Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Fri, 03/06/2009 - 19:38
  • Log in or register to post comments
  • 4528 views

प्रतिक्रिया

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 03/06/2009 - 20:47

Permalink

वादाचा प्रश्न नाही..

१)त्याचा केवळ एकच ध॑दा नाही,विमान क॑पनीही आहे,ही बाजु ही बघायला हवी २)आता ते जे $1.8 million भारतीय नागरी॑का॑चेच आहेत,असेही मी म्हणु शकतो. विजयाकडे केवळ विजय म्हणुनही बघता येईल..बाकी विजय मल्ल्या काय आणी आणखी कोणी काय्..शेवटी तो भारतीयच ना !! आणी काँग्रेस पक्ष काय आणी तत्कालीन सरकार काय ? वस्तु परत आल्या ह्याचा आ॑नद..बाकी काय सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 03/07/2009 - 00:07

Permalink

>>काँग्रेस

>>काँग्रेस पक्षाच्या अंबिका सोनी म्हणाल्या ते आमच्यामुळेच झाले लाज कोळुन पिणार्‍यांकडुन अजुन काय अपेक्षा असाव्यात. ह्यांना जर इतकी चिंता होती त्या वस्तु भारतात आणायची तर जमवायचा होता निधी. काँग्रेसच्या मंत्र्या/संत्र्याकडे काय कमी पैसा आहे काय. दुसर्‍याच्या जिवावर पोट भरायची यांची खोड आहे, ती काय अशी सहजासहजी जाणार आहे? बाकी ह्या वस्तु भारतात आल्या याचे काही सुखदु:ख नाही. तोच पैसा काही विधायक कार्यात वापरला गेला असता तर अजुन बरे झाले असते. बाकी पैसा माल्यांचा, त्यांनी खर्च केला .. आपण बोलनारे कोण? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Sat, 03/07/2009 - 00:30

In reply to >>काँग्रेस by सुक्या

Permalink

एकदम सहमत.

एकदम सहमत. आपण बोलणारे कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 03/07/2009 - 00:20

Permalink

अश्या

अश्या व्यवहारांनध्ये विजय असा कोणाचाच नसतो. वाईट किंवा अतिवाईट यांच्यात काय निवडणार? फारतर असं म्हणता येइल की फायदा कुणाचा झाला? तर विजयसाहेबांचा झाला. करून सवरून शहाणे असतात लोक.... तसे. आत्ता पैसे असल्यामुळे म्हणा, ते काम करणे शक्य असल्यामुळे म्हणा किंवा महान कामामुळे प्रतिमा आधी व व्यापार थोडा नंतर उजळून निघणार असेल तर का पोळी भाजून घेऊ नये? असा प्रकार वाटतोय मला तरी! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Sat, 03/07/2009 - 02:15

Permalink

दारुबंदीचा

ज्या बापुंनी कायम दारुबंदीचा आग्रह धरला त्या बापुंच्या वस्तु विजय माल्या सारख्या दारुसम्राटाने परत मिळवल्या :( ...........याला काय म्हणावे :?. :? ............बापुंच्या वस्तु आधी देशाबाहेर गेल्याच कश्या?आणि जर गेल्याच तर गांधीवादाचे फुका गोडवे गाणार्‍या काँग्रेसला त्या परत मिळवणे का जमु नये?....................स्वतःच्या तुंबड्या भरुन गलेलठ्ठ झालेले काँग्रेसचे नेते इतके निर्धन (भिकरी असे वाचावे)असतिल असे वाट्ले नव्हते. असो बाकी ह्या वस्तु भारतात आल्या याचे काही सुखदु:ख नाही. तोच पैसा काही विधायक कार्यात वापरला गेला असता तर अजुन बरे झाले असते. बाकी पैसा माल्यांचा, त्यांनी खर्च केला .. आपण बोलनारे कोण? हे मात्र अगदी बरोबर्.............. अवांतर-.आता माल्या शिवरायांच्या वस्तु देखिल परत मिळवणार आहेत म्हणे? तो सोनियाचा दिवस उजाडण्याची वाट बघण्यातच हयात जायची बहुदा!!!!!!!!!!! "अनामिका"
  • Log in or register to post comments

Submitted by मृदुला on Sat, 03/07/2009 - 02:58

Permalink

मल्ल्या

विजय मल्ल्यांचाच! :-) प्रसिद्धीपरी प्रसिद्धी आणि गुंतवणुकीपरी गुंतवणूक.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 03/07/2009 - 12:10

In reply to मल्ल्या by मृदुला

Permalink

मार्मिक

मृदुला यांच्या मार्मिक टिपणीशी सहमत प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 03/07/2009 - 15:13

In reply to मार्मिक by प्रकाश घाटपांडे

Permalink

+१

+१ गांधीवाद्यांची गोची होणार काय? १) गांधीजींच्या वस्तु दारुनिर्मीती करणार्‍या माणसाने घेतल्या, चालते का गांधीवादात? २) बर परत आपल्या ताब्यात घ्यायच्या तर इतकी रक्कम खर्च होणे गांधीजींना आवडले असते का? चालते का गांधीवादात? पुढे मागे उद्योगपतीसाहेबांना १) सरकारकडून जर काही फायदा मिळू शकला नाही तर वेळ आलीय माझ्यावर म्हणुन परत त्या वस्तु विकायला काढायचा पर्याय समोर असेल व विनाकारण लोकांच्या भावना वर खाली. २) किंवा उद्या सरकारला हे जादा भावाने विकत देउन अजुन फायदा. सध्या तरी फायदा फक्त मल्या यांचाच.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 03/07/2009 - 09:45

