तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?
लेखनविषय (Tags)
बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं..
सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे..
ते म्हणजे बारामती..
आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण..
निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..
मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं.. तसंच काहीसे बारामतीकाराचे पण आहे कारण अगदी मुंबईकरासारखी काट्यावरची कसरत नसली तरी ‘घड्याळ’ ज्या पंज्याला बांधलंय ते चालू आहे ना हे माहित असणे महत्वाचे आहे.. कारण काट्यावरची कसरत नसली म्हणून काय झालं? काटा नीट काढता आलाच पाहिजे...
पुणेकरासारखा अभिमान सुद्धा काही अंशी हवाच पण हा बऱ्याच वेळा एकाच गोष्टी वर येऊन थांबतो.. म्हणजे कोणी म्हणलं की तुमचा आवडता ऋतू कुठला तर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे सर्व साधारण ढोबळ वर्गीकरण करणारे लोक भारतात सापडतील.. जरा पुरातन (पुरोगामी नव्हे) लोकं, अगदी वसंत आणि ग्रीष्म सुद्धा म्हणतील... तसंच परदेशी लोक Autumn N Spring म्हणतील पण अस्सल बारामतीकर होण्या करता 'शरद' ऋतू आवडणे ही काळाची गरज समजावी...
कोजागिरी किंवा Full Moon सारख्या गोष्टी लोक करायला लागले किंवा अगदी दस्तुरखुद्ध NASA वाले तुम्हाला चंद्रावर नेऊन आणायला तयार झाले तरी सुद्धा वाह काय ते आमचे 'शरदा'चे चांदणे ही ओळ साधारण पौर्णिमा असो किंवा अमावस्या बोलत रहावी…
तसं बारामती ला अशी काही शेती मधली History किंवा Speciality नाही म्हणजे नागपूरकर जसे आपल्या संत्र्यांचे गुणगान गातात तसे इथे गरज नाही पण सर्वसामान्य असो किंवा शेतकरी टोमॅटो, कांदा, बटाटे किंवा ‘मुळे’ या भाज्यांचा हंगाम माहित नसेल तर चालेल पण 'ताई' साहेब यांचा नियोजित दौरा हा तोंडपाठ हवाच..
जसा पु.ल. म्हणतात की, टिळक - गांधी या मुंबई बाहेरच्या लोकांनी इंग्रज आणि मुंबईकरांचे संबंध बिघडवले, तसेच काका आणि पुतण्याचे संबंध बिघडवणारी आणि पुणेकर लोकांनी कंठलेली 'काका मला वाचवा' या अतिशय ह्रदयद्रावक कहाणी लोकांच्या मनातून पुसून टाकायला आणि ‘काका ने पुतण्या ला कसे घडवले’ पर्यंत संस्कारी कहाणी याची माहिती तुम्हाला माहित असेल कि तुम्ही बारामतीकर झालात म्हणून च समजावे…
मुळात मुंबईकरासारखे गनिमी काव्याने येणाऱ्या पाहुण्याला चुकवायचा इथे प्रश्नाचं येत नाही कारण पाहुण्याला आवडो अथवा ना आवडो आणि पाहुणा प्रादेशिक परिसरातला असला काय किंवा देश पातळी वरचा असला काय इथे एकदा पाहुणचाराला येऊन च जातो इतकं ‘पॉवर’फुल समीकरण बारामतीकर होण्याकरता कळणे फार महत्वाचे..
बाकी धरणांची संख्या, पाण्याची पातळी, सहकारी तत्व आणि पुरोगामी धोरण अशी काही विषयांची आपली पूर्ण तयारी झाली की बारामतीकर होण्याची Ph.D ची परीक्षा आपण पास झालात म्हणून समजायचं!!
कारण बारामतीकर होणे म्हणजे आपल्या शहरात फार रेल्वे येत नसताना ‘इंजिनाची’ अचूक माहिती, ‘पंजाचा’ वापर आणि ‘धनुष्यबाणाची’ कला अवगत नसताना सुद्धा ‘कमळ मुखी’ चेहरा करून, बिनचूक नेम साधता आला की आपण आजन्म बारामतीकर म्हणूनच ओळखले जाल हे नक्की..
विनंती आणि तळटीप : हे फक्त विनोद याच अर्थाने सुचलेले आहे. राजकारण किंवा कुठलीही टीका करणे हे उद्देश्य नाही..
प्रतिक्रिया
कोटया जरा जास्तीच झाल्या अस
अजून शिकतोय लिहायला..
सहमत. नाही आवडलं.
मस्त जमलंय. आवडलं बुवा
+11
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
हा हा हा
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
ओक्के
मस्त जमलंय!
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
पुलंच्या तुम्हाला कोण
फक्त एक प्रयत्न..
छान लिहिले आहे....
चांगला प्रयत्न आहे, लिहीत रहा
कोणती आणि कोणाचीच टगेगिरी काय
लैच राव पर्सनली घेतासा तुमिबी
बरं बाबा विनोद तर विनोद.
मस्तं कोट्याधिश लेख !
@ राखीव खेळाडू,
नही जम्या.
++११ पुलेशु
सर्वांना प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
नही जम्म्या...
राजे, दिलपे मत लो !
नाही साहेब, बारामतीकर दिल पे
आणि दुसर्याच्या गावाला
तुमचा रोख वाई बद्दल असेल तर
जाऊ द्या पाटील, इग्नोर करा,
:)
लिहीत रहा..
+१११११११
मस्तय .... झक्कास !
भारी लिहीलंय... तुम्ही टगेखोर
१+
मस्त
आवडले ...