Skip to main content

मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?

मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?

Published on गुरुवार, 06/07/2017 प्रकाशित
माझे हे वैयक्तिक मत आहे .. कि मुली ह्या टाळण्यायॊग्य असतात ... पण काय करू देवाने सुरुवातीपासूनच या गोष्टीची दखल घेतलेली दिसत नाही आहे .. मला सख्खी एक बहीण आणि सख्ख्याचुलत चार बहिणी आहेत ... जोडीला आमच्या शेजारील दोन,, त्यांना भाऊ नाही म्हणून मी त्यांचा भाऊराया .. जरा कुठे उन्नीसबीस व्हायचं तेव्हा लगेच घरी वर्दी दिली जायची ... लहानपणी शिवी दिली... सांगा घरी .. कॉलेजमध्ये व्यसन केलं ... अहवालाची प्रिंट घरी पोचेतोवर मिळायची ... अख्ख लाईफ ज्या गोष्टीपासून लांब राहण्यात गेलं ... तेच आणि तेच येनकेन प्रकारे अवतीभवती गुणगुणत राहिलं.. स्त्री शक्तीचं वेळीच निवारण केलं नाही तर पुढे अनर्थ ओढवू शकतो .. माझे वैयक्तिक मत विचाराल तर मला फारसं गोड बोलावत नाही ... आणि खडसावलं समोरच्याला तर रडलेलं पाहवत नाही .... आपलं सर्वांचं मुलींबद्दल मत काय आहे ?

याद्या 10727
प्रतिक्रिया 52

होय मांजरावरूनच हा धागा आला ... अरे त्या मनीचे इतके धागे निघाले पण मूळ भलतेच निघाले ... म्हणुणच हे विषय आले .. होऊन जाऊ द्यात

अहो पाळीव प्राणी आपण .. या प्रकरणात सर्व वेगळंच असत गोगलगाय नि पोटात पाय ... स्त्री .. माता असो वा बहीण ... बायको असो वा मुलगी ... ती निष्ठेने समाज सुधारकांचे काम करत असते .... येनकेन प्रकारे आपल्या सवयीनमध्ये आडवी येत असते ... पेपर हाती घ्या .. बडबड चालू ... चहा परत मागा .. बडबड चालू .. ह्यामध्ये बायकोला आईची आणि बहिणींची पण साथ असते ... तोंडात काही मावा वगैरे घातले कि मग मोर्चे निघालेच म्हणून समजा ... अरे साला आपण जन्म काय फक्त ह्यांच्यासाठी घेतलाय काय ? तोंडात काही असले .. आणि त्यामध्ये कुणी प्रतिक्रियेने घासले ... कि जिलब्या तयार होत्यात मस्तपैकी ... काही कविता बनत्यात तर काही प्रतिक्रिया ... ह्यांना समजावून सांगणार कोण ? त्ये म्हणजे असं झालं कि मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे ...पण स्त्री मध्ये आली कि साली मती गुंग झाली म्हणून समजा ... मातीमोल होण्याशिवाय पर्याय नसतो .....

तुमच्या आधी टफींनी असेच काही वैचारीक (?) धागे काढून मिपाकरांना गाण्याच्या भेंड्या खेळायची संधी दिली होती.

In reply to by बबन ताम्बे

धागा वाचल्या बरोबर टफीची आठवण झाली. हा धागा लेखक ही टफीच आहे. हे स्पष्ट होत आहे. स्त्री द्वेष चुकीचा आहे. असहमतं.

In reply to by अभ्या..

किंवा दोघेही एकमेकांचे गुरु बंधु असतील. नाहीतर एकमेकांचे डायरेक्ट गुरुच असतील.