Permalink

बघा! बापूंच

बघा! बापूंच्या वस्तू भारतात परत आणायला शेवटी आमचा दारुवालाच उपयोगी पडला..! पण आम्ही उलट्या काळजाचे. दोन ऑक्टोबरला ड्राय डे पाळतो. साला अजब न्याय आहे जगाचा..! असो... रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम..! आपला, (किंगफिशर प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Sat, 03/07/2009 - 09:55

In reply to बघा! बापूंच by विसोबा खेचर

Permalink

>>पण आम्ही

>>पण आम्ही उलट्या काळजाचे. दोन ऑक्टोबरला ड्राय डे पाळतो. साला अजब न्याय आहे जगाचा..! वा तात्या!!! पटलं... >>(किंगफिशर प्रेमी) तात्या. किंगफिशर (बिअर आणि कॅलेंडर :)) प्रेमी, सुचेल तसं Finally I will be so matured that I will react to nothing.
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sat, 03/07/2009 - 11:52

In reply to बघा! बापूंच by विसोबा खेचर

Permalink

तात्या,

तात्या, तुमचेच काय सगळ्या दारुप्रेमींचा हातभार आहे, ह्या वस्तु आणायला. तुम्हीच खरे बापु भक्त गांधीवादी बाकीचे नुसते बोलबच्चन :) ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 03/07/2009 - 19:05

In reply to तात्या, by सखाराम_गटणे™

Permalink

मस्त

तात्या, तुमचेच काय सगळ्या दारुप्रेमींचा हातभार आहे, ह्या वस्तु आणायला. हे एकदम मस्त! जनतेची संपत्ती, जनतेच्या संपत्तीचा उपयोग करून जनतेच्या "खर्‍याखुर्‍या प्रतिनिधीने" परत आणली! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by chipatakhdumdum on Sun, 03/08/2009 - 15:04

In reply to मस्त by विकास

Permalink

ऐ ऐ मी सूढढा

म्हन्जे काय ? आमी सात पन्चेचालीस चा टायम चूकवत नाय, तो उगाच काय ? पैल्या गलसाच्या भाएर चार ठेम्ब टाकतो, तेवडा तरी आमचा टेकू हाये ना..?
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sat, 03/07/2009 - 11:44

Permalink

हा नक्की विजय आहे का?

हा नक्की विजय आहे का? काँग्रेसला (आणि सर्वच मोठ्या राजकीय पक्षांना) सवयच झाली आहे झाले त्याचे श्रेय लाटण्याचे. देशाची ज्या गोष्टींत वाट लावली त्याचेही श्रेय जाहीरपणे घेउन टाका, मग सुटतील सगळे. ज्या गांधीवाद्यांनी ह्या वस्तू देशाबाहेर जायला मदत केली त्यांचा आणि त्यांच्यामुळे आज ज्या परदेशी नागरीकाला $1.8 million मिळाले त्याचा? इथे दिलेल्या बातमीनुसार गांधीजींनीच त्या वस्तू प्रेरणा म्हणून दिल्या होत्या. ज्या काँग्रेसने आता एका अर्थी गांधीजींच्या संदर्भातील यश स्वत:च्या पदरात खेचून घेत आहे असे असत्य सांगत गांधीवादातील मूळ तत्वालाच धाब्यावर बसवले त्यांचा? मुळात गांधीजींनी सांगितले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करा. त्यांच्या ह्या तत्वालाही धाब्यावर बसविले त्यापुढे इतर काय? विजय मल्यांचा, ज्यांनी त्यांचा उद्योग, हा उद्योगातील नितीनियम लक्षात घेऊनच चालवला आणि त्यातील यशाचा उपयोग हा परत एका अर्थी ऐनवेळेस धावून देशाला मदत करायला केला त्यांचा? ("एका अर्थी" अशासाठी म्हणले कारण त्यांना यात प्रसिद्धी मिळणार त्याचा ते फायदा घेतीलच. म्हणजे १००% निस्वार्थी नाही, जरी कौतुकास्पद असले तरी) माझे सध्या काही मत नाही. का गांधीजी आणि गांधीवादाचा? कारण आज ६० वर्षांनी देखील भारतातील जनतेस त्यांचे कसे का असेना पडले होते आणि त्यातील एकाने परत त्यांच्या आठवणी घरी आणल्या. गांधींचा विजय वाटत नाही. त्यांच्या नावाचा उपयोग फक्त फायदा करून घेण्याकरीताच होत असेल तर नक्कीच नाही. गांधी जयंतीलाच जर दारू बंदी असूनही त्याची सर्रास विक्री आणि सेवन चालू असेल तर मग गांधीजी आणि गांधीवादाचाही विजय वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on Sat, 03/07/2009 - 19:59

Permalink

सावरकरांच्या वस्तू

ह्या वस्तू सावरकरांच्या असत्या तर इतकी मेहनत कोणी घेतली असती का? त्यांच्या वस्तूंचा लिलाव हा सरकारने गंभीरपणे घेतला असता का?
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on Sat, 03/07/2009 - 22:39

Permalink

वस्तु आणि आचरण

या देशातल्या लोकांना गांघींच्या वस्तु परत आणण्यासाठी जिवाला घोर लागतो. हा शुध्द ढोंगीपणा झाला. गांघींचे आचरण , त्यांची तत्वे या सगळ्यांना तुम्ही कधीच सोडचिठ्ठी दिलीत. आणि आता त्यांच्या वस्तु परत आणण्याची नाटके करताय ? (ढोंगावर प्रहार करणारा) हेरंब
  • Log in or register to post comments

Submitted by निळु on Sun, 03/08/2009 - 19:02

Permalink

वस्तु नीट सांभाळा

आता आणलेल्या वस्तु नीट सांभाळा ,नाही तर जायच्या चोरीस मग बसाल बोम्बा ठोकीत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com