Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १३

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 11/10/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

वाचने 34461
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

गा पै साहेब हो काँग्रेस जर इंदिरा काँग्रेस म्हणून स्वतःला म्हणवत असती तर गोष्ट वेगळी. आजही जर सगळे काँग्रेसी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचा वारसा सांगतात तर त्यांना इंदिरा काँग्रेस असा पक्ष कसा म्हणता येईल? त्यात फाटाफूट होऊन ते परत एकत्र आले म्हणजे तो काँग्रेसच पक्ष आहे असे मानायला पाहिजे.१९८५ साली काँग्रेस स्थापनेची शताब्दी सुद्धा "याच" पक्षाने साजरी केली होती हे आपल्याला आठवत असेलच.

In reply to by सुबोध खरे

खरें डॉक्टरांचे हे बरीक खरें दिसतें. सध्याच्या काँग्रेसने गांधीनेहरूंचा वारसा सांगणे म्हणजे जुनी काँग्रेस हायज्याक करणे आहे. सबब अपहृत पक्ष अपहरणकर्त्याच्या पिताश्रींची जहागीर मानायला हरकत नसावी! काय म्हणता? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा साहेब आजची काँग्रेस आपल्या अधिकृत स्थळावर आपणच मूळ काँग्रेस आहे हे लिहीत आहे तेंव्हा माझा मुद्दा अधिकृत रित्या अधोरेखित होतो आहे. कृपया नोंद असावी. http://inc.in/INCSessions.aspx

In reply to by सुबोध खरे

अहो खरे डॉक्टर, यालाच तर पक्ष हायज्याक करणे म्हणतात. अपहृत पक्ष ही बापाची मालमत्ता समजावी का, असा प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.

१८ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या पत्नीशी केलेला शरीरसंबंध हा बलात्कारच असल्याचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कायद्याच्या दृष्टीने मुलींचे विवाहाचे वय १८ वर्षे पूर्ण आवश्यक. पण जर पत्नी १५ ते १८ वयाची असेल तर तिच्याशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नाही अशी तरतूद सध्या भा.द.वि. ३७५ मध्ये आहे. न्यायालयाच्या निर्णयाने हा विरोधाभास नाहीसा होईल. तसेच बालविवाहाचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल.

In reply to by अभिजीत अवलिया

१८ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या पत्नीशी केलेला शरीरसंबंध हा बलात्कारच असल्याचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
हा निकाल मुस्लीम पुरुषाशी लग्न होणाऱ्या स्त्रीबद्धल लागू आहे का?

In reply to by वामन देशमुख

हा निकाल मुस्लीम पुरुषाशी लग्न होणाऱ्या स्त्रीबद्धल लागू आहे का? नसावा. भारतीय कायद्यानुसार मुस्लिम मुलींना वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करायची परवानगी आहे. त्यामुळे वरील निकाल हा मुस्लिमांना लागू नसावा.

जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल आला. भारताची स्थिती दयनिय आहे. भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या काळात २०१४ जागतिक भूक निर्देशांकाच्या अहवालात आपला नंबर ५५ होता. २००३ ला ९६ होता त्यातून मनमोहन सरकारने त्यांतून अनेक भुकेलेल्यांना बाहेर काढले. पण ३ वर्षातच महान स्वच्छ आणि सतत प्रामाणिक असल्याचा दावा करणारे मोदी सरकारने भारताला पुन्हा १०० व्या स्थानावर ढकलले. फक्त मोजक्याच उद्योजकांसाठी काम करणारे मोदी सरकार सगळ्या फ्रंटवर देशाला खड्ड्यात घालत आहेत. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. लोकहितकार धोरण न राबविणारे हे सरकार देशातील गरीबांच्या जिवाशी क्रुर खेळ करीत आहे. बिफ बॅन आणि नोटाबंदीने गरीबांच्या तोंडातील अन्न हिसकावून घेतले आहे. किती लोकांचा गुपचुप बळी जात आहे याचे आकडे तर आपल्याला मिळणार नाहीत... पण भूकेच आकडे पाहून शहारे आले आहेत. काँग्रेसने केलेलं गेल्या १० वर्षाच्या चांगल्या कामवर पाणी फेरण्याचे काम मोदींनी केले आहे... लोकांनी त्यांना लवकर वठणीवर आणावे लागणार... हिंसक राष्ट्रभक्ती पेक्षा भूकेलेल्यांना अन्न मिळवून देण्याची सोय करा, उजव्यांने यातुन थोडातरी धडा घ्या... फालतून आकडेवारीत विकास दाखवून नका... #कामकीबात #कामाचेबोला

