सल्ला हवा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो !
तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात.
(1) विसरून जाणे. लेखकाला व जगाला शहाणे करावयास पाहिजेच याची गरज नसते.
(2) "वा छान , पण मला असेही वाटते " असे म्हणून आपल्याला पाहिजे ते लिहणे." कविता रसग्रहण "या प्रकारात ते चालते. लेखकाला बोचत नाही व वाचकांना चांगला अर्थ लाभतो.
(3) " साफ चूक; कळत नाही तर कशाला लिहता ? असे ठणकावून ( किंवा उपरोधिक भाषेत ) सांगणे.व मग आपले म्हणणे मांडणे. पन्नास वर्षांपूर्वी मिपा असता तर तुम्हाला पुणेरी ठसका काय ते वाचतांना पुरेवाट झाली असती. पण आज ते शक्य नाही. वयाचा परिणाम ! मग मी व्यनीवर लेखकाला माझे मत कळविण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळी तेही शक्य नसते. मग काय करावयाचे ? आणखी एक प्रयत्न म्हणून प्रतिसादात सौम्य प्रश्न विचारून लेखकाला सुधारण्याची संधी देतो. पण जर लेखकाने : उत्तरच दिले नाही वा काहीतरी असंबंधित लिहले तर काय करावयाचे ? विशेषत: लेखक नवीन असेल तर ?
उदाहरणे देता येतील. पण ते मह्त्वाचे नाही. मग काय करावयाचे ?
शरद
(जरासा गोंधळलेला)
प्रतिक्रिया
आपण एक स्वतंत्र लेख लिहून
इथे लोक व्यक्त होतात.
मी काय म्हणतो,
***प्रतिसादात सौम्य प्रश्न
सौम्यपणे सांगा.
इंटरनेट हे जंगल आहे
मित्रां समोर पेच ! :)
याबाबत, मी पाळत असलेले काही
अरेरे!