जंत्री पहा. १. काश्मीर प्रश्न २. अतिरेकी ३. नक्षलवाद ४. बांगलादेशी घुसखोरी ५. स्थानिक पक्षांची दादागिरी ६. भ्रष्टाचार ७. नैतिक अवमूल्यन ८. रुपयाचे अवमूल्यन ९.प्रदूषण १०. जातिवाद ११. आरक्षण १२. अंधश्रध्दा १३. भाववाढ १४. लोकसंख्या ही यादी अशीच वाढणे शक्य आहे. पण मला तरी बहुतांशी सर्व प्रश्नांचे मूळ हे अमाप लोकसंख्या हेच आहे असे वाटते,आणि सरकार या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे. यातले कुठले प्रश्न नजिकच्या काळात निकाली निघतील असे आपल्याला वाटते?

वाचन 2656 प्रतिक्रिया 0