In reply to by तर्राट जोकर

असे प्रतिसाद पाडण्यासाठी आपल्याला पवारसाहेब अथवा पप्पूसाहेब कोणत्या दराने पैसे देतात?

In reply to by तर्राट जोकर

वजनाचे भारतीय स्टॅण्डर्ड आणि युरोपियन स्टॅण्डर्ड वेगळे आहेत की सारखेच असतात मी फक्त माहितीसाठी विचारतोय नाहीतर भक्त असलयाचा शिक्का लागायचा

In reply to by तर्राट जोकर

वर लिहिल्याप्रमाणे २०१४ ला किती लोक होते रँकिंगमध्ये आणि आता किती आहेत हे लपवून सोडलेले हवाबाण. २०१४ ला ७५पैकी ५५ नंबर होता. यवर्षी १२० पैकी १०० आहे. प्रचार जोर्दार सुरू केला आहे कांग्रेसींनी.

In reply to by रामदास२९

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला? प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले. शिवसेनेकडे वाटायला कुठून आले असतील इतके पैसे ? रोख दिले असतील की कॅशलेस व्यवहाराने दिले असतील?

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्हाला नित्यनियमाने असे प्रतिसाद पाडायला पैसे मिळतात असे ऐकून आहे. तुम्हाला पैसे रोख मिळतात की कॅशलेस व्यवहाराने..?

In reply to by मोदक

अद्याप बरं वाटत नाही का? कॅशलेस औषधं खरेदी करा.तुम्हाला बरं वाटलं आणि भीती कमी झाली की मग बोलू हं!

In reply to by मार्मिक गोडसे

मी ठीकच आहे. २०१४ नंतर तुम्हाला सुरू झालेली जळजळ अजून संपत नाहीये याचे आश्चर्य वाटत आहे. असो, थोडा जास्त वेळ पोगो बघा किंवा तुमच्या उपाध्यक्षांचे बाळबोध बोल ऐका - एकूण एकच..!

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या जबाबाचा सवाल फक्त पप्पूच देऊ शकतो. का? एका रात्रीत देश भ्रष्टाचारमुक्त व कॅशलेस झाला ह्यावरचा तुमचा विश्वास उडाला का?

In reply to by मार्मिक गोडसे

तुमचा प्रश्न म्हणजे तुमच्या काँग्रेसच्या रामराज्यात भ्रष्टाचार होतात याची कबुली आहे का..? बघा हं, नीट विचार करून बोला. खोटे प्रतिसाद पाडण्याचे पैसे मिळाले नाहीत तर उगाच परत मोदींनाच दोष देऊ नका.

In reply to by मोदक

खोटे प्रतिसाद पाडण्याचे पैसे मिळाले नाहीत तर उगाच परत मोदींनाच दोष देऊ नका. 'Moduk operandi' बदला , तुमच्या मर्यादीत ज्ञानामुळे तुम्हाला हे सिध्द करता येणार नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले. शिवसेनेकडे वाटायला कुठून आले असतील इतके पैसे ? रोख दिले असतील की कॅशलेस व्यवहाराने दिले असतील? हे ज्ञान तुम्हाला कुठून झाले याचे पुरावे द्या बघू.

In reply to by मार्मिक गोडसे

अरेरे.. मी विसरलो होतो की पक्षप्रमुखाचे बोलणे (बाळबोध का असेना) ते जस्से च्या तसे त्रिकालबाधीत सत्य मानण्याची तुमच्यात परंपरा आहे. प्रत्येकाला ५ कोटी रुपये दिले असं ऐकून आहे. म्हणजे ३० कोटी वाटले गेले - या विधानाचे पुरावे द्या म्हणतोय.

