रिचर्ड गेयर आणि चीन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पुन्हा एकदा चीनने आपल्या डोक ला भागात घुसखोरी केली आहे. भारत, भूटान आणि तिबेट या देशांना जोडणारा हा भाग सामरिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. तेथे चीन सध्या रस्ता बांधत आहे. भारतीय जवानांनी ते काम रोखल्यावर चीनी लोकमुक्ती सेनेने तीन किमी आत येऊन भारतीय बंकर उध्वस्त तर केलेच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठा तमाशा करून भारतावर नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाचा आरोप ठेवला आहे. यालाच मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हणतात.
आपल्यापैकी अनेकांनी ‘रिचर्ड गेयर’ हे नाव ऐकलेच असेल. रिचर्ड गेयर हा नव्वदीच्या दशकातला हॉलीवूड सुपरस्टार. त्याचे अमेरिकन जिगोलो, शिकागो, सारखे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. १९९० साली आलेला त्याचा जुलिया रॉबर्ट्स सोबतचा ‘प्रेटी वूमन’ इतका गाजला की १९९९ साली त्याचा दुसरा भाग ‘रनवे ब्राईड’ या नावाने पुन्हा त्याच दोघांना घेऊन काढण्यात आला. रिचर्ड गेयर अनेक वेळा भारतात येतो आणि त्याचा ‘गेयर फाउंडेशन ट्रस्ट’ भारतात सेवाभावी कामे चालवतो. २००७ साली एड्स विषयी जागरूकतेच्या कार्यक्रमात त्याच्या शिल्पा शेट्टी सोबतच्या चुंबन दृश्यामुळे त्याला फार टीकेचा सामना करावा लागला.
तर अशा या रिचर्ड गेयरला हॉलीवूड मधील मुख्य धारेतील मोठमोठ्या चित्रपट कंपन्या जसे एमजीएम, डिस्ने, वार्नर ब्रदर्स इत्यादी आपल्या चित्रपटांमध्ये घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे रिचर्डला फार कमी काम मिळत आहे. सध्या तो कमी खर्चाचे आणि समांतर चित्रपट करतोय. नुकताच त्याचा ‘द डिनर’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. नाही नाही एखाद्या बॉलीवूड सुपरस्टारप्रमाणे त्याला त्याच्या अहंकाराने कामे नाकारली जात नसून, त्याचं कारण आहे चीन.
दुसऱ्या महायुद्धाला अमेरिकेने दोन अणुबॉम्ब टाकून संपवले आणि जपानवर सामरिक निर्बंध घातले तसेच जपानची राज्यघटना बदलली. हेतू हा की पुन्हा जपानमध्ये युद्धखोर सरकार येऊन अशी आगळीक करायला नको. सध्याच्या जपानी घटनेत सरकारने जपानी भूमीबाहेर कुठेही युद्ध करायला बंदी आहे. परंतु जग फक्त शस्त्रांनीच जिंकता येते असे नाही. महायुद्धानंतर जपानने उद्योगशीलता आणि कल्पकतेच्या जोरावर वीस वर्षांतच स्वतःला सावरले आणि व्यापारात प्रचंड वाढ केली. अगदी १९८० च्या दशकातच सोनी, टोयोटा सारख्या जपानी कंपन्या अमेरिकेत बस्तान बसवू लागल्या आणि त्यांनी अनेक अमेरिकन कंपन्या विकत घेतल्या. दुसऱ्या देशांत मुक्त व्यापाराच्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या अमेरिकनांना यावेळी पाहण्याशिवाय काहीच करता आले नाही. अगदी हाच कित्ता गिरवत चीनने २००० च्या दशकात अमेरिकन कंपन्यांमध्ये फार मोठी गुंतवणूक केली. तेव्हापासून आतापर्यंत चीनने जगभर अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत; त्यामध्ये चित्रपट कंपन्याही आल्याच. तसेच अनेक कंपन्यांचे गुंतवणूकदार चीनी आहेत आणि चीनी बाजारपेठही फार मोठी आहे. त्यामुळे चीनला दुखवायला कोणी तयार नाही.
तर या चित्रपट कंपन्यांना त्यांच्या चीनी मालकांनी रिचर्डला चित्रपटांत घेण्यास बिलकुल मनाई केलेली आहे. सर्व चीनी कंपन्या या चीनी सरकारच्या मालकीच्या असतात. म्हणजे या रिचर्डबंदी मागे सरकारचा हात ओघाने आलाच. रिचर्ड म्हणतो की चीनी गुंतवणूक असलेल्या सर्व कंपन्यांनी तर त्याला वाळीत तर टाकले आहेच पण कोणीही चीनी कलाकार किंवा तंत्रज्ञ त्याच्यासोबत काम करायला तयार नाही. तो पुढे म्हणतो, “माझ्या एका चित्रपटामध्ये एक चीनी दिग्दर्शक काम करीत होता. जेव्हा त्याला कळले की चित्रपटात मी आहे, तो एक आठवड्यात काम सोडून गेला. त्यानंतर मी त्याच्याशी एका गुप्त फोन यंत्रणेद्वारे संपर्क साधला तेव्हा त्याने मला सांगितले की जर त्याने माझ्यासाबत काम केले तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना कधीच चीन बाहेर पडता येणार नाही आणि त्यालाही कधी काम करता येणार नाही. या गोष्टीचा अर्थ आपण जाणतोच.” पण रिचर्ड अजून पर्यंत त्याची फिकीर करत नाही. तो म्हणतो, “मी तीन दशके पुरेसा यशस्वी राहिलेलो आहे त्यामुळे आता अशी कामे करणे मला परवडते” पण रिचर्डवरील एवढ्या रागाच कारण तरी काय?
तर कारण हे आहे की रिचर्ड हा बौद्ध आहे. तो नुसताच बौद्ध नसून बौद्ध धर्माच्या तिबेटन गेलुगपा पद्धतीचा उपासक आहे. दलाई लामांबरोबर त्याचे चांगले संबंध असून त्याची इंटरनॅशनल ‘कॅम्पेईन फोर तिबेट’ हि संघटना तिबेटी स्वातंत्र्यासाठी काम करते. चीनशी त्याची पहिली ठिणगी पडली १९९३ मध्ये, जेव्हा त्याने ऑस्कर सोहळ्याचे समालोचन करतांना तिबेटवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यामुळे त्याला पुन्हा ऑस्कर समालोचन करण्यास आणि चीन मध्ये प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली. त्याने २००८ साली तिबेटमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन हि केले होते.
या एका उदाहरणावरून चीनी लोकांचे देशप्रेम आणि चीनी सरकारची देशहितासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याची वृत्ती दिसून येते. चीनच्या विभाजनाबद्दल बोलणाऱ्या कोणाचीही चीनी लोक गय करीत नाही, आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांना आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून कुरवाळतो. आता या आठवड्यात झालेल्या प्रकरणानंतर आपल्यापैकी किती लोक चीनी वस्तू घेणे बंद करतील?
(हा लेख दैनिक तरुण भारतच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.)
प्रतिक्रिया
शेवटच्या तीन वाक्यांशी अगदी
चीनी वस्तु वापर न करण्या साठी
चीनी वस्तु वापर न करण्या साठी
आपल्यापैकी किती लोक चीनी
>>>या एका उदाहरणावरून चीनी
ठीक आहे, देशप्रेम जाऊ द्या
चीन जगभरच्या सर्व प्रभावी
संपादक मंडळ
कॉपीराईट
मीच
मेड इन चायना
यावरून एक गोष्ट आठवली
अप्रतिम माहिती
फार
ऍमेझॉन प्राईम वरील न्यू सिल्क