गाभा:
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ?
पर्याय पहिला
१.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन
१.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
पर्याय दुसरा
समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले
२.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन
२.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल
प्रतिक्रिया
17 Mar 2018 - 9:48 pm | शाम भागवत
थोडक्यात मोदींना पर्याय सुचवा. :)
17 Mar 2018 - 9:55 pm | प्रसाद गोडबोले
अ मिलियन डॉलर क्वेश्चन !
लोकसभेच्या निवडणुकीत एकतर सर्वप्रथम काँग्रेसला जिंकणे अवघड आहे हे मान्य करु . किमान भाजपा जास्तीत जास्त टफ फाईट कशी देता येईल याचा व्हिचार त्यांनी केला पाहिजे.
जागा वाटप हा एक क्रिटिकल प्रश्न आहे , त्याला बरीच डेटा अॅनालिसिस ची मदत घेता येईल. बरेच अॅडव्हान्सड लेव्हल काम करायचे आहे ह्यात !
पण किमान पहिले ट्रिव्हियल आयटरेशन इथे लिहायला हरकत नाही !
१. ज्या जागांवर मागल्या बेळेस जो मतदार जिंकलेला , त्याला त्या जागेची सीट द्यावी.
२. जेथे मागल्या निवडनुकात जिंकलेले पण मोदी लाटेत हरले त्यांना त्या जागी दुसरी संधी द्यावी.
३. जेथे मित्रपक्श थोडक्यात विजया पासुन हुकला तिथे त्यांना समर्थन द्यावे , निवडनुक पुर्व युती करावी!
४. जिथे निर्विवाद पणे भाजपा जिंकणार आहे तिथे भाजपाच्या आमदाराला फोडण्याचा प्रयत्न करावा , जास्तीत जास्त अपक्श कसे उभे रहातील ह्याचा प्रयत्न करावा.
हे झाले बेसिक फर्स्ट आयटरेशन . २०१४ नंन्तर मधल्या काळात झालेल्या निवडणुका , इतर घडामोडी , जनतेचा कल , वगैरे मुद्दे लक्शात घेवुन जास्तीत जास्त परफेक्ट सीट अॅलोकेशन ऑप्टिमायझेशन करता येईल, एकदा सीट ठरल्या की पुढील प्रचाराची स्ट्रेटेजी ठरवता येईल.
-
डिस्क्लोजर : आम्ही बिजिनेस अॅनालिस्ट आहोत . आमचा कोणत्याही राजकीय पक्शाशी संबंध नाही. राजकीय पक्षांनी अधिक डिटेल्ड कन्सल्टन्सीसाठी व्यक्तीगत संपर्क करावा .
17 Mar 2018 - 10:04 pm | प्रसाद गोडबोले
काँग्र्सने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे मटेरियल नाही. रादर राहुलगांधी पंतप्रधान म्हणुन नको ह्या एका विचारामुळे काँग्रेसची कित्येक मते नोटाला जात असतात.
पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन कोणालाही जाहीर केले नाही तर तसेही अवघडच आहे . युती केली तरी नितिशकुमार अन ममतादी सारखे कोणी पंतप्रधान पदाचे दावेदार होतील हे वाटणे अशक्य आहे . ते टेबल वर केवळ न्युसन्स पॉवर घेवुन येतात बाकी काही नाही .
तुर्तास पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन शशी थरुर हे एकच नाव जस्टीफाय करता येण्यासारखे आहे !
पण त्याही पेक्शा बेस्ट म्हणजे तसेही हि निवडणुक जिंकण्याची शक्यता कमी असल्याने राहुललाच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन घोषित करावे अन त्याचा दणदणीत पराभव झाला तरी हरकत नाही , २०२४ मध्ये मात्र प्रियांका वढेरा ह्यांना ट्रंपकार्ड म्हणुन बाहेर काढावे , तो वर भाजपाविरोधात प्रचंड अॅन्टी ईंकम्बसी ही असेल , २०२४ च्या विजयासाठी अत्ता २०१९ मध्ये एक प्यादे सॅक्रिफाईझ करायला हरकत नाही !
17 Mar 2018 - 10:37 pm | तेजस आठवले
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही. तसेच शशी थरूर यांची पुढची वाटचाल सुनंदा पुष्कर मृत्यू निकालावर ठरेल.
नितीश कुमार काहीतरी हालचाल करणार असे मला वाटते.
17 Mar 2018 - 11:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
काँग्रेस पार्टी स्वतःच्या मुलाला सॅक्रिफाईझ करणार नाही.
हारजीतेने काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना किंsssचितसाही धक्का लागत नाही. उलट त्यांचे प्रवक्ते पुढे येऊन हा सोनिया-राहूल यांचा नैतिक विजय कसा आहे; आणि हार होण्यामागे विपक्षाची/आपल्या पक्षातील कनिष्ठ नेत्यांची चूक व मतदार जनतेचा वेडेपणा कसा आहे हे सांगत असतात. रागा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून सक्रिय राजकारणात उतरल्यापासून आत्तापर्यंत २७ पराभवांत असेच झालेले आहे. तरीही, बळीबिळी जाणे दूरच पण रागांची "निवडणुकीने आणि एकमताने" पदोन्नती करून पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले आहे... ते तहहयात राहिल असेच सद्याचा काँग्रेसी इतिहास सांगतो. उलट २८+ व्या पराभवाचे मेडल म्हणून त्यांच्यासाठी अजून एक नवीन वरिष्ठ पद तयार केले जाण्याचीच शक्यता जास्त आहे ! =))
18 Mar 2018 - 5:24 pm | तेजस आठवले
+१
सत्य. पण ते पचवायची तयारी नाही.
18 Mar 2018 - 5:41 pm | बिटाकाका
आधीच तयार असलेले अजून एक बाकी आहे, यूपीए अध्यक्षपद!!
17 Mar 2018 - 10:39 pm | तेजस आठवले
किंवा मोदी कोणीतरी असा चेहरा पुढे करतील की जनता त्याच्या मागे जाऊ शकेल आणि मोदी पडद्यामागून सूत्रे हलवू शकतील. काँग्रेस च्या पुढच्या खेळ्या मोदी काय करतात यावरच अवलंबून असल्याने (स्वतःचा काहीच अजेन्डा नसल्याने); मोदी शांतपणे आणि सावध हालचाली करतील आणि शेवटच्या क्षणापर्यंत वेळ काढतील.
18 Mar 2018 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे
विरोधकांची सर्वात मोठी गोची अशी आहे की...
१. त्यांच्यात सद्यातरी काँग्रेस हा एकच पक्ष आहे जो राष्ट्रिय पक्ष असा दावा करतो... आणि तेही सद्य परिस्थिती लक्षात घेऊन नाही तर केवळ भूतकाल विचारात घेऊन ! बाकी सगळे पक्ष राज्यस्तरीय किंवा त्यापेक्षा कमी प्रभावाचे आहेत.
२. काँग्रेसकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र करून, एकत्र ठेवून, नेतृत्व करेल असा एकही नेता नाही. ज्या कोणाची नावे घेतली जातील त्यांची काँग्रेसमधून गच्छंती होईल. याशिवाय, काँग्रेसने (विषेशतः रागा यांनी) हातमिळवणी केलेला प्रत्येक पक्ष निवडणूकीत बुडाला आहे. (याला एकच अपवाद म्हणजे बिहार, तेथे काँग्रेस तीन क्रमांकाची लिंबूटिंबू पार्टनर होती.) त्यामुळे, कोणत्याही नवीन आघाडीत काँग्रेसचे निर्विवाद नेतृत्व असणे ही गोष्ट ऐतिहासिक झाली आहे. सद्या काँग्रेसला बाहेर ठेवून (विनाभाजप-विनाकाँग्रेस) तिसरी आघाडी बनविण्याचे प्रयत्न चालले आहेतच. :)
३. विरोधी पक्षांची मोट बांधली गेलीच तर आघाडीतले जे महत्वाचे चारपाच नेते आहेत ते पंतप्रधानपदावर नजर ठेवूनच काम करतील आणि प्रतिस्पर्ध्याचा पत्ता कसा काटता येईल इकडे लक्ष देतील... कारण, निवडणूकीनंतर मिळालेले आपले पद राखण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांची ताकद व महत्व ताब्यात/कमी ठेवणे हा पंतप्रधान होणार्याचा सहाजिक सर्वोच्च उद्येश असेल.
अश्या वस्तूस्थितीत, विरोधी पक्षांना, निवडणूकीअगोदरच पंतप्रधानपदाच्या दावेदाराचे एक नाव पुढे करणे सद्य परिस्थितीत शक्य वाटत नाही. तसे करण्याने युती न बनण्याची किंवा ती अल्पकाळासाठी बनून भंगण्याचीच शक्यता जास्त आहे.
