गुगल मँप्स वर रस्ता
आम्ही लवकरच सनावद ला पोहोचलो. तेथे बेडीया चा रस्ता विचारून बेडीयाच्या दिशेने गाडी निघाली. रस्ता नविनच
बनवला गेला होता. आम्ही दर ५कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोड ला लागलो. २०चे ४० किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता. पण काही की.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला.
आम्ही पटापट गाडीतुन ऊतरून फलका जवळ सेल्फीस घेतल्या.मी ऐकून होतो की रस्ता खराब आहे पण
ह्या फलका पासुन ते रावेरखेडी पर्यंत रस्ता बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले होते.
रावेर येथून 8 की.मी. होते. लवकरच आम्ही खेडी ह्या गावी पोहचलो. इथे एक माहिती भेटली रावेरखेडी ह्या अखंड नावाचे कुठलेही गाव नाही. रावेर व खेडी ह्या वेगवेगळ्या नावाचे दोन गावे आहेत. त्यापैकी बहूतेक रावेर ह्या गावात समाधी आहे.
ते ह्या बोर्ड वरून पण लक्षात येईल.
आम्ही गावात विचारपुस केली. समाधी अजून 2 किमी पुढे आहे अशे कळाले. त्याप्रमाणे एका चिंचोळ्या रस्त्यावरून गाडी वळवून पुढे निघालो. व पोहोचलो. गाडी अलीकडे लावून आम्ही पायी निघालो. समाधीस्थळ महेश्वर धरण प्रकल्पामुळे बूडणार आहे.तशा लाल खुणा येथील घरांवर घरांवर केल्या आहेत. असं मी कुठेतरी वाचलं होत पण मला अश्या कुठल्याही खुणा येथील घरांवर आढळल्या नाहीत समाधी जवळ पोहोचताच नजरेत भरेल असा फलक म.प्र. शासनाने लावलाय.
त्याच्या बाजुलाच श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांची पुर्ण माहिती पुरवनारा आणखी एक मोठा फलक लावलाय.
समाधीस्थळाच्या दरवाजा उघडाच होता. बाहेरच पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारोती चे दर्शन घेऊन आम्ही आंत प्रवेश केला. आत भरपूर मोकळी जागा आहे. उजव्या बाजूला श्रीमंत पेशव्यांच्या अस्थींची छत्री आहे. माझी छाती भारावलेली होती. एका खूप मोठ्या स्थळी आल्याचा खूप आनंद झाला होता. मी हात जोडून छत्री समोर उभा राहीलो. महाराष्ट्राला नर्मदेपल्याड पोहचवणार्या, जगातल्या शेवटच्या हिंदू राज्याला साम्राज्यात रुपांतरीत करणार्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करणार्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समोर ऊभा असल्याचा मला भास झाला. सर्वांनी समाधीचे दर्शन केले.
समाधीवर असलेला फलक
दर्शन घेऊन व फोटो काढून आम्ही एका चिंचोळ्या जिन्याने वर चढलो. बाजूलाच विशालपात्राच्या नर्मदेचे दर्शन झाले.
त्या ठिकाणी नर्मदेत एक बेट आहे. आज ह्या ठिकाणी काही नसले तरी पुर्वी नर्मदा फक्त येथूनच पार केली जायची. मराठ्यांनी येथे टोलनाका बसवला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या १ लाख फौजेसह ह्या ठिकाणी असतांना सतत १२ तास घोडदौड केल्याने अतीश्रमाने त्यांचे निधन झाले. ग्वाल्हेरच्या शिंदेंनी त्यानंतर इथे समाधी बांधली. आम्ही संपूर्ण समाधीला चक्कर मारूण बाहेर आलो. गाडीकडे निघालो. जातांना मी गावातल्या एकाकडे चौकीदार नारू बद्दल चौकशी केली. तो गावात कुठेतरी फिरत असेल असे त्याने सांगितले. आम्ही गाडीत बसून निघालो. पुढे कसरावद ~ महेश्वर~ धामनोद~ इंदौर असा प्रवास करून आम्ही शाजापुर पोहचलो.
ह्या आधी व ह्या नंतर आम्ही सांची, भिमबेटका, ऊज्जैन, आग्रा, ग्वाल्हेर, भोपाळ अनेक ठिकाणी फीरलो. पण इथे आल्याची सर अजून कुठेही जाऊन आली नाही.
(समाप्त).
आम्ही लवकरच सनावद ला पोहोचलो. तेथे बेडीया चा रस्ता विचारून बेडीयाच्या दिशेने गाडी निघाली. रस्ता नविनच
बनवला गेला होता. आम्ही दर ५कि.मी ला कुणाला ना कुणाला रस्ता विचारत होतो. माझा अंदाज होता की समाधी बहुतेक लोकांना माहीत नसेल. पण आम्ही ज्याला कोणाला विचारले त्याने प्रत्येकाने "पेशवा सरकार" बद्दल व्यवस्थीत माहिती पुरवली. बेडीया हुन आम्ही पीपलगोन रोड ला लागलो. २०चे ४० किमी झाले तरी समाधी येईना म्हणून चालक थोडा वैतागला होता. पण काही की.मी जाताच आम्हाला म.प्र. सरकारचा हा मोठा फलक दिसला.
