Skip to main content

लेखाजोखा ४ वर्षाचा

लेखक संन्यस्त खड्ग यांनी मंगळवार, 06/02/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

वाचने 40915
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

संन्यस्त खड्ग साहेब तुमचा राग / भावना समजू शकतो पण म्हणून प्रत्येक मुद्दा दोनदा, "हे बात कुछ हजम नही हुई". बर यातल्या बऱ्याच गोष्टी फारच कपोकल्पित आहेत जसे "गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे" या लेव्हलवर तुम्हचाशी विचारविनिमय करणे अशक्य. म्हणून पास.

In reply to by आकाश कंदील

मित्राकडून पुनर्प्रक्षेपित केलेला लेख आहे त्यात सडेचार लाख कोटी ही संख्या चुकीची असण्याची शक्यता आहे त्याबद्दल क्षमस्व . पण इतर मुद्द्द्यांचे काय?

अशा प्रकारचे लेख व्हाट्सप्प वर ढिगाने फिरत असतात. तसेच आता असे लिखाण (किंवा कॉपी पेस्ट) करण्याची ठिकाणे एव्हढी वाढली आहेत की सर्वच ठिकाणी उत्तर देऊन मुद्दे खोडण्यासाठी वेळ वाया घालाविण्यात काहीच अर्थ नाही अस वाटत.

अशी "कायप्पाग्रस्त" एकांगी आणि अतिशयोक्त विधाने वाचून-ऐकून लोकांचा मोदींवरचा असलेला-नसलेला राग कमी होतो ! या संबंधात कायप्पावर फिरत असलेला एक विनोद : "डिमो-जीएसटी-करवाढ-मुळे भाजपला परत मत देऊ की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता, पण रागा/मोदीविरोधकांची एकांगी/अभद्र टीका वाचली आणि भाजपला मत देण्याचे नक्की झाले !" =)) अवांतर : कॉपी-पेस्ट करताना एकच मजकूर अनेकदा पेस्ट होणार नाही याची किमान काळजी घेणे बरे असते ! ;) :)

कायप्पावर फिरणारा एक संदेश... A brilliant answer by Bala Senthil Kumar to the question below, as answered at popular Q&A site quora. It isn't the looting of wealth that bothers me so much as the sheer fact that the Congress merely replaced the Brits in some ways - they just became masters of the same, broken, weak people, who were simply willing to suck up to authority. Nobody gave India confidence! This is the part that bothers me so much, especially with MK Gandhi's style of 'winning' us freedom by giving the enemy higher moral ground. So, India has grown up as an apologetic impotent nation, where our children are taught to revere impractical, passive, cowardly notions like non-violence, when everything in nature tells us to fight to survive. Of course, I know the philosophy of not fighting because of being strong. But this comes from mastery, not shamelessly bowing to masters! So, we saw a change of guard. The Brits went, and new masters came in the form of the Congress Party. Hierarchies remained, the class system remained, and subservience remained. Where the heck did all the dynamism go? Then we were thrown into a socialist mindset, people waiting for alms from government wealth redistribution programs instead of being empowered. We got protectionist policies, that prevented prosperity and competition, throwing us away from a path of a meritocracy. Hindustan Motors was started around the same time as Toyota, and Tata Steel started around the same time as Nippon Steel. Nippon Steel produces around five times as much as Tata Steel without native resources of ore. No need to talk about Hindustan Motors and Toyota. Japan coming out of twin nuclear strikes was devastated way more than India under the Brits. Do we need to compare how different the growth paths of these two nations have been? Only when thousands died did we start the Green Revolution. Only when China attacked us did we realize we need to become militarily stronger. Only with our backs against the wall, did India liberalize its economy. Under the Congress, every move we have made towards any kind of development has come under inevitable circumstances, with our backs against the wall. India was never allowed to be truly independent, strong, and proud of its people's full potential. No wonder so many of us left in droves and thrived in various countries elsewhere. This is the loot I would feel most wronged by - denying India its best talents and minds, because we didn't create the conditions for dignified development. Incredibly, the immense sacrifices of our fighting heroes were also swept aside under this avalanche of worship for Gandhiji. Why? So that the Brits would feel good? The Congress party was reporting to British Intelligence for 5 years after we became an independent country, about Subhash Bose's family's movements. During a criminal probe of the Bofors scandal, the Congress External Affairs minister delivered a letter to a foreign body to deny evidence and cooperation to an Indian investigating agency. Years later, a whole bunch of Congress members and their cronies used the letterhead of the Indian Parliament to petition the USA to not issue a visa to Narendra Modi, the man who would become Prime Minister. The Congress has a clear obsession with white people and a need to constantly please them. When Hillary Clinton asked India to wean itself off Iranian oil, the Congress government promptly obliged, even though Iran and India have been close friends for a long time. No surprise then that pasta aunty from Italy is their supremo. Think she would have got the same respect if she had been a Nigerian black woman? I don't think so. That's how deeply ingrained the slave mentality is in the ranks of the Congress. It is the loot of India's pride, dignity, dynamism and die-hard spirit that bothers me much much more than the loot of wealth. This country produced enough wealth to support the British Empire for 200 years. It can easily produce much more to ensure prosperity, health and wellbeing for its own people. This is an abundant, powerful country, that has been prevented from being a developed, forward thinking, awesome nation that could by now have been an example for the world. If India has been a weak, apologetic nation for so long, it's precisely because of the Congress. Why do we have to put up with these weasels and the fools who are aligning with them? I could even tolerate a ruthless, despotic, dictatorial mindset. It is this slimy, backstabbing, self-serving Lutyens mindset that really irks me. I would give anything to destroy this smugness, decimate it, and put it firmly behind us. The economic loot is nothing compared to this, but we will bloody well make them pay for all of it.