थोडक्यात...
असंख्य वैचारिक मतभेद असलेल्या पक्ष आणि नेत्यांची एखादी युती बनलीच तर, तर इतर काहीपेक्षा वैयक्तिक/पक्षिय हितसंबंध राखणे हा सर्वोच्च उद्येश डोळ्यासमोर ठेवून बनेल. वर वर मैत्रीचे कितिही प्रदर्शन केले तरी, आतल्या गोटात, युतीमध्ये आपले हितसंबंध वरचढ राखण्यासाठी युतीतल्याच कोणाचे किती पाय ओढायला हवेत आणि कोणाशी किती दोस्ती करायला हवी याचे आडाखे मांडूनच प्रत्येकाची कृती होईल. यदाकदाचित युतीला बहुमत मिळालेच तर, कोणत्या मागण्या पुढे करून आपला हितसंबंध (पंतप्रधानपद, महत्वाचे मंत्रीपद, इतर पदे, आर्थिक फायदा, राजकिय फायदा, इ) साधायचा याची गणिते मांडूनच निवडणूकीच्या नंतर कारवाया केल्या जातील (मात्र, याचा विचार व त्यानुसार मोर्चे बांधणी निवडणुकीच्या अगोदरपासून सुरू असेल, हेवेसांन). डझनावारी लहानमोठ्या व परस्पर विरोधी हितसंबंध असलेल्या पक्षांची मोट बांधणे आणि टिकवणे किती कठीण असते हे सांगायला नकोच... त्यांच्या दुर्दैवाने अश्या ताकदीचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही, एखाद्याला नेता केलेच तर ती एक कमकुवत तडजोड (fragile compromise) असेल.
19 Mar 2018 - 6:34 am | दिगोचि
१००% सहमत.
18 Mar 2018 - 5:40 am | अर्धवटराव
अपेक्षेप्रमाणे आजच्या घटकेत काँग्रेस, युपीए, भाजप, एनडीए, तिसरी आघाडी अशी पंचरंगी तालीम चालली आहे. त्यातले ऑलमोस्ट सगळेच दोन वा अधीक आघाड्यांवरुन इतरांशी व स्वतःशी देखील लढताहेत. विरोधी पक्षांनी भाजपाविरोध हा एककलमी कार्यक्रम सिरीयसली घेतला तर भाजपचा पराभव अटळ आहे. उत्तर प्रदेशात सपा+बसपा, महाराष्ट्रात काँग्रेस+ राष्ट्रवादी असं समीकरण, राजस्थान-गुजरात-पंजाब-हरयाणामधे भाजपचा घटलेला जनाधार, एन्डीएच्य घटकपक्षांची नाराजी... एव्हढ्या भांडवलावर भाजपच्या १०० जागा आरामात फिरतील. पण... केवळ भाजपा विरोध हा एककलमी कार्यक्रम नसणार.
18 Mar 2018 - 10:10 am | manguu@mail.com
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या कल्पनेचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या नरेंद्र मोदींचा पराभव करण्याची क्षमता नसल्याचा टोला लगावला. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरही त्यांनी भाष्य केले. ३०० हून अधिक खासदारांचा पाठिंबा असलेल्या एनडीएचे सरकार लोकसभेत अविश्वास ठरावाचा सहज सामना करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
18 Mar 2018 - 8:18 pm | manguu@mail.com
लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे , त्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
लाक्षागृह जाळल्यावर दुर्योधन रोज सकाळी पांडवांबाबत विचारणा करत होता. त्याला भिती वाटत होती , हे चुकुन परत आले तर ?
तशीच गत झाली आहे. पूर्ण बहुमतात सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे .
सकाळ झाली की राहूल , सोनिया , इंदिरा , नेहरु आणि बापूजी , मायावती , ममता , नायडू , यादव इ इ ची आठवण होते. भीती वाटते .. हे परत आले तर ... ?
तोंडाने रोज बोलायचे , काँग्रेस नष्ट झाली , सभेत ओरडून सांगायचे , पण आतून धास्ती - कुणीतरी परत आले तर ... !!
18 Mar 2018 - 8:28 pm | माहितगार
@ manguu@mail.com
चर्चा धाग्यातून नेहमीच्या राजकीय विवादा पलिकडे जाऊन काही पर्याय सुचवण्यास सुचवले आहे भाजपावादीमंनी सध्या सत्तेत असताना धागा उद्देशाकडे दुर्लक्ष करणे समजता येते .
तुम्ही विरोधी पक्षाच्या कोणत्यातरी एखाद्या गटाचे समर्थक दिसता तेव्हा धागा लेखाच्या अपेक्षेप्रमाणे प्रॅक्टीकल गठबंधनासाठी प्रॅक्टीकल पर्याय सुचवून पहावेत असे वाटते. बाकी विरोधक समर्थकांची जशी मर्जी , असो.
18 Mar 2018 - 10:12 pm | प्रसाद गोडबोले
प्रत्येक धाग्यावर विषयांतर करणे आणि बहुतांश वेळा कोणत्यातरी द्वेषाची गरळ उगाळणे हे वारंवार करुनही त्यांच्यावर कारवाई का बरे होत नसावी ?
18 Mar 2018 - 9:17 pm | बिटाकाका
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक!
-----------------------------------
हाहाहा, कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं म्हणतात. मोदींची लोकप्रियता घसरली आहे म्हणायचं आणि प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता दिवसभर फक्त मोदी मोदी करत असतो, ते एक असोच!
18 Mar 2018 - 9:17 pm | बिटाकाका
अवांतर टाकणे छंद आहे बहुतेक!
-----------------------------------
हाहाहा, कावीळ झालेल्याला जग पिवळं दिसतं म्हणतात. मोदींची लोकप्रियता घसरली आहे म्हणायचं आणि प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता दिवसभर फक्त मोदी मोदी करत असतो, ते एक असोच!
18 Mar 2018 - 9:51 pm | श्रीगुरुजी
>>>> लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे , त्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
कागलकरांना टॉयलेट सिंड्रोम झाला आहे.
18 Mar 2018 - 10:15 pm | पगला गजोधर
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले,
आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून....
:(
18 Mar 2018 - 10:54 pm | arunjoshi123
निवडून आलेले लोक असे काय दिवे लावतात म्हणून कोण येईल याची १-२ वर्षे आधी चर्चा करावी?
19 Mar 2018 - 8:09 am | manguu@mail.com
सहमत
19 Mar 2018 - 9:51 am | माहितगार
वस्तुतः कोण निवडून येईल ह्या साठी धागा लेख चर्चा लावलेली नाहीच मुळी. धागा लेखाचा उद्देश पुरेसा स्पष्ट आणि तसा फार्युला सुचवण्यापर्यंत मर्यादीत आहे. पण अनुषंगिकावर चर्चा अधिक होते आहे. मी धागा लेखात काही बदल करावयास हवा होता का ?
19 Mar 2018 - 10:02 am | पगला गजोधर
फक्त टायटल, "मोदीं व आर एस एस मुक्त, भारत कसा करता येईल"
असं करून पहा...
19 Mar 2018 - 10:34 am | श्रीगुरुजी
पप्पूच्या पणजोबांपासून सर्व पिढ्यांनी संघमुक्त व पाकयुक्त भारत करण्याचा जिवापाड प्रयत्न केला. ते भारतातून मुक्त झाले, पण भारत संघयुक्त होत आहे.
19 Mar 2018 - 12:55 pm | arunjoshi123
देशात एक अत्यंत सबल सत्ताधारी पक्ष आणि तितकाच सबल आणि प्रगल्भ विरोधी पक्ष असला पाहिजे. मध्यंतरांत विचारधारा इ इ बदलत असतील तर प्रमुख ३-४ पक्ष हवेत.
===================
आत्ताची स्थिती दुर्दैवी आहे. बीजेडी सोडला तर कुठलाच प्रादेशिक पक्ष आवडत नाही.
19 Mar 2018 - 1:09 pm | माहितगार
पण भारतीय मतदार प्रादेशिक पक्षांना मते देतो आहे हि वस्तुस्थिती आहे. या प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीयस्तरावर राजकीय दृष्ट्या एकत्र ठेऊ शकेल असा फार्मुला उपयूक्त असेल का ?
19 Mar 2018 - 1:40 pm | arunjoshi123
प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय राजकारण आणि समस्या काहीही कळत नाहीत. दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे सगळे पक्ष थर्ड क्लास आहेत. असं काही असू शकत नाही.