आम्ही पटापट गाडीतुन ऊतरून फलका जवळ सेल्फीस घेतल्या.मी ऐकून होतो की रस्ता खराब आहे पण
ह्या फलका पासुन ते रावेरखेडी पर्यंत रस्ता बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले होते.
रावेर येथून 8 की.मी. होते. लवकरच आम्ही खेडी ह्या गावी पोहचलो. इथे एक माहिती भेटली रावेरखेडी ह्या अखंड नावाचे कुठलेही गाव नाही. रावेर व खेडी ह्या वेगवेगळ्या नावाचे दोन गावे आहेत. त्यापैकी बहूतेक रावेर ह्या गावात समाधी आहे.
ते ह्या बोर्ड वरून पण लक्षात येईल.
आम्ही गावात विचारपुस केली. समाधी अजून 2 किमी पुढे आहे अशे कळाले. त्याप्रमाणे एका चिंचोळ्या रस्त्यावरून गाडी वळवून पुढे निघालो. व पोहोचलो. गाडी अलीकडे लावून आम्ही पायी निघालो. समाधीस्थळ महेश्वर धरण प्रकल्पामुळे बूडणार आहे.तशा लाल खुणा येथील घरांवर घरांवर केल्या आहेत. असं मी कुठेतरी वाचलं होत पण मला अश्या कुठल्याही खुणा येथील घरांवर आढळल्या नाहीत समाधी जवळ पोहोचताच नजरेत भरेल असा फलक म.प्र. शासनाने लावलाय.
त्याच्या बाजुलाच श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांची पुर्ण माहिती पुरवनारा आणखी एक मोठा फलक लावलाय.
समाधीस्थळाच्या दरवाजा उघडाच होता. बाहेरच पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारोती चे दर्शन घेऊन आम्ही आंत प्रवेश केला. आत भरपूर मोकळी जागा आहे. उजव्या बाजूला श्रीमंत पेशव्यांच्या अस्थींची छत्री आहे. माझी छाती भारावलेली होती. एका खूप मोठ्या स्थळी आल्याचा खूप आनंद झाला होता. मी हात जोडून छत्री समोर उभा राहीलो. महाराष्ट्राला नर्मदेपल्याड पोहचवणार्या, जगातल्या शेवटच्या हिंदू राज्याला साम्राज्यात रुपांतरीत करणार्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करणार्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समोर ऊभा असल्याचा मला भास झाला. सर्वांनी समाधीचे दर्शन केले.
समाधीवर असलेला फलक
दर्शन घेऊन व फोटो काढून आम्ही एका चिंचोळ्या जिन्याने वर चढलो. बाजूलाच विशालपात्राच्या नर्मदेचे दर्शन झाले.
त्या ठिकाणी नर्मदेत एक बेट आहे. आज ह्या ठिकाणी काही नसले तरी पुर्वी नर्मदा फक्त येथूनच पार केली जायची. मराठ्यांनी येथे टोलनाका बसवला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या १ लाख फौजेसह ह्या ठिकाणी असतांना सतत १२ तास घोडदौड केल्याने अतीश्रमाने त्यांचे निधन झाले. ग्वाल्हेरच्या शिंदेंनी त्यानंतर इथे समाधी बांधली. आम्ही संपूर्ण समाधीला चक्कर मारूण बाहेर आलो. गाडीकडे निघालो. जातांना मी गावातल्या एकाकडे चौकीदार नारू बद्दल चौकशी केली. तो गावात कुठेतरी फिरत असेल असे त्याने सांगितले. आम्ही गाडीत बसून निघालो. पुढे कसरावद ~ महेश्वर~ धामनोद~ इंदौर असा प्रवास करून आम्ही शाजापुर पोहचलो.
ह्या आधी व ह्या नंतर आम्ही सांची, भिमबेटका, ऊज्जैन, आग्रा, ग्वाल्हेर, भोपाळ अनेक ठिकाणी फीरलो. पण इथे आल्याची सर अजून कुठेही जाऊन आली नाही.
(समाप्त).
वाचने
7612
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम ___/\___
व्वाह...!!!
सुरेख प्रवास झाला आवडले!
अप्रतिम!! तुमच्यासोबत आम्हीही
मस्तच लिहीलय. अपडेटेड माहिती मिळाली.
प्रवासवर्णन आवडले....
छान लिखाण !!
वा!
धन्यवाद!!!
In reply to वा! by जुइ
नेहमीचा पर्यटक मार्ग
आवडला हा भाग.
हे पटले नाही - पेशव्याचा
हो! तुम्ही म्हणताय ते बरोबर
In reply to हे पटले नाही - पेशव्याचा by मनो
मस्तं लिहिलं आहे. आवडले लेख!
"पेशवा सरकार"
हो!! नक्कीच भेट द्या माझ्या
In reply to "पेशवा सरकार" by II श्रीमंत पेशवे II