In reply to by मोदक

अगदी अपेक्षित प्रतिसाद. अरे भित्र्या सश्या तुझी भीती गेली असेल तर प्रतिसाद पाडायचे मला पैसे मिळतात हे कुठून ऐकले ह्याचा पुरावा देता येतो का बघ.

In reply to by मार्मिक गोडसे

तुला ३० कोटीचे पुरावे मिळाले की मी देतो पुरावे.. नाहीतर तुझी हुजरेगिरी तशीच सुरू ठेव.

In reply to by मोदक

मी सांगितले कुठून ऐकले ते आणि मी कोणावर विश्वास ठेवायचा ते मी ठरवीन, परंतू मला प्रतिसाद पाडायला पैसे मिळतात हे तू कुठून ऐकले ते सांगायला भीती वाटते का?

In reply to by मार्मिक गोडसे

हा हा हा, याला तुझ्याकडे पुरावा म्हणातात का? पुरावे देईपर्यंत तुला फाट्यावर मारत आहे, पुरावे आण मग पुढचे बोलू.

In reply to by मार्मिक गोडसे

का? एका रात्रीत देश भ्रष्टाचारमुक्त व कॅशलेस झाला ह्यावरचा तुमचा विश्वास उडाला का? पप्पूजबाब! असले जबाब फक्त पप्पूच विचारू शकतो व त्याचे सवाल पप्पूच देऊ शकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

अरेरे. जखम दाबुन धरा आणि लगेच रूग्णालयात पळा. तातडीने मलमपट्टी करुन घ्या. नाहीतर खूप रक्त जाईल आणि जिवावर बेतेल.

In reply to by मोदक

२०१४ नंतर तुम्हाला सुरू झालेली जळजळ अजून संपत नाहीये याचे आश्चर्य वाटत आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षाला २०१४ ला मी मत दिलं होतं,त्यामुळे जळजळ नाही, पण भ्रमनिरास नक्कीच झालाय. तुमच्या उपाध्यक्षांचे बाळबोध बोल ऐका तुम्ही आजारी नसता आणि तुमचा भित्रा स्वभाव नसता तर , 'तुमच्या उपाध्यक्षांचे ' म्हणजे नेमके कुणाचे ह्याचा खुलासा मागितला असता.

In reply to by मार्मिक गोडसे

भ्रमनिरास झाल्याने की पोटावर पाय आल्याने सत्ताधारी पक्षावर आरोप करायचे कंत्राट घेतले आहे ते तरी सांगा.. तुमचा किती काळा पैसा वाया गेला नोटबंदीमुळे..?

In reply to by मार्मिक गोडसे

सध्याच्या सत्ताधारी पक्षाला २०१४ ला मी मत दिलं होतं,त्यामुळे जळजळ नाही, पण भ्रमनिरास नक्कीच झालाय.
लोकशाही पद्धतीची ही एक रिस्क आहे. ================== नागरिक म्हणून झालेली चूक भरून काढायला आपणांस उदंड आयुष्य लाभो. पुढे खूप निवडणूका आहेत. ================== २०१४ ला का चूक झाली याचं आमच्यासारख्यांना मार्गदर्शन झालं तर उत्तम.

In reply to by मोदक

तजो आणि मार्मिकजींना वेगवेगळ्या आयडींनी एकाच आशयाचे प्रश्न विचारलेत... पैसे किती मिळतात वगैरे. इंटरेस्टींग. आयटीसेल वगैरे बद्दल ऐकले होते, असे लोक मिपावर सुद्धा असतील ही शक्यता मात्र गृहीत धरली नव्हती मी.

In reply to by प्रतापराव

पराभवाची कारणे पूर्ण वेगळी आहेत. बारामती, सातारा, नांदेड अशा काही पॉकेट्समध्ये स्थानिक नेते अत्यंत प्रभावी आहेत. तिथे स्थानिक पातळीवर शिरकाव करणे खूप अवघड आहे. भाजपला नांदेड मध्ये कायम एक अंकी जागा मिळालेल्या आहेत. यावेळीही त्यात फार वाढ होईल अशी अपेक्षाच नव्हती.