19 Mar 2018 - 2:23 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक पक्श अत्यंत थर्ड क्लास आहेत.
19 Mar 2018 - 2:31 pm | माहितगार
हा वैचारीक खंडन आणि राजकीय प्रतिवाद करण्यातील तसेच सिस्टीमॅटीक पणापासून दूर पळणारा भारतीय आळस नाही ना ? फर्स्ट सेकंड थर्ड इत्यादी क्लास सब्जेक्टीव्ह नसतात, मतदाराचे मत मत नसते का ? काल प्रसून जोशींनी खूप छान मत मांडले . मत मत असते कोणतेही मत कमी दर्जाचे नसते.
19 Mar 2018 - 5:42 pm | arunjoshi123
वैचारिक आळस इ इ अजिबात नाही. वैश्विक मताधिकार दिला आहे म्हणजे लोकांची त्याची लायकी आहे असं होत नाही. १९८४ मध्ये "कोणालाही माहीत नसलेल्या" राजीव गांधीला "माय मेली म्हणून" मत देणारांना अक्कल नसते. मागच्या बिहारच्या निवडणूकित भ्रष्टाचारासाठी जेलमधल्या लालूच्या सीटा नितिशपेक्षा जास्त आल्या. २०१४ मधे अजिबात कोणती लायकी नसलेल्या पप्पूला २५% मते मिळाली. गुजरातमधे डाव्यांचं असतं तसं उजव्यांचं अखंड सरकार चालू आहे.
=======================
भारतात चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांना सुद्धा अजिबात काही राजकीय जाण नसते. ज्ञान नसतं. विचार तर नसतोच नसतो. असल्या लोकांचं चयन काहीही असू शकतं. जात, पात, धर्म, अधर्म, सेक्यूलरीझम, आदल्या रात्री पाजवलेली दारू, खाऊ घातलेलं चिकन, फिरवलेला पैसा, आणि मूर्ख बनवायसाठी काहीही बोलणार्या नेत्यांचा
अंध अनुनय हे सगळं मंजे इलेक्शन. कोंबड्यांची झुंज बघितल्यासारखा "राजकीय जाणकारांचा" निवडणूकीतला रस!!
19 Mar 2018 - 5:46 pm | पगला गजोधर
सर, हे वरील सर्व कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
२०१४ च्या लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल, ह्याच राजकीय जाण नसलेल्या, ज्ञान नसलेल्या , विचार नसलेल्या लोकांचं चयन होतं का ?
19 Mar 2018 - 5:59 pm | arunjoshi123
अर्थातच. अर्थातच.
====================
भाजप चांगला पक्ष आहे हे या लोकांचं नशीब आहे. पण त्यांना भाजपला का मत द्यावं याची अक्कल नाही. २०१४ मधे भाजपनं जिंकायला जे जे केलं ते ते कुणी केलं असतं तर तेही जिंकले असते. २००९ मधे सोनियाबाईच्या २००४ च्या त्यागावर भाळून काँग्रेसला पुन्हा निवडून दिलं होतं. २०१४ मधे भाजपचं मार्केटींग नसतं तर त्यांना २००९ पेक्षा कमी सिट मिळाल्या असत्या. बिनामोदीचा भाजप ही तितकाच चांगला आहे, पण मोदी नसला तर भाजप सॉलिड आपटेल. हेच भाजपच्या मतदारांच्या बुद्धीचं गमक नाही का?
========================
जाण तर जाऊच द्या. द्वेष हा देखील एक निकष आहे इतकं हिणकस राजकारण आहे. हिंदी द्वेष करा, तामिळ नाडू पक्का. ब्राह्मण द्वेष करा, मुसलमान पक्का.
19 Mar 2018 - 5:50 pm | arunjoshi123
१९४७ मध्ये ज्यांच्या चुकांनी लाखोनी कापले गेलेले, जेव्हा भारतात आले तेव्हा इथल्या सरकारकडून अत्यंत हिनप्रकारे वागवून घेतलेले, ज्यांनी त्यांचे सुवर्णमंदिर उध्वस्त केले, ज्यांनी त्यांच्या देशभर हजारोनी कतली केल्या अशा काँग्रेसलाच नेहमी नेहमी निवडून देणार्या पंजाबी लोकांना अक्क्ल आहे असं मला वाटत नाही.
19 Mar 2018 - 5:54 pm | पगला गजोधर
नै सर, कळलं तुम्ही काय म्हणताय ते ! "अमुक ह्याला अक्कल नाही", "अमुक ह्याला समज नाही" वैगरे...
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
19 Mar 2018 - 6:09 pm | arunjoshi123
माझ्याकडे आहे. अर्थातच असं वाटतं म्हणूनच मी सामान्य मतदाराला अक्कल नाही असं म्हणतोय. (अर्थातच हे शिष्ट नाही. पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.)
=========================
काही काही समाज काही काही शिकले, जगात सर्वात प्रगत म्हणवताहेत. तसं इकडे काही होतंय का, लक्षण आहे का याच्यावर आमचा कॉल.
19 Mar 2018 - 6:12 pm | पगला गजोधर
हे सर्व अक्कल समज कुणाकडे आहे ? आपल्याकडे आहे असा आपला दावा आहे काय ?
स्पष्ट उत्तरासाठी धन्यवाद...
19 Mar 2018 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण यनावालांची कृपा आहे. अस्तिकांचे (जे ९९% आहेत) मेंदू कूजलेले असतात, त्यांना साधी अक्कल नसते, असं ते म्हणत होते तेव्हा त्यांना पाठींबा देणारे खूप होते. म्हणून माझी ही हिंमत झाली.)
एक निरिक्षण : तुम्ही मधूनच एकदम शालजोडी दूर करून, अचानक... डायरेक्ट डोक्यात हाणता, त्या कौशल्याला दाद ! हे फार विरळ कसब आहे !! :) ;)
बाकी राजकारणाच्या चिखलातली हाणामारी दूरून बघण्यात जास्त मजा वाटत असल्याने, त्या मुद्द्यांना पास. :)
19 Mar 2018 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत
19 Mar 2018 - 6:18 pm | माहितगार
तुमची सहती नेमकी कोणत्या प्रतिसादाला आहे माहित नाही पण तसे ते शक्यतो गुलदस्त्यात राहण्याचाही फायदा असेल तावातावाने चर्चा करणार्या प्रत्येकाला मनातन जरासे हायसे वाटेल .
19 Mar 2018 - 6:31 am | दिगोचि
समजा महागठबन्धनामुळे २०१९ची निवडणूक भाजपा हरली तर यातील विजेत्याकडॅ फक्तं मोदीन्चा पराभव एवढेच ध्येय आहे त्यामुळे हे देशासाठी काय करणार आहेत तसेच निवदूनआल्यावर पन्तप्रधान कोण होणार व ज्यात लाच सघ्त्घेता येइल ती मन्त्रीपदे कोणाला मिळणार यात मारामारी नक्की होइल त्यामूळे देशाचे अतोनात नुकसान होईल. भ्रश्टाचार बोकाळेल लाचलुचपत वाढेल. मागल्या ७० वर्शात जे झाले ते होइल व चर्चिलचे भारताविशयीचे भवितव्य खरे ठरेल. आशा आहे की मोदी परत निवडून येतील.
19 Mar 2018 - 8:32 am | sagarpdy
तुमचा प्रतिसाद वाचून एका सुप्रसिद्ध कवितेची आठवण झाली ;)
19 Mar 2018 - 11:45 am | गौतमीपुत्र सातकर्णि
मोकलाया दाहि दिश्या ;) ;)
19 Mar 2018 - 6:38 am | दिगोचि
महागठबन्धनात असे नेते आहेत ते पन्तप्रधन व्हवयाची स्वप्ने बालगून आहेत. त्यात प्रमुख म्हणजे शरद पवार, राहुल गान्धी, लालु यादव, ममता बानर्जी, आदि. या लोकामधे युद्ध होईल ते कित्येक महिने धुमसत राहिल.
19 Mar 2018 - 12:07 pm | माहितगार
@ दिगोचि आपली मातृभाषा कुणाची जहागीर नसते. आपली भाषा आपल्या आईने जशी शिकवली आणि आपण जसे शिकलो तसे लिहित रहा. आपल्या प्रतिसादांसाठी आभार. आणि वैचारीक प्रतिवाद न जमण्यामुळे केलेल्या कुजकट प्रतिसादांचा जाहीर निषेद
19 Mar 2018 - 10:09 am | सुनील
मतदार या गोष्टीला फार महत्त्व देतो असे वाटत नाही.
चटकन आठवणारी दोन उदाहरणे - १९७७ च्या ऐतिहासिक निवडणूका. तत्कालीन जनता पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीरच केला नव्हता. तरीही त्यांना बहुमताने निवडून दिले गेले.
दुसरे उदाहरण २००४ चे. भाजपातर्फे अटलजींचे नाव निश्चित होते. काँग्रेसने नाव जाहीरच केले नव्ह्ते. तरीही मतदारांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा (युपिएला बहुमत) मिळवून दिले.