कायप्पा ढकलपत्रातील अत्यंत हास्यास्पद मुद्दे वाचून हसू आवरले नाही. मोदी किंवा भाजपला मत द्यायचे नसेल तर नका देऊ. पण त्यासाठी असले हास्यास्पद मूद्दे पुढे आणून पप्पूगिरी करू नका.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी आम्हांस मोदीविरोध करावयाचा नाही परंतु फक्त सगळीकडे आधार लिन्क करण्यापुरते अथवा नोटाबन्दी साठी आम्ही मोदी महोदयांस मतदान केलेले नाहीं , अनेक प्रश्न जे सर्व सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत त्याकडे सरकारने आधी लक्ष द्यावे अशी मागणी आहे ... उद्या सगळे काही आधारास जोडून एक RFID चिप प्रत्येकाच्या मनगटात घुसवली आणि Enemy of the State सारखे २४ तास आम्च्यावर लक्ष ठेवले तरी आमचे काही म्हणणे नाही परन्तु सामान्य लोकांचे जीणे हराम करणार्‍या महागाईवर भाजप सरकारने आधी नियन्त्रण आणावे

कोण रे ते निवडून देणारे!! बघा ह अस पूना केलत तर परत परत असे वाचावे लागेल. अहो मला तर वाटल नव्हत मोदी सरकारने ईतकी कामे केलीत. बरीच दिसतायत यादीत. काय करावे ब्रे?

आम्ही म्हणू तो विकास आणि आम्ही म्हणू ती असहिष्णुता अशी मानसिकता असेल तर खरेच बुरे दिन आलेत. माझे अच्छे दिन तेंव्हाच आले जेंव्हा 'orop' लागू झाले . माझे अच्छे दिन / वर्षे येणार याची खात्री झाली जेंव्हा GST लागू झाले. आता मी खिचडी सरकार आले तर फायदा किंवा परत मोदी आले काय जास्त फायदा अश्या 'सुस्थितीत ' आहे. कॉंग्रेस येत नाही याची खात्री आहेच ! कळावे , लोभ असावा.

भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे याला काही आधार आहे का? कि असंच "थूक लगा के चिपका दिया"? साधा हिशेब केला तर ८०० स्टेशन साठी साडेचार लाख कोटी म्हणजे एका स्टेशन साठी ५६० कोटी. आमच्या शेजारी एका टिनपाट नेता होण्याची इच्छा असणाऱ्या माणसाने जनतेसाठी गेले दीड वर्षांपासून फुकट वाय फाय दिलेला आहे टंकताना निदान थोडा तरी विचार तरी करायचा होता. जाता जाता -- अक्खी बुलेट ट्रेन एक लाख दहा हजार कोटी रुपयात येणार आहे. आणि केवळ वाय फाय साठी त्याच्या चौपट पैसे. आपल्या विद्वत्तेचे किती कौतुक करावे हा प्रश्न पडला आहे

In reply to by manguu@mail.com

त्या विमानांसाठी ०. १ टक्क्याने कर्ज कोण देणार होते? पाकिस्तान का सौदी अरेबिया?

In reply to by सुबोध खरे

का चीन कडून ८ टक्क्याने कर्ज घ्यायला पाहिजे होते OBOR सारखे आणि मग दिवाळे फुंकायचे पाकिस्तान सारखे ?

In reply to by सुबोध खरे

जपानला का इतका पान्हा फुटला आहे ? हा जपान म्हणजे तोच ना ? ज्याने अंदमानातील तो भक्तांचा लाडका तुरुंग उध्वस्त केला होता ?

In reply to by manguu@mail.com

ते ०.१ % तरी खरे का ? की साहेबांच्या ६०० कोटीगत तीही अनवधानानाने झालेली मिष्टीक असायची...

In reply to by manguu@mail.com

पेपर वाचत नाही का? जाऊ द्या मिपा वर एक बुलेट ट्रेनवर धागा आला होता तो तरी वाचला का? तेही नाही मग बरोबर. पिचक्या टाकायला फार अक्कल लागत नाही.

In reply to by सुबोध खरे

बुलेट ट्रेन मे कोई बैठेगा नही , लेकिन दुनिया को पता चलेगा हम भी कोई है !! दिखावे के लिये करना पडता है .. शो ऑफ पॉवर !!! https://youtu.be/_RwB90nL4mc कोण बोल्ले होते हे ? सन २०१३ ...

In reply to by manguu@mail.com

इंग्रजी पण वाचता येईनासे झाले का? ते १५० कोटी पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आहेत रेल्वे स्टेशनच्या वाय फाय साठी नाहीत Google Bags ₹150-crore Contract To Provide WiFi Across Pune In a first for an Indian city, Google will make available city-wide WiFi connection in Pune. The tech giant is undertaking the project as part of Prime Minister Narendra Modi's Smart City project announced last year that covers 20 cities across India. दीडशे कोटी कुठे आणि साडे चार लाख कोटी कुठे (दीडशे कोटीच्या ३० हजार पट होतात साडे चार लाख कोटी) साडे चार लाख कोटीच्या वाय फाय चा संदर्भ असेल तर द्या उगाच वीस लाखाच्या ट्रक सारख्या पुड्या टाकू नका.

In reply to by सुबोध खरे

मुळात जिओ मे टेलिकॉम सेक्टर मुळापासून हादरवल्यावर झक मारत सगळ्या कम्पन्यानी १जीबी डेटा पर जीबी आणि अमर्यादित फ्री व्हॉइस कॉलिन्ग २००/- रुपये प्रतिमहिना इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिलेले असताना फ्री वायफाय ची उस्तवारी अस्थानी व अनावश्यक ठरते

मिपा वर २० लाखाच्या ट्रक सारखा नवीन वाक्प्रचार रुजू झाला आहे. साडे चार लाख कोटींचा वाय फाय

In reply to by कपिलमुनी

हे तुमचं नक्की मत आहे ना की त्यांना भारताची लोकसंख्या माहीत नाही आणि त्यांनी ती ६०० कोटी आहे असा दावा केला?