In reply to by प्रतापराव

पराभवाची कारणे पूर्ण वेगळी आहेत. बारामती, सातारा, नांदेड अशा काही पॉकेट्समध्ये स्थानिक नेते अत्यंत प्रभावी आहेत. तिथे स्थानिक पातळीवर शिरकाव करणे खूप अवघड आहे. भाजपला नांदेड मध्ये कायम एक अंकी जागा मिळालेल्या आहेत. यावेळीही त्यात फार वाढ होईल अशी अपेक्षाच नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

कोण हरले व कोण जिंकले ह्यावर कोणतीही टिपण्णी न करता माझे विश्लेषण असे आहे. जे अनेक ठिकाणी लागू करता येऊ शकेल. नांदेडमधे गेली ७० वर्षे कायमच काँग्रेस प्रभावी होती. पण तिच्या जिवावर राष्ट्रवादी आपले काही नगरसेवक निवडून आणत होती. २०१२ साली राष्ट्रवादीचे किती आहेत ते पहा व आत्ता कॉग्रेसची मते गेल्यावर काय अवस्था झाली आहे ते पहा. अगदी तेच लॉजिक शिवसेनेला लावू शकता. २०१२ साली भाजपची टक्केवारी ४ च्या दरम्यान होती ती आता २३+ झाली आहे. थोडक्यात कॉग्रेसची साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष रसातळाला जात आहे. तर भाजपची मदत मिळेनाशी झाल्यावर शिवसेना आक्रसत चालली आहे. पुण्यातल्या निवडणूकामधे पण तुम्हाला या पध्दतीने संशोधन करता येऊ शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

मुस्लिम महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला याचा कितीसा उपयोग होतो हे बघायला पाहिजे...

In reply to by मार्मिक गोडसे

मा.गो., हा सबका विकास नाही. फक्त मुस्लिम महिलाओंका विकास आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा सबका विकास नाही. फक्त मुस्लिम महिलाओंका विकास आहे. गेल्या तीन वर्षात सगळीकडे विकासच विकास दिसत होता, फक्त हाच विकास व्हायचा बाकी होता, साथ तर होतीच.

आधार कार्डमुळं सरकारच्या आर्थिक योजनांचे बोगस लाभार्थी व्यवस्थेबाहेर फेकले गेले असून त्यामुळं सरकारला तब्बल ९ अब्ज डॉलरचा फायदा झाला आहे असे 'आधार कार्ड' योजनेचे प्रणेते नंदन नीलेकणी यांनी म्हटले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/aadhaar-h… म्हणजे आतापर्यंत बराच पैसा बोगस लाभार्थ्या वरती वाया जात होता आणि आधार ही योजना फार उपयुक्त होती असे म्हणण्यास वाव आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

The Maharashtra government has spotted nearly 1.5 million suspicious bank accounts it suspects were created merely to grab the benefits of its Rs34,022 crore farm loan waiver. “The people who have opened these accounts have been identified using their Aadhaar number and biometric information. Since most of these accounts have been opened in the last six to eight months, they do not show a long credit history that a typical farmer’s account would have. We are investigating these accounts further,” said the minister, http://www.livemint.com/Politics/oxZBATIH53z7sXY0CDLadI/Farm-loan-waive…

In reply to by अभिजीत अवलिया

आधार कार्ड ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. ह्या योजनेचं मूळ परदेशात असणाऱ्या काही योजनांमध्ये दडलेलं आहे. स्वीडन सारख्या देशात प्रत्येक व्यक्तीस एक युनिक नंबर दिला जातो ज्यात फार्मसि पासून टॅक्स पर्यंत, जॉब पासून ड्राइविंग पर्यंत A to Z सगळी माहिती उपलब्द असते. यांचा दैनंदिन जीवनात त्या व्यक्तीस आणि सरकार ला भयंकर उपयोग होतो. भारत त्या दिशेने पाऊल टाकत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. हे करत असताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा (strong data collection, authencity and security=) ही विकसित कराव्यात ही अपेक्षा.