19 Mar 2018 - 10:36 am | श्रीगुरुजी
२००४ व २००९ मध्ये संपुआला बहुमत नव्हते.
19 Mar 2018 - 10:45 am | सुनील
मुद्दा तो नाहीच.
पंतप्रधानापदाचा उमेदवार जाहीर केलेला नसतानाही मतदारांनी काँग्रेसला सर्वाधिक जावा मिळवून दिल्या, हा आहे.
19 Mar 2018 - 10:46 am | सुनील
जागा, असे वाचावे.
19 Mar 2018 - 11:19 am | माहितगार
मतदार महत्व देतो की नाही हा मुद्दा वेगळा , स्वतः निवडूण आलेले राजकरणी महत्व देतात की नाही हा मुद्दा आहे. निवडून आल्यानंतर पुरेशी स्टॅबीलीटी पंतप्रधान पदावरील व्यक्तीस मिळण्याच्या दृष्टीने मिळावी या साठी व्यक्ती कोण असावी हे डिसाईड करुन नको आहे . गठबंधनाच्या पंतप्रधान पदावरील निवडीसाठी राजकीय फार्मुला काय असावा ?
19 Mar 2018 - 11:55 am | पगला गजोधर
हे फ्याड अध्यक्षीय लोकशाहीत, अध्यक्षाचे नावे मत मागणे वैगेरे..
माहितीगारजी, आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही नाही, तर
संसदीय लोकशाही आहे, या छोट्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
19 Mar 2018 - 12:56 pm | माहितगार
एक सुशिक्षीत मतदार म्हणुन मला (इतर मतदारांचे माहित नाही) पंतप्रधान पदासाठी फॉर्मुला नव्हता ऐनवेळी पंतप्रधान पदासाठी एकमत झाले नाही आणि सरकार कोसळून मुदतपूर्व निवडणूकीचा अजून एक खर्च माझ्या देशाच्या डोक्यावर बसला असे नको आहे. निवडणूक झाल्यानंतर अस्थीर सरकार देण्या पेक्षा आधी पंतप्रधान निवडू नका नंतर निवडा पण काही तरी फॉर्मूला तर अॅग्री कराना . त्या शिवाय एक मतदार म्हणून मी (म्हणजे एका सुशिक्षीत मतदाराने ) विरोधी पक्षाच्या पर्यायाचा का विचार करावा ?
19 Mar 2018 - 1:50 pm | पगला गजोधर
सर, समजा....
तुमच्या आवडीच्या पक्षाने (पक्षी पंप्र उमेदवार जाहीर केलेल्या पक्षाने), निवडणुकीत बहुमत मिळवले,
व त्याच रात्री पंप्र वयोवृद्ध उमेदवार कार्डियाक /तत्सम नैसर्गिक कारणामुळे मृत झाला, व उरलेल्या खासदारात
दुफळी / यादवी माजून, पंतप्रधान पदासाठी एकमत झाले नाही आणि सरकार कोसळून मुदतपूर्व निवडणूकीचा
अजून एक खर्च देशाच्या डोक्यावर बसला तर ?
त्यामुळे "जर-तर" च्या संभावना अगणित आहेत, त्या शक्यतेत फक्त विरोधी बाजूच लंगडी असेल असे नाही...
19 Mar 2018 - 1:59 pm | arunjoshi123
गणितात प्रोबॅबिलिटी म्हणून एक प्रकार असतो.
एकमत न होणे आणि ह्र्दयविकाराचा झटका येणे या दोन प्रोबॅबिलिटीजची बेरीज कडबोळे सरकारात करायला लागेल.
पंतप्रधानाला झटका येणे, निवडणूकीनंतर लगेच येणे आणि दुफळी माजणे या शक्यतांचा गुणाकार (१ पेक्षा कमी असलेल्या संख्यांचा गुणाकार अजूनच कमी होतो.) दुसर्या केस मधे होइल.
----------------------------
थोडक्यात हिस्टॉरिकल डाटा वापरून, इ इ, शक्यता काढल्या तर तुमच्या म्हणण्यात अर्थ नाही.
19 Mar 2018 - 2:41 pm | पगला गजोधर
पदावर असताना / किंवा नुकतीच नेमणूक झाली असता मृत्यू / अपंगत्व (पदाचे कार्य न करू शकेल) येण्याची प्रॉबेबीलिटी ...
व
पदासाठी 2-3 उमेदवार आलटून पालटून संधी घेण्यावर एकमत न होण्याची प्रोबेबिलिटी ...
किती मागील काळापर्यंत चा हिस्टोरीक डेटा तुम्हाला अभ्यासायला मिळाला सर ?
19 Mar 2018 - 2:22 pm | माहितगार
फॉर्मुले म्हणजे काही कंपलसरी कायदे नाही. आणि मिपाकरांचे तिथे कुणी ऐकण्यास बसले आहे असेही नाही . तरी पण फॉर्मुले सुचवण्यात कंजुसी का होते आहे.
जनतेने घोडे बाजार भारतात राहुन प्लॉटींगचे इनसाईडर ट्रेडिंग करणारे किंवा भारता बाहेर पळून जाणारे जावईच काय ते फक्त मोजत बसायचे ? विरोधी असो वा सत्ताधारी पंतप्रधान नंतर निवडा पण पारदर्शक फॉर्मुले तर द्या . त्याने सगळा घोडेबाजार बंद होईल असे नाही पण किमान स्वरुपाची पारदर्शकत येऊ द्या ना . आणि घोडेबाजार करणारे नेते पारदर्शकते ला लाजत असतील तर समजता येते सामान्य मिपाकर मग कोणत्याही पक्षाचे समर्थक असोत त्यांच्या नेतृत्वाच्या पारदर्शकतेला का लाजतात ?
19 Mar 2018 - 2:51 pm | पगला गजोधर
पारदर्शकतेची
"पंप्र साठीचा उमेदवार जाहीर करणे", ही एकमेव व सर्वंकष चाचणी आहे काय ?
परदर्शकतेसाठी आपण सिरीयस आहोत, हे दाखवण्या साठी
इतरही काही सुझाव ...
आपल्याला निवडणुकीसाठी मिळालेल्या देणग्यांचे सोर्स देणं ?
मागल्या निवडणूकपूर्वी दिलेल्या आश्वासनच्या पूर्ततेसाठी घेण्यात आलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती/स्टेटस अपडेट ? जनतेला देने ?
एखादा निर्णय का घेतला ? व त्याची अंमल बजावणी ची सद्यस्थिती/स्टेटस अपडेट ?
त्या अंमलबजावणी मुळे झालेला इम्पॅक्ट कुठे/कधी/किती प्रमाणात....
जनतेला देने ?
19 Mar 2018 - 5:55 pm | माहितगार
ईतर मुद्दे असतील तर त्यासाठी स्वतंत्र धागा असू शकतो, इतर मुद्यांसाठी या मुद्द्याला बगल देण्याची गरज काय ? आणि अशी बगल देण्यात स्वतः राजकारणी नसलेल्यांच्या उत्साहा बद्दल गंमत वाटते. ( अर्थात आपण राजकारणी असावयास आमची हरकत आहे असे मुळीच नव्हे)
19 Mar 2018 - 6:02 pm | पगला गजोधर
ज्याप्रमाणे कसलेला जादूगार ("जादूगार" हा साहेब, "माहितीगार" नाही... ) डिसेप्शन चा भरपूर वापर करतो, प्रेक्षकांची नजर एकाच गोष्टीवर खिळवून ठेवून ...
त्याप्रमाणे एकाच मुद्द्यावर चर्चा जरूर व्हावी पण, तद्नुषंगाने बाकीचे मुद्दे संदर्भात घेऊन झाली असे आमचे एक मत.
.
(बाकी या धाग्यावर चर्चा फक्त व फक्त एकाच मुद्द्याच्या खुट्ट्याभोवती घुमवायची असल्यास आमची हरकत आहे असे मुळीच नव्हे)
19 Mar 2018 - 6:04 pm | माहितगार
चर्चांमध्ये अवांतरे कमीत कमी व्हावीत या बद्दल माझ्या भूमिकेत नेहमीच सातत्य राहीले आहे . असो.
19 Mar 2018 - 2:05 pm | बिटाकाका
.....
कायद्याने नाहीये असं म्हणत आहेत कि कसे?
----------------------------------------------
संबंधच काय अध्यक्षीय लोकशाही आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर ठेऊन निवडणुका लढवणे यात?
19 Mar 2018 - 12:04 pm | सुनील
मुद्दा रोचक आहे!