In reply to by कपिलमुनी

वेड घेऊन पेडगावला जाण्यापेक्षा परत वाचा! मी विचारतोय कि त्यांना भारताची लोकसंख्या माहित नाही आणि त्यांनी ती ६०० कोटी आहे असा "दावा" केला आहे का? तुम्हाला पेडगावला जाऊन अनावधानाने केलेल्या उल्लेखाला दावा म्हणायचे असेल तर तुमच्या बुद्धिमत्तेची किव करायला हरकत नसावी. वरीलप्रमाणे प्रतिक्रिया जनरली आआप समर्थकांकडून येतात हे एक निरीक्षण आहे.

In reply to by बिटाकाका

एकदा चष्मा घातला कि असेच होते. बगळा सुद्धा कावळाच दिसायला लागतो आणि सफेद गोष्टीत पण काळेबेरे दिसते.

In reply to by बिटाकाका

अनावधानाने चुका होतातच ! फक्त चुकला ते कबूल करावे . . फक्त आपली चूक ती अनावधानाने आणि बाकीचे चू* ! रागां ने केली तर पप्पू . वरची किती लाख कोटी ही रक्कम अनावधानाने पण चुकली का असा विचारावे. आणि ते आपचे , भाजपाचे , काँग्रेसचे झेंडे तुमच्याकडे राहू द्या.

In reply to by कपिलमुनी

वरची किती लाख कोटी ही रक्कम अनावधानाने पण चुकली का असा विचारावे. ते तेवढंच असतं तर अनवधानाने सोडून दिलं असतं. पुढे शेतकऱ्यांच्या ८६००० कोटी रुपये द्यायला पैसे नाहीत हा आरोप केला आहे म्हणून त्याचे विच्छेदन केले आहे. पूर्ण परिच्छेद वाचा म्हणजे लक्षात येईल कि हे केवळ हलकटपणा साठी केलेले विधान ( MALAFIDE INTENTION) आहे. तीच गोष्ट (साडेचार लाख कोटी) दोन वेळेस लिहिली आहे आणि ती सुद्धा कर्जाशी तुलना करून भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? जाऊ द्या मुनी तुम्ही चुकीच्या घोड्यावर सट्टा लावता हे तुमचे दुर्दैव

In reply to by सुबोध खरे

असली ढकल पत्रे पाठवणारे गाढव आहेत , काडी टाकून निघून जातात . या धाग्यावर लिहिण्या सारखे काही नाही. असल्या गाढवावर सट्टा लावणार नाही ;)

In reply to by कपिलमुनी

मी या धाग्याच्या सट्ट्यावर बोलत नाहीये तुम्ही आप च्या घोड्या वर लावलेल्या सट्ट्याबद्दल बोलत होतो. ते "अडेलतट्टू" निघालं.

In reply to by कपिलमुनी

कुणी कबूल करायचे? आणि कुणी कबूल केले नाही? तुम्हाला असे म्हणायचे आहे का कि मोदींना कुणीतरी त्यानंतर विचारले कि बाबा चूक मान्य आहे का आणि मोदींनी उत्तर दिलं...."नाही"? रागांच्या कोणत्या चुकांबद्दल बोलत आहात ते स्पष्टपणाने लिहा, उगाच टिपिकल आआप समर्थकांसारखे गुऱ्हाळ गाळू नका. कोणाकडे कोणते झेंडे आहेत ते वेगळं सांगायची गरज नसते हो, तुम्ही फक्त तुमच्या झेंड्याबद्दल बोला.

In reply to by कपिलमुनी

आपण ज्याचे समर्थक आहोत ती व्यक्तीही चुकू शकते हेच अमान्य करण्याचा ट्रेण्ड आला आहे. नेत्याला देवाच्या रुपात बघण्याचे परिणाम. म्हणूनच त्यांना 'भक्त' म्हंटले जाते , समर्थक नाही. असो...