In reply to by अभिजीत अवलिया

महाराष्ट्र टाईम्स मधील वरच्या बातमीत, मूळ बातमीतील दुसरा पॅरा गाळला आहे. तो परिच्छेद खाली दिला आहे. :) The system, launched by the previous UPA government, has been "enthusiastically" supported by the current government led by Prime Minister Narendra Modi, and Finance Minister Arun Jaitley, said the 62-year-old non-executive chairman of Infosys -- India's second largest software services firm. मूळ बातमी आपण येथे वाचू शकता.

जनधन ची एक चान्गली बाजू 'जनधन' योजनेमुळे दारू, तंबाखू खरेदीत घट - http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/jan-dhan-accounts-kee… जनधन बँक खाती उघडल्यामुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट - ६० टक्के जनधन खाती ही ग्रामीण भागात उघडण्यात आली. http://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-jan-dhan-yojna-helps-v…

In reply to by कपिलमुनी

भारताचा जागतिक भूक निर्देशांक खरा वाटायला पाहिजे म्हणून कोणताही मृत्यू भूकबळी म्हणून खपवला जात तर नाहीये? तपास केला पाहिजे. -गा.पै.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ८३ हजार किलोमीटरच्या महामार्ग निर्मितीच्या कामाला मंजुरी दिली आहे. पुढील पाच वर्षांमध्ये हे महामार्ग बांधण्यात येणार असून यासाठी सरकार ६.९ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये ‘भारतमाला महामार्ग प्रकल्पा’चाही समावेश आहे. ज्या अंतर्गत देशाच्या सीमेवर २८,४०० किलोमीटरचे महामार्ग तयार करण्यात येणार आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ह्यामुळे देशातील रस्ते वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल. तसेच गेली काही वर्षे नवे रोजगार निर्माण करण्यात आलेले अपयश थोडेफार दूर होऊन बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. http://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-cabinet-clears-rs-7-lakh-…

सरकारनेच हा घोळ घातला आहे, एकाच आधार कार्डावर अनेक लाभार्थी असायला तो सेम नंबर शेकडो लोकांनी फॉर्म भरताना लिहायला हवा, याचा अर्थ तो सर्वाना माहिती हवा. बँका कर्ज देताना आधार मागत नाहीत त्यामुळे डुप्लिईकेट आधार नंबरचा आणि कर्जदारांचा संबंध नाही. आणि हे कारण दाखवून सरकार लोकांना बोगस ठरवत आहे

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखांची घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होईल आणि १८ डिसेंबरला मतमोजणी होईल. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सुटी घेऊन दिवसभर मिपावर ऑनलाईन असणारच आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये भ्रष्ट अश्या विदर्भ सिंघ यांची सत्ता जावी अशी इच्छा आहे , आणि काही ओपिनियन पोल पाहता काँग्रेस तिथे हरेल असे दिसते. भ्रष्टाचार प्रकरणी एवढी वाईट प्रतिमा असून हि विदर्भ सिंघ यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणे चुकीचे वाटते अर्थात काँग्रेस कडे तिथे विदर्भ सिंघ सोडता इतर कोणताही मास लीडर नसणे हे हि एक कारण आहे. गुजरातमध्ये भाजप ला धक्का बसावा अशी मनोमन इच्छा आहे, देशभरात भाजपाची (विशेतः मोदी आणि शाह यांची) मुजोरी रोखण्यासाठी विरोधी पक्षांची ताकत वाढली पाहिजे, equilibrium should be maintained. परंतु भाजपाला गुजरात मध्ये हरवणे सध्या तरी श्यक्य दिसत नाही मात्र आता जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा कमी जागा याव्यात अशी इच्छा आहे. बगूया भविष्यात काय होतंय ते.