त्यासाठी आजपावेतो स्थापन झालेली सर्व आघाडी सरकारे आणि त्यांनी पूर्ण केलेला कार्यकाल, याचा विदा तपासावा लागेल. त्यावरूनच काही अनुमान काढणे शक्य होईल, असे वाटते.
19 Mar 2018 - 12:25 pm | जयन्त बा शिम्पि
तिसर्या आघाडीचे नेत्रुत्व चन्द्राबाबू नायडूंकडे न जाता, ममता अथवा अन्य (तेलंगणा राज्य मुख्यमंत्री) व्यक्तीकडे जाण्याचा संभव दिसला म्हणुन तर एन डी ए शी फारकत घेतली असावी असे वाटते.
19 Mar 2018 - 12:42 pm | विजुभाऊ
शरद पवार हे पुण्याचे मुख्यमंत्री असतील किंवा बारामती नगरपालीकेचे राष्ट्रपती असतील
19 Mar 2018 - 4:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान चर्चा. खोके/पेट्या कधी कशा पोचवल्या जातात ह्यावर फॉर्म्युला अवलंबून असतो रे माहितगारा!. बाकी विचारधारा,समविचारी पक्ष.. वगैरे हे धाग्यांमध्ये चर्चा/मारामारी करण्यासाठी असतात असे ह्यांचे मत. असो.
हल्लीपर्यंत तिसर्या आघाडीची शक्यता धूसर वाटायची. पण शेतकर्यांचा मोर्चा,आंध्रचा प्रश्न्,उत्तर प्रदेशात दोन जागांवर भाजपाचा पराभव,मोदींचे मौन.. ह्यामुळे कम्युनिस्ट,आ.प. ते तळ्यात-मळ्यात शिवसेना,वाय.एस.आर. काँग्रेस ते अगदी मनसे.. सगळेच आक्रमक झालेले दिसतात. सगळे हे असे एकत्र येणार असे गृहित धरले तर ज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदासाठी साहजिक दावा करणार.सध्या स्थानिक राजकीय पक्षांच्या मूळावरच भाजपावाले आल्याने अनेक नेते संतापले आहेत. त्यात त्यांची लढत दुहेरी असणार आहे. म्हणजे भाजपा व काँग्रेस..
19 Mar 2018 - 6:02 pm | माहितगार
फ्रॅम्कली सांगू का, माई + तुमचे अहो , लोकसभेतील भूमिकेसाठी खोके पेट्या घेण्यास (देण्यास नव्हे) सुप्रीम कोर्टाचीही हरकत नाही तेव्हा त्या १) पारदर्शकपणे घेतल्या जाव्यात २) या घेतलेल्या पेट्यांचा पैसा त्यांच्या लेकरांसाठी मॅन्युफॅक्चरीम्ग कारखाने काढण्यासाठी वापरला जावा किमान भारताचे राष्ट्रीय उत्पादन आणि काहीसा रोजगार वाढेल. पैसा लपवण्याच्या फंदात तो मॅन्युफॅक्चरींग मध्ये न लाग ल्याने देशाचे अधिक नुक्सान होते.
जो काही फार्मुला असेल तो पेट्यां सहीतचा असो अथवा पेट्या विरहीत तो पारदर्शक असावा असे आमचे म्हणणे किमान तुम्ही आम्ही जनतेने पारदर्शक फार्मुला साठी आग्रह धरावयास हवा असे वाटते.
19 Mar 2018 - 6:08 pm | माहितगार
सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींच्या आंतरजालीय समर्थकांना धागालेखातील मुद्दे डावलण्यात खुद्द राजकारण्यांपेक्षाही अधिक रस असेल असे वाटले नव्हते. एक रोचक अनुभव असो.
20 Mar 2018 - 1:28 am | अर्धवटराव
फक्त आणि फक्त शरद पवार. अर्थात, ति उमेदवारी पवारसाहेब युपीएमधे बसुन मिळवतील ;) ( या मागे लॉजीक वगैरे काहि नाहि. हि केवळ आमची इच्छा आहे)
20 Mar 2018 - 3:19 pm | रामदास२९
मला वाटतय .. मोदी नाही होणार असतील तर शरद पवार .. पण त्यान्ना सोनिया किती स्विकारतील हा प्रश्न आहे ..
20 Mar 2018 - 6:57 pm | श्रीगुरुजी
किमान ३० खासदार असणारी ममता किंवा १०+ खासदार असणारे अनेक प्रादेशिक नेते बाजूला ठेऊन २-४ खासदार असणारे पवार कसे पंतप्रधान होणार?
20 Mar 2018 - 7:01 pm | पगला गजोधर
काहीही होऊ शकतो हो, जगात आपण पाहतोच आहोत नं, अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान.
21 Mar 2018 - 12:14 pm | रामदास२९
राजकारणात काहिही होऊ शकत.. देवेगौडा, गुजराल सारखा पवार, ममतान्ना पन्प्र करून, कोन्ग्रेस ने बाहेरून पाठिम्बा दिला तर.... फक्त हि सरकारा जास्त दिवस टिकत नाहीत आणि राजकिय व्यवस्था अस्थिर करून टाकतात ..
जास्तीत जास्त ३-४ महिने , औट घटके साठी पद मिळते, माजी पन्प्र अशी एक उपाधी नावामागे लागते आणि राजकिय जीवन सार्थकी लागते..बाकि काय..
21 Mar 2018 - 12:21 pm | पगला गजोधर
बाकी अजून जगभर फिरता येते.. कोटींचे सूट बूट घालून फिरत येते.
लहान पोरे जसं स्टॅच्यू स्टॅच्यू चा गेम खेळतात, तसं लहरी प्रमाणे नोटबंदी नोटबंदी खेळता येऊ शकते.
आईबापाच्या आर्थिक क्षमतेचा विचार मनी येत नसल्याने , लहान पोरे जसं खेळण्यातली महागडी ट्रेन गेम घ्या, असा हट्ट करतात, त्याचप्रमाणे
इथेही बुलेट ट्रेनचा हट्ट करता येतो..
अजून बरच बाकी आहे ..
21 Mar 2018 - 12:44 pm | बिटाकाका
लाखो कोटींचे घोटाळे करता येतात, जातीपातीचे राजकारणं करता येतात, घोटाळे होत असताना मूग गिळून गप्प बसता येतं, रेल्वेचे साधे रूळही नीट न करता रेलवे नफ्यात आणता येते, घोटाळेबाजांना पाठीशी घालता येतं, हजारो कोटींचे कर्ज विनातारण मंजूर करून दिले जाऊ शकतात, तस्करांचे पासपोर्ट एक दिवसात नूतनीकरण करून देता येतात, लाखो झोपडपट्ट्या तयार करता येतात, गावेच्या गावे कचऱ्याच्या ढिगात रूपांतरित करता येतात, गावेच्या गवे स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी देखील अंधारात ठेवता येतात, ६० वर्षे सत्ता भोगून एकसष्टाव्या वर्षी परत गरिबी हटाव चा नारा देता येतो, बरंच काही करता येतं!
===============================
सूट बूट वरून ते फाटलेला खिसा आणि ७० हजाराचे जॅकेट आठवले.
21 Mar 2018 - 3:17 pm | श्रीगुरुजी
हॉर्वर्डमध्ये शिकूनही, सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर बसूनही अल्पशिक्शित परक्यांसमोर लोटांगण घालता येतं
आणि
कोणताही जबाबदारी न घेता उच्चविद्याविभूषित नोकरांकरवी सत्ता गाजविता येते.
21 Mar 2018 - 12:51 pm | माहितगार
मंडळी पक्ष हा का तो मध्ये जरा जास्तच गुंतला नाही आहात का ? धाग्याचा मुख्य मुद्दा राजकिय व्यवस्था अस्थिर त्यातल्या त्यात कमी असावी म्हणून एखादा फॉर्मुला सुचवा आहे त्याला राजकारणी नव्हे जनताच बगल देते तेव्हा दोन्ही बाजूनी अपव्ययाची उदाहरणांची यादी तयार करताय त्याला राजकारणी जबाबदार आहेत की, तुम्ही आम्ही जबाबदार आहोत या बाबत साशंकता वाटते ?
20 Mar 2018 - 6:51 pm | इरसाल
मला असं वाटतय की कडबोळ्यांनी सरकार बनवुन जे चार महानुभाव पंप्र बनायला गुबाबां तयार आहेत त्यांना सव्वा-सव्वा वर्ष पंप्र बनवावे, त्यांची पण जत्रेतल्या लाकडी घोड्यावर बसायची हौस फिटुन जाईल.