मोबाईल वरती देसी ढकलपत्र आधार !!! संन्यस्ता तू वेडा कुंभार !!! काढकाटाचे काम आगळे, प्रत्येकाचे स्तोत्र वेगळे !!! तूच (बि) घडविसी,तूच शोधीसी. नकळत यातून काय साधसी !!! देसी ठोकून ऐशी लक्तरे !! अर्थातून सांडे फक्त विखार तू वेडा कुंभार नाखु सावळा कुंभार बोलभांडे

In reply to by नाखु

खतरा... दंडवत तुम्हाला

In reply to by नाखु

कवी नाखू लय भारी ! त्यांच्या एकाहून एक भारी स्वाक्षर्‍यांचे तर आम्ही म्होट्टे पंखे आहोत । =))

खुर्ची भाजपाची , सत्ता भाजपाची , अन ज्यांच्याकडे सत्ता नाही , त्याण्च्या बडबडीत कशाला वेळ घालवायचा.. १ वर्ष राहिलय, हा सुर्य् हा जयद्रथसारखे हे मंदिर अन हा समान कायदा , करुनच टाका. नंतर परत कटकट नको , आमाला चानस नै दिला म्हणून.

In reply to by manguu@mail.com

मोगा खान कायदा करण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत असावे लागते इतके साधे (आणि शाळेत शिकवलेले) नागरिकशास्त्र तुम्ही वाचले नाही कि विसरलात? तीन तालाकचे बिल राज्यसभेत का अडकले आहे हे तुमच्या काँग्रेसी लोकांना विचारा मग समान नागरी कायदा याचा विचार करू. बाकी तुम्हाला समान नागरी कायदा नको तर गुन्हेगारी कायदा का समान हवा आहे याचे उत्तर गेल्या तीन चार वर्षात आणि तुमच्या अनेक अवतारात/ डू आय डी मध्ये तुम्ही दिलेले नाही याची आठवण करून देतो. ( म्हणजे चोरी केली तर हात तोडणे सारख्या शिक्षा --शरियत प्रमाणे). दांभिकपणा जाता जात नाही हेच खरे.

पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका.. १. काँग्रेसच्या पापाचे फळ म्हणजे फाळणी. २. तुम्ही घराणेशाही करता. ३. त्यामुळे आमच्यावर टीका करु नका. ४. तुम्ही देशाला आपलेसे करु शकला नाहीत , म्हणूनच विरोधात बसला आहात .. आता ह्या आरोपात नवीन काय आहे ? हे मुद्दे घासून घासूनच तर हे निवडून आलेत आणि चार वर्षानी संसदेत पुन्हा तेच मुद्दे बोलत आहेत. इतर वेळी परदेशात फिरायचे आणि देशात संसदेत असले की काँग्रेसवर टीका !

In reply to by manguu@mail.com

१. वरील मुद्दे सत्य नाहीत का? २. आजचे पूर्ण भाषण ऐकले/वाचले का? ३. कालचे खर्गेंचे भाषण ऐकले का? ४. सिलेक्टिव्ह रिडींग/लिसनिंग वाईट हे पटते का? ५. मोदी किती दिवस भारतात आणि किती दिवस परदेशात होते याची काही माहिती आहे का? तुलनेसाठी मनमोहन किती दिवस बाहेर होते हे माहिती आहे का? ६. मोदींच्या परदेश दौऱ्यावर तुमचा नेमका आक्षेप काय? तुम्हाला त्यात काय प्रॉब्लेम वाटतो? कि फक्त "मोदी" हे नाव टिकेसाठी पुरेसे आहे? ७. अंधपणा आणि गहाणबुद्धी टिका स्तुत्य आहे असे आपले मत आहे का?

पंतप्रधानांची संसदेत काँग्रेसवर टीका अतिशय योग्य आहे . त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे. भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्‍हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे. विरोधक आधारवर टीका करताय असे म्हणताना भाजपाने आधारचा विरोध केला होता हे विसरले असे दिसतय. त्या भाषणामधले आवडलेले वाक्य देशात आता प्रामाणिकतेचा उत्सव सुरु असून लोक प्राप्तिकर भरण्यासाठी पुढे येत आहेत !