In reply to by अमितदादा

गुजरातमध्ये काँग्रेसने एक मोठी चूक केली आहे असे दिसते. एकाच वेळी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांशीही संधान बांधायचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. हार्दिक पटेलची मागणी आहे की पटेलांना आरक्षण द्यावे. असे आरक्षण पटेलांना मिळाल्यास सध्या ओबीसी आरक्षण मिळत असलेल्या जातींना त्याचा फटका बसणार आहे कारण तेवढ्याच आरक्षणात आणखी पटेलही येणार आहेत. त्यामुळे या मागणीला ओबीसींचा विरोध असणे समजू शकतो. अल्पेश ठाकोर हा या ओबीसींचा नेता आहे. म्हणजेच काय की हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. दोघांनाही एकाच वेळी बरोबर घ्यायचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा फटका काँग्रेसला बसायची शक्यता आहे. देशात समर्थ विरोधी पक्ष हवा वगैरे सगळे ठिक आहे. पण गुजरातमध्ये काँग्रेस जिंकल्यास मात्र एक घातक आणि प्रतिगामी ट्रेंड येईल. गुजरातमध्ये भाजपचे मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता) सतत सरकार आहे. भाजप फटिग लोकांना आला असेल, ते सरकार लोकांना उपयुक्त कामे करत नसेल तर त्या मुद्द्यांवरून सरकारला घेरून निवडणुक जिंकायचा प्रयत्न करायला हवा. 'विकास गांडा छे' वरून काँग्रेसने ती सुरवात केली होती तेव्हा ते आशादायी चित्र वाटले होते. पण आता केवळ जातीपातींवर आधारीत राजकारण करणार्‍यांना बरोबर घेऊन निवडणुक जिंकायचे मनसुबे रचले जात आहेत. समजा काँग्रेसने ही निवडणुक जिंकली तरी विकास, चांगले प्रशासन वगैरे मुद्द्यांपेक्षा या जातीपातीवर आधारीत मुद्द्यांना महत्व मिळेल. हा प्रकार घातक आहे. त्या कारणासाठी तरी गुजरातमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडावा असे मला वाटत आहे. माझा अंदाज-- भाजप मागच्या वेळेपेक्षा थोड्या जास्त जागा जिंकेल (१३० च्या आसपास). पूर्वी काही वेळा माझे अंदाज बरोबर आले होते तर काही वेळा पूर्ण आपटले होते. यावेळी काय होते ते बघू.

In reply to by अमितदादा

गुजरातमध्ये काँग्रेसने एक मोठी चूक केली आहे असे दिसते. एकाच वेळी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या दोघांशीही संधान बांधायचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. हार्दिक पटेलची मागणी आहे की पटेलांना आरक्षण द्यावे. असे आरक्षण पटेलांना मिळाल्यास सध्या ओबीसी आरक्षण मिळत असलेल्या जातींना त्याचा फटका बसणार आहे कारण तेवढ्याच आरक्षणात आणखी पटेलही येणार आहेत. त्यामुळे या मागणीला ओबीसींचा विरोध असणे समजू शकतो. अल्पेश ठाकोर हा या ओबीसींचा नेता आहे. म्हणजेच काय की हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. दोघांनाही एकाच वेळी बरोबर घ्यायचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा फटका काँग्रेसला बसायची शक्यता आहे. देशात समर्थ विरोधी पक्ष हवा वगैरे सगळे ठिक आहे. पण गुजरातमध्ये काँग्रेस जिंकल्यास मात्र एक घातक आणि प्रतिगामी ट्रेंड येईल. गुजरातमध्ये भाजपचे मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता) सतत सरकार आहे. भाजप फटिग लोकांना आला असेल, ते सरकार लोकांना उपयुक्त कामे करत नसेल तर त्या मुद्द्यांवरून सरकारला घेरून निवडणुक जिंकायचा प्रयत्न करायला हवा. 'विकास गांडा छे' वरून काँग्रेसने ती सुरवात केली होती तेव्हा ते आशादायी चित्र वाटले होते. पण आता केवळ जातीपातींवर आधारीत राजकारण करणार्‍यांना बरोबर घेऊन निवडणुक जिंकायचे मनसुबे रचले जात आहेत. समजा काँग्रेसने ही निवडणुक जिंकली तरी विकास, चांगले प्रशासन वगैरे मुद्द्यांपेक्षा या जातीपातीवर आधारीत मुद्द्यांना महत्व मिळेल. हा प्रकार घातक आहे. त्या कारणासाठी तरी गुजरातमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडावा असे मला वाटत आहे. माझा अंदाज-- भाजप मागच्या वेळेपेक्षा थोड्या जास्त जागा जिंकेल (१३० च्या आसपास). पूर्वी काही वेळा माझे अंदाज बरोबर आले होते तर काही वेळा पूर्ण आपटले होते. यावेळी काय होते ते बघू.