22 Mar 2018 - 1:28 am | ट्रेड मार्क
या सगळ्यात नितीश कुमार काय करतात हे महत्वाचे आहे. जर ते तिसऱ्या आघाडीला जाऊन मिळाले तर ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार होऊ शकतात. याला बाकी बिहारी नेते विरोध करतील पण नितीशकुमार यांच्याएवढी चांगली प्रतिमा तिसऱ्या आघाडीतील बाकी कुठल्या नेत्याकडे नाही. जर नितीशकुमार सामील नाही झाले तर मात्र मारामारी असेल.
पर्याय पहिला: काँग्रेस सोबत हातमिळवणी. हे केलं तर काँग्रेस "राष्ट्रीय" पक्ष असल्याने त्यांना जास्त जागा द्याव्या लागतील. त्याच्या खालोखाल ममता बंगालमधील सर्व आणि लालू बिहार मधील सर्व जागा मागणार. काँग्रेस या दोन राज्यात फारशी ताकदवान नसल्याने कदाचित जागा देईलही. पण महाराष्ट्रात पवार पूर्ण ताकद लावतील आणि काँग्रेसचा सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी जोर आहे. उ.प्र. मधील काही जागा मात्र काँग्रेसकडे राहतील तरी अखिलेश, मायावती ला बऱ्यापैकी जागा द्यायला लागतील.
आघाडी कदाचित पंप्र उमेदवार आधी जाहीर करणार नाही पण ते करणे धोकादायक ठरेल. राहुलला पंतप्रधान पद मिळावे म्हणून सोनिया आणि काँग्रेस आकाशपाताळ एक करतील. पण जर निवडणुकीआधीच हे जाहीर केलं तर हार नक्की असेल. त्यामुळे आधी जरी एखाद्या सर्वसंमतीच्या माणसाला जरी पंप्र उमेदवार म्हणून जाहीर केलं तरी काँग्रेस सतत काड्या घालत राहणार. यातही नितीशकुमार आले तर गणितं बदलतील.
पर्याय दुसरा: काँग्रेस शिवाय आघाडी. यातसुद्धा सगळे प्रादेशिक पक्ष आपापल्या प्रदेशातील सगळ्या जागा घेतील. ज्या राज्यात एक पेक्षा जास्त पक्ष "प्रबळ" असल्याचे मानत आहेत तिथे मात्र जरा गोंधळाचं असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात रा. कॉ., शिवसेना, मनसे हे भांडतील तर उ.प्र. मध्ये अखिलेश आणि मायावती जागा वाटून घेतील.
थोडं अवांतर होतंय पण मला तर असं वाटायला लागलं आहे की बीजेपीने किंवा मोदींनी फार त्रास करून घेऊ नये. गांधी परिवार वा इतर कोणाला सत्ता पाहिजे असेल ती देऊन टाकावी म्हणजे बऱ्याच लोकांना मनःशांती लाभेल. अथवा वेळेआधीच निवडणूक घ्यावी आणि सरळ पास द्यावा.
कितीतरी योग्य नेते आहेत आपल्याकडे... जरा कोणाला कुठले महत्वाचे पद / खाते मिळू शकेल ते बघूया
पंतप्रधान- राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी किंवा शरद पवार किंवा मायावती किंवा चंद्राबाबू (न जमल्यास ५ वर्ष आपसात वाटून घ्यावी)
गृह - ममता किंवा मायावती (पंतप्रधान पद मिळालं नाही तर)
अर्थ - चिदंबरम वा चंद्राबाबू
संरक्षण - पवार (पंतप्रधान पद मिळालं नाही तर)
परराष्ट्र - शशी थरूर अथवा अखिलेश
रेल्वे - लालू किंवा ममता
अजून ठरवा कोणाला कुठलं खातं देता येईल.
22 Mar 2018 - 2:58 pm | श्रीगुरुजी
पुढील सरकार असे असावे.
पप्पू - पंतप्रधान
सोनिया - राष्ट्रपती
प्रियांका - उपराष्ट्रपती
वड्रा - अर्थ मंत्री
पवार - कृषिमंत्री
मायावती - परराष्ट्रमंत्री
लालू - कायदा मंत्री
सनी लिऑनी - वस्त्रोद्योग मंत्री
ए राजा - टेलिकॉम मंत्री
कलमाडी - क्रीडा मंत्री
राज - रेल्वे मंत्री
राबडी - शिक्शण मंत्री
अजितदादा - पाटबंधारे मंत्री
मुलायम - अल्पसंख्याक मंत्री
रवींद्र गायकवाड - विमान मंत्री
उद्धट - कोळसा मंत्री
राजीव शुक्ला - अवजड उद्योग मंत्री
रेणुका चौधरी - नभोवाणी मंत्री
22 Mar 2018 - 3:12 pm | मार्मिक गोडसे
सनी लिऑनीला का बळंच राजकारणात ओढताय?
22 Mar 2018 - 3:26 pm | श्रीगुरुजी
काय हरकत आहे. अनेक नट-नट्या राजकारणात आहेतच. त्यात अजून एकीची भर. हाकानाका.
22 Mar 2018 - 3:46 pm | मार्मिक गोडसे
अच्छा! party with difference चे चोचले पुरवण्यासाठी सनी हवी होय?
22 Mar 2018 - 3:56 pm | विशुमित
भाचाप नाव ठेवायला हवे...
चाबरा पक्ष...!!
22 Mar 2018 - 3:57 pm | श्रीगुरुजी
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
22 Mar 2018 - 3:53 pm | विशुमित
कितीही पदर घेतले तरी गुरुजी आणि त्यांच्या प्राणप्रिय पक्षाचे चाबरे संस्कार उघडे पडतातच.
22 Mar 2018 - 3:57 pm | श्रीगुरुजी
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
22 Mar 2018 - 4:10 pm | मार्मिक गोडसे
काहीतरीच. हे party with difference विरोधकांचे मंत्रीमंडळ आहे.
सभागृहात काय फरक पडतोय party with difference वाल्या वखवखलेल्या भोकर डोळ्यांना?
22 Mar 2018 - 5:26 pm | श्रीगुरुजी
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच माल म्हणणारे का?
22 Mar 2018 - 5:34 pm | मार्मिक गोडसे
भोकर डोळ्यांना? म्हणजे टंच माल म्हणणारे का?
भर सभागृहात 'टच' स्क्रीनवर अश्लील फिल्म पाहणारे.
22 Mar 2018 - 8:08 pm | श्रीगुरुजी
अच्छा, म्हणजे टंच माल म्हणणारे किंवा थरूरगिरी करणारे चालतील.
22 Mar 2018 - 8:33 pm | मार्मिक गोडसे
म्हणजे टंच माल म्हणणारे किंवा थरूरगिरी करणारे चालतील.
काय प्रकार आहे हा?
22 Mar 2018 - 4:18 pm | विशुमित
मी नाही त्यातला कोयंडा लाव आतला...!!
तुमचं चालू द्या स्वप्न'रंजन'...
22 Mar 2018 - 5:28 pm | श्रीगुरुजी
काय सांगताय! म्हणजे तुम्ही कोयंडा न लावताच!!!!
22 Mar 2018 - 5:39 pm | पगला गजोधर
विशुमितजीं जाऊ द्या...
श्रीगुरुजी व त्यांची लाडकी ग्यांगची अवस्था म्हणजे ...
"नेसली संस्कारी बारा लुगडी, पण बाहेर कुल्ले तशीच उघडी... "
22 Mar 2018 - 5:59 pm | arunjoshi123
प्रतिभा खुलली बाबा दोघांची.
22 Mar 2018 - 7:09 pm | विशुमित
गुरुजींच्या creativity चे कधीतरी तारीफ करत जा.
का जातभाईंना माफ आहे सगळे?
22 Mar 2018 - 8:10 pm | श्रीगुरुजी
आमची कसली हो क्रिएटीव्हिटी. वरती लुगडेवाले आहेत ते खरे क्रिएटिव्ह.
23 Mar 2018 - 9:28 am | पगला गजोधर
अहो, आहोच आम्ही, लुगडी पुरवणाऱ्या गटाचे,
परंतु
तुमचा बाह्यकरणी संस्कारी दिसणारा गट आहे, लुगडी ओढणाऱ्या दुः-शासनाचा...
23 Mar 2018 - 10:23 am | श्रीगुरुजी
हे वाचून "काय राव तुम्ही . . ." या जगप्रसिद्ध गीताचे स्मरण झालं.
22 Mar 2018 - 5:57 pm | arunjoshi123
त्या यादीतल्या अनेक ओरिजनल क्षाक्षांना एखाद्यातरी डुप्लिकेट क्षांक्षेचा काँट्रास्ट असावा म्हणून.
22 Mar 2018 - 3:50 pm | धर्मराजमुटके
सरकार मधे हीच माणसे असावित पण पदे फिक्स नसावित. रोज एकाने पंतप्रधान व्हायचे. उदा. सोमवार रागा, मंगळ : पवार साहेब, बुधवारी ममता इ. इ.
