काही समस्या पुरातन असतात आणि त्या त्या काळात त्यावर काढले गेलेले उत्तरही नेहमीच वादात अडकलेले असते असे आढळते.
पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो.
तसेच काहीसे सचिन आणि ठाकर्यांच्या वादात घडले. सचिनने विनाकारणच मूंबई सर्वांची असे मत व्यक्त केले आणि माध्यमानी जसे काही मराठीमाणूस आपणास भारतीयाच्या भुमिकेपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि ठाकरे म्हणजे देशाचे शत्रूच आहे असे त्यांना आणि देशातील विचारवंताना हवेहवेसे मत मांडायला सुरवात केली. नकळतच मराठ्यांच्या दुहीचे, मतमतांतराचे दर्शन झाले.
सचिन आणि ठाकरे या दोन प्रवृत्ती आहे, एक राजकारणाचे प्रतिनिधीत्त्व करतो तर दुसरा खेळाचे प्रतिनिधीत्त्व करतो. दोन्ही मान्यवरांचे क्षेत्र आणि योगदान वेगळे आहे.
सचिनची प्रतिक्रिया अथवा मत काहीही असो, परंतु त्यावर जो काही निष्कर्ष काढला गेला तो मराठी माणसांवर अन्याय करणारा आहे.
सचिनच्या एका मताने सावरकर, गोखले, विनोबा, आंबेडकर ते यशवंतराव यासर्वाच्या मराठी असूनही देशाच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले किंवा मराठ्यांनी देशासाठी काहीच केले नाही, संकुचित प्रांतप्रेमी असा ठसा माध्यमांना निर्माण करता आला.
सचिनने हा प्रश्न टाळायला हवा होता अथवा मूंबईच का सर्व देश सर्व देशवायीयांसाठी आहे असे उदार वादी मत व्यक्त क्रावयाला हवे होते.
सचिन खेळाच्या बाबतीत निवृत्तीच्या जवळ असेल आणि एखाद्या पक्षाच्या वळचणीला जाऊन काही पद मिळवायचे असेल तर वेगळीच गोष्ट आहे आणि आपण सर्वजण त्याच्या जाळ्यात अडकलो असे ही मान्य करावयाला हवे.
त्याचबरोबर उद्धव किती दिवस मौन ठेवणार हेही समजत नाही. अश्या प्रतिक्रिया त्याने द्यायला हव्या, बाळासाहेबच्या भुमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे, या वयातही त्यानी असा वार आणि प्रतिकार करावा हे त्यांच्या लढाऊ बाण्याचे निदर्शक आहे.
बाळासाहेबातील कलावंतच त्यांच्यातील राजकारण्याचा पराभव करत असतो असे परत एकदा सिद्ध झाले असे म्हणा तर ( पुल, नाना पाटेकर आणि आता सचिन).
असे प्रकार बघितले तर, मराठ्यांचे नष्टचर्य अजून किती दिवस चालणार हे एक तो देवच जाणो?
वाचन संख्या
12217
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन शैली छान्....विषय जुनाट
सहमत...
सहमत...
सुहासशी सहमत
असहमत
In reply to सुहासशी सहमत by jaypal
अवांतर
मराठी
In reply to अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा घ्या शशी थरूर यांचा quote
अहो
+१
In reply to अहो by आण्णा चिंबोरी
ठाकरेचा
In reply to अहो by आण्णा चिंबोरी
जोही
In reply to ठाकरेचा by निमीत्त मात्र
सगळे भडवे
+१
In reply to सगळे भडवे by विसोबा खेचर
+२
In reply to +१ by छोटा डॉन
+३
In reply to +२ by अवलिया
+४
In reply to +३ by निखिल देशपांडे
+५
In reply to +४ by योगी९००
+५.१
In reply to +५ by प्रभो
+६
In reply to +५ by प्रभो
+७
In reply to +६ by परिकथेतील राजकुमार
एक वेगळाच प्रश्न
इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.
+१ इंद्र
In reply to इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा. by नर्मदेत ला गोटा