काही काही माणसे फक्त एखादे ईश्वरी कार्य पुर्णत्वास नेण्यास जन्म घेतात त्यांच्या पैकीच "गदिमा". गदिमांनी गीतरामायण रचुन आणि सुधिर फडके यांनी त्या गीतांना स्वर्गीय संगीताचा स्वरसाज चढवुन प्रभु श्रीरामाचे चरित्र अजरामर केले..........
सुरेश भटांबद्दल काय बोलावे?त्यांच्या लेखणीतुन जन्मास आलेला एक एक शब्द म्हणजे जिवंत लेण्यासारखा आहे .मानवी आयुष्यातल्या कुठल्या भावनेला भटांनी स्पर्श केला नाही व शब्दात बांधले नाही असे नाही.
अश्या अष्टपैलू लेखकांची व कवींची मायमराठी मधे कमतरता नाही पण तरीही या द्वयींचे स्थान मात्र धृवबाळासारखे अढळ आहे हे मात्र नक्की.
"अनामिका"
गदीमा आणि सुरेश भटांची तुलना करणे म्हणजे ऍपल आणि ऑरेंज यांची तुलना करणे असे वाटते (हा विशेष करून अमेरिकन वाक्प्रचार आहे म्हणून इंग्रजीच शब्द ठेवलेत).
कदाचीत एकच तुलना करायची झाल्यास साहीत्यसंपदा किती आहे याची करता येईल आणि त्यात गदीमा बरेच वरच्या पातळीवर ठरतील. तरी देखील अशी तुलना करणे मला यथोचीत वाटत नाही.
आणि हो, सध्या मिपावरील मुखपृष्ठावरील गाण्यांच्या विविध ओळखींमधे जे शेवटी ध्रुवपदासारखे येते तसे येथे पण म्हणता येईलः "आजकाल ग्रॅमी, गोल्डन ग्लोब, ऑस्कर कुणालाही मिळतात. तशी न मिळण्याची समानता या दोन महान कवींमधे आहे आणि तरी देखील ते महानच आहेत" :-)
प्रतिक्रिया
काही काही
ऍपल - ऑरेंज
ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी.
सहमत