म्हणजे सगळेच खुश राहतील. बाकी पदांबाबत पण तसे करता येईल. रोजच्या रोज पद बदलणे अवघड असेल तर आठवडाभरासाठीची पाळी करता येईल.
22 Mar 2018 - 3:58 pm | manguu@mail.com
भाजपावाले दर एक दोन वर्षानी आपली मंत्रीपदे सोडतात तसे का ?
22 Mar 2018 - 4:00 pm | श्रीगुरुजी
पंतप्रधान पदाची इतकी मोठी रांग आहे की प्रत्येकाला फक्त १५-२० मिनिटे हे पद मिळेल.
22 Mar 2018 - 4:22 pm | विशुमित
यादी देता का? 15-20 मिनटाचा हिशोब पण सांगा.
नाहीतर परत म्हणायचा जुमला होता तो...
22 Mar 2018 - 5:24 pm | श्रीगुरुजी
बाप रे. यादी फार प्रचंड आहे. टंकण्यात दिवस जातील.
22 Mar 2018 - 5:56 pm | विशुमित
जुमल्या सारखी
22 Mar 2018 - 6:05 pm | मार्मिक गोडसे
टंकण्यात दिवस जातील.
टंकण्याने दिवस कसे जातील? कसें?
22 Mar 2018 - 6:22 pm | सुखीमाणूस
आली आणि धागा स्फोटक झाला.
सगळ्यान्ची प्रतिभा वहायला लागलेली दिसते.
सनी ताई चा महिमा अगाध!!
22 Mar 2018 - 6:29 pm | पगला गजोधर
सनी लिओनला, "ताई" म्हणू शकणारा "सुखी" कसा असू शकतो ?
22 Mar 2018 - 6:45 pm | सुखीमाणूस
गरीब बिचारी सुखी माणुस आहे.
माणुस म्हन्जे स्त्री/पुरुष /मुल कोणी ही असते..
सुखी असण ज्याच्या त्याच्या मनावर असत...
22 Mar 2018 - 8:12 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला कोयंडे आणि लुगडी माहिती आहेत, पण हे माहित नाही?
22 Mar 2018 - 6:49 am | सुखीमाणूस
बॉलीवुड ला भारत चालवायला द्यावा.
माधुरी दिक्शीत नेने यांना पंतप्रधान कराव.
खान आणि कपूर यांचे मन्त्रीमंडळ करावे.
दक्षिण भारतीय नट मंडळी पण मन्त्री करावी.
म्हणजे उच्चवर्णिय खुश.
स्त्रिया खुश
एकेकाळी ब्राम्हण स्त्रियानी खूप अन्याय सोसला आहे त्यामुळे माधुरीला पददलित म्हणता येईल व पाठींबा मिळेल.
पूर्ण भारत खुश
मग लोकसभेचे कामकाज बघायला मजा येईल.
दाऊद भारतात पैसे गुन्तवेल.
अजून बरेच काही
_______________________________________________
धागा लेखक या प्रतिसादाबद्दल सौरी बर का!!
पण मला स्वताला हाच पर्याय सुचतो आहे...
22 Mar 2018 - 12:18 pm | arunjoshi123
असं म्हणू लागलात तर मायनॉरिटी मतं कशी मिळतील?
22 Mar 2018 - 12:25 pm | माहितगार
:)
22 Mar 2018 - 8:06 pm | चौकटराजा
बडोद्याचे दादुमिया यानी २०१९ मधे २०१४ चे यश मिळाले नाही तरी भाजपाच सत्तेवर येईल असे भाकित केले आहे. २०२४ चे मात्र सांगता येत नाही असे त्यांचे मत आहे. माझा हाच होरा आहे. मला असे वाटते की भाजपेतर सर्वच पक्ष एकत्र येणेच मुळात अशक्य आहे. सर्वाचे राजकीय रक्त वेगळे आहे. असे रक्त एकत्र आले तर गुठळी जागा वाटप करतानाच होईल. मुळात नेत्रूत्च कुणाचे असा प्रशन आला तर ममता, मायावती, नीतीशकुमार,चन्द्राबाबू यांचे नेत्रुत्व राहूल गान्धी यान्चा हेकेखोर पक्ष कधीही स्वीकारणार नाही. मोदीना खाली खेचावे असे राजकीय नेत्याना वाटले तरी ते लोकाना ही वाटले पाहिजे. महागाईचा दर मोदींच्या काळात कमी झालेला दिसत आहे. लोकांचा सर्वात नाजूक मुद्दा तोच असतो. गव्हर्नन्स वर मोदी काहीसे काम करताना दिसत आहेत तरीही नासक्या व्यवस्थेपुढे त्यानीही हात टेकलेले दिसतात.
22 Mar 2018 - 8:55 pm | बिटाकाका
पोटनिवडणुकांमुळे झालेल्या थोड्या भाजपविरोधी वातावरणात आज जरी निवडणुका झाल्या तरी भाजप २५४ खाली येणार नाही असा माझा अंदाज आहे (राज्यनिहाय परिस्थितीनुसार काढलेला).
============================
अजून एक वर्ष असल्याने, शिवाय अजून येऊ घातलेल्या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. कर्नाटक जिंकले आणि राजस्थान-मध्यप्रदेश राखले तर बहुमत नक्की. याशिवाय कर्नाटक जिंकले तर राजस्थान-मध्यप्रदेश लोकसभेसोबत घेऊन राखण्याचा प्रयत्न भाजप करू शकतोच.
22 Mar 2018 - 9:38 pm | श्रीगुरुजी
भाजप कर्नाटकात हरावा अशी माझी इच्छा आहे, कारण कर्नाटक विधानसभेचा कौल नंतर होणार्या लोकसभा निवडणुकीच्या कौलाच्या एकदम विरूद्ध असतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे.
22 Mar 2018 - 10:17 pm | बिटाकाका
असं काही नाही हो. मुळात कर्नाटकमध्ये एक पार्टी जिंकते असे नाहीये. १९९४ ला जनता दल आणि २००४ ला काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावरही केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार होते ना. नंतर कुमारस्वामीने गंडावले तो भाग वेगळा.
=====================
कर्नाटकची गणितंच वेगळी, शिवाय लढत त्याच बीजेपीशी नाहीये, यहां बात अलग है!
22 Mar 2018 - 10:49 pm | श्रीगुरुजी
कर्नाटकचा १९८३ पासूनचा इतिहास (विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्श लोकसभेत सर्वात मोठा पक्श नसतो किंवा तो पक्श सत्तेत नसतो) -
१९८३ विधानसभा - जनता पक्श सर्वात मोठा पक्श
१९८४ विधानसभा - जनता पक्शाला स्पष्ट बहुमत
१९८४ लोकसभा - खांग्रेसला बहुमत
__________________________________
१९८९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत
१९८९ लोकसभा - जनता दल सत्ताधारी
_____________________________
१९९४ विधानसभा - जनता दलाला बहुमत
१९९६ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा
_________________________
१९९९ विधानसभा - खांग्रेसला बहुमत
१९९९ लोकसभा - भाजपला सर्वाधिक जागा
__________________________
२००४ विधानसभा - भाजपला सर्वाधिक जागा
२००४ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा
________________________
२००८ विधानसभा - भाजपला बहुमत
२००९ लोकसभा - खांग्रेसला सर्वाधिक जागा
___________________________
२०१३ विधानसभा - खांग्रेसला बहुमत
२०१४ लोकसभा - भाजपला बहुमत
22 Mar 2018 - 11:26 pm | मार्मिक गोडसे
ह्या वेळेस हे jinx मोडणार आहे. दोन्हीकडे भोकर डोळ्यांचे सरकार येणार. सनीला वस्त्रोद्योग मंत्री करायची तुमची इच्छाही पूर्ण होईल.
22 Mar 2018 - 11:32 pm | श्रीगुरुजी
खरे आहे. सनी पप्पूच्या मंत्रीमंडळात असणार आणि उर्वरीत मंत्री जोकरनयनी आय मीन भोकरनयनी असणार.
22 Mar 2018 - 11:42 pm | मार्मिक गोडसे
म्हणजे फेकूचे सरकार येणार नाही असं म्हणायचं आहे का? बापरे आता फेकू पकोडे विकणार की काय?
23 Mar 2018 - 10:25 am | श्रीगुरुजी
छे छे, फेकूचंच सरकार येणार. वर मंत्रीमंडळाची यादी दिली आहे.
23 Mar 2018 - 12:19 am | पैसा
काय भाषा एकेकाची! वाचून धन्य झाले!
23 Mar 2018 - 5:56 am | धर्मराजमुटके
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)
23 Mar 2018 - 7:55 am | विशुमित
येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो.
