स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो.
क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच मुळी त्याचं लवकर न संपणे हे आहे. बघा ना, सर्वात लवकर संपणारा सामना देखील (टी २०) ४ तास चालतो. ह्याउलट इतर खेळ ४५ मिनिटे- १.५ तास , दोन तास असे चालतात. सांघिक बरं का. त्यामुळे ह्या सामन्यात खेळाडूंची मानसिक ताकद प्रचंड लागते. हल्ली खेळाडू ह्या बाबतीत कसलेले दिसतात.
रविवारच्या लंका-भारत सामन्यात लंकेला बुमारह च्या अप्रतीम गोलंदाजीमुळे ( ३ सामन्यात त्याने ११ बळी घेतलेत) फक्त २१७ च धावा करता आल्या. एखाद्याने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र पाहिलं असेल, तर अंतिम निकाल बघून ( ४-२१८ भारत विजयी) “भारताने आरामात सामना खिशात टाकला” अशी प्रतिक्रिया झाल्यास नवल नाही. पण विश्वास ठेवा, ते तितकं काही सरळ-सोप्पं नाही झालं.
कोहली-जाधव-राहुल नी माती खाल्ली
कोहली अत्यंत चुकीच्या फटक्यावर बाद झाला, धवन कडून किती वेळा किती धावांची अपेक्षा ठेवायची ? पण के.एल.राहुल आणि केदार जाधव ह्यांना पुन्हा एकदा अकिला धनंजयाने लागोपाठच्या षटकांत बाद करून सामन्याची सूत्र श्रीलंकेकडे आणली. ह्यावेळी गेल्या सामन्यासारख्या ६ वगैरे विकेट नव्हत्या गेल्या , पण धावा मात्र कमीच होत्या. फक्त ६१. चार बाद ६१. आणि ह्याही वेळी सव्वा पाच फुटी धनंजया राक्षसा समान भासत होता. नाही म्हणायला रोहित शर्मा सेट झालेला होता, पण त्याचा काहीच भरवसा देता येत नाही. ( एक दोन वेळा त्याला बाद करायची संधी श्रीलंकेने घालवली) त्याला मिळालेली जीवदाने वगळता त्याने खेळ चांगलाच केला. शतकही झळकावले.
परंतु समोर “फ्रीज” होता !
४ गडी धक्कादायक रीतीने बाद झाल्यावर मात्र धोनी आला. “नेहमीच काय हा टिकेल ?” हा मनात उठणारा कुत्सित सवाल त्याने धुळीस मिळविला. आगळ्या वेगळ्या स्पिन गोलंदाजाचा सामना कसा करायचा , हे त्याच तंत्र बघण्यासारखं होतं. गोलंदाजाच्या आधीच तो तयार असायचा. आणि वेळ प्रसंगी चेंडू सीमापारही धाडायचा. एक-दोन धावा चोरत राहणे हा तर त्याचा हातखंडा.पहिली धाव कशी घ्यावी हे केवळ धोनी कडूनच शिकावं. हळू हळू स्थिरावत, पुन्हा एकदा नांगर टाकत (किती काळ पुरणार आपल्याला हा) रोहित ला फटकेबाजीला पूर्ण अवसर देत धोनीने गेलेला सामना पुन्हा एकदा हातात आणला, आणी ....
श्रीलंकेचे प्रेक्षक चिडले !
प्रेक्षकांना हे सहनच झाले नाही. कारणही तसेच होते. एवढी चांगली संधी निर्माण होवूनही, ( “अकिला अकेला” धनंजय क्या करेगा ?) सामना हातातून चालला होता. ह्या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती चांगली होती, ते खेळाडूंना प्रेरीतही करत होते आधीपासून. ते संतापले आणि बाटल्या फेकाफेक करू लागले. हे काही आपल्याला नवे नाही. आपल्याकडे असं चिडून बाटल्या फेकाफेक हे काही काळापुर्वीपर्यंत अगदी नित्याचं होतं. असो. आवाहन करूनही स्थिती आटोक्यात येईचना.
शेवटी धोनी चक्क झोपला !
आधी थोडा वेळ दोघांनीही स्ट्रेचिंग वगैरे केलं ; पण नंतर धोनी चक्क झोपला, म्हणजे दिसलं तसच. मला नक्की खात्री आहे कि त्याने मकरासन वगैरे करून तेवढ्या वेळात विश्रांती घेतली असणार ! तिथे समालोचकांच्या कक्षात याच्यावर एकच चर्चा ... गावस्कर तर चक्क त्याला “फ्रीज” म्हणाला.
स्वीच on स्वीच ऑफ चं इतकं उत्तम उदाहरण तुम्ही पाहिलयेत का ?
अर्थात थोड्याच वेळात प्रेक्षक शमले , आणि भारताने उरले सुरले सोपस्कार संपवून सामना खिशात घातला. पण धोनीची “योग निद्रा” दीर्घ काल स्मरणात राहणार हे नक्की!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4840
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर मग?
परीक्षण आवडले
ठीकच की. धन्यवाद.
In reply to परीक्षण आवडले by पैसा
ऑ? महिला क्रिकेट फिक्स होऊ
In reply to परीक्षण आवडले by पैसा
होउ शकतेच ना!
In reply to ऑ? महिला क्रिकेट फिक्स होऊ by जेम्स वांड
अहो
In reply to होउ शकतेच ना! by पैसा
परिक्षण आवडले!
मन उडून जातं हे स्वाभाविक !
In reply to परिक्षण आवडले! by जुइ
लेख आवडला!
धन्यवाद संदीप !
In reply to लेख आवडला! by चांदणे संदीप
मागच्याप्रमाणेच..
धन्यवाद संजय !
In reply to मागच्याप्रमाणेच.. by संजय पाटिल
धोनी _/\_
वर्षानुवर्षे हे तो करतोय !