In reply to by गॅरी ट्रुमन

म्हणजेच काय की हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. दोघांनाही एकाच वेळी बरोबर घ्यायचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा फटका काँग्रेसला बसायची शक्यता आहे
मला माहित नाही असे होईल का ? याच कारण लोक राजकारण वेगळं आणि समाजकारण (आरक्षण, जातीय अन्याय) वेगवेगळ्या चष्म्यातून पाहू शकतात. समजा दोन्ही नेत्यांना आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या मतदारांना भाजप ला हरवायचा असेल तर ते कॉमन ध्येय पहिल्यांदा साध्य करतील, आपल्याला पूरक अशी सत्ता आणतील, आणि नंतर आपापल्या वैयक्तिक ध्येयाकडे वळतील. अर्थात हि एक श्यक्यता आहे. एक उदाहरण: आसाम मध्ये भाजप हिंदू निर्वासितांच्या पाठीमागे ठामपणे तर आसाम गण परिषद आणि बोडो पक्ष (नाव विसरलो ) हे पूर्णपणे विरोधी होते तरी आघाडी झाली सत्ता आली. अजून सुद्दा मतभेत आहेत ह्या मुद्यांवर.
भाजप फटिग लोकांना आला असेल, ते सरकार लोकांना उपयुक्त कामे करत नसेल तर त्या मुद्द्यांवरून सरकारला घेरून निवडणुक जिंकायचा प्रयत्न करायला हवा. 'विकास गांडा छे' वरून काँग्रेसने ती सुरवात केली होती तेव्हा ते आशादायी चित्र वाटले होते. पण आता केवळ जातीपातींवर आधारीत राजकारण करणार्‍यांना बरोबर घेऊन निवडणुक जिंकायचे मनसुबे रचले जात आहेत.
यात फक्त काँग्रेस सहभागी आहे याशी पूर्णपणे असहमत, फक्त विकासाचं राजकारण करायचं आहे तर भाजप हिंदू-मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण कशासाठी करतो ?, मागील काही निवडणुका भाजप ने विकास बरोबर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून जिंकलेत तेंव्हा फक्त विकास हा मुद्दा का घेतला न्हवता? पतिदार समाजाच्या नेत्यांना कशासाठी फोडतो ? निवडणुकीच्या तोंडावर obc मधल्या अतिमागास घटकासाठी समिती कशासाठी नेमतो ? त्यामुळं जाती पाती मध्ये काँग्रेस आणि भाजप दोघेही सामील आहेत , पहिला नंबर काँग्रेस चा असेल असे मानू दुसरा तरी भाजप चा आहे ना. धार्मिक ध्रुवीकरणात भाजप ने गुजरात मध्ये तर काँग्रेस ला नक्कीच मागे टाकलाय. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत विकास हा मुख्य मुद्दा राहातच नाही हे वास्तव आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

आणखी एक. तसेही महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ब्राम्हण विरोधी मते असणारे राणे आणि त्यांचे चिरंजीव, मराठा आरक्षणास पाठिंबा असणारे आणि मागणी करणारे विनायक मेटे, धनगर आरक्षणाची मागणी करणारे महादेव जानकर हे भाजप बरोबर आहेतच कि. मराठा मोर्चातील काही लोकांच्या ऍट्रॉसिटी च्या मागणीला विरोध करणारे आठवले हे हि भाजप बरोबर आहेत च कि. हे सगळं परस्परविरोधी रसायन (आणि प्रसंगी जातीय हि ) महाराष्ट्रात आहेच कि. हे समीकरण काँग्रेस च्या गुजरात समीकरणापेक्षा कसे काय वेगळे ? ** मराठा आरक्षण वर चर्चा करायची नाहीये.

In reply to by अमितदादा

हिंदु-मुस्लिम धृवीकरणाची सुरवात भाजपने केली हा पुरोगाम्यांचा आवडता सिध्दांत असतो. पण त्याची खरी सुरवात काँग्रेसने केली होती. ती स्वातंत्र्यानंतर स्वतःचे मत समान नागरी कायदा आणावा हे असतानाही नेहरूंनी बोटचेपेपणा दाखवून ते पाऊल न उचलणे, नेहरू-लियाकत अली करार अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अशा ध्रुवीकरणाची सुरवात काँग्रेसने केल्यावर त्याचा आपसूक फायदा जनसंघ/भाजपने उठवलाच. हा प्रकार नेहरूंच्या काळानंतरही चालूच राहिला. भारतातील कित्येक मशीदी मुळातली मंदिरे उध्वस्त करून झालेल्या आहेत ही सत्य परिस्थिती असताना जर हिंदू समाजातून अयोध्या (आणि काशी-मथुरा) आम्हाला परत पाहिजे ही मागणी उठल्यावर मात्र काँग्रेसने त्याच्या विरोधीच भूमिका घेतली. (इंदिरा गांधींच्या दुसर्‍या टर्मच्या शेवटी आणि राजीव गांधींच्या काळात हिंदूंची बाजू घ्यायचा प्रयत्न झाला (*) पण त्यात धरसोडपणाच जास्त होता). या सगळ्या प्रकारात काँग्रेसने सुरवातीला घाण करून ठेवली. किंबहुना त्या काळात भारतातील एकमेव आणि निर्विवाद वर्चस्व असलेला पक्ष या नात्याने खरोखरची धर्मनिरपेक्षता आणणे हे काँग्रेसचे उत्तरदायीत्व होते. पण तसे काँग्रेसने केले नाही. या प्रकाराची दुसर्‍या बाजूने प्रतिक्रिया येणे अनपेक्षित नक्कीच नव्हते. जातीपातींचा विचार करता गुजरातमध्ये काँग्रेसनेच (माधवसिंग सोळंकींनी) खाम (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) हे जातीवर आधारीत समीकरण आणलेच होते. त्या जोरावर काँग्रेसने १९८५ मध्ये १८२ पैकी तब्बल १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याकाळी भाजपला गुजरातमध्ये फार कोणी विचारतही नव्हते. महाराष्ट्रात भाजपने जातीधारीत राजकारण करणार्‍यांना जवळ केले आहे त्याचे अजिबात समर्थन नाही. पण तरीही त्यात आणि काँग्रेस गुजरातमध्ये जे काही करत आहे त्यात मोठा फरक आहे. अचानक २०१५ मध्ये हार्दिक पटेल हा गुजरातच्या क्षितिजावर अवतीर्ण झाला त्याचवेळी याला काँग्रेसनेच प्रॉप केले असेल असे वाटले होते. पण आताच्या घटना बघता त्याची खात्रीच पटली आहे. म्हणजे भाजपला राजकीय दृष्ट्या विरोध करता आला नाही म्हणून पटेल आंदोलन उभे करायचे गलिच्छ राजकारण काँग्रेसने केले. तसेच सुरवातीला 'विकास गांडा छो' वगैरे प्रचार सुरू केला हे ठिकच झाले. पण आता जातीय राजकारणावरच भर दिसत आहे. विकास आणि गव्हर्न्सन्सच्या मुद्द्यावर आपण भाजपला राजकीय विरोध करू शकत नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेसने उघडपणे हार्दिक-अल्पेशचे समर्थन सुरू केले, त्यांना बरोबर घेतले असे का म्हणू नये? महादेव जानकरांच्या पक्षाला भाजपने महाराष्ट्रात बरोबर घेतले त्यात या सगळ्या गोष्टी होत्या का? * : इंदिरा-राजीव गांधींच्या काळात काँग्रेसने हिंदूंची बाजू घ्यायचा प्रयत्न कसा केला याविषयी एक लेख लिहावा असे कित्येक महिन्यांपासून वाटत आहे.