23 Mar 2018 - 8:09 am | चौकटराजा
माणूस पक्ष समर्थक झाला की आंधळा होतो . नमोभक्त असेच आंधळे आहेत व नमो विरोधक ही . दोघेही एकाच मालेचे मणी. कारण मुळात भाजपा व खान्ग्रेस हेच एका माळेचे मणी आहेत. दोघेही मुक्त अर्थ व्यवास्थेचे सारखेच दास . इकडे तिकडे थोडा फरक.
23 Mar 2018 - 9:44 am | पगला गजोधर
चौकातराजे जेव्हा तुम्ही, भाजपचा उल्लेख " भाजप"
व काँग्रेस चा उल्लेख " खान्ग्रेस " असा करता, तेंव्हाच स्वतः च्य भक्ती विषयी बरेच काही सांगून जाता.
तेव्हा तटस्थपणे प्रतिक्रिया देन्याचा आव आणून, समजून सांगण्याचा पोचारा मारू नाका...
"सरकार विरोध मतांना" , अंध भक्तांच्या पंगतीत आणण्यासाठी , नमोविरोधक म्हणून केलेला खटाटोप स्पष्ट दिसतो...
नाही आमची हरकत नाही, अंधभक्तांच्या राष्ट्र प्रेमाला असा बट्टा लावू नका.
23 Mar 2018 - 10:32 am | श्रीगुरुजी
>>> "सरकार विरोध मतांना"
LLRC
23 Mar 2018 - 12:26 pm | पगला गजोधर
#GCNA
23 Mar 2018 - 10:33 am | चौकटराजा
तो शब्द कॉंग्रेस असा वाचावा कृपा करून . ते सुद्धा इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेस असा वाचावा.
23 Mar 2018 - 9:14 am | मार्मिक गोडसे
येथे फक्त भाजप समर्थक आहेत. इतर पक्षसमर्थक म्हणून कोणी काम करताना दिसत नाही. त्यांना जास्तीत जास्त सरकार विरोधक म्हणू शकतो.
अगदी खरंय. परंतु आंधळे शिक्के मारायला बसलेत, हाताला लागेल तो शिक्का मारतयेत.
23 Mar 2018 - 10:21 am | बिटाकाका
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये. उच्च पातळीचा दांभिकपणा कसा कमी करावा याचे धडे अवश्य घ्यावेत. ताकाला जायचं आणि भांडे लपवायचे हे काय बराबर नाय! भाजपला का दोष देता म्हणालं कि तो भाजप समर्थक आणि काँग्रेसला का दोष देता म्हणालं कि तो काँग्रेस समर्थक नाय काय, भाजप विरोधक होतो. छानंय! इतरांना भक्त वगैरे संबोधताना आपण त्याच लॉजिकने चाटू, गुलाम, आपटार्ड वगैरे कॅटेगरीत पडतो हे सुद्धा दांभिकपणामुळे कळत नाही.
===================
भाषा कुणाची कशी घसरली आहे वर जरा जाऊन पहा, मोदींचा विरोध इथेपर्यन्त ठीक आहे पण प्रत्येक वाक्यावाक्यात ज्या तिव्रतेने तो येतो, त्याला विरोध नाही तर जळफळाट म्हणणे क्रमप्राप्त आहे.
===================
राजकारणावर (चांगल्या शब्दात, मुद्दे कसलेही असो) चर्चा करणे वाईट असे समजणाऱ्या सर्व गुणीजनांचा माझ्या वैयक्तिक कपॅसिटीमध्ये निषेध!
23 Mar 2018 - 10:27 am | विशुमित
भांडे घेऊन कट्टर प्रवक्ते आले.
23 Mar 2018 - 11:07 am | बिटाकाका
तुमच्या द्वेषयुक्त प्रतिसादांना फाट्यावर मारणे खूपच सोपे आहे हो. स्वतःची विचारसरणी लपवणे खूप अवघड असते विशुमित साहेब, खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या! वैयक्तिक बोलणे हा तुमचा छंद आहे, हे मागेच लक्षात आल्यामुळे, तुमच्याकडून मुद्द्यांची अपेक्षा नाहीचाये!
==========================
बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते. असते एकेकाची आकलनशक्ती कमी, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून (खरंतर कुठल्या पक्षाचं भांडं घेऊन) इथे येता ते नाही सांगितलंत तरी चालेल, आम्ही घेतलंय ओळखून. पण तुम्ही त्या पक्षासाठी इथे येता यावर आमचा कायबी आक्शेप नाय बगा! त्यामुळे...चिल अँड एन्जॉय!
23 Mar 2018 - 11:25 am | विशुमित
<<बाकी ते प्रवक्त्याचं म्हणाल तर ते झालंय मागेच सांगून, तिथेही उत्तर आलेच नव्हते>>
==>> ते मी फाट्यावर मारले होते.
23 Mar 2018 - 11:43 am | बिटाकाका
त्याबद्दल पुनः श्च हबीणंदण! वैयक्तिक चिखलफेक सोपा प्रकार आहे.
23 Mar 2018 - 10:31 am | श्रीगुरुजी
>>> जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये
- १
ते दांभिक नाहीत. त्यांचा अंध मोदीद्वेष त्यांनी कधीही लपविलेला नाही.
23 Mar 2018 - 10:50 am | मार्मिक गोडसे
जे इथे पक्षाचे समर्थक नाहीयेत म्हणत आहेत त्यांचे दांभिक पितळ काही लपून नाहीये.
नुसता हवेत गोळीबार.
23 Mar 2018 - 11:11 am | बिटाकाका
तेच तर, नुसता हवेत गोळीबार करायचा बाकी मुद्द्याचा कायपण बोलायचं नाय! अंधविरोधकांचा परफेक्ट मोडस ऑपरेंडी!
23 Mar 2018 - 10:27 am | श्रीगुरुजी
+ १
इथे फक्त भाजपसमर्थक व अंध मोदीद्वेष्टे आहेत.
23 Mar 2018 - 10:34 am | विशुमित
उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|
23 Mar 2018 - 10:40 am | श्रीगुरुजी
अर्थ समजतो का?
23 Mar 2018 - 10:46 am | विशुमित
नाही म्हंटले ना.
अंदाज लावलाय फक्त.
मैत्रीखातर सांगून टाका पण दक्षिणा मिळणार नाही. (हा. घ्या )
23 Mar 2018 - 10:55 am | श्रीगुरुजी
अंधविरोध करताना अंधप्रतिसाद देण्याच्या नादात स्वत:लाच गर्दभ ठरविलेत.
23 Mar 2018 - 11:00 am | विशुमित
तुम्ही फसवताय असे वाटते.
शब्द शब्दाचा अर्थ सांगता का ? "गीता जशी आहे तशी" सारखे वाच्यार्थ.
भावार्थ मी समजून घेतो.
23 Mar 2018 - 12:28 pm | पगला गजोधर
#GCNA
23 Mar 2018 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :)
चपखल निरिक्षण !
23 Mar 2018 - 10:52 am | मार्मिक गोडसे
गाढवाने सांगितली गीता, कालचा गोंधळ बरा होता असा काही अर्थ लागतोय.
23 Mar 2018 - 11:18 am | माहितगार
सर्वांना __ /\__
23 Mar 2018 - 11:54 am | बिटाकाका
प्रतिसादावर प्रतिसाद देत धाग्याची धुळवड करण्यात सहभागी झाल्याबद्दल, धागालेखकाची माफी मागतो.
=======================
माझ्यामते भाजपेतर पक्ष एकत्र येणे खूप अवघड आहे. आले तरी त्यांच्या संख्याबळातला फरक उन्नीस बीसचाच असेल असे वाटते. त्यामुळे कोण पंतप्रधान होणार हा मुद्दा क्षमतेपेक्षा संख्याबळावर अवलंबून असेल असेच वाटते. जर भाजपेतर सरकार यायचे असेल तर ते काँग्रेसचेच यावे असे वाटते.
=======================
जर तिसऱ्या आघाडीचे आले तर नितीशकुमारांपेक्षा बरा पर्याय नाही, पण त्यासाठी त्यांना बिहारमधून कमीत कमी २० जागा जिंकाव्या लागतील जे खूप अवघड वाटते. चंद्राबाबू नायडू हाही त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे पण सर्वसंमती मिळणे अवघड आहे. तिसरी आघाडी एकत्रितरित्या सगळ्या राज्यात लढत नसल्यामुळे सर्व पक्षांमध्ये एकोपा हा महाअवघड प्रकार आहे असे मला वाटते. जे पक्ष एखाद्या राज्यात एकत्र लढतील ते एकोप्याने राहण्याची शक्यता आहे पण इतर हे फक्त किती मंत्रीपदे यावर एकत्र राहतील असे दिसते.
======================
माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.