In reply to by कपिलमुनी

>>> त्यामुळेच जनतेने भाजपाला सत्ता दिली आहे. भाजपाने कोंग्रेसने किती वाटोळे केले , पटेल पंतप्रधान असते तर वगैरे गुर्‍हाळ ना लावता स्वतःच्या कामांवर बोलले पाहिजे. आपल्या दीड तासाच्या भाषणात मोदींनी आपल्या सरकारने केलेली अनेक कामे आकडेवारीसहीत सांगितली. खांग्रेसी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या गदारोळात तुम्ही ते ऐकले नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेसी कुत्र्यांच्या भुंकण्याच्या गदारोळात तुम्ही ते ऐकले नसावे.
बाकी सर्व ठिक आहे, मात्र विरोधकांना थेट कुत्रा म्हटलेले मला तरी पटले नाही. शिवाय या भुंकण्यात फक्त कॉंग्रेसी होते असेही नाही त्यात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टिडीपीचे ही काही खासदार होते. === आवातंर : तुम्ही कॉंग्रेसी खासदारांना कुत्रा म्हटल्याने, 'अखिल भारतीय कुत्रा संघटने'च्या भावना दुखावून ते तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा देखिल दाखल करु शकतात.

In reply to by प्रसाद_१९८२

कुत्ते के ईमानदारी की कसमे तो आदमी भी खाते है ... .... हमारी बात को सुन लिया ? नहीं ! सूंघ लिया , कुत्ता हूं ना ! ( इति कटाप्पा )

खरे काका, तो mangoo हितेस दादा दरेकर आहे, गजानन कागलकर. कुठे मनोरुग्णाच्या नादि लागतय. आपल्या पाणबुडि संदर्भातल्या लेखाचा पुढिल भाग टाका प्लिज.

१९४० साली फाळणीचे पाप करायला कोण कुणाला भेटले होते ? In the 1940s, the Muslim League stepped up its demand for a separate Muslim state of Pakistan. Although the Congress strongly opposed religious separatism, the League's great popularity amongst Muslims forced the Congress leaders to hold talks with the League president, Muhammad Ali Jinnah. Even though Savarkar agreed with Jinnah and recognised Hindus and Muslims to be separate nations, https://en.m.wikipedia.org/wiki/Akhil_Bharatiya_Hindu_Mahasabha

https://m.maharashtratimes.com/india-news/pm-hits-back-at-congress-says… काँग्रेसच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जो बल्ब केवळ ४० रुपयाला यायचा, तो ३५० रुपयांत विकला गेला. हे कसे झाले,' असा सवाल करतानाच देशात सध्या 'हिट अँड रन'चे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.  ... कोणत्या बल्बबद्दल बोलताहेत ?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी , बल्क ऑर्डरमुळे किंमत कमी झाली , असे त्याच बातमीत दिले आहे. कुणीकुणी लावलेत म्हणे दिवे ?

गेल्या दोन वर्षात फक्त ९ वॉट्स नव्हे तर बाजारातील सगळ्याच प्रकारच्या LED बल्ब आणि ट्युब्लाईटचे भाव कमी झाले आहे. त्यात सरकारचा काहीही संबंध नाही.

Shri Piyush Goyal, India's minister of State (IC) for Power, Coal and New & Renewable Energy yesterday celebrated the fact that in just 20 months the price of LED lightbulbs has fallen from 310 rupees (US$4.68) to 54.9 rupees ($0.84), an 83 per cent plunge that is partly India's fault. https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_l… चष्मा काढून वाचा

LED टेक्नॉलॉजी स्वस्त झाल्यामुळे देशात प्रचंड उत्पादन झाले व स्पर्धेमुळे दर कमी झाले. सगळीच LED उत्पादने स्वस्त झाली आहेत. सरकारच्या ९ वॉट बल्बमुळे ट्युब्लाईट स्वस्त झालेल्या नाहीत. Unorganised सेक्टरमुळे बड्या कंपन्यांचे धाबे दणाणले व दर कोसळले.