In reply to by पुंबा

मी सर्वात जुना असल्याने अधिकाराने विचारतो... हे टर्बोचार्ज्ड म्हणजे काय .. ओ सौरा बाय

In reply to by मोहनराव

तरीच म्हणतोय परत उत्तर का नाय अरे देवा , ह्यो तर भाय हाय पण सालं त्ये नाव असं काय काय तर म्हणे सौरा ऐकून म्या पण बनलो कि भौरा भिंगरी समजून गरगर फिरलोय मोहनराव तुम्ही चांगलंच आपटलंय धन्यवाद मार्गदर्शनाबद्दल चांगलीच घडली या आंतरजालावर अद्दल

In reply to by बबन ताम्बे

लिहिलेलं पहिलं पण परत मागावस वाटलं तुम्ही ते लिहिलं म्हणून बरं बरं वाटलं

अहो काय प्रतिमेचं घेऊन बसलायत राव टाका कि डावावर डाव रंगून देत नारीभक्तीच्या चर्चा बघूया तरी कोण संभाळतंय आपापल्या खुर्च्या ? खरं खोटं सारं निघेल भावाबहिणींचं प्रेम दिसेल युगानुयुगे तिचीच नाती तरीही सारे तिचेच गुण गाती मी देखील मानतो हे सत्य त्रिवार आपलंही जीवन असतं असत आपलंही एक सवयीचं शिवार सवयी सोडाव्या पण कश्या....अलवार... अलवार

In reply to by सूड

चालेल. धाग्याचे पहिले अक्षर 'म' असल्याने 'म' पासून शुभारंभ करीत आहे. मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग| 'ग' अक्षर आले आहे.

In reply to by जेनी...

चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचे झाड.करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी|

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन. कुन्या गावाचं आलं पाखरु बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं आपल्याच नादात...

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जीच्या गाण्यातलं क हे शेवटचं अक्षर घेऊन. कुन्या गावाचं आलं पाखरु बसलंय डौलात, न खुदुखुदु हसतंय गालात कसं लब्बाड खुदुखुदु हसतंय कसं कसं बघतंय हं आपल्याच नादात...

In reply to by सूड

तू तेव्हा तशी, तु तेव्हा अशी तू बहराच्या बाहूंची.. तू.. तेव्हा तशी तू ऐल राधा, तू पैल संध्या, चाफेकळी प्रेमाची.. तू.. तेव्हा तशी

In reply to by मुक्त विहारि

पूर्ण करतो हे गाणं.. ही चाल तुरू तुरू, उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात नागिण सळसळली.. इथे कुणी आसपास ना डोळ्याच्या कोनांत हास ना हळुहळू माझ्याशी बोल ना ओठांची मोहोर खोल ना तू लगाबगा जाता, मागं वळून पाहता वाट पावलांत अडखळली जशी मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात, नागिण सळसळली..

In reply to by दीपक११७७

खडकी दापोडी निगडी आकुर्डी चिंचवड वाकड की रावेतला कुटं कुटं जायाचं हनिमुनला राया कुटं कुटं जायाचं हनिमुनला

मला पण भेंड्या खेळायच्या आहे.

माझं काय म्हणणं, तुम्ही आपले श्रावण पाळा. नागपंचमीला नागाला कवटाळा. मग तुम्हाला असले टाळण्याजोगे प्रश्न पडणार नाहीत.

मला या आयडी ला पाहून चौकोनी कुटुंब मधील ओळी सुचतात. "मला कधीतरी माधवरावांच्या उगीचच कानफटात मारावीशी वाटते पण माधवराव कदाचित मला त्याचाही अर्थ विचारून घेतील"

बंधुभगिनींनो ,, फेटाळलं असत तर कबूल असतं व्यसनांत सार वसूल केलं असतं इतका कवटाळला गेलो एकाच माव्यावर आलो पण ह्या मुलींचं दिसत तसं नसत म्हणून जग पुन्हा पुन्हा फसतं असतं तुम्हाला सुरुवातीपासूनच भगिनी मानलंय यांतच आलंय सारं मुली खरं तर लांबच बऱ्या पुन्हा पुन्हा नको ...अंगात भिनाया ,,,ते प्रेमाचं घाणेरडं वारं.... जरा इथेच थांबतो आणि थोडीशी लाल करितो .... भगिनींनो हा तुमचा दादा होता आणि आहे,बरं का ... एक कॅसानोवा (छावा) लै पोरी मागे होत्या सार्याना नाही म्हंटल कायम जवळ ठेवला .. दारू न मावा रेकी करायची असते ..ती त्या गोपिकांवर ज्या आता इथे हयातच नाही गोकुळात सुखी त्या मी मुकुंद इथे बैसूनि ...निव्वळ तुमचे